मोदी येई साकी बनुनी, घेउनी लिलाव प्याला
खेळाडू ते विकुनी करती आनंदीत मालकाला
खेळ खेळती, लोक रंजविती, सर्वे मिळून याला
पैशाची ही नशा चढतसे, क्रिकेट होई मधुशाला
--------
(रूबाया करण्याचा प्रयत्न केलेला) वल्ली
पहिले चार उतारे वाचायला मजा आली.
हाडाचा मास्तर असा असावा....! :)
बाकी 'रुबाई'चा प्रयत्नही करुन पाहू.
तोपर्यंत ही केवळ आपल्या उत्तम लेखनाला पोच.
-दिलीप बिरुटे
**
बुंदीपाडू आणिक फंडू मिश्रित दाक्षे वेलाला
ग्रास्स्टांझा मग बनुनी साकी अल्गोचा देतो प्याला
मद्य त्यात नि:स्फूर्त कल्पना, आस्वादक ते हसत गिळे
खिदळत विसरे दर्जा अपुला कवितकमाला मधुशाला
**
ही लेखमाला विनोदी पद्धतीने अस्वादाबद्दल काही गंभीर मुद्दे सांगत आहे. म्हणून ती विशेष वाचनीय आहे.
"कवितांमध्ये कित्येकदा काहीतरी एक साचा असतो."
आणि
"फक्त साचा असला तर कविता निकृष्ट असते."
ही दोन मोठी तत्त्वे पटण्यासारखी आहेत.
पुढचे एक आस्वादतत्त्वही पटण्यासारखे आहे :
"उत्तम कवितेतही कवीने तात्पुरती चौकट निर्माण केलेली दिसते. ती चौकट लक्षात आली, तर बरे असते. त्या चौकटीमध्ये राहूनही कवीने कल्पनेच्या अचाट आणि मनोरम भरार्या मारल्या असतील, तर चौकट जाणल्यामुळे कल्पकतेचा पल्ला अधिक परिणाम करतो."
लेखमालेत तत्त्वाच्या पहिल्या वाक्याला स्पर्श होतो आहे, पण तिरप्या ठशातले स्पष्टीकरण खरेतर समजावलेले नाही.
आणखी एक आस्वादतत्त्व लेखात अर्धवट सांगितलेले आहे :
"कवीने घालून दिलेल्या मर्यादेत आस्वादकाने स्वतःहून कल्पनेच्या भरार्या मारून बघाव्यात. (म्हणजे गायकाने अवघड तान घेतल्यानंतर श्रोताही मनातल्या मनात तशी तान घेण्याचा आपोआप प्रयत्न करतो, करतोच. तसा प्रकार.) या प्रतिक्षिप्त कल्पनाभरारीमुळे कवीच्या कल्पनाशक्तीबद्दल आत्मीयता वाटते आणि आस्वादाचा स्तर बदलतो. आस्वादक घे-घे-ग्राहक न राहाता कवितेमध्ये अक्षरशः सहभागी होतो."
येथेसुद्धा तत्त्वाच्या पहिल्या वाक्याला लेखात स्पर्श होतो आहे, पण तिरप्या ठशातली पुढली वाक्ये हवी तशी पुढे नेलेली लक्षात येत नाहीत.
आता चौकट उत्कृष्ट-निकृष्ट दोन्ही कवितांमध्ये असली तरी उत्तम कवितेत वेगळे काय असते, याबाबत लेखामध्ये कुतूहल नसून फक्त दुय्यम उल्लेख आहेत. ("तुम्हा आम्हा पामरांनी एवढं सगळं करण्याआधी..." पण तुम्हा-आम्हा पामरांना कळते! उपमा चौकट कळल्यामुळे आपणा पामरांच्या अस्वादात भर पडते, की व्यंगामुळे त्या विचाराचे हसे होते आहे?)
अंतर्गत सिद्धांत सांगण्यात प्रगती न झाल्यामुळे मला चुटपुट लागून आहे.
उत्तम कवितेमध्ये चौकटीचा समावेश करून घेणारीही कुठली कल्पना सांगायची प्रामाणिक कळकळ कवीला असते. प्रामाणिकपणा जाणवतो. नेमके काय सांगायचे ते समजले नाही, तरी "काहीतरी सांगायचे आहे खास" याबद्दल आस्वादकाला नि:शंक जाणीव होते. आणि त्या जाणिवेचे एक कारण कवितेतला एकसंधपणा असतो. कवितेत एक शब्द कमी केला किंवा एक शब्द जास्त केला, तर काहीतरी चुकचुकते.
