माझी आजी पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी छान छान मलिदा करते. तसा मलिदा अजून पर्यंत माझ्या आईला आणि सौ. ला जमला नाही. तो मलिदा मला खूप आवडतो. त्यामुळेच पितृपक्ष लक्षात आहे. आणि पितृपक्षात movies release होत नाही, एवढेच माहित आहे.
अगं, पोळी कुस्करून अगदी बारीक करायची. शक्यतो मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये केल्यास छान चुरा होतो. त्यात तूप, गूळ आणि वेलची घालायची. की झाला मलिदा तयार. पीरांना हिंदू-मुस्लिम दोघेही मानतात. पीराच्या उरूसात मलिदा हाच प्रसाद असतो. क्वचित भाकरीचा मलिदाही करतात.
हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला नाय्ये, जेणेकरून मला हे असला स्वयंपाक/पाककृती वगेरे येत असायला, मला फक्त खायचे माहित आहे. जेवणाचे ताट रोज आयते पुढे येते.
थोडे खासगी अवांतर : (सुदैवाने) आमच्या सौ. पण IT वाल्या नाहीयेत. त्यामुळे पुरुषांनी स्वयंपाक घरात पाय न ठेवणे हा आमच्या घरचा (अलिखित) नियम आहे. त्यात आमच्या सौ. मिपा वाचत नाहीत, मी मिपावर ह्या ID ने लिहितो हे देखील सौ. ला माहित नाही. त्यामुळे (आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे) हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ.
तरी सुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन, आजीकडे गेलो कि तिला विचारून टाकीन ह्याची पाककृती.
रवा, गुळ आणि अजून काहीतरी पासून बनवितात एवढेच माहित आहे. खूप मस्त लागतो.
मलिदा खाण्यासाठी पितृपक्षाची वाट बघत असतो.
सिंगापूरला राहून एका चिनी प्रथेची माहिती झाली. आपल्या पितृपंधरवाड्याच्या सुमारासच चिनी लोक पितरांची शांती करतात. पोर्णीमेच्या रात्री खास, मोठ्या प्रमाणावर आणि त्या पंधरवाड्यात रोज रात्री, पितरांना प्रसाद अर्पण केल्या जातो. चिनी कालगणने प्रमाणे हा सातवा महिना मोजल्या जातो. ह्या उत्सवाला छिंगमिंग उत्सव म्हणतात. ह्या पंधरवाड्यात, रोज रात्री पुर्वजांचे आत्मे नातलगांच्या घराजवळ गिरट्या घालतात. त्यांच्या साठी रोज रात्री उदबत्या, मेणबत्या पेटवल्या जातात. डुकराचे वा कोंबडीचे मांस अर्पण केले जाते. पुर्वजांना मिळावे म्हणून कागदाच्या वस्तु, जसे बंगले, कार, खोटे पैसे, म्हणजे 'हेल मनी' च्या नोटा हे सगळे जाळले जाते. धुरांमधून पुर्वजांना ते मिळते अशी समजूत आहे. हा महिना भुतांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. ताओईझम मधून ही पद्धत आलेली आहे.
मला मागच्या आठवड्यात नागाचे स्वप्न पडले. त्या आठवड्यात पंचमुखी नागाचे एक चित्र सकाळ मधे वाचकांच्या पत्रात आले होते ते कुठतरी सुप्त मनात नोंदलेले असावे त्याचा हा परिणाम अशी संगती मी त्याची लावली.
प्रेतयोनीत पूर्वजांचे काय भटकत असते?
शरीरे तर आपण जाळलेली असतात.
आत्मे म्हणाल तर त्या आत्म्यांनी दुसरा जन्म घेतला असणार ना, चौर्याऐशी लक्षांपैकी एक?
की शरीर आणि आत्मा यांखेरीज तिसरे 'काहीतरी' असते जे भटकत असते?
फार तर नुकताच मृत्यू झालेल्याचा आत्मा अजून राहिला असेल जन्म न घेतलेला.... पण आजोबा, पणजोबा, वगैरे पण अजून भटकतच?
