रामनाथ कोविंद यांनी केलेल्या सहिने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता सर्व देशात हा कायदा लागू होईल. जसे इतर कायदे परित होतात तसाच हा कायदा देखील परीत झाला पण याला मिळणारा प्रतिसाद काहीसा नकारात्मक असाच होता. वर्तमानपत्राची पानेच पाने भरून येत आहेत. हिंसाचाराच्या बातम्या हेडलाईन्स बनत आहेत. त्यामुळेच याबद्दल तुमच्याशी बोलायच ठरवलं आहे.
हा कायदा नक्की काय आहे हे समजावून घेऊ. या कायद्याद्वारे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतामध्ये अवैधपणे स्थलांतरित झालेले व सध्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिमेतर लोक म्हणजेच हिंदू , शीख, बौद्ध धर्मीय नागरिक म्हणून गणले जातील. त्यांच्या स्थलान्तर मागे त्यांच्या पूर्वीच्या देशात झालेला धार्मिक हिंसाचार याला कारण मानून हेच नागरिकत्व देण्यासाठीच पाया ठरवला गेला.
एखाद्या देशात धार्मिक हिंसाचार होत असेल व त्या कारणाने अल्पसंख्याक समाज दुसऱ्या देशात स्थलांतर करत असेल तर त्याला नागरिकत्व देणे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य की अयोग्य? या कायद्याला संपूर्ण देशात विरोध केला जातोय.प्रत्येकाचे विरोध करण्याचे कारण व मार्ग वेगळे आहेत.विरोधी पक्षांनी बिल पारित झालेल्या दिवसाला काळा दिवस असे संबोधले . काहींनी तर हा धर्मभेद्यांचा विजय असा मानला गेला . उर्दू लेखक शिरीन दळवी यांनी अवॉर्ड वापसी केली.
सगळ्या विरोधाचे प्रखर केंद्रबिदू ठरले ते आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्ये. इतर वेळी ही राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच नादात शीळ घालत जाणाऱ्या स्वछंद्याप्रमाने वाटतात.पण तीच राज्य सर्वात जास्त पेटलेली दिसत आहेत. पोलिस गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. आसाममधील इंटरनेट सुविधा तर कालपासून बंद केली गेली आहे .आज सकाळीच माननीय प्रधानमंत्र्यांच आसामला शांततेसाठी संबोधित करणारे ट्विट आले. आता इंटरनेट नसताना हे ट्विट लोकांपर्यंत कशी पोचणार आणि त्याला लोक कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
फक्त विरोध करून उपयोग नाही तर त्यामागची कारणे देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजेत.
सगळ्यात पहिला आरोप जो विरोधकांकडून केला जातोय तो म्हणजे हा कायदा संविधान विरोधी आहे. खरंच तस आहे काय? आपल्या संविधानाने समान व सर्वसमावेशक नागरिकत्वाची तरतूद केली आहे . त्यामुळे मुस्लिमांना वगळून इतर धर्मियांना नागरिकत्व देणे म्हणजे ह्या तरतुदीचा भंग आहे का हे तपासले पाहिजे .
ह्याच मुद्द्याला धरून खूप सरी मते प्रदर्शित होतात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांडून ह्याला देशहिताचा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा कायदा मानला जातो. ह्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलतात असाही आरोप केला जातो.विरोधक या गोष्टीला मतपेटीचे राजकारण मानतात. मुस्लिमांना वंचित ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना खुपसा फरक पडत नसल्याने हा अन्याय चालवला असा आरोप आहे. तसाच विरोधकांवर सुध्दा मुस्लिम मतासाठी घाणेरड्या राजकारणाचा आरोप होतो.
त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा वेगळा मतप्रवाह आहे जो सर्वच धर्मातील अवैध स्थलांतराचा विरोध करतो व नागरिकत्व न देण्याची मागणी करतो. त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये अग्रेसर आहेत.काही लोक असाही म्हणतात की ज्या मुस्लिमेतर लोकांना भारतात यायचं होत ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थलांतरित झाली त्यातले एक पंतप्रधान पण झाले(मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला). आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं.
काही लोक या कायद्याला आसाम कराराचा भंग मानतात. कारण या कराराने १९७१ पूर्वीच्या स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्वाची तरतूद केली होती.आता नागरिकत्व कायद्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्थलांतर नागरिकत्वाासाठी पात्र ठरवला गेला.
१९७१ असे किती लोक स्थलांतरित झाले असतील असा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येते की बांगलादेशातून आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लाखो हिंदू स्थलांतरित झाले ज्यामुळे मूळचे असामी बोडो व इतर आदिवासी अल्पसंख्याक झाले. त्यामुळे आपल्यावर हिंदू संस्कृती लादली जाईल व आपली मूळची संस्कृती आणि भाषा नामशेष होतील अशी भीती त्यांना जाणवते .
आत्ता आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मधून मुस्लिम का भारतामध्ये स्थलांतरित झाले? त्यावेळी अस लक्षात येत की या देशात असलेल्या शिया सुन्नी मधल्या जीवघेण्या संघर्षाला कंटाळून अनेक मुस्लिमांनी भारतात स्थलांतर केले .तसेच म्यानमार व चीन यासारख्या मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले . चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दोन्ही बाजू ऐकल्यावर आपण संभ्रमात पडतो की नक्की याला समर्थन द्यायचे की नाही. ह्याचे उत्तर काय? मला अस वाटत की जेव्हा भारतातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भारताच्या हिताच्या दृष्टीने हवे असेल तर पुन्हा एकदा गांधी नावाच्या देशभक्ताचा प्रेमात पडावे लागेल व त्याचा मानवतेचा मंत्र घेवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लढले पाहिजे . इतर देशातील धार्मिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील . तसेच आपल्या देशातील सामाजिक सलोखा नीट ठेवावा लागेल जेणेकरून कोणत्याही कारणाने अवैध स्थलांतर होणार नाही व ज्यांचे शोषण झाले त्यांना त्यांच्या देशातच न्याय मिळेल.