वरील मत माझे आहे. याबाबतीत श्री. घासकडवी यांच्या बिंदुगामी कल्पना असतील याबद्दल मला खात्री आहे. त्या त्यांना लेखामध्ये अत्यंत गमतीदार शैलीत आडवळणाने सांगता येतील, अशीसुद्धा माझी खात्री आहे.
"चौकट असते" हा सिद्धांत आता सांगून झाला आहे. पुढच्या भागांमधून नवीन सिद्धांत पुढे येत नाहीत. म्हणून वाटू लागले आहे की लेखमालेतील प्रत्येक भाग "कवितक-लेख" साच्यामधून पडू लागला आहे. श्री. घासकडवी यांचे हुन्नर आणि कौशल्य यापेक्षा खूप अधिक आहे. हा लेख विनोदी-वाचनीय आहे, तरी त्यांना जमेल त्या मानाने निकृष्ट आहे.
"कवितकलेख पाडायचा अल्गोरिदम = कवितकलेखक" अशा प्रकारचा अल्गोरिदम याच शैलीत लिहायची माझी इच्छा होती. परंतु ती इच्छा दोन कारणांमुळे मी बाद केली : (१) आळस (२) कौशल्याचा अभाव. पहिली अडचण कॉफी पिऊन संपवू शकतो, दुसर्या अडचणीसाठी माझ्यापाशी इलाज नाही.
- - -
मधुशालेबद्दल :
मधुशालेतील प्रत्येक रूपक-रुबाईचा अल्गोरिदम उघड्यानागड्या मोकळेपणाने हरिवंश राय बच्चन यांनी सांगितलेला आहे. इतक्या की पहिल्या तीन रुबाया वाचल्यानंतर शाळकरी मुलालासुद्धा अल्गोरिदम कळावा. तो गृहीत धरूनच कोणतीही साक्षर व्यक्ती त्याबद्दल चर्चा करेल.
(येथे मिसळपावावरील उदाहरण).
खरे तर अल्गोरिदम इतक्या साळसूदपणे देण्यात हरिवंशराय यांचे धाडस बघून मनात धडकी भरते.
मग जाणवते की एक-एक रुबाई वाचताना थोडासुद्धा कंटाळा येत नाही. "हे रूपक तर मी आधीच ओळखले होते" असे वाटत नाही. त्याहूनही अचाट कवित्व हे : या दीडशे रुबायांमध्ये "एक कलाकृती" असल्याचा भास होतो. बहुधा त्याच्यामध्ये अनेक रुबायांना जोडणारी एक चौकटही आहे, असा भास होतो. पहिल्या छूटला कवीने आपले सगळे अल्गोरिदम-पत्ते खाली सांडले नाहीत असे लक्षात येते. डाव संपेपर्यंत कवी हुकुमी एक्के-राजांची नवी-नवी उतारी करत राहातो.
येथे आणि येथे अनेक रुबायांना जोडणारी चौकट शोधण्याचा माझा प्रयत्न.
संपूर्ण मधुशालेची महा-चौकट काय आहे, त्याबद्दल माझे कुतूहल फार आहे. ती अजून शोधत आहे. तरी आस्वादासाठी तशी एकतरी चौकट आहे याबद्दल मला खात्री आहे. वर्णनासाठी या क्षणी शब्द नसले मला मधुशालेत एकसंधता जाणवते आहे.
श्री. घासकडवी यांनी सुद्धा याबद्दल सांगितलेले आहे -
सुरूवातीच्या रुबाया वाचकाला 'हे तुला सादर' म्हणणाऱ्या आहेत. पुढच्या काही 'मधुशाला म्हणजे काय, ती कुठे आहे, तीपर्यंत कसं पोचायचं' याच्या आहेत. क्रमाक्रमाने नंतर आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चिंतन व नंतर मृत्यूवर चिंतन आहे.
- - -
सर्वसामान्य फुटपट्टीने मोजल्यास हा लेखाचा दर्जा उंच आहे, हे मान्य. पण श्री. घासकडवी यांच्यासाठी बनवलेली मीटरपट्टी मोठी आहे.
भावना थेट पोचवण्यात यशस्वी झालेली आहे.
