✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे

आ
आळश्यांचा राजा यांनी
Mon, 02/21/2011 - 00:02  ·  लेख
लेख
केवळ लक्ष वेधण्यासाठी नवीन धागा आहे. हेच मी श्रामोंच्या धाग्यावरील प्रतिसादात दिलेले आहे. http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल.हा त्याच कट ऑफ भागातील व्हिडीओ आहे. मध्यमवयीन आदिवासी स्त्री तीस वर्षांच्या विनीलचा उल्लेख "मोर बापा" - माझा बाप असा करतेय. बघा. जो जनतेचे रक्षण करतो पोषण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ हे त्या बाईने कुठे वाचलेले नाही. तरीही तिला हे वाटले. विनीलविषयी. लक्षवेधी असल्याने हा धागा थोड्या वाचनांनंतर उडवला किंवा वाचनमात्र केला तरी चालेल. चर्चा श्रामोंच्याच धाग्यावर चालली तर उत्तम आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27594 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

चाणक्याचं राजकर्तव्यासंदर्भात

अमित देवधर
Mon, 02/21/2011 - 11:05 नवीन
चाणक्याचं राजकर्तव्यासंदर्भात एक चांगलं वचन आहे. सरकारी अधिकार्‍यांबद्दलही तेच लागू पडू शकतं (कारण तेच सगळ्यात खालच्या पातळीवर सरकारचं प्रतिनिधित्व करतात.) प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजायां च हिते हितम् | प्रजेच्या सुखात व हितातच राजाने स्वतःचं सुख व हित बघितलं पाहिजे. असं जेव्हा अधिकार्‍यांकडून वागलं जाईल, तेव्हा आपोआप ते आदराला पात्र होतात.
  • Log in or register to post comments

ही स्वयंस्फूर्ती कुठून येत असावी?

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/21/2011 - 14:46 नवीन
>> इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल. << ही स्वयंस्फूर्ती कुठून येत असावी? असेच काही वेडे लोकं फिरत असतात आजूबाजूला, एक आहेत मनोज स्वेन. जालावर फिरताना विनील कृष्णा यांची, नक्षलवाद्यांनी पळवून नेण्याच्या काही दिवस आधीचीच आणखी एक गोष्ट सापडली. आणि नक्षलवाद्यांसाठी ही एक कविता.
  • Log in or register to post comments

व्हीडियो हालत नाहींय्

सुधीर काळे
Mon, 02/21/2011 - 15:28 नवीन
राजेसाहेब, माझ्या संगणकावर व्हीडियो हलतच नाहींय्. घरी जाऊन पहातो.....
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा...

प्रसन्न केसकर
Mon, 02/21/2011 - 16:05 नवीन
विनिल प्रकरणाच्या निमित्ताने नक्षलवाद, त्याच्याशी मुकाबला अशी समग्र चर्चा सुरु आहे. बरेच जाणकार मते मांडत आहेत. त्यानिमित्ताने गेली कित्येक वर्षे हे सर्व विषय पुन्हा पुन्हा हाताळताना मला पडलेले काही प्रश्न मांडु इछितो. त्यांचीवस्तुनिष्ठ उत्तरे मिळाली तर आनंदच आहे न मिळाली तर केवळ असे काही प्रश्न असु शकतात याची जाणीव आली तरी ठीक आणि ते प्रश्न अनाठाई वाटल्यास उडवलेच तरी माझी हरकत नाही. ते प्रश्न असे: १) नक्षलवाद (माओईस्ट, मार्क्सिस्ट्-लेनिनिस्ट इ. इ.) म्हणजे नक्की काय असते? त्याला काही सामाजिक-राजकीय तत्वज्ञान असते काय? असल्यास ते नक्की काय आणि आज तसे तत्वज्ञान अस्तित्वात आहे काय? नक्षलवादामधे वेगवेगळे गट आहेत काय, असले तर एकुण किती? असे गट होण्याची प्रक्रिया नक्की कशी होते? असे गट अस्तित्वात असण्याची नक्की कारणे काय? २) नक्षलवाद हा असमानता, विषमता, पिळवणुक, शोषण, प्रशासनाचा अभाव अश्या अनेक कारणांनी वाढतो असे सांगीतले जाते. ही कारणे नक्षलवादाच्या वाढीस नक्की कश्याप्रकारे जबाबदार ठरतात? ३) बंदुकीच्या गोळीतुन क्रांती घडवणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगणारे नक्षलवादी आणि अन्य फुटिरतावादी, दहशतवादी, गँगस्टर यांच्यात काही फरक आहे काय? असल्यास तो कोणता? त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य, सामंजस्य असते काय? असले तर कश्या प्रकारचे? ४) नक्षलवादी वापरतात अगदी त्याच प्रकारची शस्त्रे, स्फोटके इ. अन्य दहशतवादी वापरतात. ही शस्त्रे व स्फोटके बरीच महागडी असतात आणि ती वापरणे अगदी सरकारी यंत्रणांनाही परवडत नाही. हे अविकसित भागातील गरीब, शोषित लोकांनी चालविलेल्या नक्षलवादी संघटनांना कसे परवडते? नक्षलवादाचे फंडिंग नक्की कसे होते? (हाच प्रश्न अनेक मानवतावादी संघटनांबाबतही उपस्थित होऊ शकतो.) ५) सरकारची शोषक, अन्यायकारक धोरणे नक्षलवादाला जबाबदार असल्याचे देखील अनेकदा सांगीतले जाते. ही धोरणे केवळ नक्षलवादग्रस्त भागापुरतीच असतात की संपुर्ण राज्यासाठी? जर ती संपुर्ण राज्यासाठी असतील तर ती सर्वांचेच शोषण करणारी अन्यायकारक ठरतील अश्या परिस्थितीत नक्षलवाद केवळ ठराविक भागापुरताच मर्यादित का रहातो? जाणकारांकडुन अभ्यासपुर्ण उत्तरांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

अनेकांना

अवलिया
Mon, 02/21/2011 - 16:10 नवीन
अडचणीत आणणारे प्रश्न विचारत आहात तुम्ही. आता अडचणीत कोण येणार हे ज्याच्या त्याच्या बुद्धीचे आकलन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

सुरेख प्रश्न!

सुधीर काळे
Mon, 02/21/2011 - 16:29 नवीन
सुरेख प्रश्न! उत्तरांची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

एक से बढकर एक प्रश्ण !! मला

टारझन
Mon, 02/21/2011 - 16:30 नवीन
एक से बढकर एक प्रश्ण !! मला जे जे हवं होतं ते ते या प्रतिसादात आहे . :) धन्यवाद प्रसन्न ! उत्तरे वाचण्यास उत्सुक ! -लक्षवादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

अरे अरे अरे.

चिंतामणी
Mon, 02/21/2011 - 16:46 नवीन
प्रसन्न केसकर "पुन्हा एकदा" असे प्रश्ण विचारून कोणाकडुन उत्तर अपेक्षीत करत आहात?????? हे (सो कॉल्ड) विचारवंत/जाणकार सोइस्कर मौन पाळतील. (तोंड उघडण्यासाठी त्यांना वेगळे विषय आहेत) नक्षलवादाचे फंडिंग नक्की कसे होते? (हाच प्रश्न अनेक मानवतावादी संघटनांबाबतही उपस्थित होऊ शकतो.) ह्या प्रश्णाचे उत्तर कोणिही देणार नाही हा माझा अनुभव आहे. (डॉ.बिनायक सेन हा धागा पुन्हा एकदा वाचा). प्रयत्न करीत आहे. मलासुद्धा या प्रश्णांची उत्तरे मिळाली तर हवी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

