Skip to main content

पितृपक्ष-२

लेखक शुचि यांनी रविवार, 26/09/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
पितृपक्षाविषयी चर्चेमधे एक लक्षात आलं की बहुतेक जणांनी या रूढीविरोधी सूर लावला होता. कोणी अक्षरक्षः कोणीही बाजू घेणारं निघलं नाही. काहाजणं कुंपणावर होते (on the fence). याबाबत वाईट वाटलं. मी २००० मधे म्हणजे १० वर्षांपूर्वी भारतात असताना टिळकांचं "गीतारहस्य" वाचलं होतं. त्यातही सगळं नाही पण ६ वा च मला वाटतं अध्याय ज्याचं नाव आहे "कर्मविपाक" वाचला होता. आणि खूप मंत्रमुग्ध झाले होते. अतिशय तर्कशुद्ध रीतीने गूढ गोष्टी मांडल्या होत्या, व्यवस्थित पटवून दिल्या होत्या. संचित, क्रियमाण, प्रलब्ध हे कर्माचे तीन प्रकार सुरेख म्हणजे अतिशय सुरेख रीतीने व्यक्त केले होते. याच धड्यात जीवात्म्याचा मृत्यूपश्चात प्रवास, नंतरची त्याची योनी याबाबत काही मुद्दे होते. तसच श्राद्ध, पितृपक्ष आदिंचे महत्त्व आणि जीवात्म्यास या रुढींचा होणारा फायदा विषद केला होता. मला ते सर्व वाचायला खूप अद्भुत वाटले. जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते. अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?

वाचने 32587
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

थोडसं गंभीरपणे : एक तर कशावरून मृत्युपक्षात जीवन असते? आणि जरी असेल तरी जिवंत जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागण्यापेक्षा मेलेले अन ज्यांचे अस्तित्व आपल्याला ज्ञात नाही त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणे अन जेवणावळी घालणे यापेक्षा एखाद्या गरजवंताला का नाही मदत करायची? अन जरी आत्मा वगैरे प्रकार असले तरी ते या पृथ्वीवरच राहतील हे कशावरून? टिळक असो कि आणखी कोणी त्यांनी हि मृत्युपक्षात योनी आहे वगैरे कशावरून ठरवले? काय पुरावा आहे? वाचायला अद्भुत असले म्हणजे ते सत्य असते असे नाही...किंबहुना खुपदा नसतेच. पूर्वापार चालत आलेल्या रुढींना विचार न करता आंधळेपणाने धरून राहिले कि आपण धर्माभिमानी ठरतो का? मला व्यक्तीशः हे प्रकार पटत नाही...जिवंत असलेले राहिले बाजूला मेलेल्यांचे काय करत राहायचेय?

In reply to by शिल्पा ब

>> एक तर कशावरून मृत्युपक्षात जीवन असते?>> कशावरून नसते? >> आणि जरी असेल तरी जिवंत जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागण्यापेक्षा मेलेले अन ज्यांचे अस्तित्व आपल्याला ज्ञात नाही त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणे अन जेवणावळी घालणे यापेक्षा एखाद्या गरजवंताला का नाही मदत करायची? >> गरजवंताला मदत करा ना वर्षभर. वर्षातले १५ दिवस पितरांना देता येत नाहीत? >> आंधळेपणाने धरून राहिले कि आपण धर्माभिमानी ठरतो का? >> आंधळेपणानी नाही स्वप्न आदिंचा इनेक्स्प्लिकेबल अनुभव!!!

In reply to by शुचि

विषय तुम्ही काढलात...तुम्ही एखादा तरी पुरावा द्या कि मृतुपक्षात लोक अजून कुठल्यातरी योनीत फिरतात वगैरे... स्वप्न म्हणजे आपण विचार करतो , पाहतो, ऐकतो वगैरे याची फलित असते.. आता तुम्ही म्हणता हि १५ दिवस (आहेत याची खात्री नसली तरी) पितरांना द्या....उद्या अजून काही कोणीतरी आहेच म्हणेल त्यांना पण द्या...याला काय अर्थ आहे..आणि ज्याचे अस्तिव आहे कि नाही याचा काहीच पुरावा नाही त्यासाठी एवढी यातायात? त्यापेक्षा जिवंत असतानाच चांगले वागा कि...

In reply to by शिल्पा ब

>> तुम्ही एखादा तरी पुरावा द्या कि मृतुपक्षात लोक अजून कुठल्यातरी योनीत फिरतात वगैरे >> माझ्याकडे पुरावा नाही. सूर्याचा गायत्री मंत्र सगळे म्हणतात त्यातही भु:, भुवः, स्वः या तीन लोकांचा उल्लेख आहे. कोणी पाहीलेयत हे तीनही लोक? पण आपण म्हणतोच ना गयत्री मंत्र?

In reply to by शुचि

मग जे लोक भूत / पिशाच्च वगैरे मानतात अन त्यांच्यावर "जालीम " उपाय करतात त्यांना का अंधश्रद्ध म्हणून नावे ठेवायची?

In reply to by शिल्पा ब

प्रत्येकाची सीमारेखा अस्ते, मर्यादित अनुभवकक्षा असतात हे खरं. त्यानुसार तो श्रद्धेच्या मर्यादा ठरवतो.

