मुस्लिम संस्कृतीत मारलेल्या आईला जिवंत करणारे बाप आहेत का? हिंदू संस्कॄतीत आहेत बॉ. परशुरामाने आईला मारल्यावर नंतर बापाकडून वर मागून घेऊन परत आईला जिवंत करवीले होते. :)
म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली हे सुद्धा खोटे म्हणायचे. म्हणजे रक्ताची तळी सुद्धा खोटीच म्हणायची.
बाकी या चर्चेत मला इंटरेस्ट नाही.तरी तुम्ही इथे परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली असे म्हटले आहेत आणि जेव्हा जेव्हा मी इतर कोणालाही हे विधान करताना ऐकतो तेव्हा तेव्हा मी त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारतो तोच तुम्हाला पण विचारत आहे.
पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय कशी करता येईल? म्हणजे एकदा नि:क्षत्रिय केल्यानंतर सगळे क्षत्रिय संपलेच की! म्हणजे अर्थातच नवे क्षत्रिय जन्माला येणार नाहीत कारण जात/वर्ण जन्मावर अवलंबून असल्याने केवळ क्षत्रियाचाच मुलगा क्षत्रिय बनू शकेल! मुळात क्षत्रिय शिल्लक नसल्यामुळे त्यांची पुढची पिढी यायचा संबंधच नाही! मग दुसऱ्यांदा पृथ्वी नि:क्षत्रिय कशी करता येईल?
आमच्या घराण्याची ब्रम्हचर्याची उज्वल परंपरा आहे माझे पणजोबा ब्रम्हचारी, माझे अजोबा ब्रम्हचारी, माझे वडिल ब्रम्हचारी आणि मी पण ब्रम्हचारी, इतकेच काय तर माझी मुले आणि नातवंडे पण ब्रम्हचारीच असतील हे विधान आणि परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली हे विधान यात नक्की फरक काय?
बाकी चालू द्या.
आमच्या घराण्याची ब्रम्हचर्याची उज्वल परंपरा आहे माझे पणजोबा ब्रम्हचारी, माझे अजोबा ब्रम्हचारी, माझे वडिल ब्रम्हचारी आणि मी पण ब्रम्हचारी, इतकेच काय तर माझी मुले आणि नातवंडे पण ब्रम्हचारीच असतील हे विधान आणि परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली हे विधान यात नक्की फरक काय?
थोडासा विचार केला तर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार बायका युध्दात सैन्यात लढत नसत. पृथ्वी नि:क्षत्रिय केली याचा अर्थ सर्व क्षत्रिय लढवय्ये पुरुष मारले असा आहे. बायकाना ठार मारायचीही पद्धत नव्हती. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत स्त्रिया, मुले, म्हातारे याना मारले आहे. लहान मुले, म्हातारे यांना ठार करायची पद्धत मुसुलमानी आक्रमणानंतर आली. महाभारतातील युध्दाचे नियम वाचले तर याची कल्पना करता येईल. म्हणजे क्ष या वेळेला जगात अस्तित्वात असणारे सर्व लढवय्ये क्षत्रिय सैन्य मारून टाकले. त्यावेळेला त्यांच्या बायका गर्भार असतील, मुले लहान असतील ती मोठी झाल्यावर परत पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे. शिंपल लॉजिक.
बाकी ब्रम्हचारी लॉजिक मी तरी पाहीलेले नाही बॉ.
असे म्हणतात की काही वृद्ध पुरुष, स्त्रिया, लहान मुले कश्यप ऋषींच्या आश्रयाला गेल्यावर त्यांनी परशुरामाचा क्रोध शांत केला. आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊन परशुराम जिंकलेली सर्व भूमी कश्यपाला दान देऊन दक्षिणेकडे म्हणजेच कोकणात येऊन राहिला. कश्यपाने मिळालेली भूमी त्याच्या आश्रयास असलेल्या क्षत्रियांना देऊन पुन्हा राज्य, धर्मव्यवस्था थोडक्यात समाजाची बिघडलेली घडी परत वसवली.
वरिल गोष्टीला "पुरावा नाही" हे सांगणे नलगे.
दशरथादी राजे राणीवशात लपुन बसले त्यामुळे वाचले. जे जीव वाचवण्यासाठी पळुन गेले किंवा स्त्रीवेश धारण करुन जनानखान्यात जाउन लपले त्यांचे क्षात्रतेज नष्ट आले आहे असे मानुन "निक्षत्रीय" ही संज्ञा आली.
दुसरी गोष्ट म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली म्हणजे २१ वेळा क्षत्रियांचा नि:पात करण्यासाठी पृथ्वीप्रदक्षिणा केली. त्यातुनही जे वरील कारणांमुळे वाचले ते नशीबवान.
