तेथे कर माझे जुळती
आज २६/११/२०१०! मुंबईच्या ’शिरकाणा’ला दोन वर्षें झाली. छत्रपती शिवाजी टर्मिनस, रंगमंदिर गल्ली, मरीन ड्राइव्ह, ट्रायडेंट व ताजमहाल हॉटेल अशा अनेक जागी 'प्रेमळ' शेजारी देशातून आलेल्या अतिरेक्यांनी थैमान घातले! रंगमंदिर गल्लीत करकरे, कामटे व सालसकर हे तीन मोहरे पडले. त्याचे कारण म्हणजे करकरेंची बुलेटप्रूफ गाडी ते वापरू शकले नव्हते.
विनीताताई कामटेंच्या "To the last bullet" या पुस्तकातील माहितीनुसार करकरेंनी सांगितलेल्या कारवाया करण्यात आल्या नव्हत्या व त्या करण्याता आल्या नव्हत्या हे करकरेंना 'कंट्रोल रूम'मधून कुणी सांगितलेच नाहीं. त्यामुळे सांगितलेली कारवाई झाली असेलच असे गृहीत धरून हे तीघे साध्या गाडीत बसून रंगमंदिर गल्लीत गेले व AK-47च्या गोळ्यांना बळी पडले. पण पडता-पडता कामटेंनी त्यांच्या AK-47ने कसाबला जखमी मात्र केले. त्याचा फायदा नंतर त्याच्या अटकेत झाला.
त्या काळरात्री ओंबळे यांनी असामान्य धैर्य दाखविले.
त्यांना वायरलेसवरून कळले होते कीं अतिरेकी 'स्कोडा' गाडीतून पळाले असून 'मरीन ड्राइव्ह'च्या दिशेने येत आहेत. तेवढ्यात 'स्कोडा' वेगात त्यांच्या समोरून गेली. ओंबळेंनी आपल्या मोटरसायकलवरून तिचा पाठलाग गेला. इतर पोलिसांनी रस्त्यावर अडथळे उभे केले होते. गाडीचा वेग कमी झाल्यावर ओंबळेंनी आपली मोटरसायकल 'स्कोडा'समोर घातली त्यामुळे अतिरेक्यांना ती उजवीकडे वळवावी लागली व गाडी विभाजकावर आदळून थांबली. ओंबळे यांनी धावत जाऊन गाडीतील दोघांपैकी कसाबवर छलांग मारली व त्याच्या AK47 बंदुकीची नळी (Barrel) त्यांनी आपल्या दोन्ही हातांत घट्ट पकडून धरली. Barrel ओंबळेंच्या बाजूला असल्यामुळे कसाबने त्यांच्या पोटात गोळ्या मारल्या. ओंबळे कोसळले पण शुद्ध हरपेपर्यंत त्यांनी ती नळी सोडली नाहीं. त्यामुळे कसाब इतर कुणावर गोळ्या झाडू शकला नाहीं. दरम्यान इतर पोलिसांनी दुसर्या अतिरेक्याला (इस्माईल) ठार कले व कसाबला पकडण्यात ते यशस्वी झाले. अटक झालेल्या कसाबकडून हा हल्ला पाकिस्तानच्या भूमीवरूनच केला गेला होता हे सिद्ध करण्यात भारत सरकार यशस्वी झाले. पण त्यापायी ओंबळेंच्या सारख्या मोहर्याला स्वतःचा प्राण गमवावा लागला.
पण जीव देणार्या या वीरांइतकाच पण आगळा-वेगळा पराक्रम केला 'ताज'चे जनरल मॅनेजर श्री करमबीर सिंग कांग यांनी.
स्वत:ची पत्नी व दोन मुलगे मृत्यू पावले आहेत हे माहीत असूनही ते आपल्या पोस्टवरून हलले नाहींत व आपल्या कर्मचार्यांना धीर देऊन, मार्गदर्शन करून त्यांनी हॉटेलमध्ये रहाणार्या हजारो पाहुण्यांचे प्राण वाचविले.
१९६५ व १९७१ सालच्या दोन्ही युद्धात सक्रीय भाग घेतलेल्या मेजर जनरल साहेबांचे-जगतार यांचे-करमबीर सिंग कांग हे सुपुत्र होते. वडिलांच्या फौजेतील बदली होणार्या नोकरीमुळे त्यांना अनेक शाळांमध्ये शिकावे लागले पण जातील तिथे त्यांनी जिवश्च-कंठश्च मित्र जोडले. कांगसाहेब 'ताज'च्या सेवेत गेली १९ वर्षें होते. अवघड कामे नेहमीच त्यांना दिली जात व ते ती कामे यशस्वीरीत्या पार पाडत. त्यांच्या टीममध्ये असलेल्या प्रत्येकाकडून ते उत्तम रीतीने काम करून घेत. ते अतीशय लोकप्रिय 'बॉस' होते व त्यामुळे त्यांच्या सहाय्यकांना कामावर जावेसे वाटे व ते अत्यंत उत्साहाने कामावर येत. जिथे-जिथे ताज हॉटेल लंगडत चालायचे तिथे यांना पाठवण्यात येई व ते चालवायला घेतल्यानंतर वर्षाभरात ते हॉटेल अत्यंत कार्यक्षम होत असे.
