आनन्दघन जी!!!
ठरल तर पहीली सन्धी मिळताच ट्रीप टू मैसूर !!!
छान वाटल वाचुन ,
काही सेकन्द दोळ्यासमोर ती सगळी द्रुश्य जिवन्त झाली होती ,ज्यान्चे तुम्ही वर्णन केलेत ...
बाकी सोबत फोटोस टाकले अस्त तर दूधात साखर टाकल्या सारख झाल असत, नाही का?
असो..
धन्यवाद !!!!
खरे तर वृंदावन गार्डन मधे फारसा राम राहीला नाही.
झाडे सुकली आहेत आणि हाइद्राबादचा लेझर शो पाहील्यानंतर वृंदावन गार्डनातले संगीत कारंजे फारसे भावत नाहीत.
मैसूरच्या प्राणीसंग्रहालय मात्र अप्रतिम आहे.
मैसूर पासुन १५० किमि वर हलेबेळु आणि बेलुर ही शिल्पे आहेत. १२ व्या शतकातली दोन मंदिरे .
अजोड त्रि मितिय शिल्पकला. एका मन्दिराकरीता दिवस कमी पडावा असं कोरीवकाम!
हलेबेळु इथे शासनाचे विश्राम गॄह आहे. दिवसभर मंदिर पाहुन झाल्यावर मुक्कामाची उत्तम व्यवस्था.
अतिशय प्रसन्न शैली, सहज , हसत खेळत सांगितलेली माहिती.
अशा लेखांमधे "केवळ माहितीवजा" बनण्याचा फार मोठा धोका असतो. तो तुमच्या बाबतीत अजिबात संभवत नाही. सुरवातीचा "झनक झनक ..." हा परिच्छेद म्हणा , किंवा इतर व्यक्तिगत उल्लेख म्हणा , अशा गोष्टींमुळे लेख अतिशय वाचनीय झाला आहे.
शेवटचा परिच्छेद मात्र खास ! " मागे वळून पाहिले तर एक मुलगा सुवासिक फुलांच्या माळांनी भरलेली चपट्या आकाराची वेताची पाटी सायकलच्या हँडलवर ठेऊन ती हळू हळू बेताने चालवत येत होता." हे वाक्य वरवर पहाता साधेच आहे , पण मला ते एकदम चित्रदर्शी वाटले !
आणि "त्यांच्या परड्यांमधली फुले दुपारपर्यंत कोमेजून जात असतील, पण ते घालत असलेली "हूवा मल्लिगे...." ही साद दीर्घकाळपर्यंत माझ्या लक्षात राहील. " हा जो शेवट आहे तो तर सगळ्या लेखाला काव्याकडे घेऊन जातो.
लिखाणामधे सहजता, बांधून ठेवणारी रंजकता, माहितीपूर्णता आणि या सगळ्याच्या वर असणारी काव्यात्मता या सार्या गुणांमुळे हे छोटेसे टिपण सुंदर झाले आहे. तुमच्या पुढच्या लिखाणाची नक्की वाट पाहिली जाईल ! :-)
या वेळेस मी वृंदावन उद्यान चवथ्यांदा प्रत्यक्ष पाहिले. ( सिनेमात अनेक वेळा ते दिसले आहे) तरीही मला ते आवडले. झाडांना लागणारी फुले, पाने वगैरे 'ऋतुकालोद्भव' असतात, ती निसर्गनियमाप्रमाणे 'नेमेचि' येतात, पिकतात किंवा सुकतात व गळून पडतात. अशा सुकलेल्या पानाफुलांचा कचरा परदेशातील बागेत तत्परतेने काढून टाकला जातो तसे मात्र वृंदावन गार्डनमध्ये होतांना दिसले नाही. लेजर शो किंवा फटाक्यांची आतिशबाजी यांची तुलना कारंजावरील प्रकाशझोतांबरोबर करणे हे आंबा आणि गुलाबजाम यांची तुलना करण्यासारखे आहे असे मला वटते. दोघांची मजा वेगवेगळी असते.
मैसुर आणी परिसराचे आनंदघनजींनी उत्तम व यथार्थ वर्णन केले आहे.
परंतु, हल्ली सर्वच पर्यटन स्थळांकडे लोकाचा अमाप ओघ येतो, त्यामुळे आता अशा स्थळी जाण्यापूर्वीच ताण येतो.
गेल्या २२ वर्षांत बर्याचदा मैसुरला गेलो. परंतु हल्ली त्या जीवघेण्या गर्दीमुळे वृंदावन गार्डन नकोसे वाटते.
पूर्वी, धरणाच्या बांधावरुन फिरता येत असे. ३-४ तास निवांतपणे घालवता येत.
आता धरणाच्या बांधावर जायला परवानगी नाही, त्यामूळे पूर्वीची मजा गेली.
बांधावर प्रवेशासाठी एक कमान आहेत. त्यावर धरणबांधणार्या तंत्रज्ञांची सुची आहे. त्यात एका मराठी तंत्रज्ञाचे नांव वाचून अभिमान वाटत असे.
दोन महीन्यांपूर्वी आमच्या जर्मन पाहूण्यांना घेऊन मैसुरला गेलो होतो, धरणाच्या बांधावर नेऊन, भारतीयांनी ७५-८० वर्षांपूर्वी केलेले कर्तॄत्व त्यांना दाखवायचे होते. बांधावरून दिसणारा विशाल जलसागर एका बाजुला, बांधाखाली प्रवाह नियंत्रणासाठी दरवाजे व त्याच्या दुसर्या बाजुला खालच्या पातळीवरचे ते उद्यान. तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना.
पण तो अमाप लोकसागर पाहून केवळ त्यांनाच नव्हे तर आम्हालाहि तेथुन लवकरच काढतापाय घ्यावा लागला.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
प्रतिक्रिया
आनन्दघन
हलेबेळु आणि बेलुर
हलेबेळु -> हळेबीडु
लेख खूप आवडला.
तुलना
उद्यान नगरी.....मैसुर
अगदी