Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Sun, 09/26/2010 - 21:31
पितृपक्षाविषयी चर्चेमधे एक लक्षात आलं की बहुतेक जणांनी या रूढीविरोधी सूर लावला होता. कोणी अक्षरक्षः कोणीही बाजू घेणारं निघलं नाही. काहाजणं कुंपणावर होते (on the fence). याबाबत वाईट वाटलं. मी २००० मधे म्हणजे १० वर्षांपूर्वी भारतात असताना टिळकांचं "गीतारहस्य" वाचलं होतं. त्यातही सगळं नाही पण ६ वा च मला वाटतं अध्याय ज्याचं नाव आहे "कर्मविपाक" वाचला होता. आणि खूप मंत्रमुग्ध झाले होते. अतिशय तर्कशुद्ध रीतीने गूढ गोष्टी मांडल्या होत्या, व्यवस्थित पटवून दिल्या होत्या. संचित, क्रियमाण, प्रलब्ध हे कर्माचे तीन प्रकार सुरेख म्हणजे अतिशय सुरेख रीतीने व्यक्त केले होते. याच धड्यात जीवात्म्याचा मृत्यूपश्चात प्रवास, नंतरची त्याची योनी याबाबत काही मुद्दे होते. तसच श्राद्ध, पितृपक्ष आदिंचे महत्त्व आणि जीवात्म्यास या रुढींचा होणारा फायदा विषद केला होता. मला ते सर्व वाचायला खूप अद्भुत वाटले. जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते. अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?
  • Log in or register to post comments
  • 32484 views

Book traversal links for पितृपक्ष-२

  • ‹ पितृपक्ष
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 09/27/2010 - 11:07

Permalink

छे छे पूर्वापार चालत आलेल्या

छे छे पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हणणे अतिशय अयोग्य आहे. विशेषतः ज्या रुढींमुळे मस्त सोळा भाज्या, पुरणपोळी आणि पंचामृताचं जेवण जेवायला मिळतं त्या रुढींना खुळचट म्हणणे हाच खुळचटपणा आहे. :-) तशा जेवणासाठी बाकी कोणी येत असेल किंवा नसेल पण मी मात्र मेल्यावरसुद्धा मस्त कावळ्यावर बसून येणार आहे. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 09/27/2010 - 11:35

Permalink

माझ्या स्वप्नात काल

बिपाशा आली होती. आता ह्याचा संबध कश्याबरोबर जोडावा ह्याबद्दल मिपाकर मला मदत करतील का?मी स्वप्नांच्या बाबत खुपच चोखंदळ आहे. असे किती मिपाकर चोखंदळ आहेत ते मला तपासायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 09/27/2010 - 11:38

Permalink

बसु

म्हणाली का? उत्तर मिळाल्यावर पुढील खुलासा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 09/29/2010 - 00:46

In reply to बसु by विनायक प्रभू

Permalink

महान आहात गुर्जी

>> बसु म्हणाली का ! फस्सकन हसलो ना ह्या सगळ्या गंभीर चर्चेत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 09/27/2010 - 11:39

Permalink

हो हो म्हणाली

पण बसायच्या अगोदर कावळा ओरडला.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 09/27/2010 - 19:10

In reply to हो हो म्हणाली by वेताळ

Permalink

ओरडला ?

ओरडला की शिवला ? दिशाहीन चर्चा! 'पितर' लाच इंग्रजीत पीटर म्हणतात काहो ?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 19:11

In reply to ओरडला ? by तिमा

Permalink

त्यांच्यात ओ रडत असेल.

त्यांच्यात ओ रडत असेल. भावनाओंको समझो.. !
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 09/27/2010 - 11:42

Permalink

अरेरे

मग झाला की खुलासा. असो. ह्यालाच म्हणतात नसिब मे लिखा है दंड तो खायेगा कैसे श्रीखंड.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 09/27/2010 - 12:06