काही उत्तरे

नितिन थत्ते
Mon, 02/21/2011 - 22:35 नवीन
१. नक्षलवाद म्हणजे नक्की काय याचा ऐतिहासिक उहापोह इंद्रराज पवार यांनी केलाच आहे. त्याहून अधिक माहिती नाही. २. दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर उघड आहे असे मला वाटत होते परंतु ते तसे नसल्याचे दिसते म्हणून मला वाटते ते उत्तर देत आहे. असमानता, विषमता पिळवणूक जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा त्यातून सोडवणूक करण्याचे आमीष दाखवणारे गट, पक्ष निर्माण होतात. त्यातले काही निवडणुकीच्या माध्यमातून व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन देत असतात तर काही लोकशाहीवर आमचा विश्वास नाही अशी घोषणा घेऊन येतात. या लोकशाहीवर विश्वास नाही म्हणणार्‍यांपैकी काही गट व्यवस्थेचेच गुलाम असतात आणि व्यवस्थेतला बदल म्हणजे लुटणार्‍या व्यक्ती बदलणे इतक्याच मर्यादित उद्दिष्टांचे असतात आणि ते लोकशाही मार्गाने सत्तांतर व्हायची शक्यता दिसताच व्यवस्थेशी जुळवून घेतात. आणि विषमता, पिळवणुक वगैरे स्वतःही सुखाने करू लागतात. काही गट खरोखरच व्यवस्था बदलण्याचा विचार (बरोबर अथवा चुकीचा) मनात ठेवून असतात. ते खरेच व्यवस्था उलथून टाकण्याचा प्रयत्न करतात. ज्यांची खरोखरची पिळवणुक होत असते त्यांचा या गटांना पाठिंबा मिळतो. आणि पिळवणुकीतून सुटका तर नाहीच पण प्रशासनयंत्रणा आणि न्याययंत्रणा पिळवणुक करणार्‍यांनाच धार्जिणी आहे असे त्यांना "वाटल्यास" ही चळवळ फोफावते. ३. प्रश्नातल्या यादीत गँगस्टर का आहेत हे कळले नाही. बाकीच्या तिन्हींचा जाहीर उद्देश तरी असलेली व्यवस्था/शासन/शासक बदलून नवे आणण्याचा असतो. गँगस्टरांचा जाहीर उद्देश काही असतो असे मला वाटत नाही. दुसर्‍याचे धन स्वतःकडे हिसकावून घेण्याची यंत्रणा एवढेच गँगस्टरांचे उद्दिष्ट असते. बाकीच्या तीनांपैकी एकाचा राज्यातून फुटून निघण्याचा उद्देश असतो. दहशतवाद्यांचे वेगवेगळे उद्देश असू शकतात. नक्षलवाद्यांचा अस्तित्वात असलेली व्यवस्था मोडून नवी वर्गविहीन व्यवस्था उभारणे हा उद्देश असतो. (उद्देश यशस्वी झाल्यावर खरेच वर्गविहीन व्यवस्था ते आणतील की नाही यावर येथे काही भाष्य करीत नाही). ४. >>नक्षलवादी वापरतात अगदी त्याच प्रकारची शस्त्रे, स्फोटके इ. अन्य दहशतवादी वापरतात. ही शस्त्रे व स्फोटके बरीच महागडी असतात आणि ती वापरणे अगदी सरकारी यंत्रणांनाही परवडत नाही. ही माहिती बहुधा चुकीची आहे. गुगलून मिळालेल्या माहितीनुसार Most foreign arms seized from Naxals looted from security forces. Three jawans of the Central Reserve Police Force (CRPF) were arrested on Friday for selling arms and ammunition to Maoists, अशी माहिती मिळाली. नक्षलवाद्यांचे फंडिंग नक्की कसे होते हे ठाऊक नाही पण त्यात परकीय मदत (उदा. नेपाळमधील माओवादी, म्यानमार मधील सरकार वगैरे) तसेच स्थानिक मदत (त्या भागात बस्तान बसवू पाहणारे उद्योजक व त्यांचे प्रतिस्पर्धी, जंगलातून लाकूड तोडणारे, तेंदू पत्ता गोळा करणारे ठेकेदार वगैरे) असणारच. ५. सरकारची अन्यायकारक धोरणे सर्वत्र असतात पण दुर्गम भागा खेरीज इतर भागात जनतेचे हितसंबंध व्यवस्थेत निर्माण झालेले असतात. दुसरे म्हणजे जेथे मध्यमवर्गाची संख्या लक्षणीय आहे तेथे उठाव वगैरेला पाठबळ मिळण्याची शक्यता कमी होते. दुर्गम भागात ही संख्या नगण्य असते तेथे नक्षली लोकांना पाठिंबा अधिक मिळतो किंवा बस्थान बसवणे सोपे होते. शहरी भागात जमिनी वगैरे लोकांच्या मालकीच्या असतात त्यामुळे तसाही सरकारी वरवंटा सहजासहजी फिरवता येत नाही. उलट जंगलामधली जमीन सहसा फॉरेस्ट खात्याची असते. त्या जमिनीचे निर्णय सरकार कोणाला न विचारता घेऊ शकते. [ऐकीव माहिती प्रमाणे- उदा. जंगलातली लाकडे तोडण्याचे कंत्राट सरकार कंत्राटदाराला देते पण सरपणासाठी लाकूड तोडल्यास त्या जंगलात राहणार्‍या आदिवासींवर कारवाई होते. चू भू दे घे. मध्यंतरी महाराष्ट्रातील जंगलात पिढ्यानपिढ्या(?) राहणार्‍या आदिवासींना -अतिक्रमण केल्याचे सांगून- तेथून हुसकावून लावण्याबाबत कोर्ट केस चालू होत्या असे ऐकले होते]. त्यामुळे धोरणे समान असली तरी त्यांची अन्याय्य अंमलबजावणी शहरी भागात कमी आणि दुर्गम भागात जास्त असते. म्हणून नक्षलवाद तिकडे अधिक मूळ धरू शकतो. याखेरीज लपून करण्याच्या चळवळी दुर्गम भागात जोर धरणार हे तर उघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

धन्यवाद थत्तेसाहेब...

प्रसन्न केसकर
Mon, 02/21/2011 - 23:04 नवीन
इंटरेस्टिंग अ‍ॅनॅलिसीस आहे. सर्वप्रथम खुलासे: १) मी विचारलेले प्रश्न पुर्ण विचारांती उपस्थित केलेले आहेत. विविध सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आणि व्यवसायानिमित्त मी स्वतः घेतलेल्या काही अनुभवांचा अनेक वर्षे विचार करुन मी या प्रश्नांपर्यंत पोहोचलेलो आहे. शस्त्र्-स्फोटकांबाबत तुम्ही दिलेल्या दुव्यातील माहिती सत्य आहे पण ते केवळ अर्धसत्य आहे. २) तुम्ही मुंबई परिसरातील आहात असा माझा समज आहे. वस्तुस्थिती तशी असेलच तर गँगस्टर या प्रश्नात का येतात हे कळणे सोपे आहे. दुसरे म्हणजे नक्षलवादाचा इतिहास अभ्यासायचा असेल तर गँगवॉर्सचा संदर्भ त्यात अनिवार्य आहे. नक्षलवादाच्या इतिहासाला तसाही एक आयाम आहे. डाव्या चळवळी समजुन घेताना दाभाडीचा इतिहास माहिती नसेल तर तो अभ्यास अपुर्ण ठरतो तसेच ते आहे. उर्वरित मुद्यांवर ते कंडीशनल असल्याने आत्ताच उहापोह करत नाही. फक्त एक गोष्ट स्पष्ट करतो. नक्षलवादी स्वतः शोषित, गरीब वगैरे नसतात. बहुतेक सर्व नक्षलवादी नेत्यांनी गडगंज माया जमवलेली असते. कदाचित तेव्हढी माया प्रस्थापित लोकांकडे देखील नसेल. अजुन कुणाकडुन काही उत्तरे येतात काय याची वाट पाहु थोडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

धन्यु

चिंतामणी
Tue, 02/22/2011 - 00:08 नवीन
Most foreign arms seized from Naxals looted from security forces. Naxals looted म्हणल्याबद्दल. तुमच्या लेखी त्याचा अर्थ काय हे मी समजू शकतो. पण............ कला जो अर्थ कळला आहे त्याबद्दल धन्यु. एक सांगा. ही शस्त्रे लुटायला जाताना ते मोकळ्या हातांनी गेले होते का??????? ते वापरत असलेली शस्त्रे, स्फोटके इत्यादी गोष्टी फक्त पोलीसांना लूटून मिळाली????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुम्हाला काय 'गूढ" अर्थ कळला

नितिन थत्ते
Tue, 02/22/2011 - 07:53 नवीन
तुम्हाला काय 'गूढ" अर्थ कळला ते समजले नाही. शिवाय माझ्या लेखी कोणता वेगळा अर्थ असावा असे तुम्हाला वाटते याचे स्पष्टीकरण करावे. मूळ वाक्य Most foreign arms seized from Naxals, looted from security forces >>एक सांगा. ही शस्त्रे लुटायला जाताना ते मोकळ्या हातांनी गेले होते का??????? अर्थातच नाही. >>ते वापरत असलेली शस्त्रे, स्फोटके इत्यादी गोष्टी फक्त पोलीसांना लूटून मिळाली???????? नाही. ती पोलिसांनी त्यांना विकत सुद्धा दिली आहेत असे बातमीत म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

"भारतीय...." मधील कांहीं वाक्ये थेट तू लिहिलेल्या पृथःकरणात आहेत

सुधीर काळे
Tue, 02/22/2011 - 10:46 नवीन
नितिन, मी कालच पोस्ट केलेल्या "भारतीय....प्र. २ भाग-७" मध्ये पहिल्याच परिच्छेदातील कांहीं वाक्ये थेट तू लिहिलेल्या पृथःकरणात आहेत (लोकशाही मार्गाने सत्तांतर व्हायची शक्यता दिसताच व्यवस्थेशी जुळवून घेतात. आणि विषमता, पिळवणुक वगैरे स्वतःही सुखाने करू लागतात) म्हणून मुदाम खाली देत आहे! १९९०च्या दशकात अन्य मागासलेल्या जाती-जमातींत (OBCत) गणना होणार्‍या आणि (जास्त करून) शेतीप्रधान व्यवसायातील मतदारांनी त्यांच्या सतत वाढणार्‍या आर्थिक बळाचे राजकीय बळात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेत्यांनी आपल्या बांधवांवर पूर्वी झालेल्या आन्यायांमुळे आलेल्या हलाखीच्या परिस्थितीला लक्षात घेऊन सरकारी नोकर्‍यांत आरक्षणाची मागणी केली आणि तसे आरक्षण त्यांना मिळालेही. पण हे नेते त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या आणि यापूर्वी अशाच आरक्षणाचे फायदे मिळविलेल्या वर्गांशी वैरानेच वागत राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरुंधती रॉय कांहीं बोलल्या असतील तर वाचायला आवडेल!

सुधीर काळे
Mon, 02/21/2011 - 16:26 नवीन
अरुंधती रॉय कांहीं बोलल्या असतील तर ते वाचनात आलेले नाहीं! बोलल्या असतील तर जरूर इथे पोस्ट करावे. वाचायला आवडेल!
  • Log in or register to post comments

तोंड उघडण्यासाठी त्यांना वेगळे विषय आहेत

चिंतामणी
Mon, 02/21/2011 - 16:48 नवीन
अरुंधती रॉय कांहीं बोलल्या असतील तर ना. वरच्या पोस्टमधील एक वाक्य त्यानासुद्धा लागु होते. तोंड उघडण्यासाठी त्यांना वेगळे विषय आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

काल तुम्ही हे कार्टुन पाहिले होते का?

चिंतामणी
Tue, 02/22/2011 - 15:19 नवीन
http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?queryed=40&username=&useremailid=&parenteditioncode=40&eddate=2/21/2011 नक्कीच पाहीले असणार. ;) (डाव्याबाजुला वरती कार्टुन आहे. त्यावर क्लिक केल्यावर मोठे दिसेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

पहिल्या प्रश्नाचे उत्तर....!!

