Skip to main content

सत्य साईबाबांचे नावच गूढ

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 25/04/2011 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला १९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल. १९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या. त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा) जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात) चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत) आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा. १. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ? सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे २. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या ३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ? (सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती) ---------------------- माझीही शॅम्पेन

वाचने 55706
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by गणेशा

बा गणेशा, खाली स्पावड्याला दिलेलं उत्तर वाच. बाकी सचिन ने कसलेसे चमत्कार करुन कुणाला लुबाडल्याच ऐकिवात नाही. उलट अधुन मधुन त्याचा मदतीचा हात कसा सुटतो ह्या बातम्या ऐकल्या आहेत. असो, जर नकळत कुणाच्या बाबाच्या लंगोटी/धोतराच्या कासोट्याला हात घातला असेल तर क्षमस्व. या धाग्यावर उगाच आवांतर नको. खवत स्वागत आहे.

In reply to by गणपा

आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या. गणपाशी सहमत आहे. मला तर उगाच मानसिक त्रास झाला. बाकी, सचिन एक हाडामासाचा माणूस आहे आणि त्याच्या स्वत:च्या अशा काही श्रद्धा- भावना आहेत याच्याशी सहमत होता येईल. पण कालच्या घटनेने सचिनने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, नाष्टा केला नाही, आणि आज सच्याला रडतांना पाहून [सच्यानं रडू नये असे म्हणायचं नाही. पण, हवेत हात फिरवून सोन्याची लॉकेटं काढणार्‍या माणसासाठी इतकं भाविनक व्हावं. ] सालं आपलं वेडं क्रिकेट प्रेम आवरलं पाहिजे असं वाटायला लागलं आहे. :( भविष्यात सच्या असा म्हणाला की, माझा स्क्वेअर कट, पुल,स्ट्रेट ड्राईव्ह, थर्डमॅनच्या खेळाडूच्या डोक्यावरुन मारलेला सिक्स, पॅडल स्वीप, आणि क्रिकेटच्या पुस्तकात नसलेले फटक्यांची प्रेरणा 'बाबा'च आहेत असे म्हटले तर मी काहीही वाटून घेणार नाही. :( अवांतर : पुट्टापर्थीच्या या राजूबाबानं जाता-जाता लै प्रॉब्लेम वाढवून ठेवले आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं आपलं वेडं क्रिकेट प्रेम आवरलं पाहिजे असं वाटायला लागलं आहे.
अगदी बरोब्बर.. मैदानाबाहेर तो एक व्यक्तिमत्व म्हणुन त्याच्या विचारांना स्थान देण्याची गरज आहे असे वाट्टे..

बाकी आपला शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही. गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज हे पण भोन्दुच होते म्हणायचे

In reply to by स्पा

गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज हे पण भोन्दुच होते म्हणायचे
अमेरिकेट शरिरभर टॅटू काढुन हार्ले डेव्हिडसन वर आर्धे कलिंगड घालुन फिरणारांना गोंदवलेकर महाराज म्हणतात , ते कधी पासुन नॉन भोंदु झाले ? :) अधिक प्रकाश संपादिकेने टाकावा ;) बाकी गजानन म्हाराज म्हणजे तेच का , दिगंबर अवस्थेत चिलीम ओढणारे ? त्यांनी त्यांच्या वर्तनातुन व्यसनं करण्याचा संदेश दिल्यामुळे मला ते आवडत नाहीत. बाकी स्वामीसमर्थ लोकांना शिवीगाळ करायचे , उद्धट बोलायचे असे ऐकुन आहे . अर्थात कोणाच्या भावना दुखवने हा हेतु नसला तरी काही ऐकीव फॅक्ट्स उघड कराव्याश्या वाटल्या :) आणि मुद्दान सत्यसाईबाबाच्या धाग्यावर बाकी श्रद्धास्थाने घुसवणार्‍या मोन आगाशेचे कौतिक वाटले :)

In reply to by टारझन

टारझन राव, तुमच्या प्रतिक्रियेमुळे नुकत्याच ढकलपत्रातून आलेल्या एका खळबळजनक लेखाची आठवण झाली. हवा असल्यास पाठवतो.