Permalink

कर्मविपाक सिद्धांत

शुचिताईंनी दोन्ही लेखात धर्मपालन संदर्भात एखाद्या विश्वासावर श्रध्दा असली तर ती कशाप्रकारे "डीफेन्ड" करता येईल याचा प्रत्यय लेखात तसेच विविध प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून केला आहे हे वाचताना दिसते. पण असे असले तरी खुल्या मंचावर जाहीर चर्चा करताना 'आपली बाजू कुणी घेत नाही' याचे वाईट वाटून घेणे म्हणजे आपल्या मत प्रदर्शनाला महत्वच नाही असा अर्थ करून घेणे होय. दुसरा मुद्दा त्यांनी "कुंपणावर बसलेल्यांचा" घेतला आहे. मला कबूल करायला काहीच अवघड नाही की, मी या मुद्द्यावर कुंपणावर बसलो आहे....त्याला कारण परत तेच > मी ज्या समाजात राहतो, ज्या संस्कृतीविषयी मला आत्मियता आहे, तिच्यातील श्रध्दा फोल्डरमधील 'पॉझिटीव्ह/निगेटीव्ह' प्रतिमांशी जुळवून घेणे मला आवडते ~ फक्त जिथे आणि जेव्हा श्रद्धेच्या परीचे अंधश्रध्देच्या चेटकीणीमध्ये रूपांतर होण्यास सुरूवात होते त्या त्यावेळी परिणामकारक असा विरोध केलेलाच आहे. ~~ टिळकांच्या ज्या 'कर्मविपाका'च धागाकर्तीने उत्साहाने उल्लेख केला आहे, त्याचा अर्थ असा घ्यायचा का की, तो सिद्धांत म्हणजेच हिंदू तत्वज्ञानाचे ते सार आहे? कर्मविपाकाचा सोप्या भाषेत अर्थ असा की, 'तुम्ही या जन्मी जे काही आहात आणि जे काही भोगता ते कशामुळे? तर मागच्या जन्मीच्या पापामुळे किंवा पुण्यामुळे... तसेच या जन्मी तुम्ही ते काही कृत्य करता, त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे पुढच्या जन्मी... म्हणून आता जन्माला आलाच आहात तर पुढच्या जन्म चांगला जावो म्हणून या जन्मात सत्कृत्य करा...." [अजून बरेच लिहिता येईल कर्मविपाकाच्यासंदर्भात, पण स्थानभयास्तव थांबणे गरजेचे आहे, तसेच चर्चेच्या रोखाने इतपतच पुरे आहे.] ~~ इथे याचा मतलबी अर्थ इतपतच आहे की आपल्या पितरांच्या नावाचे गोरगरीबांना (किमान १५ दिवस) गोडधोड खायाला घाला आणि निश्चित रहा की, वर तुमचे पितर आनंदाने पुढचा जन्म चांगला मिळणार या कल्पनेत राहणार शिवाय असे पुण्यकर्म केल्यामुळे तुम्हाला जरी या जन्मी पुष्पक विमान न्यायला आले नाही तरी 'हेवन एंट्री' साठी 'टोल' बसणार नाही हेही तितकेच सत्य. या जन्मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो म्हणून एखाद्या 'अबक' ने 'मी मागील जन्मी पुण्य केले होते म्हणून...' तर एखादा 'कखग' भंगी झाला म्हणून 'नक्कीच त्याने मागील जन्मात महाभयंकर पाप केले असणार म्हणून...' अस रिडींग करता येईल का...या कर्मविपाकाच्या सिध्दांताच्या आधारे? कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... भले हा बहाद्दर 'सुधाकर' आज तळीरामाबरोबर बसला असला तरी सिंधूने ती प्रार्थना करायचीच. आहे हे मान्य आजच्या समानतेच्या युगात ? चला, वादाकरीता तेही मान्य करू या. पण ही सिंधू या आयुष्यात विपरित परिस्थितीतही पुण्यसंचय करीत राहिली आणि सुधाकरबुवा हमेशा झिंगलेल्या अवस्थेत येऊन हिला लाथा घालत बसला तर याच्या बँक अकौन्टवर कोणत्या प्रकारचे 'पुण्य' जमा होणार? उत्तर झीरोच असेल...मग असा गृहस्थ या जन्मातील अशा प्रकारच्या कृत्यामुळे मेल्यावर स्वर्गात जाईल की नरकात? स्वर्ग तर बंदच (कारण कर्मविपाक सांगते तशी पुण्याई या बाळकोबाकडे नाहीच...) मग नरकात जर याने अप्रेन्टिसशीप केली तर याचा पुढील जन्म मनुष्याचा नसून डुकराचा असणार...हेही कर्मविपाकात सांगितले आहे. मग आता हयात असलेल्या याच्या पिलांनी 'पितृपक्षा' त १५ नाही तर १५० दिवस जरी गोडधोड करून सो-कॉल्ड गोरगरीबांना दानधर्म केला तर 'नेक्स्ट लाईफ ट्रान्सफॉर्मेशन' थांबणार असे मानायचे का? थोडक्यात, कोणत्याही कारणाने आणि "अमुक एक होईल किंवा व्हावे" अशा स्वार्थी वृत्तीने केलेला दानधर्म फलद्रूप होईल असे समजणे ही स्वतःशीच फसगत केल्यासारखे आहे....आणि जर का निस्वार्थी हेतूनेच दानधर्म करायचा असेल तर मग 'पितृपक्षा'ची तर वाट का पाहावी? इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 09/27/2010 - 12:47

In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार

Permalink

+

एवढेच नाही. सिंधूने अमाप पुण्य केल्याने ती पुन्हा ब्राह्मण स्त्री म्हणून जन्मणार. तर सुधाकर हा पापांमुळे डुक्कर किंवा गेला बाजार शूद्र तरी होणारच. पण सिंधूने जन्मोजन्मी हाच पती मागितल्याने तिला शूद्र सुधाकराशी विवाह करावाच लागनार आणि ती प्रतिलोम वर्णसंकराच्या पापात बुडून जाणार (डुकराशी लग्न केल्यास कोणत्या पापात बुडणार याची कल्पना नाही). असो. लिहावे तेवढे थोडेच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Tue, 09/28/2010 - 02:05

In reply to + by नितिन थत्ते

Permalink

नितिन थत्ते

हाहाहा... हा तर इन्फायनाईट लूप झाला :D
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 09/27/2010 - 13:05

In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार

Permalink

कर्मविपाक?

