सर्व साधारण पणे साहित्यिक क्षेत्रात एकमेकांच्या साहित्यावर स्तुती / टीका होताना दिसते. ते साहजिकच आणि अपेक्षितही आहे. पण 'रहस्य कथा' लिहिणार्यांकडे तसे उपेक्षेनेच बघितले जाते ही वस्तुस्थिती आहे. अर्थात ह्याला बर्याच प्रमाणात रहस्य्कथा लेखकच कारणिभूत आहेतच पण ओल्याबरोबर 'सुकेही' जळते ह्या न्यायाने ' त्या उडिदात जे काही गोरे' होते त्यांच्या कडे दुर्लक्ष झाले (किंवा मुद्दाम केले गेले).
सर्व सामान्य वाचकाचे मागणे लई नसते. थोडी फार करमणू़क, विरंगुळा एवढाच माफक हेतू असतो. आणि 'रहस्य कथेत' ही मागणी अगदी चोख पुरवायचा प्रयत्न केलेला दिसतो (अगदी ढापून सुद्धा). त्यामुळे 'समिक्षकही' ह्या साहित्याची दखल घेण्याच्या सुद्धा भानगडीत पडत नाहीत. पण त्याच्यातच जर कोणी धाडस दाखवून वेगळे प्रयोग जर केले असतील तर त्याची मात्र उपेक्षा (क्वचित टिंगलच) होते. सु. शि. ने अनेक वेगळे प्रयोग केले आहेत - बरेच फसले - काही जमले - पण जेव्हा जमले तेव्हा त्याच्या पाठीवर कुठलीही कौतुकाची थाप पडली नाही - कारण का - तर तो सर्व सामान्यांना आवडेल असे 'रहस्य कथा लेखन' करतो.
कितिही नाकारले तरी कुठल्याही प्रस्थापित साहित्यिकाने 'ह्या प्रकारच्या' लेखकांबद्दल कुठलीही आपुलकी, (साधा उल्लेख) केल्याचेही आढळात नाही. नाही म्हणायला पु. लं नी बाबुराव अर्नाळकरांवर एक लेख लिहिला होता.
मी म्हणतो तो क्लासेस आणि मासेस मधला तथाकथित फरक तो हाच - बहुसंख्य जनतेला आवडते ना - मग करा त्याची उपेक्षा - अपवाद आहेतच वरती दिल्या प्रमाणे - पण जे अपवाद वरती नोंदवले गेले आहेत त्यांच्या समिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या काळात त्यांना झोडपलेच होते - नंतर त्यांचे विचार बदलले असतीलही - आणि जनतेने सु. शि ल कधीच स्वीकारले आहे, समिक्षक किंवा तथाकथित साहित्यिक कधी स्वीकारणार का हाच प्रश्न आहे.
"अरे गाढवा! मला ते वाचून बघितलं पायजेल ना! त्याशिवाय चित्रासाठी विषय कसा निवडनार? का हेमामालिनीचं चित्रं काढून हवेय तुला?" मास्तर वैतागले...
:))
एक होती पवाडा गाण्यार्या शाहिराची!! अगदी मर्हाट्मोळा पोशाख! डफ आणि फेट्यासकट!! आणि चेहर्यावर अगदी बाबासाहेब पुरंदर्यांचा आवेश!!!
दुसरी होती नऊवारी नेसलेल्या, बोटांत पदर उंचावलेल्या मराठमोळ्या तमाशा नर्तिकेची!! चेहरा वेगळा होता पण भाव अगदी जयश्री गडकरच्या "बुगडी माझी सांडली ग!" मधला!!!!
आय हाय!!!!! दोन पुर्णतः वेगवेगळ्या भावमुद्रा श्रवणभक्तिच्या धुंदीत एकाच वेळी साकारणारे गावित मास्तर भारीच की.
आणि चित्राचं वर्णनही अप्रतिम. :) आवडल बॉ आपल्याला.
अवांतरः काही क्षण विचार केला, वरची चर्चा वाचून भांबावून गेलो. लेख तर आवडलाय. प्रतिक्रिया काय द्यावी कळेना.