त्यातही ज्यांचा निर्वंश झाला त्यांच्याकडेही नियोगाचे हत्यार होतेच. म्हणजे परत क्षत्रिय जन्म घेत राहिलेच. फक्त क्षत्रियांचा उन्मत्तपणा नष्ट झाला.
अवांतरः आता बोला की ब्राह्मणांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रचलेले कुंभांड आहे हे म्हणुन.
http://en.wikipedia.org/wiki/Hinglaj_Mata
http://www.shaktipeethas.org/hinglaj-darshan-t180.html
http://bhavsarsamaj.com/history/
एक मंदिर महाराष्ट्रात सुद्धा आहे , पण नक्की ते कुठे आहे ते माहित नाही. नाशिक का कुठे तरी आहे.
अहो गीता म्हणजे "सांगणे"/अर्थबोध करणे... गुरु गीता, गणेश गीता, हंस गीता, यम गीता, शिव गीता, राम गीता... अश्या अनेक गीता आहेत. श्रीकृष्णाने सांगितली तिला भगवत्गीता म्हणतात...
हि माहिती तुम्हाला नव्याने कळणे म्हणजे इतिहास बाहेर येणे ??
(इतिहास प्रेमी) अर्धवटराव
वेड्यात काढू नका,
तो विमानाचा पंखा नाहीये, तो घरातला हवा घेण्याचा पंखा आहे.
विमानाचा पंख असा असतो.
कधि कधि दोन पन असत्यात
एका विमानाच्या पंख्याच्या बजेट मध्ये एक हिंदी चित्रपट होऊ शकतो.अवांतर : बिनापंख्याचे विमान कोणी बघितले आहे काय ?
ते मघाशी संपादक म्हणून हा धागा वाचत होते, त्यामुले त्यांना धाग्यावर करडी नजर ठेवणे भाग होते.
आता सद्ध्या ते फक्त सभासद म्हणून आलेत, सबब धुमाकूळ घालायला मोकळे आहेत.
त्यांच्याकडील असलेल्यागीतेच्या नियमावलीत हेच सांगितले आहे! :)
भगवत्गीतेत श्रीकृष्णाने सूर्य-मनु-विवस्वान (असाच काहिसा ऑर्डर आहे.. मला नक्की आठवत नाहि) अशी गीता ज्ञानाची परंपरा सांगितली आहे. आणि मुख्य म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत नवीन-जुने, पहिला-शेवटचा.. असं काहि नसतं हो. माणसाच्या पिढया बदलतात, संदर्भ बदलतात, साधनं, दृष्टीकोन बदलतो.. ज्ञान तेच राहतं.
(अज्ञानी) अर्धवटराव
प्रतिक्रिया
सहमत आहे. सत्य बाहेर आलेच
अजुन एक प्रश्न.....
पित्याच्या सांगण्यावरुन.
पण का?
हो.
काय? बसते?
सहमत आहे. जाणकार उत्तर देतील.
फरक हा की हिंदु संस्कृती
मुस्लिम संस्कृतीत मारलेल्या
परत जिवंतच करायचे होते तर मारले कशाला ?
कसे काय?
आमच्या घराण्याची
पुपे, उत्तर बरेचसे
असे म्हणतात की काही वृद्ध
धन्स रे नानुस पण ह्या
दशरथादी राजे राणीवशात लपुन
तुम्हीच बघा म्हणजे झाले.
म्हणजे थोडक्यात पृथ्वी नि:क्षत्रिय झालीच नाही.
सापडले देवीचे नाव.
जरा विस्तृत माहिती द्या या
हे घ्या
धन्यवाद. अतिशय बहुमोल माहिती
सहस्त्रार्जुनाचा वध
गीता
बघा बघा... खरा इतिहास बाहेर
इतिहास बाहेर योतोय ??
कृष्णाने अर्जुनाला सांगितली,
अशी किती वेळा गीता कुणी
आमच्या सरमळकर सरांनी एकदा मला
पण ती गीता म्हणजे हीच गीता
कारण ही ती नाही म्हणुन ती ही
कदाचित ह्यातली असेल बॉ!
गीता सांगायच्या काळात
नसते प्रश्न नका बॉ विचारु!
वेड्यात काढू नका,
पंखे अपौरुषेय आहेत.
अरेरे.. इतक्या सिरीयस
ते मघाशी संपादक म्हणून हा
त्यांच्याकडील
अरेच्या!
पण मुळ मुद्दा बाजुलाच राहिला.
पण मुद्द्याला धरुन चर्चा
पुनर्लेखनाच्या कामात तुम्ही
आमाला सुपारी मिळाली आहे.
मला नारळ मिळालाय
गीता रामाने सांगितली,
अष्टावक्रानंही सांगितली
तशी तर आम्हीही गीता
रेवतीताईला गीतापठणाबद्दल बरीच
गीता !!