सदर कादंबरी कुणी वाचली आहे का अशी काही जणांनी पृच्छा केली आहे. मी मिस्त्री यांचा 'टेल्स फ्रॉम फिरोजशा बाग' (१९८७) हा कथासंग्रह पूर्वीच वाचला होता आणि तो मला आवडलाही होता. म्हणून 'सच अ लाँग जर्नी' (१९९१) प्रकाशित झाल्या झाल्या लगेचच वाचली होती. मुंबईचं इंग्रजी साहित्यातलं प्रभावी चित्रण ज्यात आहे अशा निवडक कादंबर्यांमध्ये माझ्या मते या कादंबरीचा समावेश नक्कीच व्हायला हवा. त्यातलं प्रमुख पात्र खास पारशी विक्षिप्तपणानं आजूबाजूच्या परिस्थितीवर टोकदार भाष्य करत असतं. तो विक्षिप्तपणा खूपच परिचयाचा असल्यामुळे आणि त्यातला गोडवा जाणवत असल्यामुळे या कादंबरीबद्दल (आणि तेही इतक्या वर्षांनी) असा गदारोळ उठेल असं तेव्हा अजिबातच वाटलं नव्हतं. प्रमुख पात्र आजूबाजूच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीमुळे (कादंबरीला १९७१ च्या बांगलादेश युध्दाची पार्श्वभूमी आहे) आणि स्वतःच्या कौटुंबिक समस्यांमुळे खूप हताश होत जातं आणि त्याचा वास्तवावरचा ताबाही हळूहळू सुटू लागतो असं आठवतं. खाली कुणीतरी उल्लेख केलेल्या उतार्यांकडे या सर्व संदर्भासहित पाहिलं पाहिजे. प्रथेप्रमाणे आपलं राजकीय नेतृत्व 'कादंबरी वाचली नाही' हे अभिमानानं सांगत आहे आणि तरीही त्यातला तथाकथित आक्षेपार्ह संदर्भांविना उद्धृत करत आहे हे लक्षात घ्यायला हवं.
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.
अवांतरः प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊ नये म्हणून पहिल्या प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणून लिहीत आहे.
थोडक्यात कादंबरीची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच वाचायला आवडेल (आणि मिळाली तर वाचेन).
मला वाटते हे मधल्या काळात जे काही "भावना दुखावू नयेत" म्हणून अतिरेक होऊ लागला त्याचा हा परीणाम आहे. यात त्याची बाजू घेणे हा उद्देश नसून हा कॉज पेक्षा इफेक्ट आहे असे वाटते हे सांगणे हा उद्देश आहे.
म्हणूनच आपल्याकडे असल्या बंदी करण्यास कायद्याने बंदी केली पाहीजे असे वाटते. अमेरिकेत एका पाद्र्याने मुस्लीम धर्मग्रंथ जाळायचा आचरटपणा करण्याचे ठरवले होते. त्याला सगळ्यांनी विरोध केला अगदी ओबामाने देखील. तसे करू नका असे आवाहन केले गेले, मात्र त्याला कायद्याने कोणी अडवू शकले नाही. (सुदैवाने तसे त्याने काही केले नाही). हे थोडेफार अवांतर आहे. पण हा विषय महत्वाचा वाटत असल्याने येथे लिहीले आहे इतकेच.
मिसळपावावरून असे लेख ब्यान करायला हवेत.
ठाकरे म्हणजे दैवत. दैवतांची अशी गंमत करू नये. लोकांची किती श्रद्धा आहे ठाकर्यांवर. जनमानसाचा काही विचार करा चिंजं तुम्ही.
सायबांचा असा एकेरी उल्लेख ?
साहेब युवराजांसारखे ख्रिश्चन मिशनर्यांच्या कॉलेजांमध्ये शिकले असते तर त्यानी पुस्तक वाचले असते व फक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काढायचे काय, विद्यापीठच बंद केले असते. आणि सोज्वळ शिव्या कशा असाव्यात यासाठी “माझे विद्यापीठ” सुरू केले असते.
.छावा अजून लहान आहे. त्याच्या दुडक्या पावलांचे कौतुक करा. आताच हातात तलवार आली आहे अजून ती नीट चालवायला शिकायचं आहे.
सायबांना तलवारीची गरज नव्हती त्यांचं मत होतं:
खिंचों न कमानको न तलवार निकालो
जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो !!!
चला आता जवळ जवळ पॉपकॉर्न खायची वेळ झाली!!!
