मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहासाचे पुनर्लेखन

परिकथेतील राजकुमार · · काथ्याकूट
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच. असो.. तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल. आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :- १) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ? २) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ? ३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? ४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही. ५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ? गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ? आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।। आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।। तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।। ५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ? ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.

वाचने 97258 वाचनखूण प्रतिक्रिया 352

"जाळपोळ होइल. अर्धी बामण जमात नष्ट होइल." श्री.मृत्युंजय... २१ व्या शतकातील दुसर्‍या दशकाकडे आपण वाटचाल करीत आहोत जिथे आपणा सर्वांना केवळ विज्ञानाची कास धरूनच पुढे जाणे महत्वाचे वाटले पाहिजे. (चीनचा ड्रॅगन केवळ राजकीय आणि मिलिटरी या दोन भिंतीवरून भारताला मागे टाकण्याचे स्वप्न पाहात नसून त्याला आता चांगलीच समज आली आहे की, आशियाच नव्हे तर युरोप आणि अंकल सॅमचा प्रदेश आपल्या पंजाखाली घ्यायचा असेल तर असलेल्या युवा वर्गाकडून आणि त्यांच्या 'बुद्धीमत्ता' नामक प्रभावी अस्त्राच्या साहाय्यानेच... आणि हा काळ फार लांब नाही हे इथले इंटुक सदस्यही जाणतीलच ~~ वाचा > मिभोंचा ताजा धागा : "बंगलोर/बीजिंग). त्यामुळे जाळपोळीची भाषा किमान आपण तरी चर्चेत घेऊ नये. हा प्रांत (जाळपोळीसारख्या अतिरेकी टोकाचा) ज्यांच्या विचाराचा आहे त्याला खतपाणी न घालणे इतपतच आपल्या हाती असते, शिवाय आपणाला हेही चांगलेच माहिती आहे की, सत्ताधारी असोत वा सत्तेच्या प्रतिक्षेत असोत, त्यांना सातत्याने भेदाचे कोणत्याही प्रश्नाच्या आहुतीने अग्नीकुंड तेवत असलेले हवे असते, त्याशिवाय आपण आपापल्या छाट्यांसाठी काही तरी करतोय हे कसे दाखविता येईल? "बामनां" (हा शब्द तुमचा आहे, लिहायची वेळ आली की मी कायम "ब्राह्मण" असेच लिहिती/टंकतो, कधी 'ब्राम्हण' असेही लिहिलेले नाही...असो.) बद्दल लिहिले म्हणूनच त्याला कुणी विरोध करीत नाही." असे श्री.हुप्प्या म्हणतात (आणि तुम्हाला त्यात तथ्य वाटते).... ठीक आहे....किती आहेत असे लिहिणारे? आणि काय आहे त्यांच्या बुद्धीमत्तेची पातळी? शिवाय कोणत्या हेतूसाठी त्यांनी तसे लिहिले (वा त्यांना लिहिते केले गेले?). एकदोन टुकार पत्रकाच्या आधारे तुम्ही (वैयक्तीक म्हणत नाही) लोक जर समस्त मराठा समाजाला त्या पंक्तीत पाहात असाल तर..माफ करा..पण तुमचे आमच्याबद्दलचे रीडिंग चुकले किंवा गैरसमजुतीचे आहे असे मी विषादाने म्हणतो. तुम्हा दोघानांही (सम विचाराचे आणखीनही बरेच असतील, तर) शक्य झाल्यास कधीतरी पुणे-मुंबई येथील ब्रिगेडच्या कार्यालयात ~ अगर श्री.आ.ह.