✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका (अज्ञात) सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर!

स
सुधीर काळे यांनी
गुरुवार, 09/16/2010 - 20:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51857 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

काळे साहेब !

जिप्सी
गुरुवार, 09/16/2010 - 20:41 नवीन
अगदी सुन्न करून टाकलं तुम्ही !
  • Log in or register to post comments

कविता लै भारी.. धन्यवाद

विसोबा खेचर
Sat, 09/18/2010 - 21:52 नवीन
कविता लै भारी.. धन्यवाद काळेसाहेब.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी

खरेच

गणेशा
गुरुवार, 09/16/2010 - 21:00 नवीन
परिस्थीती मुळे असे मनात भाव आले तर कसे वाटत असेल हे वाचुन .. वाईट वाटले . मुळ कवितेचा आनखिन एक स्वैर अनुवाद करावा असे मनापासुन वाटत आहे. तुम्हाला आवडेल का ? -
  • Log in or register to post comments

वेगळा लेख लिहिलात तर ते जास्त आवडेल

सुधीर काळे
गुरुवार, 09/16/2010 - 21:09 नवीन
कविता माझी नाहींय्. त्यामुळे माझी हरकत असायचा प्रश्नच येत नाहीं. पण वेगळा लेख लिहिलात तर ते जास्त आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लिहितो आहे. माफ करा वेगळा लेक

गणेशा
गुरुवार, 09/16/2010 - 21:41 नवीन
लिहितो आहे. माफ करा वेगळा लेक करणे योगय वाटले नाही, तुमच्या मुळे हे लिखान मिळाले .. स्पर्धा नाही मनातली एक अस्पष्ट तळमळता लिहावी वाटली .. म्हनुन दोन शब्द .. पुढे लिहितो आहे आनखिन .. माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे असे रक्षणात सिमांच्या अखंड सताड उभे आता करुनी मुर्खात गणना माझी त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ? पुरुषात रुपांतर करुनी झाले सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत राहिलो हरवले ते रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ? धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी रक्त सांडलेले तुझ्या पदरी ... पाहतेस का कधी ? माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ? कोठे कसाही असो, ना विचार तेंव्हा वेगळा सज्ज कायम रक्षणास, वेळ येताच प्राणांची आहुती -- अपुर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

तुम्ही छान रूपांतर करताय्. जरूर पूर्ण करा!

सुधीर काळे
गुरुवार, 09/16/2010 - 21:56 नवीन
तुम्ही केलेले कवितेचे रूपांतर आवडले. करा पूर्ण. मी कविता करू शकत नाहीं म्हणून चक्क बाळबोध भाषांतर केले होते. पण तुम्ही छान करताय्. जरूर पूर्ण करा! आणि स्पर्धेचा मुद्दा डोक्यातही नव्हता. धागा भरकटू नये म्हणून मी असे लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एक आन्खिन स्वैर अनुवाद ..

गणेशा
Fri, 09/17/2010 - 15:25 नवीन
माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे आता करुनी मुर्खात गणना माझी त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ? पुरुषात रुपांतर करुनी झाले सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ? धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी रक्त सांडलेले तुझ्या पदरी ... पाहतेस का कधी ? माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ? कोठे कसाही असो, ना विचार तेंव्हा वेगळा सज्ज कायम रक्षणास, वेळ येताच प्राणांची आहुती काळ येता जेंव्हा, अमरत्वाची ग्वाही सामोरा उभा सज्ज मृत्युच्या दारी बोलशील तेंव्हा तू, काय अशी मोठी बात भारी त्यागलेला हा शुल्लक जीव .. पाहतेस का कधी ? खडतर आयुष्य.. आयुष्याची नाती नोंद तुझ्या मनावरी.. आठवतेस का कधी मी गेल्यावर पत्नीच्या कपाळावरील गोंदलेले ओसाड रान .. पाहशील का कधी सांग वाहिलेल्या शुद्र शवाची येव्हडी इच्छा जाणशील का कधी? आशा कोरडी जाणीवतेची ना तू जाणलेली ती ही कधी बेभानलेले माझे तेजरुप पाहताना मरणाची सदैव काळझेप.. पाहतेस का कधी ? नाव हि नसते ठावूक, आपुल्या तान्ह्या बाळाचे बर्फावर विरघळणारे पितृत्व असे .. पाहतेस का कधी ? ना सापडे तडफड पित्याच्या अतिंम श्वासांची नाविक गस्त असे जरी विशाल समुद्रावरी बुलंद आवाज ना माझा एकट्याच्या मीच तो उंच उभा सदैव रक्षणात तुझ्या उन्हा पावसात तू मुक्त बागडताना हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ? मायेच्या रक्षणात सदैव आपण हसण्याचे हेच कारण पुरे आयुष्यभर अन तू बोलतेस जगाशी .. चमकतो भारत आहे देवूनी धोका धारातीर्थ जवानांच्या आत्म्यास सांग चकाकणारे सोंग हे .. तू कधी पर्यंत वठवणार आहे ? तुच्छतेने लिहिले कोणी, अस्तित्व येथले उपहासित हे माझे जगणे .. पाहतेस का कधी ? उभारुन माझ्या जागी, बोलशील का कधी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? ध्वज उंच दिमाखात फडकवण्यास तुझा अजुनही जोखीम प्राणांची घेत आहे प्रश्न परि अनुउत्तरीत माझे .. माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? ---- शब्दमेघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

झकास!

सुधीर काळे
Sat, 09/18/2010 - 08:07 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लेख झकास आहे आणि भावनांना

रन्गराव
Fri, 11/26/2010 - 15:10 नवीन
लेख झकास आहे आणि भावनांना गणेशानं दिलेलं शब्दरूपही सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

कविता मनाला जावून

पारुबाई
गुरुवार, 09/16/2010 - 21:02 नवीन
कविता मनाला जावून भिडते. सैनिकाची व्यथा समजली. पण याला उत्तर काय ? मती कुंठीत झाली आहे.
  • Log in or register to post comments

मी दुव्याच्या स्वरूपात दिलेला तरुण विजय यांच्या लेख कृपया वाचा

सुधीर काळे
गुरुवार, 09/16/2010 - 21:13 नवीन
http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/whose-man-is-that-soldier-fighting-in-kashmir हा लेख कृपया वाचा. त्यात खूप चांगल्या सूचना आहेत. दोन-तीन दिवसांनी मी या दुव्यावर आधारित एक वेगळा धागा सुरू करायच्या विचारात आहे. बघू कितपत जमतंय् ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारुबाई

काळेकाका...

