रेवती, अगदी भयानक अनुभव. त्यातून फारसे नुकसान न होता वाचलात हे भाग्यच.
मला तर २६ जुलै २००५ची आठवण झाली. अंधेरी पश्चिमेला माझ्या मामाच्या घरात जवळ जवळ ५-७ फूट चढलेल्या पाण्याची आठवण झाली. संसार धुऊन निघणे म्हणजे काय ते कळले तेव्हा. नंतर ८ दिवस घर साफ करत होतो. अतिशय घाण असे नाल्याचे पाणी घरात घुसले आणि त्यात परत कुजलेल्या सामानाचा वास. आजही अंगावर काटा येतो. घरातले सगळे सामान अगदी फ्रिजसुध्दा पाण्यात तरंगत होते मस्त पैकी. आणि नेमकी म्हातारी आजी घरी एकटी होती आणि सुदैवाने शेजार्यांच्या लक्षात आले म्हणून काही मुलांनी तिला हातावर उचलून पहिल्या मजल्यावर नेले आणि ती वाचली. मामेभाऊ तर अगदी घराजवळ पोचूनही रात्रभर एका बिल्डिंगच्या कंपाऊंड वॉलवर बसून राहिला. तो अजूनही गंमतीने म्हणतो की चालत रोजच घरी यायचो. पोहत पोहत घरी यायचा योग एकदाच आला.
बिपिन कार्यकर्ते
हादरवुन टाकणारा अनुभव..!
डॉल्बी सिस्टीम स्टाईल लेखनशैली... सर्व काही डोळ्यासमोर घडतेय असे वाटले..!!
(ह्या निमित्ताने काही सरकारी अनुभव ही आले असतील ना.?(कॉम्पेनसेशन..) अथवा घरमालकासोबत नुकसानभरपाईसंबंधात बोलणी.इ.इ.... ते ही वाचायला आवडतील.)
(पोहु नव्हे तरंगु शकणारा) योगेश.
मुंबईतला २६ जुलै आठवला. आम्ही पहिल्या मजल्यावर रहात असल्याने आमच्या घरात पाणी शिरले नाहि मात्र खालच्या चारहि घरांत टिव्ही पर्यंत पाणी .. खालच्या कार, रिक्षा पूर्ण पणे पाण्याखाली.. रात्री ३ ला दारावर थाप पडली व खालची चारही बिर्हाडे आमच्याकडे राहिली होती. पुढे त्यांची घरे साफ करण्यात आठवडा गेला होता. दुसर्या दिवशी फ्युज काढून ठेवले होते त्यामुळे मुणबत्त्यांचा दुष्काळ होता. मी ५ किमी चालत जाऊन बोरीवलीतून अख्ख्या सोसायटीसाठी अश्या गरज पडल्या तर असूदे म्हणून चांगल्या १० डझन मेणबत्त्या आणल्या होत्या. (लोडशेडींग नसल्याने आता त्या लागतच नाहित.. तेव्हा लोक त्या अजूनही वापरतात :) )
यात काहि फार सांगण्यासारखं आहे असं नाहि पण असं काहि वाचलं की हे सगळ आठवतं... असो..
माझ्या मनात अजूनही कधीतरी आठवणींची ढगफुटी होते. विचारांचे लोंढे वाहून गेले की पुन्हा नेहमीचे आयुष्य चालू होते.
+१
फारच छान लिहिलंय.. चित्रदर्शी!
ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ४७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता"ओळखलंत का सर मला, पावसांत आला कोणी...."
भयानकच ग, २६ जुलै आणि त्याआधी २००० सालच्या आषाढी एकादशीला अडकलेले नातेवाईक आणि आमची होणारी घालमेल यांची आठवण साहजिकच झाली.
माझ्या मनात अजूनही कधीतरी आठवणींची ढगफुटी होते. विचारांचे लोंढे वाहून गेले की पुन्हा नेहमीचे आयुष्य चालू होते.
अगदी खरं..
अनुभव उत्तम शब्दबध्द केला आहेस, जरा नियमित लिहायचे मनावर घे.
स्वाती
अगाबाब्बो!!! :SS
अशा वेळी सरपटणार्या प्राण्यांचा (जास्त करुन साप) त्रास होण्याची शक्यता जास्त.
अशावेळी मनात भिती बसतेच. घडलेल सगळ परत परत रिवाइन्ड होत जेव्हा जेव्हा जोराचा पाउस दिसतो. हो ना?
बापरे! काय भयानक अनुभव आला तुम्हाला!
त्यातून सुखरुप फार नुकसान न होता वाचलात.. खरच भाग्य!
अनुभव कथन उत्तम झाले आहे. तुमचा कसा गोंधळ झाला असेल ते सगळे डोळ्यासमोर उभे केलेस.
--शाल्मली.
प्रतिक्रियांबद्दल आपणा सर्वांचे आभार!
वाचनमात्र असलेल्यांचेही आभार!