जीवात्मा आपण पाहिलेला नसतो, पाहिलेले लोकही माहिती नसतात. अशावेळी या विषयावर आपला वेळ दवडण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी मन लावले तर त्या वेळाचा आपल्याला आणि दुसर्‍यांनाही फायदा होऊ शकतो. अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का? अश्रद्ध लोक कधी वाचून बोलतात, कधी न वाचता लोकांवर विश्वास ठेवून बोलतात. माणसे म्हटली, की विविध प्रकारची असतात. सर्वांना सरळसोट एकच समजणे गरजेचे नाही. मुळात पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. पुरोगामी असणे चांगले असते. या आधारे, एखादी कृती समाजाला सध्याच्या काळाला योग्य आणि जरूरीचे असे मार्गदर्शन करत असली, पुढे घेऊन जात असली तर पुरोगामी आहे, असे म्हणायला हरकत नाही. पुरोगामी असण्याला विरोध नसतो. तुमचा विरोध पुरोगामी असण्यास नाही, पण पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणार्‍यांना आहे असे दिसते आहे. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. शेवटी पुरोगामित्व हे कृतीने ठरणार आहे. आज इंटरनेटच्या जमान्यात काँप्युटर वापरायला शिकायचाच नाही, असा हट्ट धरून बसणार्‍याचे आजच्या जगात काय होईल? आणि एखाद्याने असा हट्ट धरला, म्हणून त्याचे सर्वच म्हणणे टाकाऊ, खुळचट आहे असे समजणे विवेकीपणाचे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा स्वत:साठी स्विकार किंवा अस्विकार करण्यासाठी अशा प्रत्येक विचाराचा वेगळा असा आढावा घेऊन स्विकार/अस्विकार करावा, हे धोरण योग्य ठरेल असे वाटते. माझ्या मते पितृपंधरवड्यात आपल्याला हवी ती व्रते करणे, जेवण घालणे हे वाईट नाही. पूर्वजांची आठवण करणे हेही वाईट नाही. किंबहुना ती नेहमीच असावी. पण त्याचा संबंध जीवात्म्याशी लावणे हे गरजेचे नाही. कारणपरंपरा मागे नेणे अशा ठिकाणी थांबवावे, जिथपासून पुढे विश्वासार्ह डेटा मिळणे बंद होते. उदा. अलिकडे मी एकाजणांना म्हटले त्याप्रमाणे - मंगल पांडे यांनी १८५७ च्या बंडात/युद्धात चुकीच्या दिवशी पहिला वार केल्याने ब्रिटिशांना काहीतरी कारस्थान चालले आहे याची जाणीव झाली, आणि त्यांनी हे बंड मोडून काढले असे सांगितले जाते. याचा अर्थ मंगल पांडेचे डोके त्याच दिवशी का फिरले? त्या दिवशी त्याच्यावर काही ग्रहतार्‍यांचा परिणाम झाला होता का? बंडात सामील करून घेण्याआधी त्याची पत्रिका पहायला हवी होती का, अशा प्रश्नांची न मिळणारी उत्तरे शोधण्यापेक्षा मंगल पांडेला भडकवण्यासारखे काय झाले, ते व्हायला नको म्हणून काय करायला/सांगायला हवे होते जे केले/सांगितले गेले नाही, किंवा जे सांगण्याचा बंडाच्या नेतृत्वाकडून विचार झाला नाही, ते पाहिले पाहिजे. हे अवांतर वाटेल, पण तसे नाही. मूळ मुद्दा एवढाच आहे, की पितृपंधरवड्यासाठीची कारणपरंपरा मागे नेताना जीवात्मा येतो म्हणून आम्ही पितृपंधरवडा करतो असे म्हणण्यापेक्षा हा पंधरवडा आम्ही आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी, त्यांच्या नावाने काही चांगले करण्यासाठी ठेवला आहे, असे म्हणणे हे सयुक्तिक ठरेल, आणि पुरोगामीही ठरेल.

In reply to by नितिन थत्ते

सहमत आहे. माझ्या वडिलाना जाऊन ३० वर्षे झाली. आम्ही कधीही त्यांचं श्राद्ध केलं नाही, पण त्यांची आठवण म्हणून गरजू मुलांना मदत करणे माझ्या आईने चालू ठेवलं आहे. त्यांची आठवण जागी ठेवणं हेच एक प्रकारे श्राद्ध आहे. त्याचवेळी, माझ्या सासूबाई तेव्हाच गेलेल्या त्यांच्या सासूबाईंचं श्राद्ध अजून करतात, तर त्यालाही आम्ही विरोध करत नाही, फक्त रजा बिजा घेऊन येणं शक्य नाही हेही त्याना सांगितलंय. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवाय मला असं वाटतं की "अंनिस" चा सुद्धा विरोध अंधश्रद्धेला आहे, कोणी सश्रद्ध असण्याला नाही. ज्या लोकमान्यांबद्दल तुम्ही लिहिलंय ना त्यांचं स्वतःचं वागणं असल्या गोष्टीत एकदम practical होतं. समाजातले बहुमत बालवयातल्या विवाहाना अनुकूल होतं त्यांचा त्यानी विरोध केला नाही. त्याचवेळी स्वतःच्या मुलींची लग्नं लहान वयात केली नाहीत. समाजाबरोबर राहून, न बोलता आणि बहुमताला विरोध न दर्शवता, स्वतःच्या वागण्यातून समाजाला धडे कसे द्यावेत, हे शिकावं लोकमान्यांकडूनच. म्हणूनच, समाजाला आपल्याबरोबर नेण्यात ते आगरकरांपेक्षा यशस्वी ठरले.

In reply to by चित्रा

>> हा पंधरवडा आम्ही आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी, त्यांच्या नावाने काही चांगले करण्यासाठी ठेवला आहे, असे म्हणणे हे सयुक्तिक ठरेल, आणि पुरोगामीही ठरेल. >> मान्य!!

In reply to by चित्रा

क्या बात है. नंबर एक प्रतिसाद.....! -दिलीप बिरुटे

प्रेतयोनी , जीवात्मा वगैरे गोष्टी वाचून रंजन झाले. यापुढचा लेख काय गंडे दोरे ताईत भूतप्रेतादि गोष्टी यांवर येणार काय ? मग जारणमारण इत्त्यादि गोष्टी फार मागे नाहीतच. या सर्व गोष्टींबद्दल लेख लिहिणे ही एक बाब झाली. परंतु या सर्व गोष्टींची भलावण करणे म्हणजे फारच झाले. अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? या वाक्यातले कर्ता कर्म क्रियापद या सर्व गोष्टी , जत्रेत मुले माणसे हरवतात तशी हरवलेली दिसतात :-) (कर्टसी - पु ल देशपांडे)

In reply to by मुक्तसुनीत

परंतु या सर्व गोष्टींची भलावण करणे म्हणजे फारच झाले.
सहमत आहे. अश्या गोष्टींबद्दल लिहायला सगळ्यांना स्वातंत्र्यच काय मुभा दिल्यासारखे वातावरण आहे त्याउलट एखादा प्रतिसाद त्याविरोधात लिहला की सामंजस्य दाखवा म्हणुन सुचना येतात हा विरोधाभास नमुद करावासा वाटतो.

विषय नक्कीच गहन आहे. पण जिवन्त असताना माणसाशी नीट वागायचे नाही. आणि मेल्यावर श्राध्द घालून मोकळे व्हायचे हे अजिबात योग्य नाही. त्यापेक्शा माणसान्शी माणुसकीने वागून समाधान मिळ्वावे.असे मला वाटते.

घुबडाचे डोळे जाळून त्याचे अंजन डोळ्यात घातले असता गुप्तधन दिसते. कृपया आसपास घुबड दिसल्यास व्यनिने कळवावे. डायरेक्ट डोळे काढून पाठवल्यास तर उत्तमच. ( स्वतःचे डोळे काढून जाळा वगैरे पीजे मारू नयेत.)

