सकाळी सकाळी गार हवेत
मस्त पैकी पांडवलेण्याला चढून यावे.
मग गाडी काढून थेट तसेच पंचवटी कारंज्यावर जाऊन, अंबिका रेस्टॉरंट मध्ये मिसळ साठी नंबर लावाठी. दाटीवाटीमधे बसून, खास सावजी मसाला असलेली मिसळ समोर येते. सोबत कांदा कोथिंबीर, शेव. ताजे, खमंग वासाचे पाव!
घास घेतल्यावर आवाज फुटणे बंदच! फक्त "रस्सा", "तर्री " असे घशातल्या घशात पुटपुटणे!
काही फालतू लोक इथे जास्तीची शेवही मागवतात, पण त्यात काही अर्थ नाही!
इथे फक्त'काळा रस्सा व तर्री 'मागणारे ष्टँडर्ड असतात.
एकदा आमच्या एका एकारांत मित्रवर्याने येथे दही मागताच, सगळे हॉटेल स्तब्ध होवून आमच्या कडे बघायला लागले होते!
त्याला गप्प बसून नाक पुसत खाण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही.
ही स्वर्गीय मिसळ संपेपर्यंत भलेभले स्वर्गीय होतात!!! बोलायचं कामच नाही...!
मग कारंज्यावरचा पांडे मिठाई च्या शेजारी असलेल्या टपरीवरचा चहा गरम चहा...
हे खाल्ल्यावर बरेच लोक अर्ध्यातासाने वगैरे बोलूही शकतात असे ऐकुन आहे!
मी मात्र मिसळ गरम चहा व त्यावर एकशेवीस तिनशे लावली की तासभर फारसे न बोलणेच योग्य धरतो.
या वेळी खाणे हा बोलण्याचा प्रकारच नाही; हे ध्यानात येते हो!
आपला
गुंडोपंत
औरंगाबादला बाबा पेट्रोल पंप नावाचा बस स्टॊप आहे. इथेच "गणेश इडली वडा सेंटर" नावाचे एका अण्णाचे प्रसिद्ध हॊटेल आहे.
सकाळी नाष्ट्याला आणि दिवसभर इथे तोबा गर्दी असते, हा आहे 'उक्मा '(१० रुपये) ( मला दोन वाट्या भरुन लागतात) त्याच बरोबरइथे इडली वडा (१२ रुपये),उत्तप्पा (१२ रुपये),शिरा( १० रुपये), मसाला डोसा १५ रुपयात मिळतो. मराठी माणूस कामाची सुरुवात इथूनच करतो ! :)
( खोब-याची चटणी लहान वाटीत तर उकमा मोठ्या वाटीत.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मटण बिर्याणी अप्रतिम दिसतेय...
योगायोगाने आज आमच्या घराजवळच्या 'अभिरूची'मधे मटण बिर्याणी खाऊन आलो आणि आता हा धागा बघतोय :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
प्रतिक्रिया
अंबिका
नाष्ट्याची सोय !
मस्त
फोटु
मार्ग
क्या बात है !