(अवांतर : अरेरे, कालच मी माझ्या खोलीतल्या बर्याच मुंग्या मारल्या. अन्नपाण्याच्या आशेने आलेले माझे पूर्वज असतील तर....... )
टीप : वरील प्रतिसादाचा हेतू खिल्ली उडवण्याचा नसून, लेख वाचणार्या इतरांना "विचार करण्यास उद्युक्त" करण्याचा आहे.
किती काळानंतर पुढचा जन्म मिळतो. तीन पिढ्या प्रेतयोनीत म्हणजे माझ्या पणजोबांचा पण अजून पुढचा जन्म मिळाला नाही?
तुमच्या म्हणण्यावरून असे दिसते की मी मरेपर्यंत (इनफॅक्ट माझ्या पिढीतले सगळे चुलत भाऊ मेल्याशिवाय) पणजोबांना पुन्हा जन्म मिळणार नाही.
आमच्या पितरांनी, महान भारतची सद्य परिस्थिती लक्षात घेता पुढचा जन्म कुठे(कोणत्या देशात) घेऊ अशी विचारणा BULK SMS द्वारे नुकतीच केली आहे.
थत्ते काका , कृपया जरा मदत करता काय ? कोणता देश सुचवू त्यांना ? चीन, अमेरिका, कि अजून कोणता.
१. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे कधी आले होते? कारण २९ तारखेपर्यंत बल्क एसेमेसना बंदी आहे.
२. परतचा जन्म माणसाचा मिळत नसून कुठल्यातरी प्राण्याचाच मिळतो. तो या मानवजन्मात केलेली पापे आणि पुण्ण्ये पाहून मिळतो. तेव्हा अनुकूल देशातले हवामान पाहून जन्म मिळेल.
३. तुम्हाला भारतात जे वाईट आहे असे वाटते आहे ते माणसांसाठी लागू आहे. कुत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आणि मनेकाबाईंचे खास संरक्षण आहे. त्यामुळे कुत्र्याचा जन्म भारतात घ्यायला काही हरकत नाही. २९ तारखेनंतर बल्क एसेमेस करून पूर्वजांना कळवावे.
आपल्या अमुल्य सल्लाबद्दल धन्यवाद.
>>बल्क एसेमेसना बंदी आहे.
१) अहो ह्या बंदी वगेरे शुद्र मानवांसाठी, पितरांना नाही.
२) आमच्या पूर्वजांनी बरीच पुण्याची कामे केली आहेत, त्यांचा पुण्याचा घडा भरलेला आहे. मला पुणे-मुंबई सोडून जगातले दुसरे कुठलेच हवामान माहित नाही. त्यामुळेच तर विचारणा केली होती. असू दे मीच जरा गुगलतो.
३) 'भारतात माणसांपेक्षा कुत्री बरी' हे माहित आहे. आणि त्यामुळेच जिकडे तिकडे कुत्र्यांचे फोफावले आहे. त्या फोफावलेल्या कुत्रांच्या जमातीती जर का जन्म घेतला तर एका दिवसांत सगळे पुण्य खतम होईल. अशी भीती आमच्या पितरांना आहे. बघू मीच काहीतरी आयडिया काढतो. आणि २९ नंतर त्यांना BULK SMS करतो. (आम्हाला मात्र सध्या BULK SMS बंदी आहे. शेवटी आम्ही काय, एक शुद्र मानव)
मिसळपाव वर स्वागत आहे. सवय करून घ्या अशा खिल्लींची. हळूहळू त्याचे काही वाटेनासे होईल (आंतरजालीय प्राथमिक) आणि मग एके दिवशी तुम्हीच अनाठायी खिल्ली उडवू लागाल (आंतरजालीय माध्यमिक). पुढील स्टेप्स बाकीचे जुने आणि जाणते सांगतीलच हळूहळू.
(आंतरजालीय प्राथमिक मध्ये शिकणारा) वि. मे.
