Skip to main content

द काश्मीर फाइल्स

लेखक निनाद यांनी बुधवार, 09/03/2022 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचने 94191
प्रतिक्रिया 327

प्रतिक्रिया

चित्रपटाचा ट्रेलर येथे पाहता येईल चित्रपट जरूर पहावा असा असणार आहे.

६ मार्च रोजी, दिल्लीमध्ये काश्मीर फाइल्सचे प्री-रिलीझ स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. समाजातील अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना तसेच काश्मिरी हिंदूंना स्क्रीनिंगसाठी आमंत्रित करण्यात आले होते. काश्मीर मधील नरसंहाराच्या क्रूर कथेची मांडणी भिडणारी आहे असे मत श्री ढिल्लन यांनी व्यक्त केले आहे.

इंडिया टुडे चा लेख म्हणतो की, या अशा कथा आहेत ज्या सांगायला हव्यात. फुटीरतावाद्यांसाठी कितीही कडवट असले तरी हे सत्य सांगितले पहिजे! फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा चिन्मय मांडलेकरने उत्तमपणे साकारली आहे. या बिट्टाने काश्मिरी हिंदूंना अतिशय क्रूरपणे हालहाल करून मारल्याची उघडपणे कबुली दिली असतानाही काश्मिरी वाटाघाटीसाठी याला बोलावले जात होते.

वरवर वाटणारे स्थानिक प्रश्न देशाच्या एकता आणी अखंडतेवर जबरदस्त परीणाम करतात.पंजाब,असम किंवा काश्मीर याची झळ इतर प्रदेश, राज्यातील लोकांपर्यंत पोहोचत नाही.आजही कशमीरी विस्थापित पंडित पुण्यातही दिसतात.कर्मधर्म संयोगाने खोर्‍यात काम करत असताना बरोबरच काम केलेले एक काश्मीरी पंडित आमच्याच काॅलोनीत राहातात जवळपास रोजच भेट होते.विस्थापित पंडितांचे दुख यावरील चर्चेत त्याचे डोळे भरून येतात. शाळेत इतीहासा बरोबरच करंट अफेअर्स पण एक विषय हवा.विषयाची व्याप्ती हळुहळू वाढवत नेली पाहिजे.याचा उपयोग स्पर्धा परीक्षेत तर होईलच पण विचार मधे सुध्दा परिपक्वता येईल आसे मला वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

शाळेत इतीहासा बरोबरच करंट अफेअर्स पण एक विषय हवा.विषयाची व्याप्ती हळुहळू वाढवत नेली पाहिजे.याचा उपयोग स्पर्धा परीक्षेत तर होईलच पण विचार मधे सुध्दा परिपक्वता येईल आसे मला वाटते.
फक्त या विषयाचा अभ्यासक्रम डिझाईन करणार्‍यांमध्ये कोणीही जनेयुवगैरे ठिकाणचे नकोत. कारण या लोकांच्या लेखी हिंदूंच्या हालअपेष्टांना शून्य किंमत असते. ३७०वे कलम रद्द केल्यानंतर काश्मीर खोर्‍यात ३-४ महिने मोबाईल इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे तिकडच्या लोकांना स्विगी आणि उबर वापरता आले नाही म्हणून गळे काढणारे पुरोगामी विचारवंत मी बघितले आहेत पण इतकी वर्षे काश्मीरी हिंदू नक्की कोणत्या स्थितीत राहात आहेत याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला असतो. त्या लोकांवर ते हिंदू आहेत या एकाच कारणाने अत्याचार करण्यात आले आहेत हे समजून यायला काही रघुराम राजन किंवा अभिजीत बॅनर्जीच्या आय.क्यू ची गरज नाही. तरीही या सेक्युलर पोपटांना ती गोष्ट दिसत नाही. त्यामुळे असले घाणेरडे लोक अभ्यासक्रम डिझाईन करणार्‍यांमध्ये नकोत. खरं तर असले लोक कुठेच नकोत. या लोकांना आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांना जोपर्यंत मान मिळत आहे तोपर्यंत आपले काहीही चांगले होऊ शकणार नाही. असल्या लोकांवर कडकडीत बहिष्कार हाच मार्ग अवलंबायला हवा. काश्मीर फाईल्स हा चित्रपट असल्या लोकांच्या ढोंगाला उघडे पाडायला मदत करेल. त्यामुळे मी तो चित्रपट नक्कीच बघणार आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+11

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तथाकथिक निधर्मांधाना ते दिसते पण बोलायचे नाही.
तरीही या सेक्युलर पोपटांना ती गोष्ट दिसत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

१०१ %.
फक्त या विषयाचा अभ्यासक्रम डिझाईन करणार्‍यांमध्ये कोणीही जनेयुवगैरे ठिकाणचे नकोत
त्याच्प्रमाणे, 'आम्ही गेल्या सात वर्षांत पाठ्यक्रमांच्या पुस्तकांत एक ओळही बदललेली नाही' असली फुशारकी मारणारे बुळचट भाजपायी/ संघिष्टही अजिबात नकोत.

