''परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
गतप्रेमाच्या पत्रामधले
अक्षर देखील दिसते गचाळ''
सर्वच चारोळ्या खास आहेत,पण वरील ओळी जरा हटके आहेत,पहिल्या दोन ओळीतून सुंदर कधी तरी रटाळ वाटते आणि तीच अवस्था प्रेमपत्रांची, नव्हे आयुष्यात पहिल्यांदा जे जे सुंदर वाटते त्या त्या सर्वांची नंतर अवस्था अशीच असते.
बहोत खूब !
अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) )
व्याकरणंच काय प्रकरणं पण माहीती दिसाताहेत...
:-) (ह. घ्या.)
आजूबाजूला तसेच आतमधे धनंजय यांची पारखी नजर काहीतरि छान तर शोधतेच पण सहज, सुंदरपणे शब्दबध्द्देखील करुन टाकते.
भारतीय क्रिकेट टिमला ऑलराउंडर ची कमतरता भासते आहे, एकदा ते पण तुम्ही अजमावून बघा म्हणतो. :-)
अजून येऊ द्या...
प्रेमात पडलेले शाळकरी, युवक, तरुण, आणि चटके खाल्लेला प्रौढ, असे चौघे जण चार ऋतूंचे क्रमाने वर्णन करत आहेत अशी कल्पना आहे. त्यामुळे शैली बालिश ते प्रगल्भ चार टप्प्यांनी गेली. उगाच आपले स्व-समीक्षण! बघा पटते का.
>>>प्रेमात पडलेले शाळकरी, युवक, तरुण, आणि चटके खाल्लेला प्रौढ, असे चौघे जण चार ऋतूंचे क्रमाने वर्णन करत आहेत अशी कल्पना आहे.
एकदम चांगली कल्पना आहे. चारोळ्यांइतकीच आवडली.
पण जरासे ध्यानात आले होते. जे केले ते तसे का केले, नियोजन प्रयोजन या प्रकाराचा तुम्ही छान वापर करता.
मी ऋतू(आजूबाजूचे/बाहेरचे) व (आतले)मनाची अवस्था / मूड / दृष्टीकोन असा काहीसा अर्थ मी घेतला होता.
..जाम आवडले.. माझ्या मते सर्व कवींनी आपल्या कवितेविषयी असे थोडे मार्गदर्शन केल्यास आमच्या सारख्या ह्या प्रातांतल्या 'ढ' लोकांना देखिल त्याचा रसास्वाद घेता येईल... समीक्षण वाचल्यावर कविता खरंच खूप आवडली!!
बालकवींची औदुंबर कविता शिकवताना आमच्या प्राध्यापकांनी ह्याच चार दशा कश्या त्या कवितेतून
टप्प्याटप्प्याने दाखविल्या आहेत ते छान वर्णन करून सांगितले होते.
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
चारही चारोळ्यांना जोडणारे हे सूत्र आवडले. चार ऋतुंचा क्रम आणि त्यांच्यातून व्यक्त होणारा मूड तुमच्या समीक्षेनंतर ध्यानी आला.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
सुंदर लिहिले आहेस रे धन्याशेठ!
विशेषतः
वसंतातल्या पालवी-कळ्या
मोठ्या खट्याळ असतात छकुल्या
आसुसलेल्या डोळ्यांना, दडून,
हळूच आडून करतात वाकुल्या
या ओळी अधिक आवडल्या!
तात्या.
अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापकसाहेब,
आडून शरसंधान कशासाठी?
उदयोन्मुख आहेत, आत्ताच कविता आणि व्याकरण यातील अन्योन्यसम्बंध जाणवला तर ठीक अन्यथा रसिक वाचकांना "त्राहि त्राहि माम" म्हणायची पाळी यायची.
-एक इसम
छान
आवडल्या!
चारोळ्या आवडल्या !
अवांतर २
आवडल्या
छान आहेत
शेवटची
हो
चार ऋतू
पटले!
अगदी तुम्ही म्हणता तसे नाही
स्व-समीक्षण
हेच
आम्हाला
सुरेख
सुंदर..
अस्स होय
परवा पडलेला शुभ्र बर्फ
त्राहि त्राहि
सुरेख...
फारच मस्त !!
उत्तम..
सुरेख चारोळ्या!