मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

Trump's picture
Trump in काथ्याकूट
29 Jun 2022 - 11:04 pm
गाभा: 

मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

------

हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.

शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.

कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.

भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.

जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 11:39 pm | श्रीगुरुजी

मला वाटते राष्ट्रवादी व कॉंग्रेस जिंकले.

१) सत्तेची अजिबात शक्यता नसताना ३१ महिने सत्ता व महत्त्वाची खाती मिळाली. त्याचा उपयोग करून भरपूर निधी मिळाला.

२) ज्यांच्याकडून सलग दोन लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव झाला व बहुसंख्य महापालिका निवडणुकीतही पराभव झाला, तेच आता एकमेकांचे कट्टर शत्रू झाल्याचे फायदे आगामी निवडणुकीत दिसतील कारण यांची युती अबाधित आहे. पुढील निवडणूक भाजप वि. सेना वि. कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती अशी होईल ज्यात सर्वाधिक जागा या युतीला मिळतील हे उघड आहे.

३) दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एक म्हणजे सेना जवळपास संपली.

४) ३१ महिन्यातील सर्व अपयशाचे खापर सेनेवर फुटणार. हे नामानिराळे राहणार.

५) जरी भाजपला सत्ता मिळाली तरी सेनेचा फुटीर गट, बच्चू कडूची गुर्मी, कायदेशीर अडथळे यामुळे या सरकारची वाटचाल अवघड आहे.

४) ३१ महिन्यातील सर्व अपयशाचे खापर सेनेवर फुटणार. हे नामानिराळे राहणार.

लोक विसरतात लगेच. तसेही सेना भावनेचे राजकारण करते.

५) जरी भाजपला सत्ता मिळाली तरी सेनेचा फुटीर गट, बच्चू कडूची गुर्मी, कायदेशीर अडथळे यामुळे या सरकारची वाटचाल अवघड आहे.

+१

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:49 pm | शाम भागवत

मला वाटते भाजपाचा दीर्घकालीन फायदा झालाय. मतदान टक्केवारी खूप सुधारणार आहे. त्याचे पहिले प्रत्यंतर महानगरपालीकांत येण्याची शक्यता आहे.
मुख्य म्हणजे राकॉं + कॉ. यांच्या एकत्रीत मतदान टक्केवारीच्या पुढे भाजप जाते का ते पहायचंय. तसे झाले तरच लोकसभेसारखे यश विधानसभेत मिळेल.
शरद पवारांनी भाजपाला रान मोकळे करून दिलंय. या अगोदर समाजवादी, प्रजा समाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप यांना संपवलं. यांना संपवण भाजप किंवा जनसंघाला कधीच शक्य झालं नसतं.

शरद पवारांनी भाजपाचं खूप मोठ्ठं काम करून ठेवलंय.
असो.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 12:12 am | श्रीगुरुजी

स्वबळावर भाजपची सर्वाधिक टक्केवारी २८.५% होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे एकत्रित किमान ३०% मते आहेत. बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे. ते आपोआपच राष्ट्रवादीलाच मत देणार. त्यासाठी भाजपला इतर मागासवर्गीय मतदारांना चुचकारावे लागेल. ब्राह्मणांची ३-४% मते सुद्धा महत्त्वाची ठरतील. दुर्दैवाने शेखचिल्लीप्रमाणे फडणवीसांनी भाजप समर्थक असलेल्या इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मतदारांनाच दुखावून ठेवले व मराठा मतांच्या मागे गेले. परीणामी २०१९ मध्ये सत्ता गेली. युती असल्याने फार मोठा पराभव झाला नाही. स्वबळावर लढले असते तर खूप कमी जागा जिंकल्या असत्या. अजूनही त्यांनी आपली कार्यपद्धती सुधारलेली नाही. याचा अजून जोरदार फटका आगामी निवडणुकीत बसेल.

असो. त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा!

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:43 am | अमरेंद्र बाहुबली

शब्दा शब्दाशी सहमत.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2022 - 11:29 am | रात्रीचे चांदणे

बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे
गेल्या दोन निवडणुकीत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असूनही बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री कसा काय नको? २०१९ ला सेना भाजप युती आली तर फडनविसच मुख्यमंत्री होणार हे माहिती असूनही दोघांचे मिळून 162 आमदार आले. ह्यात बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री नको असता तर दोघांचे 162 आमदार निवडून तरी आले असते का.?

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 2:15 pm | श्रीगुरुजी

२०१४ मध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे फडणवीस, खडसे, मुंडे असा कोणताही चेहरा मत देताना मतदारांसमोर नव्हता.

२०१७ ते २०१८ या काळात फडणवीसांनी मराठा जातीवर सवलतींच वर्षाव केला. सारथी ही संस्था स्थापन करून त्याद्वारे मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परदेशी शिकायला जाणाऱ्या मराठ्यांना मोठी आर्थिक मदत व शिष्यवृत्ती, वसतिगृहे अशा अनेक गोष्टी दिल्या. मागील वर्षी मी एका मराठी वृत्तपत्रात वाचले होते की सारथीने पहिल्या २ वर्षात १३५० कोटी रुपये शिष्यवृत्ती, आर्थिक मदत इ. साठी दिले. यावर कळस चढविला तो नोव्हेंबर २०१८ मध्ये मराठ्यांना तब्बल १६% राखीव जागा दिल्या.

२०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर २८.५% व सेनेला १८.२५% मते होती (एकूण ४६.७५%). २०१९मध्ये युती असूनही व मराठ्यांना अनेक सवलती देऊनही भाजपला २५.७५% व सेनेला १६.२५% (एकूण ४२%) मते मिळाली. म्हणजे एकूण ४.७५% मते घटली व त्यातून दोघांच्या एकत्रित २५ जागा कमी झाल्या.

आता फडणवीस नको म्हणून वगेच सर्व मराठा भाजपविरोधात मत देतात असे नाही. जेथे जेथे भाजपचा मराठा उमेदवार असतो तेथे तेथे तेथील मराठा त्याला मत देतातच. पण जेथे भाजपकडून मराठा उमेदवार नसतो तेथे असे झालेले दिसत नाही.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2022 - 3:37 pm | रात्रीचे चांदणे

2014 साली भाजपाने 280 च्या आसपास जागा लढवल्या असतील तर 2019 साली 150, त्यामुळे मतांच्या टक्केवारीत फरक हा असनारच. लोक जाती बघून मतदान करत नाहीत असं काहीही नाही हे सगळ्या जातीत थोड्याफार आहे याला मराठाही अपवाद नाहीत.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 4:22 pm | श्रीगुरुजी

२०१४ मध्ये भाजपने २५२ तर २०१९ मध्ये १६४ जागा लढविल्या होत्या. परंतु २०१९ मध्ये युती असल्याने १६४ मतदारसंघात भाजप + सेना अशी मते होती.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2022 - 11:29 am | रात्रीचे चांदणे

बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे
गेल्या दोन निवडणुकीत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असूनही बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री कसा काय नको? २०१९ ला सेना भाजप युती आली तर फडनविसच मुख्यमंत्री होणार हे माहिती असूनही दोघांचे मिळून 162 आमदार आले. ह्यात बहुसंख्य मराठा मतदारांना ब्राम्हण मुख्यमंत्री नको असता तर दोघांचे 162 आमदार निवडून तरी आले असते का.?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Jun 2022 - 12:08 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"हा एक अद्भुत प्रयोग होता. "
कमरेचे सोडुन डोक्याला गुंडाळण्याचा हा अद्भुत प्रयोग होता.काँग्रेसवाले शिवसेनेला ४० वर्षे'जातियवादी' कम्युनल म्हणून हेटाळणी करायचे. तर शिवसेना नेते काँग्रेस्वाल्याना सुडो-सेक्युलर्/अल्पसंख्यांकांचे लांगुलचलन करणारा पक्ष म्हणायचे.
"राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबडे आहे. पवारांचे योगदान काय?" उद्धव ठाकरे(https://www.youtube.com/watch?v=GjPqJMU2Z88) २०१५
"पवारांचे योगदान वादातीत" संजय राउत्/उद्धव ठाकरे.२०२१
ह्या तिन्ही पक्षांचे निष्ठावान कार्यकर्ते गेल्या अडीच वर्षात आपापल्या पक्षापासुन दुरावले नसतील तर नवल. त्याचीच परिणती शेवटी एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडात दिसली.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2022 - 12:16 am | रात्रीचे चांदणे

ह्या तिन्ही पक्षांचे निष्ठावान कार्यकर्ते गेल्या अडीच वर्षात आपापल्या पक्षापासुन दुरावले नसतील तर नवल. त्याचीच परिणती शेवटी एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडात दिसली.
सहमत, पण काही लोक दोष फडणवीसांनाच देतायत. मुळात मविआ टिकवण्याची जबाबदारी काही फडणवीसांची नव्हती.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 12:18 am | श्रीगुरुजी

कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी कार्यकर्ते आपल्या पक्षापासून दुरावलेत असे दिसते नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 12:23 am | अमरेंद्र बाहुबली

सेनेचे ही नैही. २०१९ वेळी भाजपला पाठींबा देऊ नका म्हणून शिवसैनिकांनी ट्विटर मोहीम चालवली होती जिला प्रचंड प्रमाणात यश आले होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:45 am | अमरेंद्र बाहुबली

सहमत. सर्वात जास्त कार्यकर्ते भाजपचे दुरावलेत. १२२ चे १०५ झाले. भाजपची अधोगती अशीच चालू राहनार.

ह्या तिन्ही पक्षांचे निष्ठावान कार्यकर्ते गेल्या अडीच वर्षात आपापल्या पक्षापासुन दुरावले नसतील तर नवल. त्याचीच परिणती शेवटी एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडात दिसली.

शिवसेना आणि काँग्रेसचे नक्कीच दुरावले आहेत.

राकॉचे जोपर्यंत फायदा आहे तो पर्यंत दुरावत नाहीत, मला तर राकॉ म्हणजे फायद्यासाठी एकत्र आलेली टोळी / कंपनी वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:35 am | अमरेंद्र बाहुबली

शाहु फूले आंबेडकरांची विचारधारा भाजप जोपासतेय का?

सुक्या's picture

30 Jun 2022 - 11:12 am | सुक्या

शाहु फूले आंबेडकरांची विचारधारा
म्हणजे नक्की काय हो? जरा उलगडुन सांगता का?

नाही मिळणार याचे उत्तर कधी. कारण जातीयवाद, द्वेष याशिवाय काहीच विचारधारा नाहीये

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:52 pm | अमरेंद्र बाहुबली

असं फक्त भाजपवाल्यांना वाटतं.

टीपीके's picture

30 Jun 2022 - 8:02 pm | टीपीके

पण सांगा ना नक्की काय आहे विचारधारा

त्यांना त्यातले काहीही माहीती नाही हे मला चांगले माहीत आहे. लोक उगाच आपल्याला जास्त कळतं हे दाखवण्यासाठी असले शब्द फेकत असतात.
:-)

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 9:52 pm | अमरेंद्र बाहुबली

संघ समजून घेण्यासाठी संघात या तसे ही विचारधारा समजून घ्यायला राष्ट्रवादीत या . :)

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 10:20 pm | सुबोध खरे

हा हा हा हा

राष्ट्रवादी मध्ये या!