In reply to by टारझन

तु ज्यांना गोंदवलेकर म्हणतोस ते महाराज नाहीत आणि स्पावड्या म्हणतो ते भोंदु नाहीत. बाकी तुमचे चालु द्यात.

In reply to by स्पा

गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ महाराज हे पण भोन्दुच होते म्हणायचे
स्पावड्या माझं वाक्य पुन्हा एकदा नीट वाच बरं. बाकी आपला * शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही. *इथे हा शब्द स्वतःबद्दल आदरार्थी बहुवचन म्हणुन वापरलाय. (आता इतर कुणी आदर देत नसला म्हणुन स्वतः पण देउ नये की काय ? ;) )

In reply to by स्पा

आपले तेह्तीस कोटि देव काय कमी अहेत? नवे नवे बाबा मन्ड्ली कशाला हवेत? श्रद्धेने देव भक्ति करा, तेच खूप अहे. सन्त ज्ञानेश्वर, तुकाराम अहेत ना. उद्या मी पण असेच कहितरि बाबा म्हणून प्रसिद्धि च्या मगे लागू शकतो. ह्याला अन्त नाही....कुठे तरि शेवट झालाच पहिजे.

सत्य साई स्वःता देव होते असे त्यानी जाहिर केले असताना देखिल त्यांचे हरामखोर भक्त त्याना बर वाटावे म्हणुन इतर देवांची प्रार्थना करत होते,त्यामुळे सत्यसाइबाबानी देह त्याग केला.ही अंतर्गत गोट्यातील बातमी आहे. स्वामी समर्थ हे शिवराळ होते हे सत्य आहे कारण विनाकारण लोक त्याच्या भोवती जमा होवुन त्याना उगाचच पिडत असत. समर्थानी पैसे जमा करुन कधीच कोठे आश्रम किंवा वाडा बांधला नाही. एक लंगोट सोडली तरी त्यानी काहीच जवळ बाळगले नाही.त्याच्याशी तुलना पाहुन वाईट वाटले.

In reply to by वेताळ

ही अंतर्गत गोट्यातील बातमी आहे
हरे राम ! राम राम हरे हरे ! कोण कुठूनप्राण-त्याग करेल ते काही सांगता येत नाही !

ढिस्क्लेमरः आपण सत्यसाईबाबाच काय कोणत्याच बाबाचा वा देवाचा भक्त नाही. इथे एक सूर असा दिसतो आहे की चमत्कार हे खोटे असल्याने बाबाही खोटा आहे. हा तर्क थोडा फसतो आहे असे आमचे मत आहे. चमत्कार ही हातचलाखी असेल म्हणून सोडून देऊ. पण केवळ त्यांच्या चमत्कारांना भुलून एवढी प्रचंड भक्तगणांची संख्या त्यांच्यामागे जाईल हे म्हणणे धाडसाचे आहे. ती हातचलाखी कदाचित मार्केटिंग गिमिक असू शकेल पण केवळ तेवढ्यानेच माणूस एवढा बडा अध्यात्मिक गुरू होते म्हणणे अंमळ अतिशयोक्ती करणारे ठरेल आणि बहुसंख्य सेलेब्रिटी भगतगण डोक्याने एखाद्या अशिक्षित माणसाच्या पातळीवर आहेत असे म्हटल्यासारखे होईल. हा त्यांच्यावर अन्याय आहे असे मला वाटते. तात्पर्य, त्या चमत्कारापलिकडे असे काय होते की ज्यामुळे हा माणूस एवढा मोठा झाला याचे उत्तर प्रथम द्यावे लागेल, मग ते योग्य/अयोग्य, नैतिक/अनैतिक आहे याबाबत चर्चा करता येईल. थोडक्यात त्यांची शिकवण काय होती, तिचा गाभा काय होता, ते अध्यात्मिक अनुभूती कोणत्या मार्गाने साध्य करू पहात होते, त्यांचे मार्ग कोणते होते हे प्रथम पहावे लागेल. त्याचे मूल्यमापन करूनच त्यांच्या मोठेपणाबद्दल अथवा खोटेपणाबद्दल निश्चित विधान करणे योग्य ठरेल. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सवलती वगैरेंबद्दल परस्परविरोधी विधाने ऐकण्यात आली आहेत. वर एका हत्येचा आरोपही आला आहे. (असाच आरोप एका शंकराचार्यांवर आहे अशी आमची माहिती आहे.) त्यावरून कदाचित एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रश्नचिन्ह नक्कीच लावता येईल. परंतु त्यांचे अध्यात्मिक गुरू म्हणून असलेले स्थान त्यामुळे बाधित होत नाही, शंकराचार्यांचेही नाही वा सत्यसाईबाबांचेही. त्यासाठी त्यांच्या शिकवणीतील विसंगती, घातक मूल्ये इ. बाबत सप्रमाण विधाने यायला हवीत. तरच ते स्थान डळमळीत होईल. आणि आतापर्यंत आलेल्या प्रतिसादात अशा प्रकारचे मूल्यमापन मला दिसले नाही. ढिस्क्लेमर २: मला स्वत:ला सत्यसाईबाबांच्या शिकवणुकीबाबत काडीचीही माहिती नसल्याने त्याबाबत काहीही विधान करण्यास मी 'इलिजिबल' आहे असे मला वाटत नाही. परंतु त्यांचे तथाकथित चमत्कार हे हातचलाखीचे प्रकार होते यावर - समोर आलेले पुरावे पुरेसे वाटल्याने - माझा विश्वास आहे.

