Skip to main content

त्यांनी हिंदीत का बोलावं?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 11/04/2022 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif… या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचने 108679
प्रतिक्रिया 510

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

द्रविड कुळातली सर्वात शुद्ध भाषा तमिळ. आजच्या तमिळ भाषेतही काही संस्कृतोद्भव शब्द आहेत. इतकंच काय पण संस्कृतोद्भव शब्द वाचता यावेत म्हणून तमिळमधे फार पूर्वीपासून मूळ तमिळमधे नसलेल्या अक्षरांचा एक संच ज्याला तमिळमधे ग्रंथाक्षरे म्हणतात तो वापरला जातो आहे. आटोकाट प्रयत्न करुनही तमिळभाषिकांना हे संस्कृतोद्भव शब्द तमिळमधून हुसकून लावणे १००% शक्य झालेले नाही. आणि हे जर तमिळबद्दल असेल तर बाकीच्या भारतीय भाषांमधे संस्कृत शब्दांचे प्रमाण किती असेल तर त्याचं गणित करा. संस्कृत ही काहिशी क्लिष्ट आहे हे मी नाकारत नाही.पण संस्कृतला व्याप्ती नाही हे तुमची माहिती तद्दन चुकीची आहे. संस्कृत भाषेत जर अजून सोपेपणा आणला तर तिच्यासारखी देश जोडू शकणारी भाषा दुसरी नाही. पण हे प्रत्यक्षात येणे कठीण आहे. पण म्हणून अरबी,फार्सीने भरलेली उर्दुछाप हिंदी ही देशाची भाषा राष्ट्रभाषा होऊ नये.

In reply to by उपयोजक

अहो पण कुणालाच बोलता येत नाही की ! मग कसली व्याप्ती असते ? एखाद्या भाषेत संस्कृतचे बरेच शब्द असले म्हणजे संस्कृत या भाषेला व्याप्ती येते काय ? त्या भाषेचे व्याकरण, वापरात नसलेले शब्द- हे लोकांना येत नाही. भाषा म्हणजे फक्त शब्द नसते ना, त्यात व्याकरण आले की. तुम्ही वेगळ्या अर्थाने व्याप्ती शब्द वापरत आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. राष्ट्रभाषा म्हणजे काय हे माहित नसल्याने हिंदीला राष्ट्रभाषा करा असा माझा आग्रह सोडा, इच्छा सुद्धा नाही. सेकंडरी भाषा हिंदी वापरा असे शहा म्हणतात. सेकंडरी भाषा कशासाठी हवीय हेच तुम्ही लक्षात घेत नाही आहात. स्थानिक भाषा ज्यांना येत नाही, त्यांची सोय म्हणून दुसरी एक भाषा कोणती असावी ? तर जी जास्तीत जास्त लोकांना येते ती असावी. संस्कृत तरी कुठे येती त्यांना ! त्यामुळे ज्यांना मराठी येत नाही त्यांना संस्कृत मध्ये कागदपत्रे द्या हे मूर्खपणाचे नाहीये काय ?
पण म्हणून अरबी,फार्सीने भरलेली उर्दुछाप हिंदी ही देशाची भाषा राष्ट्रभाषा होऊ नये.
राष्ट्रभाषा करा असा आजिबात आग्रह नाही. सेकंडरी लँग्वेज म्हणून वापरा. उर्दू अरबीने भरलेली भाषा चालत नाही, पण इंग्लिशने भरलेली इंग्लिशछाप भाषा जी फक्त १० मधल्या १ भारतीयाला येते ती मात्र चालते हे कसे ?