त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" सोडून कुठली विचारसरणी आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:28 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" सोडून कुठली विचारसरणी आहे अशी विचारसरणी असती तर पहाटेच्या शपथविधीला मोशांना हिरवा कंदील दिला असता का?

नाही पण विचारधारा समजावा ना.

की आपण दोघं भाऊ भाऊ महाराष्ट्र आणि देश लुटून खाऊ?

डोंबलाचे पुरोगामी. फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतात. त्यांच्याकडे खाणे हीच एक विचारधारा आहे. नुसते फुले आंबेडकर आणि शाहूंचे नाव. म्हणजे काय विचारले की गप्प. महाराष्ट्राला लागलेली कीड. अणि म्हणे महाराष्ट्र वाचवला यांनी. जोक ऑफ द सेंच्युरी.

बाळासाहेबांची पूर्ण शिवसेना संपवली यांनी. राऊत पण यांच्याच पे रोल वर.

थोडा जरी जमीर जिंदा असेल तर कृपया चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका. अणि दुसरे चुकले म्हणून तुमच्या चुका बरोबर नाही होत त्या मुळे त्या पद्धतीचे प्रतिसाद सोडा. असो तुमचे वय बघून आत्ता तरी तुम्हाला हा सल्ला कळेल/पटेल असे वाटत नाही, पण तरीही एक प्रयत्न.

उगाच याला प्रतिसाद देऊन मिपाचे संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नका. या पुढे माझ्या कडून उप प्रतिसाद नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 11:32 pm | अमरेंद्र बाहुबली

फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतात
म्हणजे अजित पवारांबरोबर शपथ घेनारे फडणवीस स्वार्थी का?
महाराष्ट्राला लागलेली कीड कीड आहे तर मग मोदी पवारांना गुरू का मानतात?

तुम्हाला खरंच कळतं नाही की कळूनही न कळल्यासरखे करताय?

विचारधारा सांगा, उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा नको

टीपीके's picture

30 Jun 2022 - 11:48 pm | टीपीके

अणि बिजेपी हलकट, नालायक म्हणून राष्ट्रवादी अणि काका चांगले होत नाहीत. उलट गुरू म्हणजे अनेक पटींनी जास्त ... (पुढचे समजून घ्या नाहीतर माझी चितळे नाहीतर कन्हैया होईल)

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 12:22 am | अमरेंद्र बाहुबली

ह्या सर्वात एकनाथ शिंदे ह्यांना काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे. त्यांना सेनेत आज ना ऊद्या मुख्यमंत्रीपद मिळालंच असतं ईतकी ताकद त्यांच्यात होती. २०१९ ला ठाकरेंना राज्यपालांना पत्र देखील पाठवलं होतं पण पवारांच्या आग्रहामुळे ठाकरेंना मामूपद स्विकारलं. आता फडणवीसना पाठींबा देऊन फडणवीस त्यांना मुख्यमंत्रीपद कधीच देनार नाहीत. पैसा मिळाला असेल तर तो त्याना सेनेत राहूनही प्रचंड प्रमाणात मिळालाच असता. मूलाची केंद्रात सोय लावावी म्हणून हे केलं असेल तर ते ही किती टिकेल?? ऊद्या सेना-भाजप झालं गेलं विसरून पुन्हा एकत्र आले तर शिंदेंच्या मुलाला सेना मंत्रीपदावर राहू देनारच नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे. किरीट सोमय्यांनी सेनेला अंगावर घेऊन अशीच खासदारकी गमावून घेतली. बाकीचे लोक चुपचाप केंद्रात मंत्रीपदं घेऊन मजा करताहेत. तेच सेनेत राहूनही श्रिकांत शिंदेना मंत्रीपद मिळाले असते.
बाकी हिंदूत्वासाठी म्हणून बाहेर पडलो असं शिंदे कितीही सांगत असले तरी २०१९ चा भाषणांत फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही हे तो स्वच:च सांगत होते. ऊद्या राजकारनात शिंदे टिकतीलही पण त्यांच्या बरोबर फुटलेले आमदार संपतील.
शिवसेना ऊद्या पुन्हा जोमाने ऊभा राहील पण एकनाथ शिंदेंना स्वत:चं जे राजकीय नूकसान करून घेतलंय ते न भरून येनारं आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:00 pm | अमरेंद्र बाहुबली

हा प्रश्न मा कालच विचारला होता. ह्याचं ऊत्तर आत्ता मिळालं. स्वतचा मुख्यमंत्री पाडून दुसर्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवावा ईतके कच्चे खेळाडू शिंदे नक्कीच नाहीत. भाजपचे सगळे चाणक्य डोकं आपटत असताल ईतका भारी गेम खेळून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. शिंदेशाही ला नमन.
महादजी शिंदेंनंतर महाराष्ट्रात दुसरा कुणी शिंदे असेल तर हाच.

अर्धवटराव's picture

30 Jun 2022 - 12:36 am | अर्धवटराव

आदित्य ठाकरेचा सर्वात जास्त फायदा झाला आहे. संघटना विदाऊट शिलेदार अशी आयतीच शिवसेना त्यांच्या पदरी पडली आहे. सोनीया गांधी काँग्रेसला राहुल गांधींच्या पाठीशी फार काहि जोमाने उभी करु शकल्या नाहि. उद्धव ठाकरेंना बराच स्कोप आहे आदित्यला सेटल करुन द्यायला.

भाजपचा फायदा झालाय कारण शिवसेनेचा लचका तोडला गेला आहे. तुर्तास तरी नव्याने बांधणी होणार्‍या सेनेशी लढणं सोपं आहे.

राष्ट्रवादी फायद्यात आहे. २०२४ च्या निवडणुका चारही पक्ष वेगवेगळे लढतील. भाजपला हे गणीत जुळ्वुन आणावच लागेल. त्याकरता आता कदाचीत पवार फॅमिली आणि काँग्रेस नेत्यांच्या भोवती अदृष्य फास आवळले जातील. भाजपला बहुमत नाहि मिळालं तर अजीत दादा राष्ट्रवादीचा फुटीर गट घेऊन बाहेर पडण्याचा प्रयोग परत एकदा करतील आणि यंदा तो सक्सेसफुल फोईल.

वैयक्तीक तोटा झालाच असेल तर तो शरद पवारांचा झाला आहे. मविआ सरकार नीट ५ वर्षं चालवणं (आणि कंपल्सरी झालच तर त्या नंतर निवृत्त होणं) हे पवारांच्या दृष्टीने आवष्यक होतं. पण पवारांचा राजकीय इनींगचा क्लायमेक्स फडणवीसांच्या डावपेचाने चितपट होणारा दिसतोय.. अर्थात, पवार इतक्यात हत्यार खाली ठेवणार नाहित.

फदणवीसांचा वैयक्तीक फायदा झाला आहे. अतिप्रचंड म्हणावा असा मुत्सद्दी विजय मिळाला त्यांना. राज्यात देवेंद्रला स्पर्धा नाहि, आणि केंद्रात त्याचे पाठीराखे त्याच्यावर खुष असावेत अशी परिस्थिती.

जनतेचा फायदा... तसाही तो गौण विषय आहे राजकारण्यांच्या दृष्टीने :(

आदित्य ठाकरेचा सर्वात जास्त फायदा झाला आहे. संघटना विदाऊट शिलेदार अशी आयतीच शिवसेना त्यांच्या पदरी पडली आहे. सोनीया गांधी काँग्रेसला राहुल गांधींच्या पाठीशी फार काहि जोमाने उभी करु शकल्या नाहि. उद्धव ठाकरेंना बराच स्कोप आहे आदित्यला सेटल करुन द्यायला.

+१

वैयक्तीक तोटा झालाच असेल तर तो शरद पवारांचा झाला आहे.

बहुतेक शेवटाच खेळ झाला हा त्यांचा

अर्धा अजून बाकी आहे.

अर्धा अजून बाकी आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

30 Jun 2022 - 2:06 am | हणमंतअण्णा शंकर...

शिवसैनिक आदित्य ठाकर्‍यांना कितपत साथ देतील कोणास ठाऊक.

उद्धव असेपर्यंत सेना टिकून राहील.

आताचे बरेच बंडखोर आमदार एकतर भाजपमधून निवडणूक लढवतील किंवा शिंदेसेनेकडून. जसे मनसेचे झाले तसे, शिवसेना, शिंदेसेना क्रमाक्रमाने संपत जातील.

भाजप संपूर्ण बहुमतात येणार. भाजपकडे मात्र दुसर्‍या फळीचे नेते नाहीत. विखेपाटलांसारखे लोक मनाने कधीच कोणत्याच पक्षात नसतात. भाजप एकतर यांना संपवून टाकेल किंवा चंद्रकांत पाटलांसारखे अजिबात जनाधार नसलेले पपेट नेमून सत्ता दोन तीन लोकांकडेच राहील याची पुरेपूर काळजी घेणार. देवेंद्र यांच्याकडे अजून साडेसात वर्षे आहेत.

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र नंतर, केंद्रात देवेंद्र/शहा/योगी अशा चर्चा होतील. देवेंद्रने अजून मुत्सद्दीपणा दाखवला तर पहिला मराठी पंतप्रधान देवेंद्र होण्याची शक्यता आहे.

देवेंद्रचे खरे शत्रू आता शहा आहेत.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 7:40 am | श्रीगुरुजी

देवेंद्र यांच्याकडे अजून साडेसात वर्षे आहेत.

फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:47 am | अमरेंद्र बाहुबली

फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू. काही झालं तरी पाच वर्षांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार येनार आहे. सेना भाजप युती होनार नाही. झाली तरी सेनेचे लोक भाजपला आज्बात मतदान करनार नाहीत.

सेना भवन व मातोश्रीच्या बाहेर काल पासुन शुकशुकाट आहे. जिल्हा प्रमुख, गट प्रमुख गटा गटात येऊन राजिनामे देत आहेत. सर्वच लोक एकनाथ शिंदेंच्या मागे पाय घट्ट रोऊन ऊभे ठाकलेले आहेत. अश्याने शिवसेनेतच नविन प्रमुख उदयास येत आहे.

यश राज's picture

30 Jun 2022 - 2:07 am | यश राज

सगळ्यात जास्त तोटा शिवसेनेचा झालाय .. नको त्यांच्या नादी लागून भरवशाची माणसे हातची गेली.
तेल ही गेले तूप ही गेले आणि हाती राहिलं धुपाटणे अशी परिस्थिती झालीय. अगदी पूर्ण सेनेचा लचका तोडला गेलाय.
माणसं ओळखण्यात कमी पडले असेच म्हणावे लागेल. सगळं गमावलच गमावलं. सत्तालालसे साठी पक्ष गमावण्याची नौबत आलीय.

दुसरा तोटा काकांचा झालाय - नाही पार्टी शाबूत आहे त्यांची पण त्यांनी स्वतःची(स्वतः) बनवलेली राजनीतिक चाणक्य ही पदवी किती फोल आहे ते जनतेला कळून चुकलं. त्यांच्या ही वरचढ कोणीतरी आहे हे ही जनतेला कळलं.
अजून एक तोटा म्हणजे मुलीचं करियर मार्गी लावण्यासाठी २०१९ मध्ये मोदी शहांशी बोलणी चालवलेली , तिथे डाळ शिजली नाही म्हणून महाराष्ट्रात मविआ चा प्रयोग व तिथे मुख्यमंत्रीपदाची चाचपणी. तो ही घास आता तोंडातून हिसकवला गेला आहे.
थोडक्यात बाबाही गेला आणि दशम्याही.