In reply to by रमताराम

सुरुवात अशा हातचलाखीने झालेली असु शकते. सुरुवात करताना लोकांना चमत्काराने भुलवुन एकदा पंथ गोळा झाला की मग तो वाढवणे म्हणजे व्यवस्थापन स्कील. त्यामुळे चमत्कार करण्याचे दावे महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. (घासू गुर्जींनी यावर मागे लेखात सविस्तर चर्चा केली होती.) अर्थात ते चमत्कार जाहीररीत्या करतात हे माहितच असेल, म्हणजे चमत्कार हे शस्त्र ते प्रसार प्रचाराकरता वापरतात हे नाकारता येणार नाही. त्यांचा इंटरनेटवर शोध घेतला असता ४-५ 'ओळखींमध्ये' पहिल्या तीनात त्यांच्या चमत्काराचा उल्लेख आहे. म्हणजे ते चमत्कारा करता (मुळे सुद्धा) ओळखले जातात हे नाकारता येणार नाही. मुळात बाबा जर मोठे अध्यात्मिक (की फिद्यात्मिक) असतील तर त्यांना अशा खालच्या दर्जाची हातचलाखी करण्याचे कारण काय असा प्रश्न का विचारु नये? एखादी व्यक्ती फ्रॉड करत असेल तर तिच्या इतर कृत्यांवर संशय येणे सहाजिकच आहे. त्याशिवाय बाबांवर फार पूर्वीपासुन आरोप आहेत. यु ट्युबवर त्याची बहुतेक तासाभराची डॉक्यु मिळेल, त्याशिवायही अनेक लेख/आर्टिकल्स शोध घेउन मिळतील. बाबांनी लहानमुलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप सुद्धा त्यांच्यावर आहेत. वरती किडनी वगैरे आरोपही झाले आहेत. इतकी संपत्ती असलेल्या बाबा लोकांना भारतात सदर प्रकरणे दडपणे अवघड नाही. (यावरुन आठवले, नित्यानंद स्वामींची दाक्षिणात्य नटीबरोबर त्याच्या शयनगृहात केलेल्या शृंगाराच्या कहाणीचे पुढे काय झाले? सहजच शोध घेता असे दिसते की नित्यानंद ज्ञानपीठाच्या लोकांनी त्या व्हिडीओचे कॉपीराईट सांगून जवळजवळ संपूर्ण इंटरनेटावरुन तो व्हिडीओ काढून टाकला आहे. युट्युब प्लेअरचा एकही व्हिडीओ दिसत नाही. असे असता, सचिन इतर राजकिय नेत्यांनी पब्लिकली तरी त्यांचे भक्त असल्याचे दाखवू सूद्धा नये, अशाने त्यांचे महत्त्वच वाढते. सचिन वैयक्तिक जीवनात अंधश्रद्धाळू आहे हे सर्वांना माहित आहे, त्याच्या आणी खेळाचा काही संबंध नाही, पण "इफ यु आर अ पब्लिक पर्सन यु डोन्ट हॅव अ प्राईव्हेट लाईफ".

