हा हा .. कथा छान आहे. मजेदार आहे.
१९९८ सालात लिहिलेली कथा २००९ मध्ये सुद्धा पटणारी आहे ही बाब महत्वाची. पुराणकथा असतातच थोर आणि ज्या भूमीमध्ये त्या घडल्या त्या भूमीवरील जनतासुद्धा!!
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
भारतातल्या अनेक क्षेत्रांना हि कथा लागू होते.
अनेक संशोधने भारतात पुराणकाळातच होउन गेली म्हणून आम्ही आमचे कुले थोपटून घेत असतो.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "मित्रा, प्रवृत्तिपादाला ही बातमी ऐकून काहीच कसे वाटले नाही? या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि हसून तो म्हणाला, " हे बघ, निवृत्तिपादाला जग जिंकायची इच्छा कधीच नव्हती आणि
प्रति-मरूत्सखाची निर्मिती फसव्या अभिमानातून झाली, हे लक्षात घे. शिवाय तो चालतॊ कसा हे कुणीच कधी बघितले नव्हते. युद्ध जिंकण्याची गोष्ट दूरच राहू दे."
हा शेवटचा अधोरेखित भाग मला संदिग्ध राहिला. त्यामुळे मला कथा नीटशी समजली नाही.
(अमेरिकन महासंगणक आणी भारतीय 'परम' अशी काही बेसलाईन ह्याला आहे का?)
(?)चतुरंग
संदिग्धता हा कोणत्याही अव्वल कलाकृतीचा सौंदर्यानुभवासाठी आवश्यक गुणधर्म असतो. जगातील सर्व कलाकृती सर्वाना समजायला हव्यात असा कोणी हट्ट धरू शकत नाही...हो आणखी एक सांगायचे राहिले अमूर्त कलाकृती मध्ये संदिग्धता जास्त प्रमाणात असते.
हा कोणत्याही अव्वल कलाकृतीबाबत सौंदर्यानुभवासाठी आवश्यक गुणधर्म असतो.
हे वाक्य तितकेसे पटले नाही. कारण कलाकृतीचा आस्वाद घेण्याकरता ती पूर्णपणे समजायला तर हवी. हां, संदिग्धता अशा बाबतीत असू शकेल की एकापेक्षा जास्त शेवटाच्या शक्यता आहेत आणी सगळ्याच शक्यता कमीअधिक प्रमाणात बरोबर आहेत. मग त्याठिकाणी वाचकाच्या अनुभवानुसार तो तो शेवट ज्याला त्याला योग्य वाटेल इ.
परंतु शेवट जर समजलाच नाही, पूर्ण गूढच राहिला तर कलाकृती अपूर्ण असल्याप्रमाणे वाटते, अशी संदिग्धता सौंदर्याला बाधक ठरते असे मला वाटते.
आणी हो, आपली अव्वल कलाकृती समजलीच पाहीजे असा आमचा हट्ट नाही...समजली तर समजली नाहीतर योग नव्हता असे म्हणेन!
चतुरंग
लेखात संदिग्धता काहीच नाहीये असे माझे मत आहे. त्यांनी महासंगणकाविषयी लिहिले असेल किंवा सध्या वादात सापडलेल्या अणुस्फोटांविषयी* असेल किंवा चांद्रयान मोहिमेविषयी असेल. ते सारखेच लागू आहे.
पण 'तो चालताना कोणीच बघितलेला नाही' हे वाक्य अनावश्यक वाटले.
(*डिस्क्लेमर: अणुस्फोट - न्यूक्लिअर फ्यूजन चा- यशस्वी झाला की नाही याविषयी हे मतप्रदर्शन नाही. मी स्वतः तरी तो स्फोट यशस्वी झाला होता असेच सध्या समजतो).
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
>>निवृत्तिपुराच्या इतिहासात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, पोथ्या-पुराणे अभ्यासण्यात आले. तसेच, रथाच्या निर्मिती सर्व प्रकारचे सर्व भाग आयात करण्यात आले.
यातील पहिल्या आणी दुसर्या भागामधला विरोधाभास लै भारी.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
आज विक्रमादित्याने वेगळे उत्तर दिले असते.
डोलांड हात पिरगळून त्याला हवे ते उत्तर मिळवेल आणि भक्त
चक्रमादित्याच्या म्याव म्यावला सिंहाची डरकाळी म्हणतील.
प्रतिक्रिया
आयला या
परम संतोष !
तुम्ही
उत्तम कथा
कथा आवडली
मस्त !
हा हा .. कथा
सर्व
सर्व
भारी कथा
हेच बोल्तो...
मस्त आहे
कथा आवडली!
सुंदर कथा..
अभिनंदन
ह्म्म रुपक कथा समजली नाही!
+१
आवश्यक गुणधर्म
संदिग्धता
लेखात
असेच...
पूर्ण काल्पनिक
>>निवृत्तिप
चीनने ए०आय० सार्वजनिक
बहुतेक ही कथा दहा
आज विक्रमादित्याने वेगळे