इन्द्र्राज पवार
Mon, 02/21/2011 - 20:05 नवीन
श्री.प्रसन्न केसकर.....यांच्या "नक्षलवाद" विषयीच्या प्रतिसादात अनेक प्रश्नांचा समावेश आहे आणि त्यानी "जाणकार" हे विशेषण ज्याना लागू होते त्यांच्याकडून उत्तरे अपेक्षिली आहेत. मला अर्थातच हे विशेषण लागू होत नाही, तरीही कोल्हापूर येथील सीपीआयचे एक प्रमुख नेते श्री.गोविंद पानसरे आणि त्यांचे साथी आणि कामगार नेते श्री.दिलीप पोवार यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतून, तसेच कोल्हापूरला शे.का.पक्षाची बर्‍यापैकी पार्श्वभूमी असल्याने त्या निमित्ताने प्रि.एन.डी.पाटील यांच्यासमवेतही "नक्षल चळवळी" वर इथे परिसंवाद होत गेले, अधिक संदर्भातील वेळोवेळी केलेले वाचन, त्यातून मिळालेली ही त्रोटक माहिती, ....यांच्या मदतीने श्री.केसकर यांच्या सर्वच प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे देणारी नसली, तरी लेट अस होप टु हॅव समथिंग फॉर द स्टार्टर : पहिल्या प्रश्नाविषयी ~ १) नक्षलवाद (माओईस्ट, मार्क्सिस्ट्-लेनिनिस्ट इ. इ.) म्हणजे नक्की काय असते? त्याला काही सामाजिक-राजकीय तत्वज्ञान असते काय? असल्यास ते नक्की काय आणि आज तसे तत्वज्ञान अस्तित्वात आहे काय? नक्षलवादामधे वेगवेगळे गट आहेत काय, असले तर एकुण किती? असे गट होण्याची प्रक्रिया नक्की कशी होते? असे गट अस्तित्वात असण्याची नक्की कारणे काय? ~ "नक्षलवाद" ही संज्ञा अस्तित्वात कशी आली ते एक अभ्यासक म्हणून श्री.केसकर आणि इथल्या जवळपास सर्वच प्रतिसादकांना माहीत आहे हे गृहित जरी धरले तरीही नवख्यांसाठी थोडक्यात सांगतो की, प.बंगालच्या सिलिगुडी सबडिव्हिजनमध्ये येत असलेले 'नक्षलबारी' हे छोटेसे खेडेगाव (जिल्हा दार्जिलिंग) जिथे मार्च १९६७ मध्ये बिमल किशन या आदिवासी तरूणाला कोर्टाकडून मिळालेली जमीन त्याला मारहाण करून स्थानिक जमिनदाराने हिसकावून घेतेली आणि त्याला देशोधडीला लावले. या अन्यायाने पेटून उठलेल्या अन्य आदिवासी तरुणांनी एकत्र येवून त्या जमिनदाराच्या जुलमाविरुद्ध लढा दिला, त्याला कम्युनिस्ट पक्षाच्याच अनेक पदरांनी सक्रिय पाठिंबा दिला (विशेष म्हणजे त्या काळात सीपीआय्[एम] ने स्थापलेल्या आघाडीचेच बंगालमध्ये राज्य होते). पुढे हा वणवा केवळ बंगालमध्येच नव्हे तर शेजारील आसाम ओरिसा आन्ध्रातही पसरला आणि 'आपण एकत्र आलो तर या बड्या धेंडांविरूद्ध यशस्वी लढा देवू शकतो...' हा विश्वासही बळावला. यातून प्रचलित झाली "नक्षलवादी" ही संज्ञा [ही माहिती सविस्तरपणे विकिपेडियावरही उपलब्ध आहेच....गरजूनी ती जरूर अभ्यासावी.] पुढे या 'एकत्र' मध्ये 'शस्त्रे' ही आली. पण बंगालमध्ये पसरलेली नक्षलवाद्यांची ही चळवळ सीपीआय (एम) नेच काही प्रमाणात काबूत ठेवली. त्यामुळे झाले असे की, आदिवासींचे कल्याण करतो असे म्हणणारे हेच कम्युनिस्ट सत्तेत आल्यावर भांडवलशाहीचे बगलबच्चे होतात असा प्रबळ समज असणारे जे कुणी चळवळीत युवक होते त्यानी या आदिवासी आणि तत्सम पिडीत गटाला घेऊन 'रीव्होल्युशनरी युनिट' ची १९६८ मध्ये स्थापना केली. या युनिटची दोन ध्येये होती, "प्रस्थापितांविरूद्ध लढा द्यायचा तो शस्त्राने" व "कोणत्याही प्रकारच्या निवडणूकीत असहकार". पुढे 'शस्त्राने द्यावयाचा लढा" कशाप्रकारे पुढे न्यावा यावरून नेहमी होतात तसे मतभेद झाले आणि टी.नागी रेड्डी आणि कन्हय्या चटर्जी या दोन नेत्यानी अनुक्रमे आंध्र आणि प.बंगालमध्ये सवत्या चुली मांडल्या. कन्हय्या ग्रुपचीही पुढे शकले झाली आणि त्यातून 'शस्त्राच्याच आधारे वर्गविरहीत समाज स्थापन करायचा' असे ठासून मांडणारा एक नेता या युवा नक्षलींना मिळाला....त्याचे नाव चारू मुझुमदार. कन्हय्याने स्थापलेल्या कम्युनिस्ट फळीचे नाव झाले 'माओवादी कम्युनिस्ट सेंटर (MCC)" तर चारूच्या पार्टीचे नाव झाले सीपीआय (मार्क्सवादी-लेनिनवादी). मात्र धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मतभेद असले तरी मूळ उद्देश नक्षलवादी चळवळ जोमाने वाढवायची आणि त्यायोगे सशस्त्र क्रांतीनेच संबंधित राज्यांतील जमिनदारी नष्ट करायची. पुढे चारू मुझुमदारला (जो सर्वत्र 'नक्षल गुरु' या नावानेच ओळखला जाऊ लागला) या माध्यमाद्वारे तळागाळातील लोक आणि आदिवासी वाड्यात जी लोकप्रियता लाभली ती सार्‍या देशभरात पसरली. अर्थात त्याला भक्कम साथ मिळाली ती कनु सन्याल या अभ्यासू आणि विलक्षण वक्तृत्त्व गुण असलेल्या युवकाची. पण इतके असूनही माओने चीनमध्ये घडवून आणलेली क्रांती इथे भारतात आणण्याचे जे स्वप्न चारू मुझुमदारने पाहिले ते अर्थातच प्रत्यक्षात आले नाही आणि त्यामुळे निराशेने ग्रासलेल्या चारुचे १९७२ मध्ये निधन झाल्यावर सीपीआय (एम-एल) ला अवकळा आली असेच म्हणावे लागेल. पुढे नेहमीप्रमाणे याचीही शकले झाली आणि कनु सन्याल जरी हयात होता तरी त्यानेही १९७७ मध्ये 'शस्त्राने झगडा' ही कल्पना बाजूला सारली आणि मतपेटीच्या माध्यमानेच पिडितांचे कल्याण करता येईल अशी भूमिका घेतली. तरीही अजूनही 'शस्त्र मार्गा' वर ठाम विश्वास असलेल्या नक्षल्यांनी नागभूषण पटनाईक याच्या नक्षलवाद्यांचा असा एक सीपीआय (एम-एल) लिबरेशन ग्रुप स्थापन केला आणि गुरिल्ला पध्दतीचे जीवन जगूनच प्रस्थापित राज्यशैलीवर प्रहार करायचे निश्चित केले. ही घटना म्हणजेच मतपेट्याद्वारे स्थापन झालेले शासन आम्हास मान्य नाही अशी भूमिका घेऊन त्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या कोणत्याही यंत्रणेला आम्ही विरोध करणार....हेच यांचे सूत्र. हे पटनाईक आणि विनोद मिश्रा रचीत माओवादी+लेनिनवादी+मार्क्सवादी चळवळीचे भारतीय रूप जे शहरी लोकांसाठी नसून आदिवासींकरताच नेमस्त होते. पुढील काही वर्षात (परत नेहमीप्रमाणे) यात फूट पडली आणि १९८० मध्ये "पीपल्स वॉर ग्रुप (PWG)" स्थापन झाला, ज्याचे पक्के धोरण हेच की, 'वर्गव्यवस्थेचा समूळ नाश'. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पीडब्ल्यूजी ला 'स्टार वलय' असलेला कुणीएक नेता नसूनही आज नक्षलवाद्यांच्या अनेक फळ्यांमध्ये हा ग्रुप लोकप्रिय आहे.....अ‍ॅक्टिव्हही आहेच, विशेषतः आंध्रात. या क्षणाला नक्षलवाद्यांत सीपीआय (एम.एल) आणि पीडब्ल्यूजी हे दोन पक्ष प्रामुख्याने कार्यरत असून दोघांच्याही तत्वज्ञानाला चांगलाच पाठिंबा लाभतोय असे दिसत्ये. कम्युनिस्ट पक्षांच्या परंपरेनुसार यांच्यातही आठवड्यातील सातही दिवस धुमसत असतेच पण सामान्य कार्यकर्त्याना आता त्याचे काही वावगे वाटत नाही. म्हणजे असे की, माओवाद्यांनी जिल्हाधिकारी श्री.विनिल कृष्णा आणि इंजिनिअर माज्झी याना ओलिस धरले म्हणून लेनिनवादी, मार्क्सवादी तसेच पीडब्ल्यूजी सरकारला काही मदत करतील याची सुतराम शक्यता नाही. बिहार, छत्तीसगड, उ.प्रदेश, आपले महाराष्ट्र राज्य आणि ईशान्येकडील छोटी राज्ये यांच्यातही जी कमीजास्त प्रमाणात नक्षलवादी चळवळ चालू असते त्यांचे सुकाणू आलटूनपालटून माओवादी, लेनिनवादी आणि पीडब्ल्यूजीकडे यांचाकडे येतात. त्या त्या प्रांतात ही मंडळी विविध नावाने (कधी 'लिबरेशन ग्रुप"... कधी "न्यू मुव्हमेन्ट" तर कधी 'रीव्होल्यूशनरी ग्रुप', 'न्यू डेमोक्रसी ग्रुप' आदी.... सरकारदरबारी याना Fragmented Groups असे म्हटले गेले आहे) आपापल्या मगदुराप्रमाणे त्याना अभिप्रेत असलेली 'क्रांती' आणण्याचे कांड करीत असतातच. ~ श्री.केसकर यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची ही सुरूवात समजतो. त्यांच्या क्रमांक २ ते ५ ची उत्तरे मी माझ्या मगदुराप्रमाणे देऊ शकतो, पण तरीही श्री.आ.रा. आणि तत्सम अभ्यासू सदस्यांकडे या प्रश्नांचा सखोल अभ्यास असल्याने ते माझ्यापेक्षा प्रभावीपणे उत्तरे देतील.....त्या प्रतिक्षेत राहतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments

धन्यवाद इंद्रराज...

