Skip to main content

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/09/2025 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात. १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले. महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती. देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला. २००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली. २०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली. शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21589
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by शाम भागवत

न राज्यं न च राजाS सीत् न द्ण्ड्यो न च द्ण्डिकः धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म प्रस्परम ! शासनयंत्रणा नाही, शासक नाही, कोणी अपराधी नाही, शिक्षा करणाराही कोणी नाही, धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील, ही महाभारतातील आदिम साम्यवादी कल्पना. अर्थात अशा कल्पनेने काही काळ मनोरंजनही होईल. परंतु समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळणार नाही. ( झोत ) आपण कायम ज्या 'गोबरयुगा'ची कल्पना करतो त्याची पायाभरणी म्हणता येईल ती शंभरवर्षापूर्वी झाली आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहात आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक खेळाच्या, व्यायामाच्या, माध्यमातून तरुणांना गोळा करतात. काही तरुण व्यायाम, खेळ यासाठी येतात आणि हळुहळु यांना धर्म अभिमानाचे (आपोआप धर्मद्वेश सुरु होतो) धडे देणे सुरु होते. धर्माभिमान उभा करता करता, धर्मद्वेष चिंतन शिबिरातून तरुणांना मिळायला लागतात. 'भगवा ध्वज हाच राष्ट्रीय धव्ज, हिंदुस्थान हिंदूंचा आणि एकचालकानुवर्तित्व तत्वांची संघाच्या बौद्धि कात पुनराव्रुत्ती होत असे. शिस्त आणि संघटनेसाठी जर्मनी, इटली, यांचे आदर्श असत. एखाद्या वेळी चवबदल म्हणूण हिंदूंचा उज्ज्वल गतेहितिहास, लोकशाही, संस्थापद्धतीची चेष्टा आणि कॉंग्रेसचा अधिक्षेप या सामग्रीवरच संघाची बौद्धिक आणि संघटनात्माक उभारणी झाली होती' असे अनुभव अनुभव संघात अनेक वर्ष घालवलेल्या स्वयंसेवकांनी नमुद करुन ठेवलेले आहेत. (संघातले दिवस् स.ह.देशपांडे- मौज दिवाळी अंक १९७४) झोत. रावसाहेब कसबे, पृ.क्र. ३७ आज शंभरवर्षानंतरही संघाच्या धोरणात फार बदल झालेला नाही. हिंदू संघटनाच्या नावाखाली भाजपला मदत करणे आणि कॉंग्रेस सहित इतर पक्षांचा द्वेष, मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते, गाय गोबर संस्क्रुतीवर प्रेम दाखवतांना त्यापोटी इतरांचा द्वेष शिकवणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहता येते. राष्ट्रीय स्व्यंसेवक संघाच्या जन्माचा विचार पाहता ब्रिटीश भारतात वर्गीय शोषण होत होते. सर्व सत्ता केंद्रे ही उच्च वर्णियांच्या हाती होती, स्वातंत्र्यांनंतरही, ही शोषण सत्ता व्यवस्था आणि वर्गीय व्यवस्था आपल्या हाती कशी राहील याची काळजी त्यांना पडली होती. सरंजामदार आणि नवीन भांडवलदारांना हाताशी धरुन ते संघाला जमले होते, तशी भारतीय स्वातंत्र्य चळवळ हीच त्यांच्या मार्गातील अडसर होती. स्वातंत्र्योत्तर भारताची राज्यघटना ही संसदीय लोकशाहीवर उभी राहणार होती अशा वेळी तेव्हा सत्ता आणि वर्चस्व शक्य नव्हते. बहुजन समाज जागृत होत होता. १९०९ व १९१९ च्या कायद्यामुळे लोकशाही विचारांनी डोके वर काढले होते. टीळकांच्या निधनामुळे काँग्रेसवरील हिंदुत्ववाद्यांची पकड सैल झाली होती. म.गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लीम, अस्पृश्य यांनाही सहभागी करुन घेतले होते. म. गांधीच्या उदारमतवादी धोरणामुळे लोकशाहीचा विचार रुजेल ही भिती होती. म.गांधीजींच्या मुळेच संघाचा जहालवाद फोफावला नाही. म. गांधीचा द्वेष असा सहजा सहजी संघाच्या मनात आलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीपासून दूर का राहिला. राजकारणापासून अलिप्त का राहिला तर, राजकारणातून सत्ता नको तर, वर्चस्व असले पाहिजे, दबाव गट असला पाहिजे याच हेतुने संघाची स्थापना झालेली दिसते. आज शंभर वर्षानंतरही त्यांच्या धोरणात विविध धर्म एकता,आधुनिक विचार, विज्ञान, प्रगती, डोळसपणा, वैश्विक भाव दिसत नाही त्याची कारणे सहज शोधली तर सहज सापडतील. अशा संघटनापासून सावधान राहिलं पाहिजे इतकंच. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी. अगदी. सावध राहिलंच पाहिजें. पण संघविरोधी लोकं एवढा प्रयत्न करत असूनही त्यांची संख्या कमी का होते आहे? बऱयाच वेळेस बंदी घातली. अर्धी चड्डी म्हणून हिणवलं. केंद्र व राज्य सरकार हातात असतानाचे हे सगळे प्रयत्न करून झाले. आता हातात सरकार नाही तर लोकांना सावध करून, सावध लोकांची संख्या कशी वाढवणार असा प्रश्न आहे हो. मोहन भागवत आल्यावर संघ बराच बदलला म्हणतात. पण संघविरोधी लोकींनी संघाला विरोध करण्याचे मार्ग बदलले का? जर नसतील बदलले तर मग संघविरोधी राजकारणाला यश कसं येणार? संघ संपणारच हा आदर्शवाद असेल तर माझी काहीच हरकत नाही. एवढं गोड बोलून थांबतो.

