थोडी असेलही कदाचित पण मला आमच्या कार्यालयात मुंबईचे जे २२ ते ३६ वयोगटातले मराठी तरुण भेटले त्यांचे वर्णन अगदी मी केले तसेच आहे. मी म्हटल्याप्रमाणे अपवाद असणारच नव्हे आहेतच पण विशेषतः मुंबईचा मराठी तरुण वर्ग थोड्याफार फरकाने असाच आहे असे माझे निरीक्षण आहे. सर्वसाधारणपणे अगदी अशी परिस्थिती नसली तरी याच्या अगदी जवळपास जाणारी नक्कीच आहे. :-)
तसा मी जळगावचा पण आता बरीच वर्षे पुण्यात राहत असल्याने "पुण्याचे का?" या प्रश्नाला "हो" असे उत्तर देण्याइतका इथे रुळलो आहे. :-)
धन्यवाद,
समीर
माझे म्हणणे अगदी उलट आहे... ते २२-२६ तरूण हे अपवाद असावेत. :) अर्थात मुंबईत राहून हे मत आहे.. तुम्ही मुंबईबाहेरून मत बनवले आसेल. ;) बाकी पुण्यात अगदी आवर्जून बाँबे म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. सर्वच स्तरातली. पण आता मराठी विषयीच्या आंदोलनानंतर मुंबईतली तरूण मंडळी जास्तच जागरूक झाली आहेत. आणि नटरंग तर मुंबईत अमराठी मंडळींमधेही गाजला आहे असे ऐकतो आहे.
बिपिन कार्यकर्ते
आता तर मुंबईतली कॉलेजची मुलंही एकमेकांना सांगतात की मी काल अमुक मराठी पिक्चर पाहीला म्हणुन्,हे काही वर्षांपुर्वी अस नव्हत.
समीर,आज तुमचे वर्णन पहील्यासारखे(आधीच्या परीस्थीतीसारखे) जुळत नाही....
पण ते पुर्ण चुकही नाही.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
२२-२६ वयोगटातले उलट जास्त हिंदाळलेले आहेत. त्याला कारण म्हणजे आता २२-२६ वयोगटात असणारे तरूण मुख्यत्वेकरून इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मराठीचा संबंध अगदी फक्त घरात बोलण्यापुरता असतो. शिवाय बाहेर सर्वत्र हिंदी वातावरण म्हटल्यावर तेच संस्कार शाळा-कॉलेजात होतात. आपसूकच मराठी लेखक, वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स, चित्रपट यांना अडगळीत टाकले जाते. शिवाय मराठी माणसाला (तमाम) मराठीचा न्यूनगंड अनादी काळापासून आहे. अजूनही मी मराठी चॅनलवरचा अजय-अतुल यांचा गाण्याचा कार्यक्रम पाहिला या वाक्याने त्यांची उत्सुकता जेवढी चाळवली जात नाही जेवढी सब चॅनलवर 'तारक मेहता का उलटा चष्मा' पाहिले या वाक्याने चाळवली जाते. समोरचा माणूस थोडा टापटीप दिसल्यावर त्याच्याशी त्याने मराठीत सुरुवात करूनही हिंदीत बोलणारे मराठी महाभाग कमी नाहीत.
पुण्यात अजूनतरी मुंबईपेक्षा मराठी जास्त बोलले जाते. शिवाय मराठी चित्रपटांचा ७०% व्यवसाय पुण्यातच होतो हे ही विसरता कामा नये. 'रेस्टॉरंट', 'रीटा', 'गंध', 'गैर', 'उत्तरायण', 'कॅनव्हॉस', 'एवढसं आभाळ', 'आनंदाचं झाड', 'मातीच्या चुली' इत्यादी वेगळी वाट चोखाळणार्या मराठी चित्रपटांना पुण्यात चांगला व्यवसाय मिळाला. 'नटरंग', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे चित्रपट तर पुण्यात ११-१२ आठवडे चालले.
--समीर
लेख मस्तच, पण अपवादापेक्षा बरेच जास्त नग आहेत हो मुंबैत मराठी बोलणारे!