ताजमध्येच काम करणार्या नीती माथुर यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. एकाच कंपनीत नवरा-बायकोंनी काम करू नये म्हणून नीतीबाईंनी 'ताज' सोडून 'ग्रिंडलेज'मध्ये नोकरी धरली. पुढे पहिल्या मुलाचा-उदयचा-जन्म झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली व त्या पूर्णपणे मुलाबाळांत रमून गेल्या.
२६/११ रोजी ताजवर हल्ला झाला तेंव्हां ते वांद्र्याच्या "लँड्स एंड"मध्ये कुठल्याशा सेमिनारच्या व्यवस्थापनात गुंतले होते. 'ताज'वर हल्ला झाला आहे असे कळताच ते ताबडतोड तिथे आले तोपर्यंत अतिरेकी आत घुसलेच होते व त्यामुळे त्यांना सहाव्या मजल्यावर अडकलेल्या आपल्या कुटुंबियांपर्यंत जाता आले नाहीं. हताश होऊन त्यांनी बहरीन येथे असलेल्या आपल्या वडिलांना फोन करून सारी परिस्थिती सांगितली. "त्यांना मदत करू शकत नसलास तर इतरांना मदत कर. एका अस्सल शिखासारखा धैर्याने संकटाचा सामना कर" असे सांगितल्यामुळे त्यांना धीर आला व स्वतःची दोन मुले मृत्युमुखी पडली असूनही धैर्याने लढलेल्या शीख गुरूंचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन आपले कर्तव्य त्यांनी पार पाडले.
दरम्यान अतिरेक्यांना त्यांच्या पाकिस्तानमधील श्रेष्ठींकडून आज्ञा येतच होत्या, "आगी लावा, सगळ्यांना दिसू द्या तुमचे 'कर्तृत्व', दिसेल त्याला गोळी घाला" वगैरे व त्य सर्व आज्ञा पार पाडल्या गेल्या! ताजच्या खिडक्यांतून बाहेर पडणारे आगीचे लोट सार्या जगाने पाहिले!
त्यावेळी ज्या-ज्या मित्रांनी त्याना फोन केले त्या सर्वांना त्यांनी एकच विनंती केली, "माझे कुटुंबीय सुखरूप रहावेत म्हणून प्रार्थना करा".
पण या सर्वांनी अशी प्रार्थना करूनही त्यांची पत्नी व मुले वाचली नाहींत. त्यांनी सुरक्षेसाठी बाथरूमचा आश्रय घेतला होता व शेवटी ते तीघे तिथेच गुदमरून निधन पावले. पत्नीचा व मुलांचा देह हाती आल्यानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांनी केला व ते हॉटेलवर परतले व "हॉटेल लवकरात लवकर पुन्हा सुरू करायचे" ध्येय समोर ठेऊन त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले व विक्रमी वेगाने हॉटेल पुन्हा सुरू केले.
Economic Times ने ठेवलेला Corporate Citizen of the Year हा सन्मान त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला. तसेच २००९ सालचे अतीशय श्रेष्ठ समजले जाणारे "Best of the Best" Hotel सन्मानांपैकी Virtuoso Hotelier of the Year हा सन्मानसुद्धा त्यांना त्यांच्या कामावरील निष्ठेसाठी व ताज हॉटेलला जगातल्या उत्तम हॉटेल्समधील एक हॉटेल बनविण्याबद्दल देण्यात आला. हा समारंभ लास वेगस (Las Vegas) येथे झाला. त्या वर्षी या सन्मानाचे नामांकन मिळणारे ते एकमेव भारतीय होते.
अशी माणसे देव क्वचितच बनवतो!
हे सर्व वाचल्यावर "गड आला पण सिंह गेला" या शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध उद्गारांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीं व मग तोंडातून शब्द बाहेर पडतात, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती"
(Pakista Defence या संस्थळावरील "Karambir Singh Kang, saviour of Taj Hotel on 26/11" हा एलिजाबेथ फ्लॉक यांचा 'फोब्स इंडिया'तील लेख, 'To The Last Bullet" या पुस्तकातील माहिती, इतर वृत्तपत्रे, नियतकालिके यातील माझे वाचन तसेच विकिपीडियावरून मिळविलेल्या माहिती यावरआधारित)
स्वत:ची पत्नी व दोन मुलगे मृत्यू पावले आहेत हे माहीत असूनही ते आपल्या पोस्टवरून हलले नाहींत व आपल्या कर्मचार्यांना धीर देऊन, मार्गदर्शन करून त्यांनी हॉटेलमध्ये रहाणार्या हजारो पाहुण्यांचे प्राण वाचविले.