शुचिताईंनी दोन्ही लेखात धर्मपालन संदर्भात एखाद्या विश्वासावर श्रध्दा असली तर ती कशाप्रकारे "डीफेन्ड" करता येईल याचा प्रत्यय लेखात तसेच विविध प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून केला आहे हे वाचताना दिसते.>>>>> त्या 'धर्मपालनाबद्दल' बोलत नाहियेत, त्यान्च्या स्वप्नाबद्दल आणी योगायोगाबद्दल बोलतायत! "डीफेन्ड" करण्याचा प्रश्न कुठे येतो? 'पित्रुऋण' फेडण्यासठी दान करने हा गुन्हा आहे का? कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... भले हा बहाद्दर 'सुधाक........ हे कर्मविपाकात लोकमान्य टिळकानी सांगितले आहे का? कुठे? असा वेडेपणा मला तरी गीतारहस्यात दिसला नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 09/27/2010 - 13:40

In reply to कर्मविपाक? by कवितानागेश

Permalink

धर्म आणि लिखाण

"त्या 'धर्मपालनाबद्दल' बोलत नाहियेत, त्यान्च्या स्वप्नाबद्दल आणी योगायोगाबद्दल बोलतायत!" ~~ अहो ताई, त्यांनी धाग्यात जरी 'धर्म' असा सरळसरळ उल्लेख केला नसला तरी ती भाषा धर्माचे आचरण करण्यासंदर्भातच आहे, हे तरी मान्य करू या ना. प्रत्येक वेळी तसे थेट म्हटले नसले म्हणजे प्रतिसाद देताना ती बाब लक्षात ठेवूनच लिखाण करावे असे नाही. शिवाय शुचिताईंनी सापाच्या स्वप्नाचा संबंध पितृपक्षाशी लावला व त्यानुसार जागेपणी पालन केले म्हणजे कोणतीतरी 'धर्मरिती' पाळली असे होते ना? "हे कर्मविपाकात लोकमान्य टिळकानी सांगितले आहे का? कुठे?" ~~ इथेही तेच. अमुक एक गोष्ट लोकमान्यांनी सांगितली तरच ती प्रमाणभूत मानावी असा काही दंडक आहे काय? कर्मविपाकाचा मी एवढ्यासाठीच उल्लेख केला की, त्या अनुषंगाने अन्य धर्मग्रंथात 'स्त्री' ने पाळावयाच्या जी काही दंडके आहेत ती या श्रध्दा/अंधश्रद्धा चर्चेच्या निमित्ताने चर्चेत यावी. शिवाय ना गीतेत ना कर्मविपाकात राहू दे, अन्यत्र जर टिळकांनी एखाद्या 'सिंधू' ची 'सुधाकर' हाच नवरा पुढील जन्मी मिळो अशी प्रार्थना ऐकली असती तर तिचे त्यांनी शनिवारवाड्यावर बोलावून अभिनंदन केले असते का? धर्म आचरणातील चांगल्या/वाईट रितीविषयी लिहिताना/बोलताना लिखित आणि मौखिक दोन्हीची संगत घ्यावीच लागते. "देवास काय आवडते ?" याची व्याख्या देवाने नसून खुद्द मनुष्याने केली आहे हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे कारण याच मनुष्याने स्वतःला जे सुखदायी असेल तेच देवास आवडते अशी सोयीस्कर समजूत करून घेतली आहे. [आता हे कर्मविपाकात टिळकांनी लिहिलेले नाही, म्हणून असत्य होते काय?] "असा वेडेपणा मला तरी गीतारहस्यात दिसला नाही!" ~~ ठीक. मुळात जगातील एकजात धर्मांची उभारणी एका क्षणी 'सृष्टीत मानवापेक्षा मोठा कुणी नाही..." या वेडेपणातून झाली असल्याने, मग तो वेडेपणा गीतारहस्यच काय पण खुद्द गीतेतही दिसला वा ना दिसला....काही फरक पडत नाही. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 09/27/2010 - 14:29

In reply to धर्म आणि लिखाण by इन्द्र्राज पवार

Permalink

विषयांतर

त्या अनुषंगाने अन्य धर्मग्रंथात 'स्त्री' ने पाळावयाच्या जी काही दंडके कुठले धर्मग्रंथ? तुम्ही कर्मविपाकाबद्दल बोलताय की धर्मग्रंथांबद्दल? गीता हा धर्मग्रंथ नाही, गीतारहस्य हाही नाही. (मधल्या काही शतकांमध्ये स्त्रियांवर धर्माच्या नावाखाली बंधने होती, त्याचे कारण वेगळे आहे, त्याची इथे चर्चा नको.) त्यामूळे एकच काठी घेउन चुकीच्या परंपरांच्या नावाखाली,संपूर्ण धर्माला बडवणे योग्य नाही! तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी केवळ 'रूढी' म्हणून केल्या जातात... अशा रुढींमध्ये, समजांमध्ये 'काहीतरी' अर्थ आहे की काय, असे वाटावे, असे अनुभव, नेहमीच लोकाना येतात. अशा वेळेस त्या अनुभवांकडे डोळसपणे न बघता, त्यातून 'चांगले' काही 'निष्पन्न' होत असेल तर ते न बघता, केवळ 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली उडवणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 09/27/2010 - 15:07