काँग्रेसचा फार काही तोटा झाला नाही. मुळात ते सत्तेत असून नसल्यासारखे. त्यामुळे त्यांना जास्त फरक पडणार नाही.

फायदा झालाय तो भाजपचा.. जनाधार त्यांच्या व सेनेच्या युतीचा बाजूला होताच पण त्या जनाधराच्या विरूद्ध सरकार बनवून सेनेने जी घोडचूक केली त्यामुळे जनतेच्या मनात तसेच पर्यायाने सेनेच्या आमदारांमध्ये जी खदखद होती. त्याचा पुरेपूर उपयोग भाजपने करून घेतला व महाराष्ट्राच्या जनतेवर जबरदस्तीने लादलेले सरकार उतरवले. याचा उपयोग २०२४ च्या निवडणुकीत होईलच.

अजून एक फायदा झालाय तो एकनाथ शिंदे यांचा. त्यांच्या बंडानंतर गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये लक्ष दिले तर कळून येईल की त्यांच्या मागे सेनेतले तळा गाळातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे राहायला सुरुवात झालिये. आज जी लोकं सेनेमध्ये आहेत ते उद्या शिंदेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली

सेनेचा काहीही तोटा झालेला नाही. ऊलट पक्षातील घाण गेली. आता दुसर्या फळीतील ताज्या दमाचे शिवसैनिक वर येतील.

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 11:22 am | सुबोध खरे

पक्षातील घाण गेली.

म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने भरलेला होता? आणि ते तुम्हाला समजलेच नाही?

इतकी वर्षे याच माणसांबरोबर काढल्यावर त्यांना घाण म्हणताय?

ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून कित्येक वर्षे काम केले त्यांना डुक्कर, प्रेते म्हणणे हे सभ्य संस्कृतीत बसत नाही.

तुम्ही सुद्धा संजय राऊत यांचाच वारसा चालवताय, ज्यांना याच माणसांनी निवडून राज्यसभेवर पाठवले आहे.

कृतघ्नतेचा कळस आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 12:39 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने भरलेला होता? आणि ते तुम्हाला समजलेच नाही? हो. फितूर हा फिकूरी करे पर्यंत आपलाच असतो.
इतकी वर्षे याच माणसांबरोबर काढल्यावर त्यांना घाण म्हणताय? सेनेच्या जिवावर वाढून सेनेचाच मुख्यमंत्री खाली खेचनार्यांना हाच शब्द योग्य. ऊद्या भाजपच्या जिवावर वाढलेल्याने भाजपला खाली खेचले तरीही मी हेच म्हणेन.
ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून कित्येक वर्षे काम केले त्यांना डुक्कर, प्रेते म्हणणे हे सभ्य संस्कृतीत बसत नाही. मला तरी आदित्य ठाकरेंच्या त्या वाक्यात काहीही तुकीचे वाटले नाही.
तुम्ही सुद्धा संजय राऊत यांचाच वारसा चालवताय, ज्यांना याच माणसांनी निवडून राज्यसभेवर पाठवले आहे.

त्यांना सेनेने निवडूण आणले होते. राऊत हे सेनेचे ऊमेदवार होते. त्यांना मतदान करून आमदारांनी ऊपकार केलेले नाहीत.

कृतघ्नतेचा कळस आहे. सहमत. सेनेच्या नावावर मते मागून, सेनेच्या जिवावर मोठं होऊन सेनेच्याय मुख्यमंत्र्या बरोबर गद्दारी करणे हा कृतघ्णपनाचा कळसच आहे.

कानडाऊ योगेशु's picture

30 Jun 2022 - 12:11 pm | कानडाऊ योगेशु

आता दुसर्या फळीतील ताज्या दमाचे शिवसैनिक वर येतील.

मागे ही मी हेच म्हणालो होतो.भाजपबद्दल ममत्व नाही व शिवसेनेबद्दल शत्रुत्व नाही.पण जुन्याची जागा नव्याने घेतली पाहिजे व बदल होत राहिले पाहिजेत. सेनेसाठी ही पुन्हा पक्षबांधणीसाठी चांगली संधी ठरु शकते. (ब्लेसिंग्ज इन डिज्गाईज.) अर्थात मनसे नेतृत्वाप्रमाणे शिवसेनेचे नेतृत्व ही तंगड्या पसरुन बसायला नको.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत.
२०१९ साली राष्ट्रवादीत असेच अनेक नेते जागा अडवून बसले होते. भाजपेयींच्या मुर्खपणामूळे म्हणा किंवा राष्ट्रवादीच्या सुदैवाने ही लोकं भाजपात गेली. राष्ट्रवादीतील दुसर्या फळीतील नेत्यांना ही संधी मिळाली नी त्यांनी जोर लावून निवडणूका लढवल्या. त्यामुळे संपलेल्या राष्ट्रवादीच्या तब्बल ५५ जागा निवडून आल्या. सेनेबरोबर ही असेच होनार. ठाकरे फिरनारे नेते आहेत. आता जबाबदारीतून मोकळेरी झालेत विधान परिषदेचाही राजिनामा दिलाय. महाराष्ट्र पुन्हा पिंजून काढून ते सेनेला नवी ऊभारी देतील. सेनेसाठी ही ईष्टापत्ती ठरनार.

चौकस२१२'s picture

30 Jun 2022 - 7:50 am | चौकस२१२

- फायदा झाला तो काकांचा असे दुर्दैवाने म्हणावे लागते
- भाजपला तात्पुरता फायदा दिसत असला तरी "तुटलेली शिवसेना " हा काही फार फायद्याचा भाग होणार नाही
- सेनेची इज्जत गेली खरी पण ती मूळ टिकावी असे अनेकांना वाटते , शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांचं व्यक्तव्यातुन ते दिसते

सर्वात मोठा तोटा झाला तो भारतीय लोकशाही हि परिपक्व आहे या समजुतीचा ,, आणि जनेतेचा ( पण जनतेने तो स्वतःवर ओढवून घेतला ,, घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजून !
- हे काय विचीत्र नाटक देश/ जगासमोर आले... , सभापतींच नाही एवढे दिवस, कोर्टात काय जावे लागते , पक्षाचं अंतर्गत असे बेबनाव सोडवू शकले जात नाहीत / हि अशी मुंबई-सुरत- गुहाती आणि गोआ जत्रा काय .. सगळंच गोंधळ.. माफ करा पण दुर्दैवाने असे म्हणावे लागते कि भारतीय समाजाने खरी लोकशाही अजून स्वीकरली नाहीये ... याचे हे जिवंत उधारण

कंजूस's picture

30 Jun 2022 - 8:55 am | कंजूस

म्हणजे आता स्थानिक पक्षांतही उपस्थानिक पक्ष निर्माण होणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 11:12 am | अमरेंद्र बाहुबली

शिंदे गट कुठेतरी विलीन होनार.

खरी लोकशाही ही कल्पना केवळ कल्पनेतच आहे.

वास्तवात कोणत्याही देशात खरी लोकशाही अस्तित्वात नाही.

बाकी चालू द्या..

कुमार१'s picture

30 Jun 2022 - 9:57 am | कुमार१

अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची एक मूलभूत व्याख्या केलेली आहे:

https://www.toppr.com/ask/question/give-abraham-lincolns-definition-of-d...

परंतु,
जगभरातील वास्तव त्याच्या पूर्ण विरुद्ध झालेले दिसते ते असे:
Democracy is a government -
off the people,
far the people &
buy the people !!

स्वधर्म's picture

30 Jun 2022 - 2:17 pm | स्वधर्म

>> सर्वात मोठा तोटा झाला तो भारतीय लोकशाही हि परिपक्व आहे या समजुतीचा ,, आणि जनेतेचा ( पण जनतेने तो स्वतःवर ओढवून घेतला ,, घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजून !

सहमत! एकदा मत दिल्यावर मतदारांच्या हातात काहीही नसते, याची दु:खद जाणिव.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली

घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजून सहमत. २०१४ ला भाजपने घराणेशाहीतून आलेल्या देवेंद्र फडणवीसांना मामू केले तरी २०१९ ला भाजपला १०५ जागा मिळाल्या.

चलत मुसाफिर's picture

30 Jun 2022 - 8:57 am | चलत मुसाफिर

शिवसेना यातून योग्य तो धडा घेईल आणि भाजपपेक्षा अधिक प्रखर हिंदुत्ववादी होईल अशी आशा. भाजपला वेळोवेळी आरसा दाखवून भानावर आणील असा एकतरी पक्ष भारतात आवश्यक आहे.

शिवसेना यातून योग्य तो धडा घेईल आणि भाजपपेक्षा अधिक प्रखर हिंदुत्ववादी होईल अशी आशा. भाजपला वेळोवेळी आरसा दाखवून भानावर आणील असा एकतरी पक्ष भारतात आवश्यक आहे.

नक्कीच. त्यामुळे लोकांना शिवसेना आवडायची. आता ढोंगी लोकांच्या नादी लागुन अगदी वाट लावुन घेतली.

क्लिंटन's picture

30 Jun 2022 - 10:26 am | क्लिंटन

२०२४ मध्ये किंवा जेव्हा केव्हा परत विधानसभा निवडणुक होईल तेव्हा समजा काँग्रेस-राष्ट्रवादी युती विरूध्द भाजप विरूध्द शिवसेना अशी तिरंगी लढत झाली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीला मोकळे रान असेल असे मला तरी वाटत नाही. त्याची कारणे:

१. १९९९ पासून आजपर्यंत विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांची टक्केवारी बघू-
१९९९: काँग्रेस- २७.२% आणि राष्ट्रवादी- २२.६%. दोन पक्ष स्वतंत्र लढले आणि त्यांच्या मतांची बेरीज ४९.८% होती.
२००४: काँग्रेस + राष्ट्रवादी- ३९.८%
२००९: काँग्रेस + राष्ट्रवादी- ३७.४%
२०१४: काँग्रेस- १८.१% आणि राष्ट्रवादी- १७.४%. दोन पक्ष स्वतंत्र लढले आणि त्यांच्या मतांची बेरीज ३५.५% होती.
२०१९: काँग्रेस + राष्ट्रवादी- ३३%

गेल्या २० वर्षांत काँग्रेस आणि राष्टवादी एकत्र लढले तरी किंवा एकमेकांविरोधात लढले तरी त्यांची मते कमी होत आहेत.

२. काँग्रेसची २०१९ पासून राष्ट्रीय पातळीवर अजून जास्त पडझड झाली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला इतके मुख्यमंत्री बदलावे लागले याचाच अर्थ आपल्याविरोधात प्रस्थापितविरोधी मते जातील ही भिती भाजपला होती. मला तर वाटले होते की उत्तराखंडमध्ये भाजपने काँग्रेसला बाय दिला आहे. पण तरीही तिथेही काँग्रेसला जी निवडणुक अगदी सहजपणे जिंकायला हवी होती ती गमावली. गोव्यात तर भाजपने अगदी अवर्णनीय गोंधळ घातला होता. २०१७ मध्ये निवडून गेलेल्या विधानसभेतील ४० पैकी तब्बल २६ आमदारांनी पक्षांतर केले होते. असा वाईट विक्रम गोव्यात भाजपने करून दाखवला होता. तरीही काँग्रेसने तिथे २०१७ पेक्षा अधिक वाईट कामगिरी केली. महाराष्ट्र पातळीवरही २०१९ पासून काँग्रेसने काय मोठा पराक्रम केला आहे की त्यामुळे जो कल इतर राज्यांमध्ये बघायला मिळाला त्यापेक्षा वेगळा कल महाराष्ट्रात बघायला मिळेल?