पितरांचे श्राध्द घालणारे सगळे त्यांच्याशी जिवंतपणी वाइट वागून आता मात्र प्रेम दाखवतायत, हा गैरसमज कुठून आला. ज्याना श्रध्देनी, त्या निमित्तानी दान करायचे असेल, त्याना खुशाल करु द्यावे. पित्रुऋण मानण्यात चुकीचे काय आहे??? ज्याची त्याची पध्दत वेगळी असू शकते, एखादा वडलांच्या , आजोबांच्या, नावानी एखाद्या संस्थेला काहीतरी देतो, एखादा, ( कदाचित सेफ साईड म्हणून) पित्रुपक्षात जेवणावळी घालतो. पूर्वी ब्राम्हण गरीब होते, त्यामूळे त्याना जेवायला घालायचे... शिवाय पित्रुपक्षात फक्त ब्राम्हणाना जेउ घालायची पध्दत नाही. नातेवाइक, मित्रमंडळी व अंत्यज म्हणजे ( तळागाळातले लोक), यानाही जेवायला बोलवण्याची व दान देण्याची पध्दत आहे?? आपल्याला 'मोठ्या' लोकांची स्मारके चालतात, मग घरच्याच बिचार्‍या आजोबा पणजोबांची १ दिवसाची जेवणावळ अंगावर का येते? ( कुंपणावरुन आत उडी टाकलेली) माउ

In reply to by कवितानागेश

जेवणावळच घालायची तर रोज घाला पण पितर बितर म्हणून घालतोय असे सांगायची काय गरज? हवं तर तुम्हीपण परसात एखादं स्मारक बांधा नाही कोण म्हणतंय? आपल्या पूर्वजांचे ऋण ठेवायचे तर ठेवा अथवा नका ठेवू पण उगाचच अंधश्रद्धा कशाला पसरवायची? काय तर म्हणे पूर्वजांना जेवायला घालायचे !!! आनंद आहे.

In reply to by शिल्पा ब

इथे लोकांचे रुढी परंपरांचे फंडे फारच कच्चे आहेत! :-S त्यामुळे काहीच पटेनासे होते...... नक्की 'कोण' जेवते, कावळा काय दर्शवतो, हे एकदा नीट महिती करुन घ्या! एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची 'सेन्सिटिविटी लेवल' वेगळी असते. कुठल्यातरी महत्वाच्या श्राध्द्तिथीच्या सुमाराला/ पित्रुपक्षात साप-नागाची स्वप्न पडल्याचे मी अनेक लोकांकडून ऐकले आहे. जर प्रत्येक वेळेस शुचीताइना हे स्वप्न पदत असेल, तर ती अंधश्रध्दा कशी? आणी हा अनुभव शेअर करणे म्हणजे अंधश्रध्दा पसरवणे नाही. आणी त्यानी शेअर केला नाही तरी लोकाना स्वप्न पडायची थांबणार नाहीत! ;) माझा एक मित्र असाच प्रश्नकंटक नास्तिक होता. त्यालादेखील अशीच स्वप्न पडली मध्ये..... घरे सांगितल्यावर कळले, की त्याच दिवशी त्यच्या आजीची श्राध्द्तिथी येत होती. घरी अनेक वर्षे कुणचही श्राध्द वगरै कही केले जात नव्हते. याच्या नास्तिकपणाला घरातले एवढे टरकून असायचे, की त्याच्यासमोर, देवपूजेबद्दल सुध्दा कुणी बोलायचे नाहीत. त्यामूळे त्यानी घरात काही श्राध्दाबद्दल ऐकले असेही नाही. त्यानी प्रत्यक्ष साप-नाग अनेक वर्षात पहिला नाही. तो ढकल्पत्र वाचतच नाही. डिलिट मारतो, त्यामूळे असे उगीच कुठे चित्र पहायचा संबंध नाही. शिवाय त्याला कुठल्याही प्राण्याची, सापानागासकट, भिती वगरै बिल्कुल नाही. ..पण हा योगायोग दिसला! :-O ह फक्त एक किस्सा... असे अनेक ऐकले आहेत. ....मला स्वतःला असा अनुभव नसला तरी इतरांच्या अनुभवावर, विश्वास ठेउन त्याचा आदर राखण्याइतका समजूतदारपणा नक्कीच आहे.मी लोकांची खिल्ली उडवत नाही, त्यामूळी मला अनेकजण सांगतात.

In reply to by कवितानागेश

आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत...उगाच बुरसटलेले अन रुढींच्या नावाखाली असलेले विचार आम्हाला आवडत नाहीत.. आणि एवढेच आहे तर मंत्र तंत्र, जारण मारण, बळी देणे हे प्रकार जे लोक करतात त्यांचे पण काही फंडे असतात...काहीतरी प्रतीके असतात...त्यांना तुम्ही अंधश्रद्ध का म्हणता ? का त्यांना प्रश्नकंटक होऊन असे कशाला करायचे विचारता? आणि तुम्हीच तर म्हणालात न कि पूर्वज जेवतात .... आमच्याकडचे पूर्वज मेलेले आहेत म्हणून मी आपले विचारले? मेलेल्यांना जेवायला घालायचे नाही हा आमचा फंडा आहे...तुमच्याकडचे पूर्वज असतील अजून जिवंत तर घाला खायला ...आमच्याकडे आणा आम्ही पण आदरातिथ्य करूच.

In reply to by शिल्पा ब

आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत
होना, फक्त अंधश्रद्धच लोक कसे बुवा अश्या बाबतीत सेंन्सिटीव्ह असतात काही कळत नाही, अन विरोध केला की लगेच यांचे गळे काढणे सुरु.

In reply to by शिल्पा ब

>> आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत... मुखपृष्टावर लावलेल्या कावळ्याबद्दल आपले काय मत आहे? तो काढुन टाकावा अशी सुचना करायची असा विचार तुमच्या मनात आला का?

जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला विश्वास किंवा अविश्वास असलाच पाहिजे का ? ज्या गोष्टीतले मला काहीच कळत नाहीत त्यावर मी विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे याला काही अर्थ नसतो. म्हणजेच ती गोष्ट चांगली किंवा वाईट म्हणण्यालाही अर्थ नाही. पण इतर कुणी त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्यांच्या श्रद्धेला धक्का देण्याचे काही कारण नाही. तुमची या गोष्टींवर श्रद्धा असेल तर ती इतरांनी काही म्हटल्यामुळे दुखावली जाण्याइतकी तकलादू नक्कीच नसावी. पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.