असो, आणखी एक सांगायचं म्हणजे कुसुमाग्रज, पुलं, विंदा वगैरे नावं माहित असतात कारण बालपण कुस्करणार्या मराठीच्या पुस्तकांमधून हेच लोकं भेटतात! (आमच्या शाळेत भाषेचे शिक्षक असे होते म्हणून मी त्याला बालपण कुस्करणं वगैरे म्हणते. अलिकडे मराठी आणि इंग्लिशशी वैर राहिलेलं नाही आहे.) तर मुद्दा हा की आजही माझ्या भावाचं स्पष्ट मत आहे, जे लोकं पाठ्यपुस्तकात भेटत्/ले नाहीत, उदा. कविता महाजन, मिलिंद बोकील, प्रकाश संत वगैरे लोकं काही खास नाहीत. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाने का मराठी साहित्यच वाचलं पाहिजे, एखाद्या मराठी माणसाला गवंडीकामातच रस असतो.
अदिती
तात्या,
धन्यवाद. आपल्याला इथे भेटणारी मुंबईकर मंडळी ही अपवाद असणारच पण मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूं की जो कहा हैं सच कहा हैं और सच के सिवा और कुछ नही कहा हैं. :-) माझ्या कार्यालयात आतापर्यंत मी तीन मुंबईकर मराठी तरुणांसोबत काम केले आहे. आणि अजून इतर ४-५ मुंबईकर मित्रांसोबत राहिलेलो आहे. ते अजिबात मराठी वृत्तपत्र वाचत नाहीत. तसही आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्र वाचणार्या तरुणांची संख्या रोडावली आहेच. एका मुंबईच्या मित्राला पुलंविषयी विचारल्यावर त्याची प्रतिक्रिया "वो मराठी ऑथर ना? कॉमेडी लिखते थे..." अशी होती. :-)
--समीर
थोडं अवांतरः तुम्ही आजकाल म.टा. वाचता का? म.टा. ची ऑनलाईन आव्रुत्ती वाचनीय पेक्षा प्रेक्षणीय झालेली आहे. मला तर इच्छा असूनही म.टा. वाचावासा वाटत नाही. लोकसत्तावर (ऑनलाईन) वर बातम्या एक दिवस उशीरा दिसतात. अश्या वेळी IBNLIVE.com किंवा NDTV.com शिवाय पर्याय उरत नाही.
मुंबईकर मराठींचे दोन गट पडतात - एक, ३०+ वयाचे. जे बहुतांशी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यांच्याबाबतीत वरील वर्णन हे केवळ अतिशयोक्तीच नव्हे, तर तद्दन चुकीचे आहे.
आणि दोन, ३०- वयाचे, जे बहुतांशी इंग्लीश माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. ह्यांचे इंग्लीश वर्णन केल्याप्रमाणे यथातथा नव्हे, तर बर्यापैकी सफाईदार असते. हां, ह्यांच्या तोंडी हिंदी पटकन येते (मराठीपेक्षा) परंतु, ह्यांचे मराठी काय किंवा हिंदी काय, अर्ध्याहून अधिक इंग्लीश शब्द वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. ह्यांना पुल ऐकून ठाऊक असतात पण सुर्वे, ग्रेस वगैरे मडळी ठाउक नसतात, हे मात्र खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रिय सुनील,
आजच २-३ तासांपूर्वी माझ्याच क्युबिकलमध्ये बसणार्या एका मुंबईकर मराठी माणसाला (वय वर्षे ३६) विंदा करंदीकर नावाचे एक कवी होते; त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि नुकतेच त्यांचे देहावसान झाले हे माहित नव्हते. त्याला सांगीतल्यावर त्याचा चेहरा कुणीतरी हिब्रू भाषेतून बोलल्यावर कसा असेल तसा होता. मग काही सेकंदांनंतर तो "आय डोण्ट नो अबाऊट धिस" असे काहीतरी पुटपुटला आणि कामाला लागला.
मराठीचा न्यूनगंड हे एकमेव कारण यामागे आहे. कुणाशीही बोलतांना आधी हिंदीतून सुरुवात करायची हे तर आता पुण्यातही नित्याचेच झाले आहे. एक मराठी मित्र माझ्याशी ज्ञानेश्वरांच्या गीतांवरही हिंदीतून बोलायचा. आणि बोलतांना त्यांने पंजाब्यांसारखी "चल कोई नई" अशी लकब अगदी प्रयत्नपूर्वक लावून घेतली होती. 'चक दे इंडिया' मधली एक माजोर्डी मुलगी हे पालुपद सतत म्हणत असते. आता अशा लोकांचे काय करावे?
--समीर
समीरच्या निरिक्षणाशी सहमत. तरुण वर्गात ( < ३०) हे लोक बरेच आढळतात. मी तर आपल्या आईवडिलांना देखील मराठी सोडून हिंदीत बोला असे सांगणारे लोक ही पाहिले आहेत. आणि हे साउथ मुंबई किंवा पश्चिमेच्या उपनगरातले नाहीत तर ठाणे डोंबिवली कडचे लोक.
तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित. अर्थात एक आहे. अशा लोकांचे मित्रमैत्रिणी हिंदी, गुजराती, मराठी असे सगळ्याच भाषा बोलणारे असतील त्यामुळे सवय लागत असेल पण म्हणून मराठी बोलणे तुच्छ समजणे पटत नाही. अशा मित्रांपैकी दोन मराठी जरी भेटले तरी लगेच हिंदीत बोलायला सुरू करतात. वाईट वाटते ते याचे.
बाकी समीरची भवितव्याची शंका रास्त. पण किती आणि काय बोलावे?
- ओंकार.
तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित.
तात्याचे माहित नाही... माझ्या बाबतीत असेल बहुतेक हे खरे... काही कल्पना नाही ब्वॉ!!! ;)
बिपिन कार्यकर्ते
असलं वाचताना पाणी वगैरे पिऊ नये. कंप्युटरचा स्क्रीन, कीबोर्ड इत्यादी निकामी होऊ शकतात...
मुंबईत नाही म्हटलं तरी मराठी माणूस राह्यलाय कुठे? पण म्हणून पुण्याच्या लोकांनी इतकं चढून जावं आणि मूठभर राहिलेल्या मुंबई-मराठीकरांना हिणवावं काय? त्यांना विक्षिप्त पाट्या लिहिता येत नाहीत म्हणून काय झालं? (चला चर्चेला एका दगडात दोन धागे फोडले... आता चटकन झाडावर चढून बसायचं)
राजेश
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
धम्याला कांपिटीशन ... तो कॉफी उडवायचा, तुम्ही पाणी!
अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत असं अलिकडेच कुठेतरी वाचलं होतं, आता चटकन संदर्भ आठवत नाही आहे.
मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली!
अदिती
मुंबईत मराठी माणसांचं प्रमाण फक्त 28 टक्के आहे.
दुवा :---
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=44202707
हा आकडा २००३ चा आहे म्हणजे आता किती टक्के उरले असतील ?:?
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली!
सहमत... नुसता विक्षीप्तपणाच नाही काय, अजून बरेच काही आहे त्यात...(जसे खवचटपणा...)
त्याचं काय आहे ना, कामधंद्यामुळे आणि पोटापाण्यासाठी बरीच मुंबईची लोकं आलीत पुण्याला ... एक्स्पोर्ट माल घेवून.
=)) =)) =)) =))
-
अफाट जगातील एक अडाणि.
खरचं खरा आकडा कळेल का कधी ?
काही दुवे:---
http://bit.ly/d6SdcQ
http://bit.ly/aGElKW
(मुंबईतील मराठी माणुस नक्की राहतो कुठे ? :?)
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो,
हे लिहील्याबद्दल धन्यवाद.
मी ज्या त्या ठिकाणी स्थानिक भाषा बोलणेच चांगले समजतो,.
दुसरी: हो, वैसाईच हैं वो ही कुठली? :)) व तितली का? यावर पण २ उतारे लिहा समीर.
बाकी जे मुंबईकराचे वर्णन दिलेय ते ईंग्रजी माध्यमात शिकलेले असतात असे आमचे ठाम मत.(आम्ही मुंबईच्या बॉर्डर्वर राहतो,न ओळखता येणा-या व्यक्तीरेखेत)
५०वर्षांनंतरच बोलाल तर मराठी खुप अभिमानाने जगणार आहे,तिला आधी न भेटलेले चांगल रुप भेट्णार आहे,इंटरनेट्वर खुप पसरणार आहे.___हे सर्व निष्कर्ष आमचे स्वःताचे,आमच्याशिवाय त्यांना दुस-या कशाचा आधार नाही.
लेख फार छान वाटला वाचायला,धन्यवाद.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
मी ज्या कॉलेजमध्ये होते तिथे सगळी आंतरराष्ट्रीय जनता! त्यांना मराठीच काय, हिंदीही जेमतेम ( ४-५ शब्द) आणि इंग्रजीही कसंबसं कळायचं. ती जनता इंग्रजी बोलायला लागली की अगदी कान देउन ऐकलं तरच काय बोलतात ते कळायचं. इतर जनता म्हणजे मल्लू, तेलुगू, उत्तर प्रदेशी व थोडेफार मराठी. त्यात अनेक मराठी लोक गावाकडून आलेले असायचे. त्यांचं मराठी ग्रामीण धाटणीचं... हिंदीही यथातथाच आणि विंग्रजीचं तर काय बोलूच नका ना भाऊ! त्यामुळे ते त्यांचा ग्रुप सोडला तर गप्पगप्पच असायचे.