In reply to by शाम भागवत

श्री० शाम भागवत ज्या क्षणी काँग्रेस आणि इतर पक्ष आपले आत्मपरिक्षण/शोधन करून पुनर्बांधणी करतील त्या़क्षणी संघप्रेमाला ओहोटी लागेल. तुम्हाला बेल कर्व्हचा नियम्/परिणाम ठाऊक आहे का? अविवेकी लोकांची संख्या विवेकी लोकांच्या संख्येपेक्षा नेहेमीच जास्त असते कारण निसर्ग क्षमतांचे वाटप समान करत नाही. अविवेकी/अडाणी लोकांना समूहात नेहेमीच सुरक्षित वाटते. समूहात जोपर्यंत गरजा भागतात तो पर्यंत समूह एकसंध राहतो. संघात राहून भ्रमनिरास झालेल्यांची संख्या थोडी नाही. ही संख्यापण कमी होण्याची लक्षणे नाहीत. ज्या प्रश्नांकडे संघ जाणून-बुजून डोळेझाक करतो ते संघाबद्दल भ्रमनिरास आणि संघाचा पराभव करण्यास पुरेसे आहेत. त्यामुळे संघ संपणार नाही हा उन्मादच शेवटी केव्हा तरी घात करेल हे नक्की...

In reply to by युयुत्सु

उपजे ते नाशे. इतके सोपे आहे ते तत्वज्ञान. पण त्यात जो आपले ममत्व किवा राग/द्वेष घालतो त्याला त्रास होतो. त्यामुळे मी सतत फक्त वस्तूस्थिती मांडतोय. त्यात काही चुकत असेल तर सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते मी माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत रोज जात असे. त्या नंतर ही मला त्यांच्या बद्धल आस्था होती. अनेक संघ कार्यकर्त्यांचे उल्लेखनिय काम मला माहित अहे. तुम्ही जे मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम म्हणत आहात ना, त्याच्या अगदी उलटे आजच्या काळात दिसते. श्री. मोहन भागवत यांची विधाने पहाला तर ते हिंदुंच्या भल्यासाठी आहेत असे वाटत नाही. त्यांची विधाने पाहिली असता ती हिंदू संघटना राहिली आहे का? असा प्रश्न पडतो! माझ्या वाचनात त्यांची आलेली त्यांची काही विधाने खाली देत आहे. १] मुसलमानों के बिना हिंदुत्व भी नही बचेगा| २]मुसलमानों के बिना हिंदू राष्ट्र नही| ३]आरक्षण को संघ का पेहला से समर्थन है ,सदा रहेगा, जबतक उस आरक्षण के लाभार्थीं को ये लगता नही इसकी आवशकता नही, ये भेद समाप्त हो गया हम अब अपने बलबुते खडे रहेंगे,ये दुसरे किसी को दो ये ऐसा जबतक उनको लगता नही हम उसके समर्थन मे रहेंगे| ४] जब से इस्लाम भारत में आया उस दिन से इस्लाम यहा है और रहेगा! इस्लाम नही रहेगा, ये सोचने वाला हिंन्दू सोच का नही है! ५] मुसलमानो के बिना हिंदुत्व नही| ६] हम कहेंगे कि मुसलमान नही चाहिए तो हिंदुत्व भी नही बचेगा| ७] हिंदुत्व में मुसलमान पराए नही| ८] हर मस्जिद मे शिवलिंग की तलाश क्यो? ९] मंदिरो को लेकर अब कोई आंदोलन नही करेगा संघ| १०] पेहले दिन इस्लाम भारत आया तबसे आजतक इस्लाम यहा है और रहेगा,इस्लाम नही रहेगा ऐसे सोचने वाला हिंदू सोच का नही| ११] परिवार के अंदर बच्चों से बातचीत से रोका जा सकता है लव जिहाद| १२] ब्राह्मणों की बेटी दलितों के घर ब्याहने से मिटेगा जातिवाद| १३] परशुराम जी "बढई / लोहार समाज के लक्कड हारे थे वो हमेशा अपने पास फरसा कुल्हाडी रखते थे वो कोई ब्राह्मण पुत्र नही थे|[ हे विधान सत्य आहे का? ते मला पडताळता आलेले नाही.] १४] उठसूट कोणत्याही प्रर्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरं असल्याचा दावा करणं योग्य नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे चूक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा.हा.हा... मग मोदी संघाचे ना? त्यांनी कोट्यावधी रुपये मुसलमानांसाठी का खर्च केले? कढी भात खायला? बरं ते जी दरवर्षी चादर चढवतात तो तर जिहादी आहे नै का? खरंच ते जर हिंदूत्ववादी असते तर ही घृणास्पद प्रथा त्यांनी ताबडतोब बंद केली असती ना? [ एका अंध भक्ताने ती चादर भगव्या रंगाची आहे असे मला सांगुन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.] मोदींनी नक्की किती हजार कोटी रुपये मुस्लिम योजनांवर खर्च केले? तो आकडा शोधणे कठीण आहे म्हणतात! आनंद रंगनाथन म्हणतात की जे मोदींनी मुसलमानांसाठी केले ते हिंदुंच्यासाठी देखील केले नाही. संदर्भः Modi Done More For Muslims Than Hindus" Anand Ranganathan “PM Modi Has Done More For Muslims Than Hindus” - Anand Ranganathan Dr Anand Ranganathan Podcast : BJP AND Congress | PM Modi | Hindu Discrimination | Hindu-Muslim मला संघ कधीही मुस्लिम द्वेष्टा असल्याचे कोणताच चष्मा न लावता दिसलेले नाही. ज्यांना खरंच देशात हिंदूची स्थिती नक्की काय आहे? हे तथ्या सकट जाणुन घ्यायचे असेल तर आनंद रंगनाथन यांचे हिंदूराष्ट्रातील हिंदू हे मराठीत उपलब्ध असलेले पुस्तक जरुर वाचावे असे मी सुचवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा. उपप्रश्नः १. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का? २. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का? नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.

