खूप खूप आवडली ही सुरुवात! अतिशय हृद्य आणि भावपूर्ण लिहिलंय मीनल! पार्टीच्या वातावरणातून कधी निघालो, आणि अंतरंगात कधी पोहोचलो, कळलंच नाही!
ग्रॅज्युएशन फक्त माझ्या मुलाचच नाही तर माझ ही झाल आहे.
ग्रॅज्युएशन.... जे ग्रॅज्युअली होत ते.... अल्लडते पासून प्रौढत्वाकडे .... दुकटेपणापासून एकटेपणाकडे.... भरीवपणापासून रितेपणाकडे...
आणि शाळेच्या`त्या` सेरिमनी बरोबर COMMENCEMENT झाली आहे माझ्या ही आयुष्यात....
सुरवात.....नवीन प्रकारच्या आयुष्याची..... जिवनातल्या संक्रमणाची, स्थित्यंतराची...
या जाणिवा तर खूप खास! अभिनंदन, शुभेच्छा आणि बरंच काही, शब्दांत सांगता न येणारं!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
मिनलताई,
इतकी भावपूर्ण लेखमाला लिहून तू आम्हाला वेगळाच अनुभव दिलास.
आताचा भाग वाचताना जीव कासावीस झाला.
माझं काय होइल मुलगा शिकायला बाहेर जाताना.....आणि बरच काय काय वाटून गेलं.
आपल्याला जर आठ दहा मुलं असली तर किती बरं होइल असं वाटलं...... एम्टी नेस्टची भिती वाटायला नको.;)
रेवती
खरे आहे :(
माझं काय होइल मुलगा शिकायला बाहेर जाताना.....आणि बरच काय काय वाटून गेलं.
मला तर अजुन मुलबाळ पण नाहि पन तरिहि जीव कासावीस झाला.
मिनल काकु किति उत्साही आहेत. भारतातुन फोटो मागवुन घेतले.
काकु मस्त वाट्ले अजुन लिहा ना !!!!
चुचु
मस्त लेख..
खरच इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात celebrate करतात प्रत्येक achievement. माझे पण M.S. चे ग्रॅज्युएशन झाले काल.मी भारतामधे असताना ग्रॅज्युएशन attend नव्हते केले आणि त्याचे काही विशेष वाटलेही नव्हते. पण इथे गेल्यावर्षी ग्रॅज्युएशन ceremony पाहिला आणि मग मात्र पुढचे एक वर्ष ह्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होतो. ह्यावेळी हवामान तितकेसे चांगले नव्हते पण पालक आणि मुलांचा उत्साह मात्र तसाच होता. पाऊस पडत असूनही सगळे जण तेवढ्याच उत्साहाने विनातक्रार बसून होते. पावसामुळे बर्याच लोकांनी भाषणे आटोपती घेतली.
University मधे प्रत्येक College (उदा. College of Management, College of Science and Mathematics etc. जशी आपल्याइथे Departments असतात तशी) ला वेगळ्या रंगाचे sage (ओढणी सारखे घ्यायचा एक कापडाचा तुकडा) दिले जातात. बाकी सगळे सारखेच असते. काळा गाऊन आणि कॅप. त्यावर एक रेशमी लांब गोंडा (Tassels) ज्यावर ग्रॅज्युएशनचे वर्षाचा बिल्ला असतो. तो मीनल यांनी सांगितल्या प्रमाणे आधी टोपीच्या उजवीकडे ठेवायचा असतो. PhD केलेल्यांना मात्र वेगळा गाऊन आणि गोल टोपी दिली जाते.
प्रत्येक कॉलेज ठरलेल्या क्रमाने मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आपापल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाते. नंतर तिथे मुख्य कार्यक्रमात थोडीशी भाषणबाजी होते आणि मग फक्त PhD मिळालेल्यांना आणि special achievement award winners ना वर बोलावून पदवीदान केले जाते. बाकीच्यांना नुसतेच कॉलेजप्रमाणे ग्रुप मधे उभे करून announce करतात की तुम्हाला डिग्री मिळाली आहे आणि मग प्रत्येक कॉलेजला वेगवेगळ्या ठिकाणी नेले जाते. तिथे मग प्रत्येकाला स्टेजवर बोलावून डिग्री दिली जाते. (खरे म्हणजे नुसतेच होल्डर देतात ज्यात डिग्री ठेवली जाते. खरी डिग्री नंतर पोस्टाने येते. कारण इतक्या हजारो मुलांची नावे order मधे लावणे अशक्य असते. आणि काही जण येतही नाहीत डिग्री घ्यायला.). तुमचे नाव व्यवस्थित घेतले जावे म्हणून प्रत्येकाला आधीच एक कागद दिला जातो ज्यावर phonetic स्पेलिंग लिहायचे असते. सगळ्यांना डिग्री देऊन झाल्यावर मग सांगितले जाते की आत तुम्ही ग्रॅज्युएट झालात आणि आता तो रेशमी गोंडा डावीकडे करा. मग परत सगळ्यांना रांगेत बाहेर सोडले जाते. :)
अवांतर :इथे फोटो पहाता येतील.
ग्रॅज्यूएशन आवडलं. मुलाच्या बरोबरीनं अयुष्यातल्या ह्या टप्प्यावरच्या स्थित्यंतरातून होणारं तुमचं ग्रॅज्यूएशन मनाच्या आत पोचलं. जीव कासावीस कसा होऊ शकतो ह्याची जाणीव तीव्रतेनं झाली.
मी ग्रॅज्यूएट होऊन बाहेर नोकरीला निघालो त्यावेळी माझ्या आईवडिलांना काय वाटलं असेल ह्याचा थोडा अंदाज आला.
आपणंच स्वप्न दाखवतो आणि भरारीची वेळ आल्यावर मात्र मन कातर होतं हा मनुष्यस्वभाव आहे. त्याचा छान मागोवा तुम्ही घेतला आहेत.
आपल्या मुलांना आपली गरज लागेल तेव्हा आपण कुठे असू हा प्रश्न मनाला छळत रहातो पण हे पिढी दरपिढी असे होतच रहाणार हे सत्य स्वीकारले की आर्तता सोसायचं बळ येतं
भरपूर कष्ट घेऊन तुम्ही केलेल्या तयारीचे कौतुक वाटले.
पुढील भरार्यांसाठी नचिकेतला आणि त्या समर्थपणे बघण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!!
(बालवाडीतला)चतुरंग
प्रतिक्रिया
मस्त
अप्रतिम!
असेच
खुपच छान
व्वा.सर्व
मिनलताई, इत
खरे आहे
साधं, सरळ
मस्त
धन्यवाद
छानच,,,,,,
मस्तच लिखाण!
भावपूर्ण आणि प्रामाणिक
छान!
अप्रतिम