✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी सप्टेंबर २०२५

स
स्वधर्म यांनी
Sat, 09/06/2025 - 21:49  ·  लेख
लेख
६ सप्टेंबर आला तरी चालू घडामोडींचा धागा दिसत नव्हता, म्हणून सुरू केला. बहुधा सगळे गणपतीत मग्न आहेत. नातवाला 65 लाखांची Tesla भेट देणाऱ्या प्रताप सरनाईकांची एकूण संपत्ती किती? रिक्षाचालक ते 800% संपत्ती वाढ, Income सोर्स... सरनाईकांनी म्हणे निर्धार केला होता की भारतातील पहिली टेस्ला मीच घेणार. त्याप्रमाणे ती त्यांनी घेतली. शिवाय या त्यांच्या कृतीमुळे आता त्यांच्या नातवाला शाश्वत वाहतुकीचे महत्व कळेल. त्यांच्या संपत्तीत २००९ सालच्या १६ कोटी पासून २०२४ मध्ये ३३३ कोटी अशी वाढ झाली आहे. बाकी किरकोळ विषय सोडून देऊन एका परिवाहन मंत्र्याच्या पर्यावरण स्नेही कृतीची जरूर कदर केली पाहिजे, नाही का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22025 वाचन

💬 प्रतिसाद (142)

प्रतिक्रिया

बुड नसलेला तांब्या आणि आपलं परराष्ट्रीय धोरण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/07/2025 - 10:04 नवीन
बूड नसणारा तांब्या आणि आपल्या शेठचं परराष्ट्रीय धोरण सारखंच असतं. आता आपली चीनशी मैत्रीचं धोरण पाहता. चीनच्या वस्तुंवर बहिष्कार, चीनच्या अ‍ॅप्लीकेशनवरील बंदी, चीनची भारत सीमेवरील घुसखोरी, चीनची पाकला मदतीचं धोरण सर्व विसरावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय लोकशाही मजबूत करण्यासाठी चीन-भारत एकत्र येत आहेत. व्यापारी संबंध, शुल्क धोरण, ट्रंपचं राजकारण या पार्श्वभूमीवर शेठचं नवं चीनीपिंग पाऊल भारताला प्रगतीच्या कोणत्या शिखरावर घेऊन जाते ते येत्या काळात कळून येईलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आता

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/07/2025 - 23:13 नवीन
" चीनच्या वस्तुंवर बहिष्कार, चीनच्या अ‍ॅप्लीकेशनवरील बंदी, चीनची भारत सीमेवरील घुसखोरी, चीनची पाकला मदतीचं धोरण सर्व विसरावे लागणार आहे" ते सगळे चॅनेलवाले/पत्रकार गेले कुठे, जे "चीनपासुन आपल्याला सर्वात जास्त धोका आहे" म्हणणारे? असो. भारत-चीन चर्चेत मोदी/जयशंकर ह्यांनी "तेवढे ते अरूणाचलला हात लावु नका. २०२९ पर्यंत" असे जिंपिंग ह्यांना सांगितले असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा

अभ्या..
Sun, 09/07/2025 - 15:18 नवीन
वावावा, चारपाच वर्शाच्या नातवाला पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी त्याला टेस्ला (तीपण भारतातली पैली वैली डिलिव्हरी हं) गिफ्ट देणारे आजोबा आपले परिवहन मंत्री आहेत हं. सुंदर. महिन्द्रा टाटा वगैरे उगीच चीनी बॅटर्‍या जोडून आपल्या जुन्या मॉडेलना इव्ही म्हणवतात. खरी पर्यावरणस्नेही ती टेस्लाच. शिवाय सद्यकालीन मस्क ट्रम्प खुन्नस बघता टेस्ला ही मस्कची असल्याने तात्याला हा टोला असे म्हणायचे राहिले वाट्ट्टं.
  • Log in or register to post comments

लालबागच्या राजास उशीर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/07/2025 - 19:32 नवीन
गरीब आणि श्रीमंत अशा दर्शनासाठीच्या भेदभावामुळे लालबागचा राजा रुसला विसर्जनाला उशीर. हे लालबागच्या राजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या धोरणास क्षमा कर. चुभू पदरात घे...! नाराज राहू नकोस...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लालबाग मंडळ लोकांना क्षणभर पण

Bhakti
Sun, 09/07/2025 - 21:08 नवीन
लालबाग मंडळ लोकांना क्षणभर पण देवाला पाहू देत नाही,अति शहाणपण करतात. आता देवच भक्तांसाठी चौपाटीवर थांबलाय. ना कोणती रांग , ना कोणी व्हीआयपी ! डोळे भरून दर्शन घेऊया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लालबागचा राजा

चंद्रसूर्यकुमार
Mon, 09/08/2025 - 06:39 नवीन
लालबागच्या राजाचे काल रात्री नऊनंतर एकदाचे विसर्जन झाले.
लालबाग मंडळ लोकांना क्षणभर पण देवाला पाहू देत नाही,अति शहाणपण करतात.
शेवटी सगळा पैशाचा आणि स्टेटसचा खेळ आहे. व्हीआयपी लोक अगदी आरामात दर्शन करू शकतात पण सामान्यांना अगदी हिडुस फिडुस केली जाते. तरी लोक तिथे तासंनतास रांगेत उभे असतात. तीच गोष्ट बर्‍याच देवस्थानांची. अशा ठिकाणी खरं तर आपल्यासारख्या सामान्यांनी जाऊच नये. आता तर ज्यांना फारच हौस असेल त्यांना ऑनलाईन दर्शनाचा पण पर्याय उपलब्ध असतो. मग कशाला तिथे जायची हौस असते समजत नाही. तात्या (म्हणजे तात्या अभ्यंकर. हल्ली तात्या म्हटले की वेगळाच कोणीतरी डोळ्यासमोर येतो) मिसळपाव बघायचे तेव्हा काही दिवस मिपाच्या मुखपृष्ठावर मिसळपावला लालबागच्या राजाचा आशीर्वाद आहे असे लिहून त्या मूर्तीचा फोटो असायचा ते आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

