मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किनारा

शैलेन्द्र · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा, तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इषारा मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा. अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा. वनवास या सुखाचा मी विरहात साहीला, स्वप्नात शोधीला पण शारीर राहीला, माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा, दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा. होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती, लवलवती पेटुन काया, गंधीत मात्र होती, नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता, ह्रदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता. होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची, गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची, आली प्रचंड भरती मग उधान सागराला, गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.

वाचने 1939 वाचनखूण प्रतिक्रिया 8
खूपच छान ! होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची, गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची, आली प्रचंड भरती मग उधान सागराला, गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा. सुरेख कविता .

राजेश घासकडवी 30/11/2010 - 17:12
कविता आवडली. गोंडस व काहीशा एकसुरी प्रेमकाव्यांपेक्षा जिवंत शृंगाराच्या अनुभवाचं चित्रण केलेलं आहे. असेच धीटपणे विषय हाताळत राहा. वृत्तावर थोडी मेहेनत घेतली तर नादमयता वाढून या कवितेला अधिक बहार येईल.

In reply to by राजेश घासकडवी

शैलेन्द्र 23/12/2010 - 19:25
"वृत्तावर थोडी मेहेनत घेतली तर नादमयता वाढून या कवितेला अधिक बहार येईल." अगदी मनापासुन मान्य, वृत्त शाळेत असताना, ऑप्शनला टाकले होते, आता शिकायला लागेल.... हा विषय मांडायचा बराच काळ मनात होत, थोडासा संकोच होता.. पण शेवटी धाडस केल.