In reply to by स्वधर्म

1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही , 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही , खूप खूप तर वर्ग असताना ओळख व्यवस्था म्हणून तात्पुरते ओळख पत्र या काही वर्षात देऊ लागले आहेत , वर्ग पूर्ण झाला की ते जमा करून घेतात , ही पद्धत संपूर्ण भारत भर असेलच असे नाही , नवीन छोटेखानी प्रयोग फक्त काही ठिकाणी झाले 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो , आणि ह्या निधीमधूनच वर्षभराचा सर्व खर्च केला जातो . पुन्हा समर्पण गोळा केले जात नाही . ह्याचा हिशोब संघ कार्यालयात ठेवला जातो , कोणीही स्वयंसेवक हा हिशोब पाहू शकतो , परंतु सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही , तेवढा विश्वास तेथे ठेवलेला असतो . याचे अंतर्गत ऑडिट होत असते . फक्त राम मंदिराच्या वेळी संघाने समाजातून निधी गोळा केला होता , ते ही मंदिर समितीच्या अध्यक्षतेखाली , तो सुद्धा हिशोब संघ देऊ करतो/ त्या वेळी दिला . परंतु ज्यांनी एक रुपया सुद्धा राम मंदिरासाठी दिला नाही ते हिंदू बांधव देणगीचा हिशोब मागतात .राम मंदिरावरच आणि रामा वरतीच प्रश्न चिन्ह निर्माण आपले हिंदू बांधव करत , आहेत हे खेदाने नमूद करतो.

In reply to by समाधान राऊत

श्री पटाईत काकांनी काही उत्तरे दिली नाहीत. तुंम्ही दिलीत, हरकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. आपण संघाकडे पाहताना एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून उत्तरे दिली आहेत. तथापि, या दिलेल्या माहितीकडे एका अपरिचिताचा पर्यायी दृष्टीकोन ठेवूनही पाहता येते. >> 1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही मग संघ हे काय आहे? '२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.' असे पटाईत काका यांनी लिहिले आहे. याचा अर्थ लाखाहून जास्त स्वयंसेवक तर आहेतच. एवढे मोठे संगठन नोंदणी न करता चालवावे याचे कारण काय? >> 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही नोंदणी नाही, सभासदत्व नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जवळजवळ भूमीगत संघटना असल्यासारखेच झाले. हे खरोखरच असे का चालवतात हा प्रश्न पडतो. समजा कोणी सभासदाने संघाच्या वतीने काही बेकायदेशीर काम केले, तर त्याच्यापासून संघाला हवे तेंव्हा वेगळे दाखवता येऊ शकते व जर चांगले काम केले तर संघाचा संबंध दाखवता येतो. हे कितपत पारदर्शक आहे असे आपणांस वाटते? >> 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो हा निधी असा कितीसा असणार? काही माहिती खुली करण्यात आली आहे का? एवढ्या अल्प निधीमध्ये फक्त २०२५ या एका वर्षात ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे घेतली असा दावा करण्यात आला आहे. एक शिबीर घ्यायचं तर केवढा निधी लागेल? हे काम चांगलेच आहे व त्यासाठी संघाने कितीही पैसे गोळा करायला कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही, फक्त संस्थेची नोंदणी नसल्याने धर्मादाय आयुक्त, आयकर विभाग व सरकारच्या सर्व संस्था संघाला काहीही विचारू शकत नाहीत. एखादी साधी चार माणसांची संस्था काढली तरी केवढे नियम पाळावे लागतात, हिशोब ठेवावे लागतात व मुख्य म्हणजे जे कराल त्याची जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना घ्यावीच लागते. संस्थेची व सभासदांची नोंदणीच न केल्यामुळे संघाला हे काहीच लागू होत नाही. त्यामुळे देशातील यंत्रणेला तिथे कसलाच प्रवेश नाही. संघ ही एक राष्ट्रप्रेमी संघटना आहे, तर देशाचे कायदे पाळायच्या कक्षेतच येऊ नये अशा प्रकारे ही संस्था का चालविली जाते हे आपण सांगू शकाल का? आपल्यासारख्या संघाबद्दल अभ्यास असणार्‍या व्यक्तीकडून नीट माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारले आहेत, कृपया गैरसमज नसावा.