प्रसन्न केसकर
Mon, 02/21/2011 - 21:06 नवीन
अभ्यासपुर्ण प्रतिसाद वाचला. इतिहासाचा आढावा महत्वाचा आहेच. या प्रतिसादामुळे ती उजळणी होते आहे. प्रतिसादात मला अपेक्षित असलेले एक वाक्य आहेच. या क्षणाला नक्षलवाद्यांत सीपीआय (एम.एल) आणि पीडब्ल्यूजी हे दोन पक्ष प्रामुख्याने कार्यरत असून दोघांच्याही तत्वज्ञानाला चांगलाच पाठिंबा लाभतोय असे दिसत्ये. हे ते वाक्य. माझा एक प्रश्न नक्षलवादाच्या तत्वज्ञानाबद्दलही आहे. शिवाय सशस्त्र क्रांती ते मतपेटीच्या माध्यमातुन बदल या परिवर्तनाबाबत जवळपास काहीच उहापोह नाही. नक्षलवादाला तत्वज्ञान आहे असे म्हणताना या परिवर्तनाचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. अन्यथा ती दिशाभुल ठरते. नक्षलवादाबाबत गेली वीस एक वर्षे अशीच दिशाभुल सातत्याने सुरु आहे. डाव्या चळवळींच्या इतिहासात नक्सलबारीचे महत्व अनन्यसाधारण आहेच पण संपुर्ण भारतातील (आणि अर्थातच अविभाज्य संबंध असलेल्या नेपाळमधीलही) डाव्या चळवळीच्या इतिहासात ते महत्व नक्की काय आणि किती हा प्रश्न रहातोच. अनेक फँटसीज मधे ते ओव्हर एक्झॅग्रेट होते आणि या फँटसीज सार्वत्रिक आहेत. माझे अन्य प्रश्न अजुन आहेतच. त्यांना काय उत्तरे येतात ते पाहु आणि त्या अनुषंगाने चर्चा पुढे ठेऊ असे मला वाटते. मग या धाग्याचेही काश्मीर झाले तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments

सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत कसे?

सुधीर काळे
Mon, 02/21/2011 - 21:45 नवीन
इंद्रा-जी, तुम्हाला माहिती नसलेला कुठला तरी विषय आहे काय? सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत आहात! धन्य आहात!! माझे कांही अपरिपक्व प्रश्नः भारताला त्रास व्हावा म्हणून यांना फंडिंग चीनमधून येते काय? शस्त्रास्त्रेसुद्धा चीन पुरवतो काय? जसे काश्मिरी दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि ISI तर्फे पैसे व शस्त्रास्त्रे पुरवली जातात तशीच चीनही पुरवतो काय? (असणारच!) पुन्हा एकदा माझे कांहीं जुने प्रश्नः १) कूळ कायद्याने 'कसेल त्याची जमीन' असताना अशा चळवळी उभ्या रहायचे कारणच मला दिसत नाहीं. तरीही असे होत असेल तर एक तर कायद्यात पळवाटा आहेत किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नाहीं. २) माओवादी तत्वप्रणालीचा सपशेल पराभव रशिया आणि चीनमध्ये झालेला स्पष्ट दिसत असताना (तोही माओ त्से तुंगसारखा बलदंड नेता असताना) अशी तत्वप्रणाली आजही हे लोक कुठल्या बळावर आदिवासींना पटवून देतात? ही तत्वप्रणाली आता scrap झाली आहे/व्हायला हवी! (या दुसर्‍या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळतच नाहीं) जर कायद्यात पळवाटा असतील किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्यांच्यावर कुरघोडी करायला शस्त्रास्त्रे कशाला? चांगले वकील, खासदार/आमदार हे काम कां करू शकत नाहींत? आणि मग ते कसे निवडून येतात?
  • Log in or register to post comments

ज्ञानप्राप्तीच्या वाटा...!!

इन्द्र्राज पवार
Mon, 02/21/2011 - 22:10 नवीन
सुधीर जी... मी आता काय प्रतिक्रिया देऊ तुमच्या या आपुलकीच्या भावनेबद्दल ? मी वर म्हटल्याप्रमाणे विविध क्षेत्रातील अन्य अधिकारी लोकांकडून [जे प्रत्यक्ष फिल्ड वर्क करतात] माहिती गोळा करतो आणि नोंदवून ठेवतो, तसेच थोडीफार भटकंतीही झाली आहे या भागात समविचारी मित्रांसमवेत (मात्र बंगालमध्ये अजून गेलेलो नाही) त्यामुळे अनायासे माहितीत भरही पडत जाते. ..(वाचनही आहेच...इथली कम्युनिस्ट पक्षाचे माहेरघर असलेली लोकवाङ्मय गृहाची लायब्ररी बिनदिक्कत वापरू शकतो, इतका घरोबा आहे) शिवाय इथे तुमच्यासारखे अभ्यासू आणि देशाच्या सद्यःस्थितीविषयी मनःपूर्वक आस्था बाळगणार्‍या लोकांचे विचारही मिसळपावसारख्या आपुलकीच्या संस्थळावर वाचायला मिळतात...वाद घालता येतो, प्रतिसाद देता येतो, घेता येतो....अशा अनेक बाबीमुळे ज्ञानप्राप्तीच्या कक्षा रुंदावत जातात, इतकेच म्हणतो. असो. तुम्ही वरील प्रतिसादात उभ्या केलेल्या प्रश्नांची यथामती उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा जरूर प्रयत्न करा!

सुधीर काळे
Tue, 02/22/2011 - 11:30 नवीन
इंद्रा-जी, माझ्या प्रतिसादातील दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा जरूर प्रयत्न करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत

अप्पा जोगळेकर
Wed, 02/23/2011 - 01:14 नवीन
सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत कसे? मलाही आधी हा प्रश्न पडायचा. आता खात्री झाल्येय की त्यांच्याकडे सुरईतला राक्षस किंवा हातावर घासण्याचा अल्लाउद्दिनचा दिवा असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अ‍ॅक्च्युअली मला

गोगोल
Sat, 02/26/2011 - 00:26 नवीन
याचे उत्तर माहीती आहे. इन्द्रा साहेब खरेखुरे हुशार बिशार काही नाहियेत. ते त्यांच्या एरीयातील एक नामचीन गुंड आहेत. सगळीकडे नुसती दह्शत पसरवून ठेवली आहे. पण झाल काय की त्यांना ते इंटेलेक्च्युली खूप हुशार आहेत असं सिद्ध करायचा किडा आला. म्हणून मग त्यांनी एक १०० एक विविध विषयावरच्या तज्ञ लोकांना पकडून आणल आणि तळघरात डांबून ठेवलय. आता त्या लोकांना आदेश असतो की मिसळपाववर कुठ्लाही लेख आला की माहीतीपुर्ण कमीत कमी पानभर प्रतिसाद द्यायचाच .. तरच त्यांना त्यादिवशी खायला मिळते. जर का प्रतिसाद मूळ लेखापेक्षा मोठा असेल तर बक्षिस म्हणून शिकरण पण मिळते. म्हणून सर्वांना अशी विनंति आहे की त्यांनी विविध विषयावरचे धागे काढून त्या बिचार्या लोकांना खायला मिळेल याची सोय करून द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

ते त्यांच्या एरीयातील एक

अप्पा जोगळेकर
Sat, 02/26/2011 - 23:04 नवीन
ते त्यांच्या एरीयातील एक नामचीन गुंड आहेत. जर का प्रतिसाद मूळ लेखापेक्षा मोठा असेल तर बक्षिस म्हणून शिकरण पण मिळते. आवरा. :) - शिकरण पोळीचा फ्यान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

शिकरण....नो वरीज्...!!

इन्द्र्राज पवार
Sat, 02/26/2011 - 23:50 नवीन
अहो अप्पा....! शिकरणाची भीती वा काळजी मला अजिबात नाही. कारण श्री.गोगोल यानीच ती जबाबदारी स्वखुशीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. {तसे त्यानी मला सांगितले देखील असल्याने प्रतिसाद येतच राहतील}. आता 'नामचीन गुंड' वगैरे विशेषनाम दिले असल्याने या आधारे पुढील निवडणुकीचे तिकिट मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडे अर्ज करतोच.....(शिवाय अ‍ॅडिशनल बेनेफिट असा की आडनाव "पवार" आहे...त्यामुळे निम्मी लढाई जिंकली असेच आहे) थॅन्क्स.. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

वाचत आहे

स्वाती२
Mon, 02/21/2011 - 21:53 नवीन
वाचत आहे
  • Log in or register to post comments

फंडिंगच्या वाटा....!!