वाटाड्या...
गुरुवार, 09/16/2010 - 21:36 नवीन
सुन्न बिन्न होण्याचे दिवस आता गेले. हा माझा भारत देशच नाही १. ज्या मधे वृद्धांना कोणी विचारत नाही.. २. ज्या मधे चिरीमिरी दिल्याशिवाय अंत्यसंस्कार सुद्धा होत नाहीत... ३. ज्या मधे प्राणार्पण केलेल्या सैनीकांच्या शवपेट्यांचा सुद्धा बाजार होतो, ४. जिथे मरण यातना भोगताना अँब्युलन्सलासुद्धा धावताना जागा मिळु शकत नाही.. ५. जिथे डॉक्टरसुद्धा गोळ्या देताना त्याला मिळणार्‍या कमिशनचा विचार जास्त करतो.... ६. जिथे आजुबाजुच्या परीसरातील ऋग्णांपेक्षा गणपतीच्या समोर स्पिकर भिंतीच्या उंचीची जास्त काळजी केली जाते.. ७. जिथे संसद भवनावर हल्ला करणार्‍यांना मोकळं फिरता येतं... ८. जिथे ८०% जनता भ्रष्टाचारी (अर्थात देशद्रोही) आहे... ९. जिथे देव / वंदनीय थोर प्रभुतींच्या नावाचा उपयोग मतं मिळवण्यासाठी होतो... १०. जिथे ग्रंथालयांवर हल्ले होतात.. ११. जिथे बोबडं बोलायला लागलेल्या चिमुकल्या जीवांवर अत्याचार होतात... १२. जिथे खुनसुद्धा सर्रास पचवले जातात.. १३. जिथे आदिवासांना २ घासालासुद्धा मोताज केलं जातं... १४. जिथे गायकांना sms वर विजयी व्हावं लागतं... १५. जिथे अपघातात मदत करताना सुद्धा आधी पोलिसांचा विचार करावा लागतो.. १६. जिथे जाती पातींवर / आरक्षणाच्या नावावर सर्रास लुटलं जातं... अजुन काय काय लिहु.. ह्याला माझा देश म्हणु मी...?? खरयं, माझा देश असाच तर दिसतो.... - (कोडगा झालेला) वाटाड्या...
  • Log in or register to post comments

हा प्रकल्प हाती घेतला तर 'नैवेद्या'चा 'मिपा'लाच मिळेल!

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 13:22 नवीन
वाटाड्या-जी, तुमची यादी वाचून मीही सुन्न झालो. बरंचसं खरं आहे! एक-दोन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले "Being Indian" हे पुस्तक वाचले आणि मी वेडा झालो. या पुस्तकात आपण भारतीय 'असे' कां आहोत याचा उहापोह केलेला आहे. आपण गद्दारी कां करतो, आपण भ्रष्टाचारी कां आहोत आणि या सर्व 'सद्गुणां'चे समर्थन आपण किती मखलाशीने करतो हेही त्यात दिले आहे. हे पुस्तक प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचायला हवे. श्री. पवनकुमार वर्मा हे भारताचे राजदूत होते व त्यांची सेवानिवृत्तीच्या आधीची पोस्ट सायप्रस येथे होती. तिथे त्यांना खूप मोकळा वेळ मिळाला व त्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांचे एक 'चेले' सध्या जकार्ताच्या भारतीय दूतावासात आहेत व त्यांच्या ओळखीने मी परवानगी मागितली आहे. (कारण त्यांचे थेट Contact details मला मिळाले नाहींत) त्यांची परवानगी मिळाल्यास या पुस्तकाचेही मराठीत भाषांतर करायचा विचार आहे. दु:ख इतकेच आहे कीं माझे हिंदी तितके चांगले नाहीं. नाहीं तर हिंदी भाषांतर जास्त लोकांपर्यंत पोचेल. असो. जरा भरकटलोच! हा प्रकल्प हाती घेतला तर 'नैवेद्या'चा मान 'मिपा'लाच मिळेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

काळेकाका...

वाटाड्या...
Wed, 09/22/2010 - 00:59 नवीन
मी तुम्हाला मदत करु शकतो का त्या पुस्तकाच्या भाषांतरासाठी? काही पाने तर जरुर करुन तुम्हालाच देईन. मला नक्की कळवा. मी उत्सुक आहेच. इतकी चांगली संधी मिळत असेल तर का सोडावी? मलाही इथे अमेरीकेत आल्यापासुन प्रत्येक (मिळालेल्या) भारतीयाचं अवलोकन केल्यावर हाच प्रश्न पडत आलेला आहे... क. लो. अ. - (भाषीक) वाट्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

मी त्या पुस्तकाला मराठीत आणणारच.

सुधीर काळे
गुरुवार, 09/30/2010 - 17:21 नवीन
जरूर! आजच ठाण्यात आलोय् व ४ ऑक्टो.ला जकार्ताला परतेन. त्यानंतर "Being Indian" हा प्रकल्प हातात घेईन. बघू हिंदी कितपत जमते ते!पण मराठीत तरी नक्की आणण्याचा विचार आहे. पण मुख्य प्रश्न हा आहे कीं किती लोकांना त्यांची परखड टीका भावेल! नाहीं तर पुन्हा "Attack the messenger, not the message"चा प्रयोग सुरू होईल आणि 'समंजस'साहेबांना पुन्हा हस्तक्षेप करावा लागेल. पण ते जाऊ दे. मी त्या पुस्तकाला मराठीत आणणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

आम्ही सैनिक

विश्नापा
गुरुवार, 09/16/2010 - 21:41 नवीन
होतो..निराश कधीतरी सैनिकही !!! पण मग गीतेतील पार्थाला दिलेले दिव्यज्ञान ही आठवते.. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं,जित्वा भोक्ष्यसे महिम " आणि नाहीतरी भारत हा क्रुतघ्न लोकांचा देश आहे...
  • Log in or register to post comments

'मही'ला भोगताहेत राजकीय नेते!