आता घडून गेलेल्या घटनेची भीती कमी झालीये. घाबरगुंडी उडाल्याबद्दल नंतर थोडे हसूही आले. श्रावण मोडक यांनी विचारलेले प्रश्न बर्याचजणांनी विचारले. आम्हाला जाग आली नाही एवढेच सांगू शकते. भिंत पडल्याचा आवाज झाला नाही कारण पाण्याच्या लोंढा बराच जोरात आला असावा. नंतर पडलेल्या दगडांचे अवशेष काही मिळाले नाहीत.
योगेश, या प्रसंगानंतर घरमालकांनी आम्हाला तात्पूरते कंपाऊंड तातडीने बांधून दिले. चोरी होऊ नये म्हणून महिनाभरात पक्की भिंत बांधायला सुरूवात झाली होती. मालकीणबाईंनी अठवडाभर पिण्याचे स्वच्छ पाणी घरी आणून दिले कारण रोगराई पसरण्याची हीच वेळ असते. श्री. व सौ. कृपेश्वरांनी तक्रार करण्यास जागा ठेवली नाही. थोडीफार गैरसोय तर सगळ्यांचीच झाली. दरम्यानच्या काळात दोन तीन चोर्या झाल्याच.
स्वातीताई, नियमीत लिहीण्याइतका धीर गोळा करतीये. सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे ते जमेल असे वाटते.
पुन्हा सगळ्यांचे आभार!
रेवती
रेवतीताई,तुमची शैली अतिशय चित्रदर्शी आहे. हे सगळं वाचतांना आम्हीही तिथेच होतो ह्याचा पदोपदी भास होत होता. तेव्हा आता इतर सगळ्यांनी म्हटलंय त्याला 'मम' म्हणतो. असेच नियमित लेखन करत चला. मिपावर आता तुमचाही 'फॅणक्लब'(टारूशेठच्या भाषेत)तयार झालाय.....त्याचा मीही एक सदस्य आहे. :)
खुदके साथ बातां: बाकी रंगाशेठचे सगळंच कुटुंब साहित्यिक दिसतंय.फावल्या वेळात आपापले कोपरे आणि संगणक पकडून हे लोक बहुदा वाचन/लेखनच करत असावेत असं दिसतंय.
:)
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
लेख आताच वाचला. ओघवत्या शैलीतले उत्तम लिखाण. अशा प्रसंगांची आठवण कधी न पुसणारीच. परंतु त्यावेळच्या मनःस्थितीचे , एकंदर परिस्थितीचे चित्रण सुरेख आले आहे. आणि होय, सस्पेन्स तर शेवटच्या परिच्छेदापर्यंत चांगलाच राखलाय.
असे अनुभव काय शिकवितात असा प्रश्न मला पडला. आजूबाजूला पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि इथे पूरामुळे माणसे बळी जाणे यातली विसंगती विशेष जळजळीत आहे. आणि मग अर्थातच नेहमीचा प्रश्न : झाल्या घटनेचे उत्तरदायित्व. या गोष्टीला मात्र कसलेच महत्व नसणार , साधी चौकशी देखील झाली असेल की नाही कोण जाणे.
लेख दीर्घकाळ स्मरणात राहील असा.
कसला विचित्र आणि भयानक अनुभव आहे! वाचूनच अंगावर काटा आला.
लिखाण खूपच आवडलं. चित्रदर्शी आणि ओघवतं.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
आधीच अनोळखी ठिकाण त्यात असला अनुभव भयाण !
पुण्यातल्या आमच्या सोसायटीच्या मागे एक ओढा आहे. पावसाळ्यात त्या ओढ्याचं पाणी वाढून पार आमच्या घराच्या पायरीपर्यंत यायचं ... ५-६ घरं पार करून ... सगळी घरं जीव मुठीत घेऊन.... त्या आठवणी जाग्या झाल्या.
रंग्या मात्र एकंदर प्रसंगावधानी दिसतोय.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार!
टार्या, प्रमोदकाका, 'फॅनक्लब' म्हणून मला लाजवू नका!
मुक्तभाऊ, घटनेची साधी चौकशीही झाली नाही. नुकसानभरपाई वगैरे विसलेली बरी.....कुठले उत्तरदायीत्व आणि काय? लिंक देण्यासाठी जालावर त्या घटनेवर लिहिलेले काहीही सापडले नाही ज्यामुळे तारीख, वार देउन लेखात आणखी नेमकेपणा आणता आला असता.
धन्यवाद!
रेवती
प्रतिक्रिया
बापरे!
पाउस
हुश्श
बाप रे
२६ जुलै २००५
मी त्या
च्यामारी
हादरवुन
चित्रदर्शी
बापरे...
अगाबाब्बो!!
बापरे....कसल
मस्त लिहिले
चित्रदर्शी लेखनशैली
दोन्ही भाग
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बापरे! काय
सहमत आहे.
नविन
नविन जागेत
अनुभव
गंभीर
प्रतिक्रि
चित्रदर्शी शैली .
लेख
+१
फारच भयानक
भयानक!
जबरा
जब्बरा अनुभव
सर्वांचे
एकदम भयावह अनुभव, अतिशय