३. शिवसेना-भाजप एकत्र लढून जितकी मते त्यांना मिळाली होती जवळपास तितकीच मते एकट्या भाजपने मिळवली हे देगलूर आणि कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत मिळवली हे दिसून आलेच आहे. याचाच अर्थ पूर्वी जी मते युतीची होती त्यातील शिवसेनेची मते मोठ्या प्रमाणावर भाजपकडे जात आहेत. याचा कारण ठाकरेंनी सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर केलेली सोयरीक शिवसेनेच्या सामान्य मतदारांपैकी बहुतेकांना मान्य नव्हती.

४. समजा एकनाथ शिंदे गटाला पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी द्यावी लागली तरी त्यामुळे भाजपपुढे फार डोकेदुखी निर्माण व्हायला नको. समजा २०१९ च्या निवडणुकांनंतर जे काही झाले ते झालेच नसते आणि शिवसेनेबरोबर युती कायम राहिली असती तर त्या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे आमदार शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले असते आणि तसाही तिथे भाजपचा उमेदवार नसता. युतीत असताना अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने एकदाही निवडणुक लढवलीच नव्हती. त्यामुळे तिथे पक्षाची स्थानिक पातळीवर संघटना प्रबळ नाही. कोथरूडमध्ये उमेदवारी द्यावी अशा मेधा कुलकर्णी होत्या तसे उमेदवार सगळीकडे भाजपकडे नाहीत. त्यामुळे त्या कारणाने भाजपपुढे फार डोकेदुखी निर्माण होईल असे वाटत नाही.

या कारणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला पूर्ण मोकळे रान मिळेल असे मला तरी वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 2:38 pm | श्रीगुरुजी

१) या आकडेवारीतून हे दिसतंय की जरी प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी कमी होताना दिसत असली तरी ती कमी होण्याचा वेग तसा कमी आहे. समजा हाच वेग कायम राहिला तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना किमान ३१% मते मिळतीलच.

दुसरीकडे २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर २८.५% मते होती व ही भाजपची सर्वोत्तम कामगिरी होती. २०१९ मध्ये युती असूनही व मराठ्यांना अनेक सवलती देऊनही भाजपला २५.७५% मते होती. म्हणजे आताच दोघांमध्ये ७.२५% मतांचा फरक आहे. जर भाजपने ३.७५% मते वाढवून २९.५% मते मिळविली व कॉंग्रेस-राष्ट्रवादीने तितकीच मते गमावून २९.२५% मते मिळविली तरच भाजपला त्यांच्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळू शकतील. परंतु १४४+ जागा जिंकण्यासाठी किमान ३८% मते मिळवावी लागतील (२०१९ मध्ये भाजप-सेनेला जवळपास ४७% मते व १८६ जागा होत्या तर २०१९ मध्ये ४२% मते व १६१ जागा होत्या). त्यासाठी भाजपला २०१९ च्या तुलनेत किमान १२.२५% अधिक मते तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला किमान ५% अधिक मते मिळवावी लागतील. हे उघड आहे की ऑड्स भाजपच्या बाजूने नाहीत.

यातील अजून एक घटक म्हणजे सेना. पुढील निवडणुकीत सेना दुर्बल झाल्याने सेनेची काही मते मनसे तर काही मते कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडे जातील. भाजपकडे ही मते येण्याची शक्यता फार कमी आहे.

समजा शिंदे गटाशी युती केली तर अर्थातच भाजपला कमी जागांवर लढावे लागेल, तसेच सेना मतदार शिंदे गटाला किती मते देतील हे आता सांगता येणार नाही.

त्यामुळे पुढील निवडणुकीत माझ्या मते आता तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे.

२) कॉंग्रेसची अवस्था फार चांगली नसली तरी त्यांच्याकडे अजूनही जवळपास सेनेइतकीच १६-१७% मते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असल्यास कॉंग्रेसला फायदाच होईल.

३) या पोटनिवडणुकीत सेनेचा उमेदवार नव्हता. तो असता तर भाजप उमेदवाराला इतकी मते मिळाली नसती.

४) शिंदे गट आता असलेल्या फक्त ३९ जागांवर समाधान न मानता अधिक जागा नक्की मागणार. तसेच अपक्ष, प्रहार संघटना आणि सध्याचे मित्रपक्ष आहेतच. त्यामुळे तेव्हा जागावाटप करणे तितके सोपे नाही.

क्लिंटन's picture

30 Jun 2022 - 3:57 pm | क्लिंटन

भविष्यात काय होईल हे सांगता येत नसले तरी-

१. २०१४ मध्ये भाजपने स्वतंत्र लढून २८.१% मते मिळवली होती ही सत्य परिस्थिती आहे. पण त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट झाली होती जी आता बदललेली आहे. २०१४ मध्ये युती तुटली २५ सप्टेंबरला आणि मतदान झाले १५ ऑक्टोबरला. म्हणजे युती तुटल्यानंतर अवघ्या २० दिवसात. दरम्यानच्या काळात उध्दव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांचा उल्लेख प्रचारादरम्यान केला आणि मोदी दिल्लीहून अफझलखानाचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात आले आहेत असा वेगळाच इतिहास सांगितला. तसेच शिवसेनेने प्रचारादरम्यानही काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका न करता भाजपवरच टीका केली होती. हे सगळे असले तरी या गोष्टी प्रचाराच्या काळातल्या आहेत, एकदा निवडणुक संपल्यावर परत हे दोन पक्ष एकत्र येतील असे मतदारांना वाटले असेल तर त्यात काही चुकीचे नव्हते. किमानपक्षी नंतरच्या काळात जितके संबंध बिघडले तितके बिघडतील याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर त्यांच्याविरोधात मोठी प्रस्थापितविरोधी लाट होती हे नक्की. अशावेळेस जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला हरवू शकेल इतका प्रबळ भाजपचा उमेदवार नसेल पण असा शिवसेनेचा उमेदवार होता तिथे भाजप मतदारांनीही मते शिवसेनेच्या उमेदवारांना कशावरून दिली नसतील? तेव्हा २८.१% ही भाजपची सर्वोत्तम कामगिरी समजायची का हा प्रश्न आहे.

२. आता शिवसेनेबरोबर लढणार नसल्यामुळे शिवसेना मतदारांची मते मिळणार नाहीत त्याप्रमाणेच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेनाविरोधी मतदारांना भाजप आपल्याकडे खेचू शकतो. एक उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईत महापालिका निवडणुकांमध्ये २०१७ मध्ये युती नव्हती. त्यावेळेस भाजपला मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदारांची मते मिळाली होती आणि भाजपने कधी जिंकल्या नाहीत इतक्या ८२ जागा मुंबई महापालिकेत जिंकल्या. पूर्वी युती असताना ही मते काँग्रेसला जायची. २०१४ नंतर काँग्रेसची पडझड झाली आणि शिवसेनेशी युती नव्हती त्यावेळेस ही मते भाजपकडे गेली. ही मते शिवसेनेच्या विरोधात असल्याने पूर्वी ती मते भाजपकडे कधीच गेली नव्हती. अशी मते काँग्रेसकडून भाजपकडे कशावरून येणार नाहीत?

३. एक पक्ष म्हणून शिवसेनेला मिळणार्‍या मतांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मिळणारी मते आणि मराठीच्या मुद्द्यावरून मिळणारी मते होती. यापुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मिळणार्‍या मतांना शिवसेना हा तितकासा आकर्षक पर्याय राहणे कठीण आहे. ही मते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अर्थातच जाणार नाहीत. मग त्यातील बरीचशी मते भाजपकडे का वळणार नाहीत? यातली बरीच मते २०१४ मध्येही स्थानिक पातळीवर शिवसेनेचा उमेदवार प्रबळ असेल तर शिवसेनेला गेली असली तरी यापुढे जातील का हा प्रश्न आहे. तेव्हा शिवसेनेच्या यापुढे होणार्‍या पडझडीचा भाजपला फायदा होणारच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

मराठीचा मुद्दा मुळात मुंबई आणि सभोवतालच्या परिसरात जास्त महत्वाचा आहे. राज्याच्या इतर भागात या मुद्द्याचा इतका प्रभाव नाही. मुंबईत आणि आसपासच्या परिसरातही मराठीच्या मुद्द्यावरून मत देणार्‍यांमध्ये मनसे हा पर्याय मतदारांपुढे आहे.

४. एकनाथ शिंदेंच्या गटाबरोबरच प्रहार संघटना आणि अपक्षांना जागा द्याव्या लागतील म्हणून भाजपत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल असे नाही. यापैकी शिंदे गटाच्या बर्‍याचशा जागांवर भाजपची संघटना फार प्रबळ नाही हे वर लिहिलेच आहे. त्यामुळे त्या जागांवर फार प्रश्न येऊ नये. उलट शिंदे गटाचे आमदार आपापल्या भागात स्वतःच्या नावावर बर्‍यापैकी मते घेऊ शकतात त्याचा फायदाच होईल. अपक्ष आणि इतरांपैकी किती आमदार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले आहेत? दुसरे म्हणजे हे लोक २०१९ मध्ये स्वतःच्या बळावर निवडून आले असतील तर त्यांची स्वतःची ताकद आहेच ना. अशा उमेदवारांचे समर्थक माणसाला मत देतात पक्षाला नाही. समजा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि जरी बंडखोरी झाली तरी त्यापैकी काही लोक तरी परत निवडून येऊ शकतीलच ना? राज्यात सरकार स्थापन करायचे असेल तर १४५ ची गरज असते पण प्रत्यक्षात ती गरज १३०-१३२ चीच असते. एकदा तो आकडा आला की उरलेले १२-१५ लोक अपक्ष आणि लहान पक्षांकडून मिळू शकतात. असे अपक्ष आणि लहान पक्षवाले लोक बहुतेक वेळा कोणीही सत्तेत असेल त्या बाजूलाच जातात.

५. आता राहिला मुद्दा ब्राह्मण मतदारांमधील नाराजीचा. मागे कोणत्यातरी प्रतिसादात तुम्हीच लिहिले होते की २०१४ मध्ये कोथरूडमधून मेधा कुलकर्णी ६५ हजार मताधिक्याने जिंकल्या पण २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील यांचे तेच मताधिक्य २५ हजार झाले. हा आकड्यांचा खेळ सुध्दा म्हणता येईल. कारण २०१४ मध्ये मतदान झाले होते १ लाख ९७ हजार तर २०१९ मध्ये १ लाख ९५ हजार म्हणजे जवळपास तेवढेच. २०१४ मध्ये मेधा कुलकर्णींना मते होती १ लाख १ हजार तर २०१९ मध्ये चंपांना मते होती १ लाख ५ हजार. मतांची टक्केवारी बघितली तरी मेधा कुलकर्णींना २०१४ मध्ये ५१.१५% मते होती तर २०१९ मध्ये चंपांना ५३.९३%. मताधिक्य दिसताना इतके कमी दिसते कारण २०१९ मध्ये मनसेच्या किशोर शिंदेंना सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता आणि आपले उमेदवार त्यांनी उतरवले नव्हते.