सुधीर काळे
गुरुवार, 09/16/2010 - 22:03 नवीन
अहो, त्या बिचार्‍या सैनिकांना कुठे मिळते भोगायला 'मही'? 'मही' भोगताहेत राजकीय नेते! सैनिकांना सांगायला कांहीं तरी उदात्त वगैरे लागतं फक्त तेवढं शोधायचं गीतेत. कांहीं ना कांहीं नक्कीच मिळतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्नापा

असहमती

नितिन थत्ते
गुरुवार, 09/16/2010 - 22:04 नवीन
सैनिकांच्या दृष्टीकोनातून कविता चांगली लिहिली आहे. पण.... सैनिकांची ढाल करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम तरुण विजय यांनी केले आहे. त्याला फार महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही. तरुण विजय यांच्या पक्षाचे सरकार होते तेव्हा "दिल्लीच्या निधर्मी सुलतानशाहीपेक्षा" वेगळ्या स्थितीत सैनिक होते असे मला वाटत नाही. तसेच पुचाट नसलेले, सत्तेची दलाली न करणारे, इंचाइंचाने माघार न घेणारे आणि कर्तव्यदक्ष सरकार असलेल्या इस्रायलच्याही सैनिकाची स्थिती याहून वेगळी नसते. मग "पण तरी आता मनात येतच रहाते..... हे भारतमाते, मी तुझी सेवा अजून कां करतोय्?" असे रूदन कशाला? ही विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याकडून बेजवाबदारपणे सैनिकांना दिलेली चिथावणी समजायची का? देशाची भविष्यातली पिढी घडवायची आहे म्हणून शिक्षक होणारे १-२ टक्केही नसतील तसेच "देशासाठी बलिदान करण्याच्या" इच्छेने सैन्यात दाखल होणारे सैनिक १-२ टक्केही नसतील. तसे असूही नये. सैनिक होण्यात मृत्यू येण्याचा धोका किती आहे (हा १००% नसतो आणि खूप कमी असतो) याचा हिशेब करून त्या धोक्याच्या बदल्यात किती पगार, इतर व्यवसाय करण्याची शक्यता वगैरे विचार करून बहुतेक लोक सैन्यात जात असावेत. (ज्यांचे वडील वगैरे सैन्यात असतील त्यांच्याबाबतीत 'सवयीने/वहिवाटेने' सैन्यात जाण्याची शक्यता अधिक असेल. पण तिथे देशभक्तीपेक्षा रिझनेबल आयुष्य जगता येत असल्याचा प्रत्यक्षानुभव कामी येत असावा). असाच धोका पोलादाच्या कारखान्यात काम करणारे कामगार, उंच इमारतीच्या बाहेरून पाळण्यावर बसून रंग लावणे वगैरे कामे करणारे, यांनाही असतो. धोक्याचे प्रमाण काढले तर ते साधारण सारखेच असेल. सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते. त्याहून जास्त ग्लोरिफिकेशन करू नये.
  • Log in or register to post comments

विषयांतर होऊ नये म्हणून जास्त लिहिण्याचे टाळत आहे!

सुधीर काळे
गुरुवार, 09/16/2010 - 22:26 नवीन
नितिन, तुझे मत वाचले, पण प्रतिक्रिया देण्याइतका Data माझ्याकडे नाहींय्. (म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले मृत्यूचे प्रमाण वगैरे). त्यामुळे विषयांतर होऊ नये म्हणून जास्त लिहिण्याचे टाळत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

विषयांतर नाही

नितिन थत्ते
गुरुवार, 09/16/2010 - 22:47 नवीन
लेखातली भावना 'सिव्हिल सोसायटीला-त्यात विशेषकरून आपल्या देशाच्या सत्ताधार्‍यांना- सैनिकांच्या त्यागाची कदर नसणे' हा आहे. म्हणून काही गोष्टी यथार्थतेने दाखवायची गरज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

या प्रतिसादाला श्री जयंत कुलकर्णी यांनी मुद्देसूद उत्तर दिले आहे

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 07:25 नवीन
या प्रतिसादाला श्री जयंत कुलकर्णी यांनी मुद्देसूद उत्तर दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

विषय तरी काय आहे?

सुनील
गुरुवार, 09/16/2010 - 23:15 नवीन
विषयांतर होऊ नये म्हणून जास्त लिहिण्याचे टाळत आहे विषय तरी काय आहे? तुम्हाला तरुण विजय ह्यांच्या भिकार लेखावर चर्चा करायची असेल तर, आपला आत्ताच पास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

या लेखावर एक वेगळा धागा काढायचा विचार आहे

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 07:26 नवीन
जरूर. या लेखावर एक वेगळा धागा काढायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

शुभेच्छा

सुनील
Fri, 09/17/2010 - 07:41 नवीन
जरूर. या लेखावर एक वेगळा धागा काढायचा विचार आहे. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

काळेकाका ,अत्यंत सुमार कविता

वेताळ
Fri, 09/17/2010 - 18:47 नवीन
असे विचार करणारे सैनिक जर भारतिय सैन्यात असतील तर त्याना ताबडतोब रिटायर्ड करुन घरी बसवले पाहिजे.सैन्यात नोकरी करायला भारत सरकार सक्ती करत नाही किंवा वंशपरंपरेने कोणाला सैन्यात घेतले जात नाही. असल्या फालतु कवितेने टाळ्या मिळतील हे मात्र नक्की.मी बर्‍याच राज्यात सैन्यभरती होताना होणार्‍या गर्दीचे व चेंगराचेगरीचे फोटो पाहतो त्यावेळी तरुणाच्या मनात एकच विचार असतो सैन्यात नोकरी करुन उत्तम पैसा कमावणे व रिटारमेंन्ट नंतर चांगली नोकरी मिळवणे. युध्द काय दररोज होत नसते त्यामुळे मरणाची भिती दररोज असण्याची गरजच काय? तसेच युध्दात मरण पावल्यावर सरकार अश्या सैनिकाच्या कुंटुबाला वार्‍यावर सोडत नाही. कविता वाचल्या असे वाटते सैन्यात भरती होणारा प्रत्येक सैनिक युध्दात मरतो. किंवा जो पर्यत तो सैन्यात आहे तोपर्यत त्याला युध्दभुमीत तैनात केले जाते. त्याला खायलाप्यायला महिन्यातुन एकदाच दिले जाते किंवा त्याला वारंवार टॉर्चर केले जाते.माझ्या नात्यातील जे लोक सैन्यात आहेत किंवा होते त्याच्या अश्या भावना कधीच नव्हत्या. वरील कविता करणारा सैनिक नक्कीच पळपुटा असणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