In reply to by Nile

मुळात बाबा जर मोठे अध्यात्मिक (की फिद्यात्मिक) असतील तर त्यांना अशा खालच्या दर्जाची हातचलाखी करण्याचे कारण काय असा प्रश्न का विचारु नये? एखादी व्यक्ती फ्रॉड करत असेल तर तिच्या इतर कृत्यांवर संशय येणे सहाजिकच आहे.
कल्पना नाही. येशूच्या खात्यावरदेखील लोकांना हस्तस्पर्श करून बरे करणे, बुधल्यातील पाण्याची हस्तस्पर्शाने दारू* करणे, वगैरे 'चमत्कार' दर्ज आहेत. * मागे पुण्यात 'पेट्रोलमधील एथॅनोलमुळे टाकीत पाणी साचते' वगैरे दावे झाल्याचे ऐकले होते, त्या एथॅनोलचे मूळ 'असले' काही असावे काय, अशी शंका येऊ लागते. (प्रतिसादाच्या उर्वरित भागाशी सहमत.)

मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच .. बरी सुटका झाली .. त्याचं तोंड पाहिलं की मेंढराची आठवण यायची =))
आमची प्रतिक्रीया अशीच आहे. खरं फार लवकर मरायला हवा होता पण मेला एकदाचा. आम्हीतर तो सुदिन साजरा केला.

९०% मते सत्यसाईबाबा देव नव्हते असे आहेत. आज मला अशा मतांचा आग्रह असणार्‍या मिपाचा सभासद असण्याचा आनंद होतो आहे. त्यांना मिळणार्‍या दानातून त्यांनी हॉस्पीटल्स काढली, हे केले, ते केले. अरे ते सारे मोठ्या लोकांनी दिलेल्या पैशातून केले ना? हे सारे करतांना एवढी संप्पती मागे कशी राहीली? तिचा विनीयोग कसा केला नाही? वर गणपा म्हटला तेच खरे. सत्यसाईबाबा गेल्यानंतर रडणार्‍यांचे मगरीचे अशृ आहेत असे वाटते.

प्रतीक्रीया पण वास्तववादी.

आमचा क्रिकेट चा देव सुद्धा रडला . अवांतर आम्ही कधीपासून कल्की अवताराची वाट पाहत आहोत . आमचे साई भक्तांच्या हाकेला देऊन मृत्युच्या दाढेतून परत आले होते . हा साई फकीर म्हणून प्रसिद्ध होता . असो ते ४०००० कोटी सरकार च्या तिजोरीत जमा करा सिंधुताई सकपाळ ह्यांना अजून पुरेशी अनाथ मुलांसाठी मदत मिळाली नाही आहे .आणी ह्यांना मात्र एवढे ................ सर्व पैसा सेवाभावी संस्थांना व विधार्भातील व भारतातील शेतकऱ्याला द्या .

In reply to by निनाद मुक्काम …

४०००० कोटी सरकार च्या तिजोरीत जमा करा
अरे वा. आणि मग आपले सरकारी मंत्री/नोकरशहा तोच पैसा स्विस बँकेत ठेवणार आणि आपल्या पोराबाळांचे कल्याण करणार. सत्य साई हॉस्पिटल पाहिले आहे का? नसेल तर एकदा तेथील सेवा,सुविधा पाहून या. समाजातला एक उपेक्षित गरीब वर्ग बाबांच्या निधनाने का हळहळला असावा ते कळेल. तिथे दिल्या जाणार्‍या सुविधांबद्दल अब्दुल कलाम काय म्हणतात पहा- I can see god's mission being carried out here. The doctors and staff looked to me as angels अनेक डॉक्टर्स्,तज्ञ तेथे मोफत सुविधा पुरवतात. सत्य साईबाबा चमत्कार करतात म्हणून हे सगळे झूट आहे, ही बनवाबनवी आहे असे वाटत असेल तर प्रश्न मिटला.