आता अशा कॉलेजमध्ये मग वरच्या लेखाप्रमाणेच संवाद कानी पडून पडून, कॉलेज संपले तरी आजूबाजूला असेच दिव्य भाषा नमुने ऐकायला मिळाल्याने कानांना त्यांची सवय झाली आहे. त्यात खटकवून घ्यायचं ठरवलं तर खटकतं. नाहीतरी ही नवी हिंग्लीश/ मिंग्लीश भाषा सध्याच्या पिढीचा 'ट्रेडमार्क' आहे. आणि त्यात इंग्रजी क्रियापदांना मराठी प्रत्यय किंवा मराठी/ हिन्दी क्रियापदांना इंग्रजी प्रत्यय लावून वापरणे 'फॅशनेबल' (!) समजले जाते. उदाहरणार्थः पोस्टलं, टायपलं, एसेमेस्लं, रटोफाय करना वगैरे वगैरे. त्यातूनच मराठीचे नवे उत्क्रांत रूप पाहावयास मिळेल कदाचित! आणि सध्याच्या मराठीला 'ए कस्ली ओल्डी टाईपची मराठी आहे ना?!!!' असे शेलके शेरे ऐकणे नशीबी येईल!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
लेख चांगला आहे. पण अतिशयोक्त आहे. का हो समीरसूर, मराठी भाषा हे काही पुणेकरांचं राखीव कुरण नाही. त्यांच राखीव कुरण आगाऊपणा हे आहे हे एकवेळ मान्य होऊ शकेल. आणि असं जरी असेल तरी लगेचच मी आरोपांची राळ उडवणार नाही की पुणेकर म्हणजे एक नंबर आगाऊ. छ्या, ह्या मुळामुठेच्या पाण्यातच काहीतरी दोष आहे.
(३० पेक्षा कमी वय असलेला मराठी अप्पा.)
- फारच राग असेल तर तीर्थरुपांना 'बाप' म्हणावे. 'पप्पा' किंवा 'डॅडी' अशा शिव्या देऊ नयेत.
ए अप्पाच्या पप्पा...
खारं पाणी पिणार्याला नदीच्या पाण्याची चव नाही कळणार.
नको उगा बोट घालु.
तुला काय बोलाचय ते धागाप्रवर्तका बद्द्ल बोल.
ऊगी लै टिवटिव नको.
प्रिय अप्पा,
अहो मी माझा अनुभव सादर केला आहे आणि माझा मुद्दा फक्त मराठी वापरणे आणि मराठी वापरायला न लाजणे असा आहे. मला खूप ज्ञान आहे, माझे मराठी खूप उच्च दर्जाचे आहे किंवा माझ्याकडे काहीतरी विशेष आहे असं अजिबात नाही. मी एक अगदी सामान्य कुवतीचा माणूस आहे. पण चार मराठी माणसं असतांना सरळ सोप्या मराठीत बोलायला लाजू नये, मराठीतलं ते फालतू असं कुणी मानू नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. याच्या अनुषंगाने मुंबईतल्या वातावरणामुळे आणि मराठी बोलण्याबाबतच्या न्यूनगंडांमुळे मुंबईतल्या तरुणांविषयी मी माझी काही निरीक्षणं आणि अनुभव मांडलेले आहेत. मराठी भाषा ही पुणेकरांचे राखीव कुरण अजिबात नाही. मराठी जळगाव, अकोला, कोल्हापूर अशी अवघ्या महाराष्ट्रात बोलली जाते, विविध रुपात आणि ढंगात बोलली जाते आणि तशी ती टिकावी म्हणून हा लेखप्रपंच. यात पुण्याच्या मक्तेदारीचा लवलेशही मला दिसला नाही. किंबहुना मराठी ही सगळ्याच मराठी लोकांची मक्तेदारी/कुरण व्हावे आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक आणि आभिमानपूर्वक मराठीचा वापर आणि विस्तार व्हावा म्हणूनच हा लेख लिहिलाय ना! :-) कुणालाही दुखावण्याचा हेतू अजिबात नाही. चू. भू. दे. घे. :-)
--समीर
समीर साहेब,
तुमचं निरीक्षण अचूक आहे. पण सरसकट अख्ख्या तरूणाईला यात खेचणे जरा अति होते. शितावरून भाताची परीक्षा या बाबतीत जरा अयोग्य वाटतेय! वानगीदाखल सांगायचं तर, आमच्या साठ्ये कॉलेजमध्ये दरवर्षी अॅन्युअलला दोन कार्यक्रम होतात. सकाळी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि संध्याकाळी हिंदी-इंग्रजी गाण्यांचा कार्यक्रम! माझ्या आठवणीप्रमाणे, मी कॉलेजात असताना तीनही वर्षं मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. (आणि मला अवघी ४ वर्षे झालीयेत हो कॉलेज सोडून!)