तीच गोष्ट ओबीसी मतदारांची. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यांचे पंख कापले म्हणजे ओबीसी मतदार नाराज होईलच हे १९९० च्या दशकातले गृहितक झाले. सध्याच्या काळात ते कितपत लागू पडेल याविषयी साशंकता आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचे विधानपरिषदेत पुनर्वसन झाले आहे.

समजा फडणवीस परत मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठा आरक्षण परत आणायचा प्रयत्न केला तर मात्र ब्राह्मण आणि ओबीसी मतदारांमध्ये ही नाराजी वाढेल हा मुद्दा मान्य. पण समजा तसे झाले नाही तर २०१७-१८ मध्ये फडणवीसांनी मराठ्यांसाठी अमुकतमुक केले म्हणून २०२४ मध्ये त्यांना मते द्यायची नाहीत इतकी सामान्य मतदारांची आठवण तल्लख नसते. संबंधित नेत्यांनी सततचे लांगूलचालन केले तर मतदार मात्र ते लक्षात ठेवतात. म्हणून फडणवीसांना समजा परत मुख्यमंत्रीपद मिळाले तर पुढील दोन वर्षे महत्वाची असतील.

तेव्हा भाजपसाठी परिस्थिती इतकी वाईट आहे असे मला तरी वाटत नाही.

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 10:46 am | सुबोध खरे

जो शरद पवारांच्या नादाला लागला त्याचा कार्यभाग बुडाला!

स्वतःचे मातृपक्ष अनेक वेळेस फोडून झाले.

फडणविसना हसणार्या लोकांनी एवढेच लक्षात ठेवावे की फडणवीस आहेत तिथेच आहेत

आणि मी पुन्हा येईन ची खिल्ली उडवली तरी फडणवीस पुन्हा येणारच आहेत

पण

शिवसेनेचे काय झाले!

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले, आमदारकीचा राजीनामा दिला, पक्ष दुभंगला आणि उद्या मुंबई महापालिका सुद्धा हातातून गेली तर आश्चर्य वाटू नये.

शिवसेना सोडून गेलेल्यांची वाताहत झाली असे म्हणणे चूक ठरेल कारण श्री भुजबळ, श्री नारायण राणे आपल्या स्वतःच्या बळावर उभे आहेतच.

तेंव्हा रिक्षावाल्याना पानवाल्याना आम्ही उभे केले आणि आम्ही नसलो तर त्यांची वाताहत होईल असे म्हणणे हि सरंजामशाही दर्पोक्ती ठरेल.

श्री एकनाथ शिंदे, श्री दीपक केसरकर यांचा आपला बांधलेला मतदार आहे. ते केवळ शिवसेनेच्या पाठबळावर उभे आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.

असे चांगले जनाधार असलेले नेते गमावण्यामुळे उलट शिवसेनेचे फार मोठे नुकसान होईल.

आपल्या जनतेची " राजा आणि प्रजा" हि मनोवृत्ती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक श्री उद्धव ठाकरे यांच्या मागे जातील यात शंका नाही.

परंतु जर श्री उद्धव यांनी जमिनीवरच्या सैनिकांकडे दुर्लक्ष करण्याची अक्षम्य चूक पुन्हा केली तर मात्र शिवसेनेचे भविष्य अंधारात असेल.

मुसलमानांचे लांगूलचालन केल्यामुळे शिवसेनेस कोणताही फायदा होणार नाही कारण मुसलमान सेनेवर कधीही विश्वास ठेवत नाहीत.

उलट त्यामुळे कुंपणावर असणारे हिंदू मात्र मोठ्या प्रमाणावर दुखावले गेले आहेत ज्यात असंख्य शिवसैनिक सुद्धा आहेत. अर्थात हि मते आपोआप भाजपकडे गेल्याने भाजपचा फायदा होईलच पण तुरळक प्रमाणात मुसलमान मते जरी शिवसेनेने खाल्ली तरी राष्ट्रवादी यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

त्यातून श्री अनिल परब आणि श्री संजय राऊत याना इ डी चे बोलावणे आलेले आहे. आता ते किती दिवस बाहेर राहतील हे पाहायला लागेल. कारण ईडीचे लोक सहसा सज्जड पुरावा जमवल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत.

राजकीय द्वेषातून अटक झाली इ इ सामान्य मतदारांना सांगण्यासाठी ठीक आहे.
पण याचाच व्यत्यास असा आहे कि सामान्य माणसांनी हे पण स्वीकारलेले आहे कि राजकारणी माणूस हा भ्रष्ट असतोच. त्यामुळे एखादा मंत्री/ आमदार आत गेला तर लोक भोग आपल्या कर्माची फळे म्हणून स्वस्थ बसतात त्याला कोणतीही सहानुभूती किंवा जनाधार मिळत नाही

त्यात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद ला धाराशिव करण्यास मान्यता दिल्यामुळे मुस्लिम मतदार दुखावले गेले आहेत

धारावी भेंडीबाजार येथील मुसलमान आता भीतीग्रस्त झालेले असतील. त्यांना खरी भीती भाजपची असे. कारण एका व्यापाऱ्याच्या मते शिवसेनेच्या हिंदुत्वाला ते कधीच घाबरत नसत. पैसे दिले कि काम होत असे. परंतु भाजपचे बरेचसे लोक सडे फटिंग असल्याने सहजासहजी पैशाने काम होत नाही.

आयुष्यभर सतत कारस्थाने करत राहण्याच्या स्वभावामुळे श्री शरद पवार यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाही. त्यातून त्यांचे दोन मंत्री तुरुंगात बसले आहेत त्यांना बाहेर काढण्यात त्यांना अपयश आल्याने साहेब काहीही करू शकतात यावर खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही.

वृध्दापकाळात आपल्या पक्षाची वाताहत झाल्याचे सुद्धा पाहणे त्यांच्या नशिबी येणार आहे.
पु लं च्या भाषेत शरद पवार यांना

शकुनी म्हणावे
की अपशकुनी

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ

ही म्हण सार्थ आहे

प्रसाद_१९८२'s picture

30 Jun 2022 - 11:15 am | प्रसाद_१९८२

छान विश्लेषण !

शकुनी म्हणावे
की अपशकुनी
---

मला वाटते अपशकुनी म्हणावे. कारण हा माणुस ज्या कोणासोबत जातो त्याचा विनाश होतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 11:26 am | अमरेंद्र बाहुबली

कारण ईडीचे लोक सहसा सज्जड पुरावा जमवल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत. ईडीचे लोक सज्जड पुरावे तसेच भ्रष्ट भाजपेचर पक्षात आहेना ह्याचा पुरावा जमल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत.
धारावी भेंडीबाजार येथील मुसलमान आता भीतीग्रस्त झालेले असतील. त्यांना खरी भीती भाजपची असे. कारण एका व्यापाऱ्याच्या मते शिवसेनेच्या हिंदुत्वाला ते कधीच घाबरत नसत. पैसे दिले कि काम होत असे. परंतु भाजपचे बरेचसे लोक सडे फटिंग असल्याने सहजासहजी पैशाने काम होत नाही.

कैच्याकै. भाजप म्हणे हिंदूत्ववादी. भाजपने हिंदूंसैठी काय केले हे आजपर्यंत तुम्हाला सांगता आलेले नाही डाक्टर.

आयुष्यभर सतत कारस्थाने करत राहण्याच्या स्वभावामुळे श्री शरद पवार यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाही बरोबर. म्हणून सेना आणी काॅंग्रेस ने एकत्र येऊन पवरांच्या भरवस्यावर महाविकाय आघाडी ऊभी केली. कारस्थानं करनार्यांना १०५ असूनही घरी बसावे लागले.

खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. हे असं फक्त भाजपच्या लोकांना वाटतं.
वृध्दापकाळात आपल्या पक्षाची वाताहत झाल्याचे सुद्धा पाहणे त्यांच्या नशिबी येणार आहे. वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ

ही म्हण सार्थ आहे ही म्हण सेनेसाठी सार्थ आहे. ३५ वर्षे ज्यांच्याशी संगं केला त्यांनीच ईडी सीबीआय लावून सेनेचा प्राण घ्यायचा प्रयत्न केला.

यश राज's picture

30 Jun 2022 - 11:41 am | यश राज

.वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी.

म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते.
अबा आता त्या धुंदितून बाहेर या,सतत १०५ चा घोशा लावणारे बसलेत आता घरी. व घरी बसलेले जोमाने बाहेर आलेत व आता विरोधी पक्षाला कुठे कुठे बसवतील याचा भरवसा नाहीये.
समय का पहिया शेवटी काय...

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 11:58 am | अमरेंद्र बाहुबली

म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते. त्यांना परस्पर क्लिनचीट दिली नाही.
घरी बसलेले जोमाने बाहेर आलेत जोमाने वगैरे नाही ईडीचा धाक दाखवून फोडफोडी करून गुजरात आसाम ला आमदार लपवून मग आलेत.

इरसाल's picture

30 Jun 2022 - 4:21 pm | इरसाल

पास झालो तर मी पास झालो......आणी
नापास झाला तर गुरुजींनी (श्रीगुरुजी नाही) नापास केला...................हा रडीचा डाव कधीपर्यंत खेळणार.
शरद पवार पुर्ण भिजले असते तर कदाचित सरकार ५ वर्षे टिकले असते पण ते अर्धवट भिजले नी २.५ वर्षात बुंदीवाला त्यांच्या पानापर्यंत येईतोवर लग्नातली बुंदीच संपली.
आता आजीवन भावी पंतप्रधान विथ आजीवन भावी मुख्यमंत्रीण बाई.
बाकी कोणी कितीही उपटो (हिंदीत पटको) पण गेले ते गेले आले ते आलेच.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 4:27 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्या बद्दल ईडी, राज्यपाल, सीबीआय ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

इरसाल's picture

30 Jun 2022 - 5:14 pm | इरसाल

पण ह्या लोकांनी काही चुकीचे केले नसेल तर इडी, राज्यपाल आणी सीबीआयला कां म्हणुन घाबरावे.
की घोटाळे करुनही आम्हाला कोणी काहीच करु नये अशी अपेक्षा आहे.
आता भाजपच्या लोकांना का नाही आटक करत अस बोंबलाल....तर मागचे २.५ वर्ष सरकारात राहुन काय फक्त वसुलीसंचलन केले कां?

यश राज's picture

30 Jun 2022 - 11:43 am | यश राज

.वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी.

म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते.
अबा आता त्या धुंदितून बाहेर या,सतत १०५ चा घोशा लावणारे बसलेत आता घरी. व घरी बसलेले जोमाने बाहेर आलेत व आता विरोधी पक्षाला कुठे कुठे बसवतील याचा भरवसा नाहीये.
समय का पहिया शेवटी काय...

