क्रिप्टीक उडवल्याबद्दल आभार ;)
टीप : माझी खव,व्यनि सुविधा बंद असल्याने उत्तर देता आले नाही.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतच नाही. :-)
एकट्या स्त्रीने घरात सगळी कामं करायची आणि इतरांनी उशीरापर्यंत झोपून रहायचं, बसल्या जागी चहा आण, पाणी आण अशा ऑर्डरी सोडायच्या हे मी कधी पाहिलं नाही आणि मला पटतही नाही. एकदा मुलं चालायला-बोलायला लागल्यावर त्यांनाही शक्यतोवर स्वावलंबी बनवलेलं बघण्याची सवय आम्हाला लागली गेली.
एक अवांतर किस्सा: माझ्या भावाची होणारी बायको मला एकदा थँक्स म्हणाली. का म्हणे, तर मी त्याला हातात जेवणाचं ताट वाढून आणून देणं, सकाळी त्याच्या मागे लागून त्याला उठवणं इ.इ. सवयी लावून बिघडवलेलं नाही.
"कविता म्हणून सहज, सोपी आहे म्हणून आवडली. पण अर्थ म्हणून नाही" यातून मला हे म्हणायचं होतं.
तुमची कविता का आवडली ?
हे सांगायचा हा प्रयत्न !
कदाचित कुणा एका स्त्रीला गृहिणी म्हणुन हे सगळे करायला आवडत नसेल. काहिंचा फेमिनाईन ऍप्रोच मुळेही मतांतरे होउ शकतात .
पण मला आजुबाजुला अश्याच घरासाठी कष्ट करणार्या स्त्रिया दिसतात अन मला त्यांचे रास्त कौतुकही आहे. माझ्या नवर्याने माझ्याएवढेच काम केले पाहिजे या ऍप्रोचपेक्षा घर माझे आहे, संसार माझा आहे या भावविश्वात त्या सुखी असतात, असे काहिसे सुंदर मतप्रदर्शन तुमच्या कवितेतुन झाले आहे.
या वादासाठी हा धागा योग्य नाही तरीही रहावत नाही म्हणून!
माझ्या नवर्याने माझ्याएवढेच काम केले पाहिजे या ऍप्रोचपेक्षा घर माझे आहे, संसार माझा आहे या भावविश्वात त्या सुखी असतात
या सुखात तर मी सुद्धा आहे. पण हे सुखसुद्धा इतर सुख-दु:खाबरोबर मी आणि तो वाटून घेतो. "घर माझं आहे, संसार माझाही आहे" हा विचार तो सुद्धा करतो. हे सुख मला इतर गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचं वाटत असावं.
थोडं वेगळं उदाहरण देते: गाडी चालवताना 'वे ऑफ राईट' घ्यायचा नसतो, द्यायचा असतो. तसंच संसार दोघांचा आहे हा विचार लादून समानतेचं सुख मिळत नाही.
पटते. हा तुझा ऍप्रोच झाला. तुझ्या बुद्धिनिष्ठ मानसिकतेला तेच भावणार. याबद्दल यत्किंचितही शंका नाही. वैयक्तिक जाण्याचा विचार नव्हताच.
तरीही तु तुझ्या अनुभवावर कविता केली तर तीही नक्की आवडेल. कारण तु ते तुझ्या भावनांचे केलेले सुंदर प्रदर्शन असेल. व्यक्तिश: जरी मला ती मतं पटली नसतील तरीही. कारण तेव्हा मी तुझी कविता वाचुन तुझे सुख समजुन आनंदित होईल.
आनंदयात्री यांचा प्रतिसाद आवडला. अशा स्त्रियांना आमचा सलाम (वाकडा नव्हे).
जास्त काही लिहित नाही इथे. खुप वाद होतील.
(अवांतरः यावर एक लेख लिहिण्याचा विचारात होतो बर्याच दिवसापासुन. पण...... ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
कविता आवडली.
खरे तर प्रकाशित झाल्या झाल्या वाचली होती, कामामधे प्रतिसाद बाकी राहीला
कविता आवडली, खुप आवडली.
