विमुक्त, मस्त वाटलं वाचायला. गावातले पावसाचे वातावरण अगदी डोळ्यसमोर उभे केले. विहिर, पडवी, माड, पागोळ्या... झक्कास्स्स्स!!! नेहमी नेहमी लिहित रहा. :)
बिपिन कार्यकर्ते
कोकणातल्या पावसाचे मस्त वर्णन!
खरच, नेहमी अश्या आठवणी लिहा.
आम्हीही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत काकांकडे कोकणात जायचो ते सगळा उन्हाळा संपून पाऊस सुरू होताहोता परतायचो. त्यावेळी जूनच्या सुरूवातीला असा एखाद् दुसरा पाऊस अनुभवायला मिळायचा त्याची आठवण आली. आपल्या लेखनाने आठवणीतला पाऊस जिवंत झाल्यासारखे वाटले.
रेवती
अश्या बय्राच आठवणी दर पावसाळ्यात जिवंत होतात आणि मग, मी दर weekend ला सह्याद्रिच्या कडे-कपाऱ्यांमधे भटकून नविन आठवणींची साठवण करत असतो.
खास!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
झकास , शैली आवडली आहे , मस्त सुरळीत पण जसं आठवलंत तसं लिहीलंत, कुठेही आपला लेख छापुन आल्याची बातमी दिलेली नाहीत (आता तो आला नसेल हा भाग अलहीदा) पण फुक्कटची अलंकारीक भाषा न वापरता वाचताना प्रभावित झालो . अजुन लेख येउन द्या ..
आम्ही सुद्धा पावसाळ्यात पाझर तलाव आणि विहीरी धुंडाळत फिरायचो .. गावाच्या आजुबाजुची एकही विहीर आम्ही सोडली नव्हती !! आम्ही मुटका आणि सुळ (सुर) स्पेषालिष्ट , मुटका मारताना (शब्द निट वाचावेत) आम्ही पाणि तर जास्त उडवायचोच पण आवाज ही एक णंबर निघे .
(मास्तरधार्जिण्या लोकांनी ह्या वाक्यात क्रिप्ट शोधत बसू नये)
आणि हो,
विहीरीतले मासे पाऊस लागु नये म्हणुन तळात जावुन बसलेले असायचे, त्यामुळं तुडुंब भरलेली विहीर सुद्धा रिकामी-रिकामी वाटायची.
वा! मस्त !!
--अवलिया
=================
सहजराव पुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
पावसाळ्याचे वर्नन, पोहोण्याची मजा सगळेच अगदी अगदी सुरेख. एकदम मनात जसे येत जाईल तसे लिहिले आहेस त्यामुळे अगदी गप्पा मारल्यासारखे वाटले.
पहिल्यांदाच लिहिलं आहेस. आता नेहेमी लिहीत जा. शुभेच्छा! :)
(सूरमारे)चतुरंग
लेख सुंदर जमला आहे.विहीरीवर पोहणे म्हणजे अत्यानंदाची बाब.दरवर्षी नवशिकी मुलं यायची.त्यांना डुब्बा मारायला शिकवायचं.कपबशीचा फुटका चिपोरा पाण्यात टाकून तळ गाठायचा.विहीराच तळ काढणे हा थरारक आणि अट्टल पोहणार्यांसाठी राखीव असा अनुभव.आता गावतल्या गणपतीच्या दिवसांच्या आठवणी जरूर लिहा .आपल्या लेखाची वाट बघतो आहे.
अवांतर : श्रावण येता येता घुले पडायला सुरुवात व्हायची,नळेच्या कौलाची घरं असली की जास्त घुले जमायचे.आदल्या दिवशी काही नसायचं दुसर्या दिवशी छत घुल्यांनी भरून गेलेलं असायचं.शाळेत जाताना दांडीवरचे वाळलेले कपडे (जास्त करून युनीफॉर्मची प्यांट आणि लंगोट)तपासून घ्यावे लागायचे.तरी सुध्दा एखादं दिवशी घुला आत रहायचाच.पुढे काय काय व्हायचं हे कळायला घुला अंगाला लागायलाच हवा.
सुंदर लिहिले आहे
माझा सगळ्यात आवडता ऋतू आहे हा
अगदी लहानपणी माझं गावी आम्ही भिजायचो ते आठवले मला
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे ना मंजूर
सुंदर अनुभव लेखन !
मला ही विहीरी मध्ये / नदी मध्ये पोहणे खुप आवडतं... पण ना दिल्ली ला विहीरी आहेत ना पोहण्यालायक नदी.. त्यामुळे वर्षातुन कधी घरी जातो तेव्हा मात्र पंचगंगेत मनसोक्त पोहून घेतो व गावी गेल्यावर विहीरीमध्ये :)
पावसाळ्याच्या आठवणीत भिजवलस...
लहानपणी (आणी आता सुध्दा) घरुन पोहायला खुप विरोध.. त्यामुळे अशा जागा शोधाव्या लागत जिथे विवस्त्र पोहता यायच.. :-) बर्याच वेळी पावसाळ्यात खोलगट भागात पाणी साचुन छोटी छोटी तळी बनत आणी ति जास्त खोल नसल्याने आम्हाला भरपुर आनंद..पण माहीत नाही कसे पण घरच्यांना खबर लागायची आणी मग आमची धुलाइ...
एकदा विहिरित पोहत असताना घरी कुणीतरी जावुन सांगितले, आई नि मोठ्या भावाला बघन्यासाठि पाठवले... आमची बंधुराज थोर..
"तु बाहेर ये लवकर".. मि: "थांब २ मि.".. पाच मिनिटांनंतर त्यानी वरतुन दगड धोंडे मारायला सुरुवात.. मग काय.. पाण्यात बराच वेळ खोलवर डुबक्या मारत होतो.. वर आलो कि परत एखादा दगड येताना दिसायचा.. नशीब बलवत्तर म्हणुन कुठे काही लागले नाही..
(आता तो म्हणतो कि तुझ्या बरोबर पोहायला शिकलो असतो तर बर झाल असत, बिचार्याला अजुन पोहता येत नाही :-) )
-- टुकुल.
प्रतिक्रिया
जियो!!!
हो
विमुक्त,
विहीरीतील
कोकणातल्य
अश्या
झकास , शैली
वा! मस्त !!
मस्तच रे विमुक्ता!
मोठ्ठा फ्लॅशबॅक ..
वा!!!!!!!!!!!
मस्त लिहिले आहे
माझा पण....
खूप छान
सुंदर
मस्त रे मित्रा !!