In reply to by प्रदीप

त्याच्प्रमाणे, 'आम्ही गेल्या सात वर्षांत पाठ्यक्रमांच्या पुस्तकांत एक ओळही बदललेली नाही' असली फुशारकी मारणारे बुळचट भाजपायी/ संघिष्टही अजिबात नकोत. १००% सहमत आहे

थोडे विषयांतर होत आहे, पहिलीच्या new find out या पुस्तकात स्पोर्ट्स स्टार म्हणून बोल्ट आणी रोनाल्डो यांची नावे व फोटो दिले आहेत. शंका नाही ते मोठे खेळाडू आहेत पण भारतीय खेळाडूंची नावे का नाहीत, निरज ,राज्यवर्धन इ. ग्रेट इंडियन्स म्हणून सावरकर, पटेल,टिळक ,फुले,आंबेडकर इ नावे दिसण्या ऐवजी इंदिरा गांधी आणी मदर टेरेसा आणी मुख्य म्हणजे फेमस अक्टर्स म्हणून शहारूख,आमीर,प्रियांका,इरफान दीपिका आणी रणबिर कपूर . कीव येते या शिक्षण तज्ञांची. आपण देशाचे भवितव्य आणी भविष्य घडवतो याचे भान दिसत नाही. आजच्या या मोबाईल पिढीला याच्या पेक्षा जास्त माहिती आहे.

देशातील जाती,धर्माच्या भिंती आर्थिक प्रगती करून पाडून टाका. इथे सर्व वास्तू इतक्या महाग आहेत की सर्वात गरीब भारतात आहेत त्यांना दोन वेळ हे जेवण पण मिळत नाही. भारत म्हणजे गरीब लोकांचा देश ही अवस्था आहे आणि राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठी rakhe . कुठल्या भलत्याच विश्वात असतात. इथे जी मुस्लिम आहेत ते असणार च आहेत. उगाच द्वेष निर्माण करू नका. सर्वांना सोबत घेवून जाणारा राजकीय पक्ष पाहिजे. आणि वेळ आली तर स्व धर्मीय असू नाही तर कुटुंबातील त्याला पण फासावर लटकवणारा नेता पाहिजे.

मी बहुतेक फक्त तिकीट काढेन, चित्रपटाला पाठिंबा म्हणून. हा चित्रपट 3 तास बघण्याची क्षमता माझ्यात असे असे मला वाटत नाही..

लवकरच बघावा लागेल, विवेक रंजन अग्निहोत्रीनं मागे काढलेल्या हू किल्ड शास्त्री ह्या विषयावर आधारित ताशकंद फाईल्सने भ्रमनिरास केला होता मजबूत, ह्या विषयात तरी तो फ्रंटफूटवर येऊन खेळला असेल अशी अपेक्षा आहे, ती पूर्ण न झाल्यास वाईट वाटेल मात्र नक्कीच.

सगळ्या तथाकथित पुरोगाम्यांना हे पचणार नाही अनुपम चोप्रा या प्रसिद्ध समीक्षक सुद्धा बघा याची समीक्षा करनार र्नाहीत किंवा केली तरी नाराजीचा सूर असणार ( त्यांचे पती वैदू विनोद हे स्वतः काश्मीर ) त्यांनी "मनकर्णिका" कडे असेच दुर्लक्ष केलं होत - तान्हाजी, बाजीराव मस्तानी, पानिपत , मनकर्णिका , मराठीतील रमा माधव, फर्जद , फत्तेशीकस्त , पावनखिंड आणि काश्मीर फाईल्स असले चित्रपट पुरोगामी सर्वधर्मभावी भारतात "बनलेच कसे " असा प्रश्न काही लोकांना पोटशूळ उठतो

In reply to by चौकस२१२

तुम्ही दिलेल्या सिनेमामुळे "पुरोगाम्यांना" काही पोटशूळ वैगेरे उठला नाही. ताशकंद फाईल्स काय पहिला नव्हता, कारण ट्रेलर पाहून भारी प्रोपोगंडा वाटला. तानाजी पहिले काही मिनिटं बघून बंद केला, अत्यंत टुकार सिनेमा वाटला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, बाजीराव मस्तानी तर सर्वप्रिय सिनेमे आहेत. खरोखर काय होते बघा- माय नेम इज खान, जोधा अकबर, पद्मावत या सिनेमांना प्रदर्शित होण्यासाठी झगडावे लागते. झुंड वर उगाचच ब्राम्हणविरोधी, विखारी म्हणून टीका होते, सैराट "मुलांना बिघडवणार" अशी टीका होते. अनुपमा चोप्राचे नाव घेतले म्हणून- ताशकंद फाईल्स वर तिच्या सहकार्याने असला बँगर रिव्यू लिहिलेला कि हसून हसून पुरेवाट झालेली. त्यावरून विवेकजी अग्निहोत्री (facts are not facts वाले) इतके तंतरेलेले कि अनुपमा चोप्राबद्दल असभ्य भाषेत ट्विट करता होते, माझ्याविरुद्ध "कुभांड" रचतायत वैगेरे रडलेले.यांच्या सिनेमाबद्दल नकारात्मक रिव्ह्यू म्हणजे "कुभांड" होय. नक्की वाचा- A second hand history lesson in third rate politics