In reply to by चिरोटा

@चिरोटा साहेब लोकांनी दिलेली संपत्ती लोकांसाठी खर्च करणारे साईबाबा मोठे आणी बरेच काही ............ तर स्व कष्टाने मिळवलेले अब्जावधी संपत्ती मधील अर्धी समाजासाठी देणारे बिल गेट्स व वॉरेन साहेबांना काय म्हणायचे . अगदी भारतातील उदाहरण द्यायचे तर जाणता राजा ह्या महा नाट्यातून मिळालेली संपत्ती शिव सृष्टी निर्माण करण्यासाठी खर्च करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे ह्यांना काय म्हणायचे .? अभय बंग किंवा प्रकाश आपटे .व कोणत्याही वी आय पी व श्रींमत देणगीदार नसतांना अनाथांची आई असलेल्या सकपाळ बाईंना काय म्हणायचे ? व जो गरीब वर्ग त्यांच्या मृत्युनंतर रडला त्यांना अंत्य दर्शन सचिन सारखे व्यवस्थित घेता आले का ?

सत्य साईबाबांच्या निधनाची वार्ता समजल्या वर लक्षावधिंच्या गळ्यातला ताईत सचिन याने वाढ दिवस साजरा केला नाहि.. स्वतास खोलीत कोंडुन घेतले... तसेच बाबांच्या अंत्यदर्शनाला गेला असता त्यास अश्रु आवरले गेले नाहि..या गोष्टीवर ब~याच ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली.... तसेच मिडियाने पण याला अमाप प्रसिद्धि दिली...खरे तर..अनेक देशविदेशातिल मान्यवर बांबांच्या निधनाने व्यथित झाले हदरले...पण फोकस व चर्चा सचिन बाबत होति.. सचिनची बाबा वर असलेली श्रद्धा लोकांना खटकते असे चित्र आहे का?

In reply to by अविनाशकुलकर्णी

नक्की माहित नाही. पण नेहमी 'समाज प्रबोधना'चे काम करणार्‍या मराठी वृत्तपत्रांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केलेय. सामना,लोक्सता,मटा कोणीच साईबाबांविषयी अग्रलेख लिहिलेला दिसत नाही आहे.

मी काही सत्य श्री साईबाबांना भेटलेलो नाही त्यामुळे त्यांच्याबद्दलचे सर्वच ऐकीव. म्हणून त्यांचा समर्थकही नाही अथवा विरोधकही नाही. त्यामुळे खालील प्रतिसाद हा देखील समर्थन अथवा विरोधातला नाही... मात्र येथे त्यांच्यावर तोंडसुख घेणार्‍यांना इतके नक्की विचारावेसे वाटते की त्यांनी अथवा त्यांच्या गणंगांनी तुम्हाला फसवले आहे का की ज्यामुळे आज इतके तावातावाने बोलावेसे वाटते? जर तसे असेल तर अवश्य अनुभव येथे सांगावात... बाकी त्यांच्या बद्दलच्या चमत्कारांबद्दल आणि सेवांबद्दलच बोलायचे असले तर तसे मदर तेरेसांबद्दलही बोलता येईल, ज्यांना तर जगाने नोबेल पारीतोषिक दिले आणि भारत सरकारने भारतरत्न दिले... इतकेच नाही तर अंत्ययात्रेस जो मान राष्ट्रपिता गांधीजींना दिला होता तो दिला गेला. त्यांच्या चमत्काराला पोपने मान्यता दिली आणि संतपदासाठी पुढे नेले. नशिब! आपल्याकडे पब्लीकच बाजूने अथवा विरोधात ठरवून एखाद्याला संत करते अथवा गुंड ठरवते! पण त्यांच्यावर कधी अशी टिका कोणी केल्याचे आठवत नाही. (हे मी मिपाकरांना उद्देशूण म्हणत नाही. मला माहीत आहे, तेंव्हा मिपा नव्हते. :-) कुठल्याही व्यक्तीस नाही पण ह्या वृत्तीस नक्कीच उद्देशून बोलत आहे). बाकी. रमताराम यांच्या प्रतिसादाशी सहमत. प्रकाशरावांनी दिलेले उदाहरण जर एकमेवच असेल आणि ते देखील चित्रलेखेतले असले तर केवळ त्यावर अवलंबून राहून निष्कर्ष काढणे मला योग्य वाटणार नाही. कारण नाईलने भारतात प्रकरणे जशी दाबता येतात असे म्हणले आहे, त्याच्या उलट पण म्हणता येते. (खोटी प्रकरणे तयार करता येतात). असे म्हणताना मी प्रकाशरावांवर अविश्वास दाखवत नाही आहे! :-) कलामांच्या हिंदूस्थान टाईम्स मधील लेखातील साईबाबांच्या सामाजिक कार्याबद्दलचे ठळक मुद्दे जाणवले ते असे: Value-Based Education, Water Mission, Healthcare, Project Management. प्रतिभा पाटलांनी देखील त्यांच्या शोकसंदेशात याच गोष्टीवर भर दिला आहे. आयबीएन वरील माहितीप्रमाणे:
The demise of Satya Sai Baba came as a deep shock for those are engaged in various social programmes launched by the godman through his trust in Andhra Pradesh. Prominent among the programmes started by the Sathya Sai Central Trust is Sri Satya Village Integrated Programme (SSVIP) under which 212 villages in East Godavari district were provided drinking water in a phased manner. Another programme, the Sri Sathya Sai Drinking Water Project (SSSDWP), launched on January 20, 2008, covers 25 tribal-dominated villages in East and West Godavari districts, an official of the project said on Sunday.
अजून काही माहिती येथे देखील मिळेल. आता राहीला सचिनचा प्रश्न. तो पब्लीक फिगर असला तरी त्याच्या कर्तुत्वावर आहे. जर त्याला कोणी म्हणाले असते की त्याने स्वतःपेक्षा मोठ्या, गुजराथी मुलीशी लग्न का केले, तर आपण ऐकून घेऊ का? तो त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. तेच साईबाबांसंदर्भात मी समजेन. त्याने कधी कुणाला साईबाबांच्या मागे लागा म्हणून सांगितले नाही की पैसे द्या म्हणून सांगितले नाही. बर सचिनचा आदर्शच घेयचा असेल तर त्याने त्याच्यावर अचानक आलेल्या दु:खद प्रसंगाला देखील संयमित तोंड देऊन १९९९ साली परत वर्ल्ड कप खेळायला जायला कमी केले नव्हते आणि कर्तव्यात (कामात नाही) चुकारपणा केला नव्हता, ते का नाही लक्षात ठेवायचे? आजही भले त्याच्या डोळ्यातून पाणी आले असेल आणि खोली बंद केली असेल, पण तो माध्यमांच्या मागे लागला होता का की कसेही करा आणि याला प्रसिद्धी द्या म्हणून? शिवाय त्यावेळेतही त्याचे कर्तव्य करण्यात तो चुकार ठरला आहे का? मग कशाला त्याला नावे ठेवा?