In reply to विषयांतर by कवितानागेश

Permalink

'धार्मिक धार्मिक'

"केवळ 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली उडवणे योग्य नाही....." ~~ माझ्या मूळच्या प्रतिसादात मी स्पष्टपणे म्हटले आहे की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा मी ओळखतो. कोणत्याही बाबीची मी कधीही 'धार्मिक धार्मिक' म्हणून खिल्ली (इथेच काय, पण अन्यत्रही कुठे) उडवलेली नाही. फक्त देवधर्माच्या नावाखाली ज्या अनिष्ट रूढी, परंपरा येथील मातीत रूतून बसल्या आहेत (त्यातील बर्‍याचशा कालबाह्य झाल्या असल्या तरी...) त्यांचे पुनरूज्जीवन कोणत्याही निमित्ताने होऊ नये इतपतच. सचिनला एरवी आम्ही डोक्यावर घेऊन नाचनाचनाचू पण खेळातील सातत्य कमी झाले म्हणून पाठीवर उठलेल्या कुठल्यातरी व्रणामुळे 'सर्पशांती' नावाचा यज्ञ करायला केरळाच्या मंदिरात जायाचे यासाठी त्या कृत्याची खिल्ली उडवलीच पाहिजे. ~~ तुम्ही आणि शुचिताई "स्त्री" आहात, मग एका स्त्रीची - त्या ऐश्वर्या रॉयची "मंगळशांती" करण्यासाठी तिचे बालाजीला जाऊन "झाडा" च्या फांदीबरोबर लग्न लावून ते बाजूला नेऊन जाळायचे, मग तिला 'पवित्र' अशा दहा नद्यातील पाण्याने आंघोळ घालायची....., हुश्श... आता तिच्या डोक्यावरून 'मंगळ' गेला म्हणून बालाजीला ५५ लाखाचा मुकुट द्यायचा, नंतर तिचा त्या महान बच्चनच्या पुत्राबरोबर 'पुनर्विवाह' करायचा....ही बाब एक सुशिक्षित स्त्री म्हणून तुम्हाला खटकत नाही का? आणि जर खटकत असली तर मग 'तसे' करण्याबद्दल ज्या कोणत्याही धर्मग्रंथात लिहिले असेल तो तुम्हाला टाकावू वाटणार नाही? आता अशा प्रथेबद्दल संयत भाषेत टीका केली तर ती धर्माची खिल्ली कशी होईल? इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 09/27/2010 - 15:50

In reply to 'धार्मिक धार्मिक' by इन्द्र्राज पवार

Permalink

संयत भाषेत टीका?

पुन्हा विषयांतर!! अहो, चर्चा सुरु आहे, ती या न त्या कारणाने पित्रुऋण फेडण्याबद्दल, आणी त्या अनुषंगानी घडणार्‍या काही योगायोगांबद्दल! आणी तुम्ही एकट्यानी संयत भाषेत लिहून काय उपयोग? शिवाय इथे सचिन आणी ऐश्वर्याचा काय संबंध? (अवांतरः अशा 'अंधश्रध्दा'वाल्या गोष्टी फक्त भारतातच घडतात असे नाही!) मग 'तसे' करण्याबद्दल ज्या कोणत्याही धर्मग्रंथात लिहिले असेल तो तुम्हाला टाकावू वाटणार नाही? >>>>>>> संपूर्ण ग्रंथ टाकाउ कसा असेल? प्रत्येक ग्रंथ त्या त्या काळाला अनुसरुन लिहिला गेला आहे, म्हणूनच भारताला 'स्पेसिफिक' धर्मग्रंथ नाही! एखाद्या काळात जर मुलींना 'मंगळी' म्हणून, बिनलग्नाचे ठेवायला सुरुवात झाली असेल, तर हे सगळे असे 'शांती' चे उपाय कढून, मुलगी 'उजवण्याची' वाट मोकळी केली असेल, असे मला वाटते. त्यात बिघडले काय? स्वतःची उन्नती होणार असेल, तरच माणसाच्या हातून पैसा सुटतो! हे एक बरे निमित्त आहे! खरेच 'मंगळ' काय करतो, ही गोष्ट पुढची, ...ज्योतिष्यानी अभ्यास करुन शोधण्याची आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 09/27/2010 - 16:04