दुसरी भाषा इंग्रजीच हवी आणि हिंदी नको असा धागाकर्ते आणि इतर काही प्रतिसादकांचा आग्रह आहे. धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय. तर्कवादी, उपायोजक व अमरेंद्र बाहूबली यांची मते बदलणार नाहीत हे ठाऊक असूनही इतरांकरिता - पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल? म्हणजे गरीब / ज्यांना इंग्रजी ज्ञान नाही असे मजूर वर्गातले दक्षिण भारतीय लोक देखील स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हिंदीचा आधार घेतातच. एलिट क्लासचे दक्षिण भारतीय लोक देखील हिंदीच्या आधारावर पैसा कमावतातच. वर मी लिहिलेल्या https://www.misalpav.com/comment/1138188#comment-1138188 या प्रतिसादातील
प्रत्येकाला इंग्रजी शिकणे अवघड आहे त्यापेक्षा हिंदी सोपी आहे. आणि इतकंच आहे तर दक्षिणी भाषेतील चित्रपट मूळ भाषेसोबत फक्त इंग्रजीतच डब करावेत पण नाही ते तर हिंदी प्रमाणेच आता तर थेट भोजपूरीत देखील डब होतात. कारण काय तर ह्या उत्तर भारतीयांच्या खिशातून पैसे हवे आहेत तर मग त्यांच्यापर्यंत पोचायला त्यांच्या भाषेत संवाद साधायला मग या दाक्षिणात्यांचा भाषाभिमान आड येत नाही का? बाहूबली तुमचा सिनेमा जर फक्त स्थानिक + इंग्रजी भाषेत आणला असता तर इतका प्रचंड व्यवसाय करु शकला असता का? हिंदीत असल्यामुळेच उत्तर भारतातही तो पाहिला गेला. त्यांना जर दाक्षिणात्यांचा द्वेष असता तर त्यांनी सरसकट सर्वच दक्षिण भारतीय चित्रपटांवर ते हिंदीत डब असले तरीही बहिष्कार टाकला असता.
या विधानांचा अजूनतरी कोणी प्रतिवाद केलेला नाहीये. यापूर्वी एका प्रतिसादात ए आर रहमान यांचा उल्लेख आला आहे. त्यांनी देखील डब्ड तसेच स्वतंत्र हिंदी चित्रपटांना संगीत दिल्यानेच अधिक यश कमावले. ज्या गीताकरिता ते आंतराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचले ते गीत देखील हिंदी भाषेत आहे. The soundtrack won the Golden Globe Award for Best Original Score, BAFTA Award for Best Film Music, and two Academy Awards, one for Best Original Music Score and the other for Best Original Song for "Jai Ho". The soundtrack has also won two Grammy Awards, one for the album itself and another for the song "Jai Ho". The latter song would be reworked by Ron Fair and The Pussycat Dolls into an English language adaptation "Jai Ho! (You Are My Destiny)" which would go on to become and international hit for the group. https://en.wikipedia.org/wiki/Slumdog_Millionaire:_Music_from_the_Motio… दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेय. महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे. दक्षिण भारतीयांच्या नादाला लागून महाराष्ट्राने असा विरोध करु नये. दक्षिण भारतीय महाराष्ट्र आणि मुंबईत राहूनही त्यांच्या भाषेचे दडपण आणून सिनेमाचालकांना इथे त्यांच्या स्थानिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित करायला लावतात. चैन्नई / कोचीमध्ये मराठी चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित होतात का? इतकेच काय पण डीडी डायरेक्ट प्लस ने सर्व भाषांतील काही मोफत वाहिन्यांचे देशभर प्रसारण केले आहे. जेणेकरुन आपण देशाच्या कोणत्याही भागात असलो तरी आपल्या स्थानिक भाषेचे कार्यक्रम तिथे बसून पाहू शकतो. असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? मी त्यांच्याशी किंवा अशा सर्वांशी मराठीतच बोलतो व ते त्यांना समजतं. मी कोणाशीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्रात सर्वांशी मराठीत व महाराष्ट्राबाहेर इंग्लिशमध्ये बोलतो.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल? हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल? हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.

In reply to by उपयोजक

हा फारच वैयक्तिक आणि तद्दन चूकीचा प्रतिसाद आहे. माझा जन्म महाराष्ट्रातला आणि आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो. ती लिहिता देखील येत नाही. दहावीपर्यंत मराठी माध्यमात सर्व विषयांचे शिक्षण घेतल्याने लिहायला वाचायला व बोलायला आणि एकूणातच व्यक्त व्हायला मला सर्वात सोपी मराठीच वाटते. इथे मिसळपाव वरच मी कितीतरी मराठी भाषेत लेख लिहिले आहेत. हिंदीत तर एक सुद्धा नाहीये. पण जर मराठी कुठे चालत नसेल तर मग तोंडी संभाषणास दुसरा पर्याय हिंदी आणि तिसरा पर्याय नाईलाजास्तव इंग्रजी असा प्राधान्यक्रम आहे. भाषिय त्रिसूत्री.
मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.
या आरोपाबद्दल बोलायचे तर मी इंग्रजी ऐवजी हिंदी ही बाजू लावून धरलीय मराठी ऐवजी हिंदी अशी नाही. तरी ही असा आरोप होत असेल तर मात्र जे हिंदी ऐवजी इंग्रजी अशी बाजू लावून धरत आहेत त्यांच्यावर
तुम्ही मूळचे भारतीय असूच शकत नाही अजुनही इंग्रजी गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकले असल्याने तुम्हाला इंग्रजी या परक्या भाषेबद्दल जितकी आत्मियता वाटते तितकी हिंदी या भारतीय भाषेबद्दल नाही.
असा आरोप करावा काय? पण असा आरोप मी करणार नाही कदाचित माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती व मग मूळतः व्यवहारात मराठीला मी प्राधान्य न देता सरसकट इंग्रजीचा वापर केला असता तरीही माझ्यावर असला गचाळ आरोप आला नसता.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो. चारशे वर्ष झाले महाराष्ट्रात येऊन तरी देखील तुम्ही घरात मारवाडीच बोलतात. म्हणजे ४०० वर्षांपासून तुम्ही तुमची मुळ भाषआ जपून ठेवलीय. घरात मराठी बोलावीशी वाटत नाही कारण ती तुमची मातृभाषा नाही. त्यामुळेच मा बोललो का तुम्हाला मराठी विषयी आत्मियता नाही. जशी तुम्हाला मारवाडी प्रिय तशी आम्हाला मराठी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अतिशय चुकीचा प्रतिसाद ! चेतन गुगळे हे इथे व्यवस्थित व मुद्देसुद प्रतिसाद देत आहेत. त्यांचा मुद्दा चुकीचा की बरोबर तो वेगळा भाग होऊ शकतो. त्यांच्या मराठीप्रेमाबद्द्ल शंका घेण्याचे कारण दिसत नाही. घरात मारवाडी बोलतात त्यात टीका करण्यासारखे काही नाही. प्रत्येकाने आपली मातृभाषा जपलीच पाहिजे. मारवाडी समाज महाराष्ट्रातील अनेक छोट्या छोट्या गावांत फार पुर्वीपासून वास्तव्यास आहे आणि त्यांनी तेथील बोलीभाषा आणि रितीरिवाज आत्मसात केलेले मी स्वतः पाहिलेले आहे. जर ते घरात आपली मातृभाषा जपतात तर तो त्यांचा हक्क आहे. आपले असे तोडून टाकणारे आणि हेटाळणीचे प्रतिसादच तर इतर भाषिकांच्या मनात मराठी माणूस आणि मराठी भाषेविषयी अढी / तिरस्कार उत्पन्न करत नाहित ना याचा विचार करणे गरजेचे आहे. कृपया वैयक्तीक टीका टाळावी ही विनंती.