In reply to by स्वधर्म

आरएसएस ही पंजीकृत संस्था नसली तरी ही Audited Reports & Annual Activities RSS khud registered nahi hai, lekin uski Akhil Bharatiya Pratinidhi Sabha (ABPS) har saal ek Annual Report publish karti hai इत्यादि इत्यादि.

संघाची स्तुती संघाचे लोक सोडून कुणीही करत नाही, संघाचे लोक काम करताना संघाच्याच लोकाना दिसतात इतरांना नाही, स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग का घेतला नाही? हे कुणीही सांगत नाही, संघाचे लोक टाईट इस्त्रीचे कपडे घालून मदतीला जातात नि तसेच टाईट इस्त्रीचे कपडे घालून घरी येतात, (फोटो काढून), राबून राबून पांढरा शर्ट चिखलाचा झालेला, घामेघाम झालेला संघ कार्यकर्ता कधीही दिसलेला नाही दिसणारही नाही, संघातील काकांची मुले ख्रिस्ती देशात तसेच अरबी मुस्लिम देशात जाऊन डॉलर नी दिनार कमावीत असतात पण तेच काका इथे हिंदूंच्या रक्षणासाठी बहुजनांच्या मुलाना “दंडप्रहार” शिकवत असतात. थोडक्यात संघ ही समाजाला काहीही फायदा न देणारी तसेच उपद्रवही न देणारी संघटना आहे. सामान्य माणसाने संघा पासून आपली मुले कशी दूर ठेवता येतील हे पाहावे. १०० वर्षे पूर्ण करूनही सांगण्यासारखं काहीही न केलेली संघटना म्हणजे आरएसएस!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मलाही संघाबद्दल जास्त काही माहिती नाही परंतु शाखेत न जाता त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना टिप्पणी करणे जास्त सोपे असे दिसते . संघाचे स्वंयसेवक केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत , जे करतात ते सोशल मीडिया वापराने आणि account trp वयक्तिक जास्त करतात , संघ बामनांचा आहे ह्या मिथ्या गोष्टी आहेत, कित्येक प्रचारक ब्राह्मणच आहेत , ज्यांनी स्वतःचे आयुष्य देव देश धर्म ह्या गोष्टी साठी वाहून घेतले. तुमच्या म्हणण्यानुसार संघाचा स्वयंसेवक फक्त दुसऱ्या संघी माणसाला दिसतो , तुम्हाला दिसत नाही , तर तो घामाने भिजला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार . जरी काकांचा मुलगा अरबी देशात गेला असला तरी तो दंड प्रहार वैगेरे शिकला आहे फक्त बहुजन मुलांना शिकवता हे मिथ्या पसरवू नका , आणि तसेही बहुजनांच्या मुलांना अरब देशात जायला संघ अडवत नाही, वयक्तिक आयुष्यात संघ किमान गरज असेल तर मदत करते , दखल देत नाही. संघाने बरेच लहान मोठे कार्यकर्ते देशाला दिले आहेत हे विसरू नका. स्वातंत्र्य लढ्यातील संघाचे योगदान असे पुस्तक ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे , एकदा वाचा.

In reply to by समाधान राऊत

परंतु शाखेत न जाता
संघाच्या शाखेत जाऊन एक दोन वर्ग करून, संघाच्या लोकांचे खरे चेहरे नी संघाचा खरा चेहरा पाहून मगच बोलतो आहे, “विशिष्ट” लोकांनी “विशिष्ट” लोकांसाठी बनवलेली संघटना एस संघा बद्दल म्हणता येते, संघाचा छुपा अजेंडा भयानक आहे, संघाच्या वरगांमध्ये काही विशिष्ट कुजबुजे महापुरुषांची बदनामी करण्यासाठी सोडलेले असतात, गांधी, नेहरू, नी अनेक स्वातंत्र्यविरुद्ध नको नको ते बोलले जाते, आपण स्वत स्वातंत्र्यलढ्यात काय दिवे लावले ह्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत, तुमची मुले संघात जाऊन भडकलेल्या माथ्याची होतात, संघात जे काका लोक जातात त्यांच्या मुला बाळाना, नातेवाईकांना ते तिथे आणत नाहीत, त्यांची मुले शिकून सावरून विदेशात पळ काढतात, पण बहुजनांची मुले इथे भडकलेली टाळकी घेऊन फिरतात, मागेच भय्याजी जोशी ह्या संघी माजी अध्यक्षाने महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही असे मराठी द्वेष्टे विधान केले होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरे जाऊ‌दे!कोणाला सांगतो.. संघाचा अनुभव घेऊन त्यापासून दूर झालेल्यांचा १०१ कोटींचा एक मोठा ग्रुप होईल. संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.शाखा चालवली,दुर्गा वाहिनीचे शिबिरही केले पण महिलांवर कर्मकांडाचे खुप मोठे ओझे असावे या मतातून ते लवकर बाहेर पडणार नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.

