Skip to main content

ताज्या घडामोडी जुलै २०२५

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 01/07/2025 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
वीसेक वर्षांपूर्वी कांटा लगा या गाण्यामुळे प्रसिध्द झालेल्या शेफाली जरीवालाचे मागच्या आठवड्यात वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. ४२ हे काही जायचे वय नाही. तिला आदरांजली. jariwala

वाचने 20283
प्रतिक्रिया 122

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

'संघप्रमुख मोहन भागवत यांनी असे सुचवले आहे की ७५ वर्षांनंतर, एखाद्या व्यक्तीने इतरांसाठीही मार्ग मोकळा करावा, या विधानामुळे सर्वांना आनंद झाला पाहिजे. कारण यातून भारतासाठी, संविधानासाठी आणि देशाच्या आत्म्यासाठी अच्छे दिन येत आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> उद्या सरकार विरुद्ध लिहिणारे-बोलणारे हिंसक आणि शहरी नक्षलवादी ठरवून जेलात घालतील असे होण्याची दाट शक्यता आहे. हा कायदा हेतुपुरस्सर अनेक गोष्टींची व्याख्या अत्यंत मोघम ठेवून सरकारच्या मर्जीनुसार कोणालाही तुंरूंगात घालण्याची व त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची सोय करून देणारा आहे. मुळात युएपीए सारखा कायदा आधीच अस्तित्वात असताना या कायद्याची गरजच नव्हती. म्हणून हा कायदा जनसुरक्षा नसून भाजप सुरक्षेसाठी आणला आहे असे विरोधकांचे मत आहे.

कुछ तो गुरू है,कुछ गुरू घंटाल, बुझो तो ग्यान है वरना जी का जंजाल.... ऐसे सभी गुरू और गुरूघंटालोको शिष्योत्तम का प्रणाम.

काही नाही शी जिनपिनगचया वरचढ कोणी झायावर ते खरोखरच नाहीसे झालेले असण्याची शक्यता जास्त आहे . चीनमधे पार्टीचे लोक जास्तविचार न करता शूट at साईट ही असते , ङोईजड झाला एखादा कार्यकर्ता की शूट हे असते. जॅक maaचे पुढे काय झाले हे त्याना एकदाच विमानाचा जिना चढताना दाखवले अर्थात जुना फोटो . नन्तर अजूनही त्या बद्द्ल काहीच आलेले नाही वर्त़मानपत्रात.. निरीक्षण करत ठेवणे या चिनी लोकान्चे हेच आपण करु शकतो. जे जे होईल ते पहात राहणे.

आणि आपल्या देशाने सीमेवर शस्त्र सज्ज रहाणे व आपण एकजुटीने सरकार लष्कर सैनिकान्चया पाठीशी रहाणे सरकारचे मनोधैर्य वाढविणे व बळ देणे हेच करू शकतो..

महाराष्ट्राचा उद्याचा नेता आपणच असणार आहोत असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. आधी काँग्रेस होती आता भाजप आहे आणि उद्या अभिजीत बिचुकलेच असणार आहे असेही ते म्हणाले. मी कोणाबरोबरही जाणार नाही तर माझ्याबरोबर इतरांना यायचे आहे असेही ते म्हणाले.तसेच शिवाजी महाराजांच्या गादीचा वैचारीक वारसही आपणच आहोत आणि आपण छत्रपतींच्या नावाचा गैरवापर कोणालाही करू देणार नाही असेही ते म्हणाले आहेत. bichukale अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywo… वर

वडोदरा येथील पूल पडला आणि विरोधक तसेच व्यंगचित्रकार जोमात. 'गुजरात मॉडेल' हा थट्टेचा ( meme) विषय होत आहे. तर इकडे महाराष्ट्रात दारू दुकान परवान्यांचे वाढ करून सरकार पैसे कमावणार आहे यावर विरोधक तुटून पडले आहेत. लाडक्या बहिणींचे पैसे असे देणार का हा मुद्दा जोरात आहे. आणि दिल्लीत पेट्रोल वाहने पंधरा वर्षे तर डिझेल वाहनांना दहा वर्षे मुदत हा मोठा वादाचा मुद्दा झाला आहे.