In reply to by मितान

>> पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. >> मान्य >> तुमची या गोष्टींवर श्रद्धा असेल तर ती इतरांनी काही म्हटल्यामुळे दुखावली जाण्याइतकी तकलादू नक्कीच नसावी. >> दुखावली नाही ग जस्ट क्युरीऑसिटी की कोणी माझ्याइतकं श्रद्धाळू आहे का? मी खूप पॅशनेट आहे श्रद्धेच्या बाबतीत.... अनुभव आहेत तसे.

In reply to by मितान

पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
पटले.

In reply to by मितान

पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
पटले.

>>पूर्वी ब्राम्हण गरीब होते, त्यामूळे त्याना जेवायला घालायचे>> ( उडी मारून पळालेला अंत्य़ज) अडगळ

फार पूर्वी ब्राम्हण केवळ भिक्षुकी करायचे... त्याच दक्षिणेवर घर चालायचे...... तुम्ही गोष्टी वाचल्या नाहीत वाटते,... एका गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता........ वगरै

In reply to by कवितानागेश

एका गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता.
त्या गावाचे नाव आटपाट नगर असायचे. हे आटपाट नगर काय आहे हे अजुनही मला कळले नाही. आटपाट ह्याच अर्थ काय?

In reply to by कानडाऊ योगेशु

आटपाट ह्याच अर्थ काय? ज्या नगरात पाण्याचे पाट आठही दिशानी वहात असतात्...अर्थात पाण्याची रेलचेल असते. तेथे जीवन समृद्ध असते असे गाव म्हणजे आटपाट नगर. आटपाट नगर हे नगर ( शहर) असते गाव नसते. तेथे उद्योग धन्दे पैसा मुबलक असतो.

In reply to by कवितानागेश

(दणद्णीत पुरव्याला घाबरून कुंपण तोडून लांब पळालेला) अडगळ

In reply to by कवितानागेश

पण अजून हि ब्राह्मण लागतो ना सर्व कार्यांना भिक्षुकाचे स्थान अजून कोणी नाही (पण काही अपवाद सोद्लेतर )घेवू शकत कारण ब्राह्मण हाच सर्व खरा धर्माचे पालन करणारा आहे .

In reply to by गोरिला

या धाग्यातील गुप्तधन सापडले. (अक्कल चोरिला गेलेला ) अडगळ

In reply to by गोरिला

भिक्षुकाचे स्थान अजून कोणी नाही (पण काही अपवाद सोद्लेतर )घेवू शकत कारण ब्राह्मण हाच सर्व खरा धर्माचे पालन करणारा आहे . साहेब आपले ३.१४ कुठे आहेत . एकदा दर्शन घ्यावे म्हणतो. "जरी ब्राम्हण भ्रष्ट तिन्ही लोकी तो श्रेश्ठ" या उक्तीवर फारच श्रद्धा दिसतेय . अभ्यंकरानी चप्पलांचा कारखाना काढला , लागू बंधूनी सोनारकाम केले , चितळ्यानी गाईम्हशी पाळल्या , किर्लोस्करानी लोहारकाम केले , अंबेडकरानी भारताची घटना बनवली , भाऊराव पाटलानी शिक्षणसंस्था काढल्या , आण्णा भाउ साठ्यानी पुस्तके लिहीली , टाटानी हजारो लोकाना रोजगार दिला , ज्योतिबा फुल्यानी मुलींसाठी शिक्षणाची चलवळ राबवली हे सारे जन्माने नव्हे पण कर्माने ज्ञानदान कार्य करीत होते

सर्व मिपा कराना एक विनिन्ति आहे कि ह्या धाग्या काही प्रतिक्रिया देण्या पूर्वी जरा साम वेद आणि अथर्व वेद जरूर वाचावा जर तीव्धी कुवत असेल तर नीट अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी हि विनंती . जे दिसते ते नसते आणि जे आहे ते आपण मान्य नाही करत काय करणार आपण सगळेच स्वताला शहाणे समजतो ना? एक वेद अभ्यासक म्हणून सांगतो

In reply to by गोरिला

प्रतिक्रिया देण्या पूर्वी जरा साम वेद आणि अथर्व वेद जरूर वाचावा जर तीव्धी कुवत असेल तर नीट अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी नाय बॉ आम्ही अज्ञानी आहोत. पण सामवेद आणि अथर्ववेदाचे पुस्तक कुठे उपलब्ध आहे ते सांगाल का. आळंदीत एका ठिकाणी वेदमहाराज असे वेदांच्या पुस्तकांचे मंदीर होते. लोक त्याला हळदकुम्कू वहात होते . नमस्कार करत होते. कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास असा करतात हे प्रथमच पाहिले. असो. विवेकानन्द म्हणतात की युरोप जेंव्हा औद्यगीक प्रगती करीत होता तेंव्हा भारतातील पुरोहीत आचमन करताना पळी डाव्या हातात की उजव्या हातात याची चर्चा करण्यात मग्न होते. जानवे उजव्या कानावर चांगले की डाव्या कानावर याचे चर्वण करत होते. असो. पुराणकाळातील त्या काळातील गरजेनुसार ऋषीमुनीनी काही संशोधन केले ते कुठेतरी लिहून ठेवले. आपण मात्र ममः आत्मनः म्हणत आचमने करीत बसलो त्यानी केलेल्या संशोधनाला पूर्णविराम दिला. खरा जिज्ञासू विद्याभ्यास बाजूलाच राहीला. फालतू सोवळ्याओवळ्याचे शुचितेचे नुसते स्तोम माजवत बसलो. असो. बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे की वेदांत बरेच ज्ञान आहे. तुम्ही एवढा वेदाभ्यास केलेलाच आहे . मला काही सोप्या शंका आहेत त्या सोडवाल का? सोप्या मराठीत सांगा. १)खगोलशास्त्रात सांगितलेला उर्टचा ढग पत्रीकेत कोणत्या स्थानात असतो. पत्रीकेचे थोडावेळ बाजूला ठेवा उर्टचा ढग आकाशात ( सूर्यमालेत)कोणत्या ग्रहानन्तर येतो. २) वेदातील ज्ञानात गेल्या चारशे वर्षात कोणती नवी भर पडली आहे? ३) एका वैज्ञानीक प्रयोगानन्तर ओपेनहायमर ला भग्वतगीता आठवली होती . त्याचे वर्णन कोणत्या वेदात आहे? ४) तुम्ही सांगितलेल्या वेदांत नक्की कोणत्या प्रकारची महिती दिलेली आहे? ५) वेदांतील ज्ञान कधीच कालबाह्य कसे नाही ? जे दिसते ते नसते असू शकते. आणि जे आहे ते आपण मान्य नाही करत नक्की काय आहे तेच कोणी सांगत नाही. तुम्ही सांगा ना. काय करणार आपण सगळेच स्वताला शहाणे समजतो ना? नाही हो. खरेच अज्ञानी आहे. पण आमचे अज्ञान दूर करायचे बाजूलाच उलट आम्हाला तुम्हाला काय यातले कळणार असे म्हणून बाजूला केले जाते आणि आम्ही अज्ञानीच रहातो एक वेद अभ्यासक म्हणून सांगतो खर्‍या अभ्यासकाबद्दल नेहमीच आदर आहे. आम्हाला थोडे समजावून सांगा. आमची कुवत कमी असेल. पण म्हणून आम्हाला न हिणवता ;थोडेतरी सांगा.