In reply to by Bhakti

संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले. खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे. क्या बात! एकदम खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा चष्मा लागला असेल तर मध्यानाचा सूर्य दिसणार नाही. तसेच तुम्हाला संघाचे कार्य दिसू शकत नाही. बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले. गांधी आणि आंबेडकरांनी संघाची प्रशंसा केली. मुलांनी संघात जाण्याचे अनेक फायदे असतात. 1. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. 2. अनुशासन शिकतात. 3 शारीरिक व्यायाम होतो. 4. भाषा शुद्ध होते. 5. लोकांशी संपर्क वाढतो. 6. संघात जाणारा तरुण कधीच बेरोजगार राहणार नाही. 7. रस्त्यावर भाजी लावणारा असो एलआयसी अजेंट सर्वांचा धंधा वाढतो.

In reply to by विवेकपटाईत

बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
शाबास! उठता बसता नेहरूंना नावं ठेवणाऱ्या संघाला आज त्यांचे सर्टिफिकेट घ्यावे लागते.

In reply to by आग्या१९९०

छे हो संघाला सर्टिफिकेट ची मुळीच गरज नाही नेहरू घराण्याच्या गुलामांना त्यांच्या सर्टिफिकेट शिवाय खात्री पटणार नाही म्हणून

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण इतका आटापिटा का पटवून द्यायचा? हांगाश्शी तेच मी इतके दिवस सांगतोय खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना कशाला समजावून देताय? पालथ्या घड्यावर पाणी

In reply to by युयुत्सु

गांधी, नेहरूंची निंदा करणे हा एक प्रकारचा " उद्योगच " आहे. हा " उद्योग " नोंदणी न केल्याने सर्वसामान्यांना माहीत नाही.

In reply to by विवेकपटाईत

बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
हा आयडी तर परत परत सांगूनही खोटेपण पसरवण्याचे काही थांबवत नाही. संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. १९६२ च्या चीन-भारत युद्धामुळे, १९६३ च्या परेडमध्ये लष्करी उपस्थिती कमी करण्यात आली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतील अशी मोठी "नागरी परेड" आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील विविध संघटना आणि स्वयंसेवक गटांना अधिक सहभाग घेता आला. युद्धादरम्यान गटाच्या स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेऊन नेहरूंनी त्यांना परेडमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते असा आरएसएसचा बराच काळ दावा आहे. काही अहवालांवरून असे दिसून येते की या कार्यक्रमात सुमारे ३,००० ते ३,५०० आरएसएस स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात मार्च केला होता. तथापि, भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे परेडमध्ये आरएसएसला अधिकृतपणे आमंत्रित केल्याची कोणतीही नोंद नाही. विशेष आमंत्रण नाही. अभिलेखागारातील नोंदी आणि लेखा असे सूचित करतात की आरएसएसला विशेष आमंत्रित करण्यात आले नव्हते तर त्यांनी नागरी गटांना सहभागी होण्यासाठी खुल्या आमंत्रणाचा फायदा घेतला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाची तपासणी सुरू असल्याने, संघाला वैधता मिळवण्यासाठी हा प्रयत्न होता, असा युक्तिवाद इतिहासकार आणि पत्रकारांनी केला आहे. नेहरूंचे विधान. वृत्तांनुसार, नेहरूंनी २७ जानेवारी १९६३ रोजी संसदीय पक्षाला संबोधित करताना म्हटले होते की ते संघाला येण्यापासून रोखू शकत नाहीत, परंतु त्यांनी त्यांना कधीही विशेष आमंत्रित केले नव्हते नाही तर सरळ नाही म्हणावे पण गांधी पटेल नेहरुंचे व्हॅलिडेशन घेतल्याशिवाय संघाला जमत नाही आणि काही जमवता येत नाही हेच खरे. पण आता ह्या व्हाटसपआंकलना काहीही बोलण्यात अर्थ राहिला नाही कारण खुद्द पक्षानेच ह्या खोट्या घटनेला अधिकृत बनवण्यासाठी त्याचे पोस्ट तिकिट प्रकाशित केलेले आहे. चला, निदान ह्या कारणाने तरी बंद पडायला आलेल्या पोस्टात थोडीफार म्हातार्‍यांची वर्दळ होईल थोडे दिवस.

In reply to by अभ्या..

त्याला संघ स्वयंसेवक व संघाचे समर्थक कधीही खोटे म्हणू शकत नाहीत. याचे कारण या चर्चेतच उघड झाले आहे. ते म्हणजे संघाचा मूळ संस्कारच असा आहे की प्रश्न विचारायचे नाहीत, चिकित्सा करायची नाही, सत्याचा शोध चुकूनही घ्यायचा नाही! त्यामुळे परंपरेने, धर्मग्रंथांनी व सर्वात महत्वाचे म्हणजे सरसंघचालकाने जे सांगितले, त्याच्या पलीकडचे काही म्हणजे काहीच स्विकारण्याची मानसिकता दिसत नाही.

In reply to by अभ्या..

संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. +++++++++++१ बेछूट आणि बेलगाम वक्तव्ये फक्त मंदबुद्धी लोकांना फसवू शकतात.