>> पण विधान सभेतुन की विधान परिषदेतुन निवडुन येणार?
मुख्यमंत्री होणार हे एकदा सांगितले ना.
पुन्हा असले गावंढळ प्रश्न का विचारत आहात ?
कुठुन का निवडुन येईनात, तुम्हाला काय त्याचे ?
मराठी माण्सचे पाय ओढणे बंद करा नायत्र पुढच्यावेळी नारळ फोडताना तुम्हाला उचलुन आणावे लागेल ;)
अरे डान्राव तुम्ही का? अरं चुकलो चुकलो परत नाही असे विचारणार.
कुठुनका येईना ! मराठी मानुस आहे ना ! बास्स.
तेवढं मंडपाच कान्ट्राक्ट आपल्याकडं येईल येवढं बगा राव.. मराठी मानसाला मदत !
डॉनजींचा प्रतिसाद पाहून मन भारावले. आपल्या मोठ्या भावाची, तिकडे पाकिस्तानात म्हणे बायपास झाली आहे नुकतीच. असो.
सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेस करते तीच फक्त घराणेशाही. बाकीच्यांची मुले, पुतणे, नातू हे स्वयंभू असतात.
अरे माझ्या राजकुमारा, तो ठाकरा मराठी शाळेत शिकलेला असता ना तर तुझ्या तोंडात साखर पडो असे म्हणालो असतो. पण तो पडला क्षेव्हियरवाला. त्याला काय कळणार रे झा@ मराठी?
पाहू काय होते ते. त्या राहूल पेक्षा बरा इतकेच!
अरे बेसनलाडवा (ठाकरीय शैली), किंग जॉर्ज नाही राजा शिवाजी. आत्ताच सांगितले ना मिभोंनी? स्वतःच्या शाळेचे नाव ही तुम्हाला माहित असू नये हे जरा अतीच झाले. तुम्हाला राजा शिवाजी नावाचे वावडे आहे का? किंवा हे नाव फारच डाऊन मार्केट वाटते का?
कृपया, शाळा स्थापन झाली तेव्हा किंग जॉर्ज नाव होते म्हणून तसे लिहिले असा युक्तिवाद करू नये.
(स्टंप सोडून खेळणाऱ्या शतकवीरांना त्रिफळाचीत करणारा) वि.मे.
कृपया, शाळा स्थापन झाली तेव्हा किंग जॉर्ज नाव होते म्हणून तसे लिहिले असा युक्तिवाद करू नये.
का बरे? तेच सत्य आहे. आणि मला माझ्या शाळेच्या नावाचा अभिमान आहे, म्हणूनच माझ्या व्यक्तिगत माहितीत ते जसेच्या तसे लिहिले आहे.
कृपया विनाकारण काड्या सारून स्वतःचा आणि माझा वेळ दवडू नये.
(नाबाद)बेसनलाडू
का बरे? तेच सत्य आहे.
त्याकाळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते हे ही सत्य आहे. आता उठून तुम्ही "God save the queen" म्हणायला लागणार की काय?
मला माझ्या शाळेच्या नावाचा अभिमान आहे
वरील प्रतिसादातून तसे दिसले नाही. मुंबईला बॉम्बे म्हटल्यावर चिडतो की नाही आपण? मी चिडतो, तुमचे माहित नाही. माझा त्या शाळेशी / संस्थेशी काही संबंध नसता तर नसतो बोललो काही.
म्हणूनच माझ्या व्यक्तिगत माहितीत ते जसेच्या तसे लिहिले आहे.
तुम्ही तुमच्या व्यक्तिगत माहितीत काहीही लिहा हो. अनवधानाने इथे काय लिहून गेलात ते महत्त्वाचे.
कृपया विनाकारण काड्या सारून स्वतःचा आणि माझा वेळ दवडू नये.
काड्या सारायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे. तुमच्या कडे पण तो आहे असे दिसते. उसामध्ये कामाचा दिवस आणि वेळ असताना प्रतिक्रिया येतात म्हणून म्हटले.
एका धाग्यावर दोनपेक्षा जास्त अवांतर प्रतिसाद देणे टाळण्यासाठी पुढील बातचीत करायची असल्यास खव/व्यनी मधून करेन.
मुंबई- बाँबे, राजा शिवाजी - किंग जॉर्ज या नामधारी वादांमध्ये पडायला मला आवडत नाही. माझ्या शाळेबद्दलच्या भावनांच्या सच्चेपणासाठी मला तुमच्यासारख्या काडीघालूंच्या संकुचित प्रमाणपत्रांची गरज वाटत नाही.
