महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी
विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची.
कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो
कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो.
जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी
ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी.
लढण्यासाठी जन्म आपुला, हेच मजला ठाव असे
हार्-जीत तर चालायाचीच, मजला त्याचे गम्य नसे.
संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा
भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा.
चाकोरीत राहुनी मी, डाव कधी ना मांडला
फेकले तिथेच फासे जेथे, अद्द्याप कुणी ना जिंकला.
वळुनी मागे अतीत बघता, माझेच मजला वाटते भय
फिरुनी आगीत चाललो मी, आगीचीच मला सवय.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6977
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडले
चुकीची दुरुस्ती
In reply to आवडले by अमोल केळकर
केवळ अप्रतीम!
+१ तात्या.
In reply to केवळ अप्रतीम! by विसोबा खेचर
हार आणि जीत
िशवाजीमहाराजांवर कवन?
आर्य
छानच काव्य.
जबरदस्त
मस्त
छान
भाई व्वा....
धन्यवाद...!
चेतन तुमचे पण आभार
संकटांना
सुन्दर
धन्यवाद
खुप्च चान