In reply to by विकास

सचिनबद्दलच्या मतांशी सहमत आहे. तसेच सत्यसाईबाबा फ्रॉड होते, तर ते पकडले गेले किंवा त्यांचे पितळ उघडे पडले अश्या गोष्टी झाल्यावर सर्वसामान्य माणसाला आनंद झाला तर एकवेळ समजु शकते, पण ते मेले तर आनंद व्हायचे काय कारण हे कळले नाही. थोडक्यात तुम्ही कंबोडियात रहात असाल आणी पॉल पॉट मेला तर तुमचा आनंद मी समजु शकतो पण इतर कोणी मेल्याने तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या सुधारणावादी, निधर्मीवादी, विज्ञानवादी वैगेरे वैगेरे वादी प्रवृत्तीपेक्षा माणुसकीचा अभाव चिंताजनक आहे. तुमचा नसलेला आमचा असलेला देव तुमचे भले करो.

In reply to by विकास

विकास तुमची प्रतीकिर्‍या अशांता: पटतेय. चर्चा चांगली चालू आहे , लेख लिहील्यानंतर बर्‍याच प्रतिक्रिया आल्यात पण काही पश्न अजूनही अनूत्तरीत वाटतात प्रसार माध्यमांची अनाकलनीय भूमिका खर तर मुद्दामन मी चंद्रास्वामिंचा उल्लेख टाळला ते एक यशस्वी(?) मध्यस्थ होते किंबहुना सर्व मीडिया मध्ये कुठेना कुठे त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभाग समोर येत राहतो पण सत्य-साईबाबा बद्दल अस खात्रीने म्हणता येत नाही. मिपा , उपक्रम किंवा ई-सकाळ अश्या प्रतिक्रिया देता येणार्‍या (सोशल मीडिया) माध्यमातून हे तरंग उमटत राहतात. स्वता:ला पुरोगामी म्हणणार्‍या कुठल्याच माध्यांनी चमत्कार करणार्‍या बाबांचा अंत झाला किवा काही लोक त्याचा निधानाने तथाकथित(?) आनंदी झाले अस काहीही सांगत नाही आहेत. सचिन / सुनील आणि सत्य साईबाबा सचिन किंवा सुनील नुकतच त्यांच अंतिम दर्शन घेतल इत्यादी. त्याना अध्यमीत्‍क गुरू मानून त्यानी जे केल कदाचित योग्य केल अस असाव पण यामुळे लोकांच्या मध्ये खळबळ माजू नये म्हणून त्यानी नक्की कश्या प्रकारे मार्गदर्शन केल हेही सांगितल नाही. बर एकीकडे त्याना मध्यस्थ म्हणाव तर सचिन सारख्या महा-मानवस त्याची काय गरज. म्हणजे कुठेतरी काहीतरी गफलत असावी की त्यांच्या वर टीका करण्याराना ते कळलेच नाही अस म्हणाव? अध्यमिक रोबिनहुड(?) श्रीमन्ताना लुटून गरिबाना संपत्ती वाटणारा रोबिनहुड किंवा तस्त्सम व्यक्तिरेखा सामन्याननी नेहमी नायक म्हणून स्वीकाराल्या गेल्या आहेत. हे कदाचित त्याचच उदाहरण असाव ? अश्या नायकानी खून केले तरी ते माफ केले जातात तर जादू-टोणा तर किरकोळ बाब. थोडकायात हे प्रकरण अतिशय गुंता-गुंतीच आहे म्हणून गूढ अर्थाने शीर्षक दील आहे ! बाकी चालूद्या !

In reply to by माझीही शॅम्पेन