In reply to by कॉमी

सिनेमाबद्दल नकारात्मक रिव्ह्यू म्हणजे "कुभांड" होय... असं मी म्हणत नाहीये अनुपम चोप्रा जर निपक्षपाती सिने टीकाकार पत्रकार म्हणवतात आणि तरी जाणून बुजून अश्या चित्र पटांकडे दुर्लक्ष करतात असा अनेकांचा आरोप आहे.. कारण त्यांना असेल चित्रपट जणू हिंदुत्ववाद्यांचा प्रोपोगांडा वाटतो ... राजदीप जेवहा निपक्ष पत्रकार म्हणून एकाच बाजूने ढोल बडवतो तेव्हा त्यावर जशी टीका होते तसेच आहे हे काहीसे मी उल्लेखलेलीय चित्रपट त्रुटी आणि एक चित्रपट म्हणून त्यातील काही सुमार दर्जाचे असतील हि .. अग्निहोत्रींनचा काश्मीर फाईल हा चित्रपट सुद्धा कदाचित फार भारी नसेलही .. पण त्याची दखल जेहें हे टिकाकराच कर्तव्य आहे आता बोलतो बाजीराव मस्तानी बद्दल , यांवरून माझेही "अगदी कर्मठ हिंदुत्ववाद्यांनशी वाद झाले आहेत पिंगा = मंगळागौर . त्यात काय गैर ते काय? फक्त स्त्रिया असे उत्सव खाजगीत साजरे करायायच्या कि मल्हारी: = चपखल गाणे .. पेशवे बाजराव हे केवळ खलबते करणारे नवहते तर ते सामान्य सैनिकांच्यात मिळून मिसळून , झालेलया अनोख्या ( अतरंगी ) विजयाचा आनंद साजरा करीत आहेत हे दाखवलाय .. काय गैर त्यात.. आप्ल्याला पेशवे म्हणजे फक्त छान कपडे घालून दरबारात खलबते करणारे असे बघायची सवय झालेल्याना हे पचले नाही ! .. खास करून शेवटी त्यांचे सैनिक मानवी सिहांसन करून त्यावर बाजीराव बसतो , हे एक, त्याला सर्वसामान्य सैनिकाने स्वीकारण्याचे प्रतीक असे दिग्दर्शकाला दाखवयायचे होते असे मला वाटते .... असो एकूण काय कि असे मराठा साम्राज्यवार ऐतिहसिक चित्रपट निघतील त्यात अर्थातच मुघलनचं विरुद्ध असे प्रसंग असणार कि , पोटशूळ मि म्हणले ते हे कि असे चित्रपट "निघालेच कसे आणि त्यातील काही चालेलच कसे कसे " यावर सर्व लिब्रा,,,,, वैतागलेली आहेत ( कारण त्यांना असे वाटते कि या चित्रपटातून "कोणा अल्पसंख्यान्कांच्या " भावना तर दुखावल्या जाणार नाहीत !) काश्मीर फाईल अनुल्लेखाने मारणे हा असाच एक डाव आहे ( प्रत्यक्ष चित्रपट कदाचित तेवढा भारी नसेल हि .. त्यावर टीका होऊ शकते ) एक खुलासा : अनुसुमा चोप्रा या एक प्रभावी सिने टीकाकार आहेत हे मी हि मानतो ( त्यांनी झुंड वर पण चांगली टिपण्णी केली आहे )पण त्यांचा अजेंडा एकूण काय आह त्यांच्या या अनुल्लेखाने कळते असो

In reply to by चौकस२१२

कुठला अनुल्लेख अहो ? चित्रपट (काश्मीर फाईल्स) रिलीज होण्याआधीच अग्निहोत्री चोप्राच्या नावाने रडत होता, कि माझ्या विरुद्ध कुभांड रचले म्हणे. अत्यंत असभ्य भाषेत चोप्राचा उल्लेख केलेला. त्याचे समर्थक विधु विनोद चोप्राची जात काढून "हा काष्मीरी पंडित नाहीच" असे बोलत होते. अग्निहोत्रीचे सिनेमे टोकाचे डाव्यांना बॅशिंग करणारे असतात. इतके सगळे असून अग्निहोत्रीला डाव्यांनी त्याच्या सिनेमाचे प्रोमोशन करावे वाटत असेल किंवा गोग्गोड रिव्यू लिहावे वाटत असतील तर त्याच्यासारखा येडा तोच. अग्निहोत्री कधी गुड फेथ मध्ये वागलाय का दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला ??