श्री. वेताळसाहेब, मी फक्त

जयंत कुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 19:52 नवीन
श्री. वेताळसाहेब, मी फक्त जेथे जेथे सैनिकांचा उल्लेख होत आहे तेथेच प्रतिसाद देत आहे , हे कदाचित आपल्या लक्षात आले असेल. असो. पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे की सैनिक हाही एक तुमच्या आमच्या सारखा माणुसच आहे. तोही विचार करतो. तो जो विचार करतो त्यातला सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे आपण का लढतो आहे आणि कोणासाठी लढतो आहोत हा आहे. सरकार सक्ती करत नाही हे अर्धवट सत्य आहे. गरज पडली तर आपल्यालाही सैन्यात भरती करून घेतले जाईल याची खात्री बाळगावी. भरतीच्या वेळी चेंगराचेंगरी व गर्दी होते याचे मुख्य कारण स्पष्ट आहे. पुरवठा व गरज यातील तफावत. त्यातून काही वेगळा अर्थ काढणे चुकिचे ठरेल. सैन्यात जाऊन उत्तम पैसा कमवणे हा उद्देश असू शकेल पण आपण तो सैनिक झाल्यावरच्या बाबींवर विचार करतोय. युध्द रोज होत नाही हे खरे आहे पण चकमकी रोजच होत असतात. मरायला सर्वकष युध्द्च व्हायला पाहिजे असे नाही. युध्दात मरण पावल्यावर सरकार वार्‍यावर सोडत नाही तरीही मला असे म्हणावेसे वाटते की त्या कुटुंबाची वाट लागते ती लागतेच. सगळे काही पैशात मोजता येते नाही. सैनिकांनी बंदूका उलट्या फिरवल्याची उदाहरणे आहेत का ? इतिहासात आहेत. जपानने जेव्हा चीनवर आक्रमण केले तेव्हा असे घडलेले आहे हे विसरू नका. माओने आव्हान केल्यावर सैनिक मागे फिरले आणि त्यांनी त्या बजबजपुरीतील पुढार्‍यांना पहिले खतम केले. पुढचा इतिहास आहे. माओने त्यांना हेच सांगितले होते की अगोदर आपण आपले घर साफ करूया मग जपान्यांकडे बघुयात. त्याप्रमाणेच झाले. सैनिक हा एक शिक्षीत युध्द करणारे यंत्र असते केव्हापर्यंत ? जो पर्यंत त्याला समाजात मान आहे, तो एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित आहे तोपर्यंत. ते नसेल तर काहिही होऊ शकते. म्हणुन सगळ्यांचे हित याच्यातच आहे की आपण आपल्या सैनिकांना मान दिला पाहिजे, त्यांच्या मागे सदैव उभे राहिले पाहिजे. सध्या सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या भरतीत काय होते आहे हे आपण पहातच आहात. जर आपली अर्थव्यवस्था भयंकर वेगाने धाऊ लागली तर भरतीच्या वेळी होणारी गर्दी गायब व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा काय करणार ? जर स्क्ती नको असेल तर तरूणांनी स्वतःहून भरती होण्यासाठी लागणार वातावरण तयार केले पाहिजे. हे शक्य आहे का ? आहे. स्व. शास्त्रींसारखे पंतप्रधानांना हे शक्य होते. पण सध्याच्या मंत्रीमंडळात जेथे गुन्हेगारांची व ४/५ हजार कोटींचा भ्रष्टाचार सहज करणार्‍यांची संख्या मजबूत आहे, ते कुठल्या तोंडाने सैनिकांना सागणार की आमचे संरक्षण करा ? यात भर आहे तत्वहीन राजकारणाची... पण तो माझा विषय नाही.... जाऊदेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

सैनिकाचा व्यवसाय ही एक

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/17/2010 - 13:24 नवीन
सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते. त्याहून जास्त ग्लोरिफिकेशन करू नये.
मला हे विधान खटकले आहे. ... ग्लोरिफिकेशन करू नये हे काही अंशी / काही दृष्टीकोनातून ठीक आहे. म्हणजे एखाद्याचा आपण देव केला की मग चुका काढताच येत नाहीत, किंवा देव केल्यानंतर त्यांच्या समस्यांकडेही डोळेझाक करता येते. म्हणून अति ग्लोरिफिकेशन / दैवतीकरण नको. इथपर्यंत ठीक आहे. पण 'ते करतात ते काय फार ग्रेट नाही / त्यात काय मोठेसे' अशा भावनेतून असेल तर नक्कीच उथळ विधान आहे असे म्हणावे लागेल.
सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते.
या वाक्यातून खरं तर ध्वनित अस होतं आहे की 'सैनिकाचा व्यवसाय ही फक्त एक सामाजिक देवघेव असते.' तसे असल्यास ते ही चूक आहे. केवळ 'जस्ट अनदर प्रोफेशन' या हेतूने हा पेशा स्वीकारणारे खूपच कमी असतात. माझ्या माहितीत काही सैनिक / अधिकारी इत्यादी होते / आहेत. ते जेवढं काम करतात, तडजोडी करतात त्या मानाने त्यांना पैसा मिळत नाही, मान मिळतो पण तो सामान्य जनतेकडून. निवृत्त झाल्यावर 'कोण तुम्ही?'च. तरीही एक काही तरी भावना असते डोक्यात / मस्ती, माज असतो / निष्ठा असते म्हणून लोक हा पेशा पत्करतात आणि निभावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहमत >>सैनिकाचा व्यवसाय ही एक