पण तुमच्या नाण्याची दुसरी बाजूही चुकीची वाटत नाही. मीही असे बरेच नग पाहिलेले आहेत जे हसत हसत "मला मराठीची तितकी सवय नाही" असं सांगतात! याच २२-२६ वयोगटातले! पण त्यातल्या बर्याच जणांना "आम्हाला कधी मराठीत कुणाशी कॉन्वर्झेशन करायचा चान्सच मिळाला नाही रे. मराठी बोलतो ते फक्त आम्च्या पेरंट्स शी!! त्यांच्याशी काय बोलणार कप्पाळ!! आमचे सगळे फ्रेण्ड्स नॉन महाराष्ट्रीयन्स**" असं खेदाने नमूद करतानाही पाहिलंय!! बरं असंही नाही की अशा सर्वांचेच पालक त्यांना लहानपणापासून मराठी भाषेशी संपर्क ठेवण्यापासून परावृत्त करतात.. ( म्हणजे असे करणारे आहेत काही महाभाग पण काय करणार अशांना आपण??) माणूस ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो! त्यामुळे मुंबईतल्या युवा मराठी जनतेबद्द्लच तुम्ही काढलेलं अनुमान काही प्रमाणात अचूक असेलही पण सगळ्या मुंबईकरांना नक्कीच लागू नाही हां ही थिअरी!! :). सध्याचे नवे मराठी चित्रपट, नवनवीन मराठी गाणी (त्यातही शंकर, सुनिधी, श्रेया असे अमराठी कलाकार मराठी गाणी गाताहेत हे पाहून) यांच्या निमित्ताने का होईना, मराठी भाषेपासून दुरावलेला जो तरूण वर्ग आहे तोही आज मराठी भाषेकडे वळतोय!! अर्थात ज्यांना मराठी 'न्यूजपेपर' मधली एक 'हेडलाईन' वाचायलाच दोन-चार मिनीटं लागतात त्यांच्याकडून मराठी साहित्याबद्दलच्या ज्ञानाची अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात तळं शोधण्यासारखं! पण त्या रूक्ष वातावरणातही एखादं 'ओअॅसिस'ही सापडतंच!! तसे माझ्या माहितीतही वर नमूद केल्याप्रमाणे "ओह माय गॉड, 'साहित्यिक' हा वर्ड आज कित्ती वर्षांनी ऐकला मी!!" म्हणणारे कोकणस्थ ब्राह्मणही पाहिलेत मी! पण त्याचबरोबर, त्यांचा "आपण आज मराठीतून शुद्ध बोललो" याचा आनंद गगनात मावेनासा होतानाही पाहिलंय. आणि तेव्हा सगळ्यांना सरसकट 'त्या' श्रेणीत बसवणं मनाला पटत नाही!
बाकी चालू द्या!
** अशा शब्दांबद्दल एकदा चर्चा करायला हवी! महाराष्ट्रीयन हा शब्द अनेक मराठी वृत्तपत्रांत वाचलाय मी! तसंच आयुर्वेदिक हा शब्दही मराठीत सर्रास वापरला जातो!! शी 'वेदिक' काय! वेदांचा अपमान केल्यासारखं वाटतं!
असो.
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
(मथळा सौजन्य - केसरी)
समीरसूर,
अहो, तुम्ही इतकी समजूतदार भूमिका घेतल्यावर बोलणेच खुंटले. मला वाटलं होतं थोडी खणाखणी होईल आणि अंमळ मौज येईल. असो. मनावर घेऊ नका. बाकी तुम्ही मूळचे पुण्याचे नाही याची खात्री पटली.
मी मुळचा जळगावचा आहे परन्तु शिक्शणच्या निमित्ताने मी "पुणे" व "मुम्बईत" वास्तव्य करुन आहे ह्या काळातील अनुभव लक्श्यात घेतल्यास मी या लेखातील विचारास काही अन्शी सहमत आहे...... अपवाद असु शकतात पण बहुतान्शी तरुण नोकरदार वर्ग असाच आहे...ह्यात पुणेकर आणि मुम्बईकर हा वादचा विषय होऊ शकत नाही...[येथे मी कोणाचेही मन दुखवू ईच्छित नाही]
या समस्येवर उपाय मात्र शोधणे ही काळाची गरज!!!!
