आवडलेले काही... १
दुर्गाबाईंचे व्यासपर्व... एक अप्रतिम पुस्तक. कधीही मूड लागला की हाती घ्यायचे कोणतेही पान काढून वाचायला सुरूवात करायची... काल असेच झाले. आणि नेमका हा परिच्छेद समोर आला... दुर्गाबाईंच्या कालातीत भाष्याला सलाम... सद्य परिस्थितीत तर अजूनच बोचले हे शब्द...
"विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला मोठा शाप आहे. बुद्धिवंतांची संवेदनक्षमता करवंडली की मग पाशवी बलाचाच आग्रह अनावर होतो. स्वत्;ची कीव करत भले भले बसतात आणि मग चळवळे, दुय्यम दर्जाचे लोक सामर्थ्याची सारी क्षेत्रे काबीज करतात. पण ती त्यांनाही फार काळ पेलत नाहीत. जागा मोठ्या माणसे लहान - असे उलटे गणित सुरू होते. हे उलट्या गणिताचे चक्र द्रोणाने युगापूर्वी फिरवले. अजून ते तसेच फिरते आहे."
- मोहरीतील ठिणगी, व्यासपर्व.
संदर्भ - द्रोणाने एकलव्य अर्जुनापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून कपटाने त्याचा अंगठा काढून घेतला.
प्रतिक्रिया
अगदी!
बधीरता
>>द्रोणाला
हे
उत्तम वेचा
असेच बोल्तो !
हा जय नावाचा इतिहास आहे...
छानच असणार
जबरदस्त
वाचायलाच
चांगले पुस्तक
अजुन एक
युगांत
धन्यवाद..