In reply to by धर्मराजमुटके

पुण्यात मी पाहतोय. पिढ्यानप्ढ्या राहनारे किराणा दुकान चालवनारे मारवाडी लोक दुकानात कामगारांशी मारवाडीतच बोलतात, गिर्हाईक मराठीत बोलत असेल तरी जाणून बूजून हिंदीतच बोलतात. तेयांना महाराष्ट्र नी मराठी ह्याशा काही घेणंदेणं नसतं. ते फक्त “पैसा कमावणासाठी” आलेले असतात. चेसुगू सरांनी वर सांगीतलंच आहे की ते घरात मराठी बोलत नाहीत मारवाडी बोलतात महाराष्ट्रात येऊन ४०० वर्ष झाले तरी. तब्बल चारशे वर्ष जाऊनही त्यांची मातृभाषआ मारवाडीच राहत असेल तर ह्याला काय म्हणावे? मध्यप्रदेशात मा अनेक मराठी आडनावाची लोक पाहीलात ज्याना मराठीचा गंधही नव्हता कारण त्यांची मातृभाषाकधीच बदलली. चेसूगु सरांचा हेका हाच आहे की हिंदी ला राष्ट्रभाषा करावी. काही दिवसानी ते म्हणताल की मराठी तसंही कुणी बोलत नाही आता महाराष्ट्राची भाषआ हिंदी करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

फारच हीन पातळीवरचा व्यक्तिगत प्रतिसाद. आमचे आडनाव देखील बदलले. गुगलिया हे आडनाव जाऊन इथे जसे सांगळे, जगदाळे असे एकारांत आडनाव आहे त्याप्रमाणे ते गुगळे झाले. पण तरीही घरातील भाषा कशी बदलेल? कित्येक मराठी कुटुंबीय इदौर ला आहेत आणि ते पिढ्यान पिढ्या मराठीच बोलतात हे ठाऊक आहे का तुम्हाला? मराठी विरोधात हिंदी मी कधीच आणलेली नाही पण तुम्ही हिंदी विरोधात इंग्रजी थोपताय म्हणजे अम्रेंद्र बाहुबली हे असे नाव घेण्यावरुनच (मराठी पात्राचे घेणे नाव का सूचले नाही तुम्हाला?) तुम्ही स्वतःच इंग्रजधार्जिणे गुलाम मनोवृत्तीचे दक्षिण भारतीय भाषिक असण्याची मला खात्री पटत चालली आहे.

In reply to by कॉमी

हे आभार मुद्दाम इथे नमूद करतो आहे कारण बरेचदा लोक दोन जणांचा वाद पाहतात पण तरीही बरोबर असणार्‍याची बाजू घेत नाहीत कारण एक तर मला काय त्याचे ही वृत्ती किंवा मग त्या दुसर्‍या आक्रमक व्यक्तिची भीती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्री गुगळे ह्यांच्यावर अशी टिका करण्याचे कोणतीहे कारण नव्हते. श्री गुगळे यांनी बरीच तात्वीक भांडणे केल्याचे मला माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या मुळ उद्देशावर शंका नक्कीच नाही. आज तर त्यांनी मारवाडी इतिहास सांगितला नसता तर त्यांचे मुळ कोणालाच कळले नसते. ------------ श्री बाहुबली, कदाचित तुम्हाला श्री गुगळे यांचे कडे दोन भाषीक पर्याय (मराठी आणि मारवाडी) उपलब्ध आहेत आणि तुमच्याकडे फक्त एकच मराठी भाषेचा पर्याय आहे. आणि राजस्थानी व गुजराती अगदी स्वतःच्या भाषेपेक्षा हिंदीला प्राधान्य देताना दिसतात. श्री अमित शहा गुजरातचे रहिवासी आहेत. ह्या सर्व गोष्टीमुळे मुळे अशी शंका आली असावी.