साळुंखे यांच्याकडे ~ जाण्याचा प्रसंग आला (तुम्ही जाल याची शक्यता धूसर आहे, तरीही म्हणतो...) आणि तेथील पत्रव्यवहार पाहण्याची संधी मिळाली तर तीमध्ये माझ्यासारख्या (समस्त महाराष्ट्रातून ~ आणि दिल्ली, बेळगांव व मध्य प्रदेशातूनही आलेल्या..) विचाराच्या किती मराठ्यांची पत्रे तिथे आहेत ते पाहा/वाचा, अन् पाहिलात तर तुम्हाला कुठेतरी मनाला निश्चित असे एक समाधान मिळेल की, "अरे, आपलेही कुठे चुकते का सर्व मराठ्यांना एकाच विचाराच्या परडीत टाकायला?" माझ्यासारख्या कित्येक मराठ्यांचा धर्म-जातपात याबाबत सावरकर विचारप्रणालीवर गाढ विश्वास आहे. स्वातंत्र्यवीरांनी समस्त हिंदुना ज्या सात बेड्या तोडून टाका असे आवाहन केले होते, त्याचे पालन हिंदू धर्मातील सर्वच घटकांनी केले तरच त्याची गोमटी फळे दिसतील, पण त्यांच्या विचारांना किती ब्राह्मणांचा पाठींबा आहे, हाही संशोधनाचा विषय होईल. आमच्यासारख्या विचारांच्या मूठभर वर्गाकडून वैचारिक मंथनातून तसा वेळोवेळी प्रयत्नही होत असतो, पण होते असे की, एका धनगराच्या ढोलाच्या ताशात बाजुच्या देवळात बसलेल्या दहा सुंदरी वादकांचा आवाज विरून जातो. (तरीही ते वादक आपले वादन चालूच ठेवतात, ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब !) "त्या जातीच्या राजकारणात आता बामणांना काही स्थान उरलेले नाही हे नक्क्की." या प्रश्नाला उत्तर असलेच तर इतकेच की, सत्तेची रुपमती ही कायम माळ घेऊन नव्या उमद्या राजकुमाराच्या शोधात असतेच, फक्त तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती पठारे, किती खंदक ओलांडायला लागतील आणि कसे....याचे सूत्र मांडले आणि ते सोडविण्याचा प्रयत्न केला तर रायडर किचकट वाटणार नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मृत्युन्जय Mon, 09/06/2010 - 14:25
"बामनां" (हा शब्द तुमचा आहे, लिहायची वेळ आली की मी कायम "ब्राह्मण" असेच लिहिती/टंकतो, कधी 'ब्राम्हण' असेही लिहिलेले नाही...असो.) बद्दल लिहिले म्हणूनच त्याला कुणी विरोध करीत नाही." असे श्री.हुप्प्या म्हणतात (आणि तुम्हाला त्यात तथ्य वाटते).... ठीक आहे....किती आहेत असे लिहिणारे? आणि काय आहे त्यांच्या बुद्धीमत्तेची पातळी? शिवाय कोणत्या हेतूसाठी त्यांनी तसे लिहिले (वा त्यांना लिहिते केले गेले?). एकदोन टुकार पत्रकाच्या आधारे तुम्ही (वैयक्तीक म्हणत नाही) लोक जर समस्त मराठा समाजाला त्या पंक्तीत पाहात असाल तर..माफ करा..पण तुमचे आमच्याबद्दलचे रीडिंग चुकले किंवा गैरसमजुतीचे आहे असे मी विषादाने म्हणतो. इन्द्राज साहेब माझा मराठ्यांवर राग नाही. मराठे हे करत आहेत असे तर मला अजिबात म्हणायचे नाही. मी आधीच सांगितले आहे की माझे बरेच मराठा मित्र आहेत आणि अगदी जिवाभावाचे आहेत. सगळ्यात जवळच्या ४ मित्रांपैकी ३ मराठा आहेत. त्यामुळे मराठे असे असतात असे जर मी चुकुन बोलुन गेलो असेन तर माफी असावी. माझा मुद्दा फक्त इतकाच मर्यादित होता की ब्राह्मणांना लक्ष केले जाते कारण त्यांच्यावर आसुड उगारले तरी काही बिघडत नाहीत. मुठभर ब्रिगेडी किंवा इतर जातीयवादी लोकच असे करतात हे तर मी कधीच मान्य केले आहे. इतर धाग्यांमध्ये तसे लिहिलेही आहे. या ब्रिगेडींना फूस लावणारे काही राजकारणी जातीच्या नावावर स्वतःची पोळी भाजुन घेत आहेत हे ही खरे. हे लोक मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत हे तर मी आधीच स्पष्ट केले आहे. बाकी बामन हा शब्द मी वापरला हे मान्य. पण त्याचा उगम कुठे आहे सांगु? माझा अगदी जवळचा मित्र (वरच्या तिघातील) हा उल्लेख करायचा. त्याला शिव्या घालुन घालुन सुधारले. त्याला जेव्हा पहिल्यांदा ही चुक लक्षात आणुन दिली तेव्हा त्याने शांतपणे हे सांगितले की त्याने त्याच्या कुटुंबात नेहेमी हाच शब्द ऐकला आहे आणि त्यामुळे यात काही गैर आहे हेच त्याला माहित नाही. त्याच्या घरी सुद्धा त्याच्याबद्दल कौतुकाने बोलले जाते की भाषा बामणासारखी आहे त्याची. आता बोला. तुम्हाला हा शब्द गैर वाटतो ना? मलाही वाटतो. पण बर्‍याच मराठा कुटुंबातुन सर्रास वापरताना बघितला हा शब्द. आणि असे करताना हे चुकीचे हे बर्‍याच जणांच्या गावीही नव्हते.