लेखाला 'नाही आवडला' म्हणून विद्वानांच्या पंक्तित बसावं (स्वत:ची ती काडीमात्र लायकी आणि अभ्यास नसताना) की मनमोकळेपणानं दाद द्यावी? .......शेवटी आमच्या सर्वसामान्यपणानं उचल खाल्ली आणि मनाच्या गाभ्यानं दिलेला कौल आम्ही आचरणात आणला. :)
अति अवांतरः सु.शि. आमचा आवडता लेखक. लाख त्यानं इंग्रजी कथांची भाषांतरं केली असतील, पण त्याच्याइतक्या ताकदीनं मराठीत रहस्यकथा सादर करणं अजुनतरी कोणाला जमलं असेल असं वाटत नाही. असल्यास मला माहित नाही.
हे आपलं स्वतःचं वैयक्तिक मत. कोणाला पटावं असा अट्टाहास मुळीच नाही :)
रहस्य कथा लेखकांत पेरी मॅसन , आर्थर कोनन डॉइल. यांचेलेखन खरेच चांगले आहेत.
गुरुनाथ नाईक ष्टाईल बाज आहेत. सु शी ची दुनियादारी ज्याने वाचली त्याला त्यंचे वेगळेपण जाणवते.
जी ए चा एक विवक्षीत वाचक वर्ग आहे. तो वर्ग जी एंच्या गाभुळलेल्या लेखन शैलीतुन कधी बाहेरच येत नाही.
जी ए नी जर एखादी श्रुंगारीक कथा लिहिली तरी ते
तिचा शेवाळी हिरवा स्पर्ष आणि आणि रीकाम्या गडग्यात किणकिणार्या खडयांसारख्या वाजणार्या बांगड्या त्याला एक वेगळीच जाणीव करुन देत होत्या . त्याच्यातील श्वापद हळुहळु जागे होऊ लागले. त्याने जड हातानेच तिचा हात हातात घेतला.
तिच्या सर्वांगातुन कसलीशी शहारलेली जाणीव धावत गेली. मणामणाचे ओझे उचलावे तसा तिचा श्वास तिलाच जड झाला. घशातुन कसलासा खरवडलेला आवज उमटवुन तिने त्याच्या कडे पाहीले. मांजर फिस्कारावे तसा तो तोंडभर हसला
असे लिहितील
ही त्यांची ष्टाइल चाहत्याना आवडुन जाते.
मला पिंजरा चित्रपतातील एक वाक्य आठवते "मास्तर तुमी ज्याला यौवन म्हणता त्याला आमी ज्वानी म्हणतो "
आणि कुठल्याशा हिंदी पिक्चर मधले हे वाक्य ही " तुम्हारे बडे होने से मै छोता नही हो जाता"
प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे उगाच सुपारी ची तुलन पेढ्याशी करु नका
प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे उगाच सुपारी ची तुलन पेढ्याशी करु नका
धन्यवाद!
हेच जर १५-२० प्रतिसादांपूर्वी तुम्हाला माहित असते तर इथे जीए आणि सुशी आलेच नसते. असो लेखाशी संबधीत नसलेल्या ह्या चर्चेने तुम्हाला 'लगेच आनंद' तरी मिळाला...तसा आम्हीही घेतला;) )
हेच जर १५-२० प्रतिसादांपूर्वी तुम्हाला माहित असते तर इथे जीए आणि सुशी आलेच नसते
आरं माज्या! येकाद्याची बाजू घिऊन ब्वालायला हरकत नस्ती रं पन आपन बरुबर ब्वालतोय का त्ये तरी पगावं. आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं. काय हाय की काई लोकांना सवय जाली हाय... दिसली जागा की काड वपु भायीर, दिसली जागा की काड साने गुर्जी भायीर मग लोक पन जीए भायीर काडतात.
त्येच तर म्हनतोय राजा मी ..१५-२० प्रतिसादांपूर्वी सानेगुर्जी/ वपु आलं तेव्हाच म्हणायच ना पेढ्याची तुलना सुपारीशी कशापायी? का आपलं जीए सुशी काडायचं?
तू पन ल्येका 'सबसे तेज' वाल्यांसारखाच दिसतोस!! :)
आरं, साने गुर्जी, वपु आलं म्हनून जीए आलं, जीए आलं म्हनून सुशी आलं....आणि शेवटी सगळंच अंगावर आलं, म्हणून पेढा आणि सुपारी पण आले हा हा हा!!!