तुम्ही लिहिलेल्यापैकी 'ठळक सरळ' लिहिण्याचा प्रयत्न होता. ठळक तिरकस (फॉंटमधील) हे भावगर्भी साक्षात्काराने वाचकाने अनुभवावं अशी आशा आहे.
उत्तम कवितांत वेगळं काय असतं याचे सिद्धांत बांधण्यापेक्षा शोध घेणं आहे. माझा तसा मूलभूत अभ्यास नसल्यामुळे, व केवळ हे चांगलं, हे वाईट असं जाणवत असल्यामुळे, फर्स्ट प्रिन्सिपल्स पासून काही काळं पांढरं करता येतं का हे लिहून बघतो आहे. हळूहळू अधिकाधिक क्लिष्ट रचना हाताळण्याचा लेखमालेत प्रयत्न केलेला आहे.
बाकी 'कवितक लेखक' प्रणाली म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. [एक क्ष काव्यप्रकार घ्या, त्यातली वाईट उदाहरणं लिहू शकणारं सूत्र लिहा, व त्याआधी तीन-चार परिच्छेद इकडचे तिकडचे विनोद-टवाळकी करा : विषयाच्या सूत्राशी इमान एखाद्या लांबलचक पट्टा गळ्यात असलेल्या बीगल इतकंच असू द्या...] पण मधनंच त्या प्रणालीबाहेरचं, कवितकच्या मर्यादांविषयीही बोलणं होतंच...
मधुशालेचा अल्गॉरिदम सोपा म्हणूनच निवडला. त्यात मर्ढेकरांच्या 'धुक्यात काळी दलदल व्याले किती मवाली इमलेवाले' सारखी रूपकांची सरमिसळ नाही.
विनोद हा सेलच्या जाहिरातीप्रमाणे आहे. तिच्यामुळे लोक दुकानात तरी येतात. कधी कधी तो मारक ठरतो हे मान्य आहे.
राजेश
'घासू'बिनीचे शिलेदार अन 'मुसू'पाडती काव्यविटा
जालतिरावर जागोजागी पखरु आपण काव्यछटा
शब्द कालवुनि 'रंगा' तळतो रुबाईचे फर्मास भजे
साकी कोठे? वाट पाहता तिष्ठुन गेला जालतिठा
चतुरंग
प्रथमदर्शनी तुला खुणवतो, नामफलक चमचमचमता
नाड्या धरुनि मधुर स्वरांनी, स्वागत करि मालक ताता
कविता, चर्चा, काथ्याकूटे, मेनू फक्कड जमलेला
चला मंडळी लेखन पिऊ, हा मिसळपाव दारूगुत्ता
मिसळ-भजीचा खमंग चकणा, लाल पानही रंगविता
काहिलीतले मेदुवडे अन्, साजणगहिऱ्या प्रेमगितां
चे वेफर चरता जमलेले हे सदस्य कवितापान्करण्या
साकिप्रतिक्षा हो प्रतिसादी, जालतिठा दारूगुत्ता
चला मंडळी झोकू आपण काव्यदारुच्या विविध छटा
विडंबनाचा देशी ठर्रा, विलायती भाषांतरिता
साके ती ना इराणि साकी, 'हाय कु'ठलिशी जापनिकी
रूसी 'व्होद्'का सह जमता, हा युनो बने दारूगुत्ता
राजेश
वा वा! असे टंकायला बोटे शिवशिवली असली तरी त्या प्रेरणेचे दमन करून हा प्रतिसाद टंकावा लागत आहे. वारंवार सांगुनही श्री सुनीत वर्गातले नियम पाळत नाहीत. गृहपाठ तर कधीच सोडवत नाहीत. त्यामुळे कसबाचे (स्किल स्किल (कसाब नव्हे)) कितीही कौतुक करावेसे वाटले तरी ते नियमाला धरून होणार नाही. वर एका 'दिपोटींनी' गुरुजींच्या वर्गाचे इन्स्पेक्शन केले तर खाली श्री सुनीत, श्री चतुरंग, श्री बिरुटे यांच्यासारखे विद्यार्थी नियम धाब्यावर बसवत आहेत. आता कुठे दाद मागावी बरे?
अवांतर (प्रस्तुत प्रतिसादासाठी): गुरूजी गृहपाठ सोडवण्याची इच्छा आहे पण हरिवंशरायांची रुबाई कुठे शोधायला जावे बरे?