In reply to by Trump

गुजराती,मारवाडी हिंदी भाषेला प्राधान्य देतात हे चुकीचे असावे. गुजराती,मारवाडी जे दुसऱ्या देशात राहतात,दुसऱ्या राज्यात राहतात तेच गुजराती मारवाडी हिंदी चे सर्मथन करतात ते पण त्यांच्या सोयीसाठी. कारण ते स्वतः दुसऱ्या राज्यात ,देशात असतात. गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत. अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.

In reply to by Trump

गुजराती,मारवाडी हिंदी भाषेला प्राधान्य देतात हे चुकीचे असावे. गुजराती,मारवाडी जे दुसऱ्या देशात राहतात,दुसऱ्या राज्यात राहतात तेच गुजराती मारवाडी हिंदी चे सर्मथन करतात ते पण त्यांच्या सोयीसाठी. कारण ते स्वतः दुसऱ्या राज्यात ,देशात असतात. गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत. अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.

In reply to by sunil kachure

गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत. अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.
हा तुमचा अंदाज चूकीचा आहे. गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आमच्या राज्यात आला आहात तर फक्त आमच्या स्थानिक भाषेतच नाहीतर इंग्रजीतच बोला अशी दमदाटी गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा या राज्यांत होत नाही हे स्वानुभावरुन सांगतो.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मला

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मला

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तर ते ही हिंदीत बोलतात असा माझा अनुभव आहे. येत नसेल तरी मोडक्या तोडक्या हिंदीत बोलायचा प्रयत्न करतात !

In reply to by चौथा कोनाडा

काहीच वर्षापूर्वी गुजरात मध्ये उत्तर भारतीय लोकांना हाकलून देण्यासाठी हिंसक आंदोलन झाले हे विसरलात का,?

In reply to by sunil kachure

त्याचा पार्श्वभुमी वेगळी होती, संदर्भ वेगळा होता, असे मुद्दे राजकिय पातळीवर नेऊन त्याचे राजकारण करण्याची Background : The 14-months old girl from a Thakor community was allegedly raped by a migrant labourer from Bihar on 28 September 2018.[1][2] He worked at the ceramic factory at Dhundhar village near Himmatnagar, Sabarkantha district in north Gujarat where the incident took place.[1][3] He was arrested by the police next day. It angered the Thakor community which held protests across Gujarat. बलात्काराच्या पार्श्वभुमीवर पीडतांना न्याय देण्यासाठी काँग्रेस नेत्याने उपोषण करून स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळण्यासाठी आंदोलन सुरु केले. त्यात भाषिक वादा पेक्षा "स्थानिकांना रोजगार" हा मुद्दा होता.

In reply to by Trump

माझं मराठी वाचून आणि ऐकून अनोळखी माणसाला मी सांगेपर्यंत कधीच कळत नाही की मारवाडी भाषिक आहे म्हणून .... गुगळे आडनावामुळे मला काय काय अनुभव आले ते कदाचित इथे अस्थानी वाटतील पण तरीही त्यातले काही मांडतो. दहावीला पी जोग क्लास मध्ये शिकत असताना इंग्रजी भाषेच्या शिक्षिकेने माझा टेस्ट पेपर मला देताना कोपर्‍यात दोन बोटांच्या चिमटीत एखादी किळसवाणी वस्तू धरावी तस धरून उचलला वर "गुगळे? ई.. काय बाई लोकांची आडनावं असतात!" असे उद्गार काढले होते. ती मला काय समजली होती ते काही मला कळले नाही. पुढे डोंबिवलीतल्या लॉजवर एका तत्वज्ञानावर वादविवादाची हौस असलेल्या एका गृहस्थाने आस्तिक नास्तिक चर्चेत माझ्याबरोबर वाद घालताना माझं मराठी ऐकून मला "गुगळे म्हणजे तुम्ही नक्की कोण हो?" असे अगदी कुतूहलाने विचारले. मी नेमका कोण हे सुरुवातीला सांगितलेच नाही तरी पुन्हा हट्ट करुन स्वतःच्या एका खांद्यावरुन खाली तिरका हात करत तुम्ही एअरिअल वाले का? असे पुन्हा विचारले. मी ऐरिअल वाला नाही असे सांगितल्यावर मग पुन्हा कोणचा हट्टच धरल्यावर जैन मारवाडी सांगितले तर त्याचा कितीतरी वेळ विश्वासच बसला नाही. तुम्ही सदाशिव पेठीच असणार असं मला वाटलं असं पुन्हा पुन्हा म्हणत होता. मराठीसोबत माझ्यासारख्या मूळ अमराठी माणसाने इतकी आत्मीयता दाखविल्यावरही हे आरोप होणार असतील तर कोण अमराठी भाषिक मराठी कधीतरी शिकेल काय?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हिंदी भाषेने मराठीचे बरेच नुकसान केले आहे. शिवाय ही ज्यांची मातृभाषा आहे त्या गायपट्ट्यसतले लोक महाराष्ट्रात सगळीकडे घुसून लोकसंख्या वाढवत आहेत. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी पे स्केल चांगले असणार्‍या नोकर्‍यांवर हे हिंदीभाषिक आहेत. रस्त्यांवर हातगाड्यांवर व्यवसाय करणारे भय्ये तर भरमसाठ आहेत. विदर्भात आधीच हिंदीला पायघड्या आहेत,मोठ्या शहरांमधे हिंदी ही मराठीला पर्याय म्हणून उभी राहतेय. आधी स्थानिक भाषेचा खून,भेसळ आणि त्यावर रोजगार हिसकावणे हे प्रकार या हिंदीभाषिकांमुळे घडत आहेत. हिंदीला अजून बळ मिळाले तर तिची मराठीसोबत भेसळ अजून होईल. यामुळे मराठी समृद्ध न होता ती धेडगुजरी होईल. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात आणि दक्षिणी राज्यांमधे हिंदीविरोध वाढता आहे. देशभर हिंदी पसरवण्यापेक्षा ज्या राज्यांची ही अधिकृत भाषा आहे त्यांचा विकास का केला जात नाही? जेणेकरुन असे ज्या राज्यात राहतात तिथली भाषा न शिकणारे भाषिक कृतघ्न महाराष्ट्रात येणे थांबेल.

