जीवधन, नाणेघाट, हडसर, चावंड हा सर्वच परिसर फार सुरेख आहे. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला माळशेज घाटाच्या बाजूने (वैशाखरे गावातून) नाणेघाटावर चढाई करायला मजा येते.
थँक्स वल्ली.
बघताना परत एकदा दम लागला त्या चढणीचा, अन अंगावर दाट धुक पसरल्याचा भास झाला. आम्ही पावसाळ्यात जायचो, अक्षय मुळे फार ठिकाण अशी फिरायला मिळाली. त्या नाणेघाटच्या पठारावर हे मोठ्या मोठ्या सापाम्च्या काती दिसतात, काटा येतो अंगावर. जिवधन ची घ़ळ तर आपण पार केली हे नंतर पटतच नाही. कीप इट अप डिअर, मिळतय तोवर सारा संह्याद्री पालथा घाला.
अरे हो तीथे एक विमान कोसळल होत त्याचे अवषेश अजुन मिळतात, म्हणजे मी गेले होते तोवर तरी मिळायचे म्हणे. तो उल्लेख नाही केला तुम्ही?
ही माहिती तर माझ्यासाठी नवीनच आहे. नाणेघाट मी आतापर्यंत ५-६ वेळा केलेला आहे मला तरी आतापर्यंत अवशेष दिसले नाहीत कुठे.
आणि जीवधन तुम्ही पावसाळ्यात केला म्हणजे कमाल आहे. पावसाळ्यात तर वाटा भयंकर निसरड्या होतात.
हो त्या निसर्ड्या वाटाच आम्ही चाललोय.आमचा ग्रुप बहुतेक दा पावसाळ्यातच बाहेर पडत असे.वीस जण होतो आम्ही. अगदी एक स्टोव्ह पण असायचा बरोबर.
विमानाचे अवषेश मोठ्ठे मोठ्ठे नाहित अन मला सापांच्या कातीतुन ते शोधायला वेळ ही नाही मिळाला, पण ही बातमी आहे की त्या भागात लो प्रेशरने पुर विमान डिसिंटीग्रेट झाल होत.
मला पण असेच वाटते आहे.
पण आपणच सर्व मिळुन आपलाच स्वतंत्र टेक प्लॅन करु शकतो.
वल्ली आणि जीप्सी नक्कीच मदत करतील .. जीप्सींचे दर्शन बरेच दिवस झाले नाही.. एकदम तत्पर असतात ते यासाठी....
व्वा!!
वल्ली, सुरेख... इतक्या सुंदर मेजवानीसाठी धन्यवाद! नाणेघाटाच्या बाजूच्या नळीच्या वाटेची सैर घडवलीत, झकास्स!!!
२००१ आणि २००२ सालच्या पावसाळ्यात गेलोय जीवधन-नाणेघाट ट्रेकला. पहिल्या वेळी सर नाही झाला, दुसर्या वेळी इरेला पेटून गेलो होतो. सोप्या वाटणार्या वाटा पावसाळ्यात किती अवघड होऊ शकतात याचं जीवधन हे फार चांगलं उदाहरण आहे. वाटा, पुसट होतात, सगळीकडे माजलेलं रान, सोसाट्याचा वारा, रिपरिपणारा पाऊस, त्यामुळे अजूनच निसरडे होणारे कातळ, जंगलातले भुलभुलैय्या, आणि जोडीला बेफाम धुकं! पण अशा ऑड्समध्ये जीवधन केला की जग जिंकल्याचा आनंद होतो..
नाणेघाटाच्या डोंगराला 'नानाचा अंगठा' म्हणतात ना! म्हणून आम्ही वानरलिंगी सुळक्याला 'नाना' म्हणायचो. म्हणजे नाना तिथे जीवधनपाशी उभा आहे, आणि त्याचा अंगठा म्हणजे नाणेघाटाचा डोंगर! =)) =)) आणि 'नाना' म्हणजे आपले नानासाहेब नैत हो!! ये शेप्रेट नाना होने का!!
आमच्यातले थोडे आंग्लाळलेले लोक होते ते त्याला न्यूटन म्हणायचे, का कुणास ठाऊक! ;-)
--असुर
पण ज्याला जीवधन पहिल्यांदाच करायचा आहे त्याने शक्यतो पावसाळ्यात जाउ नये. अवघड वाट हे कारण तर आहेच शिवाय पावसाळ्यात धुक्यामुळे दृश्यमानता काहीही नसते त्यामुळे सह्याद्रीच्या अफाट पसरलेल्या धारेचे, सरळ तुटलेल्या खोल कातळकड्यांचे, आजूबाजूच्या इतर किल्ल्यांचे, नानाच्या अंगठ्याचे एव्हढेच नाही तर खुद्द वानरलिंगीचेही दर्शन होत नाही.
वानरलिंगीलाच मुंबईकडचे लोक 'खडा पारशी' असेही म्हणतात.
वल्ली, लई भारी बाबा तुम्ही लोकं, मला तिच्यायला घराची लिफ्ट बंद असेल तर धस्स होतंय (का ते भेटल्यावर कळॅलच)
फोटो पण लई भारी आलेत, सुमित दाखवे, अनिल रावळेकर यांना ओळखतो काय, ते पण दर शनिवार रविवारी असेच फिरत असतात.
