लेख आवडला. हे विश्व चटका लावून जाणारे, अस्वस्थ आहे, हेच खरे. पण असे असतानाही सत्यनारायणादी पूजेसारख्या प्रसंगांवेळी या विश्वात जाणवणारा साधेपणा, पापभीरू/देवभोळेपणा (मनोजच्या आईने तुमच्या (मास्तरांच्या) पाया पडणे, अंबाबाईची ओटी भरा सांगणे इ.) लेखातील वर्णनातूनही जाणवला. तात्यांच्या 'धूपार्तीचा भिक्षुक' या लेखनातूनही असेच काही जाणवले होते.
(अस्वस्थ)बेसनलाडू
पुण्यात कर्वे रस्त्यावर मानव्य म्हणून एक संस्था आहे. ते लोकही अशा मुलांना सांभाळण्याचे काम करतात. लहानपणी शाळेत असताना (बहुदा सातवीत असताना) एखाददोन वेळेला आम्हाला त्यांना भेटायला, त्यांच्याशी खेळायला गेलो होतो.
शिवाजी रस्ता किंवा तिथे कुठेतरी एका बाईंचे (बहुदा विजयाताई) यांचे घर आहे, त्याही असेच काम करतात. तिकडेही गेलो होतो.
त्यापैकी काहींना त्यांची काहीही चूक नसताना एडस् झाला आहे. एकूणच त्या सगळ्यांबद्दल खूप वाईट वाटले आणि तेच विचार डोक्यात सतत राहिल्याने त्यांच्याशी खेळण्यात किंवा इतर चित्रे काढण्यात वगैरे, मनाने पूर्णपणे सहभागी होउ शकलो नाही :(
हे असं वाचल्यावर मनाला त्रास होत राहतो.
तरीही लेख आवडला.
तात्यांचा नुकताच येउन गेलेला लेख आठवला.
तोही आवडला होता.
दोन्ही लेखातलं साम्य म्हणजे पुजेच्यावेळेस राखलेले पावित्र्य!
इतकी मनोभावे पुजा आपल्याला कितीवेळा करणे जमते?
जाता त्यांनी मला ५१ रु. दिले,म्हणाल्या पुढच्या वेळेला कोल्हापूरला जाल तेंव्हा अंबाबाईची ओटी भरा>>>
हे वाक्य फार अस्वस्थ करुन गेलं.
ओटी भरणं हा सवाष्णीनं सवाष्णीला द्यायचा मान(असं म्हणतात). इथं एक वेश्या अंबाबाईची ओटी भरायला सांगत आहे.
कुठला जीव कशावर आशा ठेवून जगंल काय माहीत .
साला हा जोश्या आपला दोस्त आहे ह्याचा नेहमीच अभिमान वाटतो.
अशी कामं करणार्यांबद्दल बोलायला आमच्या दरिद्री शब्दसंग्रहाची कुवतच थिटी पडते.
हा जोश्या काय, तो मनिष काय, प्रसन्नदा काय.....सालं काय काय सोन्यासारखी माणसं भेटवली मला नशिबानं.
येड्यांनो, माझ्यासारख्या माणसाच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही देवदूत आहात रे.
अवांतरः सायबा, रोज भेटायला येणार्या मित्रांमध्ये जो उशीरा येईल त्याला दंड करुन त्या दंडाची रक्कम कुठे वापरली जायची ते नाही सांगितलंत.
दोस्ताहो, हे सगळे मित्रलोक, ठरल्या वेळी भेटायला यायला ज्याला उशीर होईल त्याकडुन दंड वसुल करायचे आणि त्या दंडाचे सग़ळे पैसे एकत्र करुन त्या शिकवणीतल्या मुलांसाठी वह्या-पुस्तकं पेनं वगैरे घेऊन द्यायचे....हे कधी? तर बेकारीच्या काळात.
दोस्ताहो, हे सगळे मित्रलोक, ठरल्या वेळी भेटायला यायला ज्याला उशीर होईल त्याकडुन दंड वसुल करायचे आणि त्या दंडाचे सग़ळे पैसे एकत्र करुन त्या शिकवणीतल्या मुलांसाठी वह्या-पुस्तकं पेनं वगैरे घेऊन द्यायचे....हे कधी? तर बेकारीच्या काळात.
बापरे
दोस्ताहो, हे सगळे मित्रलोक, ठरल्या वेळी भेटायला यायला ज्याला उशीर होईल त्याकडुन दंड वसुल करायचे आणि त्या दंडाचे सग़ळे पैसे एकत्र करुन त्या शिकवणीतल्या मुलांसाठी वह्या-पुस्तकं पेनं वगैरे घेऊन द्यायचे....हे कधी? तर बेकारीच्या काळात.