In reply to by उपयोजक

हिंदी भाषेने मराठीचे बरेच नुकसान केले आहे.
इंग्रजीने जास्त केले आहे.
शिवाय ही ज्यांची मातृभाषा आहे त्या गायपट्ट्यसतले लोक महाराष्ट्रात सगळीकडे घुसून लोकसंख्या वाढवत आहेत. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी पे स्केल चांगले असणार्‍या नोकर्‍यांवर हे हिंदीभाषिक आहेत.
दक्षिण भारतीयांनीच जास्त नोकर्‍या बळकावल्या आहेत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हे जुने झाले आता दक्षिण भारत खूप प्रगती करत आहे. खूप नोकऱ्या तिकडे निर्माण झाल्या आहेत.. मुंबई मधील शेट्टी लोकांच्या बार मध्ये आता कन्नड waiter नाहीत.. सर्व बिमरू राज्यातील आहेत . पण आजुन पण हिंदी भाषिक राज्य..राजस्थान,यूपी,बिहार mp आहे तिथेच आहेत मागास.... ह्या राज्य मुळे भारत प्रगत देशांच्या यादीत येत नाही.

In reply to by sunil kachure

मुंबई मधील शेट्टी लोकांच्या बार मध्ये आता कन्नड waiter नाहीत..
इतक्या कमी उत्पन्नावर त्यांचं लक्ष नाही. साहेबाचा पीए वगैरेंसारख्या मोठ्या मिळकतीची पदे त्यांनी बळकावली आहेत मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत. मराठी भाषेचा आणि मराठी जनांचा हेच जास्त अपमान आणि दु:स्वास करतात उत्तर भारतीयांपेक्षाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती. म्हणजे योग्य काय यावर विचार न करता तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!

In reply to by उपयोजक

तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!
मुद्दा कळला नाही की कळूनही न कळल्याचा आव आणताय? ठळक केलेले शब्दच महत्त्वाचे आहेत कारण तेच भाषेचे भवितव्य ठरविणार आहेत.
माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.
या शब्दांमधून मला हे सांगायचे आहे की मराठी माध्यमात शिकल्याने माझे मराठी उत्तम आहे पण परिणामस्वरुप इंग्रजी कच्चे. जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी. म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले. याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही. पण आता हिंदी ऐवजी इंग्रजी सक्ती अशीच होत राहिली तर पालक मुलांना टाकणार इंग्रजी माध्यमात. आता याच्या परिणामी मुलांचे मराठी कच्चे राहणार म्हणजे अंतिमतः इंग्रजी आग्रह मराठीलाच भविष्यात बुडविणार.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी. मला हिंदीपेक्षा इंग्लिश खूप सोपी वाटते. म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले. मी जन्मतःच मराठी आहे. याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही. चुकीचे गृहीतक आहे. मी बालवाडीपासून १० पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो व मला मराठी उत्तम येते. परंतु हिंदीच्या तुलनेत इंग्लिश खूपच सोपी वाटते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय. तुम्ही तुमचा हेका सोडत नाही.मग इतरांनी त्यांचा हेका का सोडावा?