१९६५ व १९७१ सालच्या दोन्ही युद्धात सक्रीय भाग घेतलेल्या मेजर जनरल साहेबांचे-जगतार यांचे-करमबीर सिंग कांग हे सुपुत्र होते. वडिलांच्या फौजेतील बदली होणार्या नोकरीमुळे त्यांना अनेक शाळांमध्ये शिकावे लागले पण जातील तिथे त्यांनी जिवश्च-कंठश्च मित्र जोडले. कांगसाहेब 'ताज'च्या सेवेत गेली १९ वर्षें होते. अवघड कामे नेहमीच त्यांना दिली जात व ते ती कामे यशस्वीरीत्या पार पाडत. त्यांच्या टीममध्ये असलेल्या प्रत्येकाकडून ते उत्तम रीतीने काम करून घेत. ते अतीशय लोकप्रिय 'बॉस' होते व त्यामुळे त्यांच्या सहाय्यकांना कामावर जावेसे वाटे व ते अत्यंत उत्साहाने कामावर येत. जिथे-जिथे ताज हॉटेल लंगडत चालायचे तिथे यांना पाठवण्यात येई व ते चालवायला घेतल्यानंतर वर्षाभरात ते हॉटेल अत्यंत कार्यक्षम होत असे.
ताजमध्येच काम करणार्या नीती माथुर यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. एकाच कंपनीत नवरा-बायकोंनी काम करू नये म्हणून नीतीबाईंनी 'ताज' सोडून 'ग्रिंडलेज'मध्ये नोकरी धरली. पुढे पहिल्या मुलाचा-उदयचा-जन्म झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली व त्या पूर्णपणे मुलाबाळांत रमून गेल्या.
त्यावेळी ज्या-ज्या मित्रांनी त्याना फोन केले त्या सर्वांना त्यांनी एकच विनंती केली, "माझे कुटुंबीय सुखरूप रहावेत म्हणून प्रार्थना करा".
पण या सर्वांनी अशी प्रार्थना करूनही त्यांची पत्नी व मुले वाचली नाहींत. त्यांनी सुरक्षेसाठी बाथरूमचा आश्रय घेतला होता व शेवटी ते तीघे तिथेच गुदमरून निधन पावले. पत्नीचा व मुलांचा देह हाती आल्यानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांनी केला व ते हॉटेलवर परतले व "हॉटेल लवकरात लवकर पुन्हा सुरू करायचे" ध्येय समोर ठेऊन त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले व विक्रमी वेगाने हॉटेल पुन्हा सुरू केले.
Economic Times ने ठेवलेला Corporate Citizen of the Year हा सन्मान त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला. तसेच २००९ सालचे अतीशय श्रेष्ठ समजले जाणारे "Best of the Best" Hotel सन्मानांपैकी Virtuoso Hotelier of the Year हा सन्मानसुद्धा त्यांना त्यांच्या कामावरील निष्ठेसाठी व ताज हॉटेलला जगातल्या उत्तम हॉटेल्समधील एक हॉटेल बनविण्याबद्दल देण्यात आला. हा समारंभ लास वेगस (Las Vegas) येथे झाला. त्या वर्षी या सन्मानाचे नामांकन मिळणारे ते एकमेव भारतीय होते.
अशी माणसे देव क्वचितच बनवतो!
हे सर्व वाचल्यावर "गड आला पण सिंह गेला" या शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध उद्गारांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीं व मग तोंडातून शब्द बाहेर पडतात, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती"
वाचने
6913
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरय.
स्मरण
समयोचीत
१०० टक्के सहमत!
In reply to समयोचीत by विकास
का हे बलिदान?
सहमत
In reply to का हे बलिदान? by रन्गराव
>>पण यात लोकांनाही दोष
In reply to सहमत by अपूर्व कात्रे
हा लेख २६/११ वरील असल्यामुळे मी हा उल्लेख केला नाहीं
In reply to का हे बलिदान? by रन्गराव
धन्यवाद
तेथे कर माझे जुळती असेच
सर्व शहिदांना सलाम आणि श्रद्धांजली
सर्व शहिदांना सलाम आणि
संकटाचा सामना कर....!!
शब्द अपुरे आहेत ,अशा विराना
हुतात्मे
Amen!
In reply to हुतात्मे by kamalakant samant
सहमत
In reply to हुतात्मे by kamalakant samant
या
नि:शब्द !
सर्व शहीद विरांना
निशब्द ... डोळ्यात पाणी आले
लाईव्ह लिक चा एक दुवा
सर्वच वाहिन्यांवर दाखविल्या गेल्या होत्या
In reply to लाईव्ह लिक चा एक दुवा by दिपक
सर्व वीर शहीदांना श्रद्धांजली
>>"त्यांना मदत करू शकत नसलास
काळेसाहेब, अतिशय समयोचित आणि
काळेसाहेब, लेख खूप आवडला.
धन्यवाद.....
नि:शब्द!