[महाराष्ट्रीय मराठी]"राजे!"
समीरसूर ह्यांच्याशी मी बराच सहमत आहे, अगदी खास, जुना(ट) मुंबईकर असून.
भाषेच्या संदर्भात मुंबईव्यतिरीक्त महाराष्ट्रातील इतर शहरांचे व गावांचे माहिती नाही, मुंबई सोडूनही मला आता जवळजवळ दोन दशके होत आहेत. तेव्हा तेथील विशीतील पिढीविषयी मला स्वतःला काही फार अनुभव नाही. पण सर्वसाधारणपणे जे माझ्या तेथील भेटींत, माझ्या नात्यातील तरूण मुलांमुलींच्या बाबतीत जाणवले ते समीरसूर ह्यांनी लिहील्याप्रमाणे आहे. ही सर्व मुले अगदी खास मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील, तेव्हा हे पुरेसे प्रातिनिधीक मानावे असे मला वाटते.
तसेच माझ्या एका समवयस्क मुंबईकर मित्राने सांगितलेला अनुभव असा: कामानिमीत्त तो व त्याचे काही तरूण मुंबईकर मराठी सहकारी कामानिमीत्त इंगलंडला गेले असतांना, तेथील वास्तव्यात ही मुले बसमधे मागील बाकावर बसून एकमेकांशी मोठ्यामोठ्याने हिंदीतून बोलत असत. ही सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
मुंबईतील मराठी वर्तमानपत्रातून जी मराठी लिहीली जाते त्याविषयी मी तरी आता तक्रार करायचे सोडले आहे. तरीही अलिकडे हे पाहून राहवले नाही. 'ते दोघे कसारा जात होते', 'एक व्यक्ति ट्रेनमधे चढला'.. इ. हे फारच होते, तेव्हा मी कळवळून माझ्या मुंबईतील एका मित्राकडे त्याचे लक्ष वेधले. हे असे फॅशन म्हणून लिहीले जाते की त्या वार्ताहरांना आता सरळ चांगली मराठी येतच नाही, हा प्रश्न मला पडला आहे. कदाचित ही दोन्ही कारणे असू शकतील.
इथे भाषेच्या संदर्भात चर्चा चालली आहे, तरी अनेक उल्लेख मराठी (तरूणां)च्या आपल्या संस्कृतिच्या सामान्यज्ञानाच्या संदर्भातील आहेत. त्याविषयी मुंबई व पुणे येथून आमच्या येथे आलेल्यांच्या बाबतीत काही फार फरक आहे असे मलातरी दिसलेले नाही. अलिकडेच एका स्पर्धेत 'संगीत स्वयंवर' कोणी लिहीले ह्याचे उत्तर अगदी हिरीरीने हात वगैरे वर करून 'बालगंधर्वांनी' असे एका तरूणाने दिले होते. बाकी 'पिपात पडले मेल्या उंदीर' पासून 'देणार्याने देत जावे', 'ह्या शेताने लळा लाविला..' ह्या सर्व कवितांचे कवी 'कुसुमाग्रज' होते असे मुंबई- पुण्याची तरूण मुलेमुली स्पर्धेत सांगत होती!