In reply to by उपयोजक

उपायोजक धागा तुम्हीच काढलाय ना? मग तुमचे मत तुम्ही धाग्यात मांडलेच आहे. काथ्याकूट करायचा असेल तर विरोधी मत स्वीकारा की. तुमचीच री ओढायची असेल तर मग तुमच्या धाग्यावर मी फक्त तुम्हाला सहमती दर्शवायला येईन चर्चा तेव्हाच होईल जेव्हा मी वेगळे मत मांडेन.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

विरोधी मतांचा आदर असू शकतो ते स्विकारायचं का नाकारायचं ते ती व्यक्ती ठरवेल. मी तुम्ही हिंदीला विरोध केलाच पाहिजे असा कुठे आग्रह धरलाय? मी माझीच मतं मांडतोय. आणि ती हिंदीविरोधी असल्याने तुम्ही चिडलात. कारण ती मते तुमच्या मताच्या विरोधी आहेत म्हणून. म्हणून तर रागारागात लिहिलंत 'आधीच निष्कर्ष काढलाय म्हणून'. तुमचं मत स्विकारलं की मगच मान्य करणार चर्चा होतेय हे?

In reply to by उपयोजक

वैयक्तिक घाणेरडा आरोप करणारे प्रतिसाद वगळता इतर प्रतिसादांना मी संताप व्यक्त केलेला नाहीये.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेय
माझ्यामते विरोध हिंदीला नाही.. हिंदीच्या सक्तीला आहे. दोन्ही गोष्टीत फरक आहे.
महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे.
पुन्हा एकदा - हिंदी विरोध आताही नाही आणि नसावा... हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रात येवून वर्षानुवर्षे "क्यो सीखनी है हमे मराठी ?" अशा मग्रुरीला - एखाद्या घोळक्यात एखादाच हिंदी भाषिक असूनही इतर मराठी भाषिक मराठीत गप्पा मारु (मी अनौपचारिक गप्पा म्हणतोय हं.. कार्यालयीन बैठकी नाही) लागल्यावर "अरे यार.. हिंदी मे बात करो ना" म्हणत तक्रारीचा सूर लावण्याला विरोध आहे. म्हणजे हिंदी भाषिकांसमोर मराठी बोलणं म्हणजे गुन्हाच झाला का ? याबद्दल काय म्हणणे आहे ? बाकी आर्थिक फायदा असेल तर मी फ्रेंच भाषेतही एखादा व्हिडिओ वा एखादे लेखन प्रसिद्ध करेन --किंवा माझी व्यक्तिगत आवड म्हणूनही शिकेन ...पण म्हणून कुणी फ्रेंच भाषा सक्तीची केली तर मी कडाडून विरोध करेन.. हा दुटप्पीपणा नसून निवडीचा अधिकार आहे. माझे हिंदी भाषिक मित्र आहेत, मी त्यांच्याशी हिंदीत बोलतो, मी हिंदी चित्रपट, मालिका व गाणी बघतो.. पण ही माझी निवड आहे. .. उद्या कुणी मराठी चित्रपटांवर बंदी घातली तर मी कडाडून विरोध करणारच.
असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?
माझा चन्नईजवळ महिंद्रासिटीत अल्पकाळ वास्तव्यातला अनुभव आहे.. तिथे एका सर्विस अपार्टमेंटमध्ये माझी राहण्याची सोय माझ्या कंपनीकडून करण्यात आलेली होती. त्यावेळी मला काही मराठी मालिका बघण्याची सवय होती. पण तिथल्या टाटा स्काय वर त्या वाहिन्या दिसत नसल्याने मी त्यांच्या मॅनेजरला फोन केला असता तिने दहा मिनटात मराठी पॅक जोडून माझी सोय केली.

इन्ग्रजी ऐवजी हिन्दी वापरा असे म्हणाले आहेत. याचा अर्थ आम्ही तरी जर दोन भिन्नभाषिकाना एकेमेकान्च्या भाषा येत नसतिल तर इन्ग्रजी मधुन बोलण्याऐवजी हिन्दी वापरावे असा घेतला आहे. यात इतके राजकारण होण्याचे एकच कारण आहे की महाराष्ट्र जर दक्शिणेच्या राज्यान्सारखा भाषाअस्मिता वादी झाला तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली... पुढची पायरी काय असणार आहे ते देखिल दिसते आहे. या पुर्वीच शेन्डी जानव्याचे राजकारण आम्ही करणार नाही असे मामु म्हणाले आहेतच. https://www.newindianexpress.com/nation/2021/oct/18/granddads-soft-hind… तेव्हा तामिळनाडु च्या भाषिक अस्मितेबरोबर तिथुन अजुन पाठ घेतले जात आहेत ते दिसते आहे. दक्शिणी भाषान्सारखा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणुन प्रयत्न चालु आहेत. शिवाय मराठी सन्स्क्रुतोद्भव नाही असे म्हणणे माण्डणे चालु आहे. https://indianexpress.com/article/cities/mumbai/marathi-language-has-no… ह्म्म चालायचेच. पण भारताला परवडणार आहे का नस्ती भाषिक भान्डणे? आपण आधीच जातीपाती मध्ये खुप विभागले गेले आहोत त्यात भाषेची भर कशाला?