इन्द्र्राज पवार
Tue, 02/22/2011 - 01:08 नवीन
"...नक्षलवादाचे फंडिंग नक्की कसे होते? (हाच प्रश्न अनेक मानवतावादी संघटनांबाबतही उपस्थित होऊ शकतो.)..." श्री.केसकर यांच्या प्रश्न क्रमांक ४ मधील वरील भाग. फंडिंगच्या संदर्भात श्री.नितिन थत्ते यानी (संभाव्य) परकीय मदतीचा उल्लेख केला आहेच. यातच थोडी भर घालतो. [मात्र माझी माहिती ही फक्त नक्षलवादी चळवळीना मिळत असलेल्या फंडिंग संदर्भातील आहे.....मानवतावादी संघटनांचा इथे उल्लेख टाळू या, कारण तो वेगळा विषय आहे] सर्वसाधारणपण कम्युनिस्टातील अतिडाव्या विचारसरणीचे [सीपीआय-माओवादी] जे कार्यकर्ते आहेत (जे सरकार दरबारी Extremists म्हणून नोंद झालेले आहेत) त्याना ईप्सित असलेली 'क्रांती' ही सततच्या पैशाच्या पुरवठ्याशिवाय अधुरी राहील हे चांगलेच माहीत असल्याने त्यांच्या 'घटने'तच 'पैसा कसा उभा करायचा?' यावर तरतूद केलेली आढळते ~ आर्टिकल ६० : "लगान, देणग्या, दंड आणि शत्रूंकडून हिसकावून घेतलेली संपत्ती" ही उत्पन्नाची प्रमुख साधने मानली जातील. यात 'देणग्या' हा भाग फार छुपा आहे. प्रमुख देणगीदार आहेत ते नक्षलवाद्यांच्या प्रभाव असलेल्या छ्त्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि आसाममधील खाणमालक. आंध्र प्रदेश आणि बिहारमधील पेपर मालक, आसाम आणि ईशान्येकडील राज्यातील चहा मळेवाले. आता या बिगीजकडून देणगीस्वरूपात जे काही येत असेल ते मोजण्याचा वा 'चेक' करण्याचे कोणतेही स्त्रोत ना मिडियाकडे आहेत ना अन्य कुठल्याही स्वयंसेवी संघटनाकडे. पण पोलिस सूत्रांकडून सरकारला वेळोवेळी मिळत जाणार्‍या अधिकृत माहितीच्या आधारे केन्द्रीय गृहमंत्री चिदम्बरम आणि राज्याचे गृहमंत्री श्री.आर.आर.पाटील यानी 'खाण मालकांच्याकडून या नक्षलवाद्यांना मिळत असलेल्या देणग्यांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे' असे जाहीर म्हटले आहे. श्री.पाटील गडचिरोलीमधील परिस्थितीविषयी बोलत होते. तथापि ह्या देणग्या कशा 'वसूल' केल्या जातात याविषयीचीही माहिती त्यांच्याकडे असेलच, ती जर प्रकाशित झाली तर शहारे येतील असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशातील एकूण ६३६ जिल्ह्यापैकी २२३ जिल्ह्यात सीपीआय-माओवादी संघटना बळकट आहेत (हा आकडा खरोखरी लक्षणीय आहे, असे म्हणावे लागेल) आणि हाती असलेल्या आधुनिक शस्त्रांच्या बळावर हे कार्यकर्ते या अंदाजे ४० हजार किलोमीटरच्या परिघातील जिल्ह्याजिल्ह्यातून कार्यरत असलेल्या सुमारे २००० पोलिस स्टेशनांच्या उपस्थितीत छोट्यामोठ्या ठिकाणाहून 'टॅक्स' गोळा करीत असतात. ही 'लगान' ची रक्कमही डोळे दिपविणारी असते. हा ढोबळ अंदाज नसून खुद्द छत्तीसगडच्या डीआयजी विश्वजित रंजन यानीच प्रकाशित केलेल्या आणि केन्द्र सरकारकडे दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, माओवादी विविध मार्गाने दरवर्षी २० अब्ज रूपये गोळा करतात. [मार्च २००८ मध्ये झारखंड येथील पोलिसांच्या चकमकीत सीपीआय-माओवादी मध्यवर्ती समितीचा एक प्रमुख सदस्य मिहिर मिश्रा सापडला होता. त्याच्याकडील कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कमध्ये मिळालेली माहिती अशी ~ सन २००७ मध्ये समितीने वसुली रूपाने दहा अब्ज रूपये गोळा केले आणि २००८ साठी हे लक्ष्य ११.२५ अब्ज रुपयांचे राहिल. डिस्कमधील माहितीत हेही उघडकीला आले की, आंध्रप्रदेश वसुलीच्या कामात त्या वर्षी तिसर्‍या क्रमांकावर गेले असून बिहार आणि छ्त्तीसगड हे अनुक्रमे प्रथम व द्वितिय स्थानावर आहेत. झारखंडने २००७ मध्ये ७५ कोटीची वसुली केली तर त्याचवेळी आपल्या महाराष्ट्राचा आणि कर्नाटकाचा वाटा होता अनुक्रमे १०० कोटी आणि ७८ कोटी. अशीच कमीजास्त स्थिती होती अन्य राज्यांची....हे सर्व दप्तर सीपीआय-माओवादीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले. उलटतपासणीत मिश्राने हेही कबूल केले की, चळवळीचे सर्व प्रमुख नेते आपापली बँक खाती सांभाळतात. [यातील एक नेता आणि पक्षाचा सचिव साम्बशिवदू याच्या एकट्याच्या खात्यावर ८० कोट रुपये होते आणि हादेखील १५ फेब्रु.२००९ मध्ये पोलिसाना शरण आला आणि त्याने हे अकौन्ट डिटेल्स खुले केले.]...अर्थात या नेतेमंडळींच्या म्हणण्यानुसार हा सारा पैसा नक्षलवाद्यांच्या गुरिला युद्धनीती आणि सैन्याच्या देखभालीसाठी उपयोगात आणला जातो. देणग्याव्यतिरिक्त माओवाद्यांचे प्रमुख साधन म्हणजे सक्तीची वसूली....जी त्याना मिळते देशभरात सर्वत्र चालू असलेल्या रोड कॉन्ट्रॅक्ट्स घेणार्‍या कंपन्याकडून, जंगलतोडणीचे कामे मिळालेल्या ठेकेदारांकडून, तेंदू पत्ता, रबर, पेपर आणि चहाचे मळे हे यातील प्रमुख घटक. शिवाय चोरटी दारू, प्राण्यांची कातडी मिळविण्याचे धंदे करणारे, आयुर्वेदिक औषधवनस्पती, सागवान, बांबू आणि चंदन तस्कर....यानी तर माओवाद्यांना उघडउघड पोसले आहे असेही म्हटले जाते..... [फार विचित्र आहे हा विषय....! कादंबरीच लिहिता येईल या सर्व घडामोडीवर]. वरील बाबी छुप्यारितीने चालू असलेल्या धंद्यातील वसूली. पण ज्या राज्यात माओवादी बळकट आहेत तिथे ते अगदी लहानमोठ्या व्यापार्‍यापासून स्थानिक डॉक्टरांकडूनदेखील ठराविक देणगीची अपेक्षा करतात जी पुरी होतेच होते. किराणा, औषधविक्रेते, वाईनशॉप, बिडी-सिग्रेट दुकानदार, केबल ऑपरेटर्स.... किती नावे घ्यावीत ? कायदा खूप काही सांगतो की अशा वसुलीवाल्यांना पकडा आणि आमच्या ताब्यात द्या....पण हे होते का...? कारण व्हू वुड विश टु फेस द डेव्हिल्स राथ? हीदेखील भीती आहेच. बिहारच्या किशनगंज आणि पूर्णिया जिल्ह्यात आणि झारखंडच्या घाग्रा आणि गुम्ला जिल्ह्यातील सुमारे १५०० हेक्टर जमिनीत लागवड केलेली अफूची आणि गांजाच्या उत्पादने ही एकट्या माओवादी नेत्यांची होती. २००९ मध्ये सीबीएनने (Central Bureau of Narcotics) धाड टाकून मिलिटरीच्या मदतीने ही लागवड भस्म करून टाकली खरी...पण इथून या अगोदर जे उत्पन्न माओवाद्यांना मिळत होते ते चक्कर आणणारेच होते. एकट्या बिहारमधुन आदल्या वर्षी त्यानी ११२ कोटी रुपयाचे उत्पन्न घेतले होते. तर मुर्शिदाबाद आणि बंगालच्या नादिया जिल्ह्यातून अफूच्या बोंडांपासून १२० कोटीचा महसूल त्याना मिळाला होता. खूप लिहिता येईल अजूनही.....उत्पन्नाच्या स्त्रोतावर....आणि तेही सरकारी दप्तरातील माहितीवरून, त्यामुळे तीवर विश्वास ठेवावाच लागेल. पण, इतपत माहितीवरून तरी इथल्या सदस्यांनी हे जाणवेल की, माओवाद्यांच्या गंगेची गंगोत्री कुठे आहे ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

ग्रेट!

आळश्यांचा राजा
Tue, 02/22/2011 - 06:53 नवीन
ग्रेट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

धन्यवाद.

चिंतामणी
Tue, 02/22/2011 - 08:32 नवीन
या धाग्यावर लिहीणारे सगळे विचारवंत हा (फंडिंगच्या वाटा....!!) पोस्ट वाचतील अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह

नितिन थत्ते
Tue, 02/22/2011 - 08:41 नवीन
(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये अशी विनंती + मागणी. जे तो वापरतील त्यांना पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षित नाही असे समजावे व त्यांच्या प्रतिसादांकडे व प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

असे का?????

चिंतामणी
Wed, 02/23/2011 - 01:32 नवीन
(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये अशी विनंती + मागणी. (किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये सर्व धाग्यांवर "पॉझिटिव्ह चर्चा " होत नाही असे आपले म्हणणे आहे का?? आपण सगळेजण सगळीकडेच पॉझिटिव्ह चर्चा होईल " ह्या कडे का लक्ष देत नाही? 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये 'विचारवंत' म्हणले यात काय चुकले??????????? 'विचारवंत' हा अपशब्द आहे का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह

नितिन थत्ते
Tue, 02/22/2011 - 08:44 नवीन
(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये अशी विनंती + मागणी. जे तो वापरतील त्यांना पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षित नाही असे समजावे व त्यांच्या प्रतिसादांकडे व प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

In the lighter vein.....

सुधीर काळे
Tue, 02/22/2011 - 10:54 नवीन
(In the lighter vein.....) आयुर्वेदाची औषधे आणि चहा महाग का होत आहे याची कांहीं कारणे इंद्रा-जींच्या वरील प्रतिसादामुळे कळली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

लेट द डिस्कशन कंटिन्यु...

प्रसन्न केसकर
Tue, 02/22/2011 - 15:24 नवीन
अजुन बरेच काही कळत जाईल. नक्षलवाद इज नोव्हेअर अ डेडिकेटेड मुव्हमेंट. इट इज ओन्ली प्रोफेशनल टेरेरीझम. इट नीडस अ व्हेरी कॉम्प्रीहेन्सीव्ह अ‍ॅप्रोच टु डील विथ. अँड दॅट अ‍ॅप्रोज विल कम ओन्ली विथ रिअलायझेशन ऑफ रिअ‍ॅलिटी. अभी तो बहुत शो बाकी है काळेसाहेब! अजुन नक्षलवादाला तत्वज्ञान आहे, सध्या भारतात नक्षलवादाच्या नावाखाली जे चालते त्याला चारु-कनु (दोघेही खर्‍या नक्षलवादाचे मुळ प्रवर्तक आणि दोघेही नक्षलवादाबाबतच्या फस्ट्रेशनने चळवळ सुरु केल्यावर काही महिन्यातच ग्रासले होते.) यांच्या तत्वज्ञानाचा बेगडी मुलामा चढवणारे कोण कोण लोक आहेत, दहशतवाद/ गँगस्टरीझम कसा चालतो असे बरेच विषय चर्चेत यायचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

साप चावल्यावर मांत्रिकाकडे जाण्यासारखे?

सुधीर काळे
Tue, 02/22/2011 - 16:01 नवीन
प्रसन्न-जी, मला जे अजीबात कळत नाहीं कीं हे 'सपशेल पडेल' तत्वज्ञान लोकांना इतके कसे पटते? ज्यांच्या देशात या तत्वज्ञानाचा उगम झाला त्याच देशांनी त्या तत्वज्ञानाला फेकून दिल्यावरच त्यांची प्रगती झाली. तरीही हे तत्वज्ञान कसे उभे रहात? म्हणजे चांगल्या शिकल्या-सवरलेल्या शहरी माणसांनी साप चावल्यावर मांत्रिकाकडे जाण्याइतकेच मला हे तत्वज्ञान हास्यास्पद वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

हॅ हॅ हॅ.

चिंतामणी
Tue, 02/22/2011 - 17:50 नवीन
मला जे अजीबात कळत नाहीं कीं हे 'सपशेल पडेल' तत्वज्ञान लोकांना इतके कसे पटते? कोंणाला पटले आहे असे तुम्हाला सुचीत करायचे आहे?????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

दोघेही खर्‍या नक्षलवादाचे मुळ

अप्पा जोगळेकर
Sat, 02/26/2011 - 23:06 नवीन
दोघेही खर्‍या नक्षलवादाचे मुळ प्रवर्तक खरा नक्षलवाद म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

मस्त इंद्रराज...