देवदेवतांच्या विरोधात एका आक्षेपार्ह पोष्ट बद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान, 'नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजायला हवे आणि त्यांनी स्व-नियमांचे पालन करायला हवे. त्याचबरोबर सोशियल मिडियावरील आक्षेपार्ह पोष्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा विचार करत आहोत असे न्यायालयाने म्हटले आहे, सोशियल मिडियावरील अशा काही प्रवृतीना आळा घालायला हवा. याचा अर्थ सेन्सरशीप नाही, नागरिकांमधे बंधुभाव असायला हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच चर्चेचा आणि कायद्याच्या कक्षेत अशा प्रकरणांचा वाढता प्रभाव पाहता येत्या काळात चित्र, लेखन, मतं यावर मोठी मर्यादा येईल असे वाटते. आणि जो असे नियम पाळणार नाही, त्याची रवानगी जेलात होत राहील असे वाटायला लागले आहे. -दिलीप बिरुटे

अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच चर्चेचा आणि कायद्याच्या कक्षेत अशा प्रकरणांचा वाढता प्रभाव पाहता येत्या काळात चित्र, लेखन, मतं यावर मोठी मर्यादा येईल असे वाटते.> "समरसता" ही कल्पना किती फसवी आहे हे जनसुरक्षा विधेयकाच्या संदिग्दधतेवरून समजले. समाजातील अर्धवट लोकांची डोकी फिरू नयेत म्हणून शहाण्यांनी तोंडे बंद ठेवावीत हा त्यातला संदेश आहे. देशाचा भविष्यकाळ भीषण आहे

In reply to by युयुत्सु

तुम्ही प्रेषित महंमदाच्या कार्टून काढा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर महाराष्टभर भाषण द्या. मी तुमचा शिवतीर्थावर जाहीर सत्कार आणि रुपये १ लक्ष याची थैली अर्पण करायला तयार आहे. बाकी चालू द्या

दिल्ली, बेंगळुरू शहरांत यूपीआइ पेमेंट घेणे बंद. आता काय करायचं? इतर शहरांतही हेच होईल. सुटे पैसे, जुनाट नोटा यांचा प्रश्न यातून खरंतर सुटला होता.

In reply to by स्वधर्म

हे का होत आहे? >>यु पी आय मध्ये काही समस्या आहे का? >> नाही. या शहरांत काही छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवहार चाळीस लाख रुपयांच्या वर झालेले सरकारला आढळले. म्हणजे ते जीएसटी विवरण देण्याच्या नियमांत आले तरीही जीएसटी विवरण देत नव्हते ( किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत नव्हते) त्यांना सरकारी नोटिसा आल्या आहेत. म्हणून आता सर्वच लहान सहान व्यापाऱ्यांनीही युपीआइ पेमेंट घेण्याचे बंद केले. रोख रक्कम घेतली की सर्व गुप्तच राहणार.

In reply to by कंजूस

अत्ता उलटी गंगा वाहने शक्य वाटत नाही. UPI द्वारे पैसे नाही स्वीकारले तर गिर्हाईक जाणार. व्यापारांना टॅक्स चोरी साठी नवीन मार्ग निवडावा लागेल.

In reply to by कंजूस

सरकार व्यापार्‍यांना वठणीवर आणेल ही अपेक्षा. आपल्या समाजात कमालीची (!) सचोटी असल्याने अक्षरश: १-२% व्यापारीच प्रामाणिकपणे कर भरत असतील असे वाटते. त्या मानाने संघटीत क्षेत्रातील पगारदार मुळीच कर चुकवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by स्वधर्म

नोटाबंदी काळात .... आमचे नेहमीचेच किराणा, दूधवाले बिलाचे . बँक अकाऊंट ट्रान्स्फर घ्यायला तयार नव्हते. त्यांचे अकाऊंटस् नाही म्हणाले ( बिझनेस किंवा वैयक्तिक) . पैसे नंतर द्या पण रोखच द्या.