तीच गोष्ट बर्‍याच

Bhakti
Mon, 09/08/2025 - 07:52 नवीन
तीच गोष्ट बर्‍याच देवस्थानांची. अशा ठिकाणी खरं तर आपल्यासारख्या सामान्यांनी जाऊच नये. आता तर ज्यांना फारच हौस असेल त्यांना ऑनलाईन दर्शनाचा पण पर्याय उपलब्ध असतो. मग कशाला तिथे जायची हौस असते समजत नाही
या फेजमधून बाहेर यायला खूप मानसिक बळ लागतं.शिर्डीला असा भयानक अनुभव आला.तेव्हापासून शिर्डीला जाण्याची हौसच फिटली.हे बळ लवकर सर्वांना मिळो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

लालबागची काळी बाजू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/10/2025 - 22:27 नवीन
भक्ती मॅडम, लालबागचा राजा आणि भक्तांची श्रद्धा यात आपल्याला पडण्याचे कारण नाही. पण काळी बाजू यावर खरं तर स्वतंत्र धागा लालबागचा राजा मला म्हणेल तेव्हा काढ़ेनच. आपण फक्त नमस्कारासाठी थेट तिथे जातो पण क्षणिक आनंदापेक्षा मंडळ जी वेदना देते त्यामुळे बाप्पाच्या दर्शनाचा आनंद मिळत नाही, असे वाटते. काल एका लहानग्या मूलीच्या बापाला मंडळ पदाधिकारी चपाचप देतांना पाहिले. फोकलीच्यांनो अरे लेकराला काय वाटलं असेल हा तर विचार करायचा. असे असंख्य व्हीडीयो पाहिले. अशा नवस सायास आणि श्रद्धेची गर्दी. तो भेदभाव, व्यक्तिगत डोक्यात जातो. सार्वजनिक गणेश मंडळाचे धोरण त्यांच्यासाठी अगदी योग्य असेलही पण आपण श्रद्धाळुना जी वागणूक देता त्याचा संताप येतो. बाय द वे, हे लालबागच्या राजा त्या मंडळाच्या फोक्लीच्यांना अक्कल येऊ दे, आम्ही त्या मंडळाच्या पदाधिका-यांना चिमटे घेऊ घेऊ नीट करुच, आम्हा मिपाकरांवर फक्त लोभ असू दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

श्रद्धा ही खुप पवित्र बाब आहे

Bhakti
गुरुवार, 09/11/2025 - 10:43 नवीन
श्रद्धा ही खुप पवित्र बाब आहे.पण अशाप्रकारे तिची अवहेलना पैशाच्या माजावर अनेक धर्मस्थळांत आता फोफावली आहे.तेव्हा आपली श्रद्धा, आपल्या स्वाभिमानाला चिरडणाऱ्या या‌ मंद लोकांच्या दारात कशाला जावं,याबाबत लोक विचार करतील. योगायोगाने आजच सुनील तांबे यांचा याविषयक खुप छान लेख वाचला,पुढे देत आहे.
पावित्र्य ही भावना आपल्या मनात असते. ही भावना आपण म्हणजे मनुष्यप्राणी एका मूर्तीमध्ये वा कल्पनेमध्ये मूर्त स्वरुपात पाहातो आणि त्याला तो देव, ईश्वर, देवता, अवतार इत्यादी काही मानतो. साहजिकच माणूस स्वतःपासून दुरावतो आणि ईश्वराला पुजू लागतो. नेमकं हेच पैशाच्या बाबत होतं. पैसा अर्थातच संपत्ती निर्माण होते माणसांच्या श्रमांतून परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्था माणसांचे श्रम चोरते आणि माणसाला पैसा वा संपत्ती श्रेष्ठ वाटते. तो पैशाला भजू लागतो. मग लालबागचा गणपती असो की पुण्याचे मानाचे गणपती सर्वांचं रुपांतर एका कमोडिटीमध्ये म्हणजे उपभोग्य वस्तूमध्ये होतं. कारण माणसांचे देव पैशापुढे फिके पडतात. त्यांच्या उत्सवांमध्ये पावित्र्य, श्रद्धा, सहिष्णुता, मानवता यापैकी काहीही नसतं. केवळ राजकीय वर्चस्व आणि उन्माद असतो कारण पैसा हा त्यांचा देव असतो. हा दुरावा वा परात्मता, सरंजामशाही आणि भांडवलशाहीने केलेलं शोषण याची निष्पत्ती वा परिणिती आहे अशी सुस्पष्ट, सटीक उकल सर्वप्रथम कार्ल मार्क्सने केली. कार्ल मार्क्स नास्तिक वा निरीश्वरवादी वा जडवादी म्हणून नाकारणं हा मूर्खपणा आहे. मार्क्सने माणसाच्या शोषणाची मीमांसा केली. मार्क्स म्हणतो माणसाच्या वाट्याला दुःखं येणारच पण ती माणसाची असावीत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण यांच्या अभावामुळे होणारी दुःखं माणसांची नाहीत तर पशू-प्राण्यांची आहेत. मार्क्स कमालीचा मानवतावादी होता, शास्त्रीय मानवतावादी. गणेशोत्सव असो की अन्य कोणताही उत्सव त्याचं कॉर्पोरेटायझेशन अनेक श्रद्धाळूंनाही त्रासदायक, तापदायक आणि नकोसं करणारं आहे. त्यांच्या मनातील पावित्र्य, पापभिरुता, धर्मभिरुता यांची टिंगलटवाळी मार्क्स करत नाही तर या भावनांना केंद्रस्थानी मानून तुमचं अधःपतन का आणि कसं होतं याची उकल मार्क्स करतो. मार्क्स असा ठायी, ठायी भेटतो. (विद्याधर दाते यांची लालबागच्या गणपतीवरची पोस्ट वाचली आणि हे सुचलं) -सुनील तांबे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/11/2025 - 11:41 नवीन
अवहेलना पैशाच्या माजावर अनेक धर्मस्थळांत आता फोफावली आहे.तेव्हा आपली श्रद्धा, आपल्या स्वाभिमानाला चिरडणाऱ्या या‌ मंद लोकांच्या दारात कशाला जावं,याबाबत लोक विचार करतील
. +१ सहमत आहे. लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार. शिस्त आणि सर्वांना एकाच दारातून प्रवेश दिल्याशिवाय लालबागच्या दरबारात समता दिसणार नाही. अर्थात, मंडळ आणि त्यांचं धोरण सुधारले तर सुधारले, नाही तर ही मुजोरी पुढे असंख्य वर्ष सामान्यांना झेलावीच लागेल, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