शालेय जीवनात म्हणजे १९९५-२००० च्या सुमारास माझे अनेक मित्र संघात होते नागपुर ला. ते नेहमीच मुस्लिमांवर विनोद करायचे आणि महारांचा प्रचंड द्वेष करायचे. बरं हि मंडळी वेग वेगळ्या शाखेत होती. तरी त्यांचे विनोद आणि त्यांचा इतिहास हा सारखाच असायचा. आंबेडकर त्याकाळी तरी त्यांचा शत्रू न. १. आता हे विचार संघाचे कि त्यांचे स्वतःचे होते हे काही सांगता येत नाही . बाकी हि मुलं जवळपास सगळी ब्राह्मण ! हे कधी शिव्या द्याचे नाही. विनोद पण कमरेखालचे नसायचे . राष्ट्रीयता नसानसात नुसती ओसंडून वाहायची . म्हणजे बाकीचे देशभक्त नव्हते असे नाही, पण हि मंडळी दाखवून देण्यात समोर होती.

बाकी काहिही असो मात्र संघाची 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' प्रार्थना फार सुंदर आहे.

हम्म. "संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे" सामाजिक कार्य असेलही पण स्वातंत्र्यलढ्यात नावड्त्या विचार्सरणीच्या लोकांना बदनाम करण्याचे काम कुजबुज आघाडीतर्फे कोण करते? कुजबुज आघाडीची जागा आता वॉट्स-अ‍ॅपने घेतली आहे. १)सुभाषचंद्र बोसांवर नेहरू पाळत ठेउन होते. त्याही पुढे जाउन, नेहरूनी त्यांना बाजुला केले.. २)लालबहादुर शास्त्रींची हत्याच झाली.. ३)राहुल गांधींचे खरे नाव वेगळेच आहे. हजारो कोटींची मालमत्ता इटालीमध्ये आहे. ह्या अफवांचे जनक कोण होते/आहेत ?शाखेवर येणार्या तरूणांमध्ये काँग्रेसबद्दल/नेहरू गांधींबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे हा उद्देश नसतो का?स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत सेटल करुन देउन बहुजन समाजातील लोकांना त्रिशुल घेउन 'जय श्रीराम' करायला लावणे हे निंदनीय आहे. ह्यांचा ईस्लाम/ख्रिश्चनद्वेष कधीतरी जाईल अशी वेडी अपेक्षा बाळगुन आमच्यासारखे अनेकजण होते. पण गेल्या काही वर्षात तो द्वेष पसरवण्याचे काम अधिक जोमाने होउ लागले असे दिसते. भाषणात "सगळे आमचेच.'..म्हणायचे आणी मागे द्वेष पसरवायचा. आता तो अनुपम खेरचा 'ताजमहल की तेजोमहल' असा चित्रपट येतोय. भारतातील किती लोकांची टाळकी फिरवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो ते बघु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे काम करतो, समाजोपयोगी काम संघाने कधीही केले नाही नी करणारही नाही.

मी विद्यार्थी परिषदेत जायचो त्या वेळेस संघाच आ आणि अभाविप चे काय नाते आहे असे विचारले तेंव्हा उत्तर मिळाले की थेट काहीच संबन्ध नाही. पण अभाविप मधील बरेच लोक संघात जातात. काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.

In reply to by विजुभाऊ

>> काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो. म्हणूनच वरती विचारले आहे की सभासद नोंदणी, ओळखपत्र दिले जात नाही याचे हे कारण आहे का? समाधान किंवा पटाईत काकांच्या उत्तराची वाट पहात आहे. तुंम्ही तर अनुभवच शेअर केलात.

संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. कॉंग्रेस व तिचे शिर्ष नेते इतके चांगले असूनही ती रसातळाला का जातीय काही कळत नाही. कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार? ;)

In reply to by शाम भागवत

कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार?
अहं. चुकलात तुम्ही. गोबरयुग म्हणायचं असतं :)

In reply to by शाम भागवत

संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.

In reply to by शाम भागवत

बघा बाबा कोण मोट्ठे आहे ते. tsj बाकी प्रेस कॉन्फरन्सला महिलांना बोलावायचे नाही हा बालहट्ट पुरवला म्हणे मोठ्या दादाने. बरोबरच आहे म्हणा. एका बावळट गुरुजीने तेच म्हणलेले काही दिवसांपूर्वी. bg मला तर "सौदामिनी आधी कूंकू लाव" वाला कॅप्टन रणगाडेच आठवला तेंव्हा.

In reply to by शाम भागवत

नका इतके गोड हसू. केविलवाणे दिसते आहे ते.. . आता सवयच झाली असेल तर हरकत नाही.

In reply to by अभ्या..

:) मी हसलो तर चालेल का? - (अंमळ हसू आलेला) सोकाजी

In reply to by अभ्या..

:) :) :)

माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही
बरं झालं!
तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी
हे काही बरं झालं नाही!! :) :) - (सघंशाखेत गेलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

लोल!

