Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 15:23
  • Log in or register to post comments
  • 6268 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 10/29/2009 - 16:02

Permalink

एक्स्पोर्ट सरप्लसची

असा एक्स्पोर्ट सरप्लस करण्यासाठी या लोकांना १२ महिने लागणारे जिहादाचे खत (की विष) पुरवले जाते आणि ते संपुर्ण अंगात भिनवले देखील जाते. सध्याचा नवा टोळी प्रमुख हकीमुल्ल्ह मसूद हा आता अनेक कारवाय पार पाडेल असेच दिसते. http://topics.nytimes.com/topics/reference/timestopics/people/m/hakimullah_mehsud/index.html हे राक्षस मेले असे पाकिस्तानी सरकार जाहीर करते व काही दिवसात हे आपले नवे व्हिडीयो प्रसारित करुन मोकळे होतात... http://www.youtube.com/watch?v=pJ24kzws5A4 (१२ ही महिने यांचा धर्म खतर्‍यामधे कसा असतो ? जिहाद चा खरा अर्थ या लोकांना तरी माहित आहे का ? ) :? मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 10/29/2009 - 16:02

Permalink

वास्तववादी!

की ’विस्तववादी?’ ;) मस्त लिहिलंय. ======== कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/29/2009 - 16:41

Permalink

शंका

भारतातून ब्रेन ड्रेन होण्याचं हेच कारण का? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 16:51

In reply to शंका by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

व्यनि पहा

व्यनि पहा ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on गुरुवार, 10/29/2009 - 20:47

In reply to व्यनि पहा by सुधीर काळे

Permalink

आम्हालाही

आम्हालाही दाखवा की.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 22:16

In reply to आम्हालाही by निमीत्त मात्र

Permalink

खरे नाव सांगाल तर दाखवेन

आपले खरे नाव कळल्यावर ठरवेन दाखवायचा कीं नाहीं. नुसत्या "निमित्त मात्र"ला दाखविण्यासारखा नाहीं! नाहीं तर 'open forum' वर नसता का लिहिला? सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 10/29/2009 - 22:21

In reply to आम्हालाही by निमीत्त मात्र

Permalink

दुसर्‍यां

दुसर्‍यांचं बघायची एवढी हौस पहिल्यांदाच पाहिली !! अभिंदन ! काका दाखवा हो ह्याला बी :) काय एकेकाची आवड ... असो
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 22:27

In reply to दुसर्‍यां by टारझन

Permalink

हाहाहा! हा मुद्दा लक्षात नव्हता आला!

हाहाहा! हा मुद्दा लक्षात नव्हता आला! ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on गुरुवार, 10/29/2009 - 19:27

Permalink

दहशदवाद हे

दहशदवाद हे ब्रेन ड्रेन मागच प्रमुख कारण असु शकेल अस मला तरी नाही वाटत. (हा कोणाला टोला असेल तर माहित नाही) काळे साहेब लेख अतिशय सुंदर लिहिला आहे. भारताने कारगीलच्या लढाईच्या वेळी पी.ओ.के घ्यायचा चान्स सोडला. त्यामागे काय राजकीय हेतु होता ते त्यांनाच ठाऊक.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 22:18

In reply to दहशदवाद हे by Dhananjay Borgaonkar

Permalink

धन्यवाद

धनंजय-जी, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. (लेख अतिशय सुंदर लिहिला आहे.) सहमत (दहशदवाद हे ब्रेन ड्रेन मागच प्रमुख कारण असु शकेल अस मला तरी नाही वाटत.) ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

Submitted by सायबा on गुरुवार, 10/29/2009 - 21:17

Permalink

लेख आवडला!

काळेसाहेब, लेख लै आवडला बघा! लिहा अजून आसंच!! सायबा
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 22:25

In reply to लेख आवडला! by सायबा

Permalink

धन्यवाद!

सायबा-जी, धन्यवाद! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on गुरुवार, 10/29/2009 - 21:58

Permalink

सुधीरजी

सुधीरजी ! इतक वास्तववादी लिखाण की भारत- पाकिस्तान मैत्रिचे गोडवे गाणार्‍यांना वाचुन झिट यायची.......बिचारे आखाती देशातुन काम करणारे पाकिस्तानी नागरिक सुट्टिवर देशात जायला देखिल घाबरतात याला कारण जिहादी .बाहेरुन आलेल्या व्यक्तीकडे मजबुत पैसा आहे असे एखाद्या अतिरेकीसंघटनेच्या निदर्शनास आले कि आलीच कंबख्ती........(कारण सर्वसामान्य माणुस कोण आणि अतिरेकी कोण हेच कळायला मार्ग नाही) स्वतःच जोपासलेला भस्मासुर त्यांचाच र्‍हास करतोय पण झाली चुक सुधारे पर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन गायब झालेल नसल म्हणजे मिळवल......? खुद्द मुशर्रफ़ यांच्या गाडीखाली बाँब उडवून त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न झाला. दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला. हे असेच काश्मिरी नेत्यांच्याबाबतीत झालेले प्रयत्न नेहमीच कसे फसतात? हे निदान मला न उलगडलेल कोड आहे. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 22:24

In reply to सुधीरजी by अनामिका

Permalink

आता या भस्मासुराला नष्ट करायला नवी 'मोहिनी' कुठून आणायची?

