भारतीय घटना ही जगातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक समजली जाते. त्याबद्द्ल अनेक समज/गैरसमज माझ्या मनात आहेत. तुमच्याहि असतील. म्हणून सध्या याविषयी वाचन चालु आहे. मात्र हे अर्थात इंग्रजीतून. मराठी मधील एखाद दोन पुस्तके चाळली. त्यातील भाषा मला तरी निरस वाटली. (ह्या विषयावर लिहिताना मख्खपणा बाळगलाच पाहिजे असं संविधानात लिहिलं आहे का ते बघत होतो )
तर मला जे थोडंफार समजलं ते मला समजणार्या भाषेत यावं म्हणून ही लेखमाला सुरु करत आहे. यानिमित्ताने तुमचे समज /गैरसमज दूर झाले/पुष्टी मिळाली तर उत्तमच. काहि नवीन नसलं तर निदान जालावर एक दस्तऐवज उपलब्ध राहिलच. आशा आहे हा उपक्रम तुम्हाला आवडेल.
--------------------------
संविधानाची - घटनेची गरजच काय? संविधान म्हणजे काय? समाजाचे आणि घटनेचे नक्की नाते काय? माझ्या रोजच्या कामाच्या धबडग्यात ही घटना डोकावते तरी का? या व अश्या प्रश्नांची उत्तरे वाटतात तितकी सोपी नसली तरी तितकी कठीणहि नाहित. व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपल्याला माहितच आहे. विविध प्रकारच्या व्यक्ती एकत्र नांदताना मतभेद हे असणारच. मग समाज कसा चालवायचा? तर ठराविक समाजाने स्वतःला आखुन घेतलेली चौकट अशी घटनेची अत्यंत ढोबळ व्याख्या करता येईल.
घटनेची उद्दीष्टे:
१. समाजाच्या विविध घटकांमधे सुसंबद्धता येण्यासाठी एक सर्वमान्य / बहुमान्य पायाभुत नियमावली उपलब्ध करणे: विविध घटकांना एकत्र ठेवायचे तर घटनेमधे एक ठोस नियमावली असणे गरजेचे आहे. घटना असे मुलभूत नियम मांडते जे समाजातील प्रत्येक घटकाला - ज्यात नागरिक आणि राज्यकर्ते दोघेहि आले - पाळणे सक्तीचे असते. अशी मुलभुत तत्त्वे बनविताना फार काळजी घ्यावी लागते. कारण जर एखादा घटक एखादे तत्त्व मानेनासा झाला तर इतरहि मानायला तयार होत नाहित.
२. समाजातील अधिकाराची रचना करणे व अधिकार्याचे (सरकारचे) स्वरूप मांडणे: समाज चालवायचा तर कोणाला तरी काहितरी निर्णय घेणे क्रमप्राप्तच आहे. एखाद्याला "अ" कायदा असावासा वाटतो तर दुसर्याला "ब" कायदा. अश्यावेळी कोणाकडे कायदा करण्याचा अधिकार असणार हे घटना ठरवते. प्रत्येक देशात याचं उत्तर वेगवेगळं असु शकतं. जसं राजेशाहि देशांमधे राजाला / राष्ट्रप्रमुखाला कायदा करण्याची / शासन करण्याचा अधिकार असतो. तर जुन्या सोवियत राज्यांप्रमाणे एकाच पक्षाला तो अधिकार दिला जाऊ शकतो. मात्र लोकशाहि देशांमधे हा अधिकार "जनतेला" असतो असं ढोबळपणे म्हणता येईल.
३.अधिकार्याच्या (सरकारच्या) आधिकारावर नियंत्रण ठेवणे: एखाद्याला अधिकार दिला म्हणजे ती व्यक्ती / संस्था काय हवं ते करू शकते असं होणं धोकादायक असतं अश्यावेळी प्रत्येक अधिकारक्षेत्रावर अंकुश असणे गरजेचे ठरते.घटना सरकारच्या अधिकारावर नियंत्रणहि ठेवते. सरकार कोणते निर्णय घेऊ शकते आणि कोणते निर्णय / हक्क डावलु शकत नाहि हे देखील घटनाच ठरवते. हे करण्याची सगळ्यात प्रमुख पद्धत म्हणजे घटनेची मुलभूत तत्त्वे मांडणे. जसे भारतीय घटनेने जनतेला विविध प्रकारचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे ज्यात असणारे बोलण्याचे स्वातंत्र्य, वैयक्तीक निर्णयस्वातंत्र्य, एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, व्यापाराचे स्वातंत्र्य, धर्माचे स्वातंत्र्य वगैरे गोष्टी मुलभूत तत्त्वांमधे येतात.
४.समाजाच्या बदलत्या गरजा/जाणीवा/आकांक्षा पूर्ण करणे: समाज सतत बदलत असतो. त्याबरोबर त्याच्या गरजा , जाणीवा, आकांक्षा देखील बदलतात. घटनेमधे या बदलत्या गरजांची पुर्तता करण्याची लवचिकता असणे गरजेचे आहे.