In reply to by अवलिया

संपलं नाहीये. काही सदस्यांनी हे संशोधन गांभीर्याने न घेता केवळ टिंगलटवाळी चालवली आहे. त्याबद्दल खेद वाटावा तितका कमीच.

पैसा Mon, 09/06/2010 - 19:52
ते काय अभ्यासक्रमातलं पाठ्यपुस्तक आहे? एवढी गांभीर्यपूर्वक चर्चा सुरू आहे, तर मला माझं ज्ञान वाढवून घ्यायचं आहे ना! म्हणजे पुढच्या चर्चांसाठी ज्ञानाचा राखीव स्टॉक असलेला बरा ना!

"पण बर्‍याच मराठा कुटुंबातुन सर्रास वापरताना बघितला हा शब्द. आणि असे करताना हे चुकीचे हे बर्‍याच जणांच्या गावीही नव्हते." (श्री.मृत्युंजय यांच्या वरील विधानाला उलट उत्तर नव्हे पण एक समंजसपणाचे लक्षण म्हणून त्यांना खरडीने संदेश दिला आहेच, तो त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारला. पण येथे खुल्या मंचावर यावर किमान काही खुलासा देणे गरजेचे वाटत आहे...कारण या संदर्भातील 'एक मराठा कुटुंब सदस्य' म्हणून ते आवश्यकही आहे.) इथे प्रामुख्याने इतिहास आणि समाज संदर्भ आहे तो उच्चारातील स्वर-भिन्नतेचा. शुद्ध उच्चार आणि अशुद्ध उच्चार यावर बर्‍याच ठिकाणी आणि सातत्याने लेखी मौखिक चर्चा होत असतात त्यावर जास्त प्रकाश टाकण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे 'बामन' असा हेटाळणीचा समजला जाणारा उच्चार ज्यावेळी एखाद्या सर्जेराव किंवा सारजेच्या तोंडातून काही निमित्ताने बाहेर पडतो त्यावेळची ती क्रिया सहजपणे झालेली, किंबहुना निरागसतेनेदेखील झालेली असते (म्हणजे आपण तसा उच्चार जाणीवपूर्वक्/सहेतुक केलेला आहे की काय असे त्यांच्या गावीही नसते). खेडेगावात मुद्दामहूनच जर तसे म्हणायचे झाल्यास तर त्या मराठ्यात आणि दुसर्‍या ब्राह्मणात शेतावरील बांध, विहीरीचे पाणी, जनावरांचे आक्रमण या वा तत्सम कारणामुळे वाद झडत असेल तरच. (हे आमच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्रास पाहायला मिळते....भांडभांड भांडतात, आणि संध्याकाळी परत एकत्र.) घरात मात्र सारजाबाई आपल्या अभ्यास न करता दिवसभार उनाडक्या करत फिरणार्‍या सद्याला रात्री थोपटून झोपविताना सांगते, "असं वांडरासारखं हिंडणं आता बास कर राजा...साळंला जा नेमानं...बघं तो बामनाचा रघू कसा छानछन कविता म्हणून दाखवित्योय आपल्या आजीला !!...शिक त्याच्याकडनं काय तरी..." ~~~ इथला 'बामन' असा उच्चार नक्कीच हेटाळणीस्पद वा अपमानस्पद नसून एक प्रकारे त्या जातीला दिलेली कमाईची पावतीच आहे. न्यू यॉर्क येथे अमेरिका ऑनलाईन रेडिओवर काम केलेले पै.अमान मोमीन यांच्या "आम्ही कोल्हापुरी" नावाची धमाल ऑडिओ कॅसेट जर तुम्ही ऐकाल तर त्यात कोल्हापुरातील एक मुस्लिम वकील मुल्ला यांचा किस्सा ते सादर करतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील हे मुल्ला वकील म.गांधीना फार मानत आणि आपल्या समाजातील मुलांना शिक्षणाचे महत्व सांगताना, "वो देखो गांधीबाबा क्या बोलत्ये है हमेशासे की, स्कूलको जावो, शिको, बडे हो जाव | लेकीन तुमी ह्यांच पड्ये रह्तो हो सुबाह से इस्पिटं खेलते रह्त हो सुबासे शाम तक..| अरे ओ बमनोके लडके बडे क्यूं हुये ? शिक्शान, एक बमनका लडका तुम जैसे दस को भारी...क्यूं? शिक्शान !" वकील मुल्ला यांनी उल्लेख केलेला "बमन का लडका" इथे अपमानस्पद नसून तो कौतुकमिश्रीत/आदरार्थी असाच आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मृत्युन्जय Wed, 09/08/2010 - 00:25
इन्द्राज साहेब हा खुलासाही मान्य आहे मला. म्हणुनच मी माझ्या मित्राच्या घरच्यांचे उदाहरण दिले होते. असो. आपण दोघेही जातीयवादी नाही आहोत. आणि ब्रिगेडींच्या स्वार्थी, राजकाराणी आणि अंध विद्वेषी बृत्तीला आपण दोघेही फाट्यावर मारतो एवढेच इथे पुरेसे आहे. उद्या कोणी वायझेड ब्राह्मण अशी ब्रिगेडी वृत्ती दाखवायला लागला तर त्यालाही मी असाच फाट्यावर मारेन याविषयी शंका नसावी. असो माझा मुद्दा वेगळा होता. आणि तो आधीच चर्चा करुन झालेला आहे त्यामुळे परत लिहीत नाही. यापुढे या मुद्द्यावर आपण खव खव खेळु ;)