त्यातील भावना थेट पोहोचल्या !
कारण? कारण अगदी सोपे आहे....
काही संदर्भ (जसे हापिसला जाणे वगैरे) वगळता जे वर्णन केले आहे ते वाचुन मला माझ्या आईची आठवण झाली.
बास ! अगदी असेच आयुष्य !!
कामाच्या रगाड्याला सतत जुंपलेली.
म्हातारे सासु सासरे, दिर, नणंदा, यांच्या तालावर नाचत, नव-याची मर्जी संभाळत !
आता हे आयुष्य ती जे काही जगली ( होय ती आता नाही ) ते तसेच जगायला हवे होते का तिने काही बंडखोरी करुन बदल करुन घ्यायला हवा होता या प्रश्नांची माझ्या कडे तरी उत्तरे नाहीत आणि मी शोधणार पण नाही.
अशा कित्येक माता आणि भगिनी माझ्या आजुबाजुला आहेत... त्यांच्या कष्टांना शब्दरुप दिलेत तुम्ही !
पापपुण्य माहित नाही, पण आज एक फार पुण्याचे काम आपण केले आहे.
मला माझ्या मृत आईच्या कष्टांची आठवण करुन देणारी कविता लिहिल्याबद्दल मी आपला आजन्म ॠणी आहे.
--अवलिया
कविता आवडली!
स्वानुभव असाच नसला तरी मलाही माझ्या आईची धावपळ आठवली!
घरात सर्वांनी कितीही मदत किंवा कामं केली तरी ती 'आईची' जी धावपळ, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती असते जनरली आईची, ती दिसली यात..
www.bhagyashree.co.cc
जागु अगदी मस्त कविता आहे.. मला खुप आवडली..
माझे मत अदितीसारखेच आहे, पण घरच्यांचे तसे मत नव्हते आणि मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करुन मग मी 'तसंच संसार दोघांचा आहे हा विचार लादून समानतेचं सुख मिळत नाही' अस म्हणुन सोडुन दिले... :(
.. त्यामुळे मग काही वर्षांपुर्वीपर्यंत माझीही दैनंदिनी वर लिहिल्याप्रमाणेच होती..... त्या जुन्या दिवसांची आठवण झाली.... काय धावपळ आणि काय दमणुक व्हायची त्या दिवसात. जागु तु अगदी सगळ्ळ सगळ्ळ अजुक लिहिलं आहेस...
साधना.
जागुताई,
कविता चांगली आहे. तुम्ही वर्णन केल्या प्रमाणे अनेक गृहिणी अपल्याला आसपास दिसत असतात. अश्या गृहिणींचे कौतूक आहेच. त्यांचे कौतूकाअपण चांगल्या तर्हेने केले आहे.
पण त्यांच्या वाट्याला आलेल्या या कष्टाचे उदात्तीकरण होऊ नये असे मला वाटते. कामाची योग्य वाटणी असावी असाच विचार सर्वांनी मांडावा आणि त्याचीच भलावण करावी असे मला वाटते. त्या अनुषंघाने मांडलेली वरील प्रतिसादांतील काही मते मला पट्ली.
-- लिखाळ.
लिखाळ तुमच्या प्रतिसादाचे स्वागत आहे. तुमचे, आदिती, प्रमोदजी, साधना ह्या सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे. पण काही ठिकाणि परिस्थितीच अशी असते जिथे स्त्रिला सारे सांभाळण्याशिवाय इलाज नसतो. उदा. जर नवरा बाहेरगावी असेल, ड्युटी १२ तासांची असेल, व्ययसायात पुर्ण दिवस बिझी राहायला लागत असेल आणि घरातील वृद्ध सासु-सासरे आजारी, अतिवृद्ध असतील तर संसार सांभाळण्यासाठी स्त्रीलाच पुढाकार घ्यायला लागतो.
माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर माझ्या घरी मोलकरीण आहे धुणी-भांड्यांना, मलाही नवरा मदत करतो काही कामांमध्ये कधी कधी मुलीची अंघोळ, बेड लावणे व इतर छोट्या छोट्या गोष्टींत पण इतर कामं असतातच. माझा नवरा पेशाने वकील आहे. सकाळी ७ पासुन दारात क्लायंट येतात. त्याच्यातुन पण वेळ काढुन तो मला थोडीफार मदत करतो. पण बाकीच्या खुप गोष्टी घर सांभाळण्यासाठी कराव्या लागतात ज्याच तंत्र स्त्रियांनाच माहीत असत. जे मी करते त्याची जाणीव माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तिला आहे. त्यामुळे मला शारीरीक कष्ट होत असले तरी मानसिक समाधान खुप आहे.
=)) नेने ताई चुचु चा अर्थ मी अरेरे धरला. आणि तुमची व्य.रेखा पाहीली तेंव्हा समजल की ती तुमची स्वाक्षरी आहे. म्हणून थोडा गैरसमज झाला.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नेने ताई चुचु चा अर्थ मी अरेरे धरला. आणि तुमची व्य.रेखा पाहीली तेंव्हा समजल की ती तुमची स्वाक्षरी आहे.
ठ्यॉ करून हसले! =)) =))
जागुताई, अर्थ आवडला नाही असं मी जे वर लिहिलं आहे ते माझ्या स्वतःच्या परिस्थितीवर भाष्य होतं; ते माझं व्यक्तीगत, खासगी मत आहे. अर्थातच तुम्ही म्हणता तसं ज्याचं त्याचं मत (आणि आयुष्य) ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतं.
जागु,
कविता आवडली अन नावडली. काय फरक पडतो इतराना.?
हा व्यक्ति-व्यक्तिच्या "कल्चर" मधला फरक आहे.
"रांधा,वाडा,उष्टीकाढा" हे एक कल्चर आणि "I don't care it is your problem" हे दुसरं.
हे दोन विचार प्रवाह.
पहिल्यात "माया-ममता ह्या जगतीवर" आहे ह्याची जाणीव.
तर दुसर्यात Business attitude प्रकर्षाने.
दोघातही अधीक-उणे आहे.
वाद होतो जेव्हा कल्चरं मिश्रीत होण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा.
नाहीपेक्षा जो तो आपआपल्यात सुखी असतो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आज काल तु कवितेत दाखवले आहेस तसे किंवा आदिती म्हणते तसे अश्या दोन्ही बाजु वेगवेगळ्या घरातुन दिसत असतात.
मागच्या दोन्-तिन पिढ्यांपुर्वी तु दाखवलेल चित्र बहुतेक घरातुन होतच
आता थोड्याफार ठिकाणी बदललेल पण आहे.
तुझी कविता मात्र खुपच छान आहे. खुप सुंदर लिहील्या आहेस सगळ्या धावपळी. =D>
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
कवितेतुन प्रकट झालेली एका विवाहीत स्त्री ची मानसिकता दर्शविते.
आजकाल नातेस॑बध त्यागावर कमी व हितावर जास्त अवल॑बुन असतात,आलेल्या प्रतिसा॑दावरुन हिच भावना आणखीच बळकट झाली...
सुहास...
कसे दिवस जातात कोण जाणे......
वा ..
छानच! सगळ्य
+१
वा जागु, छान कविता.
कवितेतलं
मस्त
+१
अश्विनी,
तुझे
अर्थ
आत्ता
तुमची कविता का आवडली ?
या
पटते. हा
सहमत.
आनंदयात्री
कविता
वाह
हेच
सुंदर
अवलियांचा
दार उघडताच शांत मन, दिवे लागताच उत्साही घर
असेच
कवीता
सगळ्यांच्
एक नंबर..
छान!
मस्त!
कविता
धन्यवाद.
मस्त कविता
साधना
जागुताई, कव
लिखाळ
घर सांभाळण्यासाठी
ह्म्म... हो
नेने ताई
ह्म्म
नेने ताई
हाआआ वादs सोडs सोडs
छान !
धन्यवाद.
ह्म्म्म
कविता झकासच..