In reply to संयत भाषेत टीका? by कवितानागेश

Permalink

मंगळ

विषयांतर नव्हते तर त्या विषयाचे दुसरे कंगोरे शोधण्याचा तो एक प्रयत्न होता.... पण आता राहू दे. [तिकडे शुचिताई माझ्या डोक्यात हाणण्यासाठी गदा शोधत आहे....] "खरेच 'मंगळ' काय करतो, ही गोष्ट पुढची, ...ज्योतिष्यानी अभ्यास करुन शोधण्याची आहे!..." ~~ चला, निदान इतपत तरी एकमत झाले ते छानच आहे...कारण खरंच हा "मंगळ्या" काय करतोय यावरही इथे एकदा नौबती झडल्या पाहिजेत. ते "रुपांगी" वाले प्रा.घैसास हा धागा वाचत असतील अशी आशा करु या. त्यांचा या बाबतीत अभ्यास असावा असा कयास आहे. ~ पण जर ते 'स्त्री' ने सुंदर कसे दिसावे ? यातच गुंतले असले तर कठीण आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/27/2010 - 16:03

In reply to 'धार्मिक धार्मिक' by इन्द्र्राज पवार

Permalink

... त्या ऐश्वर्या रॉयची

... त्या ऐश्वर्या रॉयची "मंगळशांती" करण्यासाठी ...
त्या मंगळ-चंगळ आणि फनीशनीच्या गोष्टीत मला काही विंट्रेष्ट नाय! पण ऐश्वर्याला रॉय म्हणतो आहेस तर आता बाँगाली बॉबू आणि भॉगिनींना तोंड द्यायला उभा रहा! (बसू या बॉंगाली आडनावावर फालतू जोक नकोयत!)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 09/27/2010 - 16:49

In reply to ... त्या ऐश्वर्या रॉयची by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

'Principal'

"ऐश्वर्याला रॉय म्हणतो आहेस तर...." ~~ म्हणजे ? मी तो जादाचा 'चंद्र' चढविला आहे की काय तिच्या आडनावावर? अगं, तो लिखाणातील सवयीचादेखील भाग असू शकतो. आपण नाही का, 'Principal' मराठीत लिहिताना 'प्रिन्सिपल....प्रिन्सिपाल....प्रिन्सिपॉल..." असे तीन विविध रूपे वापरलेली पाहतो; तद्वतच 'Rai' चे रॉय झाले माझ्याकडून. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/27/2010 - 16:55

In reply to 'Principal' by इन्द्र्राज पवार

Permalink

ह्यांना कोणितरी अर्धचंद्र

ह्यांना कोणितरी अर्धचंद्र द्या रे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 09/27/2010 - 19:21

In reply to 'Principal' by इन्द्र्राज पवार

Permalink

रॉय

आता सगळे मंगलोरी कोकणी पण धावणार बघ तुझ्यामागे!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 18:04

In reply to धर्म आणि लिखाण by इन्द्र्राज पवार

Permalink

मुळात जगातील एकजात धर्मांची

मुळात जगातील एकजात धर्मांची उभारणी एका क्षणी 'सृष्टीत मानवापेक्षा मोठा कुणी नाही..." या वेडेपणातून झाली असल्याने, कित्येक धर्म मानवाचे आजचे रुप हे अवनत असुन त्याच्या मुळ स्वरुपापासुन च्युत झाला आहे असे प्रतिपादन करतात. मुळचे अमृतमयी रुप म्हणजे मानवाचे दिसत असलेले रुप (दोन पाय दोन हात एक डोकं इत्यादी) अभिप्रेत नसुन त्याच्या अंतर्यामी असलेले ते चिरंतन नित्य चैतन्यरुप हेच सर्वात मोठे आहे ह्याचे प्रतिपादन केलेले असुन त्याच अनुषंगाने अमृताच्या पुत्रांनो जागे व्हा ही घोषणा आहे. उगाच काहीतरी कुठे तरी जोडून बोलु नका.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 17:54

In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार

Permalink

कर्मविपाकात 'स्त्री' साठी

कर्मविपाकात 'स्त्री' साठी ज्या काही मर्यादा रेखा आहेत तीत 'पुढील जन्मी हाच पती मला मिळो' अशी प्रार्थना ती सर्वव्यापी देवापुढे करते/किंवा करावी असे सांगितले आहे.... कशावरुन? संदर्भ द्या !
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 09/27/2010 - 18:48

In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार

Permalink

इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण

इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण नीट आठवत नाही पण इंग्रजी पुस्तकं काही आठवताहेत आणि एकामधे हे होतं की - एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही. जसं एकदा तुम्ही ५वीत असता मग तुम्हाला ४ थीत ढकलत नाहीत त्याचप्रमाणे. सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/27/2010 - 18:53

In reply to इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण by शुचि

Permalink

>>एकदा मानव योनी मिळाली की

>>एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही चला, (मला) आता निर्धास्त मरायला काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 18:56

In reply to >>एकदा मानव योनी मिळाली की by गांधीवादी

Permalink

हो पुढचा जन्म मानवाचा मिळणार

हो पुढचा जन्म मानवाचा मिळणार म्हटल्यावर निश्चिंत झाले तुम्ही !
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/27/2010 - 18:59

In reply to हो पुढचा जन्म मानवाचा मिळणार by अवलिया

Permalink

अहो, काय सांगू, एवढाली

अहो, काय सांगू, एवढाली मोठ्ठी मोठ्ठी पापे केली आहेत. म्हणून जरा काळजीत होतो. (स्विस माझ्यामुळेच तर चाललेली आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 19:00

In reply to अहो, काय सांगू, एवढाली by गांधीवादी

Permalink

हा हा हा गांधी नावात आहे

हा हा हा गांधी नावात आहे म्हटल्यावर पाप बाय डिफॉल्ट असणारच आयुष्यात
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/27/2010 - 19:01

In reply to हा हा हा गांधी नावात आहे by अवलिया

Permalink

सहमत, हे १०० टक्के खरं आहे,

सहमत, हे १०० टक्के खरं आहे, हे १०० टक्के खरं आहे,
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 09/28/2010 - 14:37

In reply to हा हा हा गांधी नावात आहे by अवलिया

Permalink

नाना ते वरून गांधीवादी आहेत.