In reply to by कॉमी

वस्तुस्थिती दाखवली आणि डावी + इस्लामी+ तुकडे गँग यांची इकोसिसिटिम किती खोल रुजवलेली आहे हे उघडे पाडले आहे म्हणून अनुपमा चोप्राचा जळफळाट होणे साहजिक आहे आणि तुमचा ही साहजिक आहे.

In reply to by कॉमी

तुम्हाला नक्की काय म्हण्यायचाय ? भारतात हिंदूंवर अन्याय झाल्याची जी ठळक उदाहरने आहेत तयावर कलाकृती काढायायचि नाही ? भाईजान प्रेमाने एक छोट्र्या मुलीला आपला जीव धोक्यात घालून कसा सरहद पार करतो एवढेच दाखवयायचे ओवेसी परवडला , पण तुमची विचारसरणी जास्त धोक्याची

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

अवघ्या सात दिवसांत सिनेमानं केली घसघशीत कमाई; १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood…

In reply to by कॉमी

ताशकंद फाईल्स काय पहिला नव्हता, कारण ट्रेलर पाहून भारी प्रोपोगंडा वाटला. बरोबर आहे अडचणीचे प्रश्न विचारणारा चित्रपट असला तर मग तो प्रोपोगंडा! तुम्ही, एन्डीटिव्ही, अनुपमा चोप्रा, कपिल शर्मा ही एकच भाषा बोलतात तेव्हा नेमका प्रोपोगंडा उघडा पडून जातो!

In reply to by चौकस२१२

पुरोगामी बडवायचे तर खुशाल बडवा हो पण बाजीराव मस्तानीवर तर देशप्रेमीही खट्टू झाले होते की, पिंगा गाण्यावर टीका, बाजीरावच्या तोंडी असलेल्या डायलॉगवर टीका, कथानकावर टीका, जणू काही भन्साळी पैसा कमवायला नाही इतिहासाचे धडे द्यायला काढणार होता बाजीराव मस्तानी. इथं बाजीराव मस्तानीला शिव्या घालणाऱ्यात पापभिरू, सज्जन, टॅक्सपेयर देशभक्त म्हणून नावाजलेले मिपाकर पण होते, आता काय करावं मग ? त्यांना लिब्रांडू म्हणावं का सिनेमाला एकंदरीत सगळीकडूनच शिव्या पडत होत्या म्हणावं चौकसजी ?

In reply to by जेम्स वांड

शेवटी भन्साळीच तो,आधी मसाला भरून पैसाच कमावणार पण घुमर गाण सिनेमात घेण्यासाठी त्याला टेक्नोलॉजीने आक्षेपार्ह गोष्टी नीट कराव्या लागल्या ज्या पिंगाच्या बाबतीत नाही घडून शकल्या :( इतिहास घडवणार्या प्रत्येक स्त्रीची प्रतिमा जपलीच पाहिजे.

In reply to by Bhakti

आर यु मिसिंग द पॉईंट एंटायरली ? एकदा रीव्हिजिट करा ही विनंती.

In reply to by जेम्स वांड

बाजीराव मस्तानी बद्दल , यांवरून माझेही "अगदी कर्मठ हिंदुत्ववाद्यांनशी वाद झाले आहेत पिंगा = मंगळागौर . त्यात काय गैर ते काय? फक्त स्त्रिया असे उत्सव खाजगीत साजरे करायायच्या कि मल्हारी: = चपखल गाणे .. पेशवे बाजराव हे केवळ खलबते करणारे नवहते तर ते सामान्य सैनिकांच्यात मिळून मिसळून , झालेलया अनोख्या ( अतरंगी ) विजयाचा आनंद साजरा करीत आहेत हे दाखवलाय .. काय गैर त्यात.. आप्ल्याला पेशवे म्हणजे फक्त छान कपडे घालून दरबारात खलबते करणारे असे बघायची सवय झालेल्याना हे पचले नाही ! .. खास करून शेवटी त्यांचे सैनिक मानवी सिहांसन करून त्यावर बाजीराव बसतो , हे एक, त्याला सर्वसामान्य सैनिकाने स्वीकारण्याचे प्रतीक असे दिग्दर्शकाला दाखवयायचे होते असे मला वाटते .... असो एकूण काय कि असे मराठा साम्राज्यवार ऐतिहसिक चित्रपट निघतील त्यात अर्थातच मुघलनचं विरुद्ध असे प्रसंग असणार कि , पोटशूळ मि म्हणले ते हे कि असे चित्रपट "निघालेच कसे आणि त्यातील काही चालेलच कसे कसे " यावर सर्व लिब्रा,,,,, वैतागलेली आहेत ( कारण त्यांना असे वाटते कि या चित्रपटातून "कोणा अल्पसंख्यान्कांच्या " भावना तर दुखावल्या जाणार नाहीत !)

