ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का? राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!
भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो -- ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः दुसर्यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.
दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -
असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )
अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का? (याच समस्यापूर्तीवर दुसर्याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )
माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील प्रमाणे -
नमित होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा!
तेणे तुम्हा विस्मय फार वाटे! सिंदूर कैसा विधवा ललाटे!
(पाठभेद असू शकतात; मूळ संस्कृतचे हे मराठीकरण!)
राजा भोज व कालिदास यांच्या बऱ्याच चतुर्यकथा प्रसीद्ध आहेत.
पण हा कालिदास संस्कृत कवी, नाटककार कालिदासहून भिन्न असावा, असे संशोधकांना वाटते.
भोज राजाचा काळ इसवी सनाचे अकरावे शतक (१००० ते ११००)हा निश्चित आहे; पण साहित्यिक कालिदासाचा काळ इसवी सनाचे चौथे शतक सांगितले जाते.
हा दुसरा कालिदास देखील चतुर, विद्वान असल्याचे दिसते, हे मात्र खरे!
एक भाप्र
राजा भोज आणि कालिदास दोघे मराठी होते का? काव्यपंक्ती मराठीत आहेत म्हणून शंका आली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
राजा भोज आणि कालिदास दोघे मराठी होते का? मला माहीत नाही.
पण ही समस्या मी लहानपणी ह्या दोघांच्या संदर्भात मराठीतूनच ऐकली आहे.
(कदाचित मूळ श्लोक संस्कृतमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालौघात मराठी भाषांतरच पुढे आले असावे...)
चतुरंग
अजून एक समस्या!
ह्याची पुढची ओळ लिहा.
इथेच लिहिली तरी चालेल.
ही समस्या देखिल राजा भोजच्या संदर्भातील आहे.
जलमध्ये डुबुक् डुबुक्
?????
(जलतरणपटू)बेसनलाडू
जम्बू फलांनी पक्वानी पतन्ती विमले जले...
जम्बू फलांनी पक्वानी पतन्ती विमले जले...
परीपक्वानी जम्बू फलानी पतन्ती विमले जले...
........... जाल गोल शन्कया:
( पिकलेली जांभळे पण्यात पदतात्...पण मासे ते जाळे (जाल गोल) टाकण्याचे गोळे समजुन खात नाहीत...)
विजूभाऊ...
बेला आम्हाला एक संस्कृतमध्ये धडा होता. त्यात हीच समस्या भोज राजा दरबारात विचारतो असे होते. आणि त्या दरबारातील एक विद्वानही
जलमध्ये डुबुक् डुबुक् असेच उत्तर देतो. अर्थात ते चूक आहे.
त्यातही खूप गमती जमतीची उत्तरे होती. दूर्दैवाने आज ते नीटसे आठवत नाही.तानि मत्स्यानि/मत्स्या न खादन्ति?
तानि मत्स्यानि/मत्स्या (विभक्ती प्रत्ययातील संदिग्धतेबद्दल क्षमस्व - बहुतेक 'मत्स्या'च असावे) न खादन्ति
जालगोलकशन्कया
असे आहे का?
(स्मरणशील?)बेसनलाडू
बरोबर!
शाब्बास बेला. तुझ्या स्मरणशीलतेला दाद द्यायला हवी.
संस्कृतमध्ये तसेही शब्द मागेपुढे झाले तरी चालतात. त्यामुळे हेच शब्द कोणत्याही क्रमाने उच्चारले तरी हरकत नाही.
अशीच अजुन एक ओळ होती..
ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का?
राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!
जलमध्ये डुबुक डुबुक च लक्षात राहीले आहे कायम.. :)
हो, असं आहे ते
भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो --
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
दुसर्यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.
दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -
रामाभिषेके जलमाहरन्त्याः
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्याः
सोपान मार्गेण करोति शब्दं
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
(संस्कृत माझा विषय नाही, त्यामुळे चुका असू शकतील, हे सर्व लहानपणी ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.:)
चतुरंग
समस्या
रामाभिषेके जलमाहरन्त्याः न्त्या
हस्ताच्च्युतो हेमघटो युवन्त्याः त्या
सोपानमार्गेण करोति शब्दं
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
ठंठं ठ ठंठं ठ ठठ ठंठ ठंठ: ||
असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )
अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का?
(याच समस्यापूर्तीवर दुसर्याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )
-(विसरळभोळा) ऋषिकेश
ठठं ठठंठं ठठठं ठठंठः
सांडोन सुवर्णघडा पडे हा
सोपानमार्गीं* करून शब्द
ठठं ठठंठं ठठठं ठठंठः
संस्कृत पद बहुधा तुम्हाला ठाऊक असावे.
*सोपानमार्ग म्हणजे जिना
एक श्लोक
ही समस्यापूर्ती नाही पण बुचकळ्यात टाकणारा श्लोक आहे.
केशवंपतितंदृष्ट्वापांडवाहर्षनिर्भरा।
रुदंतिकौरवास्सर्वेहाहाकेशवकेशव॥
उत्तर!
केशवं = कुठल्यातरी प्राण्याचे शव
पतितं दृष्ट्वा = पडल्याचे पाहून (पाण्यात पडल्याचे पाहून)
पाण्डवा = पाण्यामधे रहाणारे प्राणी (मासे)
हर्षनिर्भरा
रुदन्ति
कौरवा = (जमिनीवर रहाणारे प्राणी)
सर्वे = सगळे
हा: हा: केशवः केशवः||
आता समजलं?
कौरवा
जरूर!
समस्यापूर्ती
तसा श्लोक सोपा होता पण एकही उत्तर आले नाही. असो. समस्यापूर्ती पुढीलप्रमाणे -
नमीत होती विधवा शिवाला
मसूर डाळी जडली कपाळा
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे
चतुरंग
चतुरंग चिद्यापीठात सगळे .......
राजा भोज!
माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील
राजा भोज व कालिदास यांच्या