थोडकायात हे प्रकरण अतिशय गुंता-गुंतीच आहे म्हणून गूढ अर्थाने शीर्षक दील आहे ! बाकी चालूद्या ! गुंतागुंतीचे आहे हे मान्यच आहे. आणि आपण गूढ म्हणले त्यात काही गैर नाही. स्वता:ला पुरोगामी म्हणणार्‍या कुठल्याच माध्यांनी चमत्कार करणार्‍या बाबांचा अंत झाला किवा काही लोक त्याचा निधानाने तथाकथित(?) आनंदी झाले अस काहीही सांगत नाही आहेत. अहो स्वतःला पुरोगामी समजणारी माध्यमे राशीभविष्य छापतात, अनेक बुवा-बाबा-बायांच्या कार्यक्रमाबद्दल छापतात अथवा दाखवतात, कारण वाचकवर्गाच विचार असतो. येथे तर अनेक दिग्गज हे साईबाबांचे भक्त अथवा त्यांना मानणारे, त्यांना वेडं कसे ठरवायचे? आणि त्यातील कोणीही त्यांच्या चमत्काराचे कौतूक केलेले नसताना. त्यामुळे चमत्काराचा उल्लेख सोडून साईबाबांची बातमी आली आहे. त्यात काही गैर नाही. मात्रं पुरोगाम्यांना आनंद होण्यासाठी नक्की त्यांनी त्यांचे काय बिघडवले होते हे पण समजले पाहीजे... केवळ पुरोगामी म्हणून आधी उल्लेख केल्याप्रमाणे चमत्कारासाठी संतपद मिळवणार्‍या मदर तेरेसाबद्द्लही असे का वाटले नव्हते, ज्यांच्या समाजसेवेबद्दल ही सेक्यूलर/विज्ञानवादी पाश्चात्यांनी ताशेरे ओढले पण आपण मात्र गप्प राहीलो? मला एक मात्र (खरचं) प्रश्न पडला आहे: सत्य श्री साईबाबा शेवटपर्यंत चमत्कार करत होते का? तसेच यातील नक्की कोण कोण चमत्कारामुळे त्यांच्या जवळ गेले? त्याना अध्यमीत्‍क गुरू मानून त्यानी जे केल कदाचित योग्य केल अस असाव पण यामुळे लोकांच्या मध्ये खळबळ माजू नये म्हणून त्यानी नक्की कश्या प्रकारे मार्गदर्शन केल हेही सांगितल नाही. काही गरज नाही... त्यांचे खाजगी जीवन आहे. कुठल्या सायकॅस्ट्रीस्ट कडे गेले/ कौन्सिलरकडे गेले तर सांगायला हवे का? बरं असे सायकॅस्ट्रीट्स (लांबून ;) ) बघितले आहेत ज्यांना समाजात बिथरलेले पाहीले आहे पण तरी लोकांना सुधारू शकता. मग केवळ ते विज्ञानाचा आधार घेतात म्हणून आपण आक्षेप घेतो का? बर एकीकडे त्याना मध्यस्थ म्हणाव तर सचिन सारख्या महा-मानवस त्याची काय गरज. मध्यस्थ नसतात तर कौन्सिलर असू शकतात. रामाला ईश्वरी अवतार समजले तरी वसिष्ठांनी त्याला आलेल्या औदासिन्याच्या क्षणाला उपदेश केला, त्यातून योगवसिष्ठ तयार झाले. कृष्णाला पण सांदीपनी मुनींकडे शिकायला जावेच लागले होते. किंबहूना आपण सर्वेसर्वा नाही ह्याची सचिनला जाणीव आहे असे म्हणेन. (आता साईबाबा हा त्याने शोधलेला मार्ग होता. त्यात वाहवत गेला नसला तर काय बिघडले?) अध्यात्मिक रॉबिनहूड का ते माहीत नाही तसेच प्रकाशरावांनी मांडलेल्या मुद्याबाबत देखील माहीत नाही. त्याची चौकशी नीट करणे यात काही गैर नाही. मात्र न करताच बोलणे पटणार नाही. केवळ साईबाबांसंदर्भातच नाही तर इतर कुणाच्याही बाबतीत....