प्रसन्न केसकर
Tue, 02/22/2011 - 15:14 नवीन
सुंदर विवेचन. पण पहिले म्हणजे हेच आर्थिक स्त्रोत सर्वच दहशतवादी, गँगस्टर यांचेही असतात ना? की त्यांचे इकॉनॉमिक मॉडेल काही वेगळे असते? दुसरे म्हणजे हे सगळे झाले पब्लीकली नोन इकॉनॉमिक सोर्स. त्यापलीकडे पण सोर्सेस असु शकतात ना? तिसरे म्हणजे हे रिसोर्सेस नक्षलबारी मॉडेल च्या व्हेग अ‍ॅनॅलिसिस मधे नक्की मिळतील. तसे वेगळ्या शब्दात ते कदाचित कोणत्याही देशाच्या राज्यघटनेत पण असतील. पण नक्षलबारी मॉडेल आणि हे सोर्सेस, त्यांचे ऑप्टीमायझेशन आणि त्यांचे युटिलायझेशन यान कितपत फरक आहे हे देखील विचारात घ्यावे लागेल. त्यासाठी नक्षलबारी मॉडेलमधे सुरुवातीच्या काळातल्या बिप्लब कोर्टांचे निकाल महत्वाचे ठरतील. त्या न्यायालयांचे निकाल पाहिले तर या मॉडेलच्या अगदी उलटे आहेत.छत्तीसगढ्,आंध्र, महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगढ याचा उल्लेख मी येथे जाणुन बुजुन करत नाही कारण माझ्या मते तेथील घटनांचा काहीच संबंध नक्षलवादाच्या तत्वज्ञानाशी नाही. तो स्युडो नक्षलवाद आहे. त्याला १९९० नंतर कोणतेच तत्वज्ञान नाही आणि त्याआधी देखील बव्हंशी तत्वज्ञान होते ते मुखवट्यापुरतेच हे त्या भागातल्या नक्षलवादाच्या वाढीचा इतिहास दर्शवतो. तुझ्या प्रतिसादात तु मानवतावादी संघटना, त्यांचे रिसोर्सेस वेगळे काढलेत. ते असे वेगळे काढणे शक्य आहे? विशेषतः जेव्हा प्रश्न दहशतवाद, नक्षलवाद अश्या व्यापक संकल्पनांबाबत येतो तेव्हा तरी तसे करता येईल. हे सर्व एकाच प्रश्नाचे वेगवेगळे पैलु नाहीत? मग असे सेग्रीगेशन, असा होलिअर दॅन काऊ अ‍ॅटीट्युड कश्यासाठी? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा - शस्त्रे, स्फोटके यांचे काय? त्यांचे रिसोर्सेस काय? एकसारखी शस्त्रे-स्फोटके आणि तंत्रज्ञान कसे येते या सगळ्या दहशतवादी संघटना, नक्षलवादी गट आणि गँगस्टर्सना? शेवटी त्या सगळ्याचाही पन्नास साठ वर्षांचा हिस्ट्री ट्रेल आहेच की. तो का इग्नोर करायचा? त्याबाबतही काहीतरी येऊ दे विश्लेषण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

माहिती

प्रदीप
Wed, 02/23/2011 - 19:56 नवीन
तुम्ही ही जी नक्षलवाद्यांच्या मिळकतीची माहिती दिली आहे ती अक्षरशः भेलकांडून टाकणारी (staggering) आहे. मात्र "प्रमुख देणगीदार आहेत ते नक्षलवाद्यांच्या प्रभाव असलेल्या छ्त्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि आसाममधील खाणमालक. आंध्र प्रदेश आणि बिहारमधील पेपर मालक, आसाम आणि ईशान्येकडील राज्यातील चहा मळेवाले. आता या बिगीजकडून देणगीस्वरूपात जे काही येत असेल ते मोजण्याचा वा 'चेक' करण्याचे कोणतेही स्त्रोत ना मिडियाकडे आहेत ना अन्य कुठल्याही स्वयंसेवी संघटनाकडे. " ह्याविषयी मला वाटते हे लोक राजीखुशीने ह्या देणग्या देत नसून, जबरदस्ती देत असण्याची शक्यता जास्त आहे. पूर्वी चहामळेवाल्यांच्या मॅनेजरांचे अपहरण झाल्याचा बातम्या पेपरात येत. नंतर त्या तशा येणे बंद झाल्या. ह्याची दोन कारणे संभवतात. एक- ह्या बातम्यांना किंमत उरली नाही, दुसरी ह्या प्रस्थापनांचे मालक नियमित 'प्रोटेक्शन मनी' पोहोचवू लागले, दोन्ही कारणे खरी असावीत, असा माझा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

राजीखुषी....जबरदस्ती....!!

इन्द्र्राज पवार
Wed, 02/23/2011 - 22:55 नवीन
थॅन्क्स प्रदीप जी.....तुमच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांचे इथे प्रतिसाद अत्यंत आवश्यक आहेत. मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहात होतो असे म्हटले तर ती अतिशयोक्ती मानू नका, प्लीज. तुम्ही, श्री.जयंत कुलकर्णी, श्री.सुधीर काळे आदी सीनिअर सदस्य जर राष्ट्रापुढे असलेल्या अशा (गंभीर) समस्येबाबत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रतिसाद रूपात मत व्यक्त करणे फार फार गरजेचे आहे. विनील प्रकरणामुळे निदान इथे एका ज्वलंत प्रश्नाबाबत इथे सर्वच बाजूनी विचारमंथन होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मी वाचलेली इथली सर्वच मते/विचार मला पटले आहेत असे नाही, तसेच मी मांडलेल्या इतिहासावर तसेच माझ्या काही मतावर सर्वांनी Positive प्रतिक्रिया द्याव्यात असेही काही नाही. पण या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणार्‍या लोकांच्या भूमिका तरी या निमित्ताने समजत आहेत हे देखील काही कमी नाही.....असो. तुमच्या मुद्द्यातील "ह्याविषयी मला वाटते हे लोक राजीखुशीने ह्या देणग्या देत नसून, जबरदस्ती देत असण्याची शक्यता जास्त आहे..." या मताविषयी इतकेच म्हणू शकतो की, अशा देणग्या कुणीही राजीखुषीने देतील असे खुद्द देणगी वसूली करणारेही मानत नाही. आता इथे 'जबरदस्ती' च्या व्याख्येची व्याप्ती अशी काही विचित्र आहे की ती जर मान्य केली नाही तर आसामच्या टाटा 'टी' च्या मळ्यात एक ग्राम (आय रीपिट..... वन सिंगल ग्राम) चहाचे उत्पन्न होणार नाही.....तर थापर यांच्या बिहारमधील पेपर साम्राज्यात एकही दिवस एखादा साधा कामगारसुद्धा कामावर येऊ शकणार नाही. राज्य असो वा केन्द्र सरकार असो.....गृहखात्याकडून कधीही अशा देणग्या 'राजीखुशी' ने दिल्या गेल्याची नोंद करू शकत नाही....कारण त्या नॉन-ट्रेसेबल असतात. पण मी वरील प्रतिसादात उल्लेख केलेल्या अनेकविध उद्योगधंद्यात होऊ घातलेली अब्जावधी रुपयांची वार्षिक उलाढाल पाहता हे कार्पोरेट जायन्टस अशा देणग्या देणे ही एक नित्याची बाब मानतात.....शेवटी त्याचा भुर्दन्ड सर्वसामान्य ग्राहकांवर टाकता येतो हेही त्याना माहीत असतेच. दहाबारा वर्षापूर्वी अशीच एक घटना आपल्या देशात घडली होती. वीरप्पनने कन्नड सुपरस्टार डॉ.राज कुमार यांचे अपहरण केले होते....१०९ दिवसांनी त्यांची सुटका झाली....वदंता अशी की राजकुमार यांच्या कुटुंबियानी ५ कोट "रॅन्सम" वीरप्पनकडे पोच केली.....याला त्यावेळेच्या कर्नाटकाच्या डीआयजीनी (तो आकडा तीन कोटीवर आणून...) दुजोरा दिला होता. असे 'स्टार' या जंगलराजांना हवेच असतात, पैशाशिवाय आपल्या अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी. आज देशाचे परराष्ट्रमंत्री असलेले एस.एम.कृष्णा हेच त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते आणि त्यानीही वीरप्पनच्या किती मागण्या मान्य केल्या होत्या (का? तर डॉ.राजकुमार कन्नडिगांच्या गळ्यातील ताईत....) त्यावर खरे तर वेगळा धागा होऊ शकतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

लढाई

आळश्यांचा राजा
Tue, 02/22/2011 - 07:48 नवीन
एक आठवले. विनिल सपोर्ट ग्रुप आहे फेसबुकवर. तिथे विनिल सोबत काम करणारे अजून एक अधिकारी - मलकनगिरिचे पी डी (डीआर डी ए) बलवंत सिंग - यांनी विनिल काय म्हणत असे ते सांगितले आहे - आय अ‍ॅम नॉट फाइटिंग माओइझम; आय अ‍ॅम फाइटिंग अंडरडेव्हलपमेंट. या एका वाक्याने लढाईचा पुरा फोकसच बदलून टाकला. या निमित्ताने श्रामोंच्या मागील एका प्रतिसादातील वाक्यही आठवले - मी शासनाच्या हिंसेचाही निषेध करतो. विनिलचा मार्ग या दृष्टीने सिग्निफिकण्ट आहे. हा मार्ग केवळ माओवाद्यांच्या हिंसेलाच उत्तर देतोय असं नाही, तर शासनाच्याही हिंसेला बगल देतोय. हिंसेचे दुष्टचक्र मुळातूनच नष्ट करण्याचा हा मार्ग आहे. मार्गाची चर्चाच केवळ करत न बसता तो मार्ग प्रत्यक्षात आणण्याची हिंमत दाखवणे हा अजून एक निराळा भाग. ती बाळगणारा विनिल हा अजून एक अभिमानास्पद आस्पेक्ट आहे. नक्षलवादाशी आपला संबंध केवळ जनरल नॉलेज मिळवण्याच्या पुढेही येऊ शकतो असे ज्यांना ज्यांना वाटते, त्यांनी आवर्जून या सपोर्ट ग्रुपला एक भेट द्यावी. इंद्रा - यू आर प्राइड ऑफ धिस प्लेस! एक मालिका सुरु कर मित्रा. तुझे दोन प्रतिसाद हे पहिले दोन भाग होऊ शकतात. हे एवढे मनावर घेच. थत्ते, केसकर साहेब, श्रामो, आणि इतर अभ्यासू प्रतिसादांनी तुझे लिखाण अजून सखोल बनवतीलच.
  • Log in or register to post comments