नाना ते वरून गांधीवादी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 09/27/2010 - 19:58

In reply to इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण by शुचि

Permalink

विश्व रचना...

"जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते." ~~ हे मान्यच आहे शुचिताई. कोणतीही गोष्ट स्वीकारताना तिची चिकित्सा करणे हे डोळसपणाचे लक्षण आहे. मग तुम्ही ते ज्ञान पुस्तकाद्वारे प्राप्त केलेले असो वा ज्याच्या शिकवणीविषयी तुमच्या मनात कोणताही संदेह नाही अशा गुरुतुल्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान असो. मी पुनश्च एकदा इथे सांगू इच्छितो की, मी कोणत्याही 'श्रद्धे' च्या विरूध्द नाही, फक्त तिच्या प्रवासाकडे लक्ष ठेवून त्या शुध्द झर्‍याचे अंधश्रद्धा नामक डबक्यात रूपांतर झालेले पाहू इच्छित नाही. आपल्या पूर्वजांच्या काळात अशी श्रद्धा होती की आपली पृथ्वी सर्व विश्वाच्या केंद्रस्थानी असून ३३ कोटी देव तिच्यावर वरदहस्त ठेवून आहेत. पण पुढे विज्ञानाने हेही सिद्ध केले की विश्वाच्या या महाप्रचंड उलथापालथीत सामील असलेल्या हजारो आकाशगंगापैकी एक व तिच्यातील सूर्यासारख्या दोनशे अब्ज तार्‍यांच्यापैकी एका सूर्यतार्‍याच्या कुळात आपला पृथ्वी नावाचा ग्रह आहे....ज्याचे आकारमान या जंजाळात सुईच्या अग्रावर कसेबसे मावेल इतपत आहे. ~ हे तरी आपण मानतोच ना? आणि जर याचे उत्तर 'होय' असेल तर मग कोणत्या गोष्टीवर कितपत श्रद्धा ठेवावी ही बाबदेखील विज्ञानाच्या कसोटीवरच प्रमाणभूत मानली पाहिजे. "सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही." ~ ठीक आहे. तुमचा हा विश्वास सार्थ ठरो इतपतच म्हणतो. शेवटी या देशातील 'सिंधू' कुठल्यातरी जन्मी सुखी होणार असेल तर तुमचे वरील विधान मी कदापि खोडू इच्छिणार नाही. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 09/27/2010 - 20:38

In reply to इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण by शुचि

Permalink

चूक आणि बरोबर

>>एकदा मानव योनी मिळाली की पुढील जन्म जनावराचा मिळत नाही. >>सुधाकरला डुकराचा पुढील जन्म मिळणार नाही पहिले वाक्य बरोबर नाही. चौर्‍याऐशी लक्ष जन्म सायक्लिक असतात. त्यात शेवटचा जन्म नसतो. [मोक्ष प्राप्ती झाली तरच हे सायकल तुटते]. सुधाकरला डुकराचा जन्म मिळणार नाही या सुधारणेबद्दल धन्यवाद. चूकच झाली होती. ब्रह्महत्या करणारा डुक्कर होतो. दारू पिणारा कृमीकीटक* होतो असे मनु:स्मृती सांगते. (बायकोला मारणे हा नवर्‍याचा लग्नसिद्ध अधिकार असल्याने त्याबाबत मनु:स्मृती काही म्हणत नाही. दारू पिऊन बायकोला मारणे यासाठी काही स्पेशल शिक्षा नाही). स्त्री आणि कृमीकीटक यांचा विवाह पुढच्या जन्मी कसा होणार ते मला विचारू नका. *पुढच्या जन्मी कीटक होऊन कुणाकुणाला चावायचे याची यादी करायला घेतली आहे. (पितृपक्षात जन्मलेला)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 09/27/2010 - 21:03

In reply to चूक आणि बरोबर by नितिन थत्ते

Permalink

डुक्कर??

