मी ११ जून ला पोचतो आहे. १६ जुलैपर्यंत देशात असेन. काहीशी धावपळ असेल. पुण्यामुंबईव्यतिरिक्त कदाचित अन्यत्रही भटकत असेन. मात्र वेळात वेळ काढून भेटीचा योग साधता आल्यास, पुण्यामुंबईकडच्या अनेक मिसळपावकरांना एकत्रित भेटता आल्यास उत्तम!
(सामूहिक)बेसनलाडू
जमल्यास कधी कुठे भेटायचे सांगा. त्यानुसार संपर्क व्यवस्था कळवतो. येथे मिल्पिटासमध्येच भेटायचे झाल्यास तसेही सांगा. त्यानुसारची (वेगळी) संपर्क व्यवस्था कळवतो.
(संपर्कसाधू)बेसनलाडू
बाकी देशात जायचे, कितीही वार्या करायचे सुख वेगळेच. येथे राहून देशाची वारी ही मी पंढरीच्या वारीइतकीच पुण्याईची समजतो.
(पुण्यवान)बेसनलाडू
आजच नॉर्थ मिल्पिटास बुलवावरील स्टारबक्स मधे श्री. घासकडवी महोदय, सौ. घासकडवी आणि चि. घासकडवी यांची भेट झाली. तीनेक तास नानाविध विषयांवर गप्पा रंगल्या.
(गप्पिष्ट)बेसनलाडू
मजा आहे बुवा तुमची. आमच्या शहरात कोणी येतच नाही. बहुतेक मीनल येतेय पण : ). मी भेटणारे.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
खुप भावनाप्रधान होउन लेख लिहलात ते जाणवत. =D> जुन्या आठवात हारवलात ना?
(या!! या !! भानावर या आता.२० तारखेला यायचय ना? :) )
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
मातृभूमीची आठवण अशी सहजा सहजी पुसली जात नाही म्हणतात ते काही खोटे नाही. शेवटी ते आपल्या 'जीन्स' मधेच लिहिले गेले आहे, पुलंनी म्हंटल्याप्रमाणे 'अंतरीचा आत्माराम कधी कुठल्या गोष्टीची मागणी करेल हे काही सांगता येत नाही' - मग ते पिठले असो की भारत वारी.
मस्त मजा करुन या. शुभास्ते पंथान:
अन्यत्र दिलेला प्रतिसाद पुन्हा इथे:
या या.. आपल्या भारतात तुमचे स्वागत आहे :)
या गाण्याची जादु मी अनुभवली नसली तरी अमेरिकेत असताना स्वदेस रिलिज झाला व त्यातील "ये जो देस है तेरा..." या गाण्याने काळीज पिळवटून निघालं होतं... तसंही मी अमेरिकेत फारसा रमत नाहि.. सुरवातीला एक-दिड वर्ष काढलं तेवढंच.. नंतर फक्त छोट्या छोट्या (२-३ महिन्यांच्या) ट्रिपा मारतो झालं.
तर ते असो.. येताय तेव्हा भेटायला नक्की आवडेल.. बाकी व्यनीतून
या निमित्ताने मी गेल्यावर्षी एका विशिष्ठ अनुभवामुळे कुंपणावरच्या मित्रांसाठी काहि ओळी लिहिल्या होत्या त्या आठवल्या..
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
स्वताच्या मनातले आणि आमच्याही मनाचे बोललात. जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी काही वेगळ्याच असतात. कधी पुण्याला गेलो कि पुन्हा मित्रांबरोबर अमृततुल्यात्ला चहा घेताना वाटते कि फक्त चहाची किंमत १ रुपयातून १० रुपये झाली, बाकी सर्व तसेच राहिले. तुमची भेट अशीच सफल होवो.
पुरुष रडत नाहीत हा जावईशोध कुणी कसा लावला असावा बरे? अगदी धाय मोकलून रडत नसले तरी सद्गतित होत असावेत, गहिवरून डोळ्यांत पाणी येत असावे, असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
आणि प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे दारू पिऊन / आठवणींनी भावनिक होऊन रडण्याची तर भरपूरच शक्यता...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
काही लोकांना नाहीच समजत....स्वतःचे मत दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न कशाला करायचा...ज्याच्या त्याचा भावना...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
ठीक आहे. उदाहरण देतो.
परिवारातील कोणाचे निधन झाल्यास रडणे समजण्यासारखे आहे.
इथे लेखक काही काळानंतर घरच्यांना भेटू शकला असता.मस्तपैकी ३ जुन्या, चांगल्या मित्रांबरोबर राहात होता, त्यात बाकी सगळे भेटायला आले.मग कशाला रडायचे ?
१. मी अमेरिकेत आल्यानंतर सर्वप्रथम दीड वर्षांनी भारतात परत गेलो होतो. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पाच वेळा भारतवारी घडली आहे. तरीही प्रत्येक वेळी भारतातून अमेरिकेत परतताना माझ्या आईप्रमाणेच वडिलांच्याही डोळ्यांत पाणी येते.
२. कॉलेजातील दोन जिवलग मित्रांना पहिल्यांदा भेटलो ते कॉलेज सोडून एक-दीड वर्ष(च) लोटल्यावर. त्याप्रसंगी त्यांच्यापैकी एकाच्या डोळ्यांत पाणी आले होते.