<<स्वतःच जोपासलेला भस्मासुर त्यांचाच र्‍हास करतोय>> मी अगदी हाच शब्द या संदर्भात इतरत्र वापरला आहे! आता या 'भस्मासुरा'ला नष्ट करायला नवी 'मोहिनी' कुठून आणायची हाच एक मोठा प्रश्न आहे. <<पाकिस्तानी नागरिक सुट्टिवर देशात जायला देखिल घाबरतात>> माझ्या ओळखीचे इथले पाकिस्तानीही कांहींसे असेच सांगातात, पण थेट outright बोलायला हिम्मत त्याना इथेही होत नाहीं. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on गुरुवार, 10/29/2009 - 22:47

In reply to आता या भस्मासुराला नष्ट करायला नवी 'मोहिनी' कुठून आणायची? by सुधीर काळे

Permalink

कलियुगात

कलियुगात भस्मासुराचा नाश करायला मोहिनीची गरज नाही .मोहिनी हे फक्त माध्यमच होत, पण पाकिस्तानने नकळतच स्वहस्ते इतक्या मोहिन्यांची निर्मिती स्वदेशातच केली आहे की आपल्याला नविन मोहिनी कुठुन आणायची याची चिंताच करायचे कारण नाही... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 10/30/2009 - 11:28

In reply to कलियुगात by अनामिका

Permalink

झियाच्या आणि बेनझीरबाईंच्या बाबत त्यांना यश मिळालं!

पहिलं यश त्यांना झियाच्या बाबतीत मिळाले होते! त्या पाठोपाठ बेनझीरबाईंच्या बाबतीत! आजच तुझ्या सिग्नेचरकडे लक्ष गेलं! Wow! मस्त आहे अर्थ! ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 10/30/2009 - 06:46

Permalink

एक्स्पोर्ट सरप्लस

एक्स्पोर्ट सरप्लस मुद्दा रोचक आहे. पाकीस्तान लष्कर त्यांनीच निर्माण केलेल्या तालीबानला काबूत ठेवू शकत नाही (की मुद्दाम तसा समज करुन द्यायचा आहे) काही कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Fri, 10/30/2009 - 08:57

Permalink

गुणवत्ता

एक्स्पोर्ट सरप्लस माल बहुतेक वेळी चांगला असायचा. ज्या काळात आयात कठीण होती त्या काळात तो दुधाची तहान ताकावर भागवत असे. बहुतेक जागी स्फोट घडवणारे अतिरेकी हाती लागत नाहीत यावरून त्यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता दिसून येते. मला त्यांचे कौतुक करायचे नाही, पण ही वस्तुस्थिती दाखवायची आहे. ही निर्यात फक्त पाकिस्तानातूनच आणि फक्त भारतातच होते असे दिसत नाही. त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत असल्यामुळे ती आपल्याला ठळकपणे जाणवते. कमीअधिक प्रमाणात ही जगभरातली समस्या आहे. अतिरेकी वापरत असलेली संहारक शस्त्रे कुठे कुठे तयार होतात आणि ती कशा प्रकाराने इकडे तिकडे पाठवली जातात हे दाखवणारे अनेक इंग्रजी चित्रपट अमेरिकेत निघाले आहेत. त्यातला १ टक्का भाग जरी खरा असला तरी ते भयानक आहे. पुराणकाळापासून भस्मासुर, महिषासुर, हिरण्यकश्यप वगैरे असामान्य शक्तीशाली खलनायकांचा अखेर नाशच झाला (त्यांच्याकडे असलेली अस्त्रे आधिक गुणवत्तेची असूनसुद्धा) आणि वाईटपणाचे इतके फायदे असतांनासुद्धा माणसातला चांगुलपणा टिकून राहिला यावरूनच मला भविष्यकाळातही असेच होईल अशी आशा वाटते आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 10/30/2009 - 09:12

In reply to गुणवत्ता by आनंद घारे

Permalink

न पेरता आपल्यावर ही 'फसल' का लादली जात आहे हे मात्र 'न कळे'!