होय...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/22/2011 - 11:43 नवीन
होय मी आहे त्या ग्रुपचा सदस्य. तिथे तसेच इतरत्रही विनिल बद्दल वाचायचा प्रयत्न असतो. वाचतोही. मला वाटते आत्तापर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातले हे पहिलेच उदाहरण असेल की एका सरकारी अधिकार्‍याचे अपहरण झाले आणि सामान्य जनता पेटून उठली, रस्त्यावर उतरली. बरं ही सामान्य जनता कोण? केवळ मध्यमवर्गिय का? तर नाही... रूढार्थाने ठार अडाणी असलेले गरिब आदिवासी! नुसतेच आंदोलन नाही तर चक्क नक्षल्यांवर हल्ला करून विनिलची सुटका करायचा बेत आखला. धिस इज सिम्पली अनहर्ड ऑफ इन रिसेंट टाईम्स. यावरूनच विनिलची योग्यता आणि अशा व्यक्तींची आजकाल असलेली गरज दोन्ही स्पष्ट होत आहे. माओवाद्यांना व्यवस्था सुधारण्यात रस नाही, किंवा रिफ्रेज करतो, त्यांना सुधारित व्यवस्था आणायची नाहीये, फक्त स्वतःची व्यवस्था आणायची आहे. बास. त्यासाठी त्यांना आज आदिवासी आणि त्यांची चाललेली नाडणूक यांच्या कुबड्या उपयोगी ठरत आहे. जर का काही कारणाने ही उपयुक्तता संपली की मग कोण आदिवासी? असेही होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

ग्रुपचा सदस्य - एक चांगले काम!

आळश्यांचा राजा
Tue, 02/22/2011 - 21:11 नवीन
मला वाटते आत्तापर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातले हे पहिलेच उदाहरण असेल की एका सरकारी अधिकार्‍याचे अपहरण झाले आणि सामान्य जनता पेटून उठली,...
...अशा व्यक्तींची आजकाल असलेली गरज दोन्ही स्पष्ट होत आहे
माओवाद्यांना व्यवस्था सुधारण्यात रस नाही, ... फक्त स्वतःची व्यवस्था आणायची आहे. बास.
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+११११११११११

चिंतामणी
Wed, 02/23/2011 - 00:23 नवीन
मी सुध्दा सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

अतिशय माहितीपूर्ण

चित्रा
Tue, 02/22/2011 - 10:12 नवीन
प्रतिसाद, आळशांचा राजा आणि इंद्रराज पवार यांचे. विनिल यांचे "आय अ‍ॅम फायटिंग अगेन्स्ट अंडरडीवेलपमेंट" हेच बहुदा परिस्थिती चिघळत रहावी असे वाटणार्‍या लोकांना नको आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments

कोरापुट कलेक्टर श्री. राजेश

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/22/2011 - 11:44 नवीन
कोरापुट कलेक्टर श्री. राजेश पाटील यांनी केलेले हे आवाहन मिपावरही यावे असे वाटते - Thanks all, for the support and solidarity extended by the patriotic and peace loving citizen of india for the release of R. Vineel Krishna. now there is need to cross the cyber boundaries and make the voice reach to all corners of india that a patriotic human being who has taken it as his mission of life to change the rural landscape cann't suffer like this let there be candle light march, meetings, debate and dicussions on this importatnt issues in all big cities, universities and colleges if we remain indifferent to this then no one can save this country in future, one third of our landmass is already under the influence of red terror
  • Log in or register to post comments

सपोर्ट फॉर विनील

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/22/2011 - 11:59 नवीन
फेसबुकावरील Support For Vineel ग्रूप.
  • Log in or register to post comments

काही प्रश्न....काही उत्तरे...!!

