आई !!!
किती काळ गेला तुला जाऊन
तुझी आठवण येत नाही असे होत नाही.
पण तुझ्या आठवणीने
डोळ्यात पाणी येते असे पण आता होत नाही !!
आई!!
बरे झाले तू म्हातारी होऊन नाही गेलीस
मी जेह्वा एकटा असतो
वरच्या गच्चीत निळ्या आभाळाकडे बघत असतो
आई मला तू चक्क दिसतेस
तुझा तो छान प्रसन्न चेहरा
माझे मन भरून येते
पण शप्पत ?
डोळ्यात पाणी नाही येत आताशा माझ्या !!
आई ;तू शांत होतीस
दुधावरची साय होतीस !
पोरांनी अभ्यास नाही केलास तर
मास्तरची छडी होतीस !!
चार-पाच पोरांची तू आई होतीस
चार-चार पाच -पाच रुपये लपवून-साठवून
घराला मदत करणारी तू कोण होतीस?
तू साक्षात लक्ष्मी होतीस ?
आनदाचा झरा होतीस !!
बाबा गेला नि तू एकदम कोरडी झालीस
अचानक प्रौढ झालीस
वयाला न शोभेल अशी म्हातारी झालीस
ह्या संसारातून तू अलिप्त झालीस !
आता आमच्या ह्या वयात आठवतांना
तू किती लहान वाटतेस ?
तू जाण्याच्या काही दिवस आधी म्हणालीस
खूप सांभाळलेत मला प्रेमाने
जिवंतपणी केलेत ते भरपूर केलेत
मेल्यावर काही केले नाही तरी
मी आहेच तुमच्या मागे सतत !!
मी गेल्यावर मोठेपणा मिरवण्यात
उगाच वेळ घालवू नका
अन पाप पुण्याचा हिशेब ठेऊ नका !!
आणि आज ह्या ढग भरल्या दिवसात
तुझी आठवण आली
अन शप्पत !!
डोळ्यातून एक थेंब टपकला ..!!!
किती काळ गेला तुला जाऊन
तुझी आठवण येत नाही असे होत नाही
पण आता खरेच सांगतो
डोळ्यातून पाणी येते किंवा येत नाही
खरेच आता कळत नाही !!
आणि आज ह्या ढग भरल्या
कविता आवडली. थोडी विस्कळीत
असेच म्हणते
ढगभरल्या आसमंतात दाटलेली आठवण