दोन पेग मारुन.................
लेखनप्रकार
मानुस च बनला माणसाचा वैरी ..
तोंडावर हसू अन पाठीला सूरी ................
अशा नत द्रष्टाना
आपण कसे हेरायचे
आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या
हे किती दिवस लपवायचे ?
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता
सावलीसारखे जपले
तुम्हाला हवी "स्पेस"
त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले
शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा
भाव आणून किती जणांना फसवायच
अस कुठवर चालायचं ......................
एकलव्यान मानल द्रोणास गुरु ...
दिला अंगठा म्हणुनी "गुरुदक्षिणा"
आजचेच काही "गुरु"
प्रायव्हेट ट्युशन घेऊन किती उकळतात "दक्षिणा"
भूछत्र उगवतात तसे उगवले
शाळा ,कॉलेज ,आणि नरसऱ्या ..........
डोनेशन ,अडमिशन ,फी ,आणि फंड
पार करत सामान्यांना येतात घेरया............
अशा "ज्ञान" विकणाऱ्या गुरूना..
आपणच किती सोकावतो आहे
कॉम्पिटीशन चा जमाना आहे म्हणून आपनच
त्यांच्यामागे धावतो आहे
दुष्काळी बळीराजा ,वैतागला हळहळला ...
कर्जाला टाटा बाय - बाय करून
देवाघरी विसावला
सरकारी प्यकेज चा फायदा
मधल्या च बोक्यानी उचलला
अशा बोक्याचं कंबरड
देवबाप्पा तू का मोडत नाहीस ..........
गरिबाला दिलीस अर्धी भाकरी
ती हि तू सोडत नाहीस ...........
ऐश्वर्य ,बंगला अन गाड्यांच्चा त्यांच्याकडे चमचमाट...................
गरीबाकड १-२ मडकी गाडगी
फाटलेली गोधडी अन मोडलेली खाट..............
जो पाप करतो
म्हणतात त्याचा घडा इथेच भरतो
मरण तर सर्व जीवांना अटळ
गरीब हि मरतो अन पापीही मरतो .............
पण (भ्रष्ट बोका )पुरेपूर जगतो
अन पुरपूर उप भोगतो
बिचारा गरीब चार घासासाठी
डोक्यावरच्या छतासाठी
रोज मरून जगतो
लढत पडत शेवटी
कुठतरी जाऊन खपतो
कोण गेलेय स्वर्गात अन कोण गेलेय नरकात
कोण पाहायला जातो ?
ज्याला हि अंदाधुंदी नाही बघवत
तो काय करतो ...........
एकट्याने काय लढणार ह्या .....
माजलेल्या बोक्यांशी ..
म्हणून दोन पेग मारून
निवांत झोपतो ..................
वाचने
4149
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
अ-- प्र-- ती-- म .
खरोखर अंतर्मुख करायला लावणारी कविता....
खूप छान......
>>>अ-- प्र-- ती-- म .
>>> खरोखर अंतर्मुख करायला लावणारी कविता....
स्पा भौ शी एकदम सहमत...
+१
अशा नत द्रष्टाना आपण कसे हेरायचे आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या हे किती दिवस लपवायचे ?पियुषा! जमलय बाकी! मस्त च!
मनातील व्यथा शब्दांमागुन कळुन येते आहे ..
लिहित रहा .. वाचत आहे ..
मस्त! सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येणारे विचार अगदी चरचरीत भाषेत परिणामकारकपणे लिहीले आहेत! कविता आवडली.
In reply to मस्त! सगळ्यांच्याच मनात कधी by नगरीनिरंजन
१०१% सहमत! :)
मन- मनातलं भाष्य मनापासून उतरवलं आहेस.
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता
सावलीसारखे जपले
तुम्हाला हवी "स्पेस"
त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले
शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा
भाव आणून किती जणांना फसवायच
अस कुठवर चालायचं ...........
बाईग छान लिहितेस . खूप छान लिही. मस्त .मनापासून .
म्हणशील कोण कुठला काय म्हणतोय .चांगलं म्हणतोय . मनापासून की काय देवास ठाऊक ? [असा मनात विचार आणायचा नाही ]
लिवले ब्वा चला शुभ दिवस .!!
सत्य कथन मांडलय..
- पिंगू
छानच!
लई भारी... !!
भावस्पर्षी कविता...
पुलेशु
हदयस्पर्शी कविता. बाकी दोन पेग मारुन हे टायटल वाचुन आधी वाटले, तात्यांचा लेख आहे की काय.. ;)
-
(बार बाऊन्सर) इंट्या.
भावना अगदी मनापासून व्यक्त केल्या आहेत. पु.ले.शु.
मनपूर्वक धन्यवाद. असेच दर्जेदार लेखन होत राहूदे.
In reply to खरोखर छान लीहली आहे कवीता by आत्मशून्य
अश्या दर्जेदार लेखांना माझे पुरातन काळा पासुन प्रोत्साहन आहे ;)
छान कविता...
छान .
बिचारा गरीब चार घासासाठी
डोक्यावरच्या छतासाठी
रोज मरून जगतो
लढत पडत शेवटी
कुठतरी जाऊन खपतो
वा, क्या बात है!!अगदी खरं आहे!!
अशा बोक्याचं कंबरड
देवबाप्पा तू का मोडत नाहीस ..........
गरिबाला दिलीस अर्धी भाकरी
ती हि तू सोडत नाहीस ...........
म्हणूनच त्या देवबाप्पावरचा आमचा विश्वासही उडत चाललांय!!!! किती जणांना नडावं त्याने!!!
तो काय करतो ...........
...
...
... दोन पेग मारून
निवांत झोपतो ..................
सहमत. तो तरी बिचारा काय करणार!!!!
जे चाल्लंय ते बघवतही नाही, आणि काही करताही येत नाही!!!
मग पेगांचाच सहारा!!!
एकट्याने काय लढणार ह्या .....
माजलेल्या बोक्यांशी ..
म्हणून दोन पेग मारून
निवांत झोपतो .................
सह्हीईईईईईईई!!!!!!!!!!
अ-- प्र-- ती-- म . खरोखर