अय्या, मला माहितीच नव्हते, इथे कोर्ट भरलंय पुरावे घ्यायला! मी काही आट्पाट नगरातल्या गोष्टी गंभीरपणे घ्यायला ७-८ वर्षाची मुलगी नाही. पण गोष्टी सांगताना/लिहिताना एकंदर परिस्थिती भवतालच्याच समाजाचे चित्रण करणारी असते.

कोर्ट कशाला लागतंय..तुम्ही जर एखादी दिसत नसलेली अस्तित्व न जाणवणारी वस्तू आहेत असे म्हणताहात तर ते कशावरून हाच याचा अर्थ...पण अय्या तुम्हाला नाही समजलं? कमाल आहे!!

ज्या सर्वांनी या चर्चेत सहभाग घेतला त्यांची मी आभारी आहे. गोरीला यांचे विशेष आभार कारण मला माहीत नसलेली माहीती कळली की साम आणि अथर्व वेदात उल्लेख आहे. मी जालावर शोध घेतला सापडलं नाही. भारतात कधी काळी जायला मिळेल वेदांचा अभ्यास होईल अशी आशा करते. ज्यांना कोणाला श्राद्ध संकल्पाबद्दल माहीती हवी असेल त्यांनी पुढील साईट पहावी - http://home.comcast.net/~p.kulkarni/SSfiles/ssindex.htm ही माझ्या अतिशय आवडीच्या साईटींपैकी एक साईट.

पहिल्या धाग्यावर जो प्रतिसाद दिलाय तोच येथे परत देण्याचा मोह आवरला नाही - सगळे शेवटी मानण्या - न मानण्यावर आहे. मृत्यूनंतर काय होत असेल ह्यावर चर्चा करण्यार प्वॉईंटच काय ते मला कळत नाही. कारण त्यासाठी तो अनुभव घेऊन सांगणारा हवा. अन् त्यावर इतरांनी विश्वास ठेवायला हवा. त्यात पुन्हा विश्वास ठेवणारे (अंध)श्रद्धाळू अन् विश्वास न ठेवणारे विज्ञानवादी! जे काय असेल ते.. माझे कुणी पूर्वज खरेच माझ्यासमोर येऊन उभे राहिलेत तर मी त्यांना नक्की नमस्कार करेन अन् मनापासून जेवायला वाढेन. ते नाही आलेत तरी गाईला जेऊ घातल्यानं त्यांना समाधान लाभलं असतंच या भावनेनं गाईलाही जेऊ घालेन. दररोज शक्य होत नाही म्हणून. नाहीतर तेही केलं असतं. शेवटी ज्याचे त्याचे लॉजिक. बाकी चालू देत.

मला लई जड विचार झ्येपत न्हाईत आजकाल. म्हनून म्या आपली येक वाचलेली गोष्ट सांगतु... गुरु नानक एकदा काशीला गेले असताना तेथे घाटावर अनेक लोक पंड्यांकडून श्राद्ध, तर्पण करुन घेताना दिसले. असाच एक पोटार्थी पंड्या नानकांच्या मागे लागला. नानकांनी क्षणभर थांबून विचारले, 'तुम्ही दर्भाने पाणी सर्व दिशांना शिंपडता ते कशासाठी?' त्यावर पंड्या म्हणाला, 'त्यामुळे पितृलोकातील आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.' मग नानकांनी विचारले, 'हा पितृलोक किती दूर आहे?' त्यावर पंड्या म्हणाला, ' आपल्या पृथ्वीच्या वर आकाशात सप्तलोक आहेत. त्यात तो आहे.' नानक काही बोलले नाहीत. ते पाण्यात उतरले आणि ओंजळीने पाणी सगळीकडे फेकू लागले. त्यावर पंड्या म्हणाला, 'अरे हे काय करतो आहेस?' त्यावर नानक म्हणाले, 'तिकडे पंजाबात माझे शेत आहे. यंदा पाऊस पडला नसल्याने ते वाळून गेले आहे. मी येथून माझ्या शेताला पाणी देतो आहे.' त्यावर पंड्या उपहासाने म्हणाला, 'अरे वेड्या माणसा! इथून ओंजळभर पाणी फेकण्याने का तुझे शेत भिजणार आहे?' त्यावर नानक म्हणाले, ' का नाही बरे? जर तुमच्या चार थेंब प्रोक्षणाने पृथ्वीच्या वर असलेल्या लोकातील पितरांना पाणी मिळत असेल तर माझे शेतही नक्कीच भिजेल.'

In reply to by योगप्रभू

य गोष्टीमूळे 'पितर' नातातच हे 'प्रूव्ह' होत नाही. यंत्रवत कर्मकांड केल्यामूळे त्याना काही मुक्ती वगरै मिळणार नाही, एवढेच 'प्रूव्ह' होते. शिवाय गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथात 'पुनर्जन्माबद्दल' लिहिले आहे असे हल्लीच मला एका अभ्यासू शिख मित्राकडून कळले. हवे असल्यास मी विचारुन गुरुबानी मधल्या त्या ओव्या १-२ दिवसात इथे देउ शकते.

In reply to by कवितानागेश

माऊ शीख लोकांचं सापडलं ग- आवत हुकमि बिनास हुकमि आगिआ भिंन न कोइ ॥ आवन जाना तिह मिटै नानक जिह मनि सोइ ॥१॥ त्याच्या हुकमानुसार आपण येतो , त्याच्या हुकमानुसार आपण जातो, त्याच्या हुकमाबाहेर कोणी नाही. हे येण-जाणं (जन्म-मरणाचा फेरा) टळतं जेव्हा तुमचं हॄदय, मन पूर्ण त्याच्या स्वाधीन होतं.

