कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार - ४था व अंतिम भाग
या आधीच्या तीन भागांत मी कव्वाली या गायनप्रक्राराची ओळख, सार्वजनिक मैफिलींमधील धार्मिक कव्वाल्या आणि १९५५ ते १९७५ या कालावधीतील हिंदी चित्रपटांमधील कव्वाल्या यांची माहिती दिली होती. या चवथ्या आणि शेवटच्या भागात वळूया (प्रामुख्याने *) १९७६ ते २००५ या कालावधीतील चित्रपटांतील काही गाजलेल्या कव्वाल्यांकडे.
या आधी लिहिल्याप्रमाणे मी ही लेखमाला लिहिण्याचा घाट घातला तो केवळ मला आवडलेल्या आणि आता लक्षात असलेल्या कव्वाल्यांची यादी तुमच्या बरोबर share करण्याच्या स्वान्त-सुखासाठी, पण माझ्या सुदैवाने तुम्ही वाचक लोकही मी नमूद करायला विसरलेल्या आणि आपापल्या आवडत्या अशा अनेक कव्वाल्या इथे पुरवून एक ऑनलाईन मेहेफिल-ए-समाच निर्माण करत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद!
या भागात तसंच आधीच्या भागांत यापुढेही आठवेल तशी भर घालत चला, आपल्या सक्रिय सहभागाबद्दल मन:पूर्वक आभार!
* या आधीच्या भागात एक १९७३ ची गाजलेली कव्वाली टाकायची राहून गेली, ती इथे सुरुवातीला देतो आणि मग सुरु करुयात १९७६ पासून पुढे:
"मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती"
१९७३ चा हा चित्रपट होता 'गर्म हवा'. बलराज सहानी यांची बहुधा सर्वोत्तम भूमिका असणारा, फाळणीनंतर भारतात राहणे पसंत करणार्या मुसलमान कुटुंबाची ही सुंदर कथा. कव्वाली गायन आणि संगीत होतं अझीझ अहम्मद खान वारसी यांचं, तर शायर आहेत कैफ़ी आज़मी:
जितनी बलाएं आई, सबको गले लगाया
खूं हो गया कलेजा शिकवा ना लब पे आया
हर दर्द हमने अपना अपने से भी छुपाया
तुमसे नहीं है कोई पर्दा सलीम चिश्ती
मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती
अझीझ अहम्मद खान वारसी यांचे दोन नातू 'वारसी ब्रदर्स' यांनी गायलेली हीच कव्वाली इथे ऐकायला मिळेल.
पुढे सरकूया १९७६ च्या दो खिलाडी या चित्रपटातील कव्वाल जानी बाबू यांनी गायलेल्या, गौहर कानपूरी यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार उषा खन्ना यांनी संगीतसाजाने सजवलेल्या 'रात अभी बाकी है, बात अभी बाकी है' या कव्वालीने.
चित्रपटातील या कव्वालीचा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल.
यानंतरची कव्वाली आहे १९७७ साली आलेल्या आणि तुफान गाजलेल्या हम किसीसे कम नही या चित्रपटातली. है अगर दुष्मन जमाना गम नही. (ही कव्वाली तिसर्या भागाच्या प्रतिसादात 'प्रभो' यांनी दिली होती, पण ती या कालखंडातली आहे म्हणून इथे परत देतो आहे.) ऋषीकपूर आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेली ही कव्वाली लिहिली होती मजरूह सुलतानपुरी यांनी, गायलीय महंमद रफी आणि आशा भोसले यांनी संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
याच वर्षी (१९७७) आला आणखी एक मल्टी-स्टार चित्रपट, 'अमर, अकबर, अँथनी'. पुन्हा एकदा ऋषी कपूर (या वेळी नीतू सिंग बरोबर), गायक कलाकार पुन्हा रफी आणि आशा, गीतकार होते आनंद बक्षी, आणि संगीत होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं.