आपली श्रद्धा आपलीच भक्ती

कर्नलतपस्वी
Mon, 09/08/2025 - 07:27 नवीन
आपली श्रद्धा आपलीच भक्ती आपणच शोधायची मुक्तीची युक्ती अपुन तो ऐसेही है....... "गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास"
  • Log in or register to post comments

तात्यांच्या धरसोड वृत्तीमुळे

रात्रीचे चांदणे
Mon, 09/08/2025 - 07:45 नवीन
तात्यांच्या धरसोड वृत्तीमुळे आणि कठोर अटींमुळे मोदींनी चीनचा दौरा केला असेल तर ते योग्यच ठरेल. बदलत्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेणं हेच योग्य धोरण आहे. अमेरिका बर्‍याच वर्षांपासून आपला दोस्त नसेल पण भागीदार मात्र नक्कीच होता. मात्र ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्याने आपली आर्थिक ताकद वापरून एकेका देशावर दबाव टाकणं सुरू केलं. ज्या देशांसोबत अमेरिकेला व्यापारात फायदा होता त्यांनाही त्याने सोडलं नाही. परिणामी अनेक देश त्याच्या मागण्या मान्य करत गेले, पण चीन, ब्राझील आणि भारत अजूनही ठामपणे उभे आहेत. रशिया तर आधीपासूनच विरोधक आहे. चीनकडे अमेरिकेला लागणारे rare earth magnets आहेत. त्यांचा वापर करून चीनने ट्रम्पचा दबाव परतवून लावला. भारताकडे तसा कुठलाही हुकमी एक्का नाही, तरीसुद्धा आजवर आपण अमेरिकेच्या जाचक अटी मान्य केलेल्या नाहीत. एकाच वेळी दोन्ही महासत्तांच्या विरोधात राहणं भारतासाठी शक्य नाही. चीन आपला शेजारी देश असल्याने त्याच्याशी चांगले संबंध राखणे आवश्यक आहे. अमेरिकेने आयातीवर शुल्क (tariff) लावले तर आपल्या मालाला इतर देशांच्या बाजारपेठेकडे वळवावं लागेल. अमेरिकेला पूर्ण पर्याय शोधणं सध्या तरी शक्य नाही, पण चीनकडून मिळणारी भरपाई उपयोगी ठरू शकते. खते, बोगदे खोदणाऱ्या यंत्रणा, rare earth magnets अशा काही वस्तू चीनने थांबवल्या होत्या; मात्र मोदींच्या दौऱ्यानंतर त्या परत सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. उलट चीनने भारताकडून आयातही वाढवली आहे. याचा अर्थ असा नाही की चीन आपला दोस्त किंवा भागीदार झाला आहे. पण सध्याच्या घडीला चीनला आपली थोडी गरज आहे आणि आपल्याला चीनची जास्त. अशा परिस्थितीत भारताने या संबंधांचा योग्य उपयोग करून जागतिक समीकरणात आपला तोल राखणं अत्यंत आवश्यक आहे. अजून तरी तात्याने IT सर्विसेस वर बडगा उगारला नाही ते केलं तर आपली अजून पंचाईत होणार हे नक्की.
  • Log in or register to post comments

ट्रम्प

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 09/08/2025 - 14:24 नवीन
"अजून तरी तात्याने IT सर्विसेस वर बडगा उगारला नाही ते केलं तर आपली अजून पंचाईत होणार हे नक्की." https://www.youtube.com/watch?v=pRKLRtoQWyU&list=RDNSpRKLRtoQWyU&start_radio=1 दोन दिवसापुर्वीच्या ह्या मीटिंगचे दृष्य पहा. शाळेतील शि़क्षक जसे विद्यार्थ्यांना दमात घेतात तसे ट्रम्प विचारतोय एकेकाला -"किती गुण्तवणुक करणार आहात ,अमेरिकेत?". सगळ्या जगाला दाखवुन देण्यासाठीच ही मीटिंग होती. पुढची मीटिंग अ‍ॅक्सेन्च्युअर/सिस्को/ओरॅकलच्या लोकांबरोबर असेल हे नक्की.ह्या प्रमुख १०/१२ कंपन्यांनी आपली कंत्राटे अमेरिकेबाहेर द्यायची नाहीत असे ठरवले तर मोठी पंचाईत होणार आहे. एच-वनबी व्हिसावर गदा आलीच होती. आता तुमचा तो एल-वन वगैरे पण अगदी काटेकोरपणे देतील. "अमेरिका पुन्हा ग्रेट करून दाखवतो" ह्या आश्वासनावरच तर ट्रम्प सत्तेवर आले आहेत. भारतिय आय टी कंपन्या एच वन्/एल वनचा गैरवापर करतात आणि अमेरिकन लोकांची नोकरी जाते.. हा उघड उघड आरोप आहे. शिवाय ह्या कंपन्या ऑफ-शोरिंग करतात .अनेकवे़ळा पुरावेही स्थानिक लोकांनी सादर केले आहेत. तेव्हा ट्रम्प सहजासहजी सोडतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