दाक्षिणात्य मुले आपापसात कधीच हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलतांना दिसत नाहीत, अगदी त्यांना हिंदी किंवा इंग्रजी येत असले तरी! मग मराठी लोकांना काय साप चावतो की काय एकमेकांशी बोलतांना? आणि अधून-मधून इंग्रजी वाक्ये फेकणे ही आणखी आवड मराठी जनांची. "यु नो व्हॉट, गोईंग फॉरवर्ड, धिस इज गोईंग टू बी अ बिग प्रॉब्लेम." असल्या धरतीची वाक्ये पिस्त्याची पखरण केल्याप्रमाणे फेकली की आपण अगदी हाय-क्लास होतो हा समज मराठी लोकांमध्ये कुठल्या गाढवाने भरवला आहे कुणास ठाऊक. आणि मुळात मराठी बोलणे, वाचणे, पाहणे, ऐकणे आणि मराठीचा वापर संवादाची भाषा म्हणून करणे याचाच आपल्या लोकांना एवढा न्यूनगंड असतो की तळपायाची आग मस्तकाला जाते. तसेही मराठी माणसात सगळ्यात जास्त काय असेल तर न्यूनगंड! मराठीचा न्यूनगंड, चारचौघात धीटपणे बोलण्याचा न्यूनगंड, धंदा-व्यवसाय करण्याचा न्यूनगंड, सपासप बोलून समोरच्या व्यक्तींवर छाप पाडण्याचा न्यूनगंड, काहीतरी पुढाकार घेऊन एखादे कार्य तडीस नेण्याचा न्यूनगंड....ही मनोवृत्ती बदलायला हवी. परवा पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात एक साफसफाई करणारी मराठी मावशी आणि एक सेक्युरीटी करणारी मराठी महिला यांच्यातला संवाद मी ऐकला. दोघी तोंड भरून मल्याळी परिचारिकांचं कौतुक करीत होत्या. किती काम करतात आणि रात्रपाळीला एक क्षण झोपत नाहीत किंवा चेहर्यावर अजिबात थकव्याचा किंवा जागरणाचा लवलेशही नसतो आणि पटकन धावून जातात, रुग्णांची मनापासून सेवा करतात आणि विशेष म्हणजे सौजन्याने आणि आपुलकीने बोलतात इ. मल्याळी परिचारिकांचे मनापासून केलेले कौतुक ऐकून माझे हृदय भरून आले. शेवटी दोन मराठी बायका हे कौतुक करत होत्या. असे विहंगम, दुर्मिळ दृष्य बघून मला गहिवरून आले. मराठी माणसाला दिलखुलासपणे दुसर्याचे कौतुकही करता येत नाही असा सर्वसाधारणपणे अनुभव असतांना हे दृष्य खरच अनुकरणीय वाटले. विशेषतः चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांकडून असे कौतुक ऐकायला मिळणे यावरून त्या मल्याळी परिचारिका खरच किती कर्तव्यतत्पर असतील याची कल्पना येते.
मराठी वाहनचालक ही अशीच एक हरहुन्नरी जमात. वेळेवर हूल देणे, स्वतःला कधी-कधी साहेब समजणे, छोट्या गोष्टी लक्षात येऊन दुर्लक्ष करणे, अजिबात वेळ न पाळणे, थापा मारणे, गुर्मीत वावरणे.....बदलायला हवे. उत्तर भारतीयांविरुद्ध गळे काढून काही फायदा नाही.
--समीर
मराठी/हिंदी मधील साम्य,महाराष्ट्रावर असलेला बॉलिवूडचा,उत्तर भारतिय संस्कृतीचा प्रभाव ह्याला कारणिभूत असेल का? की मराठी भाषेचा पाया इतर भाषांच्या(दाक्षिणात्य्/बंगाली वगैरे) मानाने ठिसूळ आहे?ईतर भाषिकांना(तामिळ्/तेलुगु/कन्नड) भाषिकांना जेव्हा मी हे सांगतो तेव्हा त्यांच्या भाषेबद्दल एवढी चिंता क्वचितच व्यक्त होताना दिसते असे ते म्हणतात.(वरील भाषिकांची संख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी आहे !!)
भेंडी
P = NP
समीर सूर यांनी व्यक्त केलेले त्यांचे निरीक्षण अगदीच काही मान्य करता येणार नाही, मात्र ते सरसकट नाकारताही येणार नाही अशी अवस्था झालीये मराठीची (म्हणजे कोमात गेलेली व्यक्ती धड जिवंतही नसते आणि मेलेलीही नसते.....तसं काहीतरी).
मराठी आवर्जून (?) बोलणारे आणि आपोआपच बोलणारे माझ्याही पाहण्यात आहेत. जर "मराठीचं पुनरुज्जीवन" ही एक लढाई मानली किंवा एक व्रत मानले तर आपणा सर्वांनाच ती नेटाने लढायची आहे आणि जिंकायची सुद्धा !!! मराठीच्या पिचेहाटीला सर्वस्वी मराठी माणूसच जबाबदार आहे,युपी-बिहारी नव्हेत.
मराठी टिकवण्यासाठी आपण सगळेच एकमेकांशी मराठीतच (समोरचा मराठी असो वा अमराठी) 'जणू काही घडलेच नाही' अश्या रीतीने बोलण ठेवलं की परिस्थिती सुधारण्यास नक्की हातभार लागेल....काय म्हणता?
आपला,
नवी मुंबईकर
विनोदासाठी अतिशयोक्तीचा आधार घेतलाय हे निश्चित पण बिघडत नाही!