नरेश धाल Tue, 09/07/2010 - 11:05
परा / आणि बाकी शेकडो प्रतिसाद धारकांना नम्र विनंती, हि करमणूक अशीच चालू ठेवावी. काय आहे, कामातून जरा घटकाभर मनोरंजन होते हो. आणि जर काही विषयांची कमी पडली तर कळवा, हजारो विषय आहेत. फक्त मनोरंजनाचे काम चालू राहूद्या.

नरेश धाल Tue, 09/07/2010 - 11:14
अरे, काय झोपले का काय सगळे ?ओरडा कुणीतरी बामनान विरुद्ध, कोणी मराठ्यां विरुद्ध. अरे चालू करा ना. होऊन जाऊद्या. ते रेडे कसे लढतात एकमेकांशी. अगदी तसेच लढा ना राव. मज्जा येते, लई लई मज्जा.

In reply to by नरेश धाल

पैसा Tue, 09/07/2010 - 11:27
टाईप करायचा कंटाळा आला तर "..." फक्त एवढंच टाईप केलंत तरी चालेल!

नरेश धाल Tue, 09/07/2010 - 11:23
आम्ही सांभाळतो ना कपडे. गेला बाजार, कोण म्हणता मराठी पाशवी नसतात ? मराठ्यांना ब्राम्हणांचा धोका हा मराठ्यांचा अपमान ? मराठे व ब्राम्हण यांच्याशी वर्तन ब्राम्हण नावाचे औषध मराठे ब्राम्हणांच्या लढाईचा समृद्ध ठेवा. माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी ब्राम्हण. शाहीनच्या मांडीवर मराठे दूर देशातली भांडणे आपल्याला दुसर्याची जात आवडते का ? मुंबईतले ब्राम्हण पुण्यात मी ब्राम्हण बिच्चारा सर्वोत्तम मराठी लोक कोणती ? हे असले threads पण काढा ना राव.