In reply to by विजुभाऊ

आयला इतकी खात्री आहे तुम्हाला तुमच्या पितरांबद्दल? आम्हाला तर आमची पित्रे स्वर्गात आहेत हे माहीत आहे. ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आम्हाला तर आमची पित्रे स्वर्गात आहेत हे माहीत आहे ती जिथे असतात त्यालाच स्वर्ग म्हंटले की झाले .. हाय काय अन नाय काय

In reply to by विजुभाऊ

हलके घ्या. >>आमची पित्रे स्वर्गात आहेत तिथले काही फोटू बिटू पाठवायला सांगा ना. तिथे इंटरनेट असतो का ?

छे छे पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हणणे अतिशय अयोग्य आहे. विशेषतः ज्या रुढींमुळे मस्त सोळा भाज्या, पुरणपोळी आणि पंचामृताचं जेवण जेवायला मिळतं त्या रुढींना खुळचट म्हणणे हाच खुळचटपणा आहे. :-) तशा जेवणासाठी बाकी कोणी येत असेल किंवा नसेल पण मी मात्र मेल्यावरसुद्धा मस्त कावळ्यावर बसून येणार आहे. ;-)

बिपाशा आली होती. आता ह्याचा संबध कश्याबरोबर जोडावा ह्याबद्दल मिपाकर मला मदत करतील का?मी स्वप्नांच्या बाबत खुपच चोखंदळ आहे. असे किती मिपाकर चोखंदळ आहेत ते मला तपासायचे आहे.

म्हणाली का? उत्तर मिळाल्यावर पुढील खुलासा.

In reply to by विनायक प्रभू

>> बसु म्हणाली का ! फस्सकन हसलो ना ह्या सगळ्या गंभीर चर्चेत ;)

In reply to by वेताळ

ओरडला की शिवला ? दिशाहीन चर्चा! 'पितर' लाच इंग्रजीत पीटर म्हणतात काहो ?

मग झाला की खुलासा. असो. ह्यालाच म्हणतात नसिब मे लिखा है दंड तो खायेगा कैसे श्रीखंड.

शुचिताईंनी दोन्ही लेखात धर्मपालन संदर्भात एखाद्या विश्वासावर श्रध्दा असली तर ती कशाप्रकारे "डीफेन्ड" करता येईल याचा प्रत्यय लेखात तसेच विविध प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून केला आहे हे वाचताना दिसते. पण असे असले तरी खुल्या मंचावर जाहीर चर्चा करताना 'आपली बाजू कुणी घेत नाही' याचे वाईट वाटून घेणे म्हणजे आपल्या मत प्रदर्शनाला महत्वच नाही असा अर्थ करून घेणे होय. दुसरा मुद्दा त्यांनी "कुंपणावर बसलेल्यांचा" घेतला आहे. मला कबूल करायला काहीच अवघड नाही की, मी या मुद्द्यावर कुंपणावर बसलो आहे....त्याला कारण परत तेच > मी ज्या समाजात राहतो, ज्या संस्कृतीविषयी मला आत्मियता आहे, तिच्यातील श्रध्दा फोल्डरमधील 'पॉझिटीव्ह/निगेटीव्ह' प्रतिमांशी जुळवून घेणे मला आवडते ~ फक्त जिथे आणि जेव्हा श्रद्धेच्या परीचे अंधश्रध्देच्या चेटकीणीमध्ये रूपांतर होण्यास सुरूवात होते त्या त्यावेळी परिणामकारक असा विरोध केलेलाच आहे. ~~ टिळकांच्या ज्या 'कर्मविपाका'च धागाकर्तीने उत्साहाने उल्लेख केला आहे, त्याचा अर्थ असा घ्यायचा का की, तो सिद्धांत म्हणजेच हिंदू तत्वज्ञानाचे ते सार आहे? कर्मविपाकाचा सोप्या भाषेत अर्थ असा की, 'तुम्ही या जन्मी जे काही आहात आणि जे काही भोगता ते कशामुळे? तर मागच्या जन्मीच्या पापामुळे किंवा पुण्यामुळे... तसेच या जन्मी तुम्ही ते काही कृत्य करता, त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे पुढच्या जन्मी... म्हणून आता जन्माला आलाच आहात तर पुढच्या जन्म चांगला जावो म्हणून या जन्मात सत्कृत्य करा...." [अजून बरेच लिहिता येईल कर्मविपाकाच्यासंदर्भात, पण स्थानभयास्तव थांबणे गरजेचे आहे, तसेच चर्चेच्या रोखाने इतपतच पुरे आहे.] ~~ इथे याचा मतलबी अर्थ इतपतच आहे की आपल्या पितरांच्या नावाचे गोरगरीबांना (किमान १५ दिवस) गोडधोड खायाला घाला आणि निश्चित रहा की, वर तुमचे पितर आनंदाने पुढचा जन्म चांगला मिळणार या कल्पनेत राहणार शिवाय असे पुण्यकर्म केल्यामुळे तुम्हाला जरी या जन्मी पुष्पक विमान न्यायला आले नाही तरी 'हेवन एंट्री' साठी 'टोल' बसणार नाही हेही तितकेच सत्य. या जन्मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो म्हणून एखाद्या 'अबक' ने 'मी मागील जन्मी पुण्य केले होते म्हणून...' तर एखादा 'कखग' भंगी झाला म्हणून 'नक्कीच त्याने मागील जन्मात महाभयंकर पाप केले असणार म्हणून...' अस रिडींग करता येईल का...या कर्मविपाकाच्या सिध्दांताच्या आधारे? कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... भले हा बहाद्दर 'सुधाकर' आज तळीरामाबरोबर बसला असला तरी सिंधूने ती प्रार्थना करायचीच. आहे हे मान्य आजच्या समानतेच्या युगात ? चला, वादाकरीता तेही मान्य करू या. पण ही सिंधू या आयुष्यात विपरित परिस्थितीतही पुण्यसंचय करीत राहिली आणि सुधाकरबुवा हमेशा झिंगलेल्या अवस्थेत येऊन हिला लाथा घालत बसला तर याच्या बँक अकौन्टवर कोणत्या प्रकारचे 'पुण्य' जमा होणार? उत्तर झीरोच असेल...मग असा गृहस्थ या जन्मातील अशा प्रकारच्या कृत्यामुळे मेल्यावर स्वर्गात जाईल की नरकात? स्वर्ग तर बंदच (कारण कर्मविपाक सांगते तशी पुण्याई या बाळकोबाकडे नाहीच...) मग नरकात जर याने अप्रेन्टिसशीप केली तर याचा पुढील जन्म मनुष्याचा नसून डुकराचा असणार...हेही कर्मविपाकात सांगितले आहे. मग आता हयात असलेल्या याच्या पिलांनी 'पितृपक्षा' त १५ नाही तर १५० दिवस जरी गोडधोड करून सो-कॉल्ड गोरगरीबांना दानधर्म केला तर 'नेक्स्ट लाईफ ट्रान्सफॉर्मेशन' थांबणार असे मानायचे का? थोडक्यात, कोणत्याही कारणाने आणि "अमुक एक होईल किंवा व्हावे" अशा स्वार्थी वृत्तीने केलेला दानधर्म फलद्रूप होईल असे समजणे ही स्वतःशीच फसगत केल्यासारखे आहे....आणि जर का निस्वार्थी हेतूनेच दानधर्म करायचा असेल तर मग 'पितृपक्षा'ची तर वाट का पाहावी? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

