इतिहासाचे पुनर्लेखन
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
वाचने
97258
वाचनखूण
प्रतिक्रिया
352
जाळपोळीचा मुद्दा
In reply to जाळपोळीचा मुद्दा by इन्द्र्राज पवार
"बामनां" (हा शब्द तुमचा आहे,
हुश्श्..... संपलं वाटतं
In reply to हुश्श्..... संपलं वाटतं by अवलिया
संपलं नाहीये. काही सदस्यांनी
In reply to हुश्श्..... संपलं वाटतं by अवलिया
संशोधन फक्त सुरु झालंय हो,
क्काय ते?
In reply to क्काय ते? by पैसा
घ्या.. अख्खं रामायण झाल्यावर
In reply to घ्या.. अख्खं रामायण झाल्यावर by अवलिया
विसरले!
In reply to विसरले! by पैसा
फक्त प्रतिक्रिया देत जा !
वाचू नका?
उच्चाराची महती
In reply to उच्चाराची महती by इन्द्र्राज पवार
इन्द्राज साहेब हा खुलासाही
फक्त मनोरंजनाचे काम चालू राहूद्या.
होऊन जाऊद्या. ते रेडे कसे लढतात एकमेकांशी
In reply to होऊन जाऊद्या. ते रेडे कसे लढतात एकमेकांशी by नरेश धाल
३००
In reply to ३०० by पैसा
mayind blowing
In reply to mayind blowing by नरेश धाल
...
In reply to ... by पैसा
लयिच मइन्द ब्लोविन्ग परतिसद
हे असले threads पण काढा ना राव.
In reply to हे असले threads पण काढा ना राव. by नरेश धाल
श्री. धाल कृपया समाजाची
In reply to श्री. धाल कृपया समाजाची by परिकथेतील राजकुमार
तुला दोस्कू हाय का नाय,
In reply to श्री. धाल कृपया समाजाची by परिकथेतील राजकुमार
आणि पर्या, ह्या असल्या छापारड
अरेरे.. एखादा माणुस खरा
In reply to अरेरे.. एखादा माणुस खरा by अर्धवट
अरेरे.. एखादा माणुस खरा
ok , nau इंजन started
३००
आमच्या मांडला तर्फे त्याचा आमच्या चौकात सोन्याचा हार देऊन जाहीर
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते
जानवे
In reply to जानवे by प्रभाकर कुळ्कर्णी
. माझे काय चुकले का ?
In reply to . माझे काय चुकले का ? by नरेश धाल
धाल
In reply to धाल by प्रभाकर कुळ्कर्णी
वा वा.. जोरात आगमन आहे की..
In reply to वा वा.. जोरात आगमन आहे की.. by अर्धवट
हॅहॅहॅहॅहॅहॅ. आगमनापुर्वीचा
In reply to धाल by प्रभाकर कुळ्कर्णी
तु बरामन असुच शक्कत नाय तुझ
In reply to जानवे by प्रभाकर कुळ्कर्णी
पंडित नेहरू
पर्या ५०० गाठायच का ? तु
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
ज्ञानेश्वरीवरील आक्षेप
प्रिय परा, इतिहासाचे
कुठवर आलं पुनर्लेखनाचे कार्य?
संख्या
अरेरे......
फर्मास
छानच मुद्
(No subject)
(No subject)