डिस्क्लेमर: ही कविता माझी नाही. कुणाची ते माहित नाही. कुणास माहित असल्यास सांगावे. तसेच काही शब्द चुकले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण लहान असतांना केव्हातरी पाठ झालेली आहे. मला वाटतं याचे कमीत कमी एक आणखी कडवे आहे.. पण काही केल्या आठवत नाहीये.
***
संदर्भः ही कविता म्हणजे कृष्णाच्या एका गोकुळातल्या बोबड्या बोलणार्या मित्रानं मांडलेली भोळी पण प्रेमळ तक्रार आहे. त्यामुळे अगोदर बोबड्या बोलीतच लिहितो. खाली समजण्यासाठी साध्या भाषेत लिहिलेले आहेच! जमले तर माझ्या (भयानक) आवाजात इस्निप्स वर टाकून इथे लिंकेनच! ;)
***
दाय बा तित्ना, अता मी उत ना, थंदत तुजी नाही बली ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..
एतदा हली, दवल्याधली दहीदुध थाया देलो ले..
थालेत दोपाल पलून देले मला पतलून थेवलं ले..
थेवलं तं थेवलं.. बुदुबुदु माल्लं.. मद मी मुलुमुलु लल्ला ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..
एतदा हली, दमुनातिली पानी प्याया देलो ले..
थालेत दोपाल पलून देले मला धत्लुन देल्लं ले..
देल्लं तं देल्लं.. तोंदले फुतले.. ताते लुतले.. मद मी मुलुमुलु लल्ला ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..
================
जाय बा कृष्णा, आता मी उठं ना, संगत तुझी नाही बरी रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!
एकदा हरी, गवळ्या घरी दही-दूध खाया गेलो रे..
सारेच गोपाळ पळून गेले मला पकडून ठेवलं रे..
ठेवलं तं ठेवलं.. बुदुबुदु मारलं.. मग मी मुळुमुळु रडलो रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!
एकदा हरी, यमुनातीरी, पाणी प्याया गेलो रे..
सारेच गोपाळ पळून गेले मला ढकलून दिलं रे..
दिलं तं दिलं.. टोंगळे फुटले.. काटे रुतले.. मग मी मुळुमुळु रडलो रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!
राघव
काव्यरस
वाचने
3620
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
थो थ्वित!
+१
In reply to थो थ्वित! by सहज
थान!
अलेच्चा!!!
कसली गोड
कविता
बहुतेक हा
हुश्श!!!
खामोश!!!
In reply to हुश्श!!! by मस्त कलंदर
:)
In reply to खामोश!!! by बिपिन कार्यकर्ते
आभार
थविता
छान रे
अले वा...