मानवता परमो धर्म !!
वाचने
47566
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.
In reply to मला वाटते कि ट्रम्प यांना असे by Trump
ऑष्ट्रेलियात...
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
नाश्कातले द्रांक्षे नेतात काय
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
burnol + इनो
In reply to नाश्कातले द्रांक्षे नेतात काय by अमरेंद्र बाहुबली
नाशकातील द्राक्षे नाही ( बायो
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सगळेच मिपाकर सुजाण, सूज्ञ आहेत.
In reply to नाशकातील द्राक्षे नाही ( बायो by चौकस२१२
+१
In reply to सगळेच मिपाकर सुजाण, सूज्ञ आहेत. by चित्रगुप्त
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि काय धर्म द्वेष्ट बोललोय
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पालथ्या ढगावर पाणी!
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
काही लोकांनी चुकीच्या
In reply to पालथ्या ढगावर पाणी! by वामन देशमुख
असहमत
याआधी अमेरिकन ग्रीन कार्डसाठी
फरक आहे...
In reply to याआधी अमेरिकन ग्रीन कार्डसाठी by प्रसाद_१९८२
हम्म
Do you know why Britisher
In reply to हम्म by चिरोटा
it is happening because nobody acknowledge who betrayed whome
In reply to Do you know why Britisher by NiluMP
>>>>>>नेत्यांच्या जीवाला धोका
गप्पच राहावे अशी परिस्थिती....
घाबरू नका
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) =)) =))
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हटवा कि मग
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपणही ज्यांना कधीच आपलं मानलं
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली मतपेटी आणि मतांसाठी आपला
बाकीचे प्रश्ण आहेत....
संपूर्ण जगात हिंदुस्थान हे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4पहिला परिच्छेद. ...
In reply to संपूर्ण जगात हिंदुस्थान हे by मदनबाण
अफगाणीस्तान मधील बौद्ध
In reply to पहिला परिच्छेद. ... by मुक्त विहारि
आर्थिक आघाडीवरील अपयशाकडुन ,
आपली आर्थिक स्थिती खराब असेल
+1
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
आपण मुलीचे लग्न चार वर्षे लांबणीवर टाकाल का?
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
+1
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
+१
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
लिबरल पाकीस्तानी ??
हिंदूंवर अन्याय होणारच हे
In reply to लिबरल पाकीस्तानी ?? by धर्मराजमुटके
कायप्पा वर आलेला एक मेसेज !! वाचताना मन अस्वस्थ होते .
आणि गिरीजा टिक्कू ...!
In reply to कायप्पा वर आलेला एक मेसेज !! वाचताना मन अस्वस्थ होते . by ट्रम्प
इनटॉलरन्स च्या नावाने आपल्या
In reply to आणि गिरीजा टिक्कू ...! by गामा पैलवान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Songजेएनयु अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Songबांग्लादेश , पाकिस्तान , आणि
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू
लिब्रान्दू चे जळणे काही थांबत नाही
CAA मुळे फायदा भारताचा आणि....
सीएए पर तुरंत लगाई जाए रोक, मुस्लिम लीग ने लगाई गुहार; SC में अब
डावी डुकरे कधीही सुधारणार
ऊजवी मनूवादी गाढवे सुधारत
In reply to डावी डुकरे कधीही सुधारणार by अहिरावण
भलते विनोदी ब्वा तुम्ही !!
In reply to ऊजवी मनूवादी गाढवे सुधारत by अमरेंद्र बाहुबली
CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द
जो पर्यंत देशात देशप्रेमी
In reply to CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द by मुक्त विहारि
अगदी अगदी....
In reply to जो पर्यंत देशात देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
येणार येणार
In reply to जो पर्यंत देशात देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
सर ओस्ट्रेलीयाचं नागरीकत्व
In reply to येणार येणार by चौकस२१२
>>>CAA लागू होने के बाद नवी
In reply to CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द by मुक्त विहारि
एका आयडिया ची कल्पना
अगदी अगदी....
In reply to एका आयडिया ची कल्पना by चौकस२१२
चीन मधे तर अताही ऊयगुर
अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी
सुजलां सुफलां भारत ?
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
कमाल आहे गविंची
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
स्क्यूज् मी सर...
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
CAA संबंधी
काही लोकांना हे सहन होणार नाही...
In reply to CAA संबंधी by Nitin Palkar
CAA क्यों है जरूरी
CAA च्या विरोधात आता पाकिस्तान देखील उतरला...
हे भारत सरकार चा जागी स्वतचे
In reply to CAA च्या विरोधात आता पाकिस्तान देखील उतरला... by मुक्त विहारि
अगदी अगदी....
In reply to हे भारत सरकार चा जागी स्वतचे by अमरेंद्र बाहुबली
दानिश कनेरिया ने अब CAA का जिक्र कर भगवान हनुमान और राम पर दिया
बांगलादेशी मुस्लिमांचे एन्काऊंटर
बेनजीर कार्यकाल में थे पाकिस्तान के MP, जुल्म की इंतहा में ली शर