प्रमुख १०/१२ कंपन्यांनी आपली कंत्राटे अमेरिकेबाहेर द्यायची नाहीत

कर्नलतपस्वी
Mon, 09/08/2025 - 15:53 नवीन
प्रमुख १०/१२ कंपन्यांनी आपली कंत्राटे अमेरिकेबाहेर द्यायची नाहीत असे ठरवले तर मोठी पंचाईत होणार आहे. एशायायी मॅनपावर ही या कंपन्यांचे शक्तीस्थान आहे. अमेरिकेत एव्हढी टेक्निकल मॅनपावर नाही. असलेली शुक्रवारी दुपारी स्विच ऑफ होते आणी सोमवारी सकाळी स्विच ऑन. या कंपन्यांची इतर देशातली मॅनपावर कोल्हू च्या बैला प्रमाणे रात्रंदिवस तेल गाळत असतात. परत चारा ही कमी लागतो. (रुपक सकारात्मक आहे,एशियन लोक अमेरिकन लोकां पेक्षा जास्कत कष्टाळू आहेत असे माझे निरीक्षणआहे) बाहेर कंत्राट दिले नाही तर इतरांचे जे व्हायचे ते होईल पण अमेरिकन कंपन्यांचे दिवाळे जरूर निघेल.
  • Log in or register to post comments

कष्टाळू

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 09/08/2025 - 16:20 नवीन
आशियाई लोक कष्टाळू आहेत हे मान्य पण कल्पकता,नविन कल्पना.. ती ताबडतोब अमलात आणण्यासाठी लागणार्या सुविधा,उभे करावे लागणारे भांडवल? ..भारतात अनेक अमेरिकन कंपन्यांची केंद्रे गेले २५ वर्षे आहेत पण अमेरिका/युरोप येथेही त्यांचे अनेक कर्मचारी कार्यरत असतात. उ.दा. गूगलचे अजूनही सर्वात मोठी ऑफिसेस्,कर्मचारी अमेरिकेतच आहेत. तीच गोष्ट युरोपियन कंपन्यांची. सॅप लॅब्स्/बी.एम.डब्ल्यु/मर्सेडिझ्/एयर बस ह्यांची अनेक सेंटर्स भारतात २०/२५ वर्षे आहेत पण मुख्य संशोधन तेथील देशांमध्येच होते असे वाचले आहे. "असलेली शुक्रवारी दुपारी स्विच ऑफ होते आणी सोमवारी सकाळी स्विच ऑन." सिलिकॉन व्हॅली/न्यु यॉर्क वगैरे मध्ये मात्र असे नसते. दिवसाचे १२-१२ तास काम चालु असते अनेक कंपन्यांमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

पण मुख्य संशोधन तेथील देशांमध्येच होते असे वाचले आहे.

कर्नलतपस्वी
Mon, 09/08/2025 - 18:35 नवीन
माझे काही नातेवाईक आहेत तिकडे. बारा बारा तास वगैरे काही काम होत नाही आणी जे करतात ते सर्व ऐशियायी मुळचे आहेत. शुक्रवार संध्याकाळी बहुतांश बॅकयार्ड मधे बारबेक्यू आणी बार लागलेले बघीतले आहेत. विकांत हा फार मोठा सण आहे एक तर बाहेर जातात किंवा बॅकयार्ड मधे पार्टी असते. म्हंजे माझे काहीच म्हणणे नाही. मोठ्या कंपन्यात बरेचसे भारतीय, चिनी,बांगलादेश, मुळ असलेले तंत्रज्ञ मोठ्या हुद्द्यावर आहेत. म्हणून माझे असे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

तात्यांशी वाकडं त्याचे नदीवर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 09/08/2025 - 17:06 नवीन
तात्यांशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं! जगातल्या सगळ्यात शक्तिशाली माणसाशी का पंगे घ्यावेत पण? आजच्या सकाळला लेख आहे, रशियन तेल घेतले नाही तरीही चालेल पण अमेरिकेशी पंगा घेतला तर भारतीय गरीब लोकांवर कुर्हाड कोसळेल! अर्थात इतके “शिक्षित” लोक सत्तेत नसल्याने भारताचे भविष्य काय असेल ते सांगता येत नाही!
  • Log in or register to post comments

कमाल आहे

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 09/08/2025 - 17:47 नवीन
म्हणजे अमेरिकेने जिथुन जे पाहीजे ते घ्यावे, त्यात कोणी तंगडी घातली तर हे खवळणार आणि भारताने कुठुन काय घ्यावे त्यावर अमेरिकेचा दबाव? ही सरळ सरळ दादागिरी झाली, आणि लवकरात लवकर पर्यायी बाजारपेठा शोधणे हाच त्यावर उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवणे, जशी चीनकडे आहे. उगाच ते दम देतात म्हणुन आपण तेल आयात बंद करायची हे म्हणजे सरळ शेपुट घालण्यासारखे नाही का?
  • Log in or register to post comments

अमरिकेची आर्थिक ताकद आणी आपले

अमरेंद्र बाहुबली
Mon, 09/08/2025 - 18:49 नवीन
अमरिकेची आर्थिक ताकद आणी आपले चाललेले पोटपाणी बघता, देशाच्या आर्थिक दृष्टीने हेच योग्य आहे, एकतर आपण चीन बनू शकत नाही, ह्या जन्मात तरी नाही, अहो साधा रस्ता नीट नसतो आपला, आज बनला की उद्या खचतो! आपण कधी चीन बनणार नि कधी बार्गेनिंग पावर वाढवणार? त्यापेक्षा वास्तविकता स्वीकारणे शहाणपणाचे आहे! बाकी तात्या अमेरिका ग्रेट बनवायच्या नादात आपले कंबरडे मोडेल, आणी आता आपला देश कशा लोकांच्या हातात आहे ते तरी पहा, पूर्वीचे राजकारणी अमेरिका नी रशियाला लीलया खेळवायचे. आता तेलही जाईल नी तूपही जाईल हाती धुपाटणे घेऊन नाचावे लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

असलं काहीही होणार नाही.