काड्या सारायला तुमच्याकडे वेळच वेळ आहे हे तुम्हीच कबूल केलेत हे बरे. माझ्याकडे असलेला वेळ मी तुमच्या या सत्कार्यात खर्चू इच्छित नाही. पण तरीही आगलावेपणा करायचाच असेल, तर तो शिखंडीसारखा व्यनि/खरडींच्या आडून नको; येथेच होऊ देत.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
एक शंका: काका बालमोहनवाला असे वाचल्याचे आणि ऐकल्याचे स्मरते. नक्की कुठला? माहितगारांनी कृपया शंकानिरसन करावे. म्हणजे किंग जॉर्ज / राजा शिवाजी चर्चा करायची की बालमोहन (? सेंट बाल्स?) तेवढे निश्चित होईल.:)
चिंज, उत्तम लेख.
हे मात्र काही दिवसांनी कळेल. आत्ताच तर येंट्री घेतली ना? ते ही खरंच म्हणा! पण वाद झाल्या शिवाय प्रसिद्धी कशी मिळणार?
ती नाही मिळाली, तर लोक नेत्यांना 'पावरबाज' कसे म्हणणार?
असो, नाशकातले मुजोर भय्ये पाहता, सध्या तरी आमचे मत राज ठाकरेला!
मस्तच लेख. सध्या ह्या मुंबई विद्यापीठाचे महान कुलगुरु कोण आहेत ?
अरूण टिकेकरांनी म्हणे म्हटलं आहे की अभ्यासक्रमातून पुस्तक काढण्यासाठी एक विशीतला मुलगा मुंबई विद्यापीठाच्या व्हाइस-चॅन्सलरला अशी २४ तासांची नोटीस कशी बजावू शकतो
नोटीस मी पण बजावू शकतो, त्या नोटीशीचे पालन करणारा गाढव नाही का?असो.पारशी लोक नाहीतरी मराठी माणसांना घाटी म्हणून हिणवतातच. बरी जिरवली आदित्यरावांनी!!
भेंडी तुझे किती मित्र / मैत्रिणी पारसी आहेत अन त्यातील किती जणांनी तुला घाटी म्हणून हिणविले आहे ??
मला अन माझ्या ताईला कॉलेज पासून आजपर्यत असंख्य पारसी मित्र मैत्रिण लाभले त्यातील कोणीही मला किंवा माझ्या ईतर मराठी मित्रांना / मैत्रिणींना घाटी म्हणून कधिही हिणविलेले माझ्या आठवणीत नाही. इंडियन होटेल्स कंपनीस लिमिटेड (IHCL)च्या ताज ग्रुप ऑफ होटेल्स मध्ये सिस्टीम अन्लिस्ट म्हणून काम करतानाही मी पारसी लोकांना खुप जवळून पाहीले आहे and some of them are really really worth to call a good human beings.
हे घाटी म्हणून हिणविण्याचे कुकर्म काही गुजराथी करतात पारसी नव्हे. कादंबरी लिहणार्या लेखकाच्या धर्मावर टिकास्त्र रोखायची येथे गरज नव्हती . मला जर कोणी घाटी म्हंटले तर माझे एकच उत्तर असते, " Yes I am Ghati! I am proud to call myself Ghati because I belongs to beautiful Ghats of Maharashtra."
पारशी जमाती एवढी गोड जमात अन लोक शोधुन सापडणार नाहीत
असो , बाकी चिंजंचा लेख नेहमीच प्रमाणे अप्रतिम ! Tiger Thackeray close to extinction by his own Blood
वाहिदा,
तुझ्याशी पूर्णपणे सहमत!
माझे काही प्रोफेसर पारशी असल्याने माझा त्यांच्याशी आणि त्यांच्या फॅमिलीजशी अगदी जवळून संबंध आणि अनुभव आला आहे...
पण ते कोणीही मला अथवा इतर मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवतांना मी बघितलेलं नाही...
(पारसी लोकं मराठी माणसाला थट्टेत "तात्या" म्हणतात, "घाटी" नाही!!! जसे आपण त्यांना थट्टेत "बावाजी" म्हणतो!!!)
खरं सांगायचं तर मला मुंबईचा गैरफायदा उठवणार्या नॉन मुंबईकर मराठी माणसापेक्षा (वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरदराव पवार इत्यादि मुख्यमंत्री) मुंबईकर पारसी मला जास्त जवळचा वाटतो!!!