गांधीवादी
Fri, 09/17/2010 - 13:43 नवीन
सहमत >>सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते. त्याहून जास्त ग्लोरिफिकेशन करू नये. हे असले व्यवसाय करणारे कुठेतरी असतात म्हणूनच आपण रात्री शांत निवांत झोपू शकतो. सैनिके जे घेतात त्याची किमत कदाचित पैश्यात होईलहि, पण ते जे देतात त्याची किंमंत पैश्यात कशी करणार बुवा, आपल्याला जमेल काय ? रिस्क प्रत्येक व्यवसायात आहे पण ती रिस्क ज्याने त्याने केवळ स्वताच्या फायद्यासाठी घेतलेली असते. सैनिके अशी रिस्क स्वताच्या फायद्यासाठी घेतात हे प्रथमच ऐकत आहे. ते रिस्क घेतात लाखो लोकांच्या जीवांसाठी. तुमच्या आमच्यासाठी. हे असले प्रतिसाद मान वर करून लिहिण्यासाठी. >>असाच धोका पोलादाच्या कारखान्यात काम करणारे कामगार, उंच इमारतीच्या बाहेरून पाळण्यावर बसून रंग लावणे वगैरे कामे करणारे, यांनाही असतो. धोक्याचे प्रमाण काढले तर ते साधारण सारखेच असेल. शब्दच खुंटले,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>>पण 'ते करतात ते काय फार

नितिन थत्ते
Fri, 09/17/2010 - 15:02 नवीन
>>पण 'ते करतात ते काय फार ग्रेट नाही / त्यात काय मोठेसे' अशा भावनेतून असेल तर नक्कीच उथळ विधान आहे असे म्हणावे लागेल अशी भावना नाही. उंच इमारतीवर रंग लावणार्‍याला न मिळणार्‍या सोयी सवलती सैनिकांना दिल्या जातात. त्यामुळे जी कृतज्ञता असायला हवी तेवढी समाजात आहेच. पण सैनिकांना कित्ती कित्ती त्रास आणि आपण (म्हणजे आपले सरकार) कित्ती कित्ती करंटे असे भासवून छाती पिटून घ्यायची आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायची गरज नाही इतकेच मला म्हणायचे आहे. सैन्य सैन्य- व्हेरी गुड व्हेरी गुड सरकार सरकार - व्हेरी बॅड व्हेरी बॅड हे सारखे सारखे ऐकण्याचा कंटाळा आला आहे. बाकी लेखाचा खरा उद्देश सैनिकांची ढाल करून आपल्या नावडत्या राज्यकर्त्यांना नावे ठेवणे हाच आहे आणि त्याविषयी आधीच लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मग ठीक. बाकी सैन्य सैन्य-

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/17/2010 - 15:17 नवीन
मग ठीक. बाकी
सैन्य सैन्य- व्हेरी गुड व्हेरी गुड सरकार सरकार - व्हेरी बॅड व्हेरी बॅड
हे दुर्दैवाने बव्हंशी खरे आहे. बव्हंशी म्हणायचे कारण असे की, "देअर इज नथिंग ब्लॅक ऑर व्हाईट, एव्हरीथिंग इज ग्रे, जस्ट द शेड डिफर्स". बास. सरकार, ते कोणाचेही असो, तुमाच्या काँग्रेसचे की अजून कोणाचे, पाहिजे तेवढा मान देत नाहीच. आणि याचे खरे कारण भाप्रसे मधील अधिकारी आणि सैन्याधिकारी यांच्यातील चढाओढ हेच आहे. त्यामुळे सत्तेवर कोणता पक्ष याचा काहीच परिणाम नाही. बाकी वरील लेख / कविता वाचली नाही त्यामुळे त्याबद्दल काहीच भाष्य करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

सुनील
Fri, 09/17/2010 - 15:26 नवीन
बाकी लेखाचा खरा उद्देश सैनिकांची ढाल करून आपल्या नावडत्या राज्यकर्त्यांना नावे ठेवणे हाच आहे आणि त्याविषयी आधीच लिहिले आहे. अगदी हेच! म्हणूनच फक्त कविता दिली असती तर चर्चा वेगळ्या दिशेने गेली असती पण मूळ उद्देश तसा नसावा असे वाटते म्हणून काही तिखट प्रतिसाद आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

//अशी भावना नाही. उंच

जयंत कुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 15:35 नवीन
//अशी भावना नाही. उंच इमारतीवर रंग लावणार्‍याला न मिळणार्‍या सोयी सवलती सैनिकांना दिल्या जातात. त्यामुळे जी कृतज्ञता असायला हवी तेवढी समाजात आहेच.// १ उंच इमारतीवर रंग लावणार्‍या माणसावर खालून, वरून, बाजूने, खालून गोळ्यांचा वर्षाव होत नसतो. ( अर्थात युध्दाच्या वेळी. शांततेच्या काळातही त्यांना exersize करावे लागतात त्यातही खूपच धोका असतो). तुलनेने तर जास्तच. रंग देणार्‍या माणसाने योग्य काळजी घेतली तर तो बरीच वर्षे जगू शकतो. इथे काश्मिरमधे बायकांच्या आडून अतिरेक्याने गोळी घातली की खेळ खतम. २ दुर्दैवाने, कृतज्ञता सोडा, साधा आदरही आपण त्यांना दाखवत नाही. कारण ते विषेश काही करतात हेच आपल्याला मान्य नाही. आहो आपण आपली मुले आपल्यापासून दूर अमेरिकेत राहिली तर त्यांचे काय अमाप कौतुक करतो. यांचे काय? ते काहितरी आपल्यासाठी करताएत, या बद्दल काही वाटण्याचे जाऊदेत, आपण त्यांचे पैसे फेकलेत ना, IT भरून? मग झाले तर असा विचार करणारी असंख्य माणसे भेटली आहेत मला. //पण सैनिकांना कित्ती कित्ती त्रास आणि आपण (म्हणजे आपले सरकार) कित्ती कित्ती करंटे असे भासवून छाती पिटून घ्यायची आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायची गरज नाही इतकेच मला म्हणायचे आहे. सैन्य सैन्य- व्हेरी गुड व्हेरी गुड सरकार सरकार - व्हेरी बॅड व्हेरी ब//// जे खरं आहे ते ऐकून सच्चा माणसाला त्रास होणारच. पण कंटाळा येऊन चालणार नाही कारण ही आपलीच पापे आहेत. शेवट्चे चालूदेत. त्यात मी नाही. त्या राजकारणाच्या घाणीत आमच्या शूर आणि प्रामाणिक सैनिकांना ओढू नका आणि ढकलूही नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बरोबर

सुनील
Fri, 09/17/2010 - 15:59 नवीन
त्या राजकारणाच्या घाणीत आमच्या शूर आणि प्रामाणिक सैनिकांना ओढू नका आणि ढकलूही नका. बरोबर! राजकारण कोण करीत आहे? तरुण विजय यांचा लेख आणि त्यावर आधारीत हा काथ्याकूट हे याचे उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सैनिकी सेवा....