मी सहावीत असताना वडील संघाच्या शाखेत घेऊन गेले. त्यानंतर नियमीत शाखेत जाणे, तालुका, जिल्हा स्तरावरील शिबीरांना जाणे, असे करीत बाबरी-मशिद पडेपर्यंत संघाशी संबंध होता. त्यावेळी खेळायला मिळायचे आणि शारिरीक उर्जेचा निचरा चांगल्या प्रकारे करता यायचा त्यामुळे शाखेत जायला मजा यायची. गावातील सगळीच मुलं यायची त्यामुळे जरा जास्तच मजा यायची. पण पुढे बौद्धिकं चालू झाली आणि 'ब्रेन वॉशिग'ला सुरुवात झाली. त्या अजाणत्या वयात पद्धतशीरपणे इतर धर्मांविषयीचा आकस मनात कोरला गेला. त्यावेळी रथयात्राचे दिवस होते. तालुका शिबिरांना गेल्यावर 'आपल्यावर' कसा अन्याय होतोय आणि 'आपण' कसे आपल्याच देशात असुरक्षित आहोत हे इतकं बिंबवलं गेलं होतं की त्यावेळची मानसिक विचारधारा अत्यंत असहिष्णू झाली होती. (इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते). तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का, एक धक्का और दो बाबरी को तोड दो....अशा आत्यंतिक आणि पराकोटीच्या घोषणा देत फिरत होतो त्याकाळी. बाबर कोण, बाबरी म्हणजे काय, तिला धक्का देऊन पाडायचे म्हणजे नेमकं काय होणार ह्याची काहीही अक्कल नव्हती, पण शाखेत जाऊन आपण देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी प्रचंड महत्वाच करतोय असं मनात बिंबवलं जात होतं. नशिबाने जरी वडीलांनीच संघशाखेचा रस्ता दाखवला होता तरी ते मात्र समाजवादी होते. त्यामुळे माझ्या वैचारिक उधाणाला आवर घालायचे. त्यामुळे मी वाहवत जाण्यापासून वाचलो. पुढे बाबरी पाडल्यावर लालकृष्ण अडवाणींनी त्या घटनेचा निषेध केल्यावर मी अवाक झालो होतो आणि वडील कसे बरोबर होते ह्याची प्रचिती येऊन, त्यादिवसापासून संघशाखेपासून जो दूर झालो तो आजपर्यंत. ह्या संघाचं परदेशातलं रूपडं आहे 'विश्व स्वयंसेवक संघ'. अमेरिकन नागरिकत्व घेऊन हिंदू धर्माची धुरा वाहण्याचं पुण्यकर्म ते करत असतात. ह्याचाही मी दुर्दैवाने सक्षिदार आहे. एका अशाच विश्व स्वयंसेवच्या घरी सॅन होजेला असतना गेलो होतो. एक लाचार राष्ट्रिय संघी त्या विश्व स्वयंसेवच्या देणगी साठी भारताच्या तत्कालीन परिस्थीविषयी काहिही ऐकून घेत होता. मी ह्या सगळ्या संघींना पूर्ण कोळून प्यायलो असलो तरीही मला प्रचंड राग आला होता. तो त्या विश्व स्वयंसेवच्या लक्षात आला आणि माझ्याकडे बघत वर तोंड करून म्हणाला, " अरे लगता है इनके देश के बारे मे बोला तो बुरा लगा रहा है|" मग त्याला मी विचारले 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' म्हणता का इथे? त्यावर त्याचा झालेला कसनुसा चेहरा अजूनही लक्षात आहे :) तर ते असो, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संघाविषयीचा पटाईतकाकांचा हा, त्यांच्या निवृत्तकाळातला वेळ घालवायचा अजून एक उद्योग असलेला धागा, करमणूकीसाठी वाचला आणि त्यांचे इतर धागे वाचल्याबत येते तसे अंमळ हसू आले. - (पूर्वाश्रमीचा संघी) सोकाजी

In reply to by सोत्रि

इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते हा हा हा. कॉलोनीत राहणारे काहीजण तेव्हा कामाला जाताना बॅगेत सुरी ठेवत.चुकुन हल्ला झाला तर प्रतिकार करायला हवे म्हणून! अर्थात त्या सुरीने बटाटेही नीट कापता येत नसावेत. ग्रुहिणींनी अशा सुर्‍या आपल्या नवर्याना दिल्या होत्या. कॉलोनीचे 'संरक्षण' करण्यासाठी काही तरूण्/कॉलेजकुमार रात्रभर गेटजवळ बसत. एकदा खरोखर 'ते'(परधर्मीय तलवारी घेउन येत आहेत) अशी कुजबुज झाली आणि आमच्या तरूणांची पळता भुई थोडी झाली. धावत आपापल्या घरी जाउन बसले. तलवारी घेउन कोणी येत नव्हते.. ती अफवा होती हे नंतर कळले.

या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.

In reply to by स्वधर्म

तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो. 1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात , समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही , आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो , 2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा , संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय?? देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही

In reply to by समाधान राऊत

चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत. असो.

In reply to by समाधान राऊत

आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता. सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्‍या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्‍यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्‍या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते. नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.

In reply to by स्वधर्म

माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.