(पितृपक्षात जन्मलेला) नितिन थत्ते >>>>>>>>>>> हॅप्पी बर्थडे थत्तेकाका! ब्रह्महत्या करणारा डुक्कर होतो. दारू पिणारा कृमीकीटक* होतो असे मनु:स्मृती सांगते. >>>> पण ते शोधून कसे काढणार, अत्ताच्या डुकराला गदागदा हलवून विचारवे लागेल, "खरे बोल, कुणाला मारलस गेल्या जन्मी?" ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/27/2010 - 12:19

Permalink

**एकदा मी फिरायला बाहेर पडलो

**एकदा मी फिरायला बाहेर पडलो असताना मला प्रोफेसर धनुष्कोडी भेटले. रस्त्यातच थांबून आमच्या गप्पा सुरू झाल्या.... त्यांच्या आत्येसासूबाई वेलिंग्टनला असतात्.त्यांच्यासाठी बाकरवड्या घ्यायला ते आले होते असे त्यांनी मला सांगितले..... खूप ऊन असल्याने मी त्यांना म्हणालो, चला जरा चहा घेऊ. मग मी आणि प्रोफेसर चहा घ्यायला थांबलो. बाबल्याच्या दुकानात चहा छान मिळतो. मी प्रोफेसरांना बाबल्याची ओळख करून दिली. बाबल्याला आनंद झाला... "असे छोटे छोटे आनंद वाटायला हवेत " प्रोफेसर म्हणाले. मलाही खूप बरे वाटले. छोट्याछोट्या आनंदावरून आठवण झाली आणि मी प्रोफेसरांना म्हणालो," आपण मिसळपावावर असता की नाही?" त्यांना कळेना... मी त्यांना मिसळपाव आणि खरडवही म्हणजे काय ते समजावून सांगितले.... त्यांना माझे म्हणणे पटले... बोलताबोलता खूप वेळ गेला होता. आम्ही आत्येसासूबाईंसाठी आणलेल्या सगळ्या बाकरवड्या संपवल्या.... मला अपराधी वाटले. पण ते म्हणाले, " छोटेछोटे आनंद वाटायला शिकले पाहिजे" मलाही आनंद झाला.... जाताजाता मी म्हणालो, " पितृपक्षावरील लेख चाळणे पितरांच्या आरोग्यास चांगले असते.." तेही हसून म्हणाले, " लेख चाळलेच पाहिजेत.. पितरांचे आरोग्य चांगले ठेवलेच पाहिजे"...** **सौजन्य :- भडकमकर मास्तर.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 09/27/2010 - 12:34

In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार

Permalink

दण्णका!!!!!!! =))

दण्णका!!!!!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 09/27/2010 - 12:43

In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार

Permalink

खी: खी: खी:

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. _/\_ हो परासेठ! असो, अधिक काही लिहिले तर पराचा कावळा करण्याचा (तोही या 'पक्षी' :)) आळ यायचा, त्यामुळे लेखनसीमा.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Mon, 09/27/2010 - 14:36

In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार

Permalink

सही... बाकी, पराच्या

सही... बाकी, पराच्या प्रतिसादावर कोकेंची अपेक्षित कोटी आल्याने धन्य झाले... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/27/2010 - 15:25

In reply to सही... बाकी, पराच्या by मस्त कलंदर

Permalink

आजचा दिवस कारणी लागला. भडकमकर

आजचा दिवस कारणी लागला. भडकमकर मास्तर, परा आणि कोटीकेसरी नंदन एकत्र बसून बाकरवड्या खात कावळे हाकलत आहेत असं दृष्य डोळ्यासमोर आलं.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 09/27/2010 - 20:21

In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार

Permalink

ही ही ही ही!!!

खल्लास!! दिवाळीआधीच अ‍ॅटमबाँब फोडला पराने!!! =)) =)) (प्रो.कुंभकोणम्)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 09/27/2010 - 13:37

Permalink

आपले आई-वडील, आजी-आजोबा,

आपले आई-वडील, आजी-आजोबा, पूर्वज यांच्यामुळे या जगात आपण आलो आणि हे सर्व करू शकतो, यासाठी या आपल्या पूर्वजांची आठवण आणि त्यांच्या बद्दलचा कृतज्ञभाव व्यक्त करणारा हा पितृपक्ष. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञ भावाला फार महत्त्व आहे. जिथे प्रेम आहे, तेथे कृतज्ञता आहे आणि कृतज्ञताभाव हा ऋणमोचना भाव आहे. कारण आपल्या पूर्वजांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे आणि ते उभ्या जन्मात फिटू शकत नाही, त्यासाठी हा पितृ पंधरवाडा निर्माण झाला. या निमित्ताने आपण आपल्या वाडवडिलांची आठवण करतो. त्यांचा आदर्श, शिकवण, त्यांचं मोठेपण आठवतो आणि पुन्हा पुन्हा हे व्हावं यासाठी दरवर्षी पितृपक्ष नेमाने येतो. आम्हि पण हा विधि सश्रद्ध मनाने करतो..आम्ही धार्मिक प्रवृत्तिचे असलो तरी कर्म कांडाचा फाफट पसारा पासुन आम्हि दुर रहातो..महत्वाचे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे..ज्या आई वडिल.. आजी आजोबांच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो..ज्यांचे बोट धरुन शाळेत गेलो..ज्यांच्या त्यागावर व श्रमावर आज आपण सुसंस्कारित व ्समृद्ध जिवन जगत आहोत त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला पाहीजे..आज ते कुठल्या जगात आहेत हे आपणास हि ठावुक नाहि पण त्यांचे आशीर्वाद व मायेचा अखंड वर्षाव आपल्यावर होतच आहे...त्या साठी हा कृतज्ञ भाव....
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 09/27/2010 - 17:14

Permalink

हो बरोबर आहे....