In reply to by नरेश धाल

श्री. धाल कृपया समाजाची मनस्थीती बदलु शकण्याची ताकद ठेवणार्‍या ह्या धाग्यावर उगाच अवांतर प्रतिसाद देउ नयेत अशी विनंती. आपण इतिहास पुनर्लेखनास मदत करु शकत नसल्यास हरकत नाही पण निदान विषय भरकटवु नये.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नरेश धाल Tue, 09/07/2010 - 11:58
आणि पर्या, ह्या असल्या छपराड thread नि तुला काय समाजाची मनस्थिती बदलेल असा वाटते का ?

In reply to by अर्धवट

अरेरे.. एखादा माणुस खरा इतीहास सांगायला लागला तर केवढे पेटले लोक..
चालायचेच :) आजकाल लोक उत्तर देता आले नाही की अवांतरावर घसरतात.

नरेश धाल Tue, 09/07/2010 - 11:57
पर्या ने अति महत्वाच्या विषयावर ३०० क्रॉस केल्याने ह्याला हार्दिक अभिनंदन आमच्या मांडला तर्फे त्याचा आनि तमाम परतिसाद धारकान्चा, आमच्या कुन्तन खान्यत सोन्याचा हार देऊन जाहीर सत्कार परया लधते रहो, वोह सुबह जरूर आयेन्गि.

नरेश धाल Tue, 09/07/2010 - 12:44
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? तसेच हे सग्ले देव देविन बरोबर सम्भोग कसे करत होते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? कोन म्हन्त देव ब्रम्हन होते, देव *डिबाज होते. ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. जौ दे न , कय फरक पद्तो. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ? तुअल घलयच तर गह्ल न , नहि तर कुथेतरि तुच (आप्लि काशि )घाल. ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ? फेकुन दे ते इतिहसचे पुस्तक २) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ? त्यना दोनचार बयक मिलल्य अस्ती. त्यसथि केल असेल त्यन्नि. तुल पहिजे का. एक आहे मिपावर. ति शाहिन म्हनुन क कोनतरि, तुल पयिजे काय ? ३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ? कोनच्या खालि गेल्या होत्या का ? ४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही. तु म्रुत्युन्जय लयि मनवर घेतलेल दिस्तया. पुध्च्य निवदनुकिच्य एलिस कधि क इशाय. क सन्सदेत मन्दयचा ५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काड्या सापाचा अपमान केलस कि रे गधड्या. गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ? आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।। आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।। तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।। जे कहि असेल न तुझ्यकदे ते जालुन फेकुन दे. वेद होशिल अशाने तु. ५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ? मि गात नहि ब्बास. बाजीराव *डिबाज होता. झाले समाधान ? ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत. तु बोल्तोस राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. मग त्याच्या अगुदर्च कोन करनार भौ ? दशरथच बाप कोन ? आजोब कोन ? पन्जोब कोन ? किति बायका व्हत्य ? किति उपबायका व्हत्य ? किति थेवाल्या होत्या ? ते हिन्दु/खत्रिय व्हते को मुसुल्मन. अगदि डायनासोर पर्यत्न जौया. उद्या उगवेल. पन आज डोक्यतले खरकाटे काढ आन निट झोपि जा.

