Skip to main content

जीवन-मृत्यू!

लेखक राघव यांनी गुरुवार, 08/07/2010 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच! :) जीवन म्हणजे सागर असतो शांत गंभीर भासणारा.. वादळांस प्रसवणारा.. नवा प्रलय दाखवणारा.. जीवन म्हणजे वादळ असतं खंबीर झाडांना उचकटून टाकणारं.. रूळलेल्या वाटांमधून घोंघावणारं.. पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारं.. जीवन म्हणजे असतो किनारा वादळाला उरावर घेणारा.. उध्वस्ततेतून सावरणारा.. नवलाईची बीजं रोवणारा.. मृत्यू म्हणजे अनाहूत चाहूल खंबीर झाडांना उचकटून टाकणारी! पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारी! नवलाईची बीजं रोवणारी! नवा प्रलय दाखवणारी!! शुभम्
लेखनविषय:

वाचने 1594
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सांगितल्या प्रमाणे न विसरता शब्द पाळला. आनद वाटला जीवनाचा विचार नेहमीच सुखद असतो. छान कल्पना ! कविता आवडली !. जीवन म्हणजे सरिता सम, अल्हड बालपणी खळाळणारं, तारुण्यांत सैरावैरा वाहणारं, संसार सागराच्या उधाणांत विलीन होणारं.

जीवन म्हणजे असतो किनारा वादळाला उरावर घेणारा.. उध्वस्ततेतून सावरणारा.. नवलाईची बीजं रोवणारा.. हे सगळ्यात आवडलं.

जीवनाचे वर्णन करतांना जी वाक्यं चपखल बसतात.. तीच वाक्यं मृत्यूचे वर्णन करतांनाही चपखल बसतात असे वाटले! तीच कल्पना इथे मांडायचा प्रयत्न केलाय. राघव