आनंद, तुझा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. मी जेंव्हा 'एक्झोडस (exodus)' हे पुस्तक दुसर्‍यांदा वाचले तेंव्हां मला धक्काच बसला कारण त्यात ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमधून ब्रिटिशांना लवकर हकलून द्यायला अस्सेच स्फोट कसे घडवून आणले होते याचे वर्णन अतीशय अभिमानाने 'लियॉन यूरिस (Leon Uris)' या लेखकाने दिले आहे. (पहिल्या वेळी एक्झोडस वाचले तेंव्हा हा मुद्दा इतका जोरदारपणे register झाला नव्हता! या अतिरेकी प्रकारांचा असा दुरुपयोग करण्याचे pioneers ज्यू तर नाहींत? आणि आज तोच भस्मासुर त्यांना छळतो आहे. पेरावे तसे उगवते हे तर खरेच. पण न पेरता आपल्यावर ही 'फसल' का लादली जात आहे हे मात्र 'न कळे'! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Mon, 11/16/2009 - 08:08

In reply to न पेरता आपल्यावर ही 'फसल' का लादली जात आहे हे मात्र 'न कळे'! by सुधीर काळे

Permalink

तण

'पेरावे तसे उगवते' या म्हणीचा अर्थ 'त्याहून चांगले किंवा वेगळे फळ मि़ळत नाही' एवढ्यापुरता मर्यादित आहे. पेरलेल्या पिकामध्ये न पेरलेले तण माजतच असतात. अगदी त्यांची पाळेमुळे खणून काढून ती जाळून टाकली तरीसुद्धा ते 'एक्स्पोर्टसरप्लस' होऊन कुठून तरी येतात आणि पिकाला दिलेले खतपाणी फस्त करून फोफावतात हा शेतकर्‍यांचा अनुभव असतो. त्यामुळे वेळोवेळी ते उपटून टाकणे, वीडीसाइडची फवारणी करणे हे काम करत रहावे लागतेच. त्याला इलाज नाही. 'फ्रीडम मीन्स इटर्नल व्हिजिलन्स' असे कोणीतरी सांगितले आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 11/16/2009 - 08:19

In reply to तण by आनंद घारे

Permalink

एकदम बरोबर!

प्रिय आनंद, सुरेख प्रतिक्रिया. एकदम बरोबर व पूर्णपणे सहमत! मी तुझ्या ब्लॉगवर जाऊन त्यातला स्वातंत्र्यदेवता व वॉशिंग्टन डीसी हे लेख वाचले आहेत. माझा मुलगा वॉशिंग्टन डीसीच्या थोडासा बाहेर (व्हर्जिनिया) येथे रहातो त्यामुळे हे शहर बर्‍यापैकी 'पाठ' झाले आहे. सवडीने त्याबद्दल लिहीन. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 10/30/2009 - 09:13

Permalink

सापेक्षता

काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करणार्‍यांना "स्वातंत्र्य-सैनिक" म्हणायचे पण त्याच्या स्वतःच्या गाडीखाली बाँब लावणार्‍यांना मात्र खुनी, गुन्हेगार म्हणायचे अशा निरनिराळ्या व सोयीस्कर व्याख्या मुशर्रफने बनविल्या.
स्वातंत्र्यपुर्व काळातील इंग्रज सरकारच्या लेखी असलेले अतिरेकी यांना आपण देशभक्त वा स्वातंत्र्यसैनिक म्हणतो. जिंदा सुखाला देखील हुतात्मा म्हणणारे पंजाब मधे आहेत लेख उत्तम. क्रौर्य, हिंसा याला ही धर्म नसतो आणि माणुसकीला ही धर्म नसतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 10/30/2009 - 10:28

In reply to सापेक्षता by प्रकाश घाटपांडे

Permalink

क्रौर्य, हिंसा यालाही धर्म नसतो आणि माणुसकीलाही धर्म नसतो!<YES>

किती बरोब्बर! पूर्णपणे सहमत. <<क्रौर्य, हिंसा याला ही धर्म नसतो आणि माणुसकीला ही धर्म नसतो>> सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 10/30/2009 - 10:38

Permalink

आढावा

आढावा आवडला! काहे गोष्टी खर्‍या तर काही घडवलेल्या असाव्यात असे वाटते. पाकीस्तान संपणे म्हणजे नक्की काय ह्याचा विचार व्हायला हवा. पाक किंवा अफगाण पुन्हा सामान्य जिवन जगु शकले नाहीत तर ते भाडोत्री अतिरेकी कारखानेच बनतील अशी शक्यता आहे. भारताची ही समस्या लवकर सुटेल असे दुर्दैवाने वाटत तरी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/30/2009 - 11:21

Permalink

छान,

छान, इंटरेस्टींग लेख.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Sun, 11/15/2009 - 11:02

Permalink

दै. सकाळच्या वेब एडीशनवरील "पैलतीर"मधे हा लेख प्रकाशित झाला आहे!