In reply to by कंजूस

सरकार व्यापार्‍यांना वठणीवर आणेल ही अपेक्षा. आपल्या समाजात कमालीची (!) सचोटी असल्याने अक्षरश: १-२% व्यापारीच प्रामाणिकपणे कर भरत असतील असे वाटते. त्या मानाने संघटीत क्षेत्रातील पगारदार मुळीच कर चुकवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. व्यापारी युपीआय ने पैसे स्विकारत नसतील तर ग्राहकांनी सरळ दुसरीकडे जावे.

In reply to by स्वधर्म

आपल्या समाजात कमालीची (!) सचोटी असल्याने अक्षरश: १-२% व्यापारीच प्रामाणिकपणे कर भरत असतील असे वाटते. हेहेहे. तरी आत्ता निदान दिसणेबल काहीतरी केलेय व्यापार्‍यानी. सरकारने युपीआय कंपन्यांना हाताशी धरुन फक्त एका आस्थापनेला/दुकानाला/व्यवसायाला एकच युपीआय अकाउंट / क्यु आर कोड असे केले असते तर आत्तापर्यंत व्यापार्‍यानी जीपे, पेटीम, फोनपे चालू सुध्दा दिले नसते. केंवाच बंद झाले असते. सध्याही वस्तुस्थिती अशी आहे की साध्या किराणा दुकानातहीवेगवेगळे तीन चार कोड असतात, तेही वेगवेगळ्या बँका, जीपे, वगैरेच्या पटीत. हे अ‍ॅक्चुअली इतर नातेवाईक, दुकानात काम करणारी मुले ह्यांच्या नावाच्या अकाउंट ला अ‍ॅटॅच केली असतात. स्कॅन करताना आपल्याला दुकानाचे नाव दिसते पण अकाउंट मालक दुसराच असतो. एका शॉप अ‍ॅक्ट ला एक क्यु आर कोड इतके जरी कंपल्शन स्कॅन कोड च्या कंपन्याना केले तरी 'खरी कमाई' कळेल व्यापार्‍यांची. . व्यापारी युपीआय ने पैसे स्विकारत नसतील तर ग्राहकांनी सरळ दुसरीकडे जावे. इतके सोपे नाही. गरज आहे म्हणून व्यापार आहे. नियम आहेत तर पळवाटा आहेत. सवयी लावून घेतल्या लोकांनी तर त्यातोनही मार्ग काढणारच व्यपारी. प्रश्न सरकारसहीत सगळ्यांच्यच मनोवृत्तीचा आहे. त्या मानाने म्हणालात म्हणून ठीके पण संघटीत क्षेत्रातील पगारदार मुळीच कर (कुठलाच) चुकवू शकत नाहीत असे नाहीये. ;)

In reply to by अभ्या..