इन्द्र्राज पवार
Tue, 02/22/2011 - 18:12 नवीन
वरील प्रतिसादात श्री.सुधीर काळे आणि श्री.प्रसन्न केसकर यानी या महत्वाच्या चर्चेदरम्यान (तसेच संबंधात) ओघाने काही नवीन प्रश्न पुढे आणले आहेत, पैकी श्री.सुधीर जी यांच्या प्रश्नांबाबतचा हा यथामती घेतलेला धांडोळा ~ १) कूळ कायद्याने 'कसेल त्याची जमीन' असताना अशा चळवळी उभ्या रहायचे कारणच मला दिसत नाहीं. तरीही असे होत असेल तर एक तर कायद्यात पळवाटा आहेत किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नाहीं. ~ कायदा, त्याची अंमलबजावणी आणि चळवळी ह्या गोष्टी एकमेकाला पूरक असल्या तरी 'कायद्यामुळे'च चळवळ उभी राहते (वा मरते...) असे नसून अन्य कारणासाठीदेखील चळवळी उभ्या राहिल्याची उदाहरणे प्रत्ययी नजरेसमोर येतील. "विद्यापीठातील भ्रष्ट पेपरसेटर्स ना काढून टाका..." अशी मागणी स्टुडंट्स युनियन करते, व्हीसी+सीनेट ती धुडकावून लावते, मग त्या मागणीसाठी युनियन व्यापक चळवळ उभी करते... कॉलेजीसमधून बंद पाळला जातो, वर्तमानपत्रे युनिअनची बाजू घेऊन तो प्रश्न धसास लावतात....मग स्थानिक आमदार, खासदार पुढे येतात, कुलगुरू युनियन पुढार्‍यांनी बोलावून घेतात...यादीतील १० नावापैकी ८ नावावर काट मारली जाते...युनिअन 'झाला आपला विजय...' म्हणून चळवळ स्थगित करते. इ.इ. ~ या उदाहरणात कायदा येत नाही, प्रकरण चिघळू नये म्हणून आणलाही जात नाही. इथे 'दोन पावले पुढे, एक पाऊल मागे...' असे तत्व स्वीकारले म्हणजे दोन्ही घटक समाधान प्राप्त करून नित्याच्या व्यवहाराला लागतात.....हे सुशिक्षित जगात घडू शकते....घडते. ~ नक्षलवादी चळवळ सुरू झाली ती 'कसेल त्याची जमीन' या कायद्यामुळे नव्हे तर ज्या आदिवासी युवकाची जी जमीन होती ती एका जमीनदाराने सावकारी पद्धतीच्या व्यवहारातून गिळंकृत केली होती. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या युवकाने सर्वप्रथम कायद्याच्या बाजूनेच लढा देऊन सावकारी देणे पूर्णपणे भागवले असे सिद्ध केले होते आणि त्याच्या आधारेच कोर्टाने जमीन बिमल किशनचीच असल्याने ती त्याला परत द्यावी असा हुकूमनामा बजावला. पण भारतीय न्यायव्यवस्था अशी काही आंधळी आहे की, हुकूम दिला, पण तो अंमलात कसा येईल याचे कसलेही गणित नाही. समज असा की, जमिनदार रायसाहेब यानी संध्याकाळी गावी परतल्यानंतर किशनला बोलावून त्याच्या पदरी शेताची कागदपत्रे ठेवावीत आणि आपले रखवालदार तिथून एका हाळीने बोलावून घ्यावेत..... होत नाही असे कदापिही... इथे स्थानिक पोलिस काय करतात असा प्रश्न तुमच्यापुढे पडत असेल, सुधीर जी. पण त्या जमीनदाराच्या जागी आपल्या वाड्याच्या प्रांगणात वारा खात, मलईचे घुटके घेत पडलेला एखादा उग्रनारायणसम 'अमरीश पुरी' नजरेसमोर आणा....आणि त्याच्या आजुबाजूला अस्ताव्यस्त पसरलेले गुरासम त्याचे पित्ते....बंगालमध्ये तर असे जमीनदारच गाव चालवत असत. आता अशा वळू पोसल्यागत पैलवानाच्या गराड्यात त्या किरकोळ गावातील तितकाच 'रघुवीर यादव' टाईप किरकोळ पोलिस (१९६५-६६ चे चित्र आहे...) थरथरत त्याची सायकल घेऊन कोर्ट हुकूम देण्यास आला तर त्याचे स्वागत कसे होत असेल? "फेकून दे तो हुकूम....आणि सांग जा त्या किसन्याला, असेल हिंमत तर चालवून दाखव नांगर शेतात....मग बघ काय होते ते...!" संतापाने फणफणलेला किशन हिंमत दाखवतो आणि खरोखरी ज्यावेळी शेत ताब्यात घ्यायला जातो, त्यावेळी जो अनुभव त्याला आणि त्याच्या जमातीच्या अन्य लोकांना येतो तो कायद्याच्या भाषेत वर्णन करताही येत नाही.....त्याला मारून टाकले म्हणजेच 'कसेल त्याची जमीन' हा कायदा आपल्या उपयोगाचा नाही हे त्या आदिवासी आणि अन्य सम वर्गाने जाणले आणि डोळ्यादेखत झालेल्या त्या अन्यायपूर्वक हत्येने तसेच 'या देशाचा कायदा आपल्याला न्याय तर देईल, पण त्याची अंमलबजावणी करायला पुरेसा नाही...' असा निष्कर्ष काढून मग 'ईट का जवाब पत्थर से...' हेच सूत्र अंमलात आणले तरच खर्‍या अर्थाने न्याय, असे त्या उद्ध्वस्त झालेल्या जमातीला शिकवण देणारा तिथलाच एखादा चारू मुझुमदार त्याना 'गॉडफादर' वाटतो....मग त्या चळवळीला हिंसेची जी दिशा मिळते, तिचे रूपांतर मग एका "ईझम" मध्ये होते....तोच 'नक्षलवाद' म्हणून जोमाने फोफावतो. सरकार आपले रक्षण करत नसेल तर मग ते सरकार तरी का मानायचे? या भूमिकेतून चोखाळलेल्या रस्त्याला त्यांच्या नजरेत जे "यश" मिळते त्यामुळे फुलून जावून मग अन्यत्र हीच केमिस्ट्री वापरून "युवा वर्ग" इकडे वळविता येतो. शिवाय आदिवासी (अगदी महाराष्ट्रातील घेतले तरी) मुलामुलींना पारंपारिक पद्धतीने चालू असलेल्या शिक्षणप्रसारात काहीच गती नाही, गम्य नाही. आजही महाराष्ट्रातील कित्येक सरकारी खात्यात 'आदिवासी' कॅटेगरीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शेकडो जागा रिक्त आहेत (बॅकलॉग भरून काढावा असा राज्य सरकारचा त्या त्या खात्याला धोशा लावलेला असतो, पण मुळात ही मंडळी 'नागरी सेवे'च्या प्रवाहात येण्यास तयार नसतात, कारण त्याना ही जंगल भटकंती आवडते....आणि ती आवडावी असेच प्रशिक्षण चळवलीचे म्होरके निर्माणही करत असतात.) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सरकार अपेशी ठरते ही उद्रेकाची एक बाजू, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता/आहे तो आर्थिक स्तराचा. स्थूलमानाने सांगायचे तर या नेतेमंडळींनी आपल्या संघटनेच्या ताकदीवर "शासनसत्ता उलथून टाकू शकू आणि सत्ता आपल्या हाती आली की, आर्थिक स्थितीही कशी बदलायची तेही आपणच ठरवू..." अशी परिवर्तनाची मोहिनी याना दाखविली आहे, त्याचा परिणाम असा झाला की, मतपेट्यातून निवडून आलेले सरकार आमचे नाही, मग जर ते आपले नाही तर त्यांचा कायदा तरी आम्ही का पाळू? आणि तसे असेल तर त्या 'कायद्या'चा धाक दाखवून आमच्या रस्त्यात येणार्‍याना आम्ही आमच्या पद्धतीने रोखणार हा आमचा निर्धार.....हे 'माओवाद्यां'नी यांच्यावर असे ठसविले की त्याना अपेक्षित असलेली क्रांती यांच्यातूनच होईल असे मानणारा गट प्रभावी ठरला आहे. चळवळी उभ्या राहिल्या त्या अशा आशेच्या गाजरावर आणि त्याना शक्ती मिळत आहे ती त्यांच्या अशा 'मोडस ऑपरेन्डी'वर. २) माओवादी तत्वप्रणालीचा सपशेल पराभव रशिया आणि चीनमध्ये झालेला स्पष्ट दिसत असताना (तोही माओ त्से तुंगसारखा बलदंड नेता असताना) अशी तत्वप्रणाली आजही हे लोक कुठल्या बळावर आदिवासींना पटवून देतात? ~ रशियात कॉ.लेनन यानी कशा रितीने संघटना उभारली यापेक्षा झारच्या 'राजेशाही' ला तिथली जनताच कशी कंटाळली होती हा इतिहास सर्वप्रथम अभ्यासास घेतला पाहिजे. एक लक्षात घ्या, लाल झेंड्याखाली रशियन एकत्र आले ते त्यांच्यासमोर ढळढळीत 'आहे रे' आणि 'नाही रे' असे दोन वर्ग होते म्हणून. लेनिनने त्याना 'भाकरी' पेक्षाही आपल्याला वेगळे काय हवे तर 'समानता' आणि 'बंधुभाव' हे असे काही पटवून दिले की सारा रशिया झारविरोधी एकत्र आला. माओने चीनमध्ये क्रांती कशी घडवून आणली हा प्रश्न सर्वस्वी वेगळा आहे. दोघांनीही संघटना उभारण्यासाठी कधी पुस्तकी सिद्धांतांचा आधार घेतला नव्हता. प्रत्यक्ष पातळीवरचे व्यावहारिक राजकारण हाताळण्याची आणि संघटन उभारण्याची त्यांची क्षमता अगदी वेगळ्या पातळीवरचे होती आणि दुसरे म्हणजे लेनिन काय किंवा माओ काय दोन्हीही नेते अत्यंत प्रतिगामी व अत्याचारी अशा उजव्या राजवटीच्या विरुद्ध लढत होते. आपला संबंध भारताशी येतो. नेहरूंचा काळ हा यशस्वी की अयशस्वी यावर पेपर्स लिहू शकतो, पण कुणीही तो काळ 'अत्याचारी आणि जुलूमी राजवटी'चा होता असे विधान करू शकणार नाही. त्यामुळे कम्युनिस्टातील डावे वा अन्य फळ्यांही नेहरूंच्या समाजवादाच्या व्याख्येला विरोध करत असले तरी त्यांच्याविरूद्ध 'उठाव' करावा अशा मन:स्थितीत कधीच नव्हते, मग त्यानी आपला मोर्चा वळविला तो राज्यपातळीवरील परिस्थितीवर. खंडप्राय असलेल्या आणि अठरापगड जातीजमातीने बनलेल्या या देशात 'वर्गहीन समाजव्यवस्था' कुठल्याच राज्यात नव्हती....आजही नाही. त्यामुळे माओसूत्रावर विश्वास असणार्‍यांना प्रथम राज्य ही चौकट आटोक्यात येणारी वाटली आणि शिवाय लोकशाही निवडणुकांच्या मार्गाने मध्यवर्ती सत्ता ताब्यात घ्यायची असे स्वप्न पाहाणार्‍यांना या माओवाद्यांनी राज्यपातळीपासून त्याची सुरुवात करावी असे वाटणे स्वाभाविक, मग त्यातून पाठिंबा मिळण्यासाठी अशा चळवळी. इथे माओ आणि लेनिन यांच्या तत्वज्ञानाला आता त्यांच्या त्यांच्या देशात अनुयायी मिळत नसले तरी त्यांच्या येथील पित्त्यांच्या मनोवृत्तीत काही फरक पडत नाही. "....ही तत्वप्रणाली आता scrap झाली आहे/व्हायला हवी! (या दुसर्‍या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळतच नाहीं)....." ~ याचे समाधानकारक उत्तर शोधणारी श्री.विनील कृष्णासारखी कर्तबगार अधिकार्‍यांची पिढी पुढे आली आहे. वर श्री.आ.रा. आणि अन्य ज्येष्ठ्य सदस्यांनी प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे विनीलचे प्रयत्न "नक्षलवाद्यांचा" बिमोड नसून 'नक्षलवादा' ला पूर्णविराम देण्याचा आहे, जे त्यांच्यासारखे अधिकारी नक्कीच करून दाखवतील.....प्रोव्हायडेड, दे सी इव्हन अ‍ॅन ऑर्डिनरी सिटिझन इज रेडी टु गिव्ह देम सपोर्ट फॉर द कॉज !! तत्वप्रणाली स्क्रॅप होण्यासाठी मुळात शासन आणि अधिकारी यांच्यात परस्पर सामंजस्याचा दुवा असावा लागतो. म्हणजे रूट लेव्हलला जाऊन त्या तत्वप्रणालीचा शोध घेऊन जो त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो (उदा.विनील...) त्याच्यावर जर काही संकट कोसळले तर शासन चालविणार्‍यांनी प्रथम प्राधान्याने त्याच्यामागे भक्कम उभे राहून ते संकट दूर केले पाहिजे. असे झाले तरच दुसरा विनीलही तयार होईल आणि तुम्ही म्हणता ती तत्वप्रणालीही अस्तित्वात राहणार नाही. लेट अस होप...! इन्द्रा
  • Log in or register to post comments

अंमलबजावणीचा अभाव आणि भ्रष्टाचार हेच मूळ दिसते...

सुधीर काळे
Tue, 02/22/2011 - 22:18 नवीन
इंद्रा-जी, १) पण भारतीय न्यायव्यवस्था अशी काही आंधळी आहे की, हुकूम दिला, पण तो अंमलात कसा येईल याचे कसलेही गणित नाही. म्हणजे अंमलबजावणीचीच उणीव आहे. मग ती दूर का नाहीं करता येत? २) ज्या देशांत ती प्रस्थापित होती त्या देशांतही या नव्या संघटनांनीही (माओ, स्टॅलिन, ब्रझनेव वगैरेंनी) अनंत अत्याचार केले पण तरीही ती समाजव्यवस्था लोकांचे पोट भरू शकली नाहीं व म्हणूनच scrap झाली. त्यालाही आता वीस-एक वर्षे झाली व या वीस वर्षात चीन हा एक आर्थिक सुपरपॉवर झाला! तरीही आपले 'नाही रे' लोक यांच्या मागे कसे लागतात हे कळत नाहीं! या बाबतीत काय करायचे हे स्पष्ट आहे व सरकार जो यांना खतम करण्यासाठी पैस ओतत आहे त्याच्या निम्म्यात नक्षलवाद आटोपेल. कै. करकरे याच दिशेने प्रयत्न करत होते ते तिथल्या प्रस्थापित जमीनदारांना आवडले नाहीं व त्यांची बदली करण्यात आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

तु नक्की काय करीत आहेस?

चिंतामणी
Wed, 02/23/2011 - 00:32 नवीन
इथे स्थानिक पोलिस काय करतात असा प्रश्न तुमच्यापुढे पडत असेल, सुधीर जी. पण त्या जमीनदाराच्या जागी आपल्या वाड्याच्या प्रांगणात वारा खात, मलईचे घुटके घेत पडलेला एखादा उग्रनारायणसम 'अमरीश पुरी' नजरेसमोर आणा....आणि त्याच्या आजुबाजूला अस्ताव्यस्त पसरलेले गुरासम त्याचे पित्ते....बंगालमध्ये तर असे जमीनदारच गाव चालवत असत. आता अशा वळू पोसल्यागत पैलवानाच्या गराड्यात त्या किरकोळ गावातील तितकाच 'रघुवीर यादव' टाईप किरकोळ पोलिस (१९६५-६६ चे चित्र आहे...) थरथरत त्याची सायकल घेऊन कोर्ट हुकूम देण्यास आला तर त्याचे स्वागत कसे होत असेल? "फेकून दे तो हुकूम....आणि सांग जा त्या किसन्याला, असेल हिंमत तर चालवून दाखव नांगर शेतात....मग बघ काय होते ते...!". .............................................................................................................................................................................................................................................................................................................. परीस्थितीचे वर्णन करीत आहे का सिनेमाची "ष्टोरी" सांगत आहेस?????? तु मुद्याचे खंडन कर. पण तुझे इतर पोस्ट आहेत ना (उदा. फंडीग इत्यादी) त्या पातळीवर कर. याचा अर्थ असा नव्हे की तु नक्षलवाद्यांना विरोध कर. पण तुझ्या लेखनाची जी पातळी आहे ती या पोस्टमुळे खालावली असे माझे मत आहे. याचा अर्थ हे १००% चुक आहे असे मी म्हणत नाही. पण प्रतीसादाची पध्दत आणि त्याला काहीही आधार त्यात दिसला नाही म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा