भस्म्या !!
मी पयल्यांदा हातात नांगर धरला; तवा माझा बां मला म्हणला व्हता,
"तुज्या आयला जर तू वरबाडलास; तर ती गप बसलं का?"
"आर ही बी धरणी माय हाय.
धर ह्यो गुळाचा खडा, अन आम्बलिची धार; वाहा तिला. म्हन , आधीच उन्हान तरपासलेल्या
तुला; मी नांगरटीन उलथवतोया !
धरणी माते , माझ्या हाताला यश दे!
माग! माग! तिचा आशीर्वाद माग बाबा!
तुम्हा शिकलेल्या लोकानला; मी अंधश्रद्धाळू वाटन .
पण आजपत्तर, माझी कारभारीण; वडाला फेरया मारते.
सांज सकाळ, तुळशीला पाणी घालते.
वड, पिप्पळ, चीच्च ला दहा पिढ्यांनी ; आसच पाहयल.....
म्हणून त्यास्नी वडील धार मानते.
तुमच्या शेरात, लोक पिकनिकला जात्याती.
पर आम्ही भू पूजेला जातो बघा.
जेवाण घेवून, शेतात जावून;
पयला पाच दगड मांडतो.
त्यांना हळद कुक्कु लावून , आणलेला
घास घास; तेंच्या म्होर ठेवतो.
रानची पाखर, किडा मुंगीच आम्हा देवा प्रमाण वाटते.
एकदा पाडाला आलेला आंबा उतरताना
माझा बा मला म्हणला,
"ग्वाड लागल म्हणून मुळासकट न्हाय खायचं गड्या!
झाडावर थोडा शेर पाखरांचा बी हाय!
तेंच्या धरन चार फळ राखून झाड उतरीव.
आर तुझ्या साटन त्यो मेवा हाय; पर पाखरांचा त्यो घास हाय".
आमी नदीला गंगा मानतो.
कधी कोंबड, बकर कापायच झाल तर
उदबत्ती लावतो.
सणा सुदीचा घास माझी खिल्लार बी खात्याती;
आन रानातल; परड्यातल सार देव; माझ्या हर एक नवसाला पावत्याती.
शान्या सुरत्या पर अश्रद्ध माणसांनो
माझ्या अंधश्रद्धाळू नजरेन ,
तुमच कधीच रोग निदान केलया .
'अति' शिकून तुम्हाला 'भस्म्या' झालाया.
अपर्णा
तळटिपः-
{सेव्ह गाया! सेव्ह गाया!! म्हणून शंभर एक लोक स्टेज वर नाचली! त्यांना पाहायला पाच हजार जमली! या साऱ्यांनी मिळून प्रत्येकी दहा दिवसात करणार नाही; एव्हढा कचरा, घाण एका रात्रीत केली!! वर आणि ध्वनी प्रदूषण झाल ते वेगळंच !!! कुठलीही चळवळ म्हंटल की आज काल नाच गाण्यान सुरुवात होते. अन त्या नाच गाण्याच्या धुंदी बरोबर चळवळ ही उतरून जाते.
हल्ली दर महिन्याला निदान चार तास उर्जा वाचविण्यासाठी माझ्या इथली मंडळी बागेत जाउन बसतात . आणि उर्जा वाचवायची म्हणुन कॅंडल्स जाळतात???
अश्यावेळी मला नवल वाटत आपण आपल्या संस्कृतीत का नाही डोकावत ? एव्हढी पुरातन अन संस्कारांनी समृद्ध आपली संस्कृती आपल्याला या बाबतीत काही सांगते का? आपल्या संस्कृतीची सर्वात मोठी देणगी म्हणजे निसर्गाचा आदर. निसर्गावरील श्रद्धा. आज आपण या प्रदूषणाच्या कड्यावर येऊन पोहोचायचं मुख्य कारण म्हणजे आपली निसर्गावरील अश्रद्धा.
जशी अंधश्रद्धा वाईट तशीच ही अश्रद्धा सुद्धा घातकच. किंबहूना मी तर म्हणेन अंधश्रद्धा एका व्यक्तीला वां एका समाजाला ग्रासते तर अश्रद्धा पुऱ्या जगाला विनाशाकडे ढकलते.
तर एका शेतकर्याच्या नजरेतुन या मॉडर्न पर्यावरण वाद्यांच मोज माप!!
कवितेच नाव आहे भस्म्या! ही एक पौराणिक व्याधी! या व्याधीने ग्रस्त व्यक्तीच कशानेही आणि कधीही पोट भरत नाही. ती व्यक्ती घर दार, गावं, नगर, खाऊन फस्त करत सुटते.}
सुरेख कविता!!
अतिशय
खुप मौलीक
वरच पद्य
पद्य आणि
छान मांडलं
होय ग , आधी
सत्य.
लेख फार
दुसर्याच
वा वा..
सुरेख. गद्य
क्या बात है!!!
खूपच छान
निसर्गाचे
त्या
प्रभावी भाष्य आवडले
लिखाणाचा
'श्रद्धा'
तुमची
आवडली. मस्त
छान
तो विचार
फारच छान
मस्त! >>'अति'
बाळबोध
वरील
तुमचा हात
कविता आवडली..
शेरी
माझ
अतिशय
मनस्वी आणि भाबडी
खरेखरचे
बरोबर
पर्यावरणव