सारांश - डोळ्यांत पाणी येण्याचा प्रसंग दु:खाच्या वेळीच येतो असे नाही; आनंदाश्रू नावाचा प्रकारही असतो. अभिमानाने डोळे भरून येणे (इत्यादी इत्यादी) असते. त्याचा पौरुषत्त्वाशी नि स्त्रीत्त्वाशी संबंध कमी (किंबहुना शून्य) पण भावनिक जवळीक असणे आणि स्वतःला व्यक्त करता येणे, याच्याशी जास्त असतो. असो.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
मीपण अमेरिकेत आल्यानंतर सर्वप्रथम दीड वर्षांनी भारतात परत गेलो होतो. माझ्या बाबांच्या डोळ्यातून पाणी नाही आले. मला त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि फार आवडते.
त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पाच वेळा भारतवारी घडली आहे
:खूप जळजळ वाटते :D असो.
डोळ्यांत पाणी येण्याचा प्रसंग:
आनंदाश्रू किंवा अभिमानाचा प्रसंग, यात तुमचे बरोबर असावे (मला अनुभव नाही)
मी फक्त दु:खाच्या वेळच बोलत आहे.
मानसिक कणखरपणा असणे/ नसणे हा माझा मुद्दा होता.
आणि
त्याचा पौरुषत्त्वाशी नि स्त्रीत्त्वाशी संबंध कमी (किंबहुना शून्य) :
तुमचे बरोबर आहे. मी प्रचलित आणि आवडत्या समजानुसार टीपणी* केली होती. (just my opinion, not a fact)
आपल्याला प्रवासाच्या आणि भारतातील मुक्कामाच्या शुभेच्छा. फोटो काढा भरपूर. जरूर प्रवास वर्णन लिहा.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
कोणीही कितीही विसरभोळा, माणुसघाणा असला तरी कुठेतरी स्व:ताला आभासी जीवनाचा फायदा घेउन माणसात गुंतवत असतोच. त्यातुन एखाद्याला लोकात मिसळणे(किंवा घाउक द्वेष करायला), गप्पा(टोमणे) मारायला आवडत असेल तर मसंस्थळाचे व्यसनात रुपांतर कधी होते कळतही नाही.
पुढे कधीतरी याचा परिणाम पेट्या इकडून तिकडे करण्यात होते. फायनान्शीयल इन्व्हेस्टमेंटचे फारसे कौतुक नसले तरी इमोशनल इन्व्हेस्टमेंट डे ट्रेडिंगप्रमाणे वर खाली अगदी विथ लिव्हरेजेस! आणी मग द रेस्ट इज हिस्ट्री.
हॅपी जर्नी.
जाताजाता: माझ्या एका सहीप्रेमी मित्राला तुमची भेट घ्यायला नक्की सांगीन.
मधुबाला पुसली गेल्याचं उडत उडत कळलं तेव्हा खूप काही हरवल्यासारखं वाटलं.
घाश्यानं ४० पेन्सिली वापरून काढलेली मधुबाला भन्नाट होती बरं का? मी ती बघितलेली आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
परदेशात रहाणार्यांच्या मातृभुमी बद्दलच्या भावना या आपल्या लेखातून छान मांडल्या आहेत :)
अवांतरः
(आमच्या साठी तर मुंबई हे आमचे परदेश आणि सांगली ही मातृभुमी
आपण वर्णन केलेल्या सर्व भावना आमच्या सांगली - मुंबई वार्यांसाठीही लागू होतात )
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
मी सुद्धा मुंबैत असतो .. पण मी पुण्याला राहातो. एव्हरी विकेंड पुण्याला पळतो. काय सांगु .. शुक्रवारी जेंव्हा मी पुण्याला जायला रेडी होतो .. तेंव्हा आमच्या पुर्ण क्युबिकल मधली लोकं धाय मोकुन रडतात , (उर बडवतात म्हणाना) .. आणि निघण्या आधी घरी फोन केला की आई तर तिथेच रडायला लागते ... :)
घरी गेलो ... की आई बाबा भाऊ बहिण .. असे लायनी ने रडायला बसलेले असतात , आम्ही सगळे यमणात रडतो. असा अर्धा एक तास रडुन होई पर्यंत घरायलं सामाण अश्रुंच्या तळ्यावर तरंगायला लागतं .... मग आम्ही थांबतो आणि नेटाने पुन्हा घर स्वच्छ करतो. असाच कार्यक्रम मी सोमवारी सकाळी निघताना पुन्हा एकदा होतो . गेल्या पाच आठवड्यांत मी पाच वेळा गेलो , तरीही असेच होते हे वैषिष्ठ्य ;)
- असेच रडारडवी
प्रतिक्रिया
मी ११ जून ला पोचतो आहे
milpitas मध्ये
नॉर्थ मिल्पिटास बुलवा - स्टारबक्स
मजा आहे
मी ही...
राजेशजी मायभुमीत आपले स्वागत असो
उत्तम मनोगत
असेच म्हणतो.
सही
या हो या
जननी
गुर्जी,
२२ मे
अन्यत्र
स्वदेस
मीही.
या...
मुलांच्या उन्हाळ्याच्या
मनातले
वन्नकम
वेल्कम सर,
हेच म्हणतो
वेल्कम, नुसतं भारतातंच नव्हे तर या आयड्यांच्या भूलघालू जगातही.
त्या
जावईशोध
आणि
आणि हो,
आणि हो
शक्यता कमी
रडणे
किमान-कमाल कसे ठरवायचे?
काही
शब्द्च्छल
काही काळानंतर = ?
मीपण
आईप्रमाणेच वडिलांच्याही
आपल्याला
प्रवासाच्या आणि भारतातील मुक्कामाच्या शुभेच्छा!
हॅपी जर्नी
हाहाहा
हिंदुस्था
मधुबाला
घाश्यानं
>>>
खुपच
परदेशात
+१ सहमत
+५०
+५००
परदेशस्थ