>> एका आस्थापनेला/दुकानाला/व्यवसायाला एकच युपीआय अकाउंट / क्यु आर कोड असे केले असते तर आत्तापर्यंत व्यापार्‍यानी जीपे, पेटीम, फोनपे चालू सुध्दा दिले नसते. केंवाच बंद झाले असते. अगदी अगदी! खास करून हार्डवेअर, रंग, प्लायवूड, धातू, अगदी किराणा या क्षेत्रातील ९९% छोटे व मध्यम व्यापारी अगदी उघडपणे बील हवे असेल तर १२%, १३% एक्स्ट्रा चार्ज लागेल असे आजही सांगतात. फक्त औषध दुकानदार आणि हॉटेल जीएसटी सहित बील देतात. मला नेहमी प्रश्न पडतो की हे व्यापारी पक्के जीएसटी सहित बील दिले तरी 'आपल्या' खरेदीवरचा कर सरकारला जमा झाला की नाही ते कसे समजणार? म्हणजे मी हॉटेलम्ध्ये समजा १०० रू.चे खाल्ले तर बरोबर त्या बीलाचे ४ रू. कर नक्की सरकारी तिजोरीतच गेले का? बनावट बीले इ. सरकार तपासणार तरी किती? जीएसटी त्यासाठीच आणला म्हटले जाते, पण एवढे लाखो व्यवहार होतात त्यातला कर सरकार कसा तपासणार? संघटीत क्षेत्रातले नोकरदारही कर चुकवतात, पण त्यांना आयकर कापूनच पगार मिळत असल्याने फार चुकवेगिरी करता येत नाही, हे अगदी स्पष्ट आहे.

बऱ्याच लोकांनी XI जिनपिंग गायब झाले म्हणून आवाई उठीवली होती.खोट्या बातम्या देण्यात आपला मीडिया माघे कधीच नसतो ह्यावेळी पण त्यांनी हात धुऊन घेतले. पण आत्ता स्वतः जय शंकर जिनपिंग भेट झाली आहे.

बुक्क्या मारत मारामारी करणारे आमदार आपल्या टॅक्स मधून चाललेल्या अधिवेशनात रमी खेळणारे मंत्री विधान भवनात गुंड आणून मारामारी करणारे आमदार.. शेतकरी भिकारी म्हणणारे मंत्री बारबाला नाचवणारे गृहराज्यमंत्री ! मतदारांपेक्षा वेश्या बर्या म्हणणारे सत्ताधीश आमदार तुझ्या बापाला पेरणीचे पैसे तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत ते आम्हीच दिलेत. असा माज दाखवणारे सत्ताधारी आमदार .. ------------------------------------------------------------ यांच्या पैकी कोणावरही कारवाइ करायचे धाड्स , राजीनामा घ्याय्चे धाडस या रीक्षा सरकार मध्ये नाही एकंदरीत सत्तेचा माज डोक्यात अंगात भिनला आहे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कलयुगातील प्रो-व्हर्जन म्हणजे गोबरयुग. वरील सर्व घटना चूकीच्या, वाईट, धक्कादायक असूनही त्याचं समर्थन मोठ्या प्रमाणात अशा गोबरयुगात होत राहणार. उदा. लोकसभेतील विरोधकांना लोकसभा अध्यक्षांनी 'सडकछाप' म्हणने, याला गोबरयुगात अगदी बरोबर आहे, असे म्हटल्या जाईल. तिकडे राज्यसभेत विरोधकांना अजिबातच न बोलू देणारे आणि सरकारचा अजेंडा योग्य त-हेने राबवू देत नाहीत म्हणून राज्यसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायला मजबूर करणा-यांना 'लै भारी' म्हटलं जाईल. भागवत पुराणात जे म्हटलं आहे, ते गोबरयुगाचंच वर्णन आहे. 'पाषण्डप्रचुरे धर्म दस्युप्रायेषु राजसु । बौर्या नृतवृधाहिसा नानावृतिषुवे नृषु' धर्मात पाखंडीपणा, राजे महाराजे म्हणजे आजचे सत्ताधारी चोर लुटांरुसारखे समान पातळीवर येतील. चोरी, खोटं बोलून उदरनिर्वाह करणे, कुकर्म करुन कुटुंब देश चालवणे ही सगळी लक्षणं त्याचीच आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खो खो खो! गोबरयुगाचे वर्णन भागवत पुराणातही आहे नी ते आज चपखल बसत आहे. वाचून हसू फुटले. सध्या गोबरयुगात बिहारमध्ये मतदारयादीत फेरफार केली जात आहे, ज्या नितीशकुमारचा हात धरून बिहारात वाढले त्याचा काटा काढला जाणार असे दिसत आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्ष, जनता दल (कर्नाटकवाला), आसामगण परिषद, अकाली दल अश्या ज्या पक्षांनी राज्यात वाढवले त्याच पक्षांवर भाजप उलटला. आता नितीश बांबूचा नंबर. शिवसेना बाजूला झाली म्हणून वाचली तरिहि जाता जाता गोबरयुगीन चाणक्यांनी चिन्ह चोरून सेनेला तडाखा दिलाच.