सुबोध खरे
Mon, 09/08/2025 - 19:36 नवीन
असलं काहीही होणार नाही. भारताने १९९८ मध्ये अणुबॉम्बच्या घेतली अत्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी आपल्यावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध टाकले होते. त्यामुळे काय झालं? काहीही झालं नाही अमेरिकेने तुम्हाला S ४०० घेऊ नका अन्यथा तुमच्यावर catsaa खाली मोठ्या प्रमाणावर निर्बंध टाकू. Countering America's Adversaries Through Sanctions Act On 15 July 2022, the United States House of Representatives passed a legislative amendment that granted India a waiver from CAATSA-related sanctions connected to the purchase of the S-400; however the amendment is yet to be passed by the United States Senate. भारताने त्यांना भीक घातली नाही आणि S -४०० घेतली आणि ऑप सिंदूर मध्ये पाकिस्तानचे AWACS आणि इतर विमाने पाडली. आमचे F ३५ घ्या म्हणून अमेरिकेने दबाव टाकला. आपण घेतलं नाही. पांढरा हत्ती पोसण्यात काय हशील आहे? रशिया कडून तेल घेऊ नका म्हणून गेली चार वर्षे दबाव टाकला गेला पण भारताने त्यांना अजिबात भीक घातली नाही. आमचं F २१ ( F १६ चा आधुनिक अवतार) आणि नौदलासाठी F १८ घ्या म्हणून अमेरिका मागे लागले होते. भारताने त्यांना अजिबात भीक न घालता वायुदल (आणि आता नौदलासाठी) रफाल घेतलं. तात्या सध्या चिडीला आले आहेत. थोड्या दिवसात तेथील उद्योगपती त्यांच्या वरच दबाव टाकायला लागले कि होतील शांत सध्या उगाच अरे ला का रे? न करण्यात सरकार शहाणपणा दाखवत आहे. बाकी मोरू लोक भुंकणारच. त्यांना काय विचारायचं? रोज सकाळी श्री मोदींना शिव्या घातल्याशिवाय बऱ्याच लोकांचं पोट साफ होत नाही. त्याला काही इलाज नाही. बाकी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो. शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढण्याच्या वेळेस आदिलशहा आणि कुतुबशाह यांच्याशी पण समेट केला होता ( उगच तीन चार आघाड्यांवर लढण्यात शक्ती फुकट घालवणे हा शहाणपणा नव्हे) तेंव्हा पण किती तरी लोक असेच नाराज झाले असणार. चालायचंच.
  • Log in or register to post comments

महत्वाच्या बातम्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/10/2025 - 09:10 नवीन
१. मिपा सारखं सारखं बंद पडतंय. दुरुस्तीचं काम सुरु - सुत्र. २. लालबागच्या राजाची बदनामी केली म्हणून कोलीवाल्याविरुद्ध लालबाग सार्वजनिक गणेश मंडळ कोर्टात जाणार. ३. रोजगार आणि माध्यमं या आणि इतर कारणांमुळे नेपाळ रस्त्यावर. पंतप्रधान ओली यांचं पलायन. निदर्शकाकाडून जाळपोळ ४. उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे राधाकृष्णन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अस्थिर नेपाळ

कपिलमुनी
Wed, 09/10/2025 - 14:58 नवीन
बांगलादेश नंतर अस्थिर नेपाळ ! गावठी बाँड पोराला भेटायला लंडनला!
  • Log in or register to post comments

नेपाळ नंतर फ्रांस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/11/2025 - 08:57 नवीन
१. नेपाळमधे अराजक माजले असताना आता फ्रांस मधेही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारच्या धोरणांविरुद्ध रोष व्यक्त करताना पॅरिससह अन्य भागांत जोरदार आंदोलने सुरू झाली आहेत. संतापलेल्या आंदोलकांनी बुधवारी 'रस्ता रोको', जाळपोळ केली; तसेच पोलिसांवर दगडफेकही केली. २. अखेर पंतप्रधान मणिपुरला जाणार. ऐतिहासिक दौरा. मणिपुरमधील विद्यार्थी संघटनेनेही म्हटले, की ते पंतप्रधानांच्या संभाव्य भेटीचे स्वागत करतील, परंतु आम्ही आमच्या डोळ्यांत अश्रू घेऊन नृत्य करू शकत नाही'. ३. भारत आणि चीनवर शंभर टक्के आयातशुल्क लागू करावे असा यूरोपियन महासंघाला माय फ्रांड ट्रंप यांचा सल्ला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सध्याचा इडी आणी निवडणूक

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/11/2025 - 11:17 नवीन
सध्याचा इडी आणी निवडणूक आयोगाचा होणारा गैरवापर पाहता भारतातही नेपाळ किंवा फ्रान्स सारख्या मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, असे मत नोंदवतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय दुर्दैवी प्रतिसाद !

धर्मराजमुटके
गुरुवार, 09/11/2025 - 22:05 नवीन
अतिशय दुर्दैवी प्रतिसाद ! घी देखा लेकीन बडगा नही देखा ही म्हण याचसाठी अस्तित्वात आली असावी. आंदोलन कितीही चांगल्या कारणासाठी झाले तरी एकदा अराजक माजवणारे तत्व त्यात घुसले की मुळ उद्देश्य बाजूला पडतो. असा प्रकार भारतात कधीही होऊ नये हीच प्रार्थना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भारतात असं काही घडण्याची

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 09/11/2025 - 22:25 नवीन
भारतात असं काही घडण्याची शक्यता नाही. कारण इतर देशांसारखी परिस्थिती भारतात नाही. विरोधक फार तर मिसळ पावसारख्या साईट्सवर अशा गोष्टींची अपेक्षा व्यक्त करतील, एवढंच. समजा असा प्रयत्न झाला तरी त्याच्या विरोधात दहा पट मोठं आंदोलन समर्थनासाठी होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा राहुल गांधी आणि इतर ऐतखाऊ नेत्यांना सरळ घरी बसवून नवीन लोकांच्या हाती काँग्रेससारखा पक्ष दिला पाहिजे. म्हणजे 2029 ला चांगला पाया तयार होईल आणि 2034 मध्ये काही तरी आशा निर्माण होऊ शकेल. नाहीतर कधी "मार्केटिंग", कधी "पुलवामा", कधी "EVM", आणि सध्या "मतदारयादी" अशी कारणं देत स्वतःचं समाधान करून घ्यावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

