का उदास वाटते
नयनी पाणी दाटते
असून घोळक्यातही
एकलेच वाटते
बोलणे नको नको
मौन सुखद वाटते
विचारही मनी नको
रितेच मुक्त वाटते
शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे
उजाड माळरान हे
गंध, गारवा नको
श्रावणातही घना
बरसणे तुझे नको
जयश्री
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2392
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
शांत
कविता आवडली.
सुरेख... बोल
शांत
शांत
+१
नवीन लेख
In reply to +१ by शुचि
बोलणे नको
वाचायची राहिली होती
सुंदर रचना