News सत्ताधारी आमदाराच्या भावाचा माज ! सोशल मीडियावर गोळीबाराची चर्चा रंगल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. सुरुवातीला पोलिसांनी काही पुरावे मिळाले नसल्याचं म्हटलं होतं तर कलाकेंद्राच्या मालकांनीही असं काही घडलं नाही असं सांगितलं होतं. पुढे लोकांनी चर्चा सुरू केल्या म्हणून ही सारवासारव!

लाडक्या बहीण योजनेमुळे सगळी बिले थांबली आहेत . कंत्राटदारांनी आत्महत्या करायल सुरुवात केली आहे. सरकार ढीम्म ! रम रमी आणि रमणा मध्ये रमणारे सरकार !

राहुल गांधी हात धुवून निवडणूक आयोगाच्यामागे लागले आहेत. निवडणूक आयोग नियम बदलते पण राहुल गांधींच्या आरोपांना भीक घालत नाही. एखाद्याने नाद सोडला असता, परंतु पठ्ठ्या चिकाटीने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

४६ वर्षांपूर्वी केलेल्या खुनाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ६७ वर्षांच्या एका व्यक्तीला दोषी ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषी वृद्धाला जन्मठेप किंवा सात वर्षांच्या तुरुंगवासाचा पर्याय दिला आहे. हा नक्की काय प्रकार आहे? एक तर ४६ वर्षे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये तारीख पे तारीख चालू होते हा मुद्दा एकदम किरकोळ म्हणून त्याविषयी भाष्य करायलाच नको. दोषी व्यक्तीला आपली शिक्षा निवडायचा अधिकार असतो? मटामधील बातमीतील एक वाक्य रोचक आहे- मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, "जर तुम्ही सहमत असाल, तर आम्ही कलम 302 अंतर्गत असलेली शिक्षा कलम 304-I (सदोष मनुष्यवध) मध्ये बदलू, ज्यामध्ये सात वर्षांची कैद होईल." म्हणजे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरविल्यानंतर त्याच्यावर मुळात घातलेल्या गुन्ह्याचे कलम आणि स्वरूपच बदलायचे? इतकी वर्षे मला वाटत होते की पोलिस एखाद्या घटनेबद्दल गुन्हा दाखल करतात आणि संबंधित व्यक्ती दोषी आहे याविषयीचे पुरावे न्यायालयात सादर करतात. मग त्यावर सुनावणी होते आणि त्या पुराव्यांमध्ये दम असेल तर मग न्यायालय त्या व्यक्तीला दोषी ठरवून शिक्षा सुनावते. म्हणजे एखादी व्यक्ती अमुक एक प्रकारचा गुन्हा केला म्हणून दोषी असते. मग दोषी ठरविल्यानंतर मुळातल्या गुन्ह्याचे स्वरूपच कसे बदलता येईल? वेगळाच गुन्हा दाखल केला तर मग त्याही सुनावणी परत करायला नको का? जुन्या आय.पी.सी मधील कलम ३०२ हे खुनाचे होते ते आता ३०४-१ म्हणजे सदोष मनुष्यवधात बदलणार? म्हणजे त्या व्यक्तीने खून केला आहे म्हणून पोलिसांनी पुरावे गोळा केले, ते खालच्या न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही टिकले आणि आता न्यायाधीशच म्हणत आहेत की चला गुन्ह्याचे स्वरूपच बदलून टाकू- म्हणजे जाणूनबुजून खून केला नसून सदोष मनुष्यवध म्हणजे त्या व्यक्तीकडून चुकून दुसर्‍या कोणाचीतरी हत्या झाली- त्याचा हत्या करायचा उद्देश नव्हता. मग जुन्या पुराव्यांना आणि सुनावणीला काय अर्थ राहिला? https://marathi.indiatimes.com/india-news/supreme-court-gives-choice-to…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आजकाल न्यायालये जास्तच फालतुपणा करायला लागली आहेत. चोचले जास्त झाले / किंवा प्रश्न विचारणारा कुणी नसला की असली थेरे येतात. वरुन कुणी काही प्रश्न विचारला की न्यायालयाचा अपमान झाला म्हणुन त्यावर कारवाई करायला मोकळे. कितीतरी ठिकाणी परस्पर विरोधी निकाल लागलेले आहेत. जघन्य गुन्ह्यामधे गुन्ह्याच्या तिव्रतेपेक्षा त्याची वारंवारीता त्या गुण्ह्याच्या शिक्षेचे स्वरुप ठरवते .. हा काय प्रकार आहे तो मला अजुन समजलेला नाही.