पण आपल्या श्रध्दा आपण चार भिंती आड ठेवल्या पाहिजेत .त्याचे चव्हाट्यावर प्रदर्शन मांडणे योग्य नाही.जिथे कावळ्याचा फोटो दिला आहे तिथेच ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज ह्याचे देखिल फोटो आहेत. त्यानी देखिल अश्या किती तरी खुळचट कल्पनांवर टिका केली आहे. जे काही इथे करायचे आहे ते इथेच फेडायचे आहे.त्यासाठी देव तुम्हाला दुसरी संधी देत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 17:53

In reply to हो बरोबर आहे.... by वेताळ

Permalink

देव कशावरुन आहे?

देव कशावरुन आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/27/2010 - 17:56

In reply to देव कशावरुन आहे? by अवलिया

Permalink

३३ कोटी देव कशावर न कशावरून

३३ कोटी देव कशावर न कशावरून असतातच. उदा. गणपती उंदरावरून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 09/27/2010 - 17:59

In reply to देव कशावरुन आहे? by अवलिया

Permalink

नाना ते तरी आम्हा पाप्याना कसे माहित असेल......

देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही.पण मी देव आहे असे एक बापु ओरडुन सांगतात असे मी वाचले आहे. हवतर तुम्ही त्याचे वानर माफ करा शिष्य व्हा,तुम्हालाही संधी मिळेल देव पहाण्याची.
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/27/2010 - 18:04

In reply to नाना ते तरी आम्हा पाप्याना कसे माहित असेल...... by वेताळ

Permalink

चला,चला ५ का दस, ५ का दस, लॉट

चला,चला ५ का दस, ५ का दस, लॉट का माल , लॉट का माल देव बघा , देव बघा, चला,चला लवकर लवकर. हि संधीपू न्हायेणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 18:06

In reply to नाना ते तरी आम्हा पाप्याना कसे माहित असेल...... by वेताळ

Permalink

>>>देवाना पाहिलेला माणुस

>>>देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही मग
जे काही इथे करायचे आहे ते इथेच फेडायचे आहे.त्यासाठी देव तुम्हाला दुसरी संधी देत नाही.
हे तुम्ही कसे काय म्हटले आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/27/2010 - 18:12

In reply to >>>देवाना पाहिलेला माणुस by अवलिया

Permalink

आयल कस्ला पॉयन्ट मदि पकडलाय

आयल कस्ला पॉयन्ट मदि पकडलाय
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 09/27/2010 - 18:19

In reply to >>>देवाना पाहिलेला माणुस by अवलिया

Permalink

देव हे संबोधन हे मी

वापरले ते माझ्या आसपास असणार्‍या देवांच्या मंदिरावरुन मांडले आहे. आमच्या भागात प्रत्येक गल्ली बोळात देवाची मंदीरे उभी आहेत. त्यातली मुर्ती म्हणजे देव आहेत व ते लोकांच्या पापापुण्याचा फैसला करतात असे पुर्वी पासुन सांगितले असल्यामुळे मी तसे म्हणालो. नाना ह्या उपर मला देवांबद्दल माहिती नाहीतेव्हा ह्या पामराला क्षमा कर.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/27/2010 - 18:26

In reply to देव हे संबोधन हे मी by वेताळ

Permalink

अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही देव

अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही देव असे करतो असे प्रतिपादन आजुबाजुच्या समाजाकडे पाहुन केले. किमान समोरच्याला सांगण्यापुरते तरी तुम्ही क्षणभर देवाचे अस्तित्व मानीव का होईना गृहित धरुन सांगितले याच न्यायाने मग जर कूणी आजुबाजुच्या समाजानुसार परंपरा रुढी जतन करुन पितरांविषयी काही भावना जपत असतील, कदाचित पूर्वायुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे मनात किल्मिष असेल त्याचे निराकरण या आधाराने करत असतील आणि पुन्हा आयुष्याला धडाडीने सामोरे जात असतील तर त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही. होय की नाही ? हा प्रश्न केवळ तुम्हाला एकट्यालाच आहे असे नाही आणि कुणालाही विशिष्ट उद्देशुन नाही. शेवटी काय आहे भारत हा अनेक विचारधारांचा देश आहे. समोरच्याची खिल्ली उडवणे हेच अनेकांना जमते बाकी जमत नाही. शेवटी ज्याची त्याची जाण, समज हेच खरे.. !! असो. यानिमित्ताने या जन्मातील तसेच (असल्यास) मागील सर्व जन्मांतील सर्व बांधव, आप्त, मित्र, पितरांना विनम्र अभिवादन !
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 09/27/2010 - 18:39

In reply to अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही देव by अवलिया

Permalink

तुम्ही आमचे मागच्या जन्मातले पितर तर नाही ना?

वर जे लिहले ते बरोबर आहे,मग आपल्या पितरांचे कौतुक घरी करावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com