In reply to by विकास

मनुष्य हा सामाजिक प्राणि नक्की आहे आहे पण जशी त्याची वैचारिक गरज आहे तशी तशीचे त्याची भावनिक गरज ही आहे अन अध्यात्मिक गरज ही आहे अन कुठेतरी ती भावनिक गरज हे बाबा / बुवा लोक्स पूर्ण करताना आढळतात. मग बाबाने दिलेली साधी राख असो, डोक्यावर ठेवलेला हात असो किंवा मग त्याचे ते प्रेमळ बोलणे असो हे कुठेतरी त्या क्षणाला अदभूत अनुभुती त्या त्या व्यक्तीला देत असेल. मानस शास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहीले तर प्रत्येकाला त्याची गरज आहे अन कुठेतरी आजच्या टेंन्शन युक्त आयुष्यात fatherly / motherly figure म्हणून हे बाबालोक पुढे येत आहेत. कदाचित त्याची कारणे आजची ढासळलेली कुंटुब व्यवस्था असेल जिथे संयुक्त कुटुंब पद्धत न राहता ती Nuclear झाली आहे घरात आजी आजोबांचे स्थान हळू हळू हे बाबा लोक घेत आहेत पण ते समाजाला कुठे तरी कणा नसलेले ही बनवत आहेत जिथे विचार करण्याची गरज उरत नाही अन फ़क्त चमत्कारानेच काम होते हे कुठेतरी भितीवह आहे जेव्हा नेते हे Trasnformational न रहाता Transactional होतात अन सर्व काही व्यवहारावर अवलंबून रहाते तेव्हा कुठेतरी ते समाजाला नक्कीच खोल दरित घेऊन जाणारे आहेत. "तूम्ही मला मते द्या मी तुमच्यासाठी अमुक अमुक करतो" हेच आजच्या नेत्यांचे गुण आहेत मग काहीही न मागता हा बाबा मला देतोय अन माझ्यातील सकारात्मक गुण माझ्या डोक्यावर हात ठेवून ते बाहेर येतात अन मी प्रेरणामय होतो तर मग मी त्या आनंदमय क्षणी वाट्टॆल ते पैसे स्वखुशिने द्यायला तयार होतो कारण बाबांचे गोड बोलणे !! असेच कुठेसे या वलयांकीत लोकांबरोबर झाले असेल कारण त्या क्षणाला ज्या मायेची त्यांना गरज असते ती ही बाबा लोक पुरवतात त्याक्षणाला त्यांच्या किंवा कुणाच्याच विचारांना अन तर्कबुध्दीला काडी मात्र महत्व नाही कारण एक मानवी स्वभाव म्हणून ते वलयांकित माणसे एक भावनिक प्राणी आहेत.