मुंबईकर,
पिडां
पण पारशांची खरी जिरवली ती मिस्त्रीनच. आपल्या पुस्तकात त्याने बावाजींची चांगलीच टिंगल टवाळकी केली आहे. आणि सगळ्यात त्याने जिरवली आहे व जास्त टिंगल केली आहे ती इंदिरा गांधींचीच, सायबांची नाही. पण बॉम्बे स्कॉटीश स्कूलध्ये शिकलेल्या युवराजांसारखे आपल्याला इंग्लीश येत नसल्याने आपन पुस्तक नाय वाचला. पण पुस्तक वाचतांना सायबांच्या व्यंगचित्रांची आणि शिवाजी पार्कातल्या भाषणांचीच सारखी आठवण येत होती
आपण मराठी मराठी बोंबलत बसलो. इंग्रजी नाय शिकलो. पण आपल्यातला हा पयलाच पोरगा फाड फाड इग्रजी शिकला म्हणून पुस्तकात काय लिवलंय हे कळायला यवडी, म्हणजे वीस वर्ष लागली. नायतर तेवाच पुस्तक जाळून टाकला असता नाय का? आता आपल्यातला दुसरा पोरगा (छोटे युवराज ) तोड फोड इंग्रजी शिकतोय. मग काय मजा येईल ते बगा.
पण ती तलवार लयच जड व्हती, हाय का नाय ? म्हणून उभी धरायच्या बदली विटी दांडूच्या दांडू सारकी आडवी धरली होती. विटी दांडू खेळायच्या वयात हातात तलवार दिली तर काय व्हनार?
राजकारण्यांची मुले पालकांच्या वलयातून बाहेर पडली तर त्यांचं काय होइल असं वाटतं.
पोटापाण्यासाठी कोणता मार्ग स्विकारतील?;)
आज विशीत जिथे सामान्य नागरिक चार पैसे मिळवण्यासाठी धडपडत असतो तिथे ही ब्रँडेड वस्तू वापरणारी पिलावळ कितपत टिकते? बरीच वर्षं आईवडीलांच्या आशिर्वादानं असली छोटीमोठी कामं करून मिरवता येतं तोपर्यंत ठिक, पण त्यानं एखादं पुस्तक लिहावं कि! खरी मर्दुमकी कश्यात आहे हे आपल्या मुलांना कळणार नाही आणि ती तशीच मोठी (वयाने) होत जातील या कल्पनेची मला तरी भिती वाटते.
प्रतिक्रिया
मस्त बोचरे चिमटे!
कादंबरी वाचली आहे
धन्यवाद
वा वा वा मज्जाच मज्जा चालु
हेच बोल्तो. चिंजं : उत्तम
या छोट्या ठाकर्यांना
युवराजांचे युवराज
आरे हो की. हे लक्षातच आले
युवयुवराज की युयुवराज असे
एक कौलच टाका ना मालक त्यासाठी
आपल्याला
अगदी अगदी
तर काय?
त्यांचा आजा मोठा ठाकरे असता
आजा मोठा ठाकरे?
गुंडोआजोबा बोलले म्हणजे हे
सहमत आहे. पण विधान सभेतुन की
गावंढळ ...
अरे डान्राव तुम्ही का? अरं
डॉनजी
आम्हीतर विचारनार होतो
मिपा / उपक्रम
निवडणुक.
मग मुख्यमंत्री कसे होणार?
नानु..ठाकर्यांना रीमोट
सहमत आणि काहींना आतल्या
हॅ हॅ, ते माहित नाही, पण
अरे
मराठी शिकेल नक्की शिकेल ...
काका?
काका
२०१२ किंग जॉर्ज चे शतकमहोत्सवी वर्ष आहे!
अरे बेसनलाडवा (ठाकरीय शैली),
का बरे?
का बरे? तेच सत्य
वेळच वेळ
प्रचुदोप
काका किंग जॉर्जवाला?
>>त्या राहूल पेक्षा बरा
ते ही
हा हा
Parsi is the Shweetest Community I have ever seen
(विषय दिलेला नाही)
टोटली सहमत!
१०० % सहमत
पारशांची जिरवली ??
आता इंग्रजी कोनाला येतंय?
राजकारण्यांची मुले पालकांच्या
+१
विद्यार्थी सेनेचे काय ?