सौंदाळा's picture

30 Jun 2022 - 10:59 am | सौंदाळा

एकच गोष्ट नक्की झाली.
घराणेशाही असलेले पक्ष फार तर दोन किंवा तीन पिढ्या चालतील त्यानंतर पडझड, पीछेहाट अटळ आहे.
पहिली पिढी वाढवते, दुसरी पिढी टिकवते / डुबवते , तिसरी पिढी संपवते.
काँग्रेस जात्यात आहे, सेना सुपात आहे तर राष्ट्रवादी पोत्यात आहे. पवारांनी सुध्दा पवार / सुळे प्रेमापोटी वाहवत न जाता स्वतःनंतर पक्षाची धुरा समर्थ हातात जावी यासाठी योग्य निर्णय आताच घेतला पाहिजे

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 11:17 am | अमरेंद्र बाहुबली

घराणेशाही असलेले पक्ष फार तर दोन किंवा तीन पिढ्या चालतील त्यानंतर पडझड, पीछेहाट अटळ आहे. असहमत.
मूघलांच्या सात च्या सात पिढ्यांनी राज्य केलं. औरंगजेबाने आपल्या मूलांना राज्यकारभारापासून दूर ठेवलं म्हणून मूघल संपले.
गांधी घराण्यात मोतीलाल, जवाहर, ईंदीरा (महापराक्रमी), संजय-राजीव हे चांगलेच नेते होते. एक राहूल गांधींवर फक्त गाडी अडली पुढे प्ढी नाही म्हणून.
ठाकरे घराण्यात प्रबोधनकार, बाळासाहेब, ऊध्दव, आदीत्य सर्वच कर्तबगार आहेत.
फडणवीस घराण्यात गंगाधर आमदार, शोभाकाकू मंत्री, देवेंद्र मूख्यमंत्री.
त्यामुळे तीसरी पिढी दुबळी वगैरे ह्या सर्व कंड्या आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

30 Jun 2022 - 11:37 am | प्रसाद_१९८२

का मविआ सरकार.. अगदी वाईट झाले.
आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून अदिलशाह,अफजल खान, वाघनखे, तलवार, मुंबई महाराष्ट्रपासून तोडायचा डाव, कोमट पाणी, महाराष्ट्राचा अपमान व टोमणे बॉंब या सर्वाला महाराष्ट्रीयन जनता आता मुकणार.

विजुभाऊ's picture

30 Jun 2022 - 11:39 am | विजुभाऊ

सगळ्यात मोठा फायदा संजय राउतांचा झालाय. त्यांना शिवसेना नावाचा पक्ष आयता मिळालाय.
उद्धव ठाकरे हे आता संपूर्ण नामधारी रहातील आणि पक्ष संजय राऊत चालवतील.
बोलबच्चनगिरीतुन सावरले असतील तर मागून दोर्‍या हलवतील

कर्नलतपस्वी's picture

30 Jun 2022 - 11:47 am | कर्नलतपस्वी

अल्पमतात आसलेले सरकार त्यांची केस न्यायालयात प्रलंबित असताना नामांतराचा निर्णय घेऊ शकते का?

नामातंर केले म्हणजे हिन्दुत्ववादी आहेत कसे सिद्ध होते. करायचेच होते तर मागील आडिच वर्षात का नाही केले. जेव्हा जेव्हा विषय निघाला तेंव्हा केन्द्रावर खापर फोडले. शेवटच्या क्षणी सद् बुद्धी? कशी सुचली.

नामातंर हा विषय वादग्रस्त आसल्याने नविन सरकार करता जाणूनबुजून निर्माण केलेली डोकेदुखी तर नाही.

निरोपाच्या भाषणात आडीच वर्षात काय केले याबद्दल काहीच सांगायला नव्हते.

नामांतराचा निर्णय हा इतका महत्वाचा होता का.
वरिष्ठ, अनुभवी सैनिकांना डावलून मा.अदित्य ठाकरेला मंत्रिपद देणे हे ज्येष्ठांना कुठे खुपले तर नसेल. मुलाला मोठे करण्याची एवढी काय घाई होती.

"उधो,कर्मनः की गती न्यारी"

भक्त सूरदास लिहून गेले आहेत त्याची आठवण आली.

यश राज's picture

30 Jun 2022 - 12:02 pm | यश राज
अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 12:06 pm | अमरेंद्र बाहुबली

मागील आडिच वर्षात का नाही केले
२०१४ ते २०१९ का नाही केले?

सर्वात मोठा फायदा बारामतीच्या काकांचा झालाय.
त्यांना आता पुढच्या निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळेल. आणि कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतःचे सरकार स्थापन करता येईल.
सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 12:00 pm | अमरेंद्र बाहुबली

सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.
भाजपचे सध्याचे गलिच्छ राजकारण पाहीले तर भाजपचा ही वळनार.

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 12:51 pm | सुबोध खरे

मग महाराष्ट्राचे काय होणार?

सेना म्हणजेच महाराष्ट्र

कर्नलतपस्वी's picture

30 Jun 2022 - 12:29 pm | कर्नलतपस्वी

एक बाजू लावून धरल्याने धागा चांगला पळतोय.

नामांतराचा निर्णय बघून पेपर संपल्याची घंटा झाल्यावर पुरवणी जोडणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवण झाली.

कपिलमुनी's picture

30 Jun 2022 - 12:58 pm | कपिलमुनी

स्वबळाच्या वल्गना करणाऱ्या ना पुन्हा कुबड्या घ्याव्या लागल्या

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 12:59 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

विवेकपटाईत's picture

30 Jun 2022 - 3:43 pm | विवेकपटाईत

इतिहास गवाह आहे. काका पुतण्याला वाचवत नाही. आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात पकडण्यासाठी पोळीला तूप लावते. शिवसेनेचा व्होट बँक मराठी अस्मिता, गुजराती विरोध आणि कट्टर हिंदुत्व. गृह आणि अर्थ खाते हातात ठेऊन काकांनी शिवसेनेला हिंदुत्व पासून दूर नेले आणि शिवसेनेच्या आमदारांच्या हातात नारळ ठेवले. शेवटी शिवसेना फुटली. पुढच्या निवडणुकीत मराठी अस्मिता आणि गुज्जू विरोधी मते काका खातील. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच हस्तगत केली त्यामुळे भाजपला काहीच फायदा होणार नाही. BMC निवडणूकीत शिंदे सेना अर्ध्या जागा मागतील त्या देणे भाजपला शक्य होणार नाही.

दुसरीकडे BMC निवडणूकीत युती ९० पेक्षा जास्त जागा उद्धव सेनेला देणार नाही. एकटे लढून हरल्यास त्यांची गत शोलेच्या असरानी सारखी होईल.
तूर्त काका दिवाळी साजरी करत असणार .

कपिलमुनी's picture

30 Jun 2022 - 4:03 pm | कपिलमुनी

इतिहास सांगतो , दिल्लीकराना महाराष्ट्राचे चांगले कधीही बघवत नाही .

इतिहास सांगतो, गुज्जू मराठी लोकांचा द्वेष करतात..

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 4:14 pm | अमरेंद्र बाहुबली

+१. महापालिका भादपच्या ताब्यात गेली तर मराठी माणूस मुंबईतून संपवायचा प्रयत्न करतील. नंतर मुंबईला केंद्रशासीत प्रदेश मग हळूच गुजरात राज्यात समावेश करवतील. हे सगळं “राष्ट्रहीतासाठी” केलं असंहा सांगतील

विनाकारण मुंबईच्या पन्चायती!

चौकस२१२'s picture

2 Jul 2022 - 5:26 am | चौकस२१२

अहाहा काय तर्क काय तर्क राजेश भाऊ १८८ , करचुरे साहेब .. हेच जर केंद्रात २ पंजाबी किंवा २ उत्तरपरदेशी सतत केंद्री असते तर तुम्ही पंजाब किंवा उत्तर प्रदेशाचं नावाने ठणाणा केला असता

आता सांगा समजा उद्या मोदी शहा ऐवजी गडकरी आणि फडणवीस अशी जोडगोळी आली सत्ताकेंद्री तर काय आरडा ओरडा करणार तुम्ही

राजय पातळी वरील पक्ष आणि राष्ट्रउया पातळी वरील पक्ष ( जुना काँगेस किंवा आत्ताच भाजप ) यांच्यात हा वाद सत्तात चालूच राहणार

दिल्ली ला स्वतःचे असे अस्तित्व नाही ,, त्यामुळे आज जर २ गुजराथचे तर लगेच दिली गुजराथी झाली का!

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 9:35 am | सुबोध खरे

इतिहास सांगतो, गुज्जू मराठी लोकांचा द्वेष करतात..

इतिहास सांगतो, कानडी मराठी लोकांचा द्वेष करतात. बेळगावात जाऊन पहा.

सामना सारखी वर्तमान पत्रे वाचलीत तर मराठी माणूस उत्तर परदेशी किंवा बिहारींचा (भय्ये) द्वेष करतो असे वाटेल.

"बजाव पुंगी हटाव लुंगी" सारख्या घोषणा कुणी दिल्या होत्या?

बंगलोर मधील वृत्तपत्रे वाचलीत तर तामिळ माणसे कन्नडिगांचा द्वेष करतात असे वाटेल.

तुम्ही फक्त तुमचा चष्मा काढा.

असा सवंग द्वेष कुणीही करत नाही.

गुजरात राजस्थानात प्रत्यक्ष जाऊन पहा शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे ते.

आपला मोदि शाह बद्दल चा द्वेष जगजाहीर आहे पण त्यासाठी संपूर्ण गुजराती माणसांना दोषी ठरवणे हि अत्यंत संकुचित मनोवृत्ती आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 10:43 am | अमरेंद्र बाहुबली

+१ सहमत.

कॉमी's picture

5 Jul 2022 - 10:10 am | कॉमी

सहमत !

एकुलता एक डॉन's picture

1 Jul 2022 - 1:47 am | एकुलता एक डॉन

आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात पकडण्यासाठी पोळीला तूप लावते

खरच?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 2:05 am | अमरेंद्र बाहुबली

पोळीला तूप लावून ऊंदीर कसा सापडेल? पोळी पिंजर्यात ही ठेवायला हवी ना?

सुबोध खरे's picture

1 Jul 2022 - 11:38 am | सुबोध खरे

नाही

उंदराला पिंजऱ्यात ठेवून पोळीला तूप लावते.

उगाच काहींच्या काही

एकुलता एक डॉन's picture

1 Jul 2022 - 12:37 pm | एकुलता एक डॉन

उन्द्राला तुप लाउन पिन्जर्यात ठेवावे

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 12:59 pm | अमरेंद्र बाहुबली

मग पोळीला काय लावावे?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत

म्हणजे नक्की गेम कोणाचा झाला?

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 4:58 pm | आग्या१९९०

अडीच वर्षांपूर्वी हीच मागणी होती शिवसेनेची तेव्हा अतिआत्मविश्वास नडला बीजेपिला. आज ताकही फुंकून पित आहेत,आत्मविश्वास गळून पडला.

श्री शिंदे मुख्यमंत्री आणि त्याला भाजपचा आतुन पांठिबा अशी बातमी येत आहे. असे असेल तर भाजपाने २०१९ पासुन विरोधी पक्षात बसुन काय कमावले अशा प्रश्न पडतो. शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार.

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 6:30 pm | सुबोध खरे

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार.

भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने संपूर्ण पक्षाचे भवितव्य.

शिवसेना सध्या कुणाकडे जाणार हाच प्रश्न महत्त्वाचा होणार आहे.

बाकी डुक्कर रेडे म्हणून विशेषणे लावणाऱ्या राऊतांची मात्र झोप उडाली असेल.

"परब, राऊत" आता देव पाण्यात बुडवून बसले असतील.

सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल.

काकांना भिजण्यासाठी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पण पडतो आहे.

पहा आता काय होतंय ते.

FADANVIS IS HAVING LAST LAUGH

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 6:33 pm | सुबोध खरे

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार.

भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने संपूर्ण पक्षाचे भवितव्य.

शिवसेना सध्या कुणाकडे जाणार हाच प्रश्न महत्त्वाचा होणार आहे.