आता असे बघा. ही भरकटलेली चर्चा सुरू झाली ती वरील लेखावर समिक्षकी पद्धतीने टिका करून चलनी नाणे वगैरे म्हणल्यामुळे, पुढे ती भरकटली. जशी काही समिक्षकाना ती आवडली नाही तशी काहीना ती आवडली. त्यामुळे टिकेला प्रत्युत्तर आणि प्रतुत्तराला प्रत्युत्तर अशा प्रवासातून चर्चा भरकटली. कदाचित प्रत्येकाची असते आवड निरनिराळी. एखाद्याला पेढ्यापेक्षा असेल सुपारी जास्त आवडत पण एखादे मत जाहीर व्यक्त झाले की चर्चा सुरू होणारच.
आता तुम्ही म्हणता
त्येच तर म्हनतोय राजा मी ..१५-२० प्रतिसादांपूर्वी सानेगुर्जी/ वपु आलं तेव्हाच म्हणायच ना पेढ्याची तुलना सुपारीशी कशापायी? का आपलं जीए सुशी काडायचं?
तू पन ल्येका 'सबसे तेज' वाल्यांसारखाच
त्याऐवजी पेढा आणि सुपारीत तुलना न करता जर समिक्षकी मत जर प्रस्तुत लेखकाला पोष्टकार्ड पाठवून सांगता आले असते. आता मी या डांबिसकाकाच्या लेखनाचा पंखा आहे ,त्यामुळे जर कोणी जाहीर टीका केली डांबिसकाकाच्या लेखनावर तर त्याला माझ्या परीने मी उत्तर देईनच ना! मग हा पेढा आणि सुपारीतला फरक प्रस्तुत टिकाकार स्वतः जाणत नव्हते का? आणि तो त्याना आणि त्यांच्या बाजूने चर्चा करणार्याना नव्हता का कळत? असाल तुम्ही पेढेवाले. सोडूने द्यायचे होते हे लेखन सुपारीवाल्याचे आहे म्हणून.
दुसर्याला नुसते डोस पाजायचे, अगदी उच्च अभिरुचिचे रसिक म्हणून मिरवायचे, आचरणात आणा ना आधी एखादी गोष्ट.
पुण्याचे पेशवे
कथेचा आशय आवडला.
काही प्रमाणात साचेबद्ध होती, हे वरील काही प्रतिसादांतले मत पटते. चित्रकलेच्या बाई अनावश्यकपणे एकसुरी भडक वाटल्या, पण लघुकथेत कधीकधी असे सुलभीकरण चालायचेच.
कोणाच्याही विशेष बोलीची ढब (म्हणजे त्या बोलीतली शुद्धताच ती!) काटेकोरपणे पाळण्यात कसब महत्त्वाचे. नाहीतर सत्याचा आभास भंगतो, हे म्हणणे खरेच आहे. पण या कथेत अशी उदाहरणे थोडीच दिसतात. असले बारीकसारीक दोष पुढच्या आवृत्तीत सहज सुधारण्यासारखे आहेत.
सारांश : कथेचा आशय मला आवडण्यासारखा आहे.
मतमतांतरांचा उडालेला धुरळा डोळ्यात जाऊन सुरुवातीला मूळ कथा नीट दिसेना त्यामुळे आज निवांत वाचून प्रतिक्रिया देतोय. :)
कथा चांगली आहे. पात्र रंगवण्याची हातोटी तुम्हाला साधली आहे. कथेचा गाभा चंगला असला तरी बांधणी थोडी विसविशीत वाटली कारण कथेची सुरुवात करताना शेवट कसा करणार हे नक्की नसावे असे एकूण लिखाणावरुन वाटले. शेवट काही वेगळा, अधिक नाट्यपूर्ण, करता आला असता तर कथा ठरीव साचाच्या बाहेर पाऊल ठेवणारी आणि अधिक कसदार होऊ शकली असती असे वाटते.
थोडी अधिक मेहनत तुमच्यातला उत्तम लघुकथा लेखक आकाराला आणेल असे वाटते. पु.ले.शु.
(स्वगत - असं भडकमकर मास्तरांच्या क्लासमधून शिकून आल्यासारखं परीक्षण कधीपासून लिहायला लागलास रे तू रंगा? ;) )
चतुरंग
प्रतिक्रिया
मला लेख
गावित मास्तर
क्लासेस आणि मासेस
+++++++++++++++१
डांबिसकाका,
जी ए नी जर एखादी श्रुंगारीक कथा लिहिली
प्रत्येका
साने, वपु, जीए, सुशी, अर्नाळकर
आरं, साने
अवं,
मस्त जमलय,
छान.
आशय आवडला
मला
डांबिसकाका,
व्वा!!