इन्द्र्राज पवार
Sun, 09/19/2010 - 12:17 नवीन
सैनिकी सेवा आणि नागरी सेवा..~~ स्थिती...यावर या संदर्भात चर्चा अपेक्षित आहे....या धाग्याच्या निमित्ताने वा स्वतंत्र धाग्यावर. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

नितिन थत्ते कस व्हाव तुम्चन...आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..........

तन्गो
Fri, 09/17/2010 - 16:08 नवीन
तुम्चया पहिल्याच वाक्यात तुम्हि सैनिकाला धाल केल्याच म्हन्त्लेल आहे. अहो धाल कशालाहि कर्ता येत नस्त. असो...... मुलात तुमचे मत हे पुर्वग्रह्दुशित आहे.पुर्वग्रह हा कि मि देशावर प्रेम कर्नार्या एकहिन सैनिकला पहिले नहिन म्हनुन ते १ ते २ % च लोक असेन अस्तिल कि ते बलिदान कर्न्यासथिन सैनिक झलेन अस्तिल. य्हवर तुम्हिन कहिन सन्शोधन केले आहेन का ??????? का फक्त तुमचन कोमन सेन्स :). कुत्राहिन अनाच्या शोधात रस्ते फिरतो ; अन उन्च उद्दान करनारा ससाना आकाश गवस्तो. आता तुम्हाला ससान्याच्या उदानामध्ये कुत्र्याचे रस्ते फिर्ने दिसत असेल तर मग .. विचार करा बुवा. तुम्चिन सैनिक मान्साकद्दुन अपेक्शा काय आहे कि त्यान्नि बिन्पैशचि चौकिदारि करावि का? आइने मुलाला जन्म घालुन मोथे करन्यातहि तुम्ही देवघेव बघनार का? कि म्हने तिने स्वताहाच्या म्हातारपनाचा इन्तजाम केला असेल कि.... :( घरात बसुन दुसर्याच्या बलिदानाच तोलमाप करन्यापेक्शा एक दिवस ते अयुश्य जगुन बघा/करुन बघा तेच तर हि कविता सग्तेन आहेन पन तुम्हाला ते न दिस्ता जर 'राजकीय पोळी ' वगैरे दिसत असेल तर.............. असो... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जय हो!

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 16:59 नवीन
जय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तन्गो

कविता वाचून अस्वस्थ

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 09/16/2010 - 22:15 नवीन
कविता वाचून अस्वस्थ झालो.. सुधिर रावांच्या धाग्यात काय जादू आहे? ते नेहमी विचार करायला भाग पाडतात ता,क...गणेश कविता छान
  • Log in or register to post comments

आपल्या हृदयाच्या गाभ्यातून आलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 13:07 नवीन
अविनाश-जी, ज्या बातमीने, लेखाने, कवितेने मी खूप प्रभावित होतो, खूष होतो, भारावून जातो किंवा कमालीचा अस्वस्थ होतो त्याबद्दलच मी साधारणपणे इथे लिहितो! आपणही अस्वस्थ झालात त्याअर्थी आपल्या आणि माझ्या स्वभावात कांहींसे साधर्म्य असावे हे नक्की! आपल्या हृदयाच्या गाभ्यातून आलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

सैन्य

सुनील
गुरुवार, 09/16/2010 - 23:01 नवीन
"बाजारास जावे. रास विकत आणावे." ही वाक्ये आहेत शिवाजीने आपल्या सैन्यास लिहिलेल्या पत्रातील. शिवाजी दृष्टा होता. सैन्य रयतेशी कसे वागते, याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण आपल्या सैन्याने तसे वागू नये, ह्याबाबतीत तो दक्ष होता. थोडक्यात, सैन्य कुठल्याही देशाचे असो, ते जनतेवर जुलुम करते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ह्याला अपवाद नाही. हे त्याला ठाऊक होते. * नोव्हेंबर २००४. ठिकाण श्रीनगर. सेनेतील एका अधिकार्‍याने एका दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी आली. दुकाने धडाधड बंद झाली. शहरात कर्फ्यू लागला. रस्तोरस्ती सैनीक दिसू लागले. लष्कराबद्दलचा राग लोकांच्या नजरेत स्पष्ट दिसून येत होता. ही ऐकीव/वाचीव गोष्ट नाही. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. * जवळपास पाच लाख सैन्य (लष्करी + निमलष्करी तुकड्या) गेल्या वीस वर्षांपासून काश्मिरमध्ये आहेत. तरीही लोकांना हे "आपले सैन्य" आहे असे वाटत नसेल, त्यांच्यावर दगडफेक होत असेल तर, केवळ चार-दोन नेते किंवा पाकिस्तानकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही. मूळ दुखणे वेगळेच आहे, हे समजायला हवे. राजकीय प्रश्नाला राजकीय उत्तरच हवे, सैनिकी नव्हे.
  • Log in or register to post comments

राजकीय प्रश्नाला राजकीय

जयंत कुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 00:15 नवीन
राजकीय प्रश्नाला राजकीय उत्तरच हवे, सैनिकी नव्हे. पण राजकारणी घाण करतात, उत्तर काढू शकत नाहीत किंवा काढत नाहीत मग सैनिकांना तेथे मरायला पाठवतात. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. हल्ली तर कशालाही सैन्य पाठवतात. सैनिक तर काही राजकीय उत्तर काढू शकत नाहीत आणि त्यांनी काढूही नाही. नाहीतर पाकिस्तान होणार. आपण राजकारणी निवडणार आणि सैनिकांच्या व्यवसायातील माणसे मारणार. ( In broader sense). कारण दुर्दैवाने ते त्या व्यवसायात आहेत. //"बाजारास जावे. रास विकत आणावे." ही वाक्ये आहेत शिवाजीने आपल्या सैन्यास लिहिलेल्या पत्रातील. शिवाजी दृष्टा होता. सैन्य रयतेशी कसे वागते, याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण आपल्या सैन्याने तसे वागू नये, ह्याबाबतीत तो दक्ष होत//// सैन्यात अजूनही हेच शिकवले जाते. त्यात काही विषेश नाही. खरे तर शिवाजीचाही प्रश्न पूर्णपणे राजकीयच होता. त्याने हे सैन्य इ.इ. उभारायच्या उठाठेवी करायची काही गरजच नव्हती. राजकीय उत्तर सापडले असते की त्याला. जर मनसबदारी स्विकारली असती तर हे पत्र लिहायची त्याच्यावर वेळसुध्दा आली नसती. त्याचा प्रश्न राजकीयच होता हे तुम्हाला श्री नितीन थत्ते यांनी ठरवले तर ते सहज सिध्द करून दाखवू शकतील याची मला खात्री आहे. //सेनेतील एका अधिकार्‍याने एका दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी आली. दुकाने धडाधड बंद झाली. शहरात कर्फ्यू लागला. रस्तोरस्ती सैनीक दिसू लागले. लष्कराबद्दलचा राग लोकांच्या नजरेत स्पष्ट दिसून येत होत//// एखादे उदारहण देऊन त्याचे generalization करणे हे चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हम्म