मी पितरांचे आत्मे याकडे रूपक म्हणून बघतो. हिंदू संस्कृतीत पितृऋण मानलं गेलेलं आहे - याचा अर्थ मी आपल्या पितरांनी जसा आपल्याला जन्म दिला तसा जर आपण कोणाला जन्म दिला तर आपल्या मुलांचं प्रेमाने संगोपन करून त्यांना उत्तम व्यक्ती बनवण्याचा मनापासून प्रयत्न करावा, असा मी लावतो. यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही.
"यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही."
~~ नेमके हेच माझे मत आहे; आणि यात एकच वाक्य वाढवितो : मात्र जे ही रूढी पाळतात त्यांच्या भावनांना माझ्या मतामुळे धक्का लागणार नाही किंवा ते दुखावले जाणार नाहीत, इतपत पाहतो.
शेवटी मी समाजप्रिय आहेच, सबब वेळप्रसंगी तत्वाला मुरड घालायलादेखील शिकलो आहे.
इन्द्रा
इथे जिवंत माणसांना खायला पुरेसं अन्न नाही आणि मेलेल्यांची काळजी कशाला.. ? पितृपंधरवड्यात शुभकार्य करायचं नाही असं मानतात.. तर.. श्वास तरी का घेतात.. ते तर जगायला आवश्यक असलेलं सगळ्यात महत्वाचं शुभ कार्य आहे.. नाही का?
हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय?
तुम्ही रोज करून घालात तर रोज येतील. :) बाकी पितर बितर वर्षातून एकदा नाही २दा जेवतात. १ ज्या दिवशी गेले त्या तिथिला आणि २ ज्या तिथीला गेले ती तिथी पितृपक्षात. बाकी हॅलोवीन मला रोज करायला आवडतो पण बाकी कोणालाच आवडत नाही. :(
(हॅलोवीनप्रेमी) पेशवे
>>या पंधरवड्यात वास्तूखरेदी, वाहनखरेदी, लग्न, मुंज आदि शुभ कार्ये टाळली जातात...........
मी गेली केत्येक वर्षे मुद्दमच या पंधरवड्यात खरेदी करतो किंवा शुभ कार्ये करतो अजुन तरी माझे काहीही वाईट झाले नाही. मी माझ्या पुर्वजांना अमंगल/अभद्र मानत नाही म्हणुनच मी त्यांना वाळीत टाकत नाही. उलट पक्षी त्यांना माझ्या आनंदात सहभागी करतो. माझ्या आनंदात त्याचा देखिल आनंद नक्कीच असणार. माझे आजी/ आजोबा, पणजी /पणजोबा ई. माझ्या वर जळतील शक्यच नाही.
थत्ते काकांशी १००००००००........% सहमत.
खुळचट कल्पनांना थारा देउ नका. दिवसा भरपुर अंगमेहनत घ्या .झोपताना पाणि प्या ,सैल कपडे घाला व आराम दाई बिछान्यावर झोपा म्हणजे असली स्व्प्न पडत नाहीत (जमल्यास उशाशी एक पुंगी व पेटारा ठेवा )
''आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात'' अशा गोष्टींवर आपला काही विश्वास नाही. पण, आमच्याकडे 'पितृपक्ष' उत्सवात साजरा केला जातो. आमच्या पूर्वजांना काय काय आवडत होते ते आठवून जसे, [बीडी काडी] पान, पेग वगैरे, दाखवून आम्ही तो दिवस इंजॉय करतो. आठवणीत काढतो. या दिवशी आमच्याकडे सर्व प्रकारचे नैवद्य असते. उदा.मासे, मटन,चिकन, पुरण-पोळी, कुरडाया,पापडं,भजी,कढी, आमटी,खीर,वरण-भात, पुर्या, सर्व प्रकारच्या भाज्या काय नी काय असते जेवायला सॉरी नैवद्य दाखवायला....! :)
-दिलीप बिरुटे
इथे बेल्जियम मध्ये पण याच सुमारास अशाच प्रकारच्या रुढी पाळल्या जातात. १५ ऑक्टो ते ३१ या पंधरवाड्यात आपल्या सर्व आप्तेष्टांना ( जिवंत ! ) वॅफल्स खाण्यासाठी बोलावतात. ( चंगळ असते आमची पण ! ) मग १ नोव्हे ला सर्व संत दिवस ! त्यादिवशी सिमिट्रीत जाऊन सर्व पूर्वजांच्या कबरींवर फुलं वहायची आणि वाईन चा नैवेद्य (!) दाखवायचा. म्हणजे सर्वपितरी अमावास्या :)
बाकी या काळात होणार्या कार्यांबद्दल, खरेदी विक्री वगैरे बाबत काही वेगळा अनुभव नाही. माझ्या लग्नाची खरेदी याच काळात केली होती. बाजारात गर्दी कमी असते म्हणून !
