छानच आहेत कविता...!
'बरेच काही उगवून आलेले' हा कवितासंग्रह वाचला पाहिजे एकदा..
धन्यवाद मनिषराव. आपण फार चांगला परिचय करून दिला आहे..
अवांतर -
रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते;
अगदी सहमत आहे.
मिपाच्या सभासदाने स्वत:ची माहितीपर/रसास्वादात्मक किंवा भाषातरात्मक/अनुवादात्मक अशी कुठलीही टिप्पणी न केलेले, मिपाचे सभासद नसलेल्यांचे लेखन किंवा मिपाबाह्य साहित्य/लेखन उगाच जसेच्या तसे केवळ माहिती/आस्वाद म्हणून केवळ 'पुढे ढकलण्याच्या' स्वरुपात किंवा 'पुढे ढकलण्याच्या' उद्देशाने जसेच्या तसे मिपावर प्रकाशित करण्याला मिपाची मनाई आहे परंतु वानगीदाखल काही उदाहरणे देऊन त्यावर काही रसास्वादात्मक किंवा परिचयपर काही लिहिल्यास त्यात नक्कीच काही वावगे नाही!
आणि जनरल डायर यांच्याकडे हे तारतम्य निश्चित आहे, त्यामुळे अजूनही असेच उत्तमोत्तम रसास्वादात्मक लिखाण मिपावर निर्धास्तपणे येऊ द्या, ही विनंती! जनरल डायर त्याचे नक्कीच स्वागत करतील अशी खात्री असू द्या! ;)
तात्या.
अनेक वर्षांनी धामणस्करांच्या कविता पुन्हा एकदा वाचल्या. मनिषरावांचा शतशः आभारी आहे.
धामणस्करांच्या साध्या आयुष्याबद्दल जे थोडे ऐकले त्यानुसार , आयुष्यभर डोंबिवलीसारख्या मुंबईतल्या एका उपनगरातले, वयाची तीस-पस्तीस वर्षे रोज लोकल्-ट्रेनचे धक्के खात जाणारे एक साधेसे नोकरदार आयुष्य त्यांचे होते. अशा आयुष्यात एखाद्या माणसाच्या कोवळ्या भावना, काव्यात्म वृती या सर्व गोष्टींची राखरांगोळी झाली असती. धामणास्करांच्या इतक्या सुंदर , नितळ कविता हा या दृष्टीने, मला एक छोटासा चमत्कारच वाटतो !
त्यांच्या या कविता थेट त्यांच्यासारख्या आहेत : छोट्याशा आणि विलक्षण नितळ ! "मौजे"च्या दिवाळी अंकातल्या मांदियाळीमधे त्यांची कविता अगदी नेहमी असायची. आयुष्याबद्द्ल अनाग्रही, शांत आणि विचारांचे स्फटीक गोळा करणारी.
मनिषरावांमुळे या काळाची पुन्हा एकदा सफर घडली. त्यांचे.मनःपूर्वक आभार.
प्रतिक्रिया
परवानगी
रसास्वाद
छानच आहेत,
हृदयस्पर्शी
खरच