In reply to by चौकस२१२

चौकसजी, पण एकंदरीत देशप्रेमी जनतेनेही त्याकाळी निरर्थक गिल्ला केला होता असे मी म्हणतोय, त्यामुळे असल्या सिनेमांना फक्त लिब्रांडू लोकांनी विरोध केला म्हणण्याला फारसा आधार नसावा असे मी सुचवतोय.

In reply to by जेम्स वांड

कंदरीत देशप्रेमी जनतेनेही त्याकाळी निरर्थक गिल्ला केला होता हो सहमत आहे .. पण मी त्या यादीत त्या चित्रपटाचा उल्लेख केला कारण कि विषयाला धरून होते . पूर्वी चाह्या (पोलिटिकल करेकंटनेस ) राज्यात असल्या विषयवार ( ज्यात सरळ स्वराज्यासाठी हिंदू ना मुस्लिम आक्रमकांशी लढावे लागले हे सरळ सरळ दाखववयाला जवळ जवळ वैचारिक बंदी होती )

In reply to by जेम्स वांड

"अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावतील ना" हे ४७ पासून चालू आहे ... अदृश्य बंदी ! सोंग किती करता राव ! जणू बहुसंख्यकांना भावनांच नाहीत कोणी म्हणत नाहीये कि हिंदुत्ववादी वैग्रे बना म्हणून पण निदान निधर्मी खरा सर्वधर्म संभव तरी राबवा हो.. किती ना समजल्यासारखा करताय .. जगभर २ अब्राहमीक धर्म एकमेकांवर कुरघोडी करत असताना हिंदूंना आणि बुद्धांना आणि शिखांना कसे हळू हळू नामशेष करण्याचा अजेंडा राबवत आहेत ते जरा बघा, जगात ओळीने अश्या विषयवार बिनधास्त चित्रपट काढले आणि ते चालले कि सुरु जळफळाट ...

In reply to by चौकस२१२

:O मी कुठं म्हणतोय बहुसंख्याक लोकांनां भावना नसतात ? मला कश्याला पर्सनल होऊन बोलताय सरजी आपण ?

व्यावसायिक दृष्टिकोन हा प्रमुख उद्देश असतो. समाज विरोधी, समाजविघातक समाजभिमुख आशी वादळे उठवून बाॅक्स ऑफिस वर जास्तीत जास्त पैसे कमवायचे.कोट्यावधी पैसे कमवल्यावर समाज हिता साठी लावणारे कमीच.

In reply to by कर्नलतपस्वी

विवेक रंजन चे व्हिडियो पाहिले असता असे काही असेल असे वाटत नाही. पण तुमचे म्हणणे बॉलिवुड गँग बाबत खरे असू शकते. तेथे कमावलेले पैसे त्यांच्या साहेबांकडे कसे जात असतील याचे अनुमान काढता येते.

हरियाणा सरकारने 'द काश्मीर फाइल्स' करमुक्त घोषित केला, तिकिटांवर कोणताही राज्य जीएसटी आकारला जाणार नाही. या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की चित्रपटगृहे ग्राहकांकडून राज्य जीएसटी वसूल करणार नाहीत आणि राज्य जीएसटीची रक्कम वजा करून तिकीटे किमतीत विकावी लागतील.

In reply to by निनाद

स्वतःला हिंदू हितवादी समजणारी, शिवसेना, ह्या बाबतीत काय निर्णय घेणार? हे बघणे रोचक ठरेल ...

In reply to by मुक्त विहारि

महाविकास आघाडीत 'शिवसेने'ला काळ कुत्र देखील विचारत नाही. सर्व अधिकार भ्रष्टवादी कॉंग्रेसच्या हातात आहेत आणि ते काही हिंदू हितवादी नाहीत. तेंव्हा करमुक्त तर सोडाच उद्या या चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी नाही आणली तर ती मोठी गोष्ट होईल.

In reply to by प्रसाद_१९८२

सध्या हिंदू हितवादी भाजपचे विधानसभा निवडणूकीतले यश बघता, महाराष्ट्र सरकार, चित्रपट दाखवायला आक्षेप घेणार नाही. उदारमतवादी हिंदूंना कसे हाताळायचे? हे कॉंग्रेसला नक्कीच माहिती आहे...