बाकी डुक्कर रेडे म्हणून विशेषणे लावणाऱ्या राऊतांची मात्र झोप उडाली असेल.

"परब, राऊत" आता देव पाण्यात बुडवून बसले असतील.

सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल.

काकांना भिजण्यासाठी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पण पडतो आहे.

पहा आता काय होतंय ते.

FADANVIS IS HAVING LAST LAUGH

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 6:57 pm | अमरेंद्र बाहुबली

सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल.

केंद्राने सीबीआय पाठवून “सुशांतनो आत्महत्या केली” असा अहवाल पाठवून केस कधीच बंदं केलीय.

या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे. चंपा आणि फडणवीस यांना कसलेही मास अपील नाहीये .२०१४ नंतर फडणवीस वरुन आदेश आल्यावर cm झाले होते.

केंद्रातली सत्ता गेली तर चंपा तर ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच निवडून आणू शकणार नाही.. आणि मोदी शहा यांच्याकडून सेंट्रली सगळा राज्यकारभार हाकला जातोय, त्यामुळे फडणवीस ला मास्टर स्ट्रोक मारला वगैरे म्हणणे म्हणजे उगाच वर चढवणे आहे, कालचे जनमत ठाकरें प्रती सहानभूती आणि भाजप विरोधी झालेच होते, त्यामुळे जो निर्णय वरून आला तो घ्यावाच लागला.. नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल?

आणि जर दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते तर २०१९ ला गप शिवसेने बरोबर गेल्याचे काय वाईट होते..
त्यामुळे गेम झालाय पण गप मास्टरस्ट्रोक मारला म्हणुन मनात झुरन्यापेक्षा हातात काहीच नाही..

असो, दुसऱ्या साठी खड्डा खांदणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो हे यावरून दिसते आहे..

-- गणेशा

आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस म्हणताच, जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं..

आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा :-)

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 8:03 pm | सुबोध खरे

जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं..

अर्ध्या तासात तोंडावर पडायला झालं पहा

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:22 pm | अमरेंद्र बाहुबली

परफेक्ट प्रतिसाद.

प्रसाद_१९८२'s picture

30 Jun 2022 - 7:45 pm | प्रसाद_१९८२

या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे.
--
12

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 7:48 pm | सुबोध खरे

नाही

फडणवीस उप मुख्यमंत्री होणार आहेत. आणि बहुधा गृह खाते सुद्धा स्वतः कडे ठेवतील असा माझा कयास आहे.

बाकी-- किरीट सोमय्या याना अर्थ मंत्री करायला पाहिजे म्हणजे मग राष्ट्रवादी आणि राऊत परब सारख्यांची गम्मत पाहायला लै म्हणजे लैच मजा येईल ( अर्थात असे काही होणार नाही हा भाग अलाहिदा)

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 7:36 pm | सुबोध खरे

आपल्या दोघांच्या अफाट बुद्धीमत्तेला आणि अचाट विश्लेषण शक्तीला चार सलाम.

जाता जाता -- आता महाराष्ट्र म्हणजे कोणती शिवसेना? श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली

फायली “क्लीअर” झाल्याकी परत ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या आमदारांची. :)

महाराष्ट्र कोणता पक्ष नाही..

पण सत्तेत सुद्धा - शिवसेना..
विरोधात पण - शिवसेना...

स्वतःला समुद्र म्हणताना त्याचे ठाण्यातील खाडीत रूपांतर कधी झाले हे कळाले पण नाही..

शिवसेना संपवण्याचे मनसुभे मनात होते.. मनातच राहिले

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 8:02 pm | सुबोध खरे

ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या आमदारांची

हमे मालूम है कि ये झूट है

मगर दिल बहलाने के लिये ये खयाल अच्छा है गालिब

साहना's picture

1 Jul 2022 - 11:04 am | साहना

cars

सर्व अभ्यासू लोकांनी/ उमेदवारांनी लोकसभा हेच ध्येय ठेवावं.

डँबिस००७'s picture

1 Jul 2022 - 11:59 am | डँबिस००७

मविआची सत्ता गेली, देशाचे चाणक्याच्या नाका खालुन पण ईथल्या ह्यांना दे फ तोंड घशी पडला ह्याची काळजी पडलीय.

देफ ची खरी धास्ती जेल मध्ये गेले अनेक महीने पडुन असलेल्याम्ना, श. प. सं रा यांना आहे. कारण केंद्र सरकार व राज्य सरकार मिळुन आता हतोडा चालवणार.

देफ मुख्य मंत्री नाहीत हे बरेच आहे कारण महाराष्ट्राला परत प्रगती पथावर न्यायला लागेल तसे प्रखर निर्णय आता घेता येतील.

सुबोध खरे's picture

1 Jul 2022 - 12:12 pm | सुबोध खरे

उद्याच्या विश्वास ठराव विरोध करणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तातडीने सुनावणी देण्यास नकार दिला आहे.

परंतु हि याचिका सुद्धा इतर याचिकांबरोबर १२ जुलैलाच सुनावणी साठी घेण्यास मान्यता दिली आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 12:20 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवीस शपथवीधी वेळी नाराज दिसत होते म्हणे. शरद पवारांनी हे हेरलं.
https://www.sarkarnama.in/amp/story/vishesh/fadnavis-was-not-ready-to-po...

बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री नाराज आहेत हे ज्याला कळाल नाही त्याला मंचावर बसलेले दे फा नाराज होते हे दिसले म्हणजे फारच तिक्ष्ण दुरदृष्टी म्हणायची !!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 1:02 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवींसांचे डोळे पाणावले होते असं धनंजय महाडीक ह्यांनी सांगीतले. आजच्या मटाला बातमी आहे.

शाम भागवत's picture

1 Jul 2022 - 12:57 pm | शाम भागवत

आता काय हेरत बसले आहेत? त्याचा काय उपयोग आहे?
राष्ट्रपतीचा उमेदवार निवडीचे उपदव्याप करण्यासाठी दिल्ली वा-या करण्यापेक्षा, शिंदे गटाची नाराजी वेळीच हेरली असती तर जास्त बरं झालं असतं.
पण नियतीलाच ते मान्य नव्हतं म्हटल्यावर.....
असो.

कानडाऊ योगेशु's picture

1 Jul 2022 - 1:34 pm | कानडाऊ योगेशु

शिंदे गटाची नाराजी वेळीच हेरली असती

हेरली असावी नक्कीच काकांनी व हेतुपुर्र्स्सर कानाडोळा केला असावा. काट्याने काटा काढला गेला. आतापर्यंतच्या चित्रानुसार तरी राष्ट्रवादीला खुले रान मिळाले आहे.
मागच्या वेळेला काकांनी पावसात भिजुन बाजी मारली ह्यावेळेला आलेल्या ह्या राजकिय सुनामीत तेल लावुन कोरडे ठणठणीत राहिले. काका रॉक्स ऑलवेज.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 1:36 pm | अमरेंद्र बाहुबली

काका रॉक्स ऑलवेज.
हेच मी नेहमी ईथे सांगीतलं की लगेच काकाद्वेष्टे दांडपट्टा घेऊन लढाई करायला येतात.
काकाद्वेष्ट्यांना काका काय चीज आहे हे कधीच कळनार नाही. :)

कानडाऊ योगेशु's picture

1 Jul 2022 - 6:51 pm | कानडाऊ योगेशु

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटते. पण इथे वस्तुनिष्ठपणे पाहु गेले तर काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.राजकिय दृष्ट्या त्यात काही चूक नसावी कारण शिवसेना सुध्दा स्वतःच मतलब साधण्यासाठी राष्ट्रवादी सोबत पाट लावुन उभी होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 7:28 pm | अमरेंद्र बाहुबली

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटते आजीबात नाही. मी काकाद्वेष्ट्यांसारखा नाही. काका विरूध्द जे ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसा मी नाही.

काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.
हे कधी झालं?? काकाचर शेवटपर्यंत सोबत होते. गद्दारी आपल्या माणसांनी केली.

कानडाऊ योगेशु's picture

1 Jul 2022 - 9:24 pm | कानडाऊ योगेशु

गद्दारी आपल्या माणसांनी केली.

गद्दारीचा काकांना पुरेपुर अनुभव आहे. गद्दारी शिवसेनेच्या माणसांनी शिवसेनेशी केली. गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल.पाहुण्याच्या काठीने साप मरत असताना काका सोयीस्कर रित्या मौन राहिले.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 9:52 pm | अमरेंद्र बाहुबली

गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल. काकांना माहीत असेल/नसेल तरी काय फरक पडतो? काका प्रत्येक गोष्ट रोखूशकत नाहीत.
आता पहाना फडणवीसांचा गेम अमीत शहांनी केलाय हे पुर्ण महाराष्ट्र भाजपला माहीतीय. पण कुणई काही वाकडं करू शकतं का त्यांचं? नाहीना? हेही तसंच.

कानडाऊ योगेशु's picture

1 Jul 2022 - 11:02 pm | कानडाऊ योगेशु

असो. पुढे बोलण्यात काही अर्थ नाही.

डँबिस००७'s picture

1 Jul 2022 - 2:09 pm | डँबिस००७

कोणत्याही परिस्थितीत आपली बाजु भक्कम होइल अशी खेळी केली असती तर शरद पवार चाणक्य ठरले असते.

पण एकनाथ शिंदेचे ईतक्या आमदारांना घेऊन मुंबई सोडुन सुरतला जाणे आणी त्यानंतर गोहत्तीला जाऊन सुरक्षित रहाणे हे कोणाच्याही स्वप्नात आले नव्हते. भाजपाचा ह्याला सपोर्ट होता हे एकदम स्पष्ट आहे.

आता सर कार बदलले आहे जे श प च्या एकदम विरोधात जाणार आहे.

१. अनिल देशमुख व नवाब मलिक जेल मध्ये आहेत. त्या दोघांनाही एकदम वार्यावर सोडणे श पंना राजकीयदृष्ट्या जमणार नाही.
त्यातल्या एकाला जेल मधुन सोडवणे हे त्यापेक्षा तापदायक ठरेल.
२. म राज्यात सरकार काँग्रेसच्या भागिदारीत असल्याने राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत श पंना वजन होत, आता ते वजन नाहीस झालेल आहे.
३. श पच्यां कुदुंबावर ईडीच्या केसेस आहेत. त्यासाठी कोणताच लिव्हरेज आता हाती उरलेला नाही.
४. आता ईडीने त्रस्त झालेल्या संजय राऊतचे खरे स्वरुप हळुहळु बाहेर पडेल. जो ह्या सर्व केसे स मधुन बाहेर प डा यला मदत करणार
नाही त्याच्या वर तोंड सुख घेईल. त्याला सुद्धा श प कडुन बर्याच होप्स आहेत.

सुबोध खरे's picture

1 Jul 2022 - 7:03 pm | सुबोध खरे

काका रॉक्स ऑलवेज.

हायला

काकांचे दोन मंत्री वर्षभर आतमध्ये आहेत आणि काका काय रॉक शो करताहेत.

कानडाऊ योगेशु's picture

1 Jul 2022 - 9:21 pm | कानडाऊ योगेशु

काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी बांधील नाहीत. कुणाचाही कसाही वापर करु शकतात. (पवार <-> वापर).