बेकारीचा काळ सुखाचा ! (बालपणीचा काळ सुखाचाच्या चालीवर) , फार फार शिकवलं त्याकाळानं ! टाईम्स ऑफ इंडिया साठी दारोदार जाउन सर्व्हे आणि मार्केटिंग केलेलं आहे,फोटोफास्ट्मध्ये होतो,काय काय केलं ! त्याकाळात सांभाळलं मित्रांनी आणि आमच्या राजगडानं !
काही झाले तरी हीसुद्धा माणसेच आहेत हे लक्षात ठेवलेच पाहिजे...
५वी ते ७वी माझ्या वर्गात कामाठीपुर्यातली एक मुलगी होती...माझी छान मैत्रीण होती...दोन चार वेळेस तिच्या घरी जाऊन खेळणे वगैरे झाले होते...त्यावेळेस काही काळात नव्हते.
बहुतेक तिच्या घरचे या व्यवसायात नसावेत पण तरीही वातावरण तेच तर होते..तिने पुढे शिक्षण वगैरे घेतले असावे अशी इच्छा..
या विषयावरचे लेखन अस्वस्थ मात्र करते.
अस्वस्थ करणारा अनुभव....! सर्वत्र वाईटच चालले आहे असे दिसते, नेहमी तसेच बोलल्या जाते.
अशावेळी अशा अनुभवांपुढे, अशा कामांपुढे केवळ नतमस्तक व्हावे...!!!!
-दिलीप बिरुटे
जिप्सी,
तुमचा हा अनुभव निश्चितच मोलाचा आहे. असेच अनुभव अजून शेअर करा. कोण जाणे त्यातून कोणाला प्रेरणा मिळेल !
तुमच्या या लेखना मागे सध्या असे काही करायला वेळ मिळत नाही ही टोचणी जाणवली. ती तशीच जागी ठेवा. भविष्यात त्यातून एखादे सत्कार्य नक्की घडेल. :)
तुमच्या लिखाणात एक साधेपणा आहे. त्यात "आपण काही वेगळे केले" किंवा "चला, तुम्हाला एका वेगळ्या जगाची सैर करवतो" असा अभिनिवेश नाही, जो या प्रकारच्या इतर काही लिखाणात आढळतो. चमकदार वाक्यांची पखरण न करता जे काही सांगितले आहे ते "as a matter of fact" या पद्धतीने सांगितले आहे, हे आवडले.
तुम्ही केलेले कार्य, तुमचा अनुभव आणि तुमचे लेखन हे तीनही आवडले. शेवटच्या वाक्यात तुम्ही जे आश्वासन दिले आहे, त्याची वाट आम्ही बघत राहू.
तुम्हाला अहमदनगरचा गिरीश कुलकर्णी माहीत आहे का हो?
हा सुद्धा तुमच्याच सारखाच काम करतोय वेश्यावस्तीतल्या बायका आणि त्यांच्या मुलांसाठी 'स्नेहालय' ही त्याने उभी केलेली संस्था आहे.
मला जालावर काही लिंक्स मिळाल्या त्या पहा
http://il.youtube.com/watch?v=1yuKsEm55_w&feature=related
http://il.youtube.com/watch?v=oi3MfHnOLBA&feature=related
http://il.youtube.com/watch?v=uJztgXloP3M&feature=related
काय बोलू शब्दच नाहीत,
माझा एक मित्र देखील बुधवार पेठेतलाच (नेहरू चौक) राहणारा आहे.
तुम्ही सांगितलेले अनुभव सुद्धा त्याकडून ऐकले आहे. खूप भयानक वाटते ऐकताना.
शब्दच फुटत नाही.
तिकडे आम्ही पाकिस्तान, अतिरेकी, काश्मीर अश्या चर्चा करत असतो, पण समाजाला पुर्वानुपार असलेली हि भळभळीत जखम काय कधी बरी होणार नाय असे दिसत आहे. काय दोष असतो त्या लेकरांचा कि त्यांनी एक वेश्येपोटी जन्म घेतला, त्यांना खेळायला न बागा, ना छान छान कपडे, ना चांगले जेवण, ना चांगले प्रेम. अक्षरशः उकीरड्यावरचे आयुष्य येते त्यांच्या वाटेला. देव सुद्धा का इतका निष्ठुर होतो.
एकदा आमच्या सोसायटीत लहान मुलांचे खेळणे (childern's play park) असल्याने काही गरीब मुले खेळायला आलेली होती, सोसायटीतिल काही (दुष्ट) लोकांना बघून गेले नाही, बाहेर हाकलले त्या बिचार्यांना. म्हणे आपल्या मुलांची संगत बिघडेल. लोक सुद्धा कधी कधी वैरी होतात. वाईट वाटले खूप त्यावेळेस.