विश्वप्रवक्ते संजय राऊत हे

विजुभाऊ
Fri, 09/12/2025 - 10:51 नवीन
विश्वप्रवक्ते संजय राऊत हे तुमच्या मताशी सहमत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सध्याचा इडी आणी निवडणूक

सुबोध खरे
Mon, 09/15/2025 - 09:49 नवीन
सध्याचा इडी आणी निवडणूक आयोगाचा होणारा गैरवापर पाहता भारतातही नेपाळ किंवा फ्रान्स सारख्या मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, असे मत नोंदवतो! ते कसं करायचं ते पण लिहा कि. उगा मिपावर कळफलक बडवून काय होणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरब स्प्रिंग नंतर आता सार्क

विअर्ड विक्स
गुरुवार, 09/11/2025 - 17:20 नवीन
अरब स्प्रिंग नंतर आता सार्क स्प्रिंग नवीन दशक नवीन खंड खेळाडू तोच !!!
  • Log in or register to post comments

रोचक

निनाद
Sat, 09/13/2025 - 15:12 नवीन
हे स्प्रिंग कसे आणि कोण खेळाडू घडवते याचे फार कुतूहल आहे? अर्थातच या मागे कट आहे यात शंकाच नाही. नेमके नेते हुडकून काढणे त्यांना टारगेट करणे. रोचक पद्धतीने कार्य केले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

भारतातही नेपाळ किंवा फ्रान्स सारख्या मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे,

कर्नलतपस्वी
Fri, 09/12/2025 - 06:07 नवीन
संतश्रेष्ठ म्हणतात जंववरिरे तंववरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥
  • Log in or register to post comments

पण मुक्त व्यापाराचा पुरस्कार

कंजूस
Fri, 09/12/2025 - 11:06 नवीन
पण मुक्त व्यापाराचा पुरस्कार अमेरिकेनेच केला होता ना? त्यात मनमोहनसिंगांनी हो म्हटले होते आणि त्याचा बँड वाजवत होते भारतीय. मग आता नियम अटी लबाडी कशी काय?
  • Log in or register to post comments

मोदी विरोध

कपिलमुनी
Fri, 09/12/2025 - 12:05 नवीन
मोदी विरोध असला तरी अशा आंदोलनाचे मी स्वत: कधीही समर्थन करणार नाही. बहुसंख्य भारतीय करणार नाहीत. ही आरजकता आहे आणि यात सामान्य माणूस भरडला जातो . सीस्टीम उलथून टाकणे एकवेळ सोपे आहे , पण पर्यायी समर्थ सीस्टीम उभा करणे अवघड असते ... इथे जिथे जिथे असे उठाव घडवून आणले गेलेत ..( हे सगळे उठाव प्रायोजित असतात) तिथे देश कोसळले आहेत . ** पण उठसूट कोणत्याही विरोधी आंदोलनला सोरोस , सी आय ए प्रायोजित म्हणून उजवे गळे काढतात , ते पण चुकीचे आहे . लोकपाल आंदोलन केवढे मोठे होते .. तेव्हा कॉम्ग्रेस ने असे गळे काढले नही की दडपले नाही .. देशद्रोही ठरवले नाही हे विशेष
  • Log in or register to post comments

उजवे गळे काढतात , ते पण

अमरेंद्र बाहुबली
Fri, 09/12/2025 - 12:24 नवीन
उजवे गळे काढतात , ते पण चुकीचे आहे . उजवे नाही, भाजपेयी फक्त! भाजपेयीना उजवे म्हनने ही उजव्याना दिलेली शिवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

इंदिरा

चंद्रसूर्यकुमार
Fri, 09/12/2025 - 12:53 नवीन
लोकपाल आंदोलन केवढे मोठे होते .. तेव्हा कॉम्ग्रेस ने असे गळे काढले नही की दडपले नाही .. देशद्रोही ठरवले नाही हे विशेष
लोकपाल आंदोलनाच्या वेळेस नाही पण त्यापूर्वीच्या काळात इंदिरा गांधी सत्तेत असताना त्या अनेकदा सी.आय.ए आपल्याला पदावरून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे असे म्हणायच्या. स्वतंत्र पक्षाचे पिलू मोदी म्हणून एक खासदार होते. त्याविरूध्द 'आय अ‍ॅम अ सी.आय.ए एजंट' असे लिहिलेला शर्ट घालून ते एकदा लोकसभेत गेले होते. लोकपाल आंदोलन झाले २०११ मध्ये. तेव्हा त्यानंतर तीन वर्षात मोदी सत्तेत येतील अशी कल्पना कोणीच केली नव्हती. काँग्रेसवाले पण अगदी जानेवारी-फेब्रुवारी २०१४ पर्यंत डिनायल मोड होते. मोदींना गुजरातबाहेर कोणी ओळखत नाही, दंगलींमुळे त्यांना कोणी मते देणार नाही वगैरे काँग्रेसवाल्यांना वाटत होते. काँग्रेसवाल्यांना काय लालकृष्ण अडवाणींनाही तसेच वाटत होते. एकंदरीतच काँग्रेसने मोदींना हकल्यात घेतले. जयराम रमेशनी सप्टेंबर २०१३ मध्येच मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेसपुढील सगळ्यात मोठे आव्हान असतील असे म्हटल्यावर त्यांची पण मोदींचे एजंट वगैरे म्हणत टर उडवली गेली होतीच. प्रचार सुरू झाला आणि मग मोदी मोठे यश मिळवतील हे कदाचित काँग्रेसवाल्यांना लक्षात आले असेल पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मोदी नक्की काय करू शकतील हे वेळेत काँग्रेसवाल्यांनी लक्षात घेतले असते तर मग कदाचित २०११ मध्ये लोकपाल आंदोलनाच्या वेळेसची काँग्रेसची प्रतिक्रिया वेगळी असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अशा आंदोलनाचे मी स्वत: कधीही

