पितृपक्षाविषयी चर्चेमधे एक लक्षात आलं की बहुतेक जणांनी या रूढीविरोधी सूर लावला होता. कोणी अक्षरक्षः कोणीही बाजू घेणारं निघलं नाही. काहाजणं कुंपणावर होते (on the fence). याबाबत वाईट वाटलं.
मी २००० मधे म्हणजे १० वर्षांपूर्वी भारतात असताना टिळकांचं "गीतारहस्य" वाचलं होतं. त्यातही सगळं नाही पण ६ वा च मला वाटतं अध्याय ज्याचं नाव आहे "कर्मविपाक" वाचला होता. आणि खूप मंत्रमुग्ध झाले होते. अतिशय तर्कशुद्ध रीतीने गूढ गोष्टी मांडल्या होत्या, व्यवस्थित पटवून दिल्या होत्या. संचित, क्रियमाण, प्रलब्ध हे कर्माचे तीन प्रकार सुरेख म्हणजे अतिशय सुरेख रीतीने व्यक्त केले होते.
याच धड्यात जीवात्म्याचा मृत्यूपश्चात प्रवास, नंतरची त्याची योनी याबाबत काही मुद्दे होते. तसच श्राद्ध, पितृपक्ष आदिंचे महत्त्व आणि जीवात्म्यास या रुढींचा होणारा फायदा विषद केला होता. मला ते सर्व वाचायला खूप अद्भुत वाटले.
जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते.
अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?
वाचने
32587
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढे मोठी झाल्यावर मुले असे
In reply to कार्य-कारण भाव लक्षात घ्यावा by sagarparadkar