सुनील
Fri, 09/17/2010 - 07:39 नवीन
पण राजकारणी घाण करतात, उत्तर काढू शकत नाहीत किंवा काढत नाहीत मग सैनिकांना तेथे मरायला पाठवतात. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. हल्ली तर कशालाही सैन्य पाठवतात. सैनिक तर काही राजकीय उत्तर काढू शकत नाहीत आणि त्यांनी काढूही नाही. नाहीतर पाकिस्तान होणार. आपण राजकारणी निवडणार आणि सैनिकांच्या व्यवसायातील माणसे मारणार. ( In broader sense). कारण दुर्दैवाने ते त्या व्यवसायात आहेत. नक्की काय म्हणायचे आहे ते काहीही कळले नाही. सैन्यात अजूनही हेच शिकवले जाते. त्यात काही विषेश नाही किमान साडेतिनशे वर्षांनंतरही अजूनही हेच शिकवले जाते. यातच सर्व काही आले. (तरीही सगळी सैन्ये अजूनही "तेच" करतात) एखादे उदारहण देऊन त्याचे generalization करणे हे चूक आहे. गुगलून पहा. असंख्य उदाहरणे सापडतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

न समजण्यासारखे त्यात काही आहे

जयंत कुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 09:46 नवीन
न समजण्यासारखे त्यात काही आहे असे मला वाटत नाही. किंवा मी ते सांगण्यात कमी पडलो असेन. :-) शिवाजीचे सोडा. अलेक्झांडरपासून तरी हेच शिकवले जात आहे. तरीही सैन्य हेच करत आहे. पण प्रमाण प्रत्येक सैन्यात कमी जास्त आहे. मला सांगण्यास अभिमान वाटतो की भारतीय सैन्यात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि साडेतिनशे वर्षे तेच सैनिक लढत नसल्यामुळे हे वारंवार शिकवत आहेत. थोडक्यात हा त्यांच्या शिक्षणाचाच भाग असतो. एकीकडे त्यांना समाजाचाच भाग समजायचे आणि ते जर इतर समाजातील घटकांसारखे थोडे जरी वागले की त्यांच्याकडून glorious अपेक्षा करायच्या हा दुटप्पीपणा झाला. आपण जर गुगलवर राजकारणी आणि बलात्कार असे गुगलले तर उरलेले आयुष्य आपल्याला ती पाने वाचण्यात घालवावे लागेल ( अतिशोयक्ती केलेली आहे ). एखाद्या लेखात किंवा प्रतिक्रियेत असे isolated वाक्य टाकल्यामुळे त्याचा परिणाम general होतो हे वेगळे सांगायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

???

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 07:44 नवीन
ही ऐकीव/वाचीव गोष्ट नाही. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आवडली...

चिगो
गुरुवार, 09/16/2010 - 23:18 नवीन
छान कविता...
  • Log in or register to post comments

विचार करण्याची वेळ आली आहे

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 07:41 नवीन
पाकिस्तानच्या लष्करशहांनी अमेरिकेकडून War against terror या कारणासाठी ११००कोटी (१.१ अब्ज?) डॉलर्स पाकिस्तानला दिले होते त्यातले ३० टक्के हडप केले असा Nuclear Deception मध्ये उल्लेख आहे. त्यावरून मला नेहमी वाटायचे कीं पाकिस्तानी सैनिकांना वाटत असेल कीं हे वरचे लोक पैसे खातात आणि मरायला मात्र सैनिक. पण ही कविता वाचल्यावर भारतीय सैनिकही असा विचार करतो हे समजून मात्र जरा धक्काच बसला. जयंत कुलकर्णीसाहेब म्हणतात ते पटते कीं हल्ली सैन्य वाटेल तिथे वापरले जात आहे. याबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments

पंजाबमध्ये जे जमले नाहीं ते काश्मीरमध्ये यशस्वीपणे करायचा डाव?

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 07:56 नवीन
चार-दोन नेते किंवा पाकिस्तानकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही. पाकिस्तानचे जाऊ द्या कारण तो तर आपला कट्टर शत्रू बनला आहे. पण हे आपल्या देशाचे नागरिक असलेले चार-दोन नेते देशद्रोही कृती करतात त्यांच्यावर ते "चार-दोन आहेत" तेंव्हांच योग्य ती कृती करून परिस्थिती आटोक्यात आणायला हवी. बोटचेप्या धोरणाने त्यांना मोकाट सोडल्यास धीटपणा वाढतो आणि मग समस्या मोठी होते! काश्मीरला स्वातंत्र्य द्यायचा पर्याय यूनोच्या कुठल्याही ठरावात नाही मग तो पर्याय विचारात कां घ्यायचा? आणि असे स्वातंत्र्य द्यायचे असेल तर "अखंड भारता"तील सगळ्या राज्यांना हे मतस्वातंत्र्य द्यावे काय? त्यात पश्चिमेकडील बलुचिस्तानपासून पूर्वेकडील नागालँड-आसामपर्यंत आणि उत्तरेतील काश्मीर-लेह-लडाखपासून दक्षिणेतील तामिळनाडूपर्यंत सारी राज्ये आणावीत. केवळ एकट्या काश्मीरची स्वातंत्र्याची मागणी घटनाबाह्यच आहे. मला तरी हा पंजाबमध्ये जे जमले नाहीं ते काश्मीरमध्ये यशस्वीपणे करायचा पाकिस्तानचा डाव वाटतो!
  • Log in or register to post comments