अमरेंद्र बाहुबली
Sat, 09/13/2025 - 08:30 नवीन
अशा आंदोलनाचे मी स्वत: कधीही समर्थन करणार नाही. मी ह्या बाबतीत सहमत नाही, समजा प्रामाणिक निवडणुका घ्या म्हणून भारतात उद्या असे आंदोलन झाले नी सरकारने ऐकले नाही तर लोक जाळपोळ वगैरे करतील अश्या वेळी सरकारी, खासगी संपत्ती वाचवण्यासाठी सरकारनेच प्रामाणिक निवडणुका घ्यायला हव्यात ना? आंदोलकना दोष देऊन काय फायदा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आंदोलने आणि आपण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/13/2025 - 09:53 नवीन
लोकशाहीत आंदोलन करणे काही गैर नाही. नागरिकांचे प्रश्न, हक्क, बोकाळलेला भ्रष्टाचार, वाढत चाललेली महागाई, वाढती बेरोजगारी, असमानता, मानवाधिकारांचे उल्लंघन, किंवा इतर सामाजिक आणि राजकीय समस्यांविरोधात सरकारमधे सकारात्मक बदल घडवून आणावेत, यासाठी नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलने केली पाहिजेत. सरकार जेव्हा अति दुर्लक्ष करते तेव्हा लोकक्षोभ बाहेर पडतो. अर्थात हिंसक आंदोलनाचे समर्थन कोणीही करणार नाही. आपल्याकडे वाढते गोबरपंथीय लोंढे, सुशिक्षित माणसांचे वास्तवापासून दूर राहणे, माणसाला देव करणे, व्यक्तीपूजा, सरकारला, जनतेचं सरकार लोकशाहीचं केंद्र म्हणून न पाहता धार्मिक उन्मादाचे केंद्र म्हणून पाहणे, सामाजिक चळवळी कायद्याचा अधिकार घेत मोडून काढणे, अशा चळवळी करणा-याना तुरुंगात डांबणे, अशा विविध कारणांमुळे भितीमुळे मोठी आंदोलने लोक टाळतात, अर्थात लोकक्षोभ हा लहान मोठ्या प्रमाणात बाहेर पड़त असतोच. आपल्याकडे लोकक्षोभ बाहेर पडून व्यवस्थेत बदल करण्याचे मुख्य माध्यम हे निवडणूकच आहे, पण दुर्दैवाने लोकांचा त्यावरील विश्वासही उड़त चालला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माणसाला देव करणे, व्यक्तीपूजा

सुबोध खरे
Mon, 09/15/2025 - 09:48 नवीन
माणसाला देव करणे, व्यक्तीपूजा, एकच व्यक्तिचे फोटो ( महात्मा गांधी) नोटांपासून सर्व कार्यालयांपासून सर्वत्र कायम असणे, संपूर्ण निवडणूक हरून सुद्धा केवळ गांधीजींच्या आग्रहाखातर "जवाहर"लाच पंतप्रधान करणे, एकाच घराण्यातील व्यक्ती कोणतीही लायकी सिद्ध न करता थेट पंतप्रधान होणे पासून "इंदिरा इज इंडिया". तदनंतर कोणताही अनुभव नसताना मुलाला थेट पंतप्रधान करण्यापर्यंत आणि त्याच्या मतिमंद मुलाला थेट काँग्रेसिसचं अध्यक्ष करण्यापर्यंत चा इतिहास असताना '' अरण्यरुदन करणे चालू आहे. चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय हे खरे साहेब! डायरेक्ट

सुक्या
Mon, 09/15/2025 - 11:17 नवीन
काय हे खरे साहेब! डायरेक्ट धोतराला हात?? कुठे फेडाल हे पाप!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा,हा,हा....

कर्नलतपस्वी
Mon, 09/15/2025 - 12:16 नवीन
एवढेच, खाली बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

धोतराला हात??

कर्नलतपस्वी
Mon, 09/15/2025 - 12:17 नवीन
दांडीवरच्या की......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

झाले की

अभ्या..
Mon, 09/15/2025 - 14:57 नवीन
झाला कि तो इतिहास, म्हणून तर दुसरे आणले तर ..... हेही एकाच माणसाचे फोटो पेट्रोल पंपापासून कोरोनाच्या लसीकरणापर्यंत झळकवणारे, निवडणुका म्यानेज करुन हरल्या तरी साम, दाम, दंड भेद करुन माणसे फोडून फक्त सत्ता सत्ता करणारे शिक्षणापासून इतिहासापर्यंत सगळे संशयास्पद असूनही पदे मिळवली की लायकी विसरुन केवळ खुनशीपणा आणि बेसिक हपापलेपणा दाखवणारे, दुसर्‍याने म्हणलेले तरी सोडा, स्वतःच "मेरी मॉ, देशकी मॉ" पासून "मुझे लगता है मुझे भेजा गया है " पर्यंत स्वप्रेमात बुडलेले, मतिमंद तसेच गतिमंद ही असलेल्या मुलाला श्रीमंत बोर्डाचे डायरेक्ट सर्वोच्च पदावर बसवण्यापर्यंत मजल गेलेले, काहीच करता येत नसले तरी स्वतःचे जुने डॉयलॉग विसरुन उगी बोलबच्चन करत हॅहॅहॅ करणारे, असलेच निघाले. आता अरण्यरुदन केले तरी देशद्रोह व्हायला लागला. पण आता चालू द्या म्हणून कसे चालेल? चालू पडा म्हणायला पाहिजे ना. . म्हणून तर चिंधीचोर गद्दी छोड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अर्र! बेक्कार ठोकला! :)

अमरेंद्र बाहुबली
Mon, 09/15/2025 - 17:13 नवीन
अर्र! बेक्कार ठोकला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एकाच माणसाचे फोटो पेट्रोल पंपापासून कोरोनाच्या.....