मी अगदी खेड्यातला आहे. मी पाहिलं आहे माझ्या लहानपनी , शिवाय काही लोक, सगळेच जानवे घालायचे. नाई ब्राम्हन म्हनुन घेतात नाव्ही स्वाभीमानाने आताही. मी सुतार, लोहार, तेली, सोनार, शिम्पी सगळ्यांना जानवे घातलेलं पाहिलं आहे. माझ्या मते सगळेच हिन्दू जानवे घालु शकतात. माझ्या लहान पनी खेड्यात एकमेकांवर फार प्रेम होतं. आता सारखं नाही. माझ्या आजोबाच्या वाड्यात उन्हाळ्यात सगळे यायचे प्यायचे पाणी भरुन न्यायला आमच्या विहिरिवरुन. आजोबा कधी कुनाला रोकायचे नाही. गावातला प्रत्येक मानुस जाता येताना माझे आजोबा जर बाहेर ओट्यावर बसले असतील तर नमस्कार, शरनार्थ, राम राम म्हनुन पुढे जायचे. फार प्रेम होत. फार आदर होता. मी पाहिलं नाही की आजोबानी कुनाला काही त्रास दिला किंवा माझ्या आजोबाला कुनी काही बोलला कधी ते. शेतात पिकलेलं धान्य घरी आलं की ज्यांना शेत नसायचे ते कोनीही मागायला आले की आजोबा त्यांना द्यायचे. तो काळ फार छान होता. फार प्रेम होतं. पैसा कुनाकडेच नव्हता. सगळा व्यवहार धान्याच्या बदल्यात चालायचा. आता नवीनच वेड्या सारखं खुळ काढायचा प्रयत्न चालु आहे. तो पुर्न चुक आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या परक्रमासमोर कुनाचाही पराक्रम काहीच नाही. त्यांचा गुरु चाणक्य ब्राह्मन होता. त्याला काय करणार? जे खरं ते खरं. मी काय म्हनतो तुम्ही सगळेच ब्राह्मन व्हा ना? त्यात काय आहे? मुंज करुन घ्या. रोज गायत्री मंत्र म्हनायचा १०८ वेळेस. संध्या करायची. देवाची पुजा करायची. जानवे घालयचे. स्चछ्च रहायचे. ब्राह्मन म्हनजे काय? देवाची पुजा केली की आपोआपच हे होतं. स्वामी रामदेव मुसलमानांना प्राणायाम शिकवत आहेत . प्राणायाम ही क्रिया संध्या करतांना ब्राह्मन करायचे रोज. प्राणायामे विनियोग हा म्हनल्या जायचं, तर सगळे हिन्दू का नाही सन्ध्या प्राणायाम करु शकत . बिलकुल करु शकतात. ब्राह्मना मुळे हा देश जिवंत आहे. ब्राह्मना सारखे व्हायचे सोडुन ब्राह्मणांना मातीत घालयचा प्रयत्न केल्यामुळे भारताला वाईट दिवस येत आहेत. पापीस्तान गेला, बंगाल गेला. काश्मीर च्या मागे हात धुवून लागले आहेत. हळू हळू सगळा भारत मुसलमान झाल्यावर मग बसा ब्राह्मन मराठा करत. पापीस्तानात हिन्दू चे काय हाल चालू आहेत ते बघा. तीथे ३५% हिन्दू होते. आता १% रोज मार खात कधी जीव जातो की म्हनत जगत आहेत. ब्राह्मनाला विचारा यावर उपाय. तो सांगेल. ब्राह्मनाला राजकारनात येवू दिले असते तर ही वेळ आली नसती. खरा ब्राह्मन हा देव असतो. देवाला ब्राह्मन सुध्दा म्हनतात. जात पात सोडुन द्या. सगळेच ब्राह्मन व्हा. सावरकर ह्या ब्राह्मनाचे " भारतीय ईतीहासातील सहा सोनेरी पाने "पुस्तक वाचा. नाहीतर हे बघत बसा- http://www.truthtube.tv/play.php?vid=1996

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

नरेश धाल Wed, 09/08/2010 - 10:55
कस्ला दर्दि परतिसद हाय हा !! मला करुन घ्या ना ब्राम्हन. मि उतविळ झालोया मि मागे एक्दा एक मारवाडि पोरिच्या प्रेमात पड्लो होतो. तवा मला मारवाडि व्हावे असे वाट्ले होते. आज ब्राम्हन व्हावे से वाट्त आहे. माझे काय चुकले का ?

In reply to by नरेश धाल

लै दरदी परतिसाद हाय हा. तु ब्राह्नन नाहीस काय? व्हायचय व्हय? करतो कि. उताविळ झालास? मारवाडी पोरगी च्या पिरमात पडला हुतास व्हय? आता कोनाच्या ? म्हशीच्या कि काय? तूला ब्राह्मन व्हायचे व्हय ? मंग तुला गुरु कराव लागल बग. मी तुझा गुरु . मन्जूर? आता तू मुसलमान पोरीच्या पीरमात पड. तीला पहीले हिन्दू कर. मंग तूला आपुन कि नाय बरामन करु बग. मागे एकदा मारवाडी पोरीच्या प्रेमात. आज ब्राह्मन व्हावे वाटत आहे. उद्या भलतं सलतं काही करुन मार खावून जेल मधे जावे लागेल असे करु नकोस. पीरमात पडलो हुतो !!