In reply to by सुखीमाणूस

शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली... शिवसेनेला विरोध म्हणून अनेक भाजप समर्थक मराठीला विरोध करतात. तेयांचा कडे पाहून रडावे की हसावे ते च कळत नाही. हियाबाबत श्रिगुरूजींकडे भाजपेयींनी पहावे, ते सेना विरोधी असूनही कट्टर मराठीवादी आहेत. मराठी मुंबई म्हटलं का सेना आठवते ह्यातच सेनेचं कर्त्तृत्व दिसतं.

धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.
सहमत आहे. तसेही प्रत्येकाची मते ठरलेली असतात. कोणी चर्चेमुळे आपले मत बदलत नाही. त्यामुळे कोणत्याही ठराविक आय डीं ना दोष देता येत नाही. धागा कोणत्याही सदराखाली काढला तरी त्याकडे केवळ मौजमजा म्हणून पहावे. असेही जालावर लिहिणारे बहुसंख्यांचे पोटापाण्याचे प्रश्न तीव्र नसणारे असतात आणि ज्यांना त्याची भ्रांत आहे त्यांच्याकडे चर्चा करण्याइतका वेळ, वकूब आणि उत्साह नसतो. पुर्वी मलाही अशा चर्चा वाचून आपणही काहितरी लिहावे असा हुरुप येत असे पण आता हे सगळे नको वाटते. लिहिणार्‍यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे किंवा केवळ वाचनमात्र राहणे ही त्यातल्या त्यात सुखासिन पर्याय आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

लिहिणार्‍यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे म्हणजे आधी लिहावं म्हणून प्रोत्साहन द्यायचं नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं. चांगलंय. चालू द्या. :(

In reply to by धनावडे

इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??
का बरे ऐकावे ? समालोचन इंग्रजी मधे उपलब्ध आहे ना ? हिंदी मधून ऐकायचे नाही एवढाच तर विषय आहे ना ?

स्थानिक भाषा, हिंदी,इंग्लिश ह्या तीन भाषा शिकण्याची काय गरज आहे.उगाच टाईम वाया जातो. त्या पेक्षा स्थानिक भाषा आणि इंग्लिश ह्या दोनच भाषा आल्या खूप झाल्या . हिंदी च गरज नाही. इंग्लिश अशी पण जागतिक भाषा आहे आणि भारताची संपर्क भाषा पण होईल. इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची संख्या आता कमी असेल पण वाढेल दहा वर्षात. हिंदी भाषा नकोच. कशाला हवी.

In reply to by sunil kachure

स्थानिक भाषा, हिंदी,इंग्लिश ह्या तीन भाषा शिकण्याची काय गरज आहे.उगाच टाईम वाया जातो.
बरोबर आहे. शिवाय स्थानिक भाषा (उदा. मराठी) पण व्याकरणासहित शिकण्याची आवश्यकता नाही. पुर्ण वाक्यात एखाद दुसरा मराठी शब्द असला आणि बाकी इंग्रजी शब्द असले तरी चालून जाण्यासारखे आहे. उदा.उगाच टाईम (वेळ) वाया जातो. शिवाय विरामचिन्हे खाल्ली तरी चालतात. उदा. कशाला हवी. (?)
इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची संख्या आता कमी असेल पण वाढेल दहा वर्षात.
ह्याबद्द्ल प्रचंड सहमत. आताही इंग्रजी शाळेत जाणारी मराठी मुले आणि त्यांचे पालक आपापसात हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. त्यामुळे इंग्रजी (सॉरी इंग्लिश) बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणार ह्याबद्द्ल सहमत आहे.

हिंदी एक भारतीय भाषा आणि त्यातही मोठ्या लोकसंख्ये कडून बोलली जाणारी भाषा असली तरी तिला राष्ट्रीय भाषा मानण्यास नकार देतात तेच मूठभर इंग्रजांच्या भाषेला निमूटपणे आंतरराष्ट्रीय भाषा का मानतात?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील भारतीय जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते हिंदीत बोलतात की स्थानिक भाषेत बोलतात की मूठभर इंग्रजांची भाषा असलेल्या इंग्रजीत बोलतात?

In reply to by सतिश गावडे

परदेश म्हणजे कोणता देश? अमेरिका ब्रिटन जपान रशिया चीन तैवान जर्मनी फ्रान्स इटली वरील सर्व आणि इतरही अनेक (फार मोठी यादी होईल) देशांत भारतीय जातात /आहेत. या फार मोठ्या यादीतील मूठभर देशांत मूठभर इंग्रजांची भाषा असलेल्या इंग्रजीत बोलतात.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुम्ही माझ्या प्रतिसादातील स्थानिक शब्दाला बगल दिलीत म्हणून मूठभर शब्द पुन्हा वापरता आला. माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा बरं :)

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुम्ही प्रश्नाला सोयीस्कर बगल देत आहात म्हणून पुन्हा विचारतो: हिंदी भाषिक भारतीय इंग्रजी न बोलणाऱ्या देशात जेव्हा जातो तेव्हा तो इतरांकडून त्याच्याशी हिंदीत बोलावी अपेक्षा ठेवतो की तो इतरांशी इंग्रजीत/त्या देशाच्या भाषेत बोलतो?

In reply to by सतिश गावडे

या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय आहे? तुमच्या उत्तरानंतर मी माझं उत्तर नक्कीच देईन.

संपर्क भाषा म्हणून भारतात बऱ्या पैकी जास्त बोलणारी भाषा म्हणून हिंदी स्वीकारावी. फक्त भारतातील लोकांस एकमेकाशी संपर्क साधण्यास काही अडचण येवू नये. हा साफ हेतू असता तर लोक विरोध करणार नाहीत. का करतील पण हिंदी भाषा ही देशाची भाषा असावी असे संसदेत,मीडिया मध्ये बोलणे ह्या मागे राजकारण आहे.राजकीय हेतू आहेत.बाकी भारतीय भाषा चा कायदेशीर मार्गनी खून करण्याचा डाव आहे. मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा. असे पण हिंदी आणि मराठी मध्ये जास्त फरक नाही हिंदी वाले मान्य करतील का बघा.

मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा.
नक्की. इथे एक मराठी भाषक हिंदी ऐवजी तेलुगू भाषा सगळ्या भारतभर संपर्क भाषा म्हणून चालेल असे लिहितात.
असे पण हिंदी आणि मराठी मध्ये जास्त फरक नाही.
आहे ना. खुप फरक आहे. मराठी वाले मराठी सोडून हिंदी, इंग्रजी भाषा बोलण्यास जास्त उत्सुक असतात हा मोठा फरक आहे.
हिंदी वाले मान्य करतील का बघा.
हिंदी वाले मान्य करतील काय ते पण बघा आणि तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी पण मराठीला राष्ट्रभाषा म्हणून मान्य करतील काय ते पण विचारा.

अमितजींच्या मूळ आवाहनाला जोरदार विरोध केला आहे तो तमिळ भाषिकांनी. याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली. एका दहशतवादी संघटनेच्या नावातच यांच्या भाषेच्या नावाचा शब्द आहे आणि त्या संघटनेचे सदस्य जे आपल्या माजी पंतप्रधानांचे मारेकरी आहेत त्यांना फाशी द्यायचा विषय काढला तरी हे रस्त्यावर उतरुन हिंसक कारवाया करतात त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? यांचा नेता मेला / तुरुंगात गेला तरी हे सामूहिक आत्महत्या वगैरे करतात. यांना फार मोठ्या समुपदेशनाची व मानसिक उपचारांची गरज आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली. अत्यंत चुकीची माहिती आहे. श्रीलंकेतील लिट्टे, तुल्फ व इतर तामिळ संघटनांनी सुरू केलेला सशस्त्र लढा हा फक्त भाषेशी निगडीत नव्हता. किंबहुना भाषा हे त्यामागील एक अत्यंत दुय्यम कारण आहे. वंशभेद, तामिळांवरील अत्याचार व अन्याय, वारंवार झालेली तामिळ नागरिकांची हत्याकांडे यामुळे हा सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता.

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे एखादा हिंदी भाषीक सहज मान्य करतो पण मराठी माणूस आजीबात मान्य करत नाही. असा नेभळटपणा मराठी माणसांत का असतो?

याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता अर्धवट माहिती आहे तुम्हाला.

In reply to by उपयोजक

तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर द्या की असली एकवाक्याची पिंक टाकू नका. आणि कृपया मला चेगु हे संबोधन वापरु नका. मला आवडत नाही. तुम्ही हवे असल्यास माझे नाव / नाव + आडनाव / नुसतेच आडनाव किंवा तिन्ही एकत्र असे संबोधा. टाईप करायला जड जात असल्यास कॉपी पेस्ट करा पण नावा आडनावातील एकएक अक्षरे घेऊन संबोधन नकोय.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

https://en.m.wikipedia.org/wiki/Burning_of_Jaffna_Public_Library हे वाचा. मग कळेल दुष्ट कोण ते. श्रीलंकेतले तमिळभाषिक की सिंहलीभाषिक श्रीलंकन सरकार?

In reply to by उपयोजक

https://en.wikipedia.org/wiki/Liberation_Tigers_of_Tamil_Eelam The LTTE has been designated as a terrorist organisation by 33 countries, including the European Union, Canada, the United States, and India.[15] सिंहली तमिळ या भाषिक संघर्षात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या देशात आणि इतरत्रदेखील अतिरिकी कारवाया रक्तपात हिंसाचार केला. भारतीया माजी पंतप्रधानांची हत्या केली याचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येणारच नाही. आणि अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्‍यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारण? तमिळ लोक स्वतःला आधी तमिळ आणि मग भारतीय (?) समजतात. हा विभाजनवादी प्रवृत्ती आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्‍यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारण लिट्टे ज्यामुळे स्थापन झाली त्या श्रीलंकन सरकारच्या अत्याचारांबद्दल आणि भारताने या वादात तमिळ लोकांना काहीही मदत केली नाही याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीये. श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.