याच चित्रपटातील ''शिर्डी वाले साई बाबा' ही कव्वाली देखील खुप गाजली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रफी
१९७७ सालीच वरील दोन प्रसिद्ध चित्रपटांच्या महापुरात वाहून गेलेला एक चित्रपट होता 'चरणदास'. पाहुणे कलाकार अमिताभ आणि धर्मेन्द्र यांनी सादर केलेली 'देख लो इष्क़ का मर्तबा देख़ लो' ही कव्वाली मात्र खूप गाजली. अमिताभ साठी आवाज दिला होता येसूदास यांनी तर धर्मेन्द्रासाठी पार्श्वगायन होतं अझीझ नाझायांचं. गीतकार राजेन्द्र कृष्ण आणि संगीतकार राजेश रोशन
मग १९७८ साली आला श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला शशी कपूर चा 'जूनून' हा चित्रपट. चित्रपट सुरु होतो तोच मुळी या कव्वाली पासून.
तन मेरा मन पियु का, दोनों हो गए इक रंग
लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल
लाली देखन मै चली तो मै भी हो गयी लाल..........
मूळ अमीर खुस्रो यांनी लिहिलेल्या या कव्वालीचे इथे गायक आहेत जमील अहम्मद, आणि संगीत आहे वनराज भाटिया यांचं.
आज रंग है, मेरे मेहेबुब के घर रंग है
सुरुवातीचं निवेदन करणारा आवाज कुणाचा आहे ते तुम्ही ओळखालच!
१९८० साली आला 'द बर्निंग ट्रेन'. जीतेन्द्र, नीतू सिंग, आशा सचदेव आणि राजेन्द्र नाथ यांच्या वर चित्रीत असलेली 'पल दो पल का साथ हमारा' ही कव्वाली भरपूर गाजली. गायली होती रफी आणि आशा भोसले यांनी. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार राहुल देव बर्मन.
नंतर १९८२ मध्ये आला दीदार-ए-यार, या चित्रपटात ऋषी कपूर आणि जीतेंद्र बरोबर होत्या टिना मुनीम आणि रीना रॉय.
'गुरूर-ए-हुस्न के सदके मुहब्बत यूं नही करते'
आशा भोसले आणि महंमद रफी यांनी गायलेल्या या कव्वालीचे संगीतकार होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल.
१९९७ साली आला 'और प्यार हो गया' हा चित्रपट. नुसरत फतेह अली खान यांनी स्वतः संगीत दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट (आणि त्यांच्या हयातीतला शेवटचा! याच वर्षी त्यांचं निधन झालं.) 'कोई जाने, कोई ना जाने' ही कव्वाली चित्रपटात त्यांच्यावरच चित्रीत आहे. सोबतीला आवाज होते आशा भोसले आणि उदित नारायण यांचे. या चित्रपटातील कलाकार होते ऐश्वर्या राय आणि बॉबी देओल.
१९९९ साली 'कच्चे धागे' या सैफ अली खान, अजय देवगण, नम्रता शिरोडकर आणि मनीषा कोईराला यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटातील 'इस शाने करम का क्या कहेना' कव्वालीला पार्श्वगायन आणि संगीत दिग्दर्शन होतं नुसरत फतेह अलींचं, या दोन्ही कामगिर्या असलेला हा त्यांच्या निधनानंतर आलेला पहिला चित्रपट.
नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला तिसरा चित्रपट याच वर्षी आला, १९९९ चा सनी देओल, बॉबी देओल, सुष्मिता मुखर्जी आणि उर्मिला मातोंडकर यांनी अभिनीत केलेला 'दिल्लगी'. कव्वाली होती 'साया भी साथ जब छोड जाये, ऐसी है तनहाई', संगीत शंकर-एहसान-लॉय किंवा जतीन ललित यांचं असावं (या चित्रपटाला चक्क ५ संगीतकार होते!)
शतक संपता संपता २००० साली आला 'धडकन'. नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला हा अखेरचा चित्रपट. शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील 'दुल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है' ही बर्यापैकी गाजलेली कव्वाली संगीतबद्द केली होती जतीन-ललित यांनी तर लिहिली होती 'समीर' यांनी.
२००० सालीच आला हृतिक रोशन, करिश्मा कपूर आणि जया भादुरी यांचा ''फिजा'.
कादर ग़ुलाम मुश्ताफा, मुर्तजा ग़ुलाम मुश्ताफा, श्रीनिवास यांनी गायलेली 'पिया हाजी अली' ही कव्वाली संगीतबद्द केली होती ए आर रहेमान यांनी, तर शब्द होते शौकत अली यांचे.
२००२ साली आला चित्रपट 'ये दिल है आशिकाना'. अरुण बक्षी आणि जीविधा या नवोदित कलाकारांना घेउन काढलेला, चित्रपट चालल्याचं आठवत नाही, त्यामुळे एक चांगली कव्वालीही दुर्लक्षित राहिली. यातील 'अल्ला अल्ला तारीफ तेरी अल्ला अल्ला' या साब्री ब्रदर्स नी गायलेल्या कव्वालीचे शब्द होते तौसिफ अख्तर यांचे अणि संगीत होतं नदीम-श्रवण यांचं.
२००३ साली आलेल्या 'हजारों ख्वाइशे ऐसी' या चित्रपटात होती 'मन ये बावरा, तुझ बिन माने ना' ही लयबद्द कव्वाली. अतिशय 'intense' अशा या चित्रपटातील कलाकार होते के. के. मेनन आणि चित्रांगदा सिंग, कव्वाली गायक होते स्वानंद किरकिरे आणि अजय धिंग्रन, गीतकार पुष्पा पटेल आणि संगीतकार शंतनु मोइत्र.
हा २००४ पर्यंतच्या भारतात गाजलेल्या कव्वालींचा उण्या-पुऱ्या पन्नास वर्षांचा प्रवास इथे संपवतोय तो 'मै हुं ना' या शाहरुख खान-सुष्मिता सेन, ज़ायेद खान- अमृता राव अभिनीत चित्रपटातील 'तुम से मिल के दिल का है जो हाल क्या कहें' या कव्वालीने, गायक कलाकार होते सोनू निगम बरोबर आफताब आणि हाशिम हें साब्री बंधू, गीतकार जावेद अख्तर आणि संगीत होतं अन्नू मलिक यांचं.
तर या पन्नास वर्षांमधल्या प्रवासात कव्वालीत काय स्थित्यंतरं घडली?
निदान भारतात तरी, 'मेहेफिल-ए-समा' या कव्वाल आणि श्रोते यांच्यामधील थेट आदान-प्रदान होण्याच्या प्रकारापासून दूर सरकून कव्वाली चित्रपटांमध्ये जाऊन 'प्रेक्षणीय' आधिक झाली. याचा परिणाम थोडासा असा झाला की आधी कव्वालांना श्रोत्यांची दाद मिळण्याचं जे instant gratification होतं, त्याची जागा घेतली कव्वालीमुळे आधिक प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या यशाने.
दुसरा परिणाम असा झाला की चित्रपट हे माध्यम हिंदी समजणार्या प्रेक्षकांचं आधिक असल्याने उर्दू शब्दांची पखरण कमी होऊन कव्वालीचं 'हिंदी-करण' झालं (उदाहरणः शिर्डी वाले साई बाबा). यात बिघडलं काही नाही, पण नजाकत नक्कीच कमी झाली.
तिसरी गोष्ट, चित्रपटांत येऊन कव्वाल्या 'सुंदर आणि दिलखेचक' दिसणं आणि 'धुंद' करणारा ठेका असणं यांकडे आधिक भर असल्याने, कव्वाल्यांमधील शब्दांना दुय्यम महत्व आलं
१९८० च्या दशकानंतर एक आणखी सहज जाणवणारं स्थित्यंतर म्हणजे कव्वाली धर्माविषयी कमी आणि प्रियकर-प्रेयसी यांच्या भावनांविषयी आधिक बोलू लागली.
आणि शेवटचा मला तरी जाणवणारा (आता यात माझं सध्याच्या चित्रपटांविषयीचं अज्ञान असण्याचा ऩक्कीच संभव आहे) मुद्दा असा, की २००५ पासून आजतागायत मला चित्रपटांमध्ये (दमदार, लक्षणीय सोडाच) एकही कव्वाली आढळलेली नाही. (I sincerely hope I am wrong here, and if you know of them, do please update and add links to good qawwalis since 2005.)
हे सर्व जरी असलं, तरीही एक सत्य शिल्लक राहतंच: सुफी परंपरेतून कव्वाली जन्माला आली, आणि सहिष्णुता (इथे मला 'inclusive non-discrimination' हा अर्थ अभिप्रेत आहे, त्यावरून वाद नकोत) हा जिचा पाया आहे अशा सुफी परंपरेने कव्वालीच्या माध्यमातून हिंदू कीर्तन, अरेबियन आणि पर्शियन उक्ते या सर्वांना सामावून घेत वाटचाल केली, संगीत हे अखेर एकतेची आणि दिव्यत्वाची जाणीव करून देण्यासाठी असतं हा या प्रवासाचा पाया होता. कव्वालीने काळाबरोबर बदलावं, आणि कपडे, रंग, भाषा, नव-नवीन वाद्यं यांना अंगीकारून पुढे सरकावं, असा लवचिकपणा (flexibility) ठेवला. प्रत्येक बदलाबरोबर नव्या पीढीला सामावून घेत पुढे सरकत राहण्याची जिद्द ठेवली. असा हा सुंदर, उत्कट गायनप्रकार बदलत्या जगरहाटीत मागे पडून विस्मृतीत जाऊ नये. सर्वांनी गुण्या-गोविंदाने एकत्र, एकमेकांना सांभाळून रहावं अशी आजची आत्यंतिक गरज आहे, कव्वाली त्यात महत्वाचा सहभाग घेऊ शकेल, म्हणून पूर्वी-इतक्याच दमदार कव्वाल्या जन्माला येत रहाव्यात असं मनापासून वाटतं.
पुन्हा एकदा, सर्व वाचकांच्या सहभागाबद्दल, प्रतिसादांबद्दल आणि व्यक्तिगत निरोपांमधून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
वाचने
11709
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
मस्त , खूप छान झालाय हाही भाग
In reply to मस्त , खूप छान झालाय हाही भाग by पुष्करिणी
२००५: मंगल पांडे
मस्तच! आधुनिक काळातील एक
In reply to मस्तच! आधुनिक काळातील एक by मेघवेडा
एकदम मान्य! २००५: बंटी और बबली
बहुगुणी मस्त आढावा घेतलाय
In reply to बहुगुणी मस्त आढावा घेतलाय by गणपा
होय, हा अखेरचा भाग आहे.
फारच छान! तुमची ओघवती शैली
In reply to फारच छान! तुमची ओघवती शैली by आमोद शिंदे
जयभिम शिंसे साहेब, चक्क कौतुक
छान
In reply to छान by सुनील
हेच म्हणतो
मस्त मालिका
उत्कृष्ट !
In reply to उत्कृष्ट ! by दिपोटी
धन्यवाद!...
मस्त लेखमालिका, पण ती संपणार
अप्रतिम... इथे एक गाणं द्याव
पाहिलं होतं, आवडलंही,
चांगली लेख मालीका
ख्वाजा मेरे ख्वाजा ??
In reply to ख्वाजा मेरे ख्वाजा ?? by आवडाबाई
>>एक शंका - सलाम्-ए-इष्क
विकास, आवडाबाई आणि गणपा...
In reply to विकास, आवडाबाई आणि गणपा... by बहुगुणी
देवदास ( शहारूख्-ऐश्वर्या )
ह्म्म! That's a tough one!
हाही भाग अतिसुंदर...
In reply to हाही भाग अतिसुंदर... by मस्त कलंदर
+१ , मकं ला अनुमोदन, दर्दी