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

अर्धवट Wed, 09/08/2010 - 13:02
वा वा.. जोरात आगमन आहे की.. चालुद्या कुळकर्णी.. स्वगत - काहि दिवसांनी "प्रभाकर कांबळेचं काय झालं" असा धागा निघतोय बहुतेक

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

नरेश धाल Wed, 09/08/2010 - 13:27
तु बरामन असुच शक्कत नाय तुझ सुदलेखन खुप खराब हाय तु माया येर् -यात कारु नगस. पिरिमत पडाया मुसलमान पोर्गि कुठुन शोधु सान्ग ना गुरु ? तु मेरा गुरु , अब हो जा शुरु.

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

पापीस्तान गेला, बंगाल गेला. काश्मीर च्या मागे हात धुवून लागले आहेत........ ब्राह्मनाला राजकारनात येवू दिले असते तर ही वेळ आली नसती.
काश्मीरात १/३ भागाचे "उदक सोडणारे", "बोटचेपे", "बाळबोध सरकारचे नेते" पंडित नेहरू पण ब्राम्हणच होते की हो!!! आणि तरीपण तुम्ही हे वर बोलता?

बबु Sun, 09/12/2010 - 16:21
ज्ञानेश्वरी वाचल्यास आपणास इतके असंख्य संदर्भ मिळतील की, केवळ कलशाध्याय असलेल्या १८व्या अध्यायातील तीन ओव्यांच्या आधारे " ज्ञानेश्वरी म्हणजे निव्रुत्तीनाथांची गीता प्रवचने " हा नित्कर्ष आपणास बिनबुडाचा वाटेल. १. ज्ञानेश्वरीच्या अनेक अध्यायात गुरुस्तवन आहे. त्यात स्वताला निवृत्तिदास म्हणवले आहे. उदाहरणार्थ : देवा तुचि गणेशु I सकल मतिप्रकाशुI म्हणे निवृत्तिदासु I अवधारिजो जी II (अ.१/ २) 2.तें बुद्धिही न कळितां सांकडेंI म्हणऊनि बोलीं विपाये सांपडे I परि निवृत्तिकृपादीपउजियेडें I देखेन मी (अ.६/३२) या निमित्तानेका होइना एकदा ज्ञानेश्वरी वाचा.

पिलीयन रायडर Tue, 03/29/2011 - 12:25
असे धागे निघु शकतात??? जाती पाती वरुन एकमे़कावर अशी चिखलफेक ??? माणूस जन्माने नाही तर सन्स्कारानी त्या- त्या जातीचा होतो... हे आपल्या हातात नव्हता की काय बनायच.... तुम्ही तुमची जात सोडुन सगळ्या जाती "हलकट" असा कसा ठरवु शकता? रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, वेद,पुराण ह्या विषयी बोलण्या साठी तुमचा अभ्यास किती?? इतिहास लिहीण ही काय तुम्हाला गम्मत वाटते? मुळात ती तुमची पात्रता नाही... हे तुम्हीच तुमच्या लिखाणातुन दाखवुन दिले आहे.. आणि जर खरच असा काही करण्याची ईच्छा असेल तर पहिल्यन्दा ब्राह्मण द्वेष सोडा.. सत्य शोधण्याची आस असावी... द्वेष भावना नाही.. तुम्हाला काय लिहायला आवडेल इतिहासात हे महत्वाच नाही... जे सत्य आपोआप उलगडेल ते महत्वाच... आणि सत्य हे कोणत्याही जातीला बान्धील नसत... पुर्वज कसे वागले ह्यावर आज ब्राह्मण काहीही करु शकत नाहित... आणि दुसर्या च्या जातीचा द्वेष करा असा ब्राह्मणाच्या घरात शिकवीत नाहीत... आपण जे काही लिहिल आहे ते वाचुन आपली कीव आली........ "अभ्यास करुन बोलायला शिका"