कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय,
पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय.
कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय.
येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय?
कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच,
किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच..
तरीही,
उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात,
तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात.
स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं?
पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं?
कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन
चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन!
...
सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत;
जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3470
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मन उदास झालं असेल कवयित्रीचे.... तर
हा हा .. खुप हसले :) भारी.
In reply to मन उदास झालं असेल कवयित्रीचे.... तर by आंद्रे वडापाव
छान
धन्यवाद!
In reply to छान by सरिता बांदेकर
मस्त कविता
धन्यवाद!:)
In reply to मस्त कविता by अनंतफंदी
वॉर ऑन लोनलीनेस
जय गुरुदेव!;)
In reply to वॉर ऑन लोनलीनेस by प्रसाद गोडबोले
छान लिहीली आहे...
शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा.
In reply to छान लिहीली आहे... by कर्नलतपस्वी
मार्क्स भौ...
In reply to शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा. by प्रसाद गोडबोले
हायला!!
In reply to मार्क्स भौ... by कर्नलतपस्वी
उमेदीच्या दिवसात, कदाचित ..
In reply to हायला!! by राजेंद्र मेहेंदळे
वाह!
In reply to छान लिहीली आहे... by कर्नलतपस्वी