शिल्पाताई, बाकी तुम्ही परत आलात हे पाहून आनंद झाला. बरेच दिवस तुमचे फक्त "आवडले", "छान आहे" असेच प्रतिसाद येत होते. तुम्ही परत फार्मात आलात हे बघून बरे वाटले.
भूत जमातींची एका 'रामगोपाल वर्मा' नामक व्यक्तीशी मैत्री आहे, त्यामुळे जर का आपले (म्हणजे सगळ्यांचे ) पितर भूत जमातीतील असतील असे आपल्याला वाटत असेल तर 'त्या' व्यक्तीला घरी बोलून जेवायला घातले कि सर्व भूत जमात संतुष्ट होईल आणि त्यांना कायमची मुक्ती मिळेल.
~~गांधीवादीदेव बाबा ~~
सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला आणणार्या भगिरथाचे पुर्वज किती काळ ताटकळतं बसले होते कोणास ठावुक ? ;)
बाकी या आत्मा बित्मा गोष्टीला अपुन सॉलिट्ट मानतो !!! ( न मानुन रिस्क क्वोन घेणार ? ;) )
काय ते लोक असेल तिथे सुखामंदी असुदे !!! लफडा नको साला !!! ;)
प्रतिक्रिया
माझी आजी पितृपक्षाच्या
मलिदा
+१ असेच म्हणतो. ('मलिदा'
मलिदा
हात्तेच्या!!
हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला
अमसूलाची चटणी हा एक अनवट
चिनी पितृपक्ष
माहीती चांगली आहे .
मला मागच्या आठवड्यात नागाचे
मी देखील असा कार्यकारणभाव
आत्मे ?
होय हे जे दान करतात तेदेखील
किती काळानंतर पुढचा जन्म
आमच्या पितरांनी, महान भारतची
१. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे
आपल्या अमुल्य सल्लाबद्दल
संयम
मिसळपाव वर स्वागत आहे. सवय
रूपक
तत्व पाळणे.
हे पितर बितर फक्त या पंधरा
+१ लोल्स! असेच म्हणतो.
चित्राहूती
आमच्यात फक्त जिवंत
सहमत..
हे पितर बितर फक्त या पंधरा
आपले पुर्वज एवढे अमंगल/अभद्र होते काय ?
पूर्वज अमंगल नव्हते पण आता
जयप्या काहीही लिहीतोस काय
जयपाल..
पितृपक्षानिमित्त सर्व
१+
आपला काही विश्वास नाही
बरं झालं आठवलं..
>>>एकदा यायचंय प्रवरा संगमला.
बिरुटे सर, एकदा 'बसु' आपण!
इथे बेल्जियम मध्ये पण याच
???
<<<मोक्ष म्हणजे काय? जो
शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?)
टोकाचे
आता मेलेल्यांना खाऊ
शिल्पाताई, बाकी तुम्ही परत
पितृपक्षात कावळ्याचं चित्र
चांगली पद्धत आहे.
भुत योनी पापी लोकाना
भूत जमातींची एका 'रामगोपाल
सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला
मीबी मान्तो. मी त्यांच्या