कितीतरी ठिकाणी परस्पर विरोधी निकाल लागलेले आहेत.> व्यवस्थित व्याख्या तसेच स्पष्टता नसलेले (उदा० जनसुरक्षा कायदा) सैल कायदे केले की फटी राहतात मग हवे तसे अर्थ काढता येतात.

In reply to by युयुत्सु

तुम्ही जगातील वाटेल तो सर्वोत्कृष्ट कायदा दाखवा मी त्यातील फटी दाखवून देईन आपल्या मनातील गरळ बाहेर काढण्यासाठी (उदा० जनसुरक्षा कायदा) जिथे तिथे पचकण्यात काय हशील आहे ?

पहलगाम हल्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या ३ अतिरेक्यांची यमसदनी रवानगी केली गेली आहे अशी बातमी आहे. बरे झाले ऐन अधिवेषणाच्या दरम्यान ही घटना घडली. हे अतिरेकी कुठे आहेत ? कसे पळुन गेले वगेरे प्रश्न विचारणारे आता मिठाची गुळणी धरुन बसतील. भारतिय सैन्य दलाचा विजय असो.

In reply to by सुक्या

पहलगाम हल्ल्यातील 'सूत्रधारांना' काल भारतीय सैनिकांनी यमसदनी पाठवले. प्रत्यक्ष हल्लेखोर अजुनही सापडलेले नाहीत. भारतीय सैन्याचा कायमच अभिमान आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दिक गिचमिड मला आवडत नाही. सुत्रधार / प्रत्यक्ष हल्लेखोर वगेरे वगेरे चालु द्या. काय आहे ना. जर प्रत्यक्ष हल्लेखोर मारले गेले असते तर "सुत्रधार अजुन जिवंत आहे" आता सुत्रधार मारले गेले तर "प्रत्यक्ष हल्लेखोर अजुन जिवंत आहेत". असो. बाल की खाल ... टाईप काहीतरी वाक्प्रचार आहे हिंदीत.

In reply to by सुक्या

>>>> पहलगाम हल्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या ३ अतिरेक्यांची यमसदनी रवानगी केली गेली आहे इतकी धड़धाकट फेकाफेकी वाचली म्हणून लिहावे लागले. बाकी चालू द्या...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आर्मीच्या जनरल ला मारले तरी ज्याने गोळीबार केला तो सैनिक पळून गेला ना ? तुमच्या घरात तुम्हाला मुंगी चावली तर तुम्ही मुंग्यांचे वारूळ शोधून नष्ट केले पण जी मुंगी तुम्हाला चावली तिला मारले नाही मग एवढे कष्ट घेऊन काय उपयोग मग गोबर युगात यापेक्षा जास्त काय अपेक्षा आहेत? ऑपरेशन सिंदूर इतके निरूपयोगी ऑपरेशन दुसरे नसेल.