(खुद के साथ बातां : रंगा, कलगीतुरा सुद्धा सुर झालेला दिसतोय - पुन्हा थोड्या वेळाने तंबूत डोकावून जावे म्हणतो! ;) )
(बारा गावचं पाणी प्यालेला)चतुरंग
छान लिहलय...:)
मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा...
झारखंड-कोल्हापुर ट्रेन चालु झाल्यावर किती जणांनी त्याला विरोध केला होता त्यावेळी ? आता झारखंडवरुन इथे कोल्हापुरात कोणी तमाशाचे कलाकार तर येणार नव्हते...लोंढे येतायत...ते जसं वागतात तसच आम्हीही वागायला लागलोय आणि बोलायला तर कधीचेच.
महाराष्ट्रात काही दिवसांनी सगळेच मंत्री उत्तरभारतीय असतील आणि त्यांचे सेवक आजचे मराठी नेते-मंत्री असतील...
मराठी शाळाच बंद होतात तर मराठी बोलायचे कष्ट तरी कोण घेणार ???
सांग सांग भोलानाथ ऐवजी मेरी हॅड अ लिंटील लँब जिंदाबाद अजुन काय !!!
सांग सांग भोलानाथ ऐकुन बरेच दिवस झालेत ना ?
मग आता इथे ऐका :---
http://www.youtube.com/watch?v=5IaM5xNW5CI
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
आम्ही ही लहानपणी 'अम्मी, बाजी कहती थी ...चांद पे परियां रहती थी ' पासून ते 'अस्सावा सुंदर चोकलेट चा बंगला ..चंदेरी सोनेरी ...' सरसकट म्हणायचो पण माझ्या ताईची मुलगी मात्र 'रिंगा रिंगा रोझेस अन सगळ्या ईंग्लीश नर्सरी राईमस च म्हणते शाळेतलं वातावरण ही अगदी एंग्रजाळलेलं.... सगळंच फिरंगी .... :-(
खरच बालपणाचे दिवस कित्ती छान होते नाही आपले :-)
~ वाहीदा
समीर, छान लेख. असे नग मी पण पाहिले आहेत. ( इथे खूप मॉस्क्यूटो आहेत असे म्हणणारी मुलगी एकदा भेटली होती.)
आपल्या लेखात अतिशयोक्ति आहे असे वाटत नाही.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
अरे देवा! आता हो काय करायच? छ्या! पूर्वीचं बॉम्बे राहिलं नाही!
बाकी, सामीरसूर, तुमच्या प्रसंगांमध्ये, "ती", "पहिली", "दुसरी", "तिसरीच" इ.च जास्त! मज्जा आहे बुवा. नाही म्हणायला एक शुंभ आहे! बाकी, मुलींचे सर्व मित्र (आपल्या स्वतः शिवाय) शुंभच असतात म्हणा.
खरं पाहता अमेरिकेत राहून मुलीच्या भाषेचं भजं झालय. आम्ही प्रयत्न केले पण ते फारसे फलद्रूप झाले नाहीत. असो तो वेगळा मुद्दा.
एकदा रिया अमेरीकेत स्वच्छतागृहात गेली होती. मी बाहेर थांबले होते. बराच वेळ झाला ती येत नव्हती म्हणून मी विचारलं "काय करतेयस गं?"
उत्तर - आय अॅम पूसींग.
हे उत्तर मला कळलं पण काही अमेरीकन बायका ऐकून दचकल्या इफ यु नो व्हॉट आय मीन 8>
प्रतिक्रिया
मस्त
अतिशयोक्ती!
माझे
आता तर
नाही
आणि हो
बाकी
लेख मस्तच,
धन्यवाद!
थोडं
मुंबईकर
नॉट
वय ३६
सहमत *******चुक
छान
समीरच्या निरिक्षणाशी सहमत
अं... होहो...
धोक्याची सूचना
धम्याला
अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत ?????????????????
+१
>>अजूनही
टक्के... पण नक्की किती ?
मुंबईमधल्
दुसरी: हो,
उत्क्रांत मराठी!
लेख चांगला
मिष्टर
+१
ए
:-)
समीर
बोलणे फोल गेले
महाराष्ट्रीय मराठी
सहमत
बरोबर
हिंदीचे
मराठीचं पुनरुज्जीवन
लेख छान आहे!
मजेशीर
छान
अगदी छोटी असल्यापासून हे गाणं कुणी म्हटलं कीं कान टवकारायची!
पण अशी सुंदर बालगीते आता काळाच्या पडद्याआड जात आहेत
मस्त...!
समीर, छान
माझा एक
काय पण लोक्स असतात एकेक.
अरे देवा!
:-)
खरं पाहता