____________________________________
निसर्ग आटला तेव्हा शस्त्रे आली
स्वातंत्र्य जाचले तेव्हा धर्म आला
तसेच त्यांनी सोडवलेला गृहपाठ न पाहता प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीरी.
____________________________________
निसर्ग आटला तेव्हा शस्त्रे आली
स्वातंत्र्य जाचले तेव्हा धर्म आला
कविता नाही गझल नाही, शब्द घेऊन फिरतोस का ?
हौस मोठी प्रतिसाद नाही, वाचक माझ्यावर रुसले का ?
ओस पडल्या कविता इथे, जराशी बहार ये़ईल कधी
घासकडवीच्या नादी नाही, पण रुबाई मला जमेल का ?
-दिलीप बिरुटे
जसजसा अभ्यासक्रम पुढे जाइल तसतशी क्लिष्टता वाढत आहे. विषय समजतोय पण गृहपाठ करायला मन धजेना! त्यात प्रेम, मधु, शाला असले कठिण विषय सुरु झाल्याने काहीही सुधरत नाहीए. त्यात हे दिपोटी सारखे सारखे येउन धडकी भरवत आहेत. (इथे इंचाचे वांदे आहेत आणि दिपोटी मिटरमध्ये मोजताहेत!) 'मोकळ्या मनाने' गृहपाठ करावा तर इतर विद्यार्थी नियम तोडला म्हणुन आरडा-ओरडा करतात! फारच डेंजर स्थिती आहे. हा कोर्स ऑडिट करावा लागेल की काय असे वाटु लागले आहे. मास्तरांकडुन अधिक वेळ मागुन घेत आहे, मागील धड्याचाच अभ्यास झाल्या नसल्याने कीती वेळ लागेल कोण जाणे?
पूर्ण करण्यासाठी प्रेम, मधु वगैरे गोष्टी आवश्यक नाहीत. ज्यांना त्याबद्दल ज्ञान व अनुभव आहे अशांसाठी पहिला गृहपाठ सोपा जाईल. (कोणी तो पूर्ण केला नाही ही बाब वेगळी. सगळ्यांनी स्वत:लाच शहाणं समजून आपापल्या रुबाया लिहिल्या...) पण ज्यांना मधुशालाची रुबाई लिहायची नसेल त्यांच्यासाठी दुसरा, अधिक साधारण पर्याय उपलब्ध आहेच ना. तुमच्या अनुभूतीतल्या रूपकांचा वापर करा. अनुभूतीशिवाय काव्य म्हणजे वांग्याशिवाय भरीत - नुसतं शब्दांचं भरताड...
आता उदाहरणच देतो. जर कुणाला अॅरिझोनामधल्या महोत्तम घळीविषयी अनुभूती असेल, तर तिचाच वापर करता येईल.
महोत्तम घळ - आयुष्य; कोलोरॅडो नदी - संज्ञाप्रवाह; वाहून गेलेले - विस्मृती; शिल्लक - आठवणी
महोत्तम घळ - विश्व; कोलोरॅडो नदी - काळ; वाहून गेलेले - अशाश्वत; शिल्लक - शाश्वत
महोत्तम घळ -ज्ञान; कोलोरॅडो नदी - वैज्ञानिक विचारपद्धती; शिल्लक राहिलेले - ज्ञानशिल्प कलाकृती (न्यूटन, आइन्स्टाईन, डार्विन वगैरे); वाहून गेलेले - मूर्खपणा, अज्ञान, अंधश्रद्धा (नाडी वगैरे...)
प्रयत्न करून बघा. निदान वाक्यं तरी लिहा - यमक, छंद वगैरे फाट्यावर मारा.
(मला नक्की नीट आठवत असेल तर आपण एका बालकवींच्या काव्य विडंबनापलिकडे कधी गृहपाठ म्हणून सबमिट केलेला नाही...हम्म्म्म्म... यावेळी जरा व्यवस्थित काहीतरी द्या नाहीतर एटीकेटी घ्यावी लागेल)
राजेश
प्रतिक्रिया
क्रिकेट होई मधुशाला
मस्त हं...!
थोडीशी असहमती
उत्तम रुबाई
जालतिठा
वा वा क्या बात है!!
जालतिठा दारूगुत्ता
मालक ताता
काय करावे?
मधुशालेचा दुवा
दिपोटींचे आभार
श्री अक्षय पूर्णपात्रे
जमली का ?
एकाकी जिवन
वा वा...
जसजसा
गृहपाठ