काही समाजाच्या लोकांनी मागणी केल्यामुळे भिवंडी मध्ये पीवीआर या थेटरने द काश्मीर फाइल्स चे शो बंद केले होते. पण नागरिकांनी आवाज उठवल्यावर यातला एक शो दाखवला गेला आहे असे पळसुले यांच्या फेसबुक पोस्ट वरून कळते. मुस्लिम बहुल शहरात या सिनेमाचे शोज दाखवू नयेत म्हणून दबाव आला असल्याचे संकेत आहेत असे दिसते आहे.

kashmir files वर फार लिहून आलयं.सर्व भावनाप्रधान कढ काढण्यावर आहे. ही मार खाण्याची story झाली, कधी मार देण्याची story असू शकते असा विचार केला नसेलच कोणी. मला असं वाटतं पुढचा पिक्चर अग्नीहोत्री ने 'गोपाल पाठा' वर काढावा. मराठीत आपण पठ्या म्हणतो, गड्या किंवा मित्रा याअर्थी, बंगाली पाठा म्हणत असावेत. म्हणजे परीस्थीती हीच,किंवा याहून खराब कारण म.गांधी उपस्थीत. फरक फक्त गोपाल पाठा उपस्थीत असणे....बास check wikipedia एक बंगाली खाटीक होता, गोपाल. त्याला गोपाल पाठा म्हणायचे. http://surajlmishra.blogspot.com/2019/10/gopal-patha.html?m=1

In reply to by बाजीगर

kashmir files वर फार लिहून आलयं.सर्व भावनाप्रधान कढ काढण्यावर आहे. ही मार खाण्याची story झाली,
आजकालचे जग आमच्यावर कसे अन्याय झाले किंवा होतायेत याचे रडगाणे गाण्याचे आहेत. पाशात्य माध्यमे, भारतीय हिंदु कसे क्रिश्चन आणि मुस्लीमावर अन्याय करत आहेत ह्याचे रडगाणे गातात. गुजरात दंगल, चर्चवर होणारे हल्ले याचे सारखेच पीठ पाडतात. आपण पण तेच केले पाहिजे.

In reply to by Trump

आपल्यावर अमानूष अत्याचार झालाय, ह्याचं documentation आणि प्रसार झालाच पाहिजे, हे आपलं म्हणणं पटलं. विषेशत: तरुणपिढी ला हे कळलं पाहिजे.

कायप्पा वरून साभार: एक विनंती आहे. खूप जण म्हणत आहेत, "आम्हाला काश्मीर फाईल्स पाहवणार नाही" ठीक आहे! पण जरी पाहिला नाहीत तरी तिकिटे काढा. हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर तुफान चालला पाहिजे. विवेक अग्निहोत्री यांनी नाना अडचणी आणि त्रास याला तोंड देत हिंदूंवरील अनन्वित अत्याचाराचा दाबून ठेवलेला सत्य इतिहास मांडायला हा चित्रपट बनवला. ही हिम्मत आतापर्यंत कोणीही केली नव्हती. त्यात बॉलिवूडमधील नशेडी , माफियाचे कुत्रे रिलीज करायला धड थिएटर मिळू देत नाहीयेत. कपिल शर्माने प्रमोशनला नकार दिला या बातम्या आपण ऐकतोय. तरीही सगळ्याला तोंड देत सिनेमा रिलीज झालाय. खानांच्या तालावर नाचणाऱ्या बॉलिवूडमधील या प्रो हिंदू इकोसिस्टिमला फ़ंडिंग आपणच केले पाहिजे. हा पिक्चर जर चालला नाही तर भविष्यात कोणी हिंदूंच्या बाजूने बोलण्याची, वाचा फोडण्याची किंवा काही कलाकृती बनवण्याची हिंमत दाखवणार नाही हे लक्षात ठेवा! त्यामुळे सर्व हिंदू भगिनी आणि बांधवांना हात जोडून विनंती आहे, की जरी तुम्ही चित्रपट पाहणार नसाल तरी तिकिटे काढा. मग सिनेमाला जा किंवा जाऊ नका. पण तिकिटे काढाच.

केंद्रात हिंदू वादी सरकार आहे पूर्ण बहुमत आहे सरकार का. देशाच्या बहुसंख्य जनतेचा आजुन पण सरकार ल पाठिंबा आहे सरकार कडे काश्मिरी पंडित न साठी काही ठोस कार्यक्रम आहे का? त्यांच्या विषयी खरेच तळमळ असेल तर त्यांना त्यांच्या मुळ जागी परत त्यांना वसवले पाहिजे त्यांच्या मालमत्ता परत मिळवून दिल्या पाहिजेत. पण अशी काही योजना सरकार कडे नाही. रडगाणे किती दिवस गाणार. रडगाणे कोणी ऐकत नाही ठोस उपाय पाहिजेत योजना पाहिजे. इथे पण परत पोकळ भावना भडकून देण्याचा उद्योग च चालू आहे काश्मीर फाईल ह्या सिनेमाचा आधार घेवून. फक्त पोकळ प्रेम ..

In reply to by sunil kachure

इथे पण परत पोकळ भावना भडकून देण्याचा उद्योग च चालू आहे काश्मीर फाईल ह्या सिनेमाचा आधार घेवून. फक्त पोकळ प्रेम .. sunil kachure यांचा मी जाहीर धिक्कार करतो ...

In reply to by चौकस२१२

sunil kachure यांचा मी जाहीर धिक्कार करतो ...
आणि त्यांचे प्रतिसाद वाचून, त्यावर प्रतिसाद लिहीणार्‍या तुमच्यासकट सर्वांचा मी 'जाहीर धिक्कर' वगैरे करतो.

बहुचर्चित काश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्यात दाखविलेल्या घटनांविषयी शाळेत असताना झेलमची हाक म्हणून एका पुस्तिकेत आणि नंतर जगमोहन यांच्या My frozen turbulences in Kashmir या पुस्तकात वाचले होते. मला पुरोगामी विचारवंत या जमातीविषयी जितकी घृणा आणि तिरस्कार आहे तितका माझ्या ओळखीतल्या कोणालाही असणे शक्य नाही. तरीही हा चित्रपट बघून त्यांच्याविषयीचा संताप आणखी वाढला आहे. अमेरिकेत झालेल्या घटनेवर हे लोक Black lives matter हे hashtag चालविणार. इस्राएल-Palestine मध्ये काही झाले की यांना लगेच मानवता आठवणार. पण मग काश्मीरी हिंदूचा विषय आला की मग यांच्या तोंडाला कुलूप लागते. खरं तर या लोकांसाठी All lives other than Hindu lives matter हा योग्य hashtag आहे. त्या लोकांचे धोरण तेच असते. बस आता ठरले. या पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांवर कडकडीत बहिष्कार टाकायचा. समाजकार्याच्या नावावर हे लोक हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत असतात. त्या संस्थाना वाळीत टाकायचे. हे सगळे लोक इतके कट्टर मोदीविरोधी का असतात याचे खरे कारण मोदींनी या लोकांना मिळणारा चखणा बंद केला आहे. आणि हे असले लोक सिव्हील सोसायटीचे प्रतिनिधी असतील तर मरो ती सिव्हील सोसायटी. त्यांच्याविषयी कोणीही अश्रू ढाळायची गरज नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

या पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांवर कडकडीत बहिष्कार टाकायचा. समाजकार्याच्या नावावर हे लोक हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत असतात. त्या संस्थाना वाळीत टाकायचे. हे आपण सर्वांनी करायचे आहे. म्हणजे दणका बसेल. यांच्या एन जी ओज, यांचे वार्ताहर, यांचे चित्रपट समिक्षक, यांचे वकील, यांना सहाय्य करणारे प्राध्यापक या सर्वांना जेथे दिसेल तेथे उघडे पाडले गेले पाहिजे. डावे पुरस्कृत चित्रपट बनवणारे - भट कुटुंबीय, खान मंडळी, बच्चन गट हे सर्व या इको सिस्टीमचा भाग आहेत हे लक्षात आले की अक्षरश: डोळे उघडतात. त्यातले एकमेकांचे संबंध सहजतेने दिसू लागतात.

निनाद, धाग्याबद्दल आभार. मला हा चित्रपट बघायची इच्छा नाही. अगदी १९९० सालापासनं काय व कसं घडंत गेलं त्याची जाणीव आहे. परत तो विषय नकोसा वाटतो. माझे बापजादेही काहीशे वर्षांपूर्वी असेच काश्मीरातनं हाकलले गेले होते. कदाचित जरा कमी हिंसक प्रकारे असेल, पण हाकलले गेलेले हे नक्की. काश्मीरातनं परतपरत हिंदूंची हाकलपट्टी होत होती. आज इतक्या शतकांनी त्यास वाचा फुटते आहे हे योग्य दिशेने पडलेलं पाऊल आहे. काश्मीरी विखरणाचा ( = डायास्पोरा ) एक सदस्य म्हणून माझी मती गुंग झाली आहे. जाताजाता : मागे राजीव गांधींवर काहीतरी आक्षेपार्ह टिपणी केल्यामुळे माझं सदस्यत्व गोठवलं होतं. चूक माझीच होती. रीतसर माफी मागितली. प्रशासकांनी क्षमा करून सदस्यत्व परत सुरू केलं. राजीव गांधींविषयी तीव्र भावना बाळगण्यामागील कारण हा चित्रपट पहिल्याने कळतं. बस इतकंच. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

यांची इकोसिस्टिम फार ताकदवान आहे. - हो अजूनही आहे! भारतातील डाव्या आणि साम्यवादी लोकांची इकोसिस्टिम उघडी पाडण्यात विवेक रंजन अग्निहोत्री यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या '''अर्बन नक्षल''' या पुस्तकात नक्षल गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी शहरी भागातील लोकांचे गट कसे पुढे येतात हे त्याने दाखवून दिले आहे. या गटात वार्ताहर, वकील, प्राध्यापक आणि समाजात प्रतिष्ठेचा बुरखा घतलेले अनेक लोक सामील असता किंवा सामील करून घेतले जातात. हे लोक त्यांना हव्या असलेल्याच बातम्या माध्यमात पेरतात. त्यांना हव्या असलेल्या दृष्टीनेच बातमीचे चित्रण केले जाते. मग गुन्हेगारांना बळी असल्याचे भासवले जाते. अशा रीतीने या गटाने दबाव निर्माण करायचा आणि सरकारला काम करू द्यायचे नाही असा साधारण डाव्या विचारधारेचा कामाची शैली असते. यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाया करणे अशक्य होते. मग परत नवीन गुन्हेगारी सुरू होते असा निष्कर्ष त्यांनी आपल्या संशोधन लेखनातून काढला आहे. यासाठी त्यांनी अनेक पुरावे आपल्या पुस्तकात दिले आहेत. आपण विचार केल्यावर असे अनेक पुरावे जागोजागी आपल्याला दिसून येतात. आपली कार्य शैली उघडी पडल्याने अनेक डाव्या विचारधारेच्या लोकांनी अग्निहोत्री यांना प्रचंड विरोध केला आहे. त्यांची विश्वासार्हता नाही हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. आपली वेदना हीच माझीही वेदना आहे गा मा साहेब!

राजकारण बाजूला ठेवून The Kashmir file एक सिनेमा आहे . आणि सिनेमा एक व्यवसाय आहे बाकी व्यवसाय सारखा.. त्या बद्धल इतकेच राजकारण जरा पण इतके बिनडोक ,स्वार्थी करू नका की ते देशालाच संकटात टाकेल. अतिरेकी धर्मवाद मुळे पाकिस्तान ची स्वतःची आज ची अवस्था काय आहे पूर्ण मुस्लिम धर्मीय राष्ट्र आहे तरी हे अतिरेकी विचाराचे जल्लाद मशिदी मध्ये,शाळेत पण आत्मघाती हल्ले करतात..एक धर्मीय च आहे... मुस्लिम धर्मीय दुबई ,सौदी पण आहे पण तिथे असे घडत नाही भारतात धार्मिक उन्माद निवडणुका जिंकण्यासाठी कोणी वापरू नका. मग ते मुस्लिम असतील ,हिंदू असतील नाहीं तर बौद्ध देशाला रसातळाला घेवून जाईल हा स्वार्थ त्या पेक्क्षा भारताची न्याय व्यवस्था मध्ये . सुधारणा करा..पोलिस यंत्रणा सशक्त बनवा.active बनवा. अंतर्गत सुरक्षा इतकी मजबूत आणि talented हवी की कोणताच गुन्हेगार कोणत्या ही धर्माचा असू त्याला कठोर मधील कठोर शिक्षा लगेच मिळेल .धर्म देश एकत्र ठेवू शकतं नाही .अनेक उदाहरणे आहेत ..न्याय,सुशासन ,भेदभाव बिलकुल नसणे. आणि बलाढ्य आर्थिक स्थिती ह्याच गोष्टी देश एकत्र ठेवू शकतात . हे लक्षात ठेवा. नाही तर आज सत्ता मिळण्यासाठी केलेल्या उचापती पुढच्या पिढी लं नरकात ढकलतील.

- माझ्या गावात २च खेळ लावले होते, काही कारणाने जाता आले नाही परंतु तिकिटाचे २८ डॉलर मी विवेक रंजन अग्निहोत्रींच्या कार्यासाठी या ना त्या पद्धतीने पोचवण्याचा पण केला आहे - या शिवाय काही मित्रानि मिलून , मुद्दामून दुकानात जाऊन " नॉन हलाल " मिळेल काय असे विचारायचा उपक्रम हाती घेतला आहे ( भादीपचं भाषेत शांतीत क्रांती ) पशिमत्य देशात रहनर्या मिपकरन्न हि हे आवाहन कि अपण पण असे करुन बघा...( कल्पना पटत अस्ल्यास ) बाकी सर्व पूरो गाम्यांना काय बोलू.... आम्ही हरलो हो बरोबर आहे तुमच, हिंदूंच्यावर अत्याचार कधीच होत नाहीत ... आणि झाले तरी त्या बद्दल शष्प बोलणे दुःख करणे , हे महापाप आहे .. आपला एक उदास हरलेला हिंदू

एकूणच या चित्रपटाच्या निमित्ताने जमात-ए-पुरोगामी चा तडफडाट होत आहे ते बघता बाण योग्य ठिकाणी लागला आहे याची खात्री पटते.

इतिहासातीलच नव्हे तर कोणाहि स्त्रीची प्रतिमा जपलीच पाहिजे. या सिनेमात हिन्दु पन्डितान्च्या स्त्रियावर झालेले अत्याचार पाहून अस्वस्थ झालो॰

गेली अनेक वर्षे पुरोगामी विचारवंत आणि त्यांच्या संस्था समाजकार्याच्या नावाखाली हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेत आहेत असे दिसते. यात देशातील तसेच परदेशी वर्तमानपत्रे, टीव्ही चानेल्स, अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि वृत्तसंस्था पण आहेत.