ह्या प्रकारचं कार्य करण्याचं धाडस दाखवल्या बद्दल.
ज्ञानयोगीपेंक्षा मला कर्मयोगींना दंडवत करायला आवडतं. आरामात एका ठिकाणी बसून दिवसरात्र मो़क्ष प्राप्ती करता प्रवचन देण्यापेक्षा (आणी ते सुद्धा दुसर्यांनी लिहीलेल्या ग्रंथावर विसंबून) किंवा ऐकण्यापेक्षा अश्या प्रकारची कार्ये करून मोक्ष मिळवीणे केव्हाही उत्तम आणि अशी कार्ये करणारी व्यक्ती हेच माझं आदरस्थान.
सगळ्यांचे आभार !
पण दंडवत्/सलाम घेण्याएवढं माझं काम नाही. चांगल्या कामाला हातभार लावावा एवढ्याच उद्देशानं मी काम करतो.
(बहुतेक)तुकाराम महाराज म्हणतात,
फोडीले भांडार ! धन्याचा तो माल !
मी तो हमाल ! भारवाही !
आपल्या आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळी कामं करत असतात,त्याना आपल्या मदतीची गरज आहे. दुसर्याच्या फाटल्या आभाळाला आपापल्यापरिनं ठिगळं लावायचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो.
समाजाचे हे विदारक सत्य मनाला चटका लावुन जाते.
जिप्सि तुझा अभिमान वाटतो मित्रा.
परंतू, त्यांच्या पुजेचे च्या वेळेस चे जे पावित्र्य दिसले त्यावरुन त्यांच्या मुला मुलींना विशेषतः मुलींना पण शिकवून त्यांना ह्या वस्ती बाहेर त्यांनीच काढावे हे मनापासुन वाटते.
त्या मनोज च्या आइइचय मावशी मुलींना पण शाळेत पाठवत होत्या का ?
बाकी पांढर्पेशातील माझ्यासारखी सामाण्य माणसे फक्त वाईट वाटुन काहीच करत नाही याची पण लाज वाटते आहे. हे ही खरेच ..
असो
त्यांच्या कथे पेक्षा व्यथा मांडल्यास तर जास्त आव्डेल
प्रतिक्षेत
मुलीसुद्धा शाळेत जातात पण प्रमाण फार कमी आहे,त्यांना त्याचं नरकात मात्र संस्था शक्यतो राहू देत नाही,पण पुढं काय ? कोण करणार त्यांच्याशी लग्न ? एकातून अनेक प्रश्न निघतच जातात्,आपण मात्र हतबल ! एक एक कथा अनेक व्यथा उलगडून जाते.
समाज म्हणजे तरी कोण? आपल्यासारखे लोकचं ना? हे पाप आपल्या समाजाचे म्हणजे आपलेच आहे.
आपला पांढरपेशा वर्ग हे हलाहल पचवू शकेल?
प्रतिक्रिया
चटका लावून जाणारे
पुण्यात कर्वे रस्त्यावर
तुम्ही शिकवुन वेळ सत्कारणी
हे असं वाचल्यावर मनाला त्रास
असेच म्हणतो
लेख आवडला.
ऐकिव माहिती..
जोगिया !
_/\_
दोस्ताहो, हे सगळे मित्रलोक,
कधी
अगदी!!
_/\_
आमची बेकारी !
अजून वाचायला आवडेल
+१
चटका!
काही झाले तरी हीसुद्धा माणसेच
तुमच्यासारखी माणसं या समाजात
वेड्यासारखेच म्हणतो..
असेच लिहा
दंडवत...
मास्तरकी आवडली.....!
दंडवत!
माझापण..
सहमत
माझाही सलाम!
जिप्सी, तुमचा हा अनुभव
तुमच्या लिखाणात एक साधेपणा
+१
अगदी अगदी... चमकदार वाक्ये
अगदी
+४
दंडवत,
माझाही दंडवत!
जिप्सीची करणी अन डोळ्यात पाणी!!
सलाम!!
काय बोलू शब्दच नाहीत,
देव सुद्धा का इतका निष्ठुर होतो.
अभिनंदन जिप्सी
खुपच छान!
चटका!
दंडवत
काय सुरेख लिहिले आहे! अगदी
आभार !
हॅट्स ऑफ टु यु.
+१११११
लिहीत रहा
समाजाचे हे विदारक सत्य मनाला
मुलींची शाळा !