In reply to by स्वधर्म

काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही. अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥ जय जय रघुवीर समर्थ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे. बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
कसा सापडणार पुरावा? नथुरामला लेटरहेडवर वर्क ऑर्डर दिलेली का मिटिंग मिनिटस रेकॉर्ड? जी संस्था साधी नोंदणीकृत नाही, कितीजण येतात आणि काय करतात त्याची माहिती नाही, कागदोपत्री कसलाच व्यवहार नाही त्यांचा काय पुरावा मिळणार? मिळाला तरी मातृसंस्था तिची लेकरे काय उपद्व्याप करतात आणि त्यांना पाठबळ कशाचे हे सोयीस्करपणे लपवतात ते काय पुरावा सोडणारेत. . त्याण्तर संघावर बंदी घालताना संघाला नुकतेच प्रातःस्मरणीय झालेले देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांनी स्रसंघचालक गोळवलकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट मुद्दे मांडलेत. त्यांनी म्हटले की संघाने द्वेषाने भरलेले "जातीय विष" पसरवले आहे. "विषाचा अंतिम परिणाम" "गांधीजींच्या मौल्यवान जीवनाचे बलिदान" होते. पटेल यांनी नमूद केले की संघाने सर्व सार्वजनिक सहानुभूती गमावली आहे, विशेषतः त्यांच्या सदस्यांनी मिठाई वाटून गांधींच्या मृत्युचा आनंद साजरा केल्याचा आरोप केल्यानंतर. गांधीजींच्या हत्येच्या कटात "हिंदू महासभेचा अतिरेकी गट सहभागी होता" आणि संघाच्या कारवायांमुळे "सरकार आणि राज्याच्या अस्तित्वाला स्पष्ट धोका" निर्माण झाला होता, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ही काही अटींवर जुलै १९४९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली, ती मन बदलल्यामुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही अटी मान्य केल्यानंतर. यामध्ये हे समाविष्ट होते: औपचारिक संविधान स्वीकारणे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गांनी वचनबद्ध राहणे आणि एक संघटना म्हणून राजकारणापासून दूर राहणे. गोलवलकर यांनी या अटी मान्य केल्यानंतर ते "बंदी उठवण्यास उत्सुक" असल्याचे पटेल यांनी सांगितले. . ह्यांनंतर आजही ७५ वर्षानी रास्व संघाची शंभरी, विजयादशमी आणि म. गांधीची जयंती अशा योगावर g असे बोर्ड लागतात. द्वेष असा असतो आणि दिसतो सुध्दा. बोर्डावर कुणाचेही नाव नाही. काही ठिकाणी सकल हिंदू समाज. कोण आहे हा सकल हिंदू समाज हे उत्तर : या गटाच्या कारवायांना कायदेशीर आव्हाने आणि तपासणीचा सामना करावा लागला आहे, विशेषतः द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांबाबत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश: २०२३ च्या सुरुवातीला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजाच्या मेळाव्यांमध्ये संभाव्य द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप: महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही, २०२४ च्या अखेरीस आलेल्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की राज्यात द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांचा खटला चालवणे थांबले आहे. सकल हिंदू समाजाने "लव्ह जिहाद", धार्मिक धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदे यासह सरकारकडून विशिष्ट कायदे करण्यासाठी सक्रियपणे लॉबिंग केले आहे. हिंदू संघटनांचा युती: या युतीमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांचा समावेश आहे. सकल हिंदू समाजाचे वर्णन औपचारिक, श्रेणीबद्ध संघटना नसून एक केंद्रीकृत "बॅनर" किंवा सामूहिक म्हणून केले जाते. हे युती विविध हिंदू गटांना आणि त्यांच्या सदस्यांना रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणते, जे बहुतेकदा सोशल मीडियाद्वारे समन्वयित केले जातात. कीती छान ना. १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची.

In reply to by अभ्या..

१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची. जळजळ दिसून येते आहे. बरंच अवडंबर काढून टाकलं तर सत्य फारसं दिसत नाही. गांधीजींना काँग्रेसने देवत्वाला पोचवलं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं तरी ते अब्रह्मण्यमच होईल याची काँग्रेस ने काळजी घेतली त्याचाच हा परिपाक आहे. असं असतं तर नथुराम गोडसे यांचे न्यायालयात केलेले पाच तासाचे वक्त्यव्य यावर प्रतिबंध आणण्याची काँग्रेस वर पाळी का यावी? सरदार पटेलांना तसं बोलणं भाग होतं याची अनेक कारणं आहेत. पण ती समजून घेण्यासाठी विवेकवादी विचारसरणी असावी लागते. काँग्रेसने संघावर अनेक वेळेस बंदी आणण्याचा प्रयत्न केला/ बंदी आणली. पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. कारण तुम्हीच शोधा नाही तर द्या सोडून. नाही तरी भोंगळ समाजवाद्यांनी द्वेष सोडून केलंच काय आयुष्यभर.

In reply to by सुबोध खरे

पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!

In reply to by स्वधर्म

द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा. एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले. कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.

In reply to by कर्नलतपस्वी

उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
" तुम्ही खूप छान सुरळीच्या वड्या आणि फतफतं करता पण मला आज भूक नाहीये " इतकुसं सांगायला हॉटेलात आला?

बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात. संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले. बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली. आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.

In reply to by सुबोध खरे

मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं. गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय. :) विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_ जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे. ;)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.

In reply to by भृशुंडी

:)

In reply to by भृशुंडी

शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या. कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही. बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......