कर्नलतपस्वी
Mon, 09/15/2025 - 17:54 नवीन
त्यानाही आपणच निवडून दिले,यांनाही आपणच निवडून दिले. आपलेच दात आपलेच ओठ. आपणच बसलोय चावत. मस्त कबड्डी कबड्डी चालू आहे. तुम्हीं लिहीत रहा आम्ही वाचत राहू. बाकी ,वस्तुता जे चालू आहे त्यात काही फरक पडेल असे वाटत नाही. अ राजकिय जनता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जयहिंद

अभ्या..
Mon, 09/15/2025 - 19:15 नवीन
कसंय कर्नलसाब, प्रो कबड्डीमध्ये ते हातात गुच्छे घेऊन प्र्रत्येक चढाई किंवा पकडीला नाचणारे चीअरलीडर्स असतेत ना त्यांना त्यासाठीच ट्रेन्ड केलेलं असतं. पैसे पण मिळतात त्यांना त्याचे. खेळणार्‍याला किंवा तुमच्या सारख्या पार्टी न बघता अस्सल खेळाचा आनंद लुटणार्‍या दर्दी रसिकाला जो मनापासून आनंद मिळतो तो वेगळाच. एखाद्या पार्टीला नुसत्या टाळ्या, एखाद्या पार्टीला फुल्ल शिट्ट्या, पिपाण्या असे जरी झाले तरी आनंद घेताय हे काय कमीय. बाकी राजकारण म्हणालात तर जे चालू आहे त्यात फरक पडणार नाही असे तुम्हाला वाटत असेल, आम्हाला फरक पडावा असे वाटते. बस्स इतनाईच. इतके लिहून परत अराजकीय वगैरे असले काही नाही हं. आपण नॉर्मल जनता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

अभ्या शेठ

सुबोध खरे
Tue, 09/16/2025 - 09:48 नवीन
अभ्या शेठ कसं आहे ना ? आज व्यक्तिपूजा नाही असं माझं म्हणणं नाहीच मुळी. कोपऱ्याकोपर्यावर लावलेले फ्लेक्स, "साहेब काहीही करू शकतात" पासून आम्हीच xxxx हृदयसम्राट इ सर्वत्र दिसत आहे श्री मोदींच्या नावाचा जागर किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रतिमा असणे हा त्यातलाच एक प्रकार आहे. "किंबहुना" अनेक भाजप/ संघ समर्थकांना सुद्धा ते आवडत नाही. पण हे व्यक्तिपूजा वगैरे आजच चालू झालाय असा बिरुटे मास्तरांचा आरोप होता. त्यावर मी एवढंच दाखवून दिलं कि व्यक्तिपूजा हि सदा सर्वकाळ जगभर सर्व समाजात चालू असते. हिटलर, माओ, स्टालिन, गांधीजी, नेहरू, इंदिरा गांधी ही वेगवेगळ्य्या काळातील सहज दिसणारी ठळक उदाहरणे आहेत. पण आपल्या नावडत्या व्यक्तीच्या भरभराटीचा काळ चालू असेल तर पराकोटीचा द्वेष शेवटी असा जगजाहीर होत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आता राजा अशोकासारखे ' देवांना

कंजूस
Tue, 09/16/2025 - 12:27 नवीन
आता राजा अशोकासारखे ' देवांना प्रिय' ही उपाधी लावायची बाकी. अशोक चक्र चिन्ह घेऊन आदरणीय करून टाकले आहे भारताने त्यामुळे त्यावर टीका करू शकत नाही. प्रजेच्या मन की बात कोण ऐकणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लोकशाहीत ५१ वि ४९ असा त्यांचा

कंजूस
Sun, 09/14/2025 - 18:40 नवीन
लोकशाहीत ५१ वि ४९ असा त्यांचा कल पडला तरी ५१ वाला विजयी घोषित होतो. म्हणजे ४९ वाला अगदीच टाकावू किंवा बाद नसतो. निवडणुकीत कांग्रेससह इतर जोड गटबंधन इंडिया ब्लॉकला दोनशे जागा मिळाल्या म्हणजे विरोधकही मजबूत पाठिंबा राखून आहेत. फक्त जरा नशिबाने मार खाल्ला आहे. पुढच्या निवडणुकीत त्यांचे सरकार येण्याची शक्यता आहे. फक्त भांडाभांडी करून संधी हुकवू नये. निवडून आल्याने एक फायदा होतो तो म्हणजे ट्रान्स्फर ओफ पावर कायदेशीर होते. आंदोलनाने किंवा क्रांतीने डळमळीत व्यवस्था होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बांगलादेश, नेपाळनंतर आता

रात्रीचे चांदणे
Sat, 09/13/2025 - 13:18 नवीन
बांगलादेश, नेपाळनंतर आता भारतातील विरोधकांनाही असे स्वप्न पडू लागले आहे. मात्र, आपल्या देशात असा प्रयत्न झाला तरी मोदी सरकार सहजपणे ४०० जागांचा टप्पा ओलांडेल, असा माझा अंदाज आहे. खरं तर भारतात असं होण्याची शक्यता शून्य आहे; परंतु ज्यांना मोदी-भाजपा पसंत नाही, त्यांच्यासाठी मात्र हा एक आशेचा किरण आहे.
  • Log in or register to post comments

सहजपणे ४०० जागांचा टप्पा

अमरेंद्र बाहुबली
Sat, 09/13/2025 - 18:44 नवीन
सहजपणे ४०० जागांचा टप्पा ओलांडेल अडवणूक आयोग सोबत असले तर ४०० काय ५०० ही अशक्य नाहीत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा