कविता.....
कविता कराव्या लागत नाहीत,
त्या नकळतच होत असतात ।
मनातल्या भावनांना जसे,
शब्दांचे आधार मिळत असतात ।
जुळवायचीच म्हणून,
वाक्यांतील यमके जुळवायची नसतात ।
वरच्या ओळींची खालच्या ओळींशी,
ओढून ताणून नाती जोडायची नसतात ।
सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या,
कवीतेतून ह्या मांडायच्या असतात ।
शब्द असतात भावनांसाठी कवीतेत,
भावना शब्दां साठी नसतात ।
हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)
लेखनविषय:
वाचने
1878
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
>>कविता कराव्या लागत नाहीत,
>>त्या नकळतच होत असतात ।
वा! ओळी मनाला भिडल्या.
(तुम्हाला एकदम चार-चार झालेल्या दिसताहेत. डायरेक्ट मिपावर करण्यापेक्षा आधी एकदा कागदावर का नाही करत?
)
- अलगद डायपरभाई.
किती दिवसांनी लिहीलंत हर्षद भाऊ. आहो तुमची कवीता पहायला डोळे आसुसलेले असतात हो आमचे.
जबरदस्त काव्य आहे हे .. तोडंच नाही . लाखात एक !
-हार्डिक प्रभुकेभाई
In reply to किती दिवसांनी लिहीलंत हर्षद by टारझन
=)) =))
हाण तेज्यायल्या, इथुन पुढे हर्षदराव दहावेळा विचार करुन मगच करायला बसतील आणि नीट होत नसेल तर करणार नाहीत इतका हाणलाय! =))
-जोर लगारेभाई
तुम्ही काही या लोकांकडे लक्ष देऊ नका हो!!! लिहा वाटेल तेव्हढ...कलादालनात..(भले मग काव्य विभाग ओस का पडेना..)
डोंबिवलीत सुनामी आली की काय?? तुम्ही एक्दम काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात म्हणून बोल्लो.
नगरी टु नन्दादिप , वाचताना डोळ्यातुन पाणी गळायला लागल , एव्हढी हसतेय!
काय ओ नगरी...कागदावर?
कोनी काहिहि म्हनो,
आपल्याला आवडले हे जे काय लिहिले आहे ते.
शब्द असतात भावनांसाठी कवीतेत, भावना शब्दां साठी नसतात ।हे असमतेचे राजकारन सगळिकडेच थैमान घालते आहे
>>कविता कराव्या लागत