काळेसाहेबांशी सहमत आहे. त्या

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/17/2010 - 09:46 नवीन
काळेसाहेबांशी सहमत आहे. त्या न्यायाने स्वतंत्र महाराष्ट्र झालाच पाहीजे ही घोषणा सुधा घटनाबाह्य अथवा देशद्रोहाची ठरू नये. नाही का? त्या प्रकारचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नागालँड वगैरे किती पूर्वीपासून प्रयत्नशील आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

भावना

सहज
Fri, 09/17/2010 - 14:15 नवीन
भावनांना साद घातली की मग जशी व्हायला पाहीजे तशी चर्चा होत नाही. ही फक्त एक कविता म्हणूनच लिहायला पाहीजे होती. "राजकारण विचार समीक्षा" नको. असो. कवितेवरुन आठवले की अविनाश धर्माधीकारी यांच्या कारगीलवरील भाषणात उल्लेख आहे, दोन उदाहरणे की जेव्हा ताबडतोब कामावर रुजू व्हा (कारगील युद्धात सहभागी व्हायला)अ सा दोन सैनिकांना आदेश आला व त्याकरता तिकिटाची व्यवस्था करायला एका स्टेशन मास्टरने पैसे मागीतले व दुसर्‍याला पोलीसांनी काही कारणावरुन अडकवले व जायचे असल्यास पैसे मागीतले. वाईट वाटले. निदान सैन्याने आता तरी अशी विशिष्ट व्यवस्था करायला हवी की असे प्रसंग उद्भवणार नाहीत. २ मिनिट १७ सें पासुन बघणे
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Fri, 09/17/2010 - 14:37 नवीन
भावनांना साद घातली की मग जशी व्हायला पाहीजे तशी चर्चा होत नाही. ही फक्त एक कविता म्हणूनच लिहायला पाहीजे होती. "राजकारण विचार समीक्षा" नको हेच म्हणतो. नुसती कविता दिली असती तर गोष्ट वेगळी पण ते तरुण विजय यांचा लेख इ.इ. ची गरज नव्हती. (आणि त्या लेखावर जर काथ्याकूट टाकलाच तर त्यात ह्या कवितेची गरज नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सैनिकाच्या कवितेत मी राजकारण आणले नव्हते!

सुधीर काळे
Fri, 09/17/2010 - 21:09 नवीन
सुनील-जी, बाकी लेखाचा खरा उद्देश सैनिकांची ढाल करून आपल्या नावडत्या राज्यकर्त्यांना नावे ठेवणे हाच आहे आणि त्याविषयी आधीच लिहिले आहे. असे मुळीच नाहीं. हे गृहीत धरून तुम्ही चूक करत आहात. मी तरुण विजय यांचा परिचय त्यांच्याच वेबसाईटवरून करून दिला. यापेक्षा कांहींही जास्त नाहीं. सोबत दिलेला दुवा फक्त त्या कवितेचा carrier होता व त्या लेखावर वेगळा धागा काढायचा मी विचार करत आहे असे आधीच लिहिले आहे. मला 'भाजपा'चा पुळका अजीबात नाहीं कारण मी कुठल्याही पक्षाचे अंधानुकरण करत नाहीं तर case-by-case evaluation करतो. पण मन मोहन सिंग यांच्यापेक्षा कुणीही बरे असे मला वाटते. त्यांनी सनदी नोकर म्हणून चांगले काम केले, नरसिंह रावांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्र्याचे कामही सुरेख केले, पण ते नेते नसून अनुयायी आहेत असेच माझे मत आहे. याबाबत दुमत होऊ शकेल. भाजपाचे सरकारही चांगले नव्हते असेच मी म्हणेन. त्यावेळी मी भारतात होतो व वाजपेयींच्या (अ)कर्तृत्वाने चिडून मी त्यांनी राजीनामा द्यावा असे लिहिलेले पत्र टाइम्समध्ये छापले गेले होते. ते मी आपल्याला on request पाठवू शकतो. लाल बहादुर शास्त्रींची कारकीर्द फारच अल्पकालीन होती त्यामुळे तिचे मूल्यमापन करणे अवघड आहे. पण त्यांनी कणखर निर्णय घेतला होता यात शंका नाहीं. पण इंदिराजींच्या नंतर आपल्या देशाला नेताच मिळालेला नाहीं ही सत्य परिस्थिती आहे. त्या चांगल्या-वाईट कशा का असोत पण निर्णय घेण्याच्या बाबतीत वाघ होत्या. सध्या सरकार मन मोहन सिंग यांचे आहे. त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून सगळ्यांचे मत घेतले हे योग्यच केले. इथवर सारे ठीक. पण खर्‍या-खुर्‍या नेत्याने सगळ्यांचे ऐकून शेवटी स्वत: निर्णय घ्यायला हवा. "The buck stops here" असे म्हणतात ते यासाठीच! पण मन मोहन सिंग यांनी घेतलेला "सर्वदलीय प्रतिनिधीमंडळ" पाठवायचा निर्णय हा अस्सल 'सनदी नोकारा'चा किंवा passing the buck प्रतीचा निर्णय आहे. या बैठकीनंतर निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची आणि फक्त त्यांचीच होती आणि आहे. पण ती जबाबदारी ते टाळत आहेत असेच मला वाटते. माझी आपल्या सरकारबद्दलची मते कांहींही असोत. पण सैनिकाच्या कवितेत मी राजकारण आणले नव्हते! जनतेला संपूर्ण माहिती नसते हे तर खरेच. पण सरकारचे मूल्यमापन तर जनताच करते व निवडणुकीत मते देते. काँग्रेस सरकार गठ्ठा-मतदानाकडे लक्ष देते आहे असेही मला वाटते. सुनील-जी, तुम्हाला हे माझे मत मान्य नाहीं हे मला माहीत आहे. पण तरीही माझे हेच मत आहे. लगेच मुस्लिम मतपेटीकडे पाहू नका. इथे अनेक गठ्ठा-मतदानाला आकर्षित करणार्‍या पेट्या कसल्या, पेटारेच आहेत. त्यावरून डावपेच चाललेच आहेत. पण त्याबद्दल लिहायची ही जागा नव्हे. इच्छा असेल तर ही मतें मी तुम्हाला 'व्यनी'द्वारा on request पाठवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा