बिकाशी सहमत.
ज्या प्रॉब्लेममुळे हा निर्णय घेण्यात आला आहे त्याचा विदा मिळाला तर बरे.
नाहीतर हा धागा वाचनमात्र करावा. उगाच चर्चा करण्यात वेळ आणि उर्जा फुकत का दवडायची?
अहो एखाद्या लेखकाला वाटले की स्वतःचे पूर्ण लिखाण उडवावे तर तो उडवेल पण प्रतिसाद तसेच राहतील. अनेकांचा आक्षेप आम्ही वेळ घालवून जे प्रतिसाद लिहितो ते ही धाग्याबरोबर उडतात याला असेल तर त्याच्यावर हे उत्तर आहे. अर्थात लेख नसताना प्रतिसादांना शेंडा-बुडखा नसणार हे ओघाने आलेच, त्यामुळे असे धागे कुणी वाचणार नाहीतच.
मला वाटते मुळात ही सुविधा असताना भारंभार लेख उडवले जात होते का याविषयी कुठेच स्पष्टता नाही. एकंदर जितके लेख लिहिले गेले आहेत त्याच्या प्रमाणात लेखकांनी स्वतःहून उडवलेले लेख किती असतील? १% तरी असतील का? असे असताना नजरचुकीमुळे राहून गेलेल्या चुकांची दुरुस्ती किंवा वाचकांनी अधिक चांगला पर्याय सुचवल्यामुळे कराव्याशा वाटणार्या दुरुस्त्या या करता संपादकांवर अवलंबून राहायला सांगणे कितपत बरोबर आहे? इथे शुद्धलेखनाचा बाऊ केला जात नाही हे म्हणणे बरोबर आहे. पण चूक ही चूकच असते. ती कुणी जाणूनबुजुन करत नाही. मला जर माझी चूक कळली तर ती सुधारण्यासाठी मला दुसर्यांवर (पक्षी: संपादकांवर) अवलंबून राहावे लागणे कितपत योग्य आहे?
छापील लेखांमध्ये असे संपादन करता येत नाही म्हणून इथेही करू देऊ नये हा प्रतिवादही चुकीचा आहे. छापील माध्यमात तसे करता येत नाही हे त्या माध्यमाचे लिमिटेशन आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे इथे ते शक्य असेल तर का अडवता?
असावे ला मत दिले आहे. पण कौलात संपादनाचा हेतु स्पष्ट होत नाही. काही किरकोळ दुरुस्त्या,शुद्धलेखन किंवा काही भर अशा हेतु साठीच स्वसंपादन असावे हे मतात अभिप्रेत आहे.
मूळ कौलाचा लेख जिथे संपतो आणि वाचनांची संख्या दिसते तिथे प्रतिक्रिया लिहा अशी लिंक आहे त्यावर क्लिक केल्यावर प्रतिसाद देण्याची खिडकी उघडते.
फक्त कौलाच्या बाबतीत असे असावे.
@नितिन थत्ते - मात्र प्रतिसादाला उत्तर देता येतं...
स्वयंसंपादनाचे फायदे:
१. छोट्या छोट्या चुका दरुस्त करणे - कितीही तपासून बघितलं तरी काही चुका राहून जातातच. व्यावसायिक संपादन असताना देखील आपल्याला पुस्तकांमध्ये देखील चुका दिसतात.
- कवितेतल्या वृत्तातल्या चुका - माझ्या किमान तीन कवितांमध्ये मला बदल सुचवले गेले व मी ते केले.
- तपशीलातल्या चुका - व्यास की परीघ चं उदाहरण ताजं आहे, अनेक लेखांनंतर वाचक त्या चुका दाखवतात. त्यावर चर्चा करण्याने उगाच चर्चा भरकटते.
- शुद्धलेखनाच्या चुका - लेखकालाच त्या सापडल्या तर व त्याने दुरुस्त केल्या तर उत्तम.
- चित्रांचा आकार - बदलणे, कधी चित्रं दिसत नाहीत ती लिंक दुरुस्त करणे.
२. मोठ्या, घोडचुका दुरुस्त करणे - मिपा व्यवस्थापन लेखनाची जबाबदारी घेत नाही. चुकीचं लेखन असेल तर शेवटी लेखक गोत्यात येणार. मग संपादकांवर अवलंबून का राहावं? जबाबदारीबरोबर अधिकार नको का?
- एखादी विडंबन कविता किंवा टीकात्मक लेख लिहिताना मजा वाटते, पण नंतर ती दुखावणारी आहे असं वाटतं - विशेषतः पहिल्या काही प्रतिक्रिया आल्यावर
- एखादा लेख हीन अभिरुचीचा आहे असं लक्षात येतं, पहिल्या काही प्रतिसादांनंतरच. असे लेख उडले आणि काही क्षण गोंधळ झाला तर हरकत नाही.
३. लेखनावर कंट्रोल - स्वयंसंपादनाने लेखकाला अधिकार वाटतो. व स्वतःचं लेखन विशिष्ट पातळीवर ठेवण्याची जबाबदारीदेखील येते.
तोटे
१. काही लोक खोडसाळपणा करतील अशी भीती आहे. पण याविषयी नक्की विदा नाही. वरीलपैकी कारणांसाठी बदल केले तर त्याला खोडसाळपणा म्हणावं का? सगळेच सदस्य खोडसाळपणा करतील असं गृहित धरावं का?
२. तो नक्की कोणी उडवला हे कळत नाही, विशेषतः संपादकांना. ते एकमेकांना विचारतात, तू उडवलास का रे/गं? मला वाटतं जर 'मी लेख उडवला' हे जाहीर करण्याची प्रोसेस स्पष्ट झाली तर हा प्रश्न नाहीसा होईल.
(आत्ता कौल ~८०% असावा - ~२०% नसावा. त्या २० पैकी सुमारे १२ संपादक सदस्यांकडून असा माझा अंदाज आहे)
२. तो नक्की कोणी उडवला हे कळत नाही, विशेषतः संपादकांना. ते एकमेकांना विचारतात, तू उडवलास का रे/गं? मला वाटतं जर 'मी लेख उडवला' हे जाहीर करण्याची प्रोसेस स्पष्ट झाली तर हा प्रश्न नाहीसा होईल.
असं एकमेकांना विचारण्याचे प्रसंग गेल्या एखाद महिन्यात घडले असतील तर नजरेस आणून द्यावेत. शिवाय, लेख किंवा प्रतिसाद उडवल्यानंतर 'संपादक मंडळ' संबंधित सदस्याला कळवतेच आणि शंकांचे निराकरणही करते. वेळ लागत असेल, पण प्रतिसाद दिला जातो बहुतेक वेळा.
बाकी तुमचा अंदाज चुकीचा असावा असा माझा अंदाज आहे. :ड
श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
पण आपल्या या निरीक्षणाशी सुसंगत असा काही विदा आपण संकलित करून त्याचे विश्लेषण करून हे निरीक्षण नोंदवत आहात की मग असेच वाटले म्हणून? :)
मला, हा विदा (असला तर) बघायचा आहे. धन्यवाद.
मला वाटतं शिंदे यांचं विधान मिपावरील एका वाचकाच्या पर्सेप्शन्सचं निरीक्षण म्हणून संपादकांनीच हा एक डेटा पॉइंट म्हणून नोंद करून ठेवणं इष्ट. या संस्थळावर सगळीच विधानं विदा व आलेख घेऊन येत नाहीत. उदाहरणार्थ 'सदस्य खोडसाळपणा करतात' या अर्थाची विधानं संपादकांकडून आलेली आहेत. त्यातली किती विदा दाखवत आली? गेल्या तीन महिन्यातल्या सुमारे १२०० लेखांमध्ये किती वेळा खोडसाळपणा झाला याचा विदा देऊन जर स्वयंसंपादनाची सुविधा काढली असती तर?
जर 'मी लेख उडवला' हे जाहीर करण्याची प्रोसेस स्पष्ट झाली तर हा प्रश्न नाहीसा होईल.
१००% मान्य.
असं एकमेकांना विचारण्याचे प्रसंग गेल्या एखाद महिन्यात घडले असतील तर नजरेस आणून द्यावेत.
खवमधील लेखन उद्धृत करण्याचे प्रोटोकॉल माहीत नाहीत. पण इच्छुकांनी बरोब्बर महिन्याभरापूर्वीच्या संपादकांच्या खव तपासून बघाव्यात. त्या संपादकांनी आपले संवाद उडवू नयेत ही विनंती.
त्याचबरोबर किमान एका संपादक मंडळ सदस्याने व्यक्तिगत पातळीवर सांगितलं आहे. यापेक्षा अधिक लिहिता येत नाही. असा गोंधळ जर उडत नसेल असं सर्वसाधारण संपादक मंडळाचं मत असेल तर प्रश्नच मिटला, एक विरुद्धचा मुद्दा कमी झाला.
बाकी तुमचा अंदाज चुकीचा असावा असा माझा अंदाज आहे
नाही. त्यावेळी २०% म्हणजे सात मतं होती. त्यात मी किमान चार संपादक मोजले - नसावा असं मत जाहीर केलेले. म्हणजे २० पैकी सुमारे १२% चा हिशोब लागतो. चुभू अर्थातच द्या घ्या. किंवा संपादित करा ;)
त्याचबरोबर किमान एका संपादक मंडळ सदस्याने व्यक्तिगत पातळीवर सांगितलं आहे. यापेक्षा अधिक लिहिता येत नाही.
संपादक म्हणून जे निर्णय घ्यावे लागतात, ते व्यक्तिगत मैत्री असली तरीही बिगर संपादकांना न सांगण्याचा नियम संपादकांनी पाळावा असे मनापासून वाटते. ह्याने बर्याच प्रमाणात अधिक सूसूत्रपणे काम करता येईल (थोडक्यात व स्पष्ट शब्दांत - मिपावरल्या आगी एकूणच कमी प्रमाणात लागण्यास मदत होईल.) घासकडवी ह्यांच्याकडे मुळीच निर्देश नाही, गैरसमज नसावा, पण जे मिपाकर संपादक नाहीत, त्यांना संपादन विषयक निर्णय सांगायची आवश्यकता आहे का? असल्यास, एक धागा काढून वेळोवेळी सगळ्याच मिपाकरांना माहिती द्यावी. असा भेदभाव का बरं? :)
लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार असावा पण पूर्ण धागाच्या धागा उडविण्याचा ह्क्क नसावा.
काही लेखकांकडून लेख उडविले जाण्याच्या किंवा तत्सम घटनांची शिक्षा सगळ्यांच लेखकांना नको. स्वयंसंपादनाचा अधिकार सगळ्यांनाच नाकारणं म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुंरी सारख वाटतं. अपवादाला नियमात बसवल्यासारखं आहे.
प्रतिक्रिया
हेच म्हणतो. हाच उपाय खालीही
In reply to फक्त अप्रकाशित केला तर? by चिंतातुर जंतू
लेखाचे शीर्षक स्वसंपादनाचा
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
मास्तर एक सांगा. स्वसंपादनाचा
In reply to लेखाचे शीर्षक स्वसंपादनाचा by चिन्मना
+/-
In reply to मास्तर एक सांगा. स्वसंपादनाचा by बिपिन कार्यकर्ते
कौलमात्र !
In reply to +/- by नितिन थत्ते
अहो एखाद्या लेखकाला वाटले की
In reply to मास्तर एक सांगा. स्वसंपादनाचा by बिपिन कार्यकर्ते
मत
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
हे पहा
असावा
In reply to हे पहा by नितिन थत्ते
२. तो नक्की कोणी उडवला हे कळत
In reply to असावा by राजेश घासकडवी
-१
In reply to २. तो नक्की कोणी उडवला हे कळत by बिपिन कार्यकर्ते
असहमतीशी सहमत
In reply to -१ by नितिन थत्ते
श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे
In reply to असहमतीशी सहमत by आमोद शिंदे
स्वानुभव
In reply to श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे by बिपिन कार्यकर्ते
विदा...
In reply to श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे by बिपिन कार्यकर्ते
जर 'मी लेख उडवला' हे जाहीर
In reply to २. तो नक्की कोणी उडवला हे कळत by बिपिन कार्यकर्ते
त्याचबरोबर किमान एका संपादक
In reply to जर 'मी लेख उडवला' हे जाहीर by राजेश घासकडवी
चांगली चर्चा चालु आहे
लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार
वर्जन कंट्रोल
In reply to लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार by पुष्करिणी
लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार
अधिकार
In reply to लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार by इंटरनेटस्नेही
४२ विरुद्ध १०
५१ वि १४
६२ वि १४...
६५ वि १४
In reply to ६२ वि १४... by राजेश घासकडवी
६३ वि १४
६४ वि १४
In reply to ६३ वि १४ by क्रेमर
वाचनमात्र
६८ वि १४