एवढेच नाही. सिंधूने अमाप पुण्य केल्याने ती पुन्हा ब्राह्मण स्त्री म्हणून जन्मणार. तर सुधाकर हा पापांमुळे डुक्कर किंवा गेला बाजार शूद्र तरी होणारच. पण सिंधूने जन्मोजन्मी हाच पती मागितल्याने तिला शूद्र सुधाकराशी विवाह करावाच लागनार आणि ती प्रतिलोम वर्णसंकराच्या पापात बुडून जाणार (डुकराशी लग्न केल्यास कोणत्या पापात बुडणार याची कल्पना नाही). असो. लिहावे तेवढे थोडेच आहे.

In reply to by नितिन थत्ते

हाहाहा... हा तर इन्फायनाईट लूप झाला :D

In reply to by इन्द्र्राज पवार

शुचिताईंनी दोन्ही लेखात धर्मपालन संदर्भात एखाद्या विश्वासावर श्रध्दा असली तर ती कशाप्रकारे "डीफेन्ड" करता येईल याचा प्रत्यय लेखात तसेच विविध प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून केला आहे हे वाचताना दिसते.>>>>> त्या 'धर्मपालनाबद्दल' बोलत नाहियेत, त्यान्च्या स्वप्नाबद्दल आणी योगायोगाबद्दल बोलतायत! "डीफेन्ड" करण्याचा प्रश्न कुठे येतो? 'पित्रुऋण' फेडण्यासठी दान करने हा गुन्हा आहे का? कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... भले हा बहाद्दर 'सुधाक........ हे कर्मविपाकात लोकमान्य टिळकानी सांगितले आहे का? कुठे? असा वेडेपणा मला तरी गीतारहस्यात दिसला नाही!

In reply to by कवितानागेश

"त्या 'धर्मपालनाबद्दल' बोलत नाहियेत, त्यान्च्या स्वप्नाबद्दल आणी योगायोगाबद्दल बोलतायत!" ~~ अहो ताई, त्यांनी धाग्यात जरी 'धर्म' असा सरळसरळ उल्लेख केला नसला तरी ती भाषा धर्माचे आचरण करण्यासंदर्भातच आहे, हे तरी मान्य करू या ना. प्रत्येक वेळी तसे थेट म्हटले नसले म्हणजे प्रतिसाद देताना ती बाब लक्षात ठेवूनच लिखाण करावे असे नाही. शिवाय शुचिताईंनी सापाच्या स्वप्नाचा संबंध पितृपक्षाशी लावला व त्यानुसार जागेपणी पालन केले म्हणजे कोणतीतरी 'धर्मरिती' पाळली असे होते ना? "हे कर्मविपाकात लोकमान्य टिळकानी सांगितले आहे का? कुठे?" ~~ इथेही तेच. अमुक एक गोष्ट लोकमान्यांनी सांगितली तरच ती प्रमाणभूत मानावी असा काही दंडक आहे काय? कर्मविपाकाचा मी एवढ्यासाठीच उल्लेख केला की, त्या अनुषंगाने अन्य धर्मग्रंथात 'स्त्री' ने पाळावयाच्या जी काही दंडके आहेत ती या श्रध्दा/अंधश्रद्धा चर्चेच्या निमित्ताने चर्चेत यावी. शिवाय ना गीतेत ना कर्मविपाकात राहू दे, अन्यत्र जर टिळकांनी एखाद्या 'सिंधू' ची 'सुधाकर' हाच नवरा पुढील जन्मी मिळो अशी प्रार्थना ऐकली असती तर तिचे त्यांनी शनिवारवाड्यावर बोलावून अभिनंदन केले असते का? धर्म आचरणातील चांगल्या/वाईट रितीविषयी लिहिताना/बोलताना लिखित आणि मौखिक दोन्हीची संगत घ्यावीच लागते. "देवास काय आवडते ?" याची व्याख्या देवाने नसून खुद्द मनुष्याने केली आहे हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे कारण याच मनुष्याने स्वतःला जे सुखदायी असेल तेच देवास आवडते अशी सोयीस्कर समजूत करून घेतली आहे. [आता हे कर्मविपाकात टिळकांनी लिहिलेले नाही, म्हणून असत्य होते काय?] "असा वेडेपणा मला तरी गीतारहस्यात दिसला नाही!" ~~ ठीक. मुळात जगातील एकजात धर्मांची उभारणी एका क्षणी 'सृष्टीत मानवापेक्षा मोठा कुणी नाही..." या वेडेपणातून झाली असल्याने, मग तो वेडेपणा गीतारहस्यच काय पण खुद्द गीतेतही दिसला वा ना दिसला....काही फरक पडत नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

त्या अनुषंगाने अन्य धर्मग्रंथात 'स्त्री' ने पाळावयाच्या जी काही दंडके कुठले धर्मग्रंथ? तुम्ही कर्मविपाकाबद्दल बोलताय की धर्मग्रंथांबद्दल? गीता हा धर्मग्रंथ नाही, गीतारहस्य हाही नाही. (मधल्या काही शतकांमध्ये स्त्रियांवर धर्माच्या नावाखाली बंधने होती, त्याचे कारण वेगळे आहे, त्याची इथे चर्चा नको.) त्यामूळे एकच काठी घेउन चुकीच्या परंपरांच्या नावाखाली,संपूर्ण धर्माला बडवणे योग्य नाही! तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी केवळ 'रूढी' म्हणून केल्या जातात... अशा रुढींमध्ये, समजांमध्ये 'काहीतरी' अर्थ आहे की काय, असे वाटावे, असे अनुभव, नेहमीच लोकाना येतात. अशा वेळेस त्या अनुभवांकडे डोळसपणे न बघता, त्यातून 'चांगले' काही 'निष्पन्न' होत असेल तर ते न बघता, केवळ 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली उडवणे योग्य नाही.