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 9:54 pm | अमरेंद्र बाहुबली

काकाद्वेष्ट्यांना हे नाही दिसत का की काका कुनालाही मॅनूपूलेट करू शकतात?? रात्री दोन वाजता राष्ट्रपतीला सही करायला लावली होती काकानी राष्ट्रपती राजवट ऊठवन्यासाठी.:)
डोन्ट अंडरस्टीमेट काका.

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 9:26 am | सुबोध खरे

डोन्ट अंडरस्टीमेट काका.

डोन्ट ओव्हर एस्टीमेट काका.

ज्यांना तीन वेळेस मुख्यमंत्री होऊन सुद्धा स्वतःचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही.

ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत.

त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असताना

काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 9:34 am | अमरेंद्र बाहुबली

५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कटकारस्थाने करून, सहकार्यांना घोटाळे वगैरेत अडकवून पाच वर्षे फक्त खुर्ची खुर्ची करनार्यांमधले काका नाहीत. अश्यांचं नंतर काय होतं पाहताय ना??
ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही. ते प्रामाणीक आहेत म्हणून. नाहीतर कधीच क्लिनचीट दिली असती काकानी. बच्चू कडूना नाही का परवाच क्लिनचीट मिळाली.
ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत. ज्यानी निवडूण आणले त्यांना घरी बसवून तर दाखवले ना :)
त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असताना ह्यातील एकाचेही राज्य पवारांनी विकसीत केलेल्या महाराष्ट्राच्या पुढे नाही.
काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते. हे मोदींना म्हणताय का? कारण ते काकांना गुरू मानतात. :)

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 10:22 am | सुबोध खरे

मी माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पण गुरु म्हणून मान देतो म्हणून मी त्यांचा सल्ला माझ्या डॉक्टरकीच्या व्यवसायात घेत नाही.

श्री मोदी यांनी श्री पवारांना वडिलकीचा मान दिला हे त्यांचे सुसंस्कार आहेत पण म्हणून ते काही त्यांचा सल्ला घ्यायला जात नाहीत.

ज्याने सलग १३ वर्षे मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मिळवला आणि सलग आठ वर्षे पंतप्रधान पदावर एकहाती बहुमत मिळवून कार्यरत आहेत ते शरद पवारांसारख्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्या आणि एकदाही पाच वर्षे पूर्ण न करता आलेल्या नेत्याकडून सल्ला घेतील हे म्हणजे

गुंतागुंतीच्या मेंदूंच्या शल्यक्रिया करणाऱ्या सर्जनने शाळेत हस्तकला शिकवणाऱ्या शिक्षकाचा ( एके काली ते त्याचे शिक्षक होते म्हणून) सल्ला घेण्यासारखे आहे.

अर्थात शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र असे समजणाऱ्या तुमच्या सारख्या विद्वत्तापूर्ण लोकांना हे समजावून सांगणे म्हणजे फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे.

पालथा घडा सरळ केला तर पाणी भरेल पण फुटबॉलचे काहीच करता येत नाही

तेंव्हा तुमचे चालू द्या

प्रसाद_१९८२'s picture

2 Jul 2022 - 10:37 am | प्रसाद_१९८२

या तुमच्या लीस्टमधे केजरीवालला देखील अ‍ॅड करा. पवारांना ५० वर्षे राजकारणात राहून जे करता आले नाही ते केजरीवालने पहिल्या प्रयत्नात करुन दाखवले. दोन राज्यात संपूर्ण बहुमतातील सरकार.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 10:47 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपला रथयात्रा, दंगली नी काय काय करावे लागले राज्ये जिंकायला. पण विकासाचं राजकारण करून केजरीवालांनी २ राज्ये जिंकली. अमीत शहा आणी मोदींना केजरीवालांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.

रात्रीचे चांदणे's picture

2 Jul 2022 - 10:59 am | रात्रीचे चांदणे

आपल्या राज्यात पण बोलवा की केजरीवालांना विकास करायला, गेल्या अडीच वर्षाचा backlog भरून निघेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 11:06 am | अमरेंद्र बाहुबली

+१ येतील की दिल्ली पंजाब काबीज केलाय. वाटेत लागनारे युपी, मध्य प्रदेश, गुजरात ही अविकसीत शोषीत भाजपग्रस्त राज्ये काबीज केली की पुढील मोर्चा महाराष्ट्रावर.

शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे, काँग्रेस
कोण काय आहे, कसे होते..फलाना.. वगैरे असल्या गोष्टी आता भाजपा आणि त्याच बरोबर भाजपा धर्जिन्या लोकांनी आता बंद कराव्यात हि इच्छा...

भाजप आणि फडणवीस ज्या पद्धतीने मविआ सरकार आल्यापासून १०० दिवसांत कसे सरकार पडणार..आणि त्यांचे भक्त कसे हे वाईट झाले हे सांगत होते...
तसं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे यांनी काही हि न करावे,

आणि त्याच बरोबर गेले तर गेले सरकार असे समजुन,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे या पक्षाच्या धार्जिन्या लोकांनी नविन सरकार ला काही बोल न लावता नविन सरकार ला चांगल्या कामाच्या शुभेच्छा द्याव्यात...
उगाच भाजपा/फडणवीस यांच्या सारखे वागण्याचे कारण नाही..

असो..
मी तरी नविन शिंदे सरकार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो..
विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा..

गणेशा...

तुर्तास रामराम..

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 1:52 pm | अमरेंद्र बाहुबली

विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा.. बच्चू कडूंना क्लिनचीट मिळालीय. आता पुढचा विकास कोणाचा होतो ते पाहुयात. मला वाटतंय प्रताप सरनाईक किंवा संजय राठोड ह्यांचा विकास झाल्याची बातमी येत्या दोन-तीन दिवसात लगेच येईल.

राउताना जोवर सेना हाकलून देत नाही तोवर उठांचे त्याम्च्यावर अवलंबून वाढत जाणार.पर्यायाने ते अवलंबित्व सेनेला आणखीनच गोत्यात आणणार

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 2:02 pm | अमरेंद्र बाहुबली

सेनेची काळजी नका करू. भाजपची करा. सेना आणी राऊत पाहून घेतील काय ते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

1 Jul 2022 - 3:18 pm | हणमंतअण्णा शंकर...

फडणवीसांचे खरे शत्रू शहा आहेत यावर आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे. शहा हळू हळू त्यांच्या पंतप्रधानपदातले अडसर दूर करत आहेत.

पहिल्या निर्णयामागे आणि दुसर्‍या खच्चीकरणामागे "मुंबई" हा सगळ्यात मोठा बार्गेन असला पाहिजे.

शहा, मोदी ज्या पद्धतीने आततायी विध्वंसकारी निर्णय घेतात आणि डूखही धरतात त्यावरून मुंबई हे त्यांचे मुख्य टार्गेट आहे, आणि कदाचित मुंबई आंतराष्ट्रीय करण्याच्या बहाण्याने ती 'सिटी-स्टेट' ( पर्यायाने केंद्रशासितच ) करण्याचा घाट घातला आहे की काय अशी शंका येते.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 3:27 pm | अमरेंद्र बाहुबली

अमीत शहा फडणवीसना कधीच
मुख्यमंत्री बनू देनार नाहीत हे मी मागच्या काही धाग्यात सांगीतलं होचं. २०१९ ला ही सरकार ह्यामुळेच बनू दिलं नव्हतं अमात शहांनी.

सुबोध खरे's picture

1 Jul 2022 - 7:16 pm | सुबोध खरे

हायला

अमित शहा यांचे डावपेच त्यांच्या पेक्षा तुम्हालाच जास्त समजतात असा वाटतंय

डँबिस००७'s picture

1 Jul 2022 - 9:01 pm | डँबिस००७

अ. बा. च्या म्हणण्याप्रमाणे अमित शहा सारखा भा ज पा तला उच्च श्रेणीतला नेता जर वागत असेल तर त्यांना भा ज पा बद्दल ईतकी नाराजी का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 9:14 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवीस वला तसा आता हा राज्सपाल हटवला की आज्बात नाराजी राहनार नाही भाजप बद्दल. :)
मग मी नी श्रिगुरूजी दोन्हीही खुश राहू. :)

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 9:28 am | सुबोध खरे

तुमच्या नाराजीला शेजारच्या पक्या तरी विचारतोय का?

बाकी चालू द्या अरण्य रुदन

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 5:00 pm | श्रीगुरुजी

मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीतून भाजपत आलेले राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार. सरकार पाडण्यासाठी इतका अट्टाहास करून मूळ भाजप नेत्यांना काय मिळणार? सर्वाधिक महत्त्वाची दोन पदे मूळ भाजप नेत्यांना नाहीत. आगामी मंत्रीमंडळात सुद्धा मूळ भाजप नेत्यांऐवजी भाजपत आणलेल्या आयारामांची भरताड असेल असं वाटायला लागलंय.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 5:05 pm | अमरेंद्र बाहुबली

बंडंखोरांनी बंडं फूकट केलेलं नाही. मंत्रीपद सोडून फक्त आमदार रहायला ते काय दुधखुळे आहेत का? त्यांना परत मंतिरापदं मिळताल ह्या बोलीवरच ते भाजप बरोबर संधान बांघायला तयार झाले असावेत. फडणवीयना फत्त मुख्यमंत्रीपद हवं होतं. पण…..

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 10:12 am | सुबोध खरे

गुरुजी

सामान्य माणसांनी राजकारणी हे धुतल्या तांदळाचे नाहीत हे ( नाईलाजाने का होईना) स्वीकारले आहे. परंतु त्यांची अपेक्षा निदान पैसे घेऊन तरी कामे व्हावीत अशी झाली आहे. शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या मंत्र्यांना उलट आता काम केले नाही तर मतदारसंघात माणसे परत उभी करणार नाहीत हे माहिती आहे.

कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) .

त्यामुळे आज जरी शिवसेना शिंदे गटाकडे गेली तरी पुढच्या काळात शिवसेना हि उद्धव ठाकरे यांच्याकडेच जाणार यात शंका नाही.

तेंव्हा आपले पानिपत व्हायचे नसेल तर आपला मतदार संघ शाबूत ठेवणे आवश्यक आहे हे त्यांना माहिती आहे. जसे श्री नारायण राणे आई श्री भुजबळ यांचे झाले तसे आपणही आपला मतदारसंघ शाबूत ठेवायचा असेल तर कामे मकरने आवश्यक आहे हे त्यांना माहिती आहे.

वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे. त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल.

मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही. कारण एकदा तोंडाला रक्त लागले कि वाघ शिकार सोडत नाही.

सरकार चाललं नाही तरी भाजपचे नुकसान नाही.

मध्यावधी निवडणूक झाल्या तर भाजप स्वबळावर निवडून येईल हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 10:53 am | अमरेंद्र बाहुबली

कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) सहमत. तसे नसते तर आमदारपुत्र फडणवीस पुन्हा निवडूण आले नसते.

वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे. हे असे कुठला ऊद्योगपती बोलला? की द्वेषातून तुम्ही तुमच्या मनाचंच दिलं चिपकवून?
त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल.
कालच नारळ फूटला. बच्चू कडूंच्या क्लिनचीट पासून. आता किलिनचीट यामीनी जाधवांना की सरदेसाईंना? अशी पैज लागलीय मित्राची नी माझी.
मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही. म्हणजे ती भ्रष्ट नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का??

कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) .
मोदी, योगी, राहुल गांधी यांना मिळणारी वागणुक कशी समजावुन सांगणार?