पुढच्या ट्रेकला आमच्या शुभेच्छा.
या दोघांना नाही ओळखत. मी मात्र माझ्या शाळकरी मित्रांबरोबर भटकत असतो. आता रविवार हापिसात जावे लागणार आहे पण यदाकदाचित रद्द झालेच तर कार्ले, भाजे आणि बेडसे लेणी करायचा विचार आहे. बघू कसे जमते ते.
वल्ली, झक्कास अनुभव.........
हडसर आणि चावंड पाहून झालाय................ अता जिवधन आणि नाणेघाट राहिलाय....... फोटो पाहिले मस्तच आहेत................लवकरच अता तो पण सर करणार..............
वल्ली....
फोटो "दरडीतून उतरताना..." आणि 'नळीतून जाणारा मार्ग..." पाहताना मला चक्क आजकाल सर्वत्र गाजत असलेला आणि ऑस्करच्या रेसमधील चित्रपट "१२७ हावर्स" आठवला...तुमच्यासारखाच एक साहस आणि दुर्गप्रेमी युवक [एकटाच] अशा दरडीतून उतरत असताना एके ठिकाणी अडकून पडतो आणि त्यानंतरचे पुढचे १२७ तास 'जगण्यासाठी' कसा झगडा देत राहतो....याची सत्यकहाणी या चित्रपटात आहे. तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पाहावा...तुम्हास आणि जीवधन नाणेघाट ट्रेकमध्ये सामील झालेल्या सर्वाना तो भावेल.
फोटोवरून कळतेच.....'ये अपनी बस की बात नही, बाबा !'....पण वर्णन वाचून मनी येते मात्र की, आपणही केव्हातरी तुमचा पाठलाग करीत जथ्यात सामील व्हावे.
सुंदर अनुभवकथन....
इन्द्रा
इंद्रराज तुम्ही तर जथ्यात जरूर सामील होउन सह्याद्रीचे वारकरी व्हाच. आणि ही जीवधनची घळ तर काहीच नाही. तुम्हाला जर खरोखर "१२७ हावर्स" चा अनुभव सह्याद्रीत घ्यायचा असेल तर सांदण दरीशिवाय पर्याय नाही.
फोटोवरून कळतेच.....'ये अपनी बस की बात नही, बाबा !'....
अस काही नाहीये हो, सोबत ग्रूप असेल तर घेतात सगळे एकमेकांना सांभाळून, म्हणून ट्रेकींग अवश्य कराच, हे आपलं भाग्य आहे की आपण सह्याद्रीच्या कूशीत आहोत. कारण ट्रेकींगची मज्याच वेगळी आहे. जेव्हडे अवघड, तीतकेच मजेशीर, थरारक आणी योग्य काळजी घेतली तर संपूर्ण सूरक्षीत.
साहसी प्रकारात रॅपेलींग,रीव्हर क्रोसींग थोडं चॅलेंजींग असते पण जमून जाते, तर रॉक क्लायबींग, मात्र अवघड. तेथे फक्त शरीराने धडधाकट व मनाने साहसी लोकांनाच प्रवेश. पण ट्रेकींग बरच सोपं, आनंददायी व सर्व वयोगटासाठी ऊपलब्ध.
मस्त फोटो आणी वर्णन...
अवांतर...अरे हो तीथे एक विमान कोसळल होत त्याचे अवषेश अजुन मिळतात, म्हणजे मी गेले होते तोवर तरी मिळायचे म्हणे. तो उल्लेख नाही केला तुम्ही?>>>> अपर्णाजी ते विमान जिवधन नाणेघाट परिसरात नाही तर कल्याण-नगर रोड वरील खुबि फाट्यावरुन एक वाट सिंद्दौला टेकडीवरुन नाणेघाटात येते त्या वाटेवर पडले होते. अजुनही सिंद्दौला टेकडीपरिसरात त्याचे अवशेष सापडतात.
प्रतिक्रिया
जबरदस्त
+१
ढासु फटु. स्टन्न्ड!!!
थँक्स वल्ली. बघताना परत एकदा
अरेच्चा
हो त्या निसर्ड्या वाटाच आम्ही
मला पण आत एखादा ट्रेक क्लब
मला पण असेच वाटते आहे. पण
दोनदा आल्याने स्वसंपादित
मला पण नुकतीच आठवण आली होती
मस्त लेख आणि फोटो. तो सुळका
जबरदस्त एकदम
मस्तच ! अवघड आहे हे मला
वल्या.. खतरा फोटू... अजून
व्वा!! वल्ली, सुरेख... इतक्या
वानरलिंगी
वल्ली नेहमीप्रमाणेच झ का स
वल्ली, लई भारी बाबा तुम्ही
नाही
वल्ली, झक्कास
दरडीतून उतरताना...!!
अहो
"दरडींमधून उतरताना"
वावा..
जबऱ्या
अप्रतिम!!! काय सुरेख आहेत
झक्कास
मस्त फोटो आणी
वल्ला...
+१ आता कधी?
+१ आता कधी?
कधी ते