In reply to by कवितानागेश

"केवळ 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली उडवणे योग्य नाही....." ~~ माझ्या मूळच्या प्रतिसादात मी स्पष्टपणे म्हटले आहे की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा मी ओळखतो. कोणत्याही बाबीची मी कधीही 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली (इथेच काय, पण अन्यत्रही कुठे) उडवलेली नाही. फक्त देवधर्माच्या नावाखाली ज्या अनिष्ट रूढी, परंपरा येथील मातीत रूतून बसल्या आहेत (त्यातील बर्‍याचशा कालबाह्य झाल्या असल्या तरी...) त्यांचे पुनरूज्जीवन कोणत्याही निमित्ताने होऊ नये इतपतच. सचिनला एरवी आम्ही डोक्यावर घेऊन नाचनाचनाचू पण खेळातील सातत्य कमी झाले म्हणून पाठीवर उठलेल्या कुठल्यातरी व्रणामुळे 'सर्पशांती' नावाचा यज्ञ करायला केरळाच्या मंदिरात जायाचे यासाठी त्या कृत्याची खिल्ली उडवलीच पाहिजे. ~~ तुम्ही आणि शुचिताई "स्त्री" आहात, मग एका स्त्रीची - त्या ऐश्वर्या रॉयची "मंगळशांती" करण्यासाठी तिचे बालाजीला जाऊन "झाडा" च्या फांदीबरोबर लग्न लावून ते बाजूला नेऊन जाळायचे, मग तिला 'पवित्र' अशा दहा नद्यातील पाण्याने आंघोळ घालायची....., हुश्श... आता तिच्या डोक्यावरून 'मंगळ' गेला म्हणून बालाजीला ५५ लाखाचा मुकुट द्यायचा, नंतर तिचा त्या महान बच्चनच्या पुत्राबरोबर 'पुनर्विवाह' करायचा....ही बाब एक सुशिक्षित स्त्री म्हणून तुम्हाला खटकत नाही का? आणि जर खटकत असली तर मग 'तसे' करण्याबद्दल ज्या कोणत्याही धर्मग्रंथात लिहिले असेल तो तुम्हाला टाकावू वाटणार नाही? आता अशा प्रथेबद्दल संयत भाषेत टीका केली तर ती धर्माची खिल्ली कशी होईल? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

पुन्हा विषयांतर!! अहो, चर्चा सुरु आहे, ती या न त्या कारणाने पित्रुऋण फेडण्याबद्दल, आणी त्या अनुषंगानी घडणार्‍या काही योगायोगांबद्दल! आणी तुम्ही एकट्यानी संयत भाषेत लिहून काय उपयोग? शिवाय इथे सचिन आणी ऐश्वर्याचा काय संबंध? (अवांतरः अशा 'अंधश्रध्दा'वाल्या गोष्टी फक्त भारतातच घडतात असे नाही!) मग 'तसे' करण्याबद्दल ज्या कोणत्याही धर्मग्रंथात लिहिले असेल तो तुम्हाला टाकावू वाटणार नाही? >>>>>>> संपूर्ण ग्रंथ टाकाउ कसा असेल? प्रत्येक ग्रंथ त्या त्या काळाला अनुसरुन लिहिला गेला आहे, म्हणूनच भारताला 'स्पेसिफिक' धर्मग्रंथ नाही! एखाद्या काळात जर मुलींना 'मंगळी' म्हणून, बिनलग्नाचे ठेवायला सुरुवात झाली असेल, तर हे सगळे असे 'शांती' चे उपाय कढून, मुलगी 'उजवण्याची' वाट मोकळी केली असेल, असे मला वाटते. त्यात बिघडले काय? स्वतःची उन्नती होणार असेल, तरच माणसाच्या हातून पैसा सुटतो! हे एक बरे निमित्त आहे! खरेच 'मंगळ' काय करतो, ही गोष्ट पुढची, ...ज्योतिष्यानी अभ्यास करुन शोधण्याची आहे!

In reply to by कवितानागेश

विषयांतर नव्हते तर त्या विषयाचे दुसरे कंगोरे शोधण्याचा तो एक प्रयत्न होता.... पण आता राहू दे. [तिकडे शुचिताई माझ्या डोक्यात हाणण्यासाठी गदा शोधत आहे....] "खरेच 'मंगळ' काय करतो, ही गोष्ट पुढची, ...ज्योतिष्यानी अभ्यास करुन शोधण्याची आहे!..." ~~ चला, निदान इतपत तरी एकमत झाले ते छानच आहे...कारण खरंच हा "मंगळ्या" काय करतोय यावरही इथे एकदा नौबती झडल्या पाहिजेत. ते "रुपांगी" वाले प्रा.घैसास हा धागा वाचत असतील अशी आशा करु या. त्यांचा या बाबतीत अभ्यास असावा असा कयास आहे. ~ पण जर ते 'स्त्री' ने सुंदर कसे दिसावे ? यातच गुंतले असले तर कठीण आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

... त्या ऐश्वर्या रॉयची "मंगळशांती" करण्यासाठी ...
त्या मंगळ-चंगळ आणि फनीशनीच्या गोष्टीत मला काही विंट्रेष्ट नाय! पण ऐश्वर्याला रॉय म्हणतो आहेस तर आता बाँगाली बॉबू आणि भॉगिनींना तोंड द्यायला उभा रहा! (बसू या बॉंगाली आडनावावर फालतू जोक नकोयत!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"ऐश्वर्याला रॉय म्हणतो आहेस तर...." ~~ म्हणजे ? मी तो जादाचा 'चंद्र' चढविला आहे की काय तिच्या आडनावावर? अगं, तो लिखाणातील सवयीचादेखील भाग असू शकतो. आपण नाही का, 'Principal' मराठीत लिहिताना 'प्रिन्सिपल....प्रिन्सिपाल....प्रिन्सिपॉल..." असे तीन विविध रूपे वापरलेली पाहतो; तद्वतच 'Rai' चे रॉय झाले माझ्याकडून. इन्द्रा