तात्यासाहेब, तीन-चार दिवसापूर्वी दै. सकाळच्या वेब एडीशनवरील "पैलतीर" या सदरात हा लेख प्रकाशित झाला आहे व अजूनही आहे. http://tinyurl.com/ylyc6v4 सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Mon, 11/16/2009 - 08:14

In reply to दै. सकाळच्या वेब एडीशनवरील "पैलतीर"मधे हा लेख प्रकाशित झाला आहे! by सुधीर काळे

Permalink

अभिनंदन

दैनिक सकाळमध्ये तुझा लेख प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन. लेखाची गुणवता उत्तम आहेच,त्यात तिळमात्र शंका नाही, पण परदेशात राहून हे भारतातल्या दैनिकात प्रकाशन वगैरे करायला तुला कसे जमते? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by पारंबीचा भापू on Sun, 11/15/2009 - 13:24

Permalink

लिहा असेच माहितीपूर्ण पुढेही

पहिल्यावेळी हा लेख मिपावर आला त्यावेळी वाचायचा राहिला असावा. आजच वाचला. खूप आवडला. आता इंटरनेटवर जाऊन सकाळवरचाही बघेन. लिहा असेच माहितीपूर्ण पुढेही. भापू
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 11/15/2009 - 17:12

Permalink

भस्मासूर

मीही आजच लेख वाचला.. आवडला. आता हे भस्मासूर आहेत का स्वतःच्याच रक्ताच्या एका थेंबातून १०० पटीत जन्म घेणारे राक्षस आहेत हे काळच ठरवेल. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Sun, 11/15/2009 - 21:17

In reply to भस्मासूर by ऋषिकेश

Permalink

मलेशियात भेटलेल्या थायलंडस्थित पेशावरी तरुणाचा मनोरंजक किस्सा

ऋषिकेश-जी, तुमचा हा नवा दृष्टिकोन (एका थेंबातून १०० पटीने जन्म घेणारे राक्षस) भावला. छान! कुटुंबनियोजनाबद्दल पाकिस्तानातले कायदे किंवा तिथले रिवाज काय आहेत ते मला माहीत नाहीं, पण कुटुंबनियोजन फारसे लोकप्रिय नसावे. तरीही ज्या वेगाने तिथे माणसं मरत आहेत ते पहाता १०० कांहीं निर्माण होत असतील असे वाटत नाहीं. हे लिहिताना मला पेशावरला जन्मलेल्या, थायलंडला काम करणार्‍या व क्वाला लुंपूर (मलेशिया) येथे भेटलेल्या एका पाकिस्तानी तरुणाचा मनोरंजक किस्सा आठवला. तो खूप सांगण्यासारखा आहे. म्हणजे हा माणूस किती जुन्या काळात वावरत होता ते ऐकून मी धन्य झालो. Hopefully, he does not represent the majority of Pakistanis. सांगेन एक दोन दिवसात. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 11/15/2009 - 22:48

In reply to मलेशियात भेटलेल्या थायलंडस्थित पेशावरी तरुणाचा मनोरंजक किस्सा by सुधीर काळे

Permalink

जरा विस्कटून

जरा विस्कटून सांगतो १तून १०० जन्माला येण्यामागे वाढती लोकसंख्या हा विचार नव्हता. तर अतिरेकी व त्यांचे निर्माते एकमेकांना मारताना निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे अनेकांचे जीवन विस्कळीत होते. त्यापैकी अनेक रिकामी डोकी/रिकामे हात नाईलाजाने/उद्वेगाने शस्त्र उचलून नवे अतिरेकी बनतात. तेव्हा त्याच्या भांडणात ते एकमेकांना मारून त्यांचा भस्मासूर होईल का त्यामुळे अधिक अतिरेकी तयार होतील(१ तून १००) हे काळ ठरवेल असे म्हणायचे होते ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 11/16/2009 - 08:33

In reply to जरा विस्कटून by ऋषिकेश

Permalink

विचार केल्यास छाती दडपून जाते

ऋषिकेश-जी, मी तो शेरा lighter vein मध्ये केला होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे. एक अतिरेकी मारला कीं त्याची जागा कुणी ना कुणी घेतोच आहे. जे लोक या अतिरेक्यांना उद्युक्त करतात त्यांच्या असे टोकाचे व एकांगी विचार अतिरेक्यांच्या मेंदूत भिनविण्याच्या हातोटीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अर्थातच एकादी गोष्ट बिघडवणे सोपे असते, पण बिघडलेल्या माणसाला सुधारवणे खूप अवघड असते. पाकिस्तानात नुकतीच स्थापित झालेली लोकशाही जर यशस्वी झाली तर अशा सरकारांना किती अवघड काम करावे लागणार आहे याचा विचार केल्यास छाती दडपून जाते. प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com