श्रीनगरजवळील Dachigam National Park परिसरात भारतीय सुरक्षादलांनी लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार केले. त्यात पाहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा उर्फ सुलेमान मारला गेला. त्याच्यावर ₹20 लाख बक्षीस होत. पाहलगम हल्ल्यातील अतिरेकी पकडले किंवा मारले जाण गरजेचं होत.

तर, अशा त-हेने जनसुरक्षा कायद्या नंतर व्यवस्थेविरुद्ध जे जे लिहितील त्यांचं त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. ज्या गोदी मिडियाने मिडियाचा वापर करून लोकांवर खोट्या काल्पनिक गोष्टींचा मारा करून सत्तेजवळ पोहोचण्यास मदत झाली त्याच मिडियाचं अस्त्र उलटत जात आहे असे लक्षात आल्यामुळे शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल मिडियावर लिहिण्या बोलण्यावर महाराष्ट्र शासनाने कालपासून निर्बंध आणले आहेत. धन्यवाद. लोकशाही जिंदाबाद. -दिलीप बिरुटे

शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल मिडियावर लिहिण्या बोलण्यावर महाराष्ट्र शासनाने कालपासून निर्बंध आणले आहेत. शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल मिडियावर लिहिण्या बोलण्यामुले अनेक तर्हेचे वाद निर्माण होऊ शकतात किंवा त्याचा अनेक लोकांना फायदा किंवा तोटा होऊ शकतो हे बरीच लोकांच्या लक्षात येत नाही. अशा तर्हेचे निर्बंध लष्करात स्वातंत्र्या पासूनच आहेत. सोशल मीडियामधील वक्तव्यांचा वापर समाज विघातक वृत्ती कशा तर्हेने करू शकतात याची आपल्याला साधी कल्पना पण नाही. लष्करात असताना विद्यमान सरकारशी एकनिष्ठ राहीन अशी शपथ घेतली जाते मग त्या सरकारचे धोरण देशाविरुद्ध किंवा लष्करी हिताच्या विरुद्ध असलं तरीही. उद्या एखाद्या लढाऊ वैमानिकाने सुखोई विमानातील त्रुटी जर सामाजिक न्यासावर टाकल्या ( नेशन वॉण्टस तो नो म्हणून) तर त्यातून काय निष्पन्न होईल. सरकारी नोकरी करत असताना सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळेस अधोरेखित केलेले आहे. याला घटनेमध्ये मूलभूत अधिकारावर असलेले वाजवी निर्बंध म्हणतात (reasonable restriction). उदा. लग्न आकारणे हा आपला मूलभूत अधिकार असला तरी दोन लग्ने करणे हा गुन्हा आहे हा आपल्या मूलभूत अधिकारावर असलेला वाजवी निर्बंध आहे. सरकारी नोकरीत असणाऱ्या मुसलमानांना दोन लग्ने करता येत नाहीत. त्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागते. लष्करात आपल्याला परदेशी नागरिकाशी विवाह करता येत नाही. त्यासाठी लष्करातून राजीनामा द्यावा लागतो. हे सर्व मूलभूत अधिकारावर असलेले वाजवी निर्बंध आहेत असे असताना केवळ सरकारवर टीका करण्यासाठी टीका करणे हा करंटेपणा आहे

ओवेसी यांनी आपण पकीस्तान सोबत क्रि़केट का खेळत आहे हे विचारले .. यूट्यूब चॅनेल ब्लोक केले होते ते पण चालू केलेत . त्यतून पाकिस्स्तनी रग्गड पैसे मिळवतात . त्याचीही गरज नव्हती.

ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेतील चर्चा भारी होती. सरकार पहिल्यांदा विरोधकांना उत्तरे देतांना भांबावून गेलं. अरविंद सावंत शिवसेना ( उबाठा ) यांचं भाषण जबरा होतं. आवड़लं. ( दुवा ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

" आताचे पाकव्याप्त काश्मीर काँग्रेसने पाकिस्तानला दिलेच का ? म्हणून आम्ही ते ताब्यात घेतले नाही ". सरकारकडून काँग्रेसला गप्प करणारे मला सर्वात जास्त आवडलेले उत्तर.

In reply to by आग्या१९९०

जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती केली नाही, अशा धमाकेदार भाषणात नेहमीप्रमाणे पहलगामपासून, ऑपरेशन सिंदूर, प.नेहरु, काँग्रेस, यांच्यावर बोलून भाषण संपलं. इकडे भाषण संपलं. आणि तिकडे. ट्रंम्प यांनी भारत पाक मध्यस्थीचा दावा तिसाव्या वेळी केला. '' भारत आमचा मित्र देश आहे, माझ्या विनंतीवरुन भारतानं युद्ध थांबवलं . पाकिस्तानने ही तसंच केलं. ते खूपच चांगलं झालं. मी अशा प्रकारच्या युद्धासंदर्भात पाच वेगवेगळ्या युद्धा संदर्भात चांगलं काम केलं पण मला त्याचं श्रेय मला मिळणार नाही'' असं ते म्हणाले. 'ट्रंपने वॉर रुकवा दी पापा' म्हणना-या सयानी घोष, अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियंका गांधी , राजनाथ सिंह, गृहमंत्री, तिकडे संजयसिंह, भाषणं ऐकता आली. लोकशाहीत उत्तम चर्चा. लोकसभा अध्यक्षांचा पक्षपातीपणा वारंवार दिसत होता पण आता हे असं चालायचंच. -दिलीप बिरुटे

जनतेला यातलं काय पटलं आणि काय नाही माहीत नाही. पण चर्चा झाली आणि लोकनेत्यांची मते कळली. -------------- हल्लेखोरांना पकडून न्यायनिवाडा करत बसले असते तर आणखी दहा वर्षे आणि पाचशे कोटी खर्च झाले असते( कसाबचं उदाहरण आहेत.) -------- युद्ध कुणी थांबवलं? एक आडवाटेचा अंदाज म्हणजे वल्ड बँकेचं लोन पाकला पाहिजे तर ओघाने आलंच. मग मिळालेल्या पैशांनी अमेरिकन महागडी विमाने विकत घ्यायची?

डोनाल्ड ट्रंप भारतीय अर्थव्यवस्थेला "डेस ईकॉनॉमी" असे म्हणाला त्यावर भारताचे लोकप्रिय नेता राहुल गांधी यांनी त्याच्या हो मधे हो मिळवत "सगळ्यांना माहीत आहे भारतीय ईकॉनॉमी डेड ईकॉनॉमी आहे" असे म्हणाला. माणसाने मुर्ख तरी किती असावे? म्हणजे किमान आहे तेव्हडे डोके वापरावे तरी. कुणी बाहेरचा माणुस वाट्टेल ते बोलतो त्यावर हे होयबा करत नाचत सुटतात.

In reply to by सुक्या

किमान आहे तेव्हडे डोके वापरावे तरी. ३५ मिमी चा मेंदू असल्यावर विचार तरी किती करणार. पेंटियम २ प्रोसेसर, अँड्रॉइड ४ -आईस क्रीम सेंडवीच ऑपरेटिंग सिस्टीम, १२८ एम बी रॅम आणि ०. ५ GB हार्ड डिस्क असल्यावर आपल्या किती अपेक्षा आहेत?

१७ वर्षांपासून भगव्या दहशतवादाचे खोटे कथानक रचणारे तोंडावर आपटले! रडारड आणि बांगड्या फोडणे सुरु झाले आहे!! आज बरनॉलचा खप वाढणार!!!