५. समाजोपयोगी बंधने घालणे: याशिवाय घटना फक्त नियम बनवत नाहि तर काहि देशांत घटना शासनाला जनतेसाठी काहि गोष्टी करणे बंधनकारक करते. जसे साऊथ आफ्रिकेमधे रंगभेदाचे - वंशभेदाचे निर्मुलन करणे सरकारसाठी घटनेने बंधनकारक केले आहे. तर इंडोनिशिया मधे सरकारवर प्रत्येक नागरीकाला शिक्षण व आरोग्य सुविधा पुरविणे (केवळ उपलब्ध करणे नाहि तर पुरविणे) बंधनकारक आहे.
६. समाजाला ओळख मिळवून देणे: शेवटचं आणि बहुदा सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे समाजाला ओळख मिळवून देणे.
----------
समांतर अवांतरः टेक अ ब्रेक
घटना बनविणे ही एक अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण बनलेली घटना हा तसं पहायला गेलं तर केवळ एक दस्तऐवज असतो. मात्र त्याप्रमाणे आचरण करणे जनतेची जबाबदारी असते. उदाहरण द्यायचं झालं तर नेपाळची राज्यघटना घ्या. १९४८ पासून ते आतापर्यंत एकूण पाच वेळा घटना लिहिली गेली आणि ती दरवेळी कोसळली. १९९० पर्यंत देशाचा राजाच ती घटना लिहित होता. नंतर १९९० मधेअनेक पार्ट्यांना मान्यता मिळाली तरीही राजाच सर्वात वर होता. पुढे राजा कसा पदच्युत झाला हे सर्वज्ञात आहेच.
------------
भारतीय संविधानाचे गठन
भारतीय राज्यघटना समिती स्वातंत्र्यापूर्वीच बनली होती. हि समिती अखंड भारतासाठी घटना लिहिण्यासाठी बनविली होती. या समितीची पहिली सभा ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली तर भारताचे विभाजन झाल्यानंतर समितीची पुनर्रचना झाली आणि या समितीची पहिली बैठक १४ ऑगस्ट १९४७ रोजी झाली.
या समितीची रचना साधारणतः कॅबिनेट मिशनमधे सांगितलेल्या तत्त्वांनुसार झाली होती. ते नियम असे:
- प्रत्येक प्रांत, संस्थाने यांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर या समितीमधे १:१०,००,००० या प्रमाणात जागा दिल्या होत्या. त्यामुळे ब्रिटीश अंमलाखाली सणार्या प्रांताचे २९२ प्रतिनीधी, तर स्वायत्त संस्थानांचे ९३ प्रतिनीधी या समितीवर होते.
- प्रत्येक प्रांतातील जागा लोकसंखेतील हिश्यानूसार हिंदु, मुसलमान, शीख आणि इतर या भागात विभागल्या गेल्या जेणेकरून सर्व प्रकारच्या जनतेला प्रतिनिधित्त्व मिळावे
- ढोबळ बहुमताचा आदर करणारी मतदान पद्धती(विनर टेक्स ऑल / फर्स्ट पास्ट थ पोस्ट): बहुसंख्यांचा पाठिंबा असणार्याला विजेता म्हणणे. निर्णायक बहुमताचे (५०%च्या वरील मतांचे) बंधन नाहि.
- संसदीय कामकाज पद्धती
- "कायद्याचे राज्य" ही संकल्पना
- लोकसभाध्यक्ष हे पद व त्याची भुमिका
- कायदा बनविण्याच्या पद्धती
वाचने
25136
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला उपक्रम.
छान माहिती..
+१ हेच म्हणातो
In reply to छान माहिती.. by मस्त कलंदर
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ऋषि, लेख
छान लेख.
उत्तम
अगदी
सुंदर विषय
अगदी असेच
In reply to सुंदर विषय by सहज
असेच
In reply to सुंदर विषय by सहज
सुरेख
चांगला
हि लेखमाला
ऋषिकेश...
चांगला
अमेरिकेने
In reply to चांगला by विकास
घटना दुरूस्ती
In reply to अमेरिकेने by नितिन थत्ते
धन्यवाद
In reply to घटना दुरूस्ती by विकास
चांगला उपक्रम
फार सुरेख
अगदी अगदी अगदी सहमत
In reply to फार सुरेख by मेघना भुस्कुटे
अतिशय छान उपक्रम ऋषीकेश!
आणीबाणीच्
In reply to अतिशय छान उपक्रम ऋषीकेश! by चतुरंग
चांगला उपक्रम
धन्यवाद
पुढील
In reply to धन्यवाद by ऋषिकेश
लेख
सुरे़ख
मसुदा समिती
In reply to सुरे़ख by Nile
(आमचा)
In reply to मसुदा समिती by नितिन थत्ते
खुपच सुंदर लेखमाला
मस्त!!!