असेच म्हणतो.
माझ्या मनाला अशी बिलगलेली कविता आहे,
"सतारिचे बोल.."-केशवसुत
काय करावे कोठे जावे नुमजे मजला कि विष प्यावे
अंधारातच घडले सारे लक्ष न लक्षी वरचे तारे
विमनस्क्पणे स्वपदे उचलित रस्त्यातुन मी होतो हिंडत
एका खिडकीतुनी सुर तदा आले दिडदा दिडदा...
संगणकांत लपलेली फाईल सापडत नसली....किंवा
पार्क केलेली गाडी पोलीसांनी उचलुन नेल्याचे वर्तमान कुत्सितपणे पानवाल्याने दिले.....किंवा
अशा प्रसंगी माझ्या तोंडुन वरील ओळी सहज निघुन जातांत आणी लोकांची जरा करमणुक होते.
रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला....
ही कविता आता इयत्ता ७वीच्या इंग्रजी माध्यम च्या मुलांना आहे, मराठीच्या पुस्तकात...हवी असेल तर मी देइन....
पहीलीतल्या धड्यांची आठवण आली.
कमल नमन कर.
जगन घर बघ
शरद कमळ धर.. असे काहीसे होते.
शेवटी
सगळीकडे कमळच कमळ..
एका निवडणुक प्रचारादरम्यान भाजपने ह्याचा मिश्किल उपयोग केला होता.
शरद कमळ बघ.
राजीव कमळ बघ. इ.इ.
बापरे किती जुन्या आठवणीत घेवुन गेला हा धागा.
पहीली का दुसरीच्या पुस्तकात इंजिनदादा ही कविता होती वाटते.
इंजिनदादा इंजिनदादा काय करता
कोळसा मी खातो,पाणी मी पितो,
गावाला जातो नव्या नव्या..
एक चिमणीची आणि तिच्या हरवलेल्या घरट्याची पण कविता होती.
त्यातले काही शब्द असे होते
कपिला मावशी कपिला मावशी का गं तुझे डोळे ओले..
..
गरीब बिचार्या चिमणीला सगळे बसले टपण्याला..
आणि शेवटी
जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नक्को मला.
राहीन मी घरट्याविना,चिमणी गेली उडुन राना..
प्रतिक्रिया
मला पण
बिलगलेली कविता-
पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं
सुरूवात बहुधा वेगळी आहे..
सुरूवात बहुधा वेगळी आहे..
नाचरे मोरा
अजून एक